६६ भारतीय आहारामधे सहा चवी हव्यात. पण आज मधुमेह झाला म्हणून गोड बंद, पित्त वाढते म्हणून तिखट आंबट बंद, रक्तदाब वाढतो म्हणून खारट बंद, आवडत नाही म्हणून कडू बंद, राहिली एक तुरट चव. पाश्चिमात्य आहाराविषयी न बोललेलंच बरं.
कोणताही पूर्वग्रह दूषित ठेऊन हे वाचन करू नये. काही जणांच्या श्रद्धा, भावना, इगो, जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद, परंपरावाद आड येऊ नये. आपल्याला शुद्ध आरोग्य मिळवायचं आहे. त्यासाठी कोणते निकष कसे लावायचे, हे आपले आपणच ठरवायचे आहे. संवाद साधायचे असतील तर पूर्ण विषय समजून घेतल्यावर, जरूर बोलूया.
समर्थ म्हणतात,
पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण ।
उगाच ठेवी जो दूषण
तो दुरात्मा दुराभिमान
मत्सरे करी ।।
आजच्या काळात शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालणे जास्त महत्वाचे आहे.
जसे काम तसे तसा आहार.
कष्टाची, अतिकष्टाची कामे करणाऱ्याला, म्हणजे रस्त्यावर दगड फोड करणाऱ्या
लमाणी माणसाला जर सांगितले गेले, की
" तू रोज तुपभात खा, तुझ्या तब्येतीला तो चांगला आहे",
तर तो म्हणेल,
"काय यॅड लागलंय का, म्हणं तूपभात खावा." आमची लसणीची झणझणीत लाल चटणी, कांदा भाकर आणि कोंबडं बोकड लई ब्येस.
आणि प्रत्यक्षात देखील तेच सत्य आहे.
केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी ठरत नाही. तर व्यावहारिक स्तरावर काही पर्याय वेगळे असू शकतात.
म्हणजे
काम करून आपोआप फुकटचा घाम येतोय की, जिममधे जाऊन विकतचा आणावा लागतोय.
रोग म्हणून अंगातून घाम येतोय, की आपोआपच येतोय.
ऊन्हात काम आहे की एसी मधे.
ऊद्याची चिंता आहे की नाही.
शारीरिक श्रमाचे काम आहे की बौद्धिक क्षमतेचे.
परंपरेने आलेले, की ओढून ताणून आणलेले.
गरज म्हणून की हौस म्हणून.
जीभेसाठी की पोटासाठी.
जीवासाठी की जातीसाठी.
हट्टआग्रहाने खातोय की सहज बदल म्हणून,
मला हवंय म्हणून की मित्र खातोय म्हणून.
या सर्व गोष्टींचा विचार चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी करावाच लागेल. अगदी एका जातीतल्या, एका धर्मातल्या, एकाच घरातल्या दोन व्यक्तींसाठी सुद्धा !
विचार वेगळा करावा लागेल. लागतो.
इथे मी मुद्दाम नमुद करू इच्छितो की , जातीनुसार मांसाहार मी सांगत नाहीये, तर कर्मानुसार आहार ठरवावा.
मराठी भाषेत एक म्हण आहे, मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते. असं व्हायला नको. आपण प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा आणि आपला विकास करावा. शेवटी मत मांडणे म्हणजे मत लादणं नव्हे,
माऊली म्हणतातच, जो जे वांछील तो ते लाहो,
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
24.09.2016
तुरटी कशी ? या प्रश्नाचे उत्तर अनुभुति घेतल्याशिवाय येत नाही. ती तुरट आहे. हे उत्तर तर सर्वांनाच माहिती आहे. कशाप्रमाणे गोड वगैरे वर्णन करता येईल. पण तुरट म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर काय देणार ना ?
त्यासाठी तुरटी चाखून पाहिल्यावर जे लागते त्याला तुरट म्हणतात. असेच सांगावे लागेल.
यालाच अनुभुति म्हणतांत. प्रत्येक गोष्ट सिद्धत्वाच्या कसोटीवर तपासता येत नाही हेच खरे.
तेच प्रत्येक चवींच्या बाबतीत आहे. वापरून बघितली की, अभ्यास केला की, यांची अनुभूती घेता येते.
या सर्व चवींचे ज्ञान जीभ या ज्ञानेंद्रियानी होत असते. हे एकमेव इंद्रीय उभयात्मक आहे. म्हणजे कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे.
रसना म्हणजे आत चवीची अनुभुति देणे म्हणून रसनेंद्रिय आणि निर्माण झालेला शब्द बाहेर फेकणे म्हणून वागेंद्रीय.
आत बाहेर दोन्ही कामे करते. म्हणून या जीभेवर संयम आणता आला की, सर्व साध्य झाले. ज्याने जिंकीली रसना, त्याने जिंकिली वासना.
सर्व इच्छांवर संयम आणण्यासाठीदेखील ही तुरट चव मदत करेल.
संयमात ठेवणे हा गुण झाला, पण काहीवेळा तो दोषही होतो. जिथून विष बाहेर काढायचे आहे तिथून ही तुरट चव बाहेर पडायलाच देत नाही. स्रोतसांचे आकुंचित झाल्यामुळे बाहेर पडणारे स्राव कमी होतात. न पचलेले अन्न देखील आत मधे पडून राहाते. आम जागचा हलत नाही, तो तुरट चवीच्या याच स्तंभ गुणामुळे ! त्याचा परिणाम म्हणून पोटदुखी, मलावष्टंभ.
रक्तवाहिनीचा गरजेपेक्षा जास्त संकोच झाला तर रस रक्त विक्षेपणात अडथळे येणे, ह्रदयात वेदना होणे, ह्रदयाची ताकद कमी होणे, ही लक्षणे दिसतात.त्याचा परिणाम अन्य अवयवांवर होऊन यकृत, किडनी इ. मधे पण अवरोध जमा होऊ लागतो. म्हणून थकवा येणे, ग्लानी येणे, उत्साह जाणे, रक्तदाब वाढणे, तोंड सुकणे, आवाज बसणे यासारखी लक्षणे निर्माण होतात. चेहेरा वाकडा होणे, एक बाजू लुळी पडणे, हे वाताचे आजार देखील याच तुरट चवीच्या अतिसेवनाने होतात. हे विसरता नये.
पोषण करणाऱ्या नलिकांचा संकोच झाल्यामुळे कमालीचा अशक्तपणा येतो. वजन खूप कमी होते, प्रतिकार करण्याची शारीरिक आणि मानसिक ताकदच संपून जाते. याला देखील हीच तुरट चव जबाबदार आहे.
आपणाला कायम एकच बाजू दिसत असते. दुसऱ्याची चुक आणि आपली बरोबर.
दोन्ही बाजूने विचार करण्याची सवय ठेवली तर भूमिकेला योग्य न्याय देता येतो. आपले काय चूक नि काय बरोबर. आणि ते का. हे शोधले की सापडते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
27.11.2016
आपण आहारातील या चवी वेगवेगळ्या अभ्यासल्या. प्रत्यक्षात मात्र अगदी एकाच चवीचे पदार्थ आपण खात नाही. किंवा जे पदार्थ खातो, त्यात अनेक चवी एकत्र झालेल्या असतात. किंवा असेही काही पदार्थ आहेत, ज्यांच्यामधे एकापेक्षा जास्ती चवी चाखायला मिळतात, काही पदार्थांचे परिक्षण करून कोणत्या कोणत्या चवी त्यांच्यात चवी मिळतात, हे ऋषींनी अभ्यासून ठेवले आहे.
जसे लसूण. हिचे संस्कृत नाव रसोन असे आहे. म्हणजे एक रस ऊन म्हणजे कमी. आंबट रस सोडून बाकी सर्व चवी लसणीमधे असतात. म्हणून लसूण आंबट पदार्थाबरोबर घेतली तर सहा चवी एकत्रितरीत्या पोटात जातात. म्हणून ताकाच्या कढीत लसूण हवीच ! किंवा लसणीच्या चटणीत चिंच हवीच. तर तो पदार्थ पूर्ण होतो.
