वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगदभक्षकः ।
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला विद्युच्चलं जीवितं
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना ॥१५॥
या नश्वर जगातून वाचवण्यासाठी ईश्वर असणाऱ्या भगवंताला आचार्य श्री प्रार्थना करीत आहेत. ते सांगतात,
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं - पहा! हे आयुष्य रोज कमी कमी होत चालले आहे. वास्तविक आयुष्यातील एक दिवस कमी होणे म्हणजे ईश्वरी सेवेची एक संधी नष्ट होणे आहे. वाढत्या वयासोबत ही जाणीव वाढली नाही, तर वाढ नेमकी कशाची?
याति क्षयं यौवनं- तारुण्य लयाला जात आहे. पर्यायाने क्षमता नष्ट होत आहेत.
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः - एकदा गेलेला दिवस कधीही परत येत नाही. शेवटी पश्चातापच करावा लागेल.
कालो जगदभक्षकः - काळ हा संपूर्ण विश्वाचे भक्षण करणारा आहे. त्याच्या तावडीतून आजपर्यंत कोणी सुटला नाही. आपणही सुटण्याची शक्यता नाही.
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला - ज्या पैशाच्या आधारावर आपण स्वतःला सुरक्षित समजतो तो पैसा पाण्यावरच्या तरंगा प्रमाणे चंचल आहे. कधी, कुठून आणि कसा निघून जाईल सांगता येत नाही. या जगातील मोठमोठी साम्राज्ये, राजसत्ता नष्ट झाल्या मग माझ्या पैशाचा पाड तो किती?
विद्युच्चलं जीवितं - विजे प्रमाणे जीवन चपल आहे. विजे प्रमाणेच त्याला धरून ठेवता येत नाही. अनेकदा ते धक्केच देते.
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना - त्यामुळे शरण आलेल्या माझे, हे शरण देणाऱ्या भगवंता आता आपणच रक्षण करा.
या जगात आपल्या शिवाय सर्व नश्वर आहे. त्यामुळे मी आपल्याला शरण आलो आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
स्तोत्राच्या शेवटी मी जे काही करतो, अर्थात या देह मन बुद्धी च्या द्वारे जे जे काही घडते, त्या सगळ्यांच्या मध्ये माझ्या अज्ञानामुळे ज्या ज्या चुका होतात, त्या सगळ्यां करिता आचार्यश्री एकत्र क्षमायाचना करीत आहेत. ते म्हणतात,
हे चन्द्रचूड मदनान्तक शूलपाणे
स्थाणो गिरीश गिरिजेश महेश शंभो ।
भूतेश भीतभयसूदन मामनाथं
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष ॥ १ ॥
भारतीय संस्कृतीमध्ये, उपासनेचा क्षेत्रामध्ये नामा ला प्रचंड महत्त्व आहे. सर्वच देवतांच्या सर्व पंथात, संप्रदायात नामस्मरण ही समान गोष्ट आहे. भगवंताच्या विविध नामांमधून त्याच्या विविध गुणांचे वर्णन केलेले असते. स्वरूपाचे निर्देशन केलेले असते.
याच कारणाने नामस्मरणाचे हे महत्त्व लक्षात घेऊन भगवान जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराजांनी या स्तोत्रात भगवान शंकरांच्या विविध नामांची गुंफण केली आहे. त्यांचे अर्थ पाहणे देखील तेव्हाचा अनुभव असेल. पूज्यपाद आचार्य श्री म्हणतात,
हे चन्द्रचूड - ज्यांनी आपल्या चुडा म्हणजे केशकलापावर चंद्रकोर धारण केली आहे असे,
मदनान्तक - ज्यांनी आपल्या तृतीय नेत्रातील अग्नीने मदनाला भस्म केले असे,
शूलपाणे- शूल म्हणजे टोक. तीन टोके असल्यामुळे भगवंताच्या आयुधाला त्रिशूल म्हणतात. पाणि म्हणजे हात. ज्यांनी हातात त्रिशूळ घेतला आहे असे, तीनही गुणांचे संचालक.
स्थाणो - परम स्थिर, अविचल,
गिरीश - गिरी म्हणजे पर्वत. त्या हिमालय पर्वतावर जे शयन करतात ते गिरीश.
गिरिजेश - त्या गिरी म्हणजे पर्वतापासून जन्माला आली ती गिरीजा. अर्था देवी पार्वती. तिचे स्वामी.
महेश - सगळ्यात श्रेष्ठ देवता,
शंभो - सगळ्यांचे कल्याण करणारे,
भूतेश - सर्व प्राणिमात्रांचे स्वामी, नियंत्रक, संचालक.
भीतभयसूदन - भीत म्हणजे घाबरलेला . त्याच्या भीती चे कारण ते भय. त्या भयाला जे दूर करतात ते भीतभयसूदन.
मामनाथं
संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष - हे जगदीशा ! माझ्यासारख्या अनाथांचे या संसाराच्या गहन दुःखातून रक्षण करा.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
श्री शांकर स्तोत्ररसावली
हे पार्वतीहृदयवल्लभ – हे संबोधन मोठे मजेदार आहे. यातील हृदयवल्लभ शब्द पार्वतीसह वापरला तर पार्वती च्या हृदयाला अत्यंत प्रिय असणारे असा अर्थ होतो आणि पार्वती आणि हृदयवल्लभ हे शब्द वेगळे केले तर ज्यांच्या हृदयाला पार्वती अत्यंत प्रिय आहे असा अर्थ होतो.
भगवान शंकरांच्या या दिव्य नामावलीला पुढे सुरू ठेवताना जगद्गुरु आचार्यश्री म्हणतात, हे नीलकण्ठ – समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल नामक महाभयानक विष, समस्त ब्रह्मांडाच्या कल्याणासाठी प्राशन केल्यामुळे ज्यांचा गळा काळानिळा पडलेला आहे असे.
विश्व शब्दाचा अर्थ आहे पसरलेले. या अनंत कोटी ब्रह्मांडाच्या पसाऱ्याचे स्वामी असल्यामुळे भगवंताला विश्वनाथ असे म्हणतात.
वारणा आणि असी अशा दोन नद्यांच्या मध्ये असणाऱ्या क्षेत्राला वाराणसी असे म्हणतात. त्या श्री क्षेत्र काशी ची देवता आहे भगवान श्री विश्वनाथ.
एक मस्तक, हे असत्य वचन निघाल्यामुळे श्रीशंकरांनी कापले असे पुराणात वर्णन आहे. त्या मस्तकाची माळ गळ्यात धारण करणारे. संसारदुःखगहनाज्जगदीश रक्ष- अशा हे भगवान महादेवा ! या गहन संसार रुपी दुःखातून माझे रक्षण करा.
आदि शंकराचार्यांनी रचलेल्या या श्री गणेशाच्या स्तुतीपर स्तोत्रात पाच श्लोक आहेत. सहावा फलश्रुतीचा आहे. यातील श्लोकांचे / चरणांचे विविध अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावलेले दिसतात.
आपले रक्षण करण्याची प्रार्थना करताना भगवान आदि शंकराचार्य स्वामी महाराज पुढे म्हणतात,
Copyright © 2025 | Marathisrushti