(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • निर्णय क्षमता

    माणसाच्या अनेक क्षमतांपैकी निर्णय क्षमता खूप महत्त्वाची आहे.कोणतेही कार्य निर्णय घेतल्याविना आरंभ देखील होत नाही.बरीच कार्य फक्त निर्णय घेण्याअभावी थांबलेले असतात, निर्णय न घेणे ही चालढकल तर त्यास विलंब करणे मतिमंदत्व आहे.तीक्ष्ण बुद्धी असेल तर निर्णय तातडीने होतात.

  • मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण

    अडचणीपासून कोणीही सुटलेला नाही. अडचणीविना जीवन एक भ्रम आहे. वाळवंटातल्या मृगजळाप्रमाणे अशा जीवनामागे धावून मानसिक व शारीरिक शक्ती वाया घालविण्याऐवजी अडचणी पेलून त्यावर मात करण्यातच खरे कौशल्य आहे. अशा या व्यक्तिमत्त्वापासून गुण घेऊ या अन् म्हणू या ‘सकारात्मक विचारच देतील आयुष्याला आकार’ आणि चला आयुष्य सकारात्मक विचारानं जगू या !

  • १४१ वर्षे संगीत शाकुंतलच्या पहिल्या  प्रयोगाची

    १४१ वर्षे संगीत शाकुंतलच्या पहिल्या प्रयोगाची

    १८८० साली पुणे मुक्कामी अण्णासाहेब किर्लोस्करांनी ‘इंद्रसभा’ नावाचे पारसी नाटक – उर्दू भाषेतील – पाहिले आणि तशा प्रकारचे नाटक मराठी रंगभूमीवर का होऊ शकत नाही, या ईर्ष्येने एकटाकी ‘संगीत शाकुंतल’ या नाटकाचा पहिला अंक लिहून काढला.

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सत्तावीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे तेहेतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग सत्तावीस

    बाबा सांगतात...

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    अष्टांग ह्दय या ग्रंथातील सूत्रस्थानातील चौथ्या अध्यायातील सर्वात शेवटच्या या श्लोकाचाच एक भाग म्हणून त्याअगोदर काही कायिक वाचिक मानसिक पथ्यापथ्ये सांगितलेली आहेत. जी "आई सांगते" या धर्तीवर आधारलेली होती.

    समाजात वावरताना कसे वागावे, याचे काही ढोबळमानाने नियम ठरवून दिले आहेत. जे आजही योग्य वाटतात. हे नियम आईच समजावून सांगू शकते. जसे ग्रंथकार म्हणतात, रस्त्याने जाताना आपल्याकडे इतरांचे लक्ष असते, तेव्हा आपले कपडे नीटनेटके असावेत. जुने, मळलेले, लालभडक रंगाचे, फाटलेले कपडे घालू नयेत.
    (वासोनधारयेत जीर्णम् मलिनं रक्तम् उल्बणम् )
    दुसऱ्याने वापरलेले कपडे आपण वापरू नयेत, केवळ कपडेच नव्हेत तर फुले, पुष्पमाला, कंठहार, दागिने, अंगठ्या, चप्पल इ.इ. वापरू नये.
    काय चुकले हो आईचे ? हे आज सांगण्याची काय आवश्यकता आहे, असे काही जणांना वाटेल.

    आज पहा काय चालले आहे, जीन्सची पॅन्ट विकत घ्यायची ती पण मळकट, कळकट, मुद्दाम फाटलेली, जेवढी मळकी तेवढी म्हणे फॅशन.

    एखाद्याचा सुरू असलेला मोबाईल काॅल जेव्हा आपल्याला घ्यायचा असतो, तेव्हा तो चार वेळा पुसुन घेतो, कशासाठी जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून! हे आपल्याला कळते, पण ओढणी, रुमाल, नेलपेंट, साबण, इयरींग, टिकल्या इ. वस्तु आपण सहजपणे एकमेकांच्या वापरत असतो. असे करू नये. असेच ग्रंथकार देखील सांगत आहेत. ते मी फक्त आईच्या तोंडी घातले एवढेच.

    आता या मागील अध्यायामधे वर्णन केलेली काही सूत्रे पाहूया. त्यांना आपण बाबा सांगतात, या मथळ्याने अभ्यासूया.

    सुखार्थाः सर्व भूतानां मताः सर्वाः प्रवृत्तयः।
    सुखंच न विना धर्मात् तस्मात धर्मपरो भवेत् ।

    सर्व प्राण्यांचे एकंदर उद्योग सुखाकरीता चालले आहेत.आणि सुख तर धर्मावाचून नाही. म्हणून निरंतर धर्मपर असावे.

    हे असे सर्व वर्णन आयुर्वेदात सांगितलेले आहे का, असा प्रश्न काही जणांना पडला होता. त्यांच्यासाठी खास हे ससंदर्भ सदर.

    आई जे सांगत होती, ते सुद्धा सुखासाठीच होते. फक्त तिथे व्यष्टी होती. बाबा काही सुखप्राप्तीच्या गोष्टी सांगताना समष्टीचा विचार करतात. शब्द वेगळे असतील पण भाव तोच आहे. काळ बदलला, पण सुखाची व्याख्या तीच आहे.

    अनुकुल वेदनीयम् सुखम्
    प्रतिकुल वेदनीयम दुःखम्

    अशा अनुभूती ज्यांने अनुकुलता म्हणजे बरे वाटणे, असे अनुभवता येते, ते सुख.
    आणि अशा अनुभूती, ज्यांनी प्रतिकुल म्हणजे बरे वाटत नाही, अशी संवेदना निर्माण होण्याला दुःख असे म्हणतात.

    इंग्रजी भाषेत वर्णन करायचे झाल्यास फीलींग वेल इज सुख आणि नाॅट फिलींग वेल इज दुःख ! नाॅट फिलींग वेल म्हणजे रोग. आणि फिलींग वेल म्हणजे निरोग.

    म्हणजेच निरोगी असणे हेच सुख आणि रोगी अवस्था म्हणजे दुःख.

    म्हणजेच आपली धडपड निरोगी रहाण्यासाठी चाललेली आहे. आणि त्यासाठी शास्त्रकार सांगतात, धर्मपर रहा. हिंदीत सांगायचे झाल्यास, नेकीसे रहो।
    काही जणांना धर्म शब्दाचीच अॅलर्जी आहे. त्यांच्यासाठी हिंदीतील अर्थ सांगितला.

    धर्म म्हणजे विशिष्ट रंग अपेक्षित नाही. सरळ सांगायचे झाल्यास हिंदु, मुस्लीम, ख्रिश्चन बौद्ध असे न म्हणता आपले विहित कर्म करणे म्हणजे धर्म होय.

    धारणात धर्मः अशी व्याख्या सुद्धा केलेली आहे. पण आम्ही व्याख्या आणि व्याकरण सुद्धा मानणार नाही, असे म्हणणाऱ्या मंडळींना काय म्हणावे ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • कोकणातील गतकालीन कवी आणि लेखक

    निसर्गाने मुक्तहस्ताने केलेला कोकण साहित्यरसांनी सुद्धा तितकाच बहरला. साहित्य विश्वात त्याचे सौंदर्य कायम अधोरेखित होत आले आहे. कोकणातील साहित्यिक आणि त्यांचे साहित्य यांचे वेगळेपण इथल्या मातीशी नाते सांगणारे आहे. इथल्या मातीतील शब्द रुपी मोत्यांची पखरण करीत हे साहित्य विश्वात बहुमान मिळवित आहेत. आपल्यासाठी हे अभिमानास्पद आहे.

  • बाळक्रीडा अभंग क्र.३२

    संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.

  • कोरफड

    कोरफड कुंडीत सहज लागते व थोड्याशा पाण्यावरही झपाट्याने वाढते. कोरफडीचा गर रोज सेवन करण्याचे; तसेच बाहेरून लावण्याचे अनेक फायदे आहेत. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढविण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेणे यकृतासाठी हितावह असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते व शौचास साफ होण्यासही मदत मिळते.

    रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्तयस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरते.

    शरीरावर कोठेही भाजले असता कोरफडीचा गर लावल्याने दाह कमी होतो व फोड वगैरे न येता त्वचा पूर्ववत होते. मूळव्याधीमुळे वेदना होत असल्यास किंवा आग होत असल्यास त्यावर कोरफडीचा नुसता गर ठेवण्याने बरे वाटते.

    कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवण्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते; तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते.

    संगणकावर वा इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले वा डोळ्यांची आग होऊ लागली, तर कोरफडीच्या गराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. चकती ठेवणे अवघड वाटले, तर गराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरविण्याने बरे वाटते.
    याप्रमाणे कोरफडीचे एकाहून एक उत्तम उपयोग असल्याने आजकाल कोरफडीचा गर बाटलीत भरून विकायला ठेवतात; पण टिकण्याच्या दृष्टीने यात प्रिझर्वेटिव्ह्‌ज टाकली आहेत का हे बघावे लागेल व कोरफडीतील एखादे तत्त्व नष्ट झाले आहे का हेही पाहावे लागेल. त्यापेक्षा घरी कोरफड लावली, तर घरच्या घरी कोरफडीचा ताजा गर सहज मिळू शकतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • श्री गणपतिस्तोत्रम् – भाग ४

    विरञ्चिविष्णुवन्दितं विरूपलोचनस्तुतं!
    गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया !!
    निरंतरं सुरासुरै: सपुत्रवामलोचनै:!
    महामखेष्टकर्मसु स्मृतं भजामि तुन्दिलम् !!४!!

    गाणपत्य संप्रदायाने आग्रहाने प्रतिपादित केलेल्या, भगवान गणेशांच्या सर्वपूज्य, सर्वादिपूज्य, परब्रह्म स्वरूपाला जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज नेमक्या शब्दात व्यक्त करीत आहेत.
    आपल्या डोक्यातील श्री गणेशांच्या शिवपुत्र, पार्वतीनंदन या भूमिकेला फाटा देणारा हा श्लोक. मग काय आहे श्रीगणेशांचे नेमके स्वरूप?
    विरञ्चिविष्णुवन्दित- विरंची अर्थात भगवान ब्रह्मदेव. विष्णु,भगवान श्रीहरी. यांनी वंदन केलेले ते विरञ्चिविष्णुवन्दित.
    विरूपलोचनस्तुत- भगवान शंकरांना त्रिनेत्रधारी म्हणतात. हा तिसरा डोळा हे त्यांचे विशेष रूप आहे. त्यामुळे त्यांना विरूपलोचन असे म्हणतात. ते भगवान शंकर ज्यांची स्तुती करतात ते श्री गणेश
    विरूपलोचनस्तुत होत.
    गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया - भगवान श्रीगणेशांकडे पाहण्याची दृष्टीच आमूलाग्र बदलून टाकणारी ही ओळ. भगवान जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात, गिरीश अर्थात भगवान शंकर. त्यांना दर्शनाची इच्छा झाल्यामुळे देवी पार्वतीने ज्यांना प्रगट केले आहे असे आहेत श्री गणेश.ते शिवपुत्र नाहीत. केवळ पार्वतीनंदन नाहीत. त्या दोघांनाही वंदनीय आहेत‌. त्यांना दर्शनाची इच्छा होते त्यावेळी प्रार्थना करून ते ज्यांना प्रगट करतात ते मोरया आहेत, "गिरीशदर्शनेच्छया प्रकटितं पराम्बया ". निरंतर अर्थात सातत्यपूर्णरीत्या, नेहमी.
    सुरासुर अर्थात देव आणि दैत्य देखील.
    सपुत्रवामलोचनै:- सपुत्र अर्थात मुलाबाळांसह, वामलोचना अर्थात स्त्री.पत्नी.
    महामखेष्टकर्मसु- मख म्हणजे यज्ञ. महामख अर्थात सर्व महत्वाची कार्ये.सर्व कार्ये यज्ञस्वरूप असावीत हा भाव. इष्टकर्म अर्थात अपेक्षित गोष्टींच्या प्राप्तीसाठी केलेले कर्म.
    सगळ्यांचा एकत्रित अर्थ करता, देव आणि दैत्य देखील आपल्या अपेक्षित कामाला पूर्ण करण्यासाठी यज्ञ करताना, आरंभी विघ्न विनाशासाठी ज्यांचे स्मरण करतात असे.
    तुंदिल- धष्टपुष्ट, गुबगुबीत. अशी देहयष्टी असणाऱ्या त्या भगवान गणेशांचे मी स्मरण करतो.

  • महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग २ – जांभूळ

    महाराष्ट्रामध्ये हा सदाहरित वृक्ष सर्व ठिकाणी आढळतो. परंतु याची शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल नाही. मूळ भारतीय असलेला हा वृक्ष म्यानमार, श्रीलंका, मलेशिया, ते थेट ऑस्ट्रेलिया खंडातही सापडतो. समुद्र्सपाटीवर, नदीनाल्याचे काठ तसेच उत्तुंग पर्वतराजीवर ६००० हजार फुटांपर्यंत याचे वास्तव्य आढळते.

  • धर्मांतराने दलितांना काय दिले ?

    ज्येष्ठ आणि सुप्रसिद्ध लेखक आणि दलित चळवळीतील कार्यकर्ते श्री लक्ष्मण माने यांनी दलितांच्या धर्मांतराबाबत लिहिलेला हा अभ्यासपूर्ण लेख. धर्मांतराची कारणे नक्की कोणती ते यामध्ये वाचा. एक नव्हे हजार कारणे दिली आहेत मातंग समाजाने धर्मांतर करण्यामागे !

    लक्ष्मण माने हे भटक्या समाजातील आहेत पण त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला आहे ...!


    मी डाव्या विचारांच्या चळवळीत ३०-३५ वर्षांहून अधिक काळ सामान्य कार्यकर्ता म्हणून काढले आहेत. धर्मनिरपेक्ष, विज्ञाननिष्ठ, सेक्युलर, अशा मित्रांच्या खांद्याला खांदा लावून मी २५-३० वर्षे काम केले. अलीकडे जेव्हा मी व माझ्या भटक्या विमुक्त समाजातील सहकाऱ्यांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेण्याचा निर्णय केला, तेव्हा अनेकांचे कान टवकारले. अनेकांच्या नजरा विस्फारल्या. काहींना आता लक्ष्मणचं हे काय नवंच खूळ, असं वाटत होतं; तर काही मित्र कुत्सितपणे म्हणत होते, आता काय लक्ष्मण ‘नमो तत्स.’ मी म्हणायचो ‘जसं होईल तसं’. एक कम्युनिस्ट नेते कैक वर्षांचे माझे मित्र. ते मित्र मला म्हणत होते, ‘काय होणार तुझ्या या धर्मांतरानं?

    आपण सारी सेक्युलर मंडळी. धर्माकडे पाठ करून उभी असलेली. बरं ज्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्यांचं तरी काय झालं? तर तुझ्या जाण्यानं नेमकं काय होईल?’ तेव्हा त्यांना मी शांतपणे म्हणालो, ‘होय आपण सारे सेक्युलर, तुम्ही मराठा सेक्युलर, भाई वैद्य ब्राह्माण सेक्युलर, जनार्दन पाटील कुणबी सेक्युलर, बाबा आढाव मराठा सेक्युलर, जनार्दन वाघमारे माळी सेक्युलर आणि मी कैकाडी सेक्युलर. असा आपला सेक्युलॅरिझम आहे. सेक्युलर म्हणण्यात तुमचे काय जातं? जातीचे सर्व फायदे तुमच्या ताटात पडतातच. ते तुम्ही कधी नाकारलेत? समाजाची वास्तविक प्रतिष्ठा जातीच्या उतरंडीनुसारच मिळते ना? मी सेक्युलर कैकाडीच रहाणार असेन, तर तुमचा सेक्युलॅरिझम माझ्या आणि माझ्या समाजाच्या काय कामाचा? आणि जे आधी धर्मांतरित झाले त्यांच्याबद्दल म्हणाल तर मी दोनच गोष्टी तुम्हांला विचारतो. एक महार मला असा दाखवा जो मेलेली ढोरं ओढतो आणि मेलेल्या ढोराचं मांस खातो. मी त्याला एक लाख रुपयांचं बक्षीस देतो आणि असा महार दाखवा की ज्याला सांगावं लागतंय की पोरगं शाळेत घालं. त्यालाही एक लाख रुपये देतो.’ या प्रश्नाचं उत्तर मी काही गंमत म्हणून दिलं नव्हतं.

    धम्मचक्र प्रवर्तन अभियानामध्ये भंडाऱ्यापासून कोल्हापूरपर्यंत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मी प्रत्येक सभेत विचारत होतो, एक महार असा दाखवा जो मेलेल्या ढोराचं मांस खातो व मेलेले ढोर ओढतो. त्याला एक लाख रुपये बक्षीस देतो. आजतागायत असा महार मला भेटलेला नाही. काय अर्थ या घटनेचा?

    कोणत्या परिस्थितीमध्ये बाबासाहेबांनी या हिंदू धर्माचा त्याग केला होता.

    (मुंबई इलाखा महार परिषद ही ऐतिहासिक परिषद मुंबई येथे ३०, ३१, मे व १ व २ जून १९३६ साली चार दिवस झाली. ‘मुक्ती कोन पथे?’ या नावानं बाबासाहेबांचं भाषण प्रसिद्ध आहे).

    १९३६ साली ते म्हणाले, ‘सरकारी शाळेत मुले घालण्याचा हक्क सांगितल्यामुळे, विहिरीवर पाणी भरण्याचा हक्क सांगितल्यामुळे, वरात घोड्यावरून नेण्याचा हक्क सांगितल्यामुळे, स्पृश्य हिंदूनी मारहाण केल्याची उदाहरणे सर्वांच्या डोळ्यापुढे नेहमी असतात. उंची पोशाख घातल्यामुळे, दागदागिने घातल्यामुळे, पाणी आणण्याकरिता तांब्या पितळेची भांडी वापरल्यामुळे, जमीन खरेदी केल्यामुळे, जानवे घातल्यामुळे, मेलेली गुरे न ओढल्यामुळे व मेलेल्या गुरांचे मांस न खाल्ल्यामुळे, पायात बूट व मोजे घालून गावातून गेल्यामुळे, भेटलेल्या स्पृश्य हिंदूस जोहार न घातल्यामुळे, शौचाला जाताना तांब्यात पाणी नेल्यामुळे, पंचाच्या पंगतीत चपाती वाढल्यामुळे, अशा कितीतरी कारणाने अमानुष अत्याचार, जुलूम केले जातात. बहिष्कार घातला जातो. प्रसंगी जाळपोळीला सामोरं जावं लागतं. मनुष्यहानी होते.

    मोलमजुरी मिळू द्यायची नाही. रानातून गुरांना जाऊ द्यायचे नाही. माणसांना गावात येऊ द्यायचे नाही वगैरे सर्व प्रकारची बंदी करून स्पृश्य हिंदू लोकांनी अस्पृश्य लोकांस जेरीस आणल्याची आठवण तुम्हांपैकी पुष्कळांना असेल. परंतु असे का घडते?

    याचे कारण स्पृश्य आणि अस्पृश्य या दोन समाजांतील तो कलह आहे. एका माणसावर होत असलेल्या अन्यायाचा हा प्रश्न नव्हे. हा एका वर्गाने दुसऱ्या वर्गावर चालविलेल्या आगळिकीचा प्रश्न आहे. हा वर्गकलह सामाजिक दर्जासंबंधीचा कलह आहे. एका वर्गाने दुसऱ्या वर्गाशी वागताना आपले वर्तन कसे ठेवावे, या संबंधाचा हा कलह आहे. या कलहाची जी उदाहरणे वर दिलेली आहेत, त्यावरून एक बाब उघडपणे सिद्ध होते; ती ही की तुम्ही वरच्या वर्गाशी वागताना बरोबरीच्या नात्याने वागण्याचा आग्रह धरता, म्हणूनच हा कलह उपस्थित होतो. तसे नसते तर चपातीचे जेवण घातल्यामुळे, उंची पोषाख घातल्यामुळे, जानवी घातल्यामुळे, तांब्या पितळेच्या भांड्यात पाणी आणल्यामुळे, घोड्यावरून वरात नेल्यामुळे भांडणे झाली नसती. जो अस्पृश्य चपाती खातो, उंची पोषाख करतो, तांब्याची भांडी वापरतो, घोड्यावरून वरात नेतो, तो वरच्या वर्गापैकी कुणाचे नुकसान करीत नाही. आपल्याच पदराला खार लावतो. असे असता वरच्या वर्गाला त्याच्या करणीचा रोष का वाटावा?

    या रोषाचे कारण एकच आहे; ते हेच की अशी समतेची वागणूक त्याच्या मानहानीला कारणीभूत होते. तुम्ही खालचे आहात, अपवित्र आहात, खालच्या पायरीनेच तुम्ही राहिलात तर ते तुम्हाला सुखाने राहू देतील. पायरी सोडली तरी कलहाला सुरुवात होते, ही गोष्ट निविर्वाद आहे.

    मी अगदी लहान होतो, तेव्हा मी पाहिलं आहे, गावोगाव महारवाड्यांवर बहिष्कार चालू होते. माणसांना गावात येऊ दिले जात नव्हते, पाणवठे बंद होते, पिठाची गिरणी बंद होती, किराणामालाची दुकाने बंद होती. गावोगावच्या महारांनी, म्हणजे पूर्वाश्रमीच्या दलित जनतेने बाबासाहेबांकडून धम्म दिक्षा घेतली होती. तराळकी, येस्करकी नाकारली होती. निरोप्याचे काम नाकारले होते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली निहित कर्तव्यं गावगाड्यात करावी लागणारी सर्व कामं मग, लाकूड फोडणे असेल, ढोर ओढणे असेल, सांगावा सांगणे असेल, हे सारे नाकारले होते. हे एका अर्थाने मोठे बंडच होते.

    शेकडो वर्षांपासून घरातील देव्हाऱ्यात पूजलेल्या ३३ कोटी देवांच्या प्रतिमा एका रात्रीत नदीत भिरकावून दिल्या. मरीआई लक्ष्मीआईची मंदिरं ओस पडली. सारे गंडे-दोरे, गळ्यातल्या माळा, डोक्यावरचे केस सर्व काढून फेकून दिले. गावागावात, वस्तीवस्तीत बुद्धवंदना निनादू लागली. सर्व आखाडे, देवळे, विठ्ठलमंदिरांचे बुद्ध विहारात रूपांतर होऊ लागले.

    त्यांच्या नावापुढील जात व धर्म जाऊन ‘बौद्ध’ असे लिहिले गेले. मुलांची, घरांची, गावांची, रस्त्यांची, संस्थांची नावे बदलली. सर्व समाज तरारून उठला. सापाने कात टाकावी, तशी कात टाकून सळसळून उभा राहिला. एक नवी अस्मिता घेऊन हा समाज अन्याय, अत्याचार, जूलूम याच्या विरोधामध्ये ठामपणे उभा राहिला. चाणी, बोटी, पड, हाडकी, हाडोळा ही गुलामीची सारी प्रतिके या समाजाने भिरकावून दिली. बुद्धकालीन इतिहास व बौद्ध संस्कृतीचे प्रतिबिंब सर्वत्र दिसू लागले.

    माझी पिढी या सर्व घटनांची साक्षीदार आहे. बौद्ध स्थापत्यकला नवीन घरांवर विराजमान होऊ लागली. बुद्ध जयंती धूमधडाक्यात साजरी होऊ लागली. सामूहिकरीत्या लोक दारू सोडू लागले. जत्राखेत्रांवर होणारा प्रचंड खर्च, कोंबड्या-बकऱ्या बळी देणे, अंगात येणे या विरुद्धचे काहूर उसळू लागले.

    लग्नविधी, नामकरणविधी, अत्यंविधी बदलले, लग्न-मरणातला बँड गेला. डफडं गेलं. हालगी गेली. गावाची चाकरी-सेवा गेली. समाज गावगाड्यातून बाहेर पडला. अंगारे-धुपारे-बुवा-बाबा मागीर् लागले. पोतराजांनी अंगावरली आईची वस्त्रं धडप्यात गुंडाळून नदीला सोडली. आपल्या मनुष्यत्वाचा शोध सुरू झाला. गुलामगिरीच्या आभूषणांना चूड लागली. लोकांनी खेडी सोडा, शहरांकडे चला हा मंत्र स्वीकारला आणि लोक गावगाड्याच्या नरकातून, या गुलामगिरीच्या जोखडांमधून बाहेर पडले.

    ईश्वराच्या जोखडातून बाहेर पडले. कर्मकांडाच्या लफड्यातून बाहेर पडले. कालपर्यंत अंगात येणारी मरीआई कायमची नदीत विसजिर्त केली म्हणून काही आईचा कोप झाला नाही. कुणीही प्लेग, पटकी, कॉलरा या रोगांनी मेले नाहीत. कोणालाही हाग-वक झाली नाही. गपगुमान अंगातले देव पळून गेले. लोक दास्यातून मुक्त होऊ लागले.

    शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा मंत्र मनोमनी या समाजाने स्वीकारला. आतून-बाहेरून घुसळण चालूच होती. या समाजाने शिक्षणाचा ध्यास घेतला. हमाली करीन, मजुरी करीन, वाट्टेल ते करीन; पोरगं शिकवीन, त्याला डॉ. आंबेडकर करीन हा ध्यास त्या सर्व समाजाने घेतला. सर्वांचीच मुलं डॉक्टर, इंजिनीअर झाली असं नाही. पण सर्वांनी प्राथमिक शिक्षण घेण्याचा निर्धार केला. आज या समाजाच्या साक्षरतेचे प्रमाण ८६ टक्के इतके विक्रमी आहे.

    आज ५० वर्षांनंतर अॅड. शंकरराव खरात, डॉ. भालचंद मुणगेकर आणि डॉ. नरेंद जाधव हे महाराष्ट्रातल्या नामवंत पुणे, मुंबई, औरंगाबाद या विद्यापीठांचे कुलगुरू झाले. युनिव्हसिर्टी गँट कमिशनचे आजचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात साऱ्या देशातल्या उच्च शिक्षणाची धुरा सांभाळीत आहेत; तर डॉ. भालचंद मुणगेकर प्लॅनिंग कमिशनचे सदस्य आहेत. डॉ.रेंद जाधव हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थशास्त्रज्ञ आहेत. ते रिर्झव्ह बँकेचे सल्लागार होते. शेकडो लोक पीएच.डी. झालेले आहेत. हजारो लोक डॉक्टर आहेत, इंजिनीअर आहेत, आकिर्टेक्ट आहेत. हजारो लोक प्राध्यापक आहेत आणि प्राथमिक- माध्यमिक शिक्षकांचा तर सुळसुळाटच आहे. समाजाचे क्रीम समजल्या जाणाऱ्या आय.ए.एस., आय.पी.एस. अधिकाऱ्यांमध्ये डझनाने अधिकारी या आंबेडकरी समाजातले आहेत. अभिमान वाटावा असा मध्यमवर्ग, उच्चमध्यम वर्ग या समाजामध्ये निर्माण झाला आहे.

    वेश, भूषा, भवन, भाषा सारे बदलून गेले आहे. आज ‘वाडावो माय भाकर येस्कराला’ हे इतिहासजमा झाले आहे.

    आय.ए.एस. आय.पी.एस., यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी.,या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये देशात एक नंबरला ब्राह्मण आहेत आणि दोन नंबरला पूवीर्चे महार आणि आताचे बौद्ध आहेत. विद्वततेच्या सर्व क्षेत्रांमध्ये या दोन समाजांचीच स्पर्धा सुरू आहे. सर्वाधिक ब्राह्मण मुलींनी पूर्वास्पृश्य असलेल्या या समाजातील तरुणांशीच आंतरजातीय विवाह केल्याचे दिसेल. रोटी-व्यवहाराची तर क्रांती झालीच पण बेटी-व्यवहाराची क्रांती या समाजात घडते आहे. बेटी-व्यवहार आपल्या बरोबरीच्या माणसांशी होतो.

    साहित्याच्या क्षेत्रातही दलित साहित्याने आपला स्वतंत्र इतिहास निर्माण केला आहे. दलित कथा, कविता, कादंबरी, नाटक, चरित्र, निबंध, प्रवासवर्णन आणि वैचारिक लेखनादि क्षेत्रांतील कार्याने भल्याभल्या सरस्वतीपुत्र म्हणवणाऱ्यांना तोंडात बोटे घालायला लावले आहे. केवळ लिहिलेच नाही, तर आपला वाचकवर्गही त्यांनी मोठ्या प्रमाणात निर्माण केला आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनेक ग्रंथ अभिमानाने व तेजाने आज तळपताना दिसत आहेत. दलित साहित्य आणि दलित जाणीव, दलित चळवळ आणि अलीकडे आंबेडकरी चळवळ ही देशातल्या अन्य कोणत्याही प्रांतात निर्माण होऊ शकली नाही. ती महाराष्ट्रातच निर्माण झाली; याचे कारण स्वत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य आणि अस्मिता यांची पेरणी ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली, त्या आंबेडकरी भूमीतच देशातले पहिले साहित्यातले बंड मराठीमध्ये झाले.

    लोक विनोदाने म्हणतात, ‘ब्राह्मणांनी मटण महाग केले आणि दलितांनी पुस्तके महाग केली’ ब्राह्मणाघरी लिवणं, कुणब्याघरी दाणं आणि महाराघरी गाणं हे आंबेडकरवाद्यांनी खोडून टाकले.

    आता दलिताघरी लिवणं आणि बामणाघरी गाणं असे नवे सूत्र मांडायला हरकत नाही. दीक्षाभूमीवर लागणारी पुस्तकांची दुकाने, गावोगाव भरणारी साहित्य संमेलने आणि त्या प्रत्येक साहित्य संमेलनाच्या बाहेर थाटलेली पुस्तकाची दुकाने, सीडी, कॅसेट्स यांची लागणारी दुकाने हा खरोखर आश्चर्याचा विषय आहे. तीर्थक्षेत्रावर हार, तुरे, माळा, नारळ, कुंकू, बुक्के, शेले, दुपट्टे, चादरींची रेलचेल असते. पण तिथे दीक्षाभूमीवर नानाप्रकारच्या हजारो ग्रंथांची झालेली गदीर् दिसते. हिंदू तीर्थक्षेत्रावरून हिंदू बंधू पवित्र गंगाजल आणतात, मुस्लिम बंधू हज यात्रेवरून ‘आब-ए-जमजम’ आणतात, आमचे बौद्ध बंधू मात्र दीक्षाभूमीवरून बुद्ध, बाबासाहेबांची ग्रंथसंपदा आणि प्रतिमा घेऊन जातात. ज्या समाजाला अक्षरबंदी होती, तो समाज ज्ञानाकांक्षी बनविला, तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या धम्म चळवळीने.

    ही ज्ञानाकांक्षा हेच धम्माचे सार्मथ्य आहे.

    नमो बुध्दाय...... जय भिम !!!!!!

    लक्ष्मण माने