(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग ५

    मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र आहे.

    आस्यासुखम् स्वप्नसुखम् दधिनी
    ग्राम्यौदक आनूपरसाः पयांसी
    नवान्न पानं गुड वैकृतम् च
    प्रमेह हेतु कफकृत्तच सर्वम् !!

    ग्रंथातील या सूत्रातील आनूप या शब्दाकडे लक्ष वेधू इच्छितो. या शब्दाचा अर्थ आहे, पाणथळ प्रदेशातील मांस.
    ज्या प्राण्यांच्या हालचाली खूप कमी आहेत, जे प्राणी भरपूर पाणी पितात, ज्यांची प्रकृती कफाची आहे, जे स्वभावतःच जाड आहेत, काहीही व्यायाम करीत नाहीत, मुद्दाम खुराक देऊन वाढवलेले, माजवलेले आहेत, अश्या प्राण्यांचे मांस खाणे हे प्रमेहाचे कारण आहे.

    प्रमेह हा मूळ रोग. त्याचे एकुण वीस प्रकार त्यातील कफामुळे होणारे दहा, पित्तामुळे होणारे सहा आणि वातामुळे होणारे चार वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील वाताच्या प्रकारातील एक प्रकार म्हणजे मधुमेह.

    हा मधुमेह होऊ नये म्हणून काय करावे, काय सावधगिरी बाळगावी, हे सांगताना शास्त्रकारानी खूप छान संकल्पना मांडल्या आहेत. विषय फक्त मांसाशी संबंधीत असल्यामुळे त्याच संकल्पना इथे बघू.

    वर वर्णन केल्यापेक्षा वेगळे मांसाहारी प्राणी, म्हणजे जंगली प्राणी. सुक्या कोरड्या जागी रहाणारे, सतत धावणारे, म्हणजे व्यायाम करणारे, गरजेनुसार पाणी पिणारे, अंगावर कमी चरबी असणारे प्राणी. या जंगली प्राण्यांचे मांस आणि आनूप प्रदेशातील प्राण्यांचे मांस यांच्या गुणातील सूक्ष्म फरक द्रष्ट्या शास्त्रकारांनी अभ्यासला होता, निरीक्षण केले होते, कदाचित भविष्यात काय होणार हे त्यांना आधीपासूनच माहीत होते, म्हणूनच एक सावधानतेचा इशाराच जणु त्यांनी देऊन ठेवला होता.

    आयुर्वेदात मांसाहार निषिध्द सांगितलेला नाही. हे आपण आगदी पहिल्या लेखात पाहिले होते. मधे मधे पण त्याचा उल्लेख करीतच होतो,

    भविष्यात रोग होऊ नयेत, यासाठी कोणते मांस खाऊ नये, हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. हे अश्या प्रकारचे मांस खाल्ले की कोणते रोग होणार यांच्या यादीत प्रमेहाचा, मधुमेहाचा क्रमांक वरचा आहे.

    त्याकाळी सूत्र सांगून ठेवले, ते आजच्या काळानुसार अभ्यासले की कोणते मांस खावे आणि खाऊ नये हे स्पष्ट होत जाते.

    ज्या प्राण्यांना सतत कोंडून ठेवले जाते, तयार अन्न त्यांना सतत दिले जाते, स्वतःचे अन्न स्वतःच शोधायचे असते, हा नियम न पाळणाऱ्या, म्हणजेच खुराड्यात कृत्रिमरीत्या वाढवल्या जाणाऱ्या पशुपक्ष्यांचे मांस आनूप प्रकारात येते. हे मांस सतत खाल्ले की प्रमेह होण्याची शक्यता काही पटीने वाढते, हे लक्षात येते. प्रत्यक्षातही तसेच दिसते.

    या खुराड्यात वाढवलेल्या प्राण्यांचे पोषण मुद्दाम मांस खाण्यासाठी केलेले असते. म्हणून त्यांना दिवस रात्र सतत खायला दिले जाते. त्यांना लहान जागेत ठेवले जाते. जेणेकरून ती हालचाली कमी करतील, व्यायाम होणार नाही आणि नंतर त्यांचे वजनही वाढेल.
    पशुपक्ष्यांचे वजन वाढवणे, हाच एकमेव बिझनेस असल्यामुळे खुराडे मालकांना तेच करावे लागते, जे त्यांना सांगितले गेले आहे.
    मग ती ब्राॅयलर कोंबडी, बदके असोत वा, बकरे डुकरे असोत.
    त्यांचे जास्तीतजास्त वजन कसे वाढेल हेच मालक पहाणार.
    पण त्याचा परिणाम पुढे खाणाऱ्यांना भोगावाच लागणार. प्रमेह वाढणार.

    तो वाढलेला आहेच, असं जागतिक आरोग्य संघटना अगतिकपणे सांगतेय.

    पण इथे विचार करायला वेळ कोणाकडे आहे ?
    पैसा फेकला की जसे टाॅनिक विकत मिळते, तसे आरोग्यही विकत मिळते, असे वाटणारी मंडळी काही कमी नाहीत.
    सगळेच अगतिक...
    वेळेला बांधलेले....
    आयुष्याची गती कमी केलेले.....

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    5.10.2016

  • किचन क्लिनीक – घृत/साजूक तूप

    तेल ही गेले तुप ही गेले हाती आले धुपाटणे हि मराठी मधील एक प्रचलित म्हण आहे.अशीच काहीशी गत आपण आपल्या आरोग्याची करून घेतली आहे ती देखील तुपा बद्दल आपल्या मनात असलेल्या गैरसमजांमुळे.तुप खाणे आरोग्यास चांगले नाही,तुपा हृदयाचा आरोग्यास हानीकारक आहे,तुप खाल्ल्याने कोलेस्टेराॅल वाढते इ.त्यामुळे बरेच लोक वनस्पती तुप अर्थात डाल्डाचा सर्रास वापर आपल्या आहारात करतात.पण डाल्डा म्हणजे तेलावर प्रक्रिया करून केलेला पदार्थ तो आपल्या हृदयाच्याच नव्हे तर संपुर्ण शरीराच्याच आरोग्यास किती हानीकारक आहे ह्याची कल्पनाचा केलेली बरी.

    आणी हो कोणत्याही वस्तूचा अतिरेकी वापर हा आपल्या शरीराला बाधणारच मग त्याला फक्त तूपच कसे अपवाद असू शकते.

    तुप हा प्राणीज द्रव्यातील सर्वोत्तम स्नेह आहे.कारण दुधापासून तूप बनविताना त्यावर अनेक संस्कार झालेले असतात.जसे दुधतापवून त्यापासून काढलेल्या सायीला विरजण लावून त्यापासून दही बनविले जाते,ह्या दह्याचे ताक करतात व ताक घुसळून त्यापासून लोणी काढतात,व लोणी कढवून त्यापासून तूप तयार होते.अर्थात सुरूवातीला व शेवटअग्निसंस्कार,किण्व प्रक्रिया,व मंथनसंस्कार असे अनेक संस्कार ह्या तुपावर झालेले असतात.

    हे साजुक तुप सामान्य तापमानात देखील मऊ रवाळच रहाते व गरम हवामानात ते पुर्ण वितळते.पण जर तुम्ही डाल्डा पाहिलात तर तो कोणत्याही तापमानात गोठलेला व घट्टच असतो.मग असा हा कायमच गोठलेल्या स्वरूपात असणारा डाल्डा तुमच्या शरीरात गेल्यावर हृदयाच्याही धमन्यांमध्ये जाऊन न गोठल्यास त्यात नवल ते काय?

    तुप हे आपल्या आरोग्यास खरोखरच उपकारक आहे.ह्याचा आहारात नियमीत वापर केल्याने शरीर सुदृढ रहाते,बुध्दी तल्लख होते,रोग प्रतिकार शक्ती वाढते,व वार्धक्याकडे होणारी शरीराची वाटचाल मंदावते.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सत्तावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग दोन !

    यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण.....

    आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. विश्वाची सर्व एनर्जी, उर्जा आपण जेव्हा आपल्या मनापासून स्विकारतो, तेव्हा ही आनंदाची अनुभूती आपल्याला येत असते.

    आपण जसा विचार करतो, तसं आरोग्य आपणाला मिळत असतं. कोणत्याही रोगाची बीजे ही आपल्याच मनामधे असतात. ती विश्वमनाशी जोडली गेली की, तीच स्पंदने पुनः आपल्यापाशी येतात.

    आपल्या उपनिषदांमधे हेच सांगितले आहे. ब्रह्मांडामधे प्रचंड शक्ती आहे. ब्रह्मांडातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी दास बनून येऊ शकतात. हे विश्व मला सतत मदत करत आहे. मला माझ्या प्रत्येक कार्यात ही शक्ती सूक्ष्म रूपात मदत करत आहे. माझ्या सर्व गरजा विश्वमनाकडून पुरवल्या जात आहेत. हे विश्व खूप सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे माझ्या सर्व योग्य गरजा विश्वमनाकडून सहज पूर्ण होणाऱ्या आहेत. त्याच्यासाठी या गरजा म्हणजे किस झाड की पत्ती !

    फक्त योग्य शब्दात, योग्य वेळी त्या मागितल्या पाहिजेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत, असा विश्वास पाहिजे, या आनंदात सतत राहिलो तर त्या मिळतातच !

    वास्तुशास्त्रामधे पण हेच सांगितलेले आहे. वास्तु कायम "तथास्तु" म्हणत असतो. घरात कायम सकारात्मक स्पंदने असतील तर कोणतीही प्रबळ अनिष्ट शक्ती कोणताही त्रास देऊ शकत नाही. निसर्गाचे हे नियम, ही स्पंदने, ही उर्जा घेण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. असा सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे.

    माझ्या आजोबांना डायबेटीस होता, वडीलांना पण होता, आता मलाही तो होणार आहे, असा विचार जर मनात प्रबळ होत गेला तर, कितीही पथ्य पाळले तरी डायबेटीस तुम्हाला शोधत तुमच्याकडे येणारच. हाच निसर्गाचा नियम आहे.

    मग विचारांची स्पंदने जर सकारात्मक ठेवली तर विश्वमना पर्यंत पोचणारा परिणाम सकारात्मकच असणार ! म्हणजेच काहीही झाले तरी मला डायबेटीस होणार नाही, वाढलेल्या साखरेचा मला काहीही त्रास होणार नाही, अशी स्पंदने जर निसर्गामधे प्रक्षेपित केली तर तीच स्पंदने जास्त ताकद घेऊन पुनः आपल्याचकडे परत येतात आणि रोगापासून हवे असलेले संरक्षक कवच आपणाला मिळत असते. यालाच आजच्या भाषेत प्रतिकारशक्ती म्हणतात.

    राॅन्डा बर्न यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे, द सिक्रेट नावाचं. या पुस्तकात हेच रहस्य सांगितलेलं आहे. आपण जो विचार करतो, तो एवढा सकारात्मक करा की विश्वमनाशी तो जोडला जाईल.

    रोन्डा बर्न यांचे नाव एवढ्यासाठीच घेतले की आपली मानसिकताच अशी बनली आहे, की पाश्चात्य तज्ञ जे सांगतात, तेच अंतिम सत्य. जणुकाही आकाशातूनच पडले आहे, आपल्या पराभूत भारतीय मानसिकतेचा तो परिणाम आहे, इतकंच. बाकी विशेष नाही.
    सो बी पाॅझिटीव्ह, नेचर हियर्स यु !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    07.05.2017

  • किचन क्लिनीक – काही दुधांचे उपयोग भाग २

    ब) म्हशीचे दुध:

    १)भस्मक रोगात किंवा जेव्हा अतिभूक लागते व काही खायला न मिखाल्याच त्रास होतो तेव्हा नियमीत आहार मध्ये म्हशीचे दुध,तुप,लोणी हे पदार्थ असावेत.

    २)रात्री शांत झोप लागण्याकरिता म्हशीच्या १ ग्लास दुधात १/४ चमचा जायफळ घालून उकळावे व खडीसाखर घालून हे दुध प्यावे.

    ३)ज्या पुरूषाचे पुरुष बीज प्रमाण कमी असते त्यांनी आहारात म्हशीचे दुध,तूप व लोणी वापरावे.

    म्हशीचे दुध अतिप्रमाणात प्यायल्यास अती झोप येते व स्थूलपणा येऊ शकतो.

    क) बकरीचे दुध:

    १)टिबी,खोकला,छाती व बरगड्या ह्यात वेदना होणे ह्यात बकरीचे दुध पिणे उत्तम.

    २)वारंवार होणाऱ्या जुलाबात बकरीचे दुध फायदेशीर ठरते.

    ३)डोळ्यांचा थकवा,डोळे दुखणे,ह्या तक्रारीमध्ये बकरीच्या दुधाच्या घड्या डोळ्यांवर ठेवाव्यात.

    बकरीचे दुध अतिप्रमाणात प्यायल्याने संडासला घट्ट होऊ शकते.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – कंदभाज्या – बीट

    किचन क्लिनीक – कंदभाज्या – बीट

    हा प्रकार भारतीय नाही पाश्चात्यांनी ह्यास भारतात आणले व आपण ह्याला सवयी प्रमाणे आपलेसे केले.
    तसा ह्याचा वापर प्रत्यक्ष आमटी,भाजी करायला केला जात नसला तरी देखील सलाड,कोशिंबीर,बीटामृत,बीटताक,घरगुती तिरंगी मीठाई,बाटरूट हलवा तसेच सूप बनवताना ह्याचा वापर सरार्स केला जातो.

    ह्याचे क्षूप असते व बीट हा कंद जमीनी खाली उगवतो.हा बाहेरून मातकट रंगांचा असतो व आत मध्ये लाल भडक असतो.ह्याच्या लाल रंगांचा उपयोग स्वयंपाकात सजावट करायला देखील केला जातो.हा चवीला गोड व थंड असून शरीरातील वात व पित्त दोष कमी करतो व कफ दोष वाढवितो.

    चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)अपचन,पोट साफ न होणे,मुळव्याध ह्यात बीट उकडून त्यात कोथिंबीर घालून जेवणापुर्वी खावे व १० मिनीटांनी जेवावे.

    २)बीटाचे नियमीत सेवन केल्यास मासिकपाळी व्यवस्थित व नियमीत येते.

    ३)छातीत जळजळ होऊन उल्टी होऊन त्यातून आंबट कडू पित्त पडणे ह्यात बीटाचा रस १ कप+खडीसाखर १ चमचा हे मिश्रण जेवणासोबत प्यावे.बीट उकडून ४-५ काप खावे.३ दिवस दिवसातून २ वेळा हा प्रयोग करावा.

    ४)रक्तदाब वाढून तोल जाणे,डोके जड होणे,चिडचिड ६ चमचे बीटाचा रस +६ चमचे दुधाचा रस +१चमचा मध उपाशीपोटी व रात्री झोपताना घ्यावा.आठवड्यात फरक पडतो.

    ५)अशक्तपणा व रक्ताची कमी ह्यात बीट नियमीत खावा.

    अतिप्रमाणात बीट खाण्याने जुलाब होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – तिरफळ

    किचन क्लिनीक – तिरफळ

    साधारण पणे वाटाण्याच्या आकाराची हि फळे असतात आणि त्या फळांच्या आत काळी चमकदार बी असते.ह्याचे काटेरी झाड असते.
    ह्यांना एक विशिष्ट असा उग्र वास येतो.ब-याच
    जणांना कदाचित हे फळ माहित नसेल तसा ह्याचा आपल्या स्वयंपाकामध्ये फार वापर होतो असे देखील नाही पण गोवा कोकण प्रांतामधील लोक ह्याचा थोडाफार वापर आपल्या काही विशिष्ट खास व्यंजनांमध्ये आवर्जुन करतात.

    प्रामुख्याने ह्याचा उपयोग माशाच्या जेवणामध्ये केला जातो.कर्ली,बांगडे ह्या माशांची आमटी करताना अथवा शाकाहारी पदार्थ म्हणजे गोव्यात बनविले जाणारे भाज्यांचे खतखते ह्यामध्ये तिरफळे वापरली जातात.कारण माशांच्या आमटी मध्ये वापरण्याने मासे पंचायला सुलभ होतात.आणि त्या पासून अजीर्ण होत नाही.तसेच ह्याच्या विशिष्ट वासाने माशांचा विशिष्ट गंध कमी होतो(मी दुर्गंध म्हणणार नाही कारण आमचे शरीर ह्या माशांवरच पोसलेले आहे.

