वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

चीनच्या भिंतीला चीनच्या इतिहासात अनन्यसाधारण महत्त्व आहे. उत्तरेकडून होणाऱ्या भटक्या टोळ्यांचं आक्रमण रोखण्यासाठी बांधलेल्या या पूर्व-पश्चिम भिंतीची एकूण लांबी एकवीस हजार किलोमीटर इतकी प्रचंड आहे. अनेक राजवटींच्या काळात केलं गेलेलं या भिंतीचं बांधकाम, इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात सुरू होऊन ते इ.स.नंतरच्या सतराव्या शतकापर्यंत चालू होतं.
February 3, 2024
श्रीकृष्ण रुक्मिणी एकांतात गप्पा छाटत होते, अचानक रुक्मिणी लाडात येऊन म्हणाली, मी तुम्हाला कशी आहे असे वाटते. श्रीकृष्ण स्मित हास्य करून म्हणाले, रुक्मिणी काय सांगू तुला, तुझे महत्व माझ्यासाठी अनमोल आहे, तू अगदी मिठासारखी आहेस.
का...........य, मी मिठासारखी खारट वाटते तुम्हाला, आणि मुसमुसून रडायला सुरवात झाली. श्रीकृष्ण तिला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण रुक्मिणी काही केल्या शांत होईना. शेवटी कृतीने दाखविण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर, श्रीकृष्ण पुढे काही न बोलता तिथून निघून गेले.
ते तडक भटारखान्यात गेले, सर्व आचाऱ्याना सक्त ताकीद दिली, कि आज पासून कोणत्याच खाद्य पदार्थात मीठ टाकायचे नाही, हे ऐकून भटारखान्यातील सर्व कर्मचारी स्तब्ध झाले. दुसऱ्या दिवशी सार्वजनिक जेवण होते, राज्यातील, थोर लोक या खास भोजनास आमंत्रित होते. सर्व पंच पक्वान्ने करण्यात आचाऱ्यांनी कोणतीच कमतरता दाखवली न्हवती.
श्रीकृष्ण रुक्मिणीला सर्वाना जेवणाचा आग्रह करण्यासाठी विनंती करून दुसऱ्या कक्षात निघून गेले. सर्व पाहुणे जेवायला बसले, परंतु पहिला घास तोंडात घालताच सर्वांची तोंडे वाकडी झाली. साक्षात महाराणी सर्वांच्या समोर जातीने हजार होत्या, पण कुणालाही जेवण घशाखाली उतरत न्हवते. हळूहळू पाहुण्यांनी कुजबुज सुरु केली, व मीठ मागण्यास सुरवात केली. वाढपी सर्व जिन्नस वाढायला तयार होते, पण मीठ कोणीच द्यायला तयार न्हवते. रुक्मिणीच्या काय होतंय समजेना, कुणीही स्पष्ट बोलेना व नीट जेवताना दिसेना.
शेवटी रुक्मिणी स्वतः भटारखान्यात जाऊन पदार्थांची चव घेऊ लागल्या, तर लक्षात आले, कशातही मीठ न्हवते. मुख्य आचाऱ्याला याचे कारण विचारता, त्यांनी महाराजांची तशी ताकीद आहे असे सांगून, मीठ वाढणार नाही असे स्पष्ट सांगितले.
रुक्मिणी तडक श्रीकृष्ण बसलेल्या कक्षात गेल्या, व त्यांच्यावर तोंडसुख घेऊ लागल्या. काय हे मिळमिळीत जेवण बनवायला सांगितले आहे, कोणत्याही पदार्थात मीठ नाही, कोणीही आनंदाने जेवत नाही, आणि तुम्ही त्या सर्वांच्या समोर मला धाडून इथे आराम करत आहात. श्रीकृष्ण तिला पाहून गालातल्या गालात हसत होते, म्हणाले कसले जेवण म्हणालीस, परत म्ह......ण. हो......हो मी म्हणत आहे मि...ळ...मि.....ळी....त, चव रहित जेवण का बनवायला सांगितले?
श्रीकृष्ण म्हणाले मी उत्तम स्वयंपाक बनवायला सांगितला होता, सर्व उच्च प्रतीचे मसाले बनवून स्वयंपाक केला आहे, त्या मुळे स्वयंपाक चांगला झालेला आहेच, यात कोणतीच शंका नाही. हं, मी फक्त कशातही मीठ टाकू नका इतकेच सांगितले, पण त्याने काय फरक पडतो, इतके सुरेख मसाले, उच्च प्रतीचे धान्य, व राज्यातील नामवंत आचारी जर जेवण बनवत असतील तर फक्त मीठ ते हि चिमूटभर न टाकल्यामुळे जेवण का मिळमिळीत होणार आहे?
आता तुला समजले असेलच मिठाचे महत्व, जेवणात मीठ नसेल तर सर्व मिळमिळीत लागणार यात शंका नाहीच, हे सिद्ध करायचे होते म्हणून हा घाट घातला. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, काल मी तुला मिठासारखी आहेस म्हणालो, तर तू रागावलीस, रुसून बसलीस, मग तुझे माझ्या जीवनातील महत्व काय आहे हे समजविण्यासाठी, मला हे सर्व करावे लागले. माझ्या जीवनात सर्व काही उदात्त आहे, पण तू मिठासारखी असल्यामुळे या जीवनाला एक उत्तम चव आलेली आहे, व त्याचा आनंद मी उपभोगतो आहे. जाऊ...दे, आपले संवाद नंतरही सुरु राहतील, आधी आचाऱ्याना बोलाव, मी सर्व पदार्थात मीठ टाकायला सांगतो, पाहुणे मला नावे ठेऊदेत, पण त्या अन्नाला नको, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.
रुक्मिणी आता वरमली, म्हणाली नाथ काल मी जे रागावले ती माझी चूक झाली. असो, मीठ अन्नात हवेच पण ते चवी पुरते... हे मला पूर्ण उमगले..असे म्हणत भटारखान्यात निघून गेली.
आपल्या जीवनातही आपले वागणे चिमूटभर मिठासारखे असावे, मुलीच्या किव्वा मुलाच्या आई वडिलांनी चवीपुरते मुलांच्या संसारात लक्ष घालावे. आई वडिलांनी मुलांच्या संसारात अती लक्ष घातल्यामुळे ते मोडकळीस आलेले आज दिसून येतात, याचे कारण अती लुडबुड हि मिठाच्या खड्यासारखी खारटपणा आणते, त्याने मुलांचे जीवन बेचव होते, हीच गोष्ट सर्वांच्या जीवनाला लागू होते.
आता आरोग्याबाबतही मिठाचे महत्व अनन्यसाधारण आहे, अती तिथे माती हे मिठास योग्य तर्हेने लागू होते. अती मीठ सेवन केल्याने उच्च रक्तदाब होतो, हे लक्षात ठेवा, जेवणात वरून मीठ शक्यतो टाळाच.
मिठास जागा, मिठावर जगू नका.....
विजय लिमये
(9326040204)
March 13, 2017
तुमचे पद मग ते कितीही मोठे असो पण ते पद काही मायक्रॉन विषाणू वाट लावू शकतो हे लक्षात घ्या. आपल्या पुढल्या पिढ्यासाठी तर थांबा असे संगितले पाहिजे, नाहीतर तिसऱ्या पिढीत किंवा त्यानंतर सत्यानाश निश्चित , विचार करा ?
June 21, 2021
प्रकाशन दिनांक :- 16/05/2004
चौदाव्या लोकसभा निवडणुकीचे अंतिम परिणाम बाहेर आले आणि संसद पुन्हा एकदा त्रिशंकू राहील हे स्पष्ट झाले. या निवडणुकीत मिळालेल्या जनादेशाचे एकाच शब्दात वर्णन करावयाचे झाल्यास त्याला आपण केवळ ‘विस्कळीत’ एवढेच म्हणू शकतो. मतदारांनी कोणत्याही एका पक्षाला किंवा आघाडीला पूर्ण बहुमत तर दूरच राहिले निसटत्या बहुमताच्या जवळपासही फिरकू दिले नाही.
May 16, 2004
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आता जगभरात होत आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेला कमकुवत आरोग्य व्यवस्था असलेल्या देशांमध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची चिंता भेडसावत आहे.
February 18, 2018
तिबेटच्या अस्मिता व संघर्षाचे प्रतीक असलेले आणि निर्वासित जीवन जगताना धैर्य, शांती व अहिंसेचा परिचय देणारे दलाई लामा यांचा ६ जुलै रोजी ८४ वा जन्मदिन होता. त्यानिमित्याने त्यांच्या कार्याची आणि तिबेटी आध्यात्मिक स्वातंत्र्य लढ्याच्या सध्याच्या परिस्थितीची समिक्षा करणे जरुरी आहे.
July 13, 2019
भारतातील पहिली मोनोरेल १९०२ ते १९०८ या काळात कुंडला व्हॅली, मुन्नार, केरळ येथे धावत होती. ही रेल खाजगी मालकीची होती. पुढे त्या मार्गाचं नॅरोगेजमध्ये रूपांतर झालं. १९२४ सालापर्यंत तो मार्ग चालू होता. पुढे पुरात वाहून गेल्यावर तो मार्ग बंद पडला.
पतियाळा राज्यात फेब्रुवारी १९०७ मध्ये मोनोरेल चालू झाली व ती १९२७ मध्ये बंद पडली.
पुढे बऱ्याच प्रतीक्षेनंतर स्वतंत्र भारतातील पहिली मोनोरेल १ फेब्रुवारी २०१४ मध्ये वडाळा ते चेंबूर (मुंबई) अशी सुरू झाली आहे. पहिली मोनोरेल चालविण्याचा मान अलिबागच्या जुईली भंडारे या प्रशिक्षित इंजिनीअर मुलीला मिळाला हे विशेष.
मुहूर्ताच्या दिवशी उत्साही प्रवाशांची प्रचंड गर्दी दोन्ही स्टेशनांवर होती. या मोनोरेल मध्ये एका वेळी ५६० प्रवासी नेण्याची व्यवस्था आहे. प्रवास मजेदार असून, ही मोनो रेल दोन घरांच्या मध्यातून व घरांच्या इतक्या जवळून जाते, की घरात जेवायला बसलेलं कुटुंब, अभ्यास करणारी मुलं यांचंही दर्शन प्रवाशांना होत असतं. मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी ही किती प्रमाणात उपयुक्त ठरणार हा मात्र एक महत्त्वाचा परंतु सध्यातरी अनुत्तरित प्रश्न आहे. साडेनऊ कि.मी. अंतराचं तिकिट सध्या ९ रुपये असून, असे अनेक मार्ग यानंतर बांधण्याची शक्यता विचाराधीन आहे. मुलुंड-गोरेगांव-बोरिवली हा ३० कि.मीटर व ठाणे-भिवंडी -कल्याण ३० कि.मी. असे हे मार्ग बांधण्यास २०,२९५ कोटी रुपयांच्या खर्चाचा अंदाज आहे. पहिली मोनोरेल बांधण्याच्या आर्थिक यशाविषयी शंका असल्याने पुढील मार्ग बांधणे व्यावहारिक ठरेल का हा कळीचा मुद्दा आहे. त्यामधून केवळ राजकीय लाभ मिळविण्याकडे राजकारणी लोकांचे डोळे लागलेले आहेत, पण प्रत्यक्षात या रेलमुळे शहराची वाहतूक समस्या किती प्रमाणात सुटेल याबाबतचा विचार गंभीरपणानेच करावा लागेल.
या सर्व पद्धतीच्या गाड्यांना डबे पुरविणे हा एक स्वतंत्र, पण कठीण प्रकल्प आहे. सुरुवातीला सर्व डबे परदेशांतून आयात केले आहेत व अजूनही करावे लागतात. अशा तऱ्हेचे २०० डबे Hundrai Rotin BEML या कंपनीने पुरविले होते.
सावली (गुजरात) येथे बॉम्बारडिअर कंपनीने २६ दशलक्ष पौंड भांडवल टाकून २००९ मध्ये ६०० डबे बांधण्याचा कारखाना सुरू केला आहे.
श्री-सिटी आंध्रप्रदेश येथे २०१३ साली अल्स्टोम कंपनीने २४३ दशलक्ष पौंड भांडवल खर्ची घालून १५६ एकरांमध्ये भव्य कारखाना सुरू केला आहे. येथून भारताला लागणारे डबे बनविले जातील. डबे परदेशी निर्यातही केले जातील. प्रगत देशांच्या यादीत समावेश व्हावा म्हणून व देशवासींच्या सुखसोयीकरिता हा महाकाय खर्च अटळ आहे.
-डॉ. अविनाश वैद्य
November 18, 2022
‘नोव्हेंबर’मध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ह्या ‘क्रीडाशौकीन, निरोगी, विश्वासू, देखण्या व शिस्तप्रिय’ मानल्या जातात. चालू ‘नोव्हेंबर’ महिन्यामध्ये जन्मलेल्या आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ठसा उमटवलेल्या अश्याच काही प्रमुख जागतिक क्रिकेटवीरांवर तसेच, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले नाव नोंदवलेल्या लक्षणीय भारतीय / मराठी क्रिकेटपटूंवर दृष्टिक्षेप टाकूया.
November 16, 2025
आपण मसालेवर्गाची संपूर्ण माहीती पाहिली आता आपण वळूयात ब-याच मंडळींना न आवडणारा खाद्य गट म्हणजेच पालेभाज्या.
हा विषय घेणार हे एकूनच ब-याच मंडळींनी नाकं मुरडली असणार ह्यात शंकाच नाही.
लहान मुलांना देखील फारशी न आवडणारी आणी आयुर्वेद देखील सांगतो ८ दिवसातून फक्त एक ते दोन वेळेसच हि खावी.
ह्या पालेभाज्या देखील औषधी गुणधर्मयुक्त असतात बरेका त्यामुळे आजपासून आपण काही दिवस किचन क्लीनीक मंध्ये भाजीची मोहीम राभविणार आहोत बरे का!
आता सुरूवात करायची ना? चला तर मग पहिली भाजी पाहूयात.
पालेभाजी - आंबट चुका
हि भाजी प्रामुख्याने देशावर उगवते.ह्याचे झाड हातभर उंच असते.पाने कोमल असतात. चवीला आंबट असते.हि उष्ण असते त्यामुळे शरीरात वात कमी करते आणि कफ पित्त वाढवते.
आता हिचे औषधी उपयोग पाहूया:
१)पानांचा लेप गांधीलमाशीचा दंश झालेल्या भागी व सुजेवर करावा.
२)अपचना मध्ये जेवणाआधी तासभर चुका भाजी,आले,कोथिंबीर व कांदा घालून सूप करावे व ते प्यावे.
३)तोंड कोरडे पडणे,तोंडास चव नसणे,मुख दुर्गंधी ,दांतदुखी मध्ये चुक्याच्या रसाने गुळण्या कराव्यात.
४)चुका रस १ चमचा + कांद्याचा रस १ चमचा हे मिश्रण चामखीळांवर लावावे फायदा होतो.
५)गजकरणावर चुक्याच्या पानांचा रस लावावा.
हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास संडासला पातळ होते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
October 18, 2016
एका देवळात एका रिसायकल होणार्या तेल, फुलं, नारळ वगैरेची आर्थिक उलाढाल बघाल तर थक्क व्हाल. एका शनिवारी एका देवळात किमान १०० लिटर तेल वापरलं गेलं आणि रिसायकल झालं तर देशभरात किती लिटर तेल वाया जात असावं? आणि त्यावर किती जण “माया” कमवत असावेत? हीच गोष्ट दूध, फुलं यांचीसुद्धा !!
November 29, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti