(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • किचन क्लिनीक – जव

    जव हे धान्य प्रामुख्याने क्षुद्रधान्या मध्ये समाविष्ट होते. तसेच ह्याचा वापर आपल्या दैनंदिन आहारात आपण जास्त करताना आढळत नाही कारण तसे हे धान्य कोकण गोवा प्रांतात फारसे प्रचलित नाही.

    तरी देखील हे अत्यंत पौष्टीक, त्यामानाने स्वस्त असे धान्य असल्याने ह्याचा वापर जर आपण आपल्या आहारा मध्ये केला तर त्याचा फायदा आपल्या आरोग्यास व शरीरास नक्कीच होऊ शकेल ह्यात शंका नाही.

    डायबेटिस असणाऱ्या व्यक्तिंना तर जव हे एक वरदान आहे त्यामुळेच प्रमेही रूग्णाने आपल्या आहारात जवाचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा रक्तगक साखर नियंत्रित करायला व प्रमेह आटोक्यात ठेवायला नक्की होऊ शकतो. चला तर मग आपण जवाचे गुणधर्म पाहुयात: जव चवीला गोड, तुरट, थंड, रूक्ष, पचायला हल्के, वातकर, कफ पित्त नाशक असून, मल वाढविणारा, तसेच चरबी कमी करणारा, मेघा, बुद्धी, शरीर बल वाढविणारा आहे.

    आता आपण जवा पासून तयार केलेल्या पदार्थांचे गुणधर्म पाहुया:

    १) मंड:

    हा पचायला हल्का, कफपित्तनाशक, वातुळ, घशाला हितकर, रक्त शुध्दीकर आहे.

    २) मंथ:

    चवीला गोड, थंड, वर्ण सुधारणारा,बलवर्धक, पुष्टीकर, स्थैर्यकर, पित्तनाशक, दाह, तहान, श्रम ह्यांचा नाश करणारा, उल्टी होत असल्यास ती कमी करायला मदत करतो.

    ३) रोटी:

    चवीला गोड, हल्की, वातकर, मल वाढविणारी, कफरोगात उपयुक्त, बलकारक, शुक्रवर्धक आहे.

    जव खायचा अतिरेक केल्यास शरीरात वात वाढून त्याची लक्षणे दिसू लागतील.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    आता पर्यंत सुरू असलेले किचन क्लीनीक ह्या सदरातील हा शेवटचा लेख असून हे सदर ह्या शेवटच्या लेखाने पुर्ण होत आहे.मी आशा करते की हे सदर आपल्या सर्वांना नक्कीच उपयुक्त ठरले असेल.लवकरच पुन्हा भेटूया एक नवीन लेखमाला घेऊन.

    तो पर्यंत तात्पुरता निरोप घेते.

    धन्यवाद.

    वैद्य स्वाती अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क: ९९६०६९९७०४

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेबेचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग छत्तीस

    बाबा सांगतात...

    सांगेन गोष्टी हिताच्याच चार....

    निरोगी राहण्यासाठी काय करावे, हे आपण आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहात आहोत. केवळ औषधे घेणे म्हणजे आरोग्याची प्राप्ती नव्हे.
    तहान लागल्यावर विहिर खणण्यापेक्षा पुढे तहान लागणार आहे, हे आधीच ओळखून, पाण्याचा शोध घेऊन ठेवावा. पाण्याला "जीवन" असा आणखी एक पर्यायवाची शब्द सांगितलेला आहे. जीवन सुखी होण्यासाठी सावध तो सुखी. नाहीतर सुखाच राहाणार. समुद्री चहुकडे पाणी पिण्याला थेंबही नाही. अशी अवस्था होऊ नये, याकरता आधीच विचार करावा, असे आयुर्वेद सांगतो.