    तिरफळे चवीला तिखट,कडू असतात आणी ती ब-यापैकी उष्ण असतात.त्यामुळे ती शरीरातला वात व कफ दोष कमी करतात व पित्तदोष वाढवतात.

    जसे ह्याचा उपयोग भोजनात होतो तसाच ह्याचा उपयोग काही घरगुती उपचारांमध्ये देखील केला जातो बरे का!
    चला मग पाहूयात तिरफळाचे औषधी उपयोग:

    १)वातामुळे अंगात कळा येत असतील तर १/४ चमचा तिरफळ चुर्ण मधातून घ्यावे.

    २)अजीर्ण झाले असल्यास तिरफळ चुर्ण गूळामध्ये मिसळून त्याच्या गोळ्या कराव्यात व त्या तूपासोबत घ्याव्यात.

    ३)पोटात गॅस झाला असल्यास १/४ तिरफळ चूर्ण+२ चिमूट हिंग+१ चमचा लिंबाचा रस हे मिश्रण घ्यावे गॅस कमी होतो.

    ४)जुन्या आमवाता मध्ये १/४ चमचा तिरफळ + १चमचा एरंडेल हे मिश्रण रात्री झोपताना ४२ दिवस घ्यावे ह्याने पुष्कळ फरक पडतो.

    ५)पोटात दुखून उचक्या येत असल्यास १/२ चमचा तिरफळ चुर्ण+२ चमचे मध+१ चमचा साजुक तूप हे मिश्रण वारंवार चाटावे.पण एॅसीडीटी असणा-यांनी हा उपाय करू नये.

    अतिप्रमाणात ह्याचे सेवन केल्याने एॅसीडीटी,व तोंडात उष्णतेचे फोड येणे ह्या तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – शेपू

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – शेपू

    शेपूची भाजी हि ब-याच जणांना न आवडणारी अर्थात नावडती. तिला येणा-या विशिष्ट गंधामुळे ती ब-याच लोकांना आवडत नाही.(मला देखील आवडत नाही). हिच्या बियांना बाळंतशेपा असे म्हणतात ह्यांचा उपयोग लहान मुलांच्या बाळऔषधांत वापरतात.

    हिचे झाड तीन फूट उंचीचे असते.हि भाजी चवीला गोड व उष्ण असते हि शरीरातील कफ व वात दोष कमी करते.भाजी म्हणून जरी हि तेवढी चांगली लागत नसली तरी हिचे देखील बरेच औषधी उपयोग आहेत बरे का!

    चला मग शेपूचे औषधी उपयोग पहायचे ना!

    १)जखमेवर हिच्या पाल्याची चटणी वाटून लेप करावा.

    २)तोंडास रूची नसणे,जीभ जाड होणे,तोंडाला दुर्गंध येणे अशा तक्रारींमध्ये शेपूचा कोवळा पाला व आल्याचा एक तुकडा चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावी.

    ३)लहान मुलांना शेपूची ताजी पाने एक कपभर पाण्यात उकळावे व पाव कप पाणी शिल्लक ठेवावे व हे पाणी प्रत्येक दुग्धपानापुर्वी १-१ चमचा द्यावे त्यामुळे बाळाचे पोटाचे आरोग्य उत्तम राहते.

    ४)शेपूची पाने घालून तीळाचे तेल उकडून ते गाळावे हे तेल मार लागणे,मुरगळणे,संधिवात ह्यांच्या वेदनांमध्ये लावल्यास उत्तम.

    ५)बाळंतीणीस रक्तस्राव कमी होण्यास व दुधभरपूर येण्यास शेपूची भाजी देतात.
    हि भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पित्त वाढते.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग १९

    खावे. पण गरज असेल तर खावे.
    खावे. पण आवडत असेल तर खावे.
    खावे. पण हितकर असेल तर खावे.
    खावे. पण सहज उपलब्ध असेल तर खावे.
    खावे. पण भूक असेल तर खावे.
    खावे. पण पचवू शकत असेल तर खावे.
    खावे. पण तयार करता येत असेल तर खावे.
    खावे. पण जिभेला चव असेल तर खावे.

    सगळ्या यातना काढतोय त्या पोट भरण्यासाठीच !
    आणि आपल्या कृतीने जर..
    पोटच बिघडत असेल तर, कशाला खावे ?
    पचवू शकत नसू तर, कशाला खावे ?
    गरज नसेल तर, कशाला खावे ?
    आवडत नसेल तर, कशाला खावे ?
    पिकतच नसेल तर, कशाला खावे ?
    विकतचे आणून कशाला खावे ?
    तोंडाला चव नसेल तर कशाला खावे?

    केवळ आस्य आहे म्हणून ?

    मुखी घास घेता करावा विचार,
    कशासाठी मी, हे अन्न सेवणार ?
    प्रत्येक घास खाण्यापूर्वी असा विचार करावा.

    जीभ हा अत्यंत स्वार्थी अवयव आहे.
    "मला बरं वाटतंय म्हणून मी खातेय,
    इतरांना होणाऱ्या यातनांचे मला काय ?
    असा अविचार जीभ करते.

    ज्या एकीमुळे अवयवांची युती तुटत असेल, तिचे काय करायचे ? असे ठरवून बाकीचे सगळे अवयव त्याच्याकडे मागणी करतात, तो सर्व शक्तीमान तिला शिक्षा फर्मावतो, आणि जीभेची चवच काढून घेतो.
    कठोर शिक्षा !
    तिच्यावर बहिष्कार.
    "तिला जे हवंय ते द्यायचं नाही, जोपर्यंत बाकीच्या अवयवांच्या यातना संपत नाहीत, पुनः युती होत नाही, तोपर्यंत तिला विसरून जा."
    आणि तो तिची चवच काढून घेतो.

    आता यापलीकडे जाऊन जो हट्टाने खाणार त्याला प्रमेहासारखी शिक्षा तोच देणार.

    डाॅक्टरांकडे गेल्यावर त्यांना पहिल्यांदा बघावीशी वाटते तीला. जीभेला. तपासायला दाखवायला सांगतात ती जीभ. तिला तपासल्यानंतर डाॅक्टरना सहज कळते, आत हिने काय काय घोटाळे करून ठेवले आहेत ते !
    आणि डाॅक्टर देखील पथ्य सांगतात, जोपर्यंत अवयवांची तिच्याशी परत युती होत नाही, तोपर्यंत, हे अजिबात खाऊ नका. तमुक पिऊ नका.
    हे युती तुटणे अगदी पुरातन काळापासून चालत आलेले आहे. हे ज्याला कळले तो तरला.

    आपले पूर्वज देखील काही कमी खवय्ये नव्हते. वेगवेगळ्या चवींचे, वेगवेगळ्या संस्कारांचे, एकाहून एक सरस पदार्थ तयार केले जात होते. ते लिखित स्वरूपात क्षेमकुतुहल सारख्या ग्रंथात पहायला मिळतात. त्यावेळेच्या पदार्थांची नावे संस्कृत मधील होती. आता बोलीभाषेत वेगवेगळी तयार झाली. आणि सर्व पदार्थ उत्तमात उत्तम द्रव्ये वापरून केले जात होते. साजूक तुपातल्या जिलब्या, गावठी गाईच्या दुधाची रबडी, घरातल्या चक्क्याचे रवाळ रसाला म्हणजे श्रीखंड, घरात जात्यावर ओव्या म्हणत दळलेल्या पीठाचे वडे किती सांगू ?
    आता फक्त फरक एवढाच आहे की सगळे पदार्थ विकतचे, पामतेलात तळलेल्या जिलब्या आणि डालड्यात तळलेले कृत्रिम गुलाबाचा वास घातलेले गुलाबजाम. फरक आहेच ना !

    जिभेचे चोचले नव्हते ते, त्यावेळची गरज होती. श्रम पण तेवढेच होते ना ! आता श्रम कमी झाले आणि खाण्याचे पदार्थ अति झालेत. परिणाम आजुबाजुला दिसतोच आहे.

    आणखी एक फरक लक्षात येण्याजोगा, तो म्हणजे पूर्वी पुरणपोळीसाठी होळी पौर्णिमेच्या दिवसाची वाट पहावी लागत असे. गुळपोळ्या फक्त संक्रांतीला, श्रीखंड फक्त पाडव्याच्या मुहूर्तावर. लग्न मुंज असेल तरच लाडू. नाहीतर नाही.

    आता बाजारात केव्हाही जा.
    जो जे वांछिल तो ते सर्व काळ !
    सर्व मधुर रसाचे पदार्थ चाॅकलेट पासून गुलाबजाम पर्यंत, मुबलक प्रमाणात समोर हजर असतात.

    आपल्या सणांची रचना त्या त्या वातावरणातील हवामानावर आणि उपलब्ध साधनसामुग्री वर केली गेली आहे. त्यामुळे त्यावेळी ते पदार्थ खायलाच हवे असतात. आता जानेवारी फेब्रुवारी मधे अगदी रथसप्तमी पर्यंत तीळाचे लाडू मिळतात, ते आत्ताच, या सीझनला खाण्यासाठीच असतात.

    सणांच्या निमित्ताने खाल्ले तर मनाची, वातावरणाची, परवानगी घ्यायची बिलकुल गरज नाही.
    नाहीतर नंतर या मधुर सुखाच्या यातना ठरलेल्याच !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    04.02.2017

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – टाकळा

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – टाकळा

    हि वनस्पती प्रामुख्याने पावसाळयात उगवते.आमच्या गोव्यात देखील हि भाजी ह्या ऋतू मध्ये आवडीने अर्थात गोवेकरी घोस्ताने (कोकणी शब्द)खातात.

    हि भाजी शिजवल्यावर रूचीकर लागते मग तुम्ही तेलात परतून करा,मुग,चणा अथवा तूरडाळ घालून फक्त गुळ खोबरे घालून शिजवून करा किंवा मग त्यात फणसाच्या सुकवलेल्या आठळया घालून करा.अगदी लज्जतदार लागते हि भाजी.मला आता मी पाककृतीचेच सदर लिहित असल्या सारखे वाटले.

    हिचे वर्षायू उग्र गंधयुक्त क्षुप असते.
    हि चवीला तिखट,व उष्ण असते म्हणूनच शरीरातील कफ व वात दोष कमी करते.

    जशी खायला हि लज्जतदार लागते तशीच हि आपण घरगुती उपचारांमध्ये देखील हिचा उत्तम वापर करू शकतो.

    चला तर मग पहायचे ना हिचे औषधी उपयोग:

    १)गजकर्णा मध्ये टाकळ्याच्या रस कडुनिंबाच्या पाल्याचा रस एकत्र मिसळून त्यांवर लावावे.

    २)अंगावर पांढरे डाग पडत असल्यास व खाज येत असेल तर टाकळ्याची भाजी व भाजणीची भाकरी खावी.

    ३)त्वचा तेजवान व मुलायम दिसायला टाकळ्याच्या पाल्याचा रस बेसनात मिसळून नियमितपणे चेह-यांवर लावावा.

    ४)खरूजेवर रोगग्रस्त भागावर टाकळ्याचा रस चोळावा व नवीन पाल्याची चटणी तिथे बांधावी.ती सोडल्यावर त्या भागावर हळदपूड चोळावी चांगला फायदा होतो.

    ५)गळू फूटण्यासाठी टाकळ्याचा पाला वाटून केलेली चटणी बारीक वाटून त्याची गोळा गळूवर ठेवावी व दर बारा तासांनी हि गोळी बदलावी.

    हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग पंचाहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 32

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग सहा

    देवासाठी पान वाढले. देवासमोर ठेवले. पान बाजूला सरकवून पानाखाली पाण्याने एक मंडल (भरीव वर्तुळाकार जागा ) काढले. पुनः मंडल काढलेल्या जागेवर पान सरकवून ठेवले. आता पान पुनः हलवायचे नाही. वाढलेल्या पानाला स्थिर करून घेतले. आता जेवून पूर्ण होईपर्यंत आसन सोडायचे नाही किंवा पान सोडायचे नाही. हा दंडक.
    कशासाठी?
    वाढलेल्या पानावरून उठून जाणे, हा अन्नदेवतेचा साक्षात अपमान असतो. ( हे समजावणे आस्तिकांसाठी ! नास्तिक उघडपणे देवच मानत नाहीत, त्यांना अन्न ही देवता असते हे पटणारेच नाही. त्यांच्या दृष्टीने अन्न म्हणजे प्रोटीन्स, व्हिटामिन्स, फॅटस आणि कारबोहाड्रेटस ! बाकी अंधश्रद्धा, विषय संपला. )

    एकदा वाढलेल्या पानावरून उठल्यानंतर त्या पानावरचा आपला हक्क संपला, आता उरलेले अन्न कृमी किटकांना सोडले.
    असे करू नये. आपण वाढलेल्या पानासमोर बसलेलो असताना, आपले लक्ष पूर्णपणे पानावरच असते. ( तसे असावे. ) म्हणजे पानामधे जमिनीवरुन येणारे काही किडामुंगींसारखे किटक, किंवा आकाशमार्गे पानामध्ये उतरु शकणारे कोळ्यासारखे विषारी किटक, अन्नामधे पडू नयेत, ही घेतलेली दक्षता म्हणा हवंतर ! ( हे समजावणे नास्तिकांसाठी ! )

    सांगायचं काय तर, कोणत्याही कारणाने एकदा जेवायला सुरवात केली की, पान किंवा आसन हलू नये. एवढा संयम मनावर हवाच. आजकाल तर जेवायला सुरवात केली की, दहा वेळा उठणार. मोबाईल दुसरीकडे राहिला, दरवाज्याची बेल वाजली, बेसिनचा नळ सुरू राहिला, टीव्ही चा रिमोट घ्यायला... अश्या कारणानी जेवत असताना सतरा वेळा उष्ट्या हातानी उठतो. असे मध्येच उठल्यामुळे आपल्या हाताला लागलेले आपले उष्टे दुसऱ्याच्या पानात पडू शकते, किंवा आपल्या अंगाखांद्यावरील सूक्ष्म जीवजंतु, कचरा इकडे तिकडे दुसऱ्याच्या पानातही जाऊ शकतो. ही कृती जंतुसंसर्ग पसरवणारी असते. आणि किती डिसगस्टींग वाटते ना !

    अन्न हे कोणत्याही कारणांनी दूषित होऊ नये, यासाठी घेतलेली ही काळजी आहे.
    काय चुकीचे सांगितलेले ? आता ज्यांना हे मनुवादी विचार वाटतात, त्यांना खुशाल म्हणू देत. पण जे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, ते योग्यच आहे. हेच नियम जर एखाद्या मॅकडो ने अथवा डाॅन्कीडोने किंवा नाचोपाचो ने सांगितले असते तर ? डोक्यावर घेऊन नाचले असते. "पण हे आमच्याच भारतीय ग्रंथात सांगितलेले आहे, फक्त आता पुनः एकदा लक्षात आणून देतोय" असे म्हटले तरी काही जणांना ते अन्नाचे "भगवेकरण" वाटेल. कोणाला काय कश्या शंका येतील सांगता येत नाही. अशा शंकासूरांची संख्या हल्ली वाढते आहे. यांच्यापासून सावधान !

    बाहेरचा किटक वाढलेल्या पानात येऊ नये म्हणून पानाभोवती देखील पाणी वर्तुळाकार फिरवायचे असते. आणि या किडा मुंगीसाठी, आपण जेवायला सुरवात करण्या अगोदर, अन्न उष्टे करण्यापूर्वी, पाच सहा अन्नाचे कण ताटाबाहेर काढून ठेवायचे. याला काय म्हणायचे ? "भूतदया" म्हणू !

    काही महाभाग तर वाढलेले पान जणुकाही कुशीत घेऊन जेवतात ! वाढलेले ताट मांडीवर, अंगावर घेऊन जेवणे ही तर राक्षसी कृती आहे. वाढलेले पान हलवत हलवत फिरत फिरत खाल्ले तर नकळतपणे चंचलपणा निर्माण होतो.

    चंचलपणा म्हणजे साक्षात वाताचा प्रकोप. मुलांमधला चंचलपणा, आपल्या विचारातील चंचलपणा, कमी होण्यासाठी, जेवण पूर्ण होईपर्यंत, आपले आसन पृथ्वीला धरून ठेवणारे, दृढ हवे. स्थिर हवे. तरच खाल्लेल्या अन्नाने शरीराची पुष्टी होईल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    25.06.2017