(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – तांदुळजा (चवळीचा पाला)

    तांदुळजा (चवळीचा पाला) हि भाजी बारा महिने उगवते. हिची लहान रोपं असतात व पाने बारीक असतात. हि भाजी चवीला गोड व शीतल गुणाची असल्याने शरीरातील वात व पित्तदोष कमी करते.

    हिचे बरेच औषधी उपयोग आहेत ते आपण पाहूयात:

    १)भाजलेल्या जखमेवर तांदुळजाच्या भाजीचा रस लावावा.

    २)डोळे,हातपाय,व लघ्वीची आग होणे ह्यात तांदुळजाच्या भाजीचा १/४ कप रस+ साखर हे मिश्रण उपाशी पोटी घ्यावे.

    ३)चाई अर्थात केसांना लूत लागणे असे बोली भाषेत म्हणतात, त्यांवर तांदुळजाच्या भाजीचा रस+हिंग हे मिश्रण डोक्यावरील केस गेलेल्या भागी जीरवावे.

    ४)वारंवार ताप येणे किंवा तीक्ष्ण औषधे घेतल्याने अशक्तपणा आल्यास ४२ दिवस पाल्याचा रस एक कप घ्यावा.

    ५)संडास साफ होत नसेल तर तांदुळजाचा + पालक घालून केलेला सूप तूप घालून घ्यावा.

    हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास शौचास पातळ होते.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • याला जीवन ऐसे नाव भाग १५

    न पिबेत् पंक शैवालतृणपर्णाविलास्तृतम् ।
    सूर्येन्दुपवनादृष्टमभिवृष्टं घनं गुरू ।।
    फेनिलं जन्तुमत्तप्तं दन्तग्राह्यतिशैत्यतः ।

    वाग्भट सूत्र स्थान 5 - 5/6 भाग 3

    जसं काळोख्या जंगलातील पाणी निषिद्ध सांगितले आहे, तसेच आपल्या घरातील असा प्रदेश म्हणजे शीतकपाट. या फ्रीजमध्ये देखील असाच काळाकुट्ट काळोखच दडलेला असतो.

    शीतकपाटामधे ना सूर्यप्रकाश, ना चंद्रकिरण ना वाऱ्याची झुळुक. हे कारण देखील ग्रंथकार देताहेत. