रोजच्या जेवणात असलेल्या तिखट पदार्थात सर्वांना आवडणारा एक चटपटीत आंबट तिखट पदार्थ म्हणजे चटणी.
ही चटणी बहुगुणी औषध आहे. जिरे, मिरी, मिरची, हिंग, कढीपत्ता, चिंच, पुदीना, कोथींबीर या पैकी कोणत्या तरी पदार्थाने नटलेली सजलेली, रंगीबेरंगी चटणी रोजच्या जेवणात असावी. सुकी किंवा ओली कशीही असली तरी चविष्ट लागते. म्हणजे इष्ट चवीची !
डाव्या हाताला असणारी चटणी मधे मधे खाल्ली की उजव्या बाजूच्या इतर पदार्थांची रूची पण आपोआपच वाढत असते.
लसूण, शेंगदाणे, तीळ, नारळ, जवस, कारळे, कांदा यापैकी ( म्हणजे आठवड्यातून दरदिवशी एक कोणत्याही वेगळ्या प्रकारची चटणी केली तरी) त्यातील मुख्य पदार्थ हा एक प्रकारची तेलबी असते.
या बिया आणि इतर वेगवेगळे मसाले कुटले कि त्यातील तेल बाहेर येते. त्यात मीठ घालून ढवळले की, चटणी तयार. यात कुटण्याची पद्धत महत्वाची.
मिक्सरमधून बारीक वाटून होते, पण कुटण्याचा संस्कार होत नाही. संस्कार बदलला कि परिणाम बदलतात, चवही बदलते.
मिक्सर आणि पाटा वरवंटा वापरून केलेल्या चटणी किंवा वाटपामधे फरक पडतोच ना ! मिक्सरमध्ये ब्लेडच्या सहाय्याने बारीक बारीक तुकडे पाडणे आणि वरवंट्याचा घाव घालून पाट्यावर रगडणे या दोन्ही कृतीतून तेलबीयांमधले तेल बाहेर पडल्यामुळे चवीतही फरक पडतो. म्हणून संस्कार महत्वाचा !
चटणीला चव येण्यासाठी वापरला जाणारा मसाला कच्च्या स्वरूपातच वापरला जातो. हे उघड सत्य आहे.
हे फक्त लक्षात आणून देतो की, चटणीमधले तेल आणि मसाले कच्च्या स्वरूपात वापरले जातात, तर भाज्या या सुसंस्कारीत करून खाल्ल्या जातात. भाज्या कच्च्या नाहीत, मसाले भाजून नाहीत, तर ते जास्त औषधी.
मसाला टिकवण्यासाठी किंवा नीट कुटला जावा, यासाठी तो भाजला जातो. तो परत परत भाजला तर त्यातला दळ, वास, तेल, आणि औषध निघून जाते. पूड होण्यासाठी किंचित गरम करणे इथपर्यंत ठीक आहे, पण खमंग वास आणि परत तेल सुटेपर्यंत भाजणे, म्हणजे त्यातील अंगभूत औषध उडवून लावल्यासारखं आहे. हे निमंत्रित केलेल्या पाहुण्याला, घराच्या दारात आल्यावर, आम्ही आता शिनिमाला जातुय, *तू आता परत जा, असे सांगण्यासारखेच झाले.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
12.11.2016
November 12, 2016
आपण किचन क्लिनीक मध्ये आता पर्यंत मसाले वर्ग व पालेभाज्यांचे घरगुती उपचारांमध्ये उपयोग पाहिले आहेत.आता वेळ आली आहे आणखी एका नवीन गटाची ओळख करून घेण्याची,मग मला वाटले तो गट हा भाज्यांच्या भाऊबंदकितला का नसावा अर्थात तो आहे फळभाज्यांचा.
आपण प्रत्येक जण ह्या फळ भाज्यांचा उपयोग आपल्या दररोजच्या स्वयंपाकामध्ये निरनिराळे पक्वान्न करायला करत असतो.पण ह्याच फळभाज्यांचा उपयोग घरगुती उपचारांमध्ये देखील होतो हे एकुन आता तरी आपल्याला नवल वाटणार नाही हे मला पक्के माहित झाले आहे.
चला तर आता पहिल्या भाजी पासुन सुरूवात करूया ना.बरं मग हि पहिली भाजी कोणती बरे,चला एक क्लु देते रामदेव बाबांच्या योग शिबिरे व योग व्याख्यानांमुळे ह्या महाशयांना बरीच प्रसिध्दी लाभली आहे.
आता कसे बरोब्बर ओळखलेत तुम्ही हा दुसरा तिसरा कोणी नसून दुधीभोपळा किंवा ज्याला आपण कोकणदुधी म्हणतो तोच हा बरं का!
November 8, 2016
नागरमोथा वनस्पती ही एक सुगंधी औषधी वनस्पती आहे, जी बाळगुटीमध्ये वापरली जाते; आणी तिच्या थंडगुणधर्मासाठी आणि पचनास मदत, कृमीनाशक, लघवी साफ करण्यास मदत, आणी वजननियंत्रणात उपयोगी असणाऱ्या फायद्यांसाठी ओळखली जाते. ही पित्त आणि कफ कमी करते, तसेच अतिसार व कृमींवर प्रभावी आहे.
January 23, 2026
हे चीनी फळ आपल्या देशात देखील थंड हवेच्या ठिकाणी पिकविले जाते.हे फळ जेवढे दिसायला सुंदर तितकेच चवीला देखील सुरेख लागते.
ह्याची चव आंबट गोड आता फिकट पांढऱ्या रंगांचा मऊ गर असतो.बाहेरून पिवळसर लाल रंगांचे असते.त्याला एक प्रकारचा मादक सुवास येतोय.हे थंड गुणाचे असून ते शरीरातील वातपित्त दोष कमी करते व कफ वाढविते.
पीच कलर हे नाव ह्या रंगाला ह्याच फळाच्या रंगावरून पडले आहे जो बऱ्याच जणांच्या आवडीचा रंग असतो.
चला आता आपण ह्याचे घरगुती उपचारात उपयोग पाहूयात:
१)मुत्राशयातील खडे विरघळायला १ कप पिचचा रस+१ चमचा धणे पुड हे मिश्रण रोज जेवणा आधी प्यावे.
२)खुप ताप येऊन लघ्वी कडक होणे,जळजळ होणे,लघ्वीला कमी होणे ह्यात १ कप पिचचा रस+२ चमचे साखर हे मिश्रण २-३ वेळा प्यावे.
३)साल काढलेल्या पिचचा गर १ वाटी रोज रात्री खाल्ल्यास मळाचे खडे होणे,मलबध्दता कमी होते.
४)लहान मुले झोपेत लघ्वी करतात त्यांना रोज १ चमचा वावडींगाचे चुर्ण पाण्यासह प्यायली द्यावे व पीच खायला द्यावा.
५)ब्लड प्रेशर वाढून लघ्वी कमी होत असल्यास पिचचा रस १ कप+१/४ चमचा वेलची पूड+१ चमचा धणे पुड हे मिश्रण प्यावे.
पीच खायचा अतिरेक केल्यास सर्दी,जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
December 21, 2016
सुगंधी उटणे लावून केलेली आंघोळ साबण लावून केलेल्या आंघोळीपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यदायी आहे. तरीसुद्धा आपण वैचारिक गुलामीमुळे स्वतंत्र विचार करू न शकल्याने साबणाच्या फेसातून बाहेर पडण्याची मानसिकताच नाहीये.
February 26, 2018
आरोग्य मिळवण्यासाठी माझं नेमकं काय चुकतंय ? मी पाश्चिमात्य विचारांच्या प्रभावाखाली कसा कधी आलो, आणि जे मूलतः भारतीय नाही, पण ज्याचा संबंध थेट आपल्या आरोग्याशी आहे, अशा अनेक गोष्टींना मी माझ्या रोजच्या जीवनात कसं सामावून घेतलंय,
हे माझं मलाच विसरायला झालंय. त्याची आठवण करून देण्यासाठी हा लेखन प्रपंच.
February 1, 2018
।।गुहाग्रजाय नम:
अपामर्गपत्रंसमर्पयामि।।
ह्याचे ०.३३-१ मिटर उंचीचे क्षुप असते.काण्ड सरळ किंवा शाखायुक्त असतात.पाने २.५-१२ सेंमी लांब व रोमयुक्त,खरखरीत,मोठी व वाकलेली असतात.फुले पांढरी/ हिरवी असतात.फळ बारीक,लांबट धुरकट व त्यातून तांदळासारखे दाणे येतात.
ह्याचे उपयुक्त अंग आहेत मुळ,पाने,पंचांग,तंण्डूल /बिया.
आता आपण ह्याचे गुणधर्म पाहूयात:
ह्याची चव तिखट,कडू असून हे उष्ण असते.गुणाने हल्के,रूक्ष,तीक्ष्ण असते.
कफ व वात दोष कमी करते व पित्त वाढविते.
आता ह्याचे उपयोग थोडक्यात जाणून घेऊयात:
अंगास खाज येत असल्यास आघाड्याचा काढ्याने स्नान करावा.
आघाड्याच्या क्षाराचा लेप हा किरल्या/ कुरूप पायांवर येणारे कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
दंतरोग अर्थात दातांच्या दुखण्यात आघाड्याच्या काढ्याच्या गुळण्या करतात.
आघाड्याचा क्षार हा अम्लपित्त कमी करतो.
मार लागुन सुज आल्यास आघाड्याच्या पानांचा लेप लावतात.
अति भुक लागत असल्यास ज्याला आपण भस्मक रोग म्हणतो त्यात आघाड्याच्या बियांची खार उपयुक्त आहे.
सर्दी,खोकला,दमा ह्यात आघाड्याचे चुर्ण मधासोबत चांगले काम करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
August 2, 2017
आपल्या नेहेमीच्या कामात, दुसऱ्याने केलेली ढवळाढवळ आपण मान्य करीत नाही. मग शरीराने तरी का मंजुरी द्यावी ?
April 16, 2017
कोकणातील आणखीन एक झणझणीत तिखट पदार्थ म्हणजे माश्याचे कालवण ! कच्ची हळद, धने, आले आणि तिरफळाचा वास घमघमणारी. सुक्या लालेलाल मिरचीचा ठसका असणारी, ही मिरची जर काश्मिरी वापरली तर बघूनच समाधान ! आणि नेहेमीचे ओला नारळ आणि कांद्यालसणीचे वाटप. आंबटपणासाठी कोकणात कोकम आणि गोवन फूडमधे चिंचेचा कोळ. फोडणी म्हणजे मोहोरीचा तडका नाही.
पिवळसर लाल दिसणारी माश्याची आमटी,
कधी खाल्ली नाही, पण माश्याच्या ठिकाणी आंबाडे, टोमॅटो, मुळा, भेंडी वेगवेगळी वापरून करून बघितली.
मासे हे मुळात समुद्रात, म्हणजे नैसर्गिक अधिवासात तयार होणारे. त्यामुळे त्यात ब्राॅयलर प्रमाणे कृत्रिमता हा प्रकार नाही. काही ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत. पण यात तेवढा धोका नाही, जेवढा ब्राॅयलर मधे दिसतो. गोड्या पाण्यातील आणि खाऱ्या पाण्यातील माश्यांचे गुणधर्म वेगळे असतात.
सर्व जलज प्राणी हे हमखास कफ वाढवणारे असतात, विशेषतः रक्तासंबंधी, त्वचेसंबंधी, पाण्याशी संबंधित, मीठाशी संबंधीत आजारात जलचर प्राणी दोष उत्पन्न करतात. जसे, आजच्या भाषेत गाऊट, मधुमेह, रक्तदाब सोरीयासीस, इ.इ. त्यातल्या त्यात खारे मासे हे जास्त गडबड करणारे.
हा दोष जावा, आणि माश्यांचा उग्र वास कमी व्हावा, यासाठीच तर यात मसाल्यांची मुक्तहस्ते उधळण असते. पण युक्तीने बरं का. माश्याचे अजीर्ण दूर व्हावे, मासे सहज पचावेत यासाठी मसाल्यामधे तीक्ष्ण वासाची तिरफळे. धने, आणि हळद. ग्रेव्हीसाठी कांदा लसूण आणि ओले खोबरे. मिरीचा भगभगीतपणा वेगळा आणि तिरफळाचा तीक्ष्ण सणसणीतपणा वेगळा. म्हणून ही औषधी गुणाची तिरफळे माशाच्या आमटीत हमखास वापरली जातात. माश्याच्या आमटीत नको असतील तर सोलकढीत तरी घालावीत. म्हणजे मासे सहज पचतात. प्रदेशानुसार जे जिथे सहज उपलब्ध असते, ते तिथे सहज पचते, या न्यायाने सर्व समुद्र किनाऱ्यालगत मासे खातात ते पचतात.
सुकवलेले मासे भाजल्यावर त्यावर गावठी खोबरेल तेल घातले की अस्सा वास सुटतो (म्हणे ...) सुक्या माश्यातला रूक्षपणा कमी करण्यासाठी स्निग्ध गुणाचे खोबरेल तेल !
ब्राह्मणी पद्धतीने बनविलेले कंदमुळांचे खतखते जवळपास याच पदार्थांनी बनवले जाते. फक्त यात कांदा लसूण नाही, आणि फोडणीपण नाही. पण तिरफळे मात्र हमखास असतात.
आयुर्वेदात सांगितलेले आहारीय पदार्थ प्रदेश विचारानुसार सांगितलेले आहेत. किंवा युक्ती वापरून बनवले जातात. तिखट पदार्थातील तिरफळे हा त्यातीलच एक वैशिष्ट्य.
या तिरफळांचा वास तर सातासमुद्रापार पोहोचलेला, पण नैसर्गिक कोकणी मानसिकतेप्रमाणे व्यापारी दृष्टीचा अभाव असल्याने पांढऱ्या तांबड्या रश्श्या प्रमाणे " कॅश " न करता आलेली, ही तिरफळाची वैशिष्ट्यपूर्ण अशी तिखट आमटी.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
20.11.2016
November 20, 2016
कडू चव म्हणजे फक्त मधुमेहवाल्यांसाठीच आहे, आमचा काही संबंध नाही, असं नाही. मधुमेह होऊ नये यासाठी देखील रोज खाण्यात कडू असावे.
जसे तिखटाचा अॅण्टीडोट आंबट आहे, तसे गोडाचा कडू असे समजावे. ज्यांना गोड खूप आवडते त्यांनी अगदी तेवढ्या प्रमाणात नाही, पण कडू जरूर खावे. गोड खाऊन मधुमेह झालाय ना, आता तेवढेच कडू खातो, म्हणजे गोड " नील " होईल, असं नाही हां !
कडूपणा कमी होण्यासाठी लवण रस उपयोगी होतो. कारल्याची भाजी जास्त कडू व्हायला नको असेल तर फोडींवर मीठ पेरून ठेवतात, मीठामुळे त्याला काही वेळाने पाणी सुटते. फोडी पिळून हे पाणी काढून टाकले तरी थोडा कडूपणा कमी होतो.
कडू खाताना पण जरा काळजी घ्यावी लागते.
अति प्रमाणात जर कडू चवीचे पदार्थ पोटात गेले तर पित्त हमखास वाढते. जेवणाच्या पानात कडू चवीची जागा डाव्या बाजूला असते, एवढे लक्षात ठेवावे.
कारल्याची भाजी किंवा भजी, काही महाभाग तर रोज सकाळी कारल्याचा ज्युसदेखील पितात. मेथीची भाजी अथवा पराठे, मेथीचे दाणे पाण्यात भिजवून ते पाणी पिणे, किंवा मेथी पावडर घेणे, भाकरीच्या किलोभर पीठात, दोन तीन चमचे मेथीची पावडर घालणे, शेवग्याच्या शेंगा आणि केळफूलाची भाजी देखील कडवटच असते. असा कडू आहार आठवड्यातून एखाद दुसऱ्या वेळा ठीक आहे, याने लिव्हर म्हणजे यकृताचे काम सुधारते. पित्ताला उद्दीपना मिळते, पाचक रस नीट पाझरायला मदत होते, जीभेला चव येते. आतड्यातील आमाचे गोळे हलायला, पुढे ढकलायला मदत मिळते.
पण रोज रोज एवढे कडू खाल्ले तर स्नायुंची ताकद कमी होते. शुक्रजंतु कमी होतात, हे पण लक्षात ठेवावे. अति सर्वत्र वर्ज्ययेत् असे म्हणतात ते चुकीचे नाही.
किराईत या कडू औषधाप्रमाणेच आणखी एक सुप्रसिद्ध कडू औषध म्हणजे कुमारी, कोरफड, अॅलोवेरा. याचा रस आटवला की त्यालाच काळा बोळ किंवा सबर म्हणतात. बाळऔषधात हा असतो.
बाळगुटी हल्ली गायबच झालेली दिसते. त्यातील बहुतेक औषधे ही कडूच असतात. अगदी दररोज नको पण आठवड्यातून दोन वेळा, रविवारी आणि बुधवारी बाळाला दोन दोन वळसे अवश्य उगाळून द्यावी. उगाळून झाल्यावर ही गुटीतील कडू औषधे नीट पुसुन, कोरडी करून, ठेवावीत, म्हणजे बुरशी येत नाही.
जे डाॅक्टर बाळाला बाळगुटी अजिबात देऊ नका, असे सांगतात, त्यांच्या "सिलॅबस" मधे बाळगुटी नसल्याने, त्या औषधांचा त्यांना अभ्यास नसतो, म्हणून त्यांना तसे सांगावे लागते. यात त्यांचा काहीच दोष नाही. हे सर्व डाॅक्टर्स लहानाचे मोठे होत असताना, कडू चवीची बाळगुटी खाऊनच मोठे झालेले आहेत, हे पण लक्षात ठेवावे.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
22.11.2016
November 22, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti