वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
शेतीमध्ये पारंपरिक ज्ञान व शास्त्रज्ञांच्या शिफारशी यांच्या जोडीला स्वतःची कल्पकताही आवश्यक असते. विविध शेतकऱ्यांच्या उदाहरणांमधून अशा कल्पना सर्वांच्या पुढे येत असतात.
बाबुराव वानखेडे हे अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील आमला गावचे एक कल्पक शेतकरी. त्यांनी अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयात इंटर कॉमर्सपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर स्वतः शेती करण्यास सुरुवात केली. काही वर्षे बाबुराव दर्यापूर पंचायत समितीचे सभापती होते. त्या वेळी सरकारी धोरणाप्रमाणे त्यांना रासायनिक खते व कीटकनाशके यांचा प्रसार करावा लागत असे आणि स्वतःच्या शेतीत त्याचा वापर ते करीत असत.
१९७७-७८ सालापासून ते सेंद्रीय शेती पद्धतीने शेती करतात. आहे. एका वर्षी ते शेतात तूर आणि मूग अशी एकत्रित पिके घेतात. दुसऱ्या वर्षी त्याच शेतात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने संशोधित केलेल्या डीएचवाय- २८६ या कापसाच्या जातीची लागवड करतात. या जातीच्या पानांवर जास्त दाट लव असते. त्यामुळे नैसर्गिकपणे मावा, तुडतुडे व पांढरी माशी या किडींपासून पिकांचे संरक्षण होते. कीटकनाशके वापरायची गरज पडत नाही. झाडांची उंची ७० -७५ सेमी असल्याने कापसाची वेचणी सहज करता येते. बाबुराव कोणत्याही पिकाला रासायनिक खत देत नाहीत किंवा रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करीत नाहीत. तरीही त्यांच्या पिकांवर किडी आढळत नाहीत. या कापसाच्या शेतात आदल्या वर्षी तूर आणि मूग घेतल्याने या पिकांची पाने शेतात गळालेली असतात. त्या पानांचे खत कापसाच्या पिकाला मिळते. त्यामुळे वेगळे खत देण्याची गरज पडत नाही. बाबुरावांनी काही वर्षे सोयाबीनचे पीक घेतले. या पिकांवर किडी व रोगांचा प्रादुर्भाव जास्त असतो. शिवाय सोयाबीनच्या पिकाला बाजारभाव कमी मिळतो. त्यामुळे हे पीक घेण्याचे बंद केले.
बाबुराव वानखेडे विदर्भ सेंद्रीय कापूस उत्पादक शेतकरी संघाचे सदस्य असल्यामुळे त्यांच्या कापसाची निर्यात होते आणि भाव जास्त मिळतो.
लेखक : सुरेश खडसे
जागतिक तापमानवाढ, वितळणारे हिमनग, कार्बन-डाय-ऑक्साइडचे वाढते प्रमाण, समुद्राच्या पाण्याच्या पातळीतील वाढ या व इतर अनेक गरमागरम बाबींवर पर्यावरणवादी अतिरेकी जो गहजब माजवतात, तो किती खरा, किती खोटा? विकसित देश विकसनशील देशांची कशी दिशाभूल करतात, त्यामुळे ‘जागतिक तापमानवाढ’ हे खरोखरीचे एक महासंकट आहे, की ही एक महाफसवणूक आहे, हे आता आपल्यालाच ठरवायचे आहे…..
मंत्रालयाला लागलेल्या आगीत सरकारची आपत्कालीन संरक्षण यंत्रणा भस्मसात झाली. आणीबाणीच्या प्रसंगी ज्या यंत्रणेवर विसंबून राहावे, तीच आपत्तीची बळी ठरत असेल, तर मुळातच कुठेतरी भयंकर चूक होत असल्याचे मान्य करावे लागेल. हा संदर्भ केवळ मंत्रालयाच्या आगीपुरता मर्यादित नाही. या सरकारच्या धोरणाने संपूर्ण राज्य आणि त्यातही गरीब शेतकरी वर्ग अगदी नेमाने संकटाच्या आगीत होरपळत असतो. त्यातही विदर्भातील शेतकर्यांची दैना अधिकच अस्वस्थ करणारी आहे. सरकारने आपले अर्धे मंत्रालय नागपूरला हलविले, तर किमान या शेतकर्यांना हे सरकार आपल्यासाठी काही करू इच्छिते याचे समाधान तरी लाभेल.
चित्रपटात रंगभुषाकार (अमोल कोल्हे) कांबळी केशवची कला ओळखत निर्मात्यांशी बोलून अनेक नाटकांमध्ये त्याला भूमिका मिळवून देण्यापासून ते स्वत:च्या घरात रहाण्याची सोय करण्यापर्यंत सर्वतोपरीने मदत करतात. केशवची भूमिका असणार्या नाटकांना ज्यावेळी प्रेषकांकडून दाद मिळू लागते व तो लोकप्रिय नायक म्हणून प्रेषकांसमोर येतो, त्यावेळी सहाजिकच रूपेरी पडद्यावर देखील नायक म्हणून ऑफर्स मिळतात
जगात भाषाच नसती तर? भाषेशिवाय जगाची कल्पनाच होऊ शकत नाही. माणसाला भाषा अवगत नसती तर माणसात आणि जनावरात फरकच उरला नसता…
बेळगाव महानगरपालिका बरखास्त करण्याच्या कर्नाटक राज्य शासनाच्या निर्णयावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा घडवून आणू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेळगाव महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
अलिकडे चांगल्या मराठी विषयांच्या चित्रपटांची निर्मिती होय, सर्वार्थाने आधुनिक तंत्राचा वापर जरुन प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न अनेकनिर्माते आणि प्रॉडक्शन हाऊसेस करत असताना, दुसरीकडे प्रेक्षक ही मराठी चित्रपट पहाण्यासाठी थिएटर्सकडे आकृष्ट होताना दिसत आहेत तात्पर्य, चांगल्या मार्केटिंगचा परिणाम आता मराठी बॉक्स ऑफिस वर पहायला मिळतो आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेषकांच्या पुरेपूर टाइमपास होईल (म्हणजे उत्तम कलाकृतीच्या माध्यमातून मनोरंजन होत राहील) याची काळजी घेतली आहे. टाइमपास या चित्रपटाची कथा आहे दगडू (प्रथमेश परब) आणि प्राजक्ता (केतकी माटेगावकर)ची ; तारुण्यात नुकतच पदार्पण केलेल्या दोन मुलांच्या भावविश्वाभोवती फिरणारी ही कथा;
ठाणे शहराचे महापालिका आयुक्त आर ए राजीव यांनी ठाणे खाडी किनाऱ्याच्या पूर्वेला १०० चौरस किलोमीटर क्षेत्रफळात नवीन शहर बसवण्याचा निर्णय नुकताच जाहिर केला. या निर्णयाबाबत ज्येष्ठ पत्रकार श्री संदीप प्रधान यांनी आयुक्तांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी बातमी लिहिली. ही बातमी सोशल नेटवर्कींगच्या आणि इ-मेल्सच्या माध्यमातून शेकडो वाचकांपर्यंत पोहोचली. मराठीसृष्टीच्या वाचकांनाही ही माहिती विनासायास मिळावी या एकाच हेतूने ही बातमी येथे पुनर्प्रकाशित करत आहोत.
सचिन पिळगांवकर यांचा चित्रपट म्हणजे सर्वार्थाने वेगळा असतोच, आणि प्रेक्षकांची दाद सुद्धा त्यामुळेच मिळत रहाते हे त्यांनी दिग्दर्शित, निर्मिती केलेल्या चित्रपटांतून लक्षात येतं. नेमकं हेच वैशिष्ट्य हा चित्रपट पहाताना लक्षात येईल.
Copyright © 2025 | Marathisrushti