    याचा अर्थ असा नव्हे की, भविष्यात हाताच्या एखाद्या बोटाला चुकुन, अपघाताने, जखम झाली तर, "या जखमेचे रूपांतर पुढे कर्करोगात होऊ नये, म्हणून आत्ताच हे चांगले बोट आपण ऑपरेशन करून काढून टाकूया" असे म्हणण्यासारखे आहे. नाही का ? याला "प्रिकाॅशन" असे म्हणता येईल का ? आज व्यवहारात याला "प्रिकाॅशन" असे गोंडस असे नाव दिले जात आहे, आणि भीती उत्पन्न करून नको ती शस्त्रकर्मे जसे गर्भाशय निर्हरण, सिझेरीयन, अपेंडिक्स, थायराॅईड, पित्तखडे, मूतखडे आणि अगदी ह्रदयातील ब्लाॅकदेखील, लगेच इमर्जन्सीच्या नावाखाली, ही शस्त्रकर्मे केली जात आहेत. हे मी नव्हे तर अमीरखान सारखा सत्यशोधक सत्यमेव जयते मधून सांगतोय. पद्मभूषण डाॅ. बी एम हेगडे देखील आपल्या युट्युब मधील अनेक व्हिडिओ मधून सांगताहेत. हे व्हिडिओ शांतपणे यु ट्युबवर जरूर पहावेत.

    मनात भीती कधी उत्पन्न होते ? जर अभ्यास नसेल तर. जर एखाद्या विषयाचा अभ्यास झालेला असेल तर परीक्षेत नापास होऊ अशी भीती वाटण्याचं काही कारणच नाही. अमुक गोष्ट केल्यावर, ती जाणून घेतल्यावर, तुला भीती वाटण्याचे काही कारणच नाही, याची खात्री पटली की, भीती उत्पन्न होतच नाही, असे विवेकानंद म्हणतात. म्हणजेच अज्ञान हीच सर्वात मोठी भीती आहे. ही अंधश्रद्धा नाही. मी जर आरोग्याच्या नियमांचे योग्य रितीने पालन करत असेन, तर मला भविष्यात काही रोग होईल, अशी भीती वाटण्याचे काही कारणच नाही.

    रोग झाल्यावर काय करावे, हे अभ्यासण्यापेक्षा रोग होऊ नयेत, म्हणून काय काय करावे, हे आयुर्वेदात खूप सखोल सांगितलेले आहे.

    रोग होऊ नये, यासाठी शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक या चारही गोष्टींचा साकल्याने विचार करावा. केवळ दिनचर्या, रात्रीचर्या, ऋतुचर्या, आहार विहार पथ्यापथ्य पालन करणे म्हणजे स्वस्थवृत्त नव्हे, हा शारीरिक अंतर्गत एक भाग झाला. इतर गोष्टी दुर्लक्षून कश्या चालतील ? आपल्याला जर पूर्ण आरोग्य मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे असतील, तर सर्व गोष्टींचा विचार आणि अभ्यास करायलाच हवा. म्हणून हा आयुर्वेदीय हितोपदेश.

    काही जणांच्या मनात अज्ञानामुळे, अजूनही शंका आहेत, की " आई बाबा सांगतात" हे आयुर्वेदाच्या कोणत्या पुस्तकात सांगितले आहे ?
    कृपया आपली जातीयवादी विकृत दृष्टी, निदान आरोग्याच्या क्षेत्रात तरी, जरा बाजुला ठेवावी.

    जसे अग्निवेश, चरक, सुश्रुत होऊन गेले, तसे त्यानंतरच्या काळात 'वाग्भट' हे ग्रंथकार होऊन गेले. नागार्जुन, शारंगधर, काश्यप इ. अनेक ऋषी, आणि त्यांचे शिष्योत्तम, ही आरोग्य रहस्ये काळानुरूप त्यात योग्य ते बदल करीत, पुढील पिढीला देत गेले.

    गुरूशिष्य संवाद रुपात हे ज्ञानदान करण्याची भारतीय परंपरा जशी भगवद्गीता सांगितली, तशीच गुरूशिष्य संवादरुपी विवेचन या आयुर्वेदीय ग्रंथामधे देखील दिसते. शिष्य प्रश्न विचारतात, आणि गुरू त्या शंकेचे समाधान करतात. अशी ही परंपरा. पण दुर्दैवाने ही गुरुकुल शिक्षण परंपरा बंद पडली आणि महाविद्यालयीन चाकोरीबद्ध शिक्षण सुरू झाले....

    आई आणि बाबा हेच मोठे गुरू आहेत. जीवनाचे सार, चार हिताच्या गोष्टी, तेच अधिकाराने सांगत असतात. गुरुशिष्य परंपरा आई बाबा सांगतात, या नावाखाली सांगण्याचा हा प्रयत्न "वाग्भट" या ग्रंथाधाराने सुरू आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग अठरा

    अवयवांना आपले काम करायला एक विशिष्ट स्पेस हवी असते. जी स्पेस या गॅसच्या दबावामुळे मिळत नाही, आणि चांगले निरोगी असलेले अवयव देखील काऽही काम करू शकत नाही.

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग तेवीस

    लंबी सफर का घोडा

    शरीराच्या प्रत्येक अवयवाची स्थूल आणि सूक्ष्म हालचाल निरंतर होत असते. जिथे हालचाल आहे तिथे झीज आहे. ही झीज तर होणारच असते, ती अगदी कमीत कमी व्हावी याची काळजी घेणे हे आपले काम !

    कोणत्याही गाडीकडे बघा. त्याच्या बेअरींगची झीज होऊ नये याकरीता ग्रीसींग करणे, गंजू नये यासाठी त्याला ऑईलपेंट लावणे, केबल्स लवकर खराब होऊ नये म्हणून ऑईलींग करणे, त्या गाडीला धुणे, त्याच्या इंजिनमधील तेल पाणी बघणे, हे आपण करत असतोच. याला आजच्या भाषेत "मेंटेनन्स" म्हणतात. नियमितपणे, आठवणीने याचा "मेंटेनन्स" करणे महत्त्वाचे, म्हणजे गाडी वारंवार गॅरेजमधे न्यावी लागत नाही.

    ज्या गाडीचा मेंटेनन्स नीट नाही, ती गाडी, त्या गाडीचे अवयव लवकर खराब होतात. मग गाडी हळुहळू आवाज करू लागते. वारंवार गॅरेजमधे न्यावी लागते. तो सांगतो, या गाडीतल्या इंजिनमधील ऑईलची लेव्हल कमी झाली आहे, ऑईल बदलले पाहिजे, ब्रेक ऑईल संपले आहे, घालायला पाहिजे. चेनमधील ग्रीस संपले आहे, गियर केबल, क्लच केबल याना तेल सोडले पाहिजे.

    आपण टीव्हीवर जाहीराती पहातो, त्यातही ट्रकच्या इंजिन मधील ऑईलच्या जाहीराती मुद्दाम पहा. ज्या इंजिनमधील तेल कमी, किंवा हलक्या दर्जाचे, त्या इंजिनचे 'मायलेज' कमी. मग तो ट्रक लंबी सफर का घोडा बनू शकणार नाही. त्यामुळे आमच्या कंपनीचे अमुक तेल वापरा ते इंजिनमधील कचरा दूर करील वगैरे......

    तसेच शरीराचे देखील आहे.

    दैनंदिन जीवनात या तेलाचे अनन्य साधारण महत्व असते. शरीरावर जेवढी म्हणून छिद्रे आहेत, त्या सर्व छिद्रामधून दररोज तेल आत सोडावे. जसे नाक, कान, डोळे, मलद्वार मूत्रद्वार, योनीमार्ग, आणि सर्व घर्मछिद्रे यांना तेलाचे पूरण होणे आवश्यक असते. तर आतील सर्व स्थूल अवयव आणि सूक्ष्म इंद्रिये यांचे पोषण होत असते.

    शिलाई मशीनला जशी छिद्रे असतात. त्या छिद्राच्या जवळ लिहिलेले असते. "ऑईल." याचा अर्थ या छिद्रातून तेलाचे काही थेंब या मशीनमधे किमान आठवड्यातून एकदा तरी, सोडावेत, म्हणजे ही मशीन न झिजता उत्तम काम करेल.

    जेव्हा हे मशीन कामाला येते, तेव्हा त्याला डाॅक्टरांच्या गॅरेजमधे नेले जाते. ते सांगतील की ही झीज नैसर्गिक आहे, वाढत्या वयामुळे हे असेच होणार, हे दुखणे आता गृहीत धरायचे, आता कॅल्शियम सप्लीमेंट घेण्याची वेळ सुरू झाली हा सांधा झिजलाय बदलून टाकू, इ. इ. जे एकदा आपण गृहीत धरले की औषधे आयुष्यभरासाठी सुरू झाली किंवा कापाकापी आली.
    पण हेच मशीन जर वैद्यांकडे नेले तर वैद्य सांगतील, यातील तेल संपले आहे, तेल भरले पाहिजे, तेलाची बस्ती देऊया, शिरोधारा देऊया, अभ्यंग करूया, स्नेहन स्वेदन करूया, कर्णपूरण करूया, नस्य, मन्याबस्ती, कटीबस्ती, जानुबस्ती, तेलधारा सोडूया. इ.इ.

    केरळीय पंचकर्म करणाऱ्या वैद्यांकडे नेले तर तेल डोणीत ठेवूया, पंधरा लीटर तेलाने चार जणांकरवी मालीश करूया, पिझिंचिल, आदि पूरक पंचकर्म करूया, इ.इ.

    चला या निमित्ताने आयुर्वेदात सांगितलेल्या या सर्व उपचारांची नावे तरी कळली !

    एक लक्षात येतंय का पहा, आयुर्वेदात चिकित्सा स्वरूप उपचारामधे, तेलाचा सढळ आणि मुक्तहस्ते वापर करायला सांगितलेला आहे. इथे कंजुषगिरी करून चालत नाही. जेवढे तेल इंजिनला आवश्यक आहे, तेवढे ते दिलेच पाहिजे. जर तुम्ही दररोज "मेन्टेनन्स" करणार नसाल तर कधीतरी पंचकर्म करायला तर हवेच !

    लंऽऽबी रेस का घोडा जो बनना है !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    07.04.2017

  • आहाररहस्य ८

    जर हे सर्व विश्व, एक कुटुंब एक क्षणभर जरी मानले तरी, या कुटुंबातील प्रत्येक देश, हा या घराचा सदस्य झाला.
    या प्रत्येकाला जर हे घर “वाटायचे” ठरवले तर प्रत्येक खोलीची जबाबदारी वाटून द्यावी लागेल.
    ज्याची मास्टरी ज्याच्यात, त्याला ती जबाबदारी द्यावी.

  • कंकोळ

    ह्याची वृक्षावर चढणार वेल असते.पाने १२-१५ सेंमी लांब व तीक्ष्णाग्र असतात.फुल लहान एकलिंगी व गुच्छात उगवते.फळ गोल मिरी प्रमाणे दिसते.पण ते गुळगुळीत व तांबूस रंगाचे व ६-८ मिमी व्यासाचे असते.त्याला वर एक छोटा देठ असतो व ते सुगंधी असून तोंडात धरले असता गार वाटते.

    ह्याचे उपयुक्त अंग आहे फळ व तेल.कंकोळ चवीला तिखट,कडू असते व हे उष्ण गुणाचे असून हल्के रूक्ष व तीक्ष्ण असते.हे कफ व वातशामक असते.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)सुज व वेदना युक्त अवयवांवर कंकोळचा लेप करतात.

    २)मुखरोगात कंकोळाचे फळ चघळायला देतात.

    ३)जखमेवर कंकोळाचे तेल लावतात.

    ४)कंकोळाने घामामुळे येणारी दुर्गंध नष्ट होते.

    ५)बायकांच्या मासिक पाळीच्या तक्रारीत कंकोळ उपयुक्त आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©️Dr Swati Anvekar

  • किचन क्लिनीक – दोडके

    किस बाई किस दोडका किस हे फुगडी गीत मंगळा गौरीमध्ये लय फेमस हाय बुवा.तर आज आपण नव्याने ओळख करून घेऊयात ह्या दोडक्याची.अहो काही नाही हे दोडके आकांराने दिसते अगदी घोसाळ्याच सारखे फक्त ह्याला धारदार शिरा असतात बरं का.चला आपण ह्याला घोसाळ्याचा सावत्र भाऊच म्हणूयात ना.मग आता दोडके व घोसाळे ह्यात गफलत होणार नाही ना.

    हिचा देखील बराच पसरलेला वेल असतो.वेल लावल्यापासून सव्वा महिन्यात फळे येतात.आपण खातो ते दोडके हे त्या वेलीचे फळ.हि दोडकी देखील कडू व गोड अशा दोन प्रकारची असतात.ह्यातील कडू औषधी करिता वापरतात तर गोड खायला वापरतात.

    दोडके हे चवीला गोड व थंड आणी तिन्ही दोष कमी करणारे असते.आता त्याचे औषधी उपयोग पाहूयात.

    १)मुलांना अंगात ताकद भरण्याकरिता आठवड्यातून तीन वेळेस हि भाजी जेवणात द्यावी.

    २)ज्यांना संडासला साफ होत नाही त्यांनी रात्रीच्या जेवणात उकडलेले दोडके सैंधव व जिरे पूड घालून खावे.

    ३)ज्या व्यक्तिंना कृमी होण्याची सवय असते त्यांनी दोडक्याची कोरडी भाजी एक दिवस आड खावी.

    ४)तोंडाला रूची नसल्यास दोडक्याच्या काढलेल्या शिरा +चिमूटभर मीठ+१/२ इंच आले हे मिश्रण चावून येणारी लाळ थुंकावा व नंतर चोखोही थुंकावा.

    ५)शरीरातील धातूक्षीण होऊन चिडचिडे पणा व मानसिक त्रास वाढल्यास जो थकवा येतो तो कमी करण्यासाठी दोडक्याचे सूप बडीशेप ,जिरे व धणेपूड घालून त्यावर साजूक तूपाची फोडणी देऊन प्यावे.

    दोडके खाण्याचा अतिरेक केल्यास संडासमधून आव पडू शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – ताडगोळा

    माड,पोफळी ह्या जातीचे हे झाड उष्ण प्रदेशामध्ये उत्पन्न होते.उंच वृक्ष असतो.तसेच ह्या झाझापासून ताडी काढली जाते जी प्यायला वापरतात तर फळे ज्यांना ताडगोळा म्हणतात त्यांचा उपयोग खाण्यासाठी केला जातो.

    आता आपण ह्याचे गुणधर्म पाहूयात कच्चे ताडगोळा हा चवीला गोड,थंड गुणाचा व कफ वाढविणारा व वातपित्त दोष कमी करणारा असतो.

    चला मग ह्याचे घरगुती उपयोग पाहूयात ना:

    १)उष्णतेमुळे लघ्वीची जळजळ होत असेल तर कोवळा ताडगोळा खडीसाखर घालून खावा.

    २)डोळ्यांची आग होत असल्यास ताडगोळा त्याच्याच पाण्यात वाटून तो लेप पापण्यांवर लावावा.

    ३)गळू पिकत नसल्यास जून ताडगोळा वाटून त्यात हळद घालून गरम करावा व त्या गळूवर बांधावा.

    ४)ज्या व्यक्तींना शरीरात वात वाढल्याने संडासला घट्ट होत असेल अथवा साफ होत नसेल तर जेवणापुर्वी व जेवणानंतर काही वेळाने १ ताडगोळा खावा.

    ५)अंगामध्ये उष्णता वाढणे,हातापायांची आग होणे,पोटात आग होणे ह्यात ताडगोळा खाण्याने फायदा होतो.

    ताडगोळा अतिमात्रेत खाल्ल्याने सर्दी,खोकला,जुलाब होतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अडतीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ

    कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग तीन

    काही वेळा काही विषय परत परत येणार आहेत. कारण त्याविषयाचे गांभीर्यच तसे आहे.

    विश्रांती घेताना आपल्या शरीरातील उर्जेवर आतली महत्त्वाची कामे शरीर पूर्ण करून घेत असते. बाहेरचे दार बंद केले तरच बॅकेला आतील कामे उरकता येतात. नाहीतर आव जाव सुरू असेल तर नीट लक्ष देऊन आतली कामे करता येत नाहीत. आणि सारखं आत बाहेर आत बाहेर करावं लागलं की, उगाच शक्ती फुकट जाते.
    एखादी मातेला जर काही महत्त्वाची कामे करायची असतील तर बाळाला कसं ती जरा लवकर झोपवते. बाळ झोपले की कसं छान मन लावून काम करता येतं तसं !

    फक्त ग्रीष्म ऋतुमधेच दुपारी झोप सांगितलेली आहे. अन्य ऋतुमधे दुपारी झोप निषिध्द आहे. असे का ?

    ग्रीष्म ऋतुमधे निसर्गतः शरीरशक्ती कमी असते. सूर्याची थेट किरणे पृथ्वीवर येतात. वातावरणात प्रचंड उष्णता असते. अशा उष्ण वातावरणात जर बाहेर राहून काम केले तर शरीरातील स्निग्धत्व कमी होईल, रूक्षत्व वाढेल. तेज महाभूताचूया ऊष्णतेमुळे शरीरातील जलमहाभूताचे प्रमाण, स्निग्धत्व, गरजेपेक्षा कमी होईल. असे होऊ नये म्हणून दुपारच्या वेळी घरीच सावलीत विश्रांती घ्यायला सांगितलेली आहे.

    जेव्हा आपण झोपतो, तेव्हा सर्व अवयव आपल्या कामातून निवृत्त होतात. काम कमी होते. श्रम कमी होतात. घाम कमी येतो. उर्जा वाचते. शक्यी वाचते. ही उर्जेची बचत ही ग्रीष्मात उर्जा मिळवण्यासारखेच आहे. पैसे मिळवण्याबरोबरच पैसे वाचवणे ही पण एक मोठी बचत आहे तसे !

    ग्रीष्म ऋतुमधे ही उर्जा बचत करण्यासाठी विश्रांती सांगितली आहे. केवळ ग्रीष्म ऋतुमधेच ताकद कमी असते म्हणून या ऋतुमधे जशी दुपारी विश्रांती घ्यायची असते, तशीच विश्रांती ज्यांची ताकद कमी आहे अशा, बाल, वृद्ध, गर्भवती आणि आजारी माणसांनी देखील घ्यावी.

    जागे असताना काही ना काही तरी काम सुरू असते. जेव्हा काम सुरू असते, तेव्हा श्वासगती देखील जास्ती असते. त्यामधे देखील उर्जा संपत असते. आजारी पडल्यावर विश्रांती यासाठीच सांगितली जाते, की ज्यामुळे उर्जेची बचत व्हावी. आणि ही उर्जा अन्य महत्त्वाच्या अवयवांची प्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी वापरता यावी.

    मोबाईलची बॅटरी संपत आली की, आपण कसे मोबाईल कमीत कमी हाताळतो, व्हिडिओ पहाणे बंद, ऑडीयो ऐकणे बंद, डाटा कनेक्शन ऑफ, वायफाय बंद. ब्राईटनेस लो, अननोन नंबरचे काॅल कट करणे, तरच असलेल्या दोन चार टक्के बॅटरी साठ्यावर अत्यंत महत्त्वाचे काॅल करण्यासाठी मोबाईल "स्लीप" मोडला टाकतो, म्हणजेच बॅटरी शिल्लक ठेवतो.

    हं आता कळले. आमच्या भाषेत आम्हाला समजावनू सांगितले की पटकन कळते, ती पंचमहाभूते वगैरे डोक्यावरून जाणारे विषय !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    18.05.2017

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – चाकवत

    हि भाजी सर्व महाराष्ट्रभर आवडीने खातात व हि भाजी पथ्याची म्हणून देखील प्रसिद्ध आहे.ह्याचे रोप हातभर उंच असते.

    हि चवीला गोड खारट व थंड असते.त्यामुळे ही शरीरातील वात व पित्त कमी करते.

    आता आपण ह्याचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहूयात.

    १)ताप उतरल्यावर ह्या भाजीचे सूप त्या व्यक्तीला दिल्यास त्याची भूक वाढते.

    २)मुळव्याध असणार्या व्यक्तिंने हि भाजी गव्हाचे फुल्के व कारल्याच्या चटणी सह खावी त्यामुळे संडास साफ व मऊ होतो.

    ३)लघ्वीची जळजळ होत असल्यास धणे,जीरे घालून चाकवत भाजीचे सुप करून प्यावे.

    ४)कावीळ झालेल्या व्यक्तीला ही भाजी खायला देतात त्यामुळे संडास वाटे खराब व वाढलेले पित्त पडून जाते व कावीळ उतरायला मदत होते.

    ५)विद्यार्थी किंवा बुद्धिजीवी लोक ज्यांच्या बुद्धीवर प्रचंड ताण असतो त्यांनी लक्षात नीट रहाण्यासाठी रात्री झोपण्या आधी १/४ कप चाकवताचा ताजी रस+ १ चमचा मध हे मिश्रण १५ दिवस सलग घ्यावे फायदा होतो.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४