आपल्या स्वयंपाकघरात अत्यंत मानाचे स्थान प्राप्त अशी हि वनस्पती.तशी सगळ्याचीच लाडकी.कारण कोणताही शाकाहारी अथवा मांसहारी पदार्थ असो जसे वरण,डाळ,पोहे,उपिट,भाज्या,माशांची आमटी,चिकन,मटण ह्यावर सजावटी करीता हिची पेरणी करतात.तसेचकाथिंबीर चटणी,कोथिंबीर वड्या ह्या सगळ्यांच्याच आवडीच्या.ब-याचं व्यंजनांमध्ये हिचा वापर त्या पदार्थांची चव वाढविणा करिता केला जातो.कारण हिच्या मंद सुगंधाने व हिरव्यागार रंगाने पदार्थ दिसायला तर संदर दिसतोच पण त्याची लज्जत हि वाढते.
कोथिंबीरीचे १ मीटर उंचीचे नाजुक क्षुप असते.ह्याची पाने दंतुर कडा असलेली व सुगंधी असतात.हि चवीला तुरट,कडवट व गोड असते व गुणाने थंड असते.म्हणुनच हि शरीरातील तिन्ही दोष शांत करते.
जसा आपण हिचा उपयोग स्वयंपाकामध्ये करतो तसेच हिचा वापर घरगुती उपचारांमध्ये देखील होतो.
१)तोंड आले असता कोथिंबीरीच्या रसाने गुळण्या कराव्यात.
२)डोकेदुखी मध्ये कोथिंबीरीचा पाला वाटून त्याचा लेप कपाळावर करावा.
३)कामाच्या दरम्यान जर चेहर्याचा संपर्क उष्णतेशी आल्यास त्वचा कोरडी होते व त्वचेची आग होते तेव्हा कोथिंबीरीच्या रसांच्या घड्या चेहर्यावर ठेवाव्या थंडावा मिळतो.
४)वारंवार उल्ट्या होत असल्यास कोथिंबीरीचा रस+मध हे मिश्रण वारंवार चाटायला द्यावे.
५)ओल्या इसबावर कोथिंबीर वाटून त्यात वेखंड घालून ह्या मिश्रणाचा जाडसर लेप त्यांवर करावा.
६)हाता पायाची आग होत असल्यास कोथिंबीरीच्या पाल्याचा रस काढुन हातापायांच्या तळव्यांना चोळावा.
कोथिंबीर खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरातील धातूंना क्षीणता येते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हे पाणथळ जागी उगवणारे व नेहमी हिरवेगार असणारे १-२ मी उंचीचे क्षुप आहे.ह्याचे कंद जमीनीत असतात.आल्याच्या कंदा प्रमाणे ते वाढते.ह्याला ५-६ पर्व असतात जे मधल्या बोटा एवढे जाड व रोमयुक्त तांबूस रंगाचे व सुगंधी असतात.पाने हिरवी चमकदार व उसाच्या पानाप्रमाणे लांब,व कडा लाटा युक्त असतात.फुल पिवळट पांढरे मंजिरीस्वरूप असते.
वचा चवीला कडू तिखट असून हि उष्ण गुणाची हल्की,तीक्ष्ण,रूक्ष व प्रभाव मेध्य असलेली आहे.वचा कफवातनाशक व पित्तकर आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊया:
१)वेदना व सुज ह्यात वेखंडाचा लेप करतात.
२)लहान मुलांमध्ये वेखंड मेध्य कार्य करते अर्थात बुद्धिची ग्रहण व स्मरणशक्ती सुधारते.
३)मानसिक आजारात वेखंड हे तुप अथवा मधासह देतात.
४)खोकला,दमा ह्यात वेखंड सैंधव व कोमट पाण्यासह दिल्याने उल्टीतून कफ बाहेर पडतो.
५)वेखंड कृमीनाशक म्हणून देखील उपयुक्त आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
कोकमाची झाडे आपल्याला कोकण गोवा प्रांतामध्ये पुष्कळ पाहायला मिळतात.असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये कि कोकमा शिवाय कोकणी व गोयंकार माणसाचा स्वयंपाक पुर्ण होऊ शकत नाही.
कोकमाची फळे हि सुकवून त्याची सोले स्वयंपाक व औषधात वापरतात.आमटी,काही भाज्या,तिवळ,नारळाचा रस घालून केलेली सोल कढी,आगळ,कोकम सरबत इ अनेक प्रकारे आपण कोकमाचा वापर करतो.
ह्याचा सदाहरीत,पातळ नाजूक फांद्या असलेला वृक्ष असतो.ह्याची पाने आयताकार अथवा भालाकार असतात वरून गडद हिरवी व खालून फिकट रंगांची असतात.फळ गोलाकार १-१/२ इंच व्यासाचे असते.फळाच्या आत ५-८ मोठ्या बिया असतात.
कोकम चवीला कच्चा असताना आंबट व पिकल्यावर आंबट गोड लागतो हा उष्ण असून कफवातनाशक अाहे.
आता ह्याचे घरगुती उपचारात महत्त्व पाहूया:
१)कोरड्या उल्ट्या,तोंड कडू होणे,तोंडास चव नसणे ह्यात ७-८ आमसुलाचा एका वाडग्यात पाणी घालून भिजत घालावी व कुचकरून ते पाणी गाळावे व त्यात १ चमचा खडीसाखर घालून थोडे थोडे प्यावे.
२)अंगावर पित्त उठत असल्यास अंगाला कोकमाचे पाणी लावावे व पोटात देखील हे पाणी प्यावे.
३)कोकमाच्या बियांपासून काढलेले मेण हे पायांच्या भेगा भरून काढायला उपयोगी आहे.
४)करपट ढेकर येणे,भुक न लागणे,जेवण न पचणे,पाणी सुद्धा प्यावेसे न वाटणे ह्यात कोकमाचे पाणी काळीमिरी व मीठ घालून जेवणानंतर प्यावे त्याने पचन सुधारते.
५)ज्यांना मुळव्याध,अम्लपित्त,भगंदराचा त्रास आहे व त्यांना जेवणामध्ये चिंच वापरतां येत नाही त्यांनी कोकम वापरावा.
६)कोकमाच्या तेलाचा उपयोग जखमभरून काढायला केला जातो.
कोकम खाण्याचा अतिरेक केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
चुन्याबरोबर सहजपणे मिसळला जाणारा आणि आपला रंग चुन्याला देणारा कात हे आयुर्वेदातील एक अप्रतिम “लाईफसेव्हींग ड्रग” आहे. खैराच्या झाडाच्या जून सालींचा काढा करून खैराच्याच लाकडाने ढवळत त्या काढ्याचा केलेला खवा म्हणजे कात होय. पूर्णतः नैसर्गिक. उत्तम रक्तस्तंभक. रक्तशुद्धी करणारा. अनेक त्वचारोगांवर वापरला जाणारा हा कात.
किस बाई किस दोडका किस हे फुगडी गीत मंगळा गौरीमध्ये लय फेमस हाय बुवा.तर आज आपण नव्याने ओळख करून घेऊयात ह्या दोडक्याची.अहो काही नाही हे दोडके आकांराने दिसते अगदी घोसाळ्याच सारखे फक्त ह्याला धारदार शिरा असतात बरं का.चला आपण ह्याला घोसाळ्याचा सावत्र भाऊच म्हणूयात ना.मग आता दोडके व घोसाळे ह्यात गफलत होणार नाही ना.
हिचा देखील बराच पसरलेला वेल असतो.वेल लावल्यापासून सव्वा महिन्यात फळे येतात.आपण खातो ते दोडके हे त्या वेलीचे फळ.हि दोडकी देखील कडू व गोड अशा दोन प्रकारची असतात.ह्यातील कडू औषधी करिता वापरतात तर गोड खायला वापरतात.
दोडके हे चवीला गोड व थंड आणी तिन्ही दोष कमी करणारे असते.आता त्याचे औषधी उपयोग पाहूयात.
१)मुलांना अंगात ताकद भरण्याकरिता आठवड्यातून तीन वेळेस हि भाजी जेवणात द्यावी.
२)ज्यांना संडासला साफ होत नाही त्यांनी रात्रीच्या जेवणात उकडलेले दोडके सैंधव व जिरे पूड घालून खावे.
३)ज्या व्यक्तिंना कृमी होण्याची सवय असते त्यांनी दोडक्याची कोरडी भाजी एक दिवस आड खावी.
४)तोंडाला रूची नसल्यास दोडक्याच्या काढलेल्या शिरा +चिमूटभर मीठ+१/२ इंच आले हे मिश्रण चावून येणारी लाळ थुंकावा व नंतर चोखोही थुंकावा.
५)शरीरातील धातूक्षीण होऊन चिडचिडे पणा व मानसिक त्रास वाढल्यास जो थकवा येतो तो कमी करण्यासाठी दोडक्याचे सूप बडीशेप ,जिरे व धणेपूड घालून त्यावर साजूक तूपाची फोडणी देऊन प्यावे.
दोडके खाण्याचा अतिरेक केल्यास संडासमधून आव पडू शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आयुर्वेद म्हणजे काही केवळ पाळेमुळे नव्हे. हे जगण्याचे शास्त्र आहे. जीवन म्हणजे काय ? का जगावे ? कोणासाठी जगावे ? किती वर्षे जगावे ? कसे जगावे ? या सगळ्याची उत्तरे या शास्त्रात मिळतात, एका ओळीत सांगायचं तर, आयुर्वेद म्हणजे सगळ्यांचा बाप आहे. आता पिताश्री म्हटलं तर तत्वज्ञान ऐकून घेणं, ओघानं आलंच ना. !
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 2
जसे आचमनातून आपल्याला कळले की अनावश्यक पाणी फक्त पळीभरच म्हणजे चमचाभरच प्यायचे असते. अन्यथा नाही. आयुर्वेदात हेच सांगितले आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, नित्य म्हणजे नियमाने करायच्या कर्मांमधे देवपूजा सांगितलेली आहे. यात ठराविक वेळ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. 'मला सवड झाली की देवपूजा' असं करू नये. नियमितपणा म्हणजेच देव. सूर्याने जर नियमितपणा सोडला तर ? आणि देवपूजा करताना श्रद्धेने आणि भक्तीयुक्त अंतःकरणाने केली तरच शांती मिळते. नाहीतर ते केवळ कर्मकांड होते. तसे न व्हावे.
आचमन झाल्यावर प्राणायाम केला जातो.
काही मंडळी याला थोतांड म्हणतात. या कर्मकांडात काऽही काही अर्थ नाही, असे म्हणतात. प्राणायाम करणे हे पण एक कर्मकांडच आहे. त्याला देवपूजेमधे सर्वात पहिले स्थान दिले आहे, हे विसरून चालणार नाही.
प्राणायाम कसा करावा, ते सुद्धा धर्मशास्त्रात सांगितलेले आहे. जसे योगशास्त्रामधे वर्णन केलेले आहे, तशीच कृती धर्मश्स्त्रातील कर्मकांडामधे वर्णन केलेली आहे. हा केवळ योगायोग समजावा का ? नक्कीच नाही.
ही सर्व शास्त्रे जगण्यासाठी आवश्यक ते मुलभुत नियम सांगायला बनवली गेली आहेत. समाजाचे धारण करतो, तो धर्म अशी व्याख्या देखील केलेली आहे.
प्राणायाम करण्यापूर्वी आचमन सांगितलेले आहे हा क्रम देखील विसरून चालणार नाही. आधी प्राणायाम नंतर आचमन असे नाही सांगितलेले ! घसा, श्वसनमार्ग आचमन करून, जरासा ओला करून घ्यावा म्हणजे, नंतर केल्या जाणाऱ्या जाणीवपूर्वक श्वासोच्छ्वासाने घश्यामधे कोरडेपणा निर्माण होऊन त्रास होऊ नये. यासाठी हा क्रम महत्त्वाचा !
आचमन झाल्यावर डाव्या नाकपुडीने श्वास भरून घ्यावा. उजवी नाकपुडी बंद करावी. भरून घेतलेला श्वास फुफ्फुसामधे रोखून धरावा. म्हणजे दोन्ही नाकपुड्या बंद कराव्यात. आपली श्वास रोखून धरण्याची शक्ती संपली की, श्वास हळूहळू सोडून द्यावा. श्वास सोडताना उजव्या नाकपुडीने सोडावा. आणि श्वास न घेता काही वेळ थांबावे. याला अनुक्रमे पूरक, अंतःकुंभक, रेचक आणि बहिर्कुंभक म्हणतात. हे कर्मकांड का करायचे ? आणि देवपूजेमधे सुरवातीला महत्त्व दिले जावे, एवढे काय आहे या प्राणायामात ?
असा प्रश्न विचारणारा, कदाचित अभारतीय असावा. एवढे याचे महत्त्व महर्षी पतंजलींपासून आजमितीपर्यंत सर्व योगतज्ञांनी आपल्याला वेळोवेळी सांगितलेले आहे. प्राण धारण करण्याची शक्ती वाढवणे, शरीर आतून शुद्ध स्वच्छ ठेवणे, मन आत्मा इंद्रिये यांना शुद्ध ठेवणे, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जगण्यावरील विश्वास वाढवणे, यासाठी प्राणायाम करावा. हे तर सर्वांनाच माहिती आहे. त्यासाठी वेगळा वेळ आणि जागा फुकट घालवायवा नको. आणि आत्ता तर आपण जागतिक स्तरावर योगदिन साजरा करतो.
त्यामुळे माहिती नसेल तर लवकरात लवकर हे ज्ञान मिळवावे.
नियमितपणे प्राणायाम करावा, म्हणजे श्वसनासंबंधी कोणत्याही समस्या निर्माण होत नाहीत, आणि निर्माण झालेल्या असल्या तरी त्या दूर होतात. एवढे समजले तरी आज पुरेसे आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
27.05.2017
दान करणे ही भारतीय संस्कृती चा पाया म्हटले तरी चालेल. पण या दानाचा सर्वात मोठा धोका म्हणजे अहंकार वृद्धी. मी दान दिले. यातील मी म्हणजे अहंकार. अहंकार हा नेहेमीच सूक्ष्म असतो. पण केव्हाही मोठे रूप घेऊ शकतो. हीच वेळ धोक्याची असते. म्हणून तर आई म्हणते, उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालादेखील कळू नये. ते गुप्त असावे.
आपले सगळे अवयव बघा कसे “दाते” आहेत. कोणत्याही अपेक्षांशिवाय आपल्याला आतून आपलेपणाने सतत देत राहातात. रसरक्त, अश्रु, स्तन्य, लाळ इ.इ. काही वेळा तर सर्व अंतस्रावी ग्रंथी आपली परवानगी न घेता सुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे ते, न मागता तयार करून देतात. असा दाता व्हावं.
सहा वेळा पान खाल्ल्यानंतर तोंडात जी लाळ तयार होते, ती गिळावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेळी केवळ चावून थुंकायचे आहे. आणि नंतरची लाळ येईल तेवढी सावकाश निर्माण करून गिळायची आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti