(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • टेफ्लॉन

    पूर्वीच्या काळी स्वयंपाकघरातील तवा किंवा कढया एकतर लोखंडी, पितळी वगैरे धातूंच्या असायच्या पण आता हे जुने तवे किंवा कढयांची जागा अतिशय आधुनिक अशा नॉनस्टिक तवे व फ्राइंग पॅन्सनी घेतली आहे.

  • सूर्यप्रकाश

    पाकिस्तानातल्या कोठड्यांमध्ये २९ सप्टेंबर २०१६ पासून तब्बल चार महिने अनन्वित यातना सोसणाऱया भारतीय जवान चंदू चव्हाणांची अखेर जानेवारीत सुटका झाली. त्यानंतर त्यांनी इ-सकाळ ला दिलेल्या मुलाखतीचा अंश

  • श्री अन्नपूर्णाष्टकम् – ७

    आदिक्षान्तसमस्तवर्णनकरी शम्भोस्त्रिभावाकरीकाश्मीरत्रिपुरेश्वरी त्रिलहरी नित्याङ्कुरा शर्वरी ।
    कामाकाङ्क्षकरी जनोदयकरी काशीपुराधीश्वरी
    भिक्षां देहि कृपावलम्बनकरी मातान्नपूर्णेश्वरी ॥७॥

    आदिक्षान्त - हा येथील पहिला शब्दच मोठा रमणीय आहे. आदि शब्दातही अ+ आदि असा विग्रह आहे. त्याचा अर्थ पासून सुरु होणारे. क्षान्त अर्थात क्ष पर्यन्तचे. अ पासुन क्ष पर्यंतचया सर्व वर्णांपासून निर्माण होणारे सर्व शब्द जिचेच वर्णन करतात तीआदिक्षान्तसमस्तवर्णनकरी.

    या मध्ये ज्ञ चा उल्लेख नाही. ज्ञ ज्ञानाचा वाचत आहे आणि ते ज्ञान तिचे स्वरूप आहे. अ पासून क्ष पर्यंतच्या सर्व वर्णांच्या द्वारे त्या ज्ञ अर्थात जगदंबेचेच वर्णन केले जाते ती आदिक्षान्तसमस्तवर्णनकरी.

    शम्भोस्त्रिभावाकरी- भगवान शंकरांना तीन भावांमध्ये प्रगट करणारी. येथे भगवान शंकर हा शब्द परब्रह्म या अर्थाने आला आहे. त्या निरगुण निराकार परब्रह्माला सत्व,रज,तमात्मक तीन गुणांनी युक्त, सगुण साकार करणारी.

    काश्मीरत्रिपुरेश्वरी- काश्मीर प्रांतात निवास करणारी त्रिपुरसुंदरी.

    त्रिलहरी- तीन गुणांच्या रूपात हालचाल करणारी.

    नित्याङ्कुरा- अंकुर हे नूतनतेचे, विकासनशीलतेचे प्रतीक. तशी नित्यनूतन असणारी. शर्वरी - शर्व म्हणजे भगवान शंकर. त्यांच्या विनाशकारी शक्ती मुळे त्यांना हे नाव आहे. त्यांची शक्ती म्हणून शर्वरी.

    कामाकाङ्क्षकरी- भक्तांच्या कामना, आकांक्षा पूर्ण करणारी.

    जनोदयकरी- साधकांच्या भाग्याचा उदय करणारी.

    काशीपुराधीश्वरी- काशीनगरीची सम्राज्ञी.

    भिक्षां देहि कृपावलंबनकरी मातान्नपूर्णेश्वरी- सकल कृपांचा आधार असणाऱ्या हे आई अन्नपूर्ण! मला भक्ती ज्ञान वैराग्यरूपी भिक्षा प्रदान कर.

    -- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड

  • भारत चीन जल युध्द: सद्द्य परिस्थिती आणि उपाय योजना

    सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे आणि त्यामुळे अर्ध्याहून जास्त महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्याचप्रमाणे इशान्य भारतासाठी हे वर्ष पाण्याच्या दृष्टीने दुष्काळी समजले जाते. यावर टीव्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. पण आपल्या देशात दुसर्‍या देशातून येणार्‍या नद्यांच्या पाण्याची होणारी चोरी याबद्दल मीडियामध्ये फ़ारशी चर्चा होत नाही. या लेखाद्वारे चीन ब्रम्हपुत्रेचे भारतात येणारे पाणी कसे पळवायचा प्रयत्न करत आहे याबद्दल चर्चा करू.

  • आहारातील बदल-शाकाहार भाग १०

    गव्हाचा सर्वात जास्त वापर पंजाब हरयाणा मधे होतो. हरियाणाला तर गव्हाचे कोठारच म्हणतात. या राज्यांमधे गव्हाचा अतिवापर व्हायला लागला आणि पंजाबी जाट लोकांचे कोलेस्टेरॉल वाढू लागले असे संशोधन सोलापूरचे सुप्रसिद्ध वैद्य बागेवाडीकर शास्त्रींनी आपल्या एका व्याख्यानात सांगितले होते.

    आणि ते खरेही वाटते. धर्मेंद्रचे आहाराचे डायलॉग कसे होते ?
    "मक्के की रोटी, सरसोंका साग, बैगन का भरता और गाजर का हलुआ, व्वा, मां तूने कैसे पहचान लिया मुझे ये खाना पसंद है ?

    विनोदाचा भाग सोडून देऊया, पण गव्हाचा वापर अति व्हायला लागला आणि त्याच्या चिकटपणामुळे कोलेस्टेरॉल वाढू लागले हे व्यावहारिक सत्य दिसते.
    गहू पचण्यासाठी तापमान पण तसेच थंड लागते. समुद्रसपाटीच्या खाऱ्या हवेत तो कसा पचेल ?
    सध्या चायनीजचे वारे सुरू आहेत. प्रत्येक खेडेगावात सुद्धा जी चायनीज सेंटर गल्लीबोळातून सुरू झाली आहेत. त्यामधे रोटी कुठे मिळते ? केरळमधे रोटी कुठे मिळते ? जिथे जे पिकते तिथेच ते पचते. हा सिद्धांत विसरून चालणारच नाही.

    कोकणातील वाढत्या मधुमेहाचे आणि कमी होत नसलेल्या चरबीचे, एक कारण गहू सुद्धा आहे, हे कटूसत्य पचनी पडणारे नाही. असो.

    गहू न धुता, आपण वापरतो हा आणखीन मोठ्ठा दोष. जे धुवुन वापरतात, ते त्यातल्या त्यात समाधानी. पण न धुता वापरतात त्यांना धोक्याचा इशारा....
    गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन पंजाबमधे होते.
    भारतात सर्वात जास्त रसायने आणि खते गव्हासाठी पंजाबमधे वापरली जातात.
    बाजारात आलेला गहू पंजाबचा असू शकतो.
    भारतात सर्वात जास्त कॅन्सरचे रूग्ण पंजाबमधे आहेत.
    पंजाब मधून राजस्थान मधे आठवड्यातून दोन वेळा जाणारी, एक ट्रेन आहे, तिचे नाव आहे कॅन्सर स्पेशल !!

    या पार्श्वभूमीवर गहू न धुता वापरणे किती धोकादायक आहे याचा विचार करून पहावा.
    नुसता पाण्यात बुचकळून काढला तर हे विषारी केमिकल जात नाही, कारण या गव्हाला जी खाच आहे, त्या खाचेत या खताचा अंश चिकटून रहातो, जो दररोज आपल्या पोटात जातोय.

    भीती निर्माण करण्यासाठी हे सांगतोय, असं नाही तर जागरूकता होण्यासाठी सांगतोय , हे लक्षात घेऊया.

    अन्य काही रोगांचे हेतू ( म्हणजे कारण ) असलेले मूळ कारण जोपर्यंत दूर केले जात नाही, तोपर्यंत विषे दूर करणारी सोन्यासारखी कितीही औषधे वापरा.... काऽऽही फरक पडणार नाही.

    आयुर्वेद सांगतो, रोगाच्या मूळ कारणाचा शोध घ्या आणि ते कारण दूर करा.

    आज रोगांचे प्रमाण ( संतर्पणजन्य व्याधी म्हणजे ) विशेषतः चरबी वाढल्यामुळे होणारे रक्तदाब, ह्रदयरोग, मधुमेह, पोट सुटणे, मासिक पाळीच्या समस्या इ.इ. आजार वाढले आहेत.

    केवळ सणासुदीला वापरला जायचा तो पचायला जड असणारा, मधुर रसाचा, स्निग्ध गुणाचा, जगण्यासाठी पाणी जास्त घेणारा, त्यामुळे कफ दोष वाढवणारा, गहू आपल्याकडे दैनंदिन आहारात येऊन बसल्यावर दुसरे काय होणार ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    26.10.2016

  • लिव्ह इन रिलेशनशिप आणि भारतीय विवाह संस्था

    पूर्वी योग्य ‘वर किंवा वधु’ शोधण्याची संपूर्ण जवाबदारी मुलाच्या किंवा मुलीच्या आई-वडिलांवर असे. ‘बदल हा काळाचा नियम आहे’ असे म्हंटले जाते. त्याचप्रमाणे जसे परकीय संस्कृतीचा इथल्या संस्कृतीवर होत असलेले आक्रमण वाढत आहे आणि त्याच्या परिणाम इथल्या विवाह संस्थेवर सुद्धा होत आहे.

  • मधुमेहीं व्यक्तींनी बाहेर खाताना.

    खूप वेळ घराबाहेर काढावा लागला तर नेमकं काय खायचं हा मधुमेहींसमोर यक्षप्रश्न असतो.

    कामानिमित्त बराच वेळ घराबाहेर राहावं लागतं, वारंवार पाटर्य़ाना जावं लागतं, नवरा- बायको दोघेही काम करतात अशा विविध कारणांमुळे मधुमेहींना बाहेर, हॉटेलमध्ये खावे लागते. बाहेर खाताना ज्याने साखरेचे प्रमाण वाढणार नाही असं काय खाऊ हा प्रश्न नेहमीच सतावतो. नाक्यानाक्यावर असलेले विविध खाद्यपदार्थाचे ठेले, तोंडाला पाणी आणणारा वास, आकर्षक मांडणी यामुळे कुणालाही नक्कीच ते पदार्थ खावेसे वाटणार. हे अगदी स्वाभाविक आहे. ‘पिझ्झावर कोक फ्री’ अशा आकर्षक जाहिरातीदेखील अनेकांना भुरळ पाडत असतात. जिभेवर ताबा ठेवून, साखरेचे प्रमाण वाढणार नाही याचा विचार करत हॉटेलमधील पदार्थ निवडताना तारेवरची कसरत होते. खाण्याचा पदार्थ निवडताना खाणाऱ्याची आवड, खाद्यपदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स, (Glycemic Index), त्यातील कॅलरीजचं प्रमाण या मुद्दय़ांचा प्रामुख्याने विचार करावयास हवा. ग्लायसेमिक इंडेक्स हा त्या पदार्थामुळे रक्तातील साखर किती वाढते याचं प्रमाण दर्शवितो. खाद्यपदार्थावर दिलेला त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स, कॅलरीजचं प्रमाण, त्याचबरोबर त्यातील कबरेदके, तसंच नमूद केलेले प्रथिने, स्निग्धाचे प्रमाण जरूर वाचावे व त्यानुसार खाद्यपदार्थ निवडावा.आपल्या खाण्याची सुरुवात नेहमी ताक/ लिंबू पाणी/ सोडा, टोमॅटो, काकडी इ. सलाड, सूप (साखर, क्रीमरहित) यांनी करावी. जेवणात ब्राऊन किंवा मल्टी ग्रेन ब्रेडचे व्हेजिटेबल सँडविच (बटर, चीजरहित), साधा डोसा, गव्हाच्या पिठाची पोळी (तेल, बटर न लावलेली), डाळ (तडका नसलेली), उकडलेल्या किंवा कमी तेलात केलेल्या भाज्या, पालक पनीर, चणा मसाला, भाज्यांचा पुलाव हे पदार्थ खाण्यासाठी निवडावेत. कमी प्रमाण (small portion size) असलेला उपलब्ध खाद्यपदार्थ मागवावा.

    फ्रूट सलाड, गोड पदार्थ, आइस्क्रीम (साखररहित) माफक प्रमाणात मागवावे व आपल्या सोबतच्या मित्रांसमवेत वाटून खावे. गोड, तळलेले, मैद्यापासून बनविलेले, डालडा, तूप वापरून बनवलेले पदार्थ कटाक्षाने टाळावेत. मद्यपान टाळावे, ते शक्य नसल्यास मद्याचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. मद्य हे पाणी अथवा डायट सोडय़ामध्ये मिसळून प्यावे. प्रक्रिया केलेले (processed), बाजारात मिळणारे डबाबंद पदार्थ (packed) उदा. लोणचे, फरसाण, वेफर्स इत्यादी टाळावेत. मांसाहार खाणाऱ्यांनी कबाब, तंदूर केलेले खाद्यपदार्थ निवडावेत. उकडलेल्या माशांना प्राधान्य द्यावे. तोंडात त्वरित विरघळणारे पदार्थ टाळावेत. ३२ वेळा चावून खावे लागतील असेच पदार्थ निवडावेत. पदार्थाचे ग्लायसेमिक इंडेक्स आणि कॅलरीज दाखवणाऱ्या अॅेप्सचा वापर केल्यास योग्य खाद्यपदार्थ निवडण्यास मदत होईल.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ. मीनाक्षी कुऱ्हे

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३६

    पाण्याची प्रशंसता भाग एक

    पाणी म्हणजे जीवन जर योग्य वेळी, योग्य काळी, योग्य स्थळी, योग्य मात्रेमधे प्यायले तर !

    हे विश्व पाण्यातूनच निर्माण झाले आहे. प्रत्येक प्राणीमात्राला जगण्यासाठी पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. असे पाणी न मिळाल्यास तोंडाला कोरड पडते, शरीर चैतन्यहीन होते. अवयव शिथील होतात, आणि शेवटी मृत्यु येतो. पाण्याशिवाय कोणत्याही प्राण्यांचे कार्य चालूच शकत नाही, मग तो रोगी असो वा निरोगी, पाणी हेच जीवन आहे.

    निरोगी राहाण्यासाठी वाग्भटजी म्हणतात,
    जेवणाच्या आरंभी पाणी प्यायल्याने मनुष्य बारीक होतो.
    जेवणाच्या नंतर पाणी प्यायले असता, माणूस स्थूल होतो.
    तर जेवताना पाणी प्यायले असता मनुष्य सडसडीत राहातो.

    तो मूळ संदर्भ असा आहे.
    समस्थूलकृशा भक्तमध्यान्तप्रथमाम्बुपा : ।

    भक्तस्यादौ जलं पीतमग्निसादं कृशांगताम् ।
    अंते करोति स्थूलत्वं ऊर्ध्व चामाशयात्कफम
    मध्ये मध्यांगतां साम्यं धातूनां जरणं सुखम् ।।

    जेवताना देवाचे स्मरण करून पहिली आपोषणी घेतात. घसा ओला होण्यापुरतेच हे पाणी सांगितले आहे. नंतरचा घास अडकू नये, म्हणून घसा थोडा ओला करून घेणे. एक पळी पाणी उजव्या हाताची तर्जनी आंगठ्याच्या मुळाशी लावून तळहातावर छोटा खळगा करून त्यात एकच पळी पाणी घेतात......

    देवपूजे मधेदेखील कोणत्याही कार्याच्या सुरवातीला आपोषणी घेतात.
    केशवाय... नारायणाय....माधवाय नमः।
    इथेपण तीनच पळ्या पाणी सांगितले आहे....

    पाणी भरपूर प्यायचा नियम जर आपल्या संस्कृती मधे असला असता तर तिथे एक पळीभर ऐवजी, एकेक पेलाभर किंवा एकेक तांब्याभर पाणी प्यायला का सांगितले जात नाही?

    "कारणाशिवाय पाणी पिऊ नये. जेवणापूर्वी पाणी पिऊ नये, पाणी प्यायचे असल्यास एक पळीभरच पाणी प्यावे" हा संदेश यातून मिळतो.

    जेवणापूर्वी जास्त पाणी प्यायल्याने पोटातील पाचक स्राव कमी होतात.भूक मारली जाते. जेवण कमी जाते, त्यामुळे बारीक व्हायला होते. शरीर कृश होते, म्हणून असे करू नये.

    हो. हे आधी ठरवले पाहिजे की, आपण सडसडीत असले पाहिजे. जाड पण नको. आणि बारीक पण नको. केवळ बारीक दिसण्यासाठी, डाएटींगच्या नावाखाली, पाणी पित रहाणे हा रानटी क्रूरपणा आहे. कृपया असे करू नये. आम्ही आमच्या विचारधाराच बदलून टाकल्या आहेत. आम्ही आमचे आदर्शच बदलून टाकले आहेत.

    आमचे आदर्श जर दीपिका नि कॅटरीना असतील तर जीवनात वादळं आल्याशिवाय राहाणार नाही. काय दीपक लावायचे आहेत, ते कर्तृत्वात दाखवा. नुसते 'फिगर फिगर' करण्यात काही अर्थ नाही. शरीर अगदी नाजूक आखीव रेखीव, पण जरा काम सांगितले की कंबर जाते मोडून !

    तरूणांचा आदर्श सुद्धा संजय दत्त नको, तर बटुकेश्वर दत्त हवा. पाश्चात्य विचारांचे पाणी जोखणारा आणि त्यांच्या तोंडचे पाणी पळवणारा !!

    कृश होणे, बारीक होणे हे, 'अशक्त होणे' या अर्थी आहे, हे लक्षात घ्यावे. म्हणून शहाण्या माणसानी जेवणापूर्वी पाणी पिऊ नये.

    तोंडातील लाळ औषधी असते, पण सकाळी सकाळी तोंड धुवायच्या अगोदरची नाही. रात्रभर तोंडात तयार झालेली, किडलेल्या दाढांमधे भरून राहिलेली, लाळ औषधी कशी असेल ? राजा भोज यानी लिहिलेल्या एका ग्रंथातील संदर्भ असं सांगतो, पण वाग्भटजी असं कुठेही सांगत नाहीत.
    आपले राजे केवळ युद्धच करत नव्हते तर ग्रंथ देखील लिहित होते. आमच्या छत्रपती शंभुराजांच्या संस्कृतमधे लिहिलेल्या बुधभूषण या ग्रंथाचे नाव तरी आठवत असेल. हे सर्व प्राचीन ग्रंथ खरंतर शालेय अभ्यासक्रमात असायला हवेत. असो.

    गोऱ्या कातडीचे लोक काय सांगतात, यापेक्षा आपल्या परंपरा आणि आमचे आप्त काय सांगतात, ते जास्त महत्वाचे. त्यांनी नक्कीच चार पावसाळे जास्त बघितलेले आहेत.

    थोडा विश्वास दाखवूया, आमच्या आप्तांवर !
    त्यांनी आखून दिलेल्या चालीरीती वर !!

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.01.2017

  • इलेक्ट्रिकल इंजिनिअरची दुग्धव्यवसायात क्रांती!

    नोकरीच्या मागे न लागता स्वमेहनतीने बेसखेडा जिल्ह्यातील चांदुर बाजार येथील व्यवसायाने इलेक्ट्रिकल इंजिनिअर असलेल्या श्री रवी पाटील या होतकरु तरुणाने दुग्धव्यवसायात क्रांती घडविली आहे. पुणे येथील एका नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी सोडून ‘चॅलेंज’ म्हणून त्याने दुग्धव्यवसाय स्विकारला आणि यशस्वीही करुन दाखविला. कुठल्याही शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता परिश्रमाने या व्यवसायात आपली वेगळी ओळख निर्माण करुन जिल्ह्यातील युवकांसाठी तो आदर्श ठरला आहे. कुटूंबाने शेतकरी असलेल्या या युवकाने शेतीला दुग्धव्यवसायाची जोड देऊन ही किमया साधली आहे.

  • रोकड – विरहित व्यवस्थेकडे

    ८ नोव्हेंबर २०१६ ही तारीख स्वतंत्र भारताच्या आर्थिकइतिहासात कशी नोंदवली जाईल हे आत्ताच सांगणे कठीण आहे . मात्र यादिवशी त्यावेळी चलन - वलनात असणाऱ्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांची कायदेशीरमान्यता काढूनघेण्यात आली या गोष्टीची चर्चा नक्कीच होईल . सरकारी पक्षाचे समर्थक त्याचे वर्णन " धाडसी "असॆ करत असताना विरोधक त्याची हेटाळणी "आक्रस्ताळ " असं करणार .

    पण एक गोष्ट मात्र नक्की की ८ नोव्हेंबर २०१६ नंतरप्रत्येक नागरिकाला आपल्या स्वतःच्या खर्चाबद्दल विचारकरायची वेळ आली आहे . असा विचार एखादा खर्चकरावा का , केला तर आत्ताच केला पाहिजे का , आत्ताचकेला तरइतका करावा का या पैलूंबाबत तर करावालागत आहेच ; पण त्याचबरोबर तो कशा पध्दतीने करावाअसा खर्चाच्या माध्यमाच्या अंगानेही करावा लागत आहे .

    कोणत्याही खरेदीचा मोबदला रोख रकमेत द्यायचा ,चेकने द्यायचा , ग्राहकांच्या बँक खात्यातून पुरवठादाराच्याबँक खात्यात पैसे पाठवायला सांगायचे , क्रेडिट कार्ड -डेबिट कार्डच्या माध्यमातून द्यायचा की " paytm "सारख्यातुलनेने नवीन अशा पद्धतीचा वापर करायचा हेहीठरवावे लागेलच . या सर्व पद्धतीपैकी रोखिने पैसे देणे हाअपवाद वगळल्यानंतर जे काही मार्ग उरतात ते सर्वचम्हणजे रोकड - विरहीत ( आपल्या नेहमीच्या वापरातीलमराठीतसांगायचे तर " कॅशलेस " ) पद्धत . या मार्गानेज्या अर्थव्यवस्थेत बहुतांश व्यवहार होतात ती रोकड -विरहीत अर्थव्यवस्था ( म्हणजेच " कॅशलेस एकॉनमी ) .अशा अर्थव्यवस्थेत आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचेरुपांतर करण्याचामानस तेंव्हापासून सतत व्यक्त केलाजात आहे . जगातील अनेक देशात , विशेषतः युरोपीयदेशांत , असॆ व्यवहार , अशा अर्थव्यवस्था असण्याचेदाखले वारंवार दिले जातात . त्यातच ८ नोव्हेंबर २०१६च्या नोटा - बदलीचा मोदीसरकारच्या निर्णयांची सांगडकाळा पैसा , भ्रष्टाचार , दहशतवाद यांच्याशी घातलीगेल्याने तर कॅशलेस अर्थव्यवस्था याबाबत कशी आणिकिती उपयोगी पडेल , पडू शकेल असाही पदर त्याचर्चेला साहजिकच आहे .

    या निर्णयाला पार्श्वभूमी म्हणून अर्थक्रान्ती चळवळ आहे .मोठ्या नोटा रद्द करणे ही जशी या चळवळीची मुख्यमागणी आहे , तशीच बहुतांश व्यवहार बँक - माध्यमातूनव्हावे आणि असॆ बँक व्यवहार हाच कर - आकारणीचापायाव्हावा अशी सत्शील मागणी ही सालस - निरलसमंडळी गेली दिड - दोन दशके सातत्याने करीत आलीआहेत . रोखिच्या व्यवहारात न उरनारा मागोवा बँकव्यवहारात मात्र नक्कीच राहातो आणि सध्याच्या तांत्रिक -संगणकीययुगात तो प्रदीर्घ काळ टिकतो . त्यातूनचकोणत्याही व्यवहारांची केंव्हाही शहानिशा , पडताळणीशक्य होत असल्याने गैरमार्गाने जाऊ इच्छित असलेल्यांनाकाही प्रमाणात तरी नक्कीच पायबन्द बसेल अशी भूमिकायाबाबत मांडलीजाते . यांतून भ्रष्टाचार जरी अगदी शून्यपातळीवर आला नाही तरी काटेकोर अंमलबजावणीमुळेतो नगण्य पातळीवर नक्की येऊ शकतो .

    मुळातच कोणताही घोटाळा किंवा भ्रष्टाचार हा " Neither prescibed , nor prohibited " अशा स्वरूपातअसण्याची शक्यता असते . कायदा किंवा नियम मात्रprescribed , prohibited असाच असावा लागतो .असतो .कारण सरतेशेवटी भ्रष्टाचार हा मनात असतो ,व्यवस्थेत नाही . भ्रष्ट मन व्यवस्था वाकवण्याचे मार्गशोधत राहाते . त्याबाबतच्या संधी , शक्यता , प्रेरणा कमी- कमी करत राहाणाऱ्या प्रयत्नांची सातत्य हे याबाबतनेहमीच एकआव्हान असते . हे अगदीच अशक्यच नसलेतरी फारसे सोपे नसते .

    कारण ही प्रक्रिया जशी संविधानिक आहे , जशीकायदेशीर आहे ; तशीच आणि तितकीच मानसिकहीआहे . ही मानसिकता अर्थव्यवस्थेत नियम बनवनार्यासरकार व प्रशासकीय आधिकार्यान्ची जशी हवी तशीआणि तितकीचअर्थव्यवस्था पेलनार्या तुमच्या - माझ्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांचीही हवी . याबाबतचाआपल्या देशातला आजपर्यंतचा अनुभव संमिश्र आहे .त्याचा संबंध फारसा गरीबी सारख्या आर्थिक गोष्टीशी ,किंवा निरक्षरतासारख्यासामाजिक घटकांशी नसूनआपल्या सर्वांच्या मानसिकतेशी जास्त आहे . रोकड -विरहीत अर्थव्यवस्थेत पायाभूत असणाऱ्या बँकांचे ATMद्वारा पैसे मिळण्याचे साधन सुरु झाले तेंव्हा अगदी शहरीभागातील उच्चशिक्षित , सुशिक्षितमाणसांनी , निदानसुरुवातीच्या काळात तरी , दिलेला प्रतिसाद कुठे आणिकधी उत्साह - वर्धक होता ?

    अगदी आजही आपण सगळेच ज्या आणि जितक्यामोठ्या प्रमाणावर बॅंकांच्या ATMs चा उपयोग करतो ,तितक्याच प्रमाणावर त्याच बँकांच्या Cheque Depositing Machines चा फायदा घेतो का ?आपल्या देशांत मोबाईलमिळू लागले तेंव्हा त्यांच्यावापराचे प्रमाण कुठे सुरुवातीस सुखावह होते ? रेलवेचीतिकिटे संगणकीय प्रणालीतून मिळू लागल्यावर ही पद्धतलोकप्रिय होण्यास किती वेळ लागला ? आजमितिलामात्र IRCTC ही सर्वात जास्त वापरलीजाणारी वेब - site झाली आहे . आपल्या देशाच्या भांडवल - बाजारातDepositories चा कारभार सुरू झाल्यानंतर त्यालासरकार , नियंत्रक , बाजार - मध्यस्थ यांच्या वर्षानुवर्षेकेलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची जोड मिळालीतेंव्हाच कुठेआजची सकारात्मक परिस्थिती निर्माण झाली . ही आणिअशी उदाहरणे हे स्पष्ट करतात की अशा गोष्टी यशस्वीजरूर होतात ; पण त्या " पी हळद , हो गोरी " स्वरूपाच्यानसतात . त्या जनमानसात मुरायलारूजायला वेळ द्यावालागतो . हे सर्वच सन्बन्धीतान्च्या संयम व चिकाटी पुढेअसणारे मोठे आव्हान असते . रोकड - विरहीतअर्थव्यवस्था तर संपूर्ण देशाचा आवाका समाविष्ट करणारहे लक्षात घेतले तर या आव्हानाच्या स्वरूप ,आकार यांचाअंदाज येऊ शकेल .

    अगदी e - commerce पद्धतीने व्यवहार करणाऱ्याकंपन्यांना आपल्या देशांत जम बसवायला किती वेळलागला ? आज मात्र अशा कंपन्यांचे servers बंद पडावेअशी परिस्थिति Bumper Salesच्या काळात जन्मालायेते .त्यातूनच भलत्याच ग्राहकाला त्याने मागणीनोंदवलयापेक्षा भलतीच वस्तू मिळाली अशा तक्रारी सुरूहोतात . त्या अपवादात्मक ही असतील . पण त्या आहेत ,असतात , असू शकतात याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. ३१ डिसेंबरफार दूर नाही . तेंव्हा अशा गोष्टी होतील .पण तात्कालिक आणि सार्वकालिक यांत गल्लत करूनचालत नाही . अशी गडबड होऊ न देणे हे अशा व्यवस्थापुढचे मोठे आणि महत्वाचे आव्हान असते .

    आणि अगदी आजही अशा कंपन्याबरोबर व्यवहारकरणाऱ्या भारतीय ग्राहकांची वयानुरुप वर्गवारी केली तरएक आणखीन नवीन पैलू समोर येतो . जेंव्हा आपणसहजपणे आपल्या घरातील ४ - ५ वर्षाचे लहान मूलघरातील मोठ्यामाणसांपेक्षा जास्त लवकर आणि जास्तचांगल्या पद्धतीने एलेक्ट्रॉनिक उत्पादने वापरतात असॆम्हणतो तो एरवी कौतुकाचा उदगार रोकड - विरहीतअर्थव्यवस्थेकडे जाण्याचा वेग काय असेल याचानिर्णायक घटक ( आणि अशाअर्थाने आव्हान ) ठरूशकतो .

    रोकड - विरहीत अर्थव्यवस्था ( कॅशलेस एकॉनमी ) ही प्रामुख्याने क्रेडिट - डेबिट कार्ड या माध्यमांवर आधारीतअसते . आपल्या देशांत सिनेमाचे १०० - १२५ रूपयाचेतिकीट तरुण पिढी जितक्या सहजतेने आणि सातत्यानेक्रेडिट -डेबिट कार्डने काढते , त्या तत्परतेने अशा छोटया रकमेच्या व्यवहारात चाळिशीच्या पुढच्या वयाचे नागरिक आपल्या देशांत कार्डचा वापर आजमितिला तरी करत नाहीत . पण अशा रकमेचे व्यवहारच तर आपल्या दैनंदिन जीवनात सर्वात जास्त असतात . असा वापर न होण्यात जशी आपली मानसिकता कारणीभूत असते , तशीच अनेक व्यापारी कार्ड पेमेन्त स्वीकारत नाहीत हेही कारण आहेच . कार्ड कंपन्यांची असहकाराची भूमिका , पैसे मिळण्यात होणारी दिरंगाई , नेटवर्क- कनेक्टविटी अशा तांत्रिक बाबी अशीअनेक कारणे असतात . आणि त्या अर्थाने , मर्यादीत काहोईना , पण या प्रक्रियेसमोरची आव्हाने असतात .

    याच प्रश्नाचा अजून एक पैलू इथे आवर्जून लक्षात घ्यावालागतो . आजमितिला आपल्या देशांत क्रेडीट कार्डवापरण्यात तरूण पिढी जास्त पुढे आहे . याबाबतनेहमीच येणारा अनुभव असा आहे की मध्यम - वयीनआणि प्रौढ कार्डधारक आपले संपूर्ण बिल , आणि तेहीदेय तारखेच्या आत भरते . याउलट तरुणाईचा कलMinimum Payable Amount भरण्याचा आणि तेहीअनेकदा देय तारखेच्या नंतर भरण्यात असतो . याचीवसूली , थकबाकी , बुडीतरकम हा प्रकार भारतीयबँकांना परवडणारे नाही . आजमितिला कंपन्यांना दिलेलीकर्ज , जी बुडित - खाती ठरली ( NPAs) ही जशीभारतीय बँकांची डोकेदुखी आहे ; तशी ( अगदी त्याप्रमाणात नसली तरी ) अशी उधारी ही आहे .रोकड -विरहीत म्हणजे उधार नाही , फूकट तर नाहीच नाही.अशा अर्थाने रोकड - विरहीत अर्थव्यवस्थाप्रक्रियेसमोरचे हे आव्हान असते .

    रोकड - विरहीत अर्थव्यवस्था असा विचार करत असतानाएक गोष्ट समजून घेणे अतिशय आवश्यक आहे . तीम्हणजे अशी अर्थकारण - पद्धती ही पद्धती आहे ;कारणही नाही , आणि परिणामही नाही . तसे नसणे हेकोणत्याहीआर्थिक आजाराचे एकमेव कारण नसते .आणि तो कोणत्याही आर्थिक आजारावरचा एकमेवरामबाण उपाय नसतो . सार्वकालिक तर नाहीच नाही .याबाबत आपल्या देशांत सध्या जे एक भारलेले वातावरण( charged अशा अर्थाने) आहे ते पाहाता तर हे लक्षातठेवणे फार जरूरीचे आहे . ज्या युरोपियन राष्ट्रांचीउदाहरणे याबाबत दिली जात आहेत , त्यातल्या अनेकदेशांची अर्थव्यवस्था आजमितिला फारशा चांगल्यास्थितीत नाहीत . पण म्हणून रोकड -विरहीत अशीव्यवहार - पद्धती टाकाऊ ठरत नाही . ठरत नसते . कारणरोकड - विरहीत पद्धत अर्थव्यवस्थेची स्थिति ठरवतनसते हा विचार खोलवर पसरण्यास लागणारा वेळ हे यापद्धती पुढचे एक आव्हान ठरू शकते .

    कारण रोकड - विरहीत व्यवहार - पद्धती व्यवहार - खर्चकमी करते , ती पद्धत पारदर्शक असते म्हणूनस्वीकारायची असते , हे सर्वानीच समजून घेणे हे यापद्धती पुढचे मोठे आव्हान असते .

    सरतेशेवटी , ही पद्धत अंमलात आणण्याचा मोदीसरकारचा निर्णय हा निश्चितच स्वागतार्ह्य च आहे .त्याबाबतच राजकारण - समाजकारण आणि अर्थकारणहे तिन्ही पैलू फार महत्वाचे आहेत हे नक्कीच ! ! ! !

    (४ डिसेंबर २०१६ रोजी दैनिक पुढारी च्या बहार पुरवणीत प्रसिद्ध झालेला लेख . हा लेख आदित्य फीचर्स , पुणे यांच्या माध्यमातून प्रसिद्ध झाला .)

    -- चंद्रशेखर टिळक
    २९ नोव्हेंबर २०१६ .

    9820292376
    Email: tilakc@nsdl.co.in