तसेच आवळ्याची मुख्य चव आंबट. इतर तुरट, गोड इ. चवी देखील कमी अधिक प्रमाणात आवळ्यात असतात. पण आवळ्यात खारट चव मात्र नसते. म्हणून मीठात मुरवलेला, मीठ लावून वाळवलेला, किंवा नुसता आवळा मीठाबरोबर का खातात, ते समजले ?
नित्यं सर्व रसाभ्यासः ! चरकाचार्यांनी सहाही चवींचा आहार असावा असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. मग गोड खायचे नाही, आंबट चालत नाही, तिखट तर अजिबात नको असं नाकं मुरडत खाण्याची काही आवश्यकता नाही.
पहिलं खाल्लेलं पचवायला पुरेसा वेळ दिला तर, कोणताही पारंपारिक, आणि स्वतःला आवडणारा आहार, आपल्याला पचू शकतो. त्याचा उपद्रव न होता, शरीराचे आणि मनाचे उत्तम पोषण आणि प्रीणन होते.
अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर
गोड, आंबट खारट पदार्थ वात कमी करतात. आणि कफ वाढवतात.
कडू तिखट आणि तुरट चव वाताला वाढवतात आणि कफाला कमी करतात.
खारट आंबट तिखट चवी पित्ताला वाढवतात.
गोड कडू तुरट पित्ताला कमी करतात.
मन प्रसन्न करणारा, शरीर पुष्ट करणारा, एवढा चवदार आहार आपण एवढा बदलून टाकलाय, की या चवीष्ट बलीष्ट आहाराच्या अभावांमुळे नियमितपणे औषधे मात्र घ्यावी लागत आहेत.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
28.11.2016
शतावरी ह्या वनस्पती बाबत आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत असेल.आपण सर्वांना शतावरी कल्प तर माहितच असेल जो बाळंतीणीला हमखास दुधातून दिला जातो.चला तर आज आपण ह्या शतावरीची थोडी जास्त ओळख करून घेऊ.
शतावरीचे काटेरी झुपकेदार वेल असतो.ह्याच्या फांद्यावर उभ्या रेषा असतात.काण्ड त्रिकोण,स्निग्ध असते.ह्याचे काटे ०.५-१ सेंमी लांब व खालच्या बाजुस वळलेले काहीसे बाकदार असतात.शतावरीचे काण्ड हे पानां सारखे भासते.२-६ ह्या संख्येत गुच्छात उगवते.१.२५-२-५ सेंमी लांब पातळ व विळ्या प्रमाणे भासते.फुले मंजिरी स्वरूपात उगवतात जी २.५-५ सेंमी लांब एकेरी किंवा गुच्छ रूपात असतात हि सुगंधी व पांढरी किंवा गुलाबी रंगाची असतात.फळ वाटाण्याच्या आकाराचे १-२ बीज युक्त असते.मुळ हे मुल स्तंभापासून जाड लांबट गोल व दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी मुळे फुटतात.
शतावरीचे उपयुक्तांग आहे मुळ.ह्याची चव गोड,कडू असून हि थंड गुणाची व जड,स्निग्ध व मृदू असते.हि वातपित्त नाशक व कफ पोषक आहे पण ओली असताना मात्र कफकर असते.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊ:
१)वातनाशक व बल्य असल्याने शतावरी सिद्ध तेल अभ्यंगासाठी वापरतात.
२)सरक्त मल प्रवृत्तीमध्ये शतावरी सिद्ध घृत चांगले कार्य करते.
३)बाळंतीणीस चांगले व भरपूर स्तन्य उत्पत्ती साठी शतावरी सिद्ध दुध देतात.
४)अधोग रक्तपित्तामध्ये शतावरीचा काढा अथवा स्वरस वापरतात.
५)शतावरी शुक्रधातूची वाढ करते तसेच ती गर्भाशय पोषक देखील आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
तोंडात हात जाण्यापूर्वी काय करावे, काय विचार करावा, कसा विचार करावा आणि का करावा, याचे थोडे चिंतन व्हावे.
या संदर्भातील अशीच आणखी एक छान रचना (कवि अज्ञात)
वदनी कवळ घेता
नाम घ्या मातृभूचे l
सहज स्मरण होते
आपुल्या बांधवांचे l
कृषिवल कृषिकर्मी
राबती दिनरात l
श्रमिक श्रम करोनी
वस्तु त्या निर्मितात l
करुनी स्मरण तयांचे
अन्न सेवा खुशाल l
उदरभरण आहे
चित्त होण्या विशाल ll
किती अर्थपूर्ण आणि व्यावहारीक आहे ना.
आपण अनेक वेळा अनेक श्लोक, आरत्या, स्तोत्र नुसते पोपट होऊन म्हणत असतो. त्यात नेमकं काय सांगितलंय, कोणासाठी सांगितलंय, काऽऽही लक्षातच घेत नाही.
भोजन करताना शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक विचारांबरोबर सामाजिक विचारही तेवढाच महत्वाचा आहे. जी स्पंदने ईश्वरापर्यंत पोचतात, तीच स्पंदने शेतकरीवर्गापर्यंत पण पोचतात.
आपण आहारातून घेत असलेल्या प्रत्येक कणामागे, ती जमिन नांगरणारा, तो कण पेरणारा, जमिनीला पाणी पुरवठा करणारा, उन्हात घाम गाळून त्याचे रक्षण करणारा, त्यांच्या वाढीमधे अडथळा निर्माण करणार्या तणाला दूर करणारा, त्याची योग्य वेळी कापणी करणारा, कचरा पाखड दूर करणारा, ते धान्य पोत्यात भरणारा, ते ओझे पाठीवरून वाहून नेणारा, चारचाकीने एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहाणारा, दुकानामधे साठवून ठेवणारा, विक्री करणारा, आपल्या घरापर्यंत आणणारा, इ.इ. असंख्य लोकांचा सहभाग असतो. या सगळ्यांचे श्रम यामागे कारणीभूत असतात, तेव्हा तो दाणा आपल्या ताटात नंतर पोटात जात असतो. याचे भान प्रत्येक कणाला स्पर्श करताना व्हायला हवे.
एवढेच नव्हे तर ते अन्न आपणाला ज्या माऊलीने शिजवून, सुपाच्य होईल, असे बनवून सुग्रास वाढले आहे, तिच्याबद्दल आदर कधी व्यक्त करतो का ? ( मीठ कमी पडले असेल, किंवा जरा तिखट कमी जास्त झाले की फक्त तिच्या नावाचा अगदी गजर सुरू होतो.)
या सर्व लोकांचे ज्ञात अज्ञात चेहेरे डोळ्यासमोर आणले की मग अन्नाची नासाडी केली जाणार नाही, ताटात वाया दवडले जाणार नाही. त्याची किंमत कळेल.
विशेषतः पुढील पिढीला अन्नाची किंमत कळायला हवी. ज्या पिढीसमोर पाश्चात्यांचाच आदर आहे, त्यांना अन्न निर्मितीची साखळी प्रत्येक घासाला आठवली पाहिजे. तिचे विस्मरण कदापि होता नये.
अन्नाची नासाडी करणे, केक, पिझ्झा एकमेकांवर फेकणे, हा फेकाफेकीचा संस्कार भारतीय नाही.
ओषधिभ्यो अन्नम्
अन्नात् पुरूषः
अन्नात् भूतानि जायन्ते
जातानि अन्नेन वर्धते
अन्नं भूतानां श्रेष्ठं
अन्नम् न निंद्यात
अन्नं ब्रह्म इति व्यजानात्
तैत्तिरीय उपनिषदामधे अन्नाचे आलेले हे वर्णन अन्नाचे सर्व महात्म्य सांगून जाते.
आहार हेच औषधस्वरूप आहे.
मनुष्यजन्मासाठी अन्नाच्या आधारेच आत्मा शरीरात प्रवेश करतो,
अन्य जीवांची उत्पत्तीदेखील अन्नामुळे होते.
समस्त जीवांचे पोषण अन्नानेच होत असते.
म्हणून सर्व सजीवात अन्न श्रेष्ठ आहे.
केवळ श्रेष्ठ नाही तर ते उत्पत्ती स्थिती आणि लय यांचे कारण आहे.अन्नच ब्रह्म आहे. त्याची कधीही निंदा करू नका.
अन्नाचा आदर ठेवा, अन्नाचा कणही वाया घालवू नका. म्हणूनच
गोपाळकाला झाल्यानंतर, काला खाल्ल्यावर हाताला लागलेले आपले उष्टे अन्नकण ( आणि त्यातून मिळणारे पुण्य, चोरून सुद्धा इंद्रादि देवांना मिळू नये म्हणून ) हात धुताना ते कण सुद्धा पाण्यात जाऊ नये. इतके हात चाटून पुसून स्वच्छ करा. असे सांगण्याचा प्रघात आहे.
किमान अन्नाची निंदा करू नका. पुढच्या वर्षी पर्यंत एवढी बुद्धी तरी दे, एवढे मागणे त्या बुद्धीदात्याकडे करायला हरकत नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
06.09.2016
मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग हा प्रामुख्याने मेंदूचा व स्पायनल कॉर्डचा तपास करण्यासाठी वापरला जातो. दमादियन आणि लॉटरवर्ग या शास्त्रज्ञांनी विद्युतचुंबकीय क्षेत्राचा वापर करुन, संगणकाच्या सहाय्याने शरीराच्या विविध भागांच्या उभ्या, आडव्या, तिरक्या अशा कोणत्याही अॅंगल्समध्ये प्रतिमा काढून प्रतिमा विच्छेदन शास्त्रच प्रगत केले (इमेजिंग सर्जरी).
तिखट पदार्थात सर्वात जास्त वापरला जाणारा पदार्थ म्हणजे मिरची. कोशिंबीरी लोणच्या पासून ते सर्व भाज्या आणि फक्त मिरचीच्या ठेच्यापर्यत आपला ठसका दाखवणारी ही मिरची, तिखट पदार्थात आपले स्थान अबाधित राखून आहे.
अति सर्वत्र वर्ज्ययेत, या न्यायाने प्रदेश विचार करून, मिरचीचा वापर युक्तीने करावा. काही जण मिरच्या चराचरा चावून खातात, त्यांना भविष्यात काही गंभीर आजारांना सामोरे जावे लागण्याची शक्यता असते.
सुकी लाल मिरची आणि हिरवी ओली मिरची यामधे तुलना करायची झाल्यास सुकी लाल मिरची त्यातल्या त्यात बरी म्हणावी. कढी, पिठले, डाळ तडका इ. पदार्थांना लाल मिरचीशिवाय शोभा नाही.
आणि कोशिंबीर, कांदेपोहे, सोलकढी, आमटी या मधे हिरव्या मिरचीचा वास, काही खास असतो.
पण या हिरव्या मिरचीची साल किंवा बी आतड्यांना जर चिकटून राहिली तर तिथे व्रण म्हणजे जखम होण्याची शक्यता असते. म्हणजेच ही साल किंवा बी पोटात जाताना अगदी बारीक होऊन गेली तर धोका तेवढा नाही.
यासाठी युक्ती काय करावी ?
एकतर या हिरव्या मिरचीचे तुकडे करून वापरण्याऐवजी, ती फोडणीमधे अख्खीच वापरावी. म्हणजे त्याचा खास वासपण येईल आणि खाताना ती बाजूला काढून पण ठेवता येईल. किंवा याची सरळ पेस्ट म्हणजे चटणी करून ती वापरावी. कमी पुरते. बी आणि साल पण चिकटून रहाण्याची शक्यता कमी ! ( फोडणीमधे अख्खी वापरताना पुढचे टोक जरा मोडावे, नाहीतर गरम तेलात ती फुटते, आणि गरम तेल उडते. सावधान ! )
ज्यांना तिखट तर हवेच आहे, पण हिरव्या मिरचीने त्रास होतो, त्यांनी जिथे शक्य आहे तिथे लाल मिरची वापरावी. ही मिरची पूर्णपणे पिकल्यानंतर वाळवून ठेवलेली असते. त्यामुळे पचायला हलकी किंवा त्रास द्यायला हिरवीपेक्षा सहनशील असते.
लाल मिरचीची पावडर तर सहजपणे सर्व ठिकाणी वापरली जाते. रंग येण्यापासून, चव वाढवणे आणि सजावटीपर्यंत ही लाल मिरची उपयोगी ठरते.
मिरचीच्या सालीचे गुण बघितले तर एक महत्वाचा गुण लक्षात येतो, तो म्हणजे ती कफाच्या विरोधी गुणाची आहे. चिकटपणा कमी करणारी आहे, रक्तातील चिकटपणा पण कमी करणारी आहे. रक्तातील चिकटपणा म्हणजे आजच्या भाषेत, कोलेस्टेरॉल !
आणि मिरचीची बी, याच्या बरोबर विरूद्ध गुणाची म्हणजे मधुर रसाची ! साठवणीची मिरचीपूड करताना, त्यातील बीया काढून टाकल्या तर ती मिरचीपूड टिकते. नाहीतर मधुर रसाची असल्याने, बीयांना किड लागण्याची शक्यता जास्ती असते.
म्हणून तर प्रमेहात आणि स्थौल्यात मिरचीची बी वर्ज्य सांगितली आहे.... इति कै. विद्याताई जळूकर मॅडम.
पोपट मिरच्या खातो, पण साल नाही खात. फक्त गोड बीयाच खातो.
तिखट खाण्यात पण एक मजा असते. भाजी, उसळ आणि आमटी या तिखट पदार्था व्यतिरिक्त आणखी काही विशिष्ट तिखट पदार्थ आपल्या खाण्यात असतात. जे तिखट असतातच, पण त्यांची काही खास तिखट चव हेच त्यांचे वैशिष्ट्य असते. जसे पावभाजी, पाणीपुरी, भेळ, भजी, बटाटेवडे, आणि त्याच्याबरोबरची ओली सुकी तिखट चटणी.
हे पदार्थ म्हणजे अगदी जानी दुश्मन नाहीत, पण ते डाव्या बाजुलाच वाढलेले आहेत, हे विसरूनही चालणार नाही.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
17.11.2016
भारतीय परंपरेतील बिछाना हा असाच होता. जमिनीवर अथवा एका लाकडी बाकावर पथारी पसरायची की झाले ! त्यावर एखादी चटई, धाबळी, घोंगडी, सतरंजी, गोधडी, रजई, किंवा शाल. झोपल्यानंतर इंग्रजी एस आकाराचा पाठीचा कणा पूर्णपणे जमिनीला समांतर टेकला जावा. ज्यामुळे मेरूदंडातील सर्व मणके देखील एका सरळ रेषेत येतात. आणि मज्जारज्जूवरील ताढ कमी होतो. म्हणजे मणक्यातील अंतर वाढणे, कमी होणे, मणक्यातील गादी सरकणे, गादीला सूज येणे, त्यामुळे होणारी पाठदुखी, कंबरदुखी, मुंग्या येणे आदि प्रकार कमी होतात.
सर्व साधारणपणे ताक हे चवीला गोड,तुरट,आंबट,पचायलाहल्के, कफवातनाशक ,शरीर बल वाढविणारे,संडास घट्ट करणारे,भुक वाढविणारे व हृदयाला हितकर आहे.
पण प्रत्येक पशूच्या दुधापासून बनविलेल्या ताकाचे गुणधर्म हे वेगळे असतात त्यामुळे काही जनावरांच्या दुधापासून तयार केलेल्या ताकाचे गुणधर्म आता आपण पाहूया:
१)गाईचे ताक:
भुक वाढविणारे,बुद्धिवर्धक,मुळव्याधीत गुणकारी,त्रिदोषनाशक आहे.
२)म्हशीचे ताक:
दाट,कफकर,सूज उत्पन्न करणारे किंवा असल्यास वाढविते,पचायला जड आहे.
३)शेळीचे ताक:
अतिशयस्निग्ध,पचायलाहल्के,त्रिदोषनाशक,
मुळव्याध,पांडुरोग,सुज कमी करणे ह्यात उपयुक्त.
आता ताक कोणत्या दोषामध्ये कोणत्या अनुपाना सोबत घ्यावे ते पाहू:
१)वातविकारात:
आंबट ताक सैंधव घालून प्यावे.
२)पित्तविकारात:
गोड ताक साखर घालून प्यावे.
३)कफविकारात:
लोणी काढलेले ताक सुंठ मिरी घालून प्यावे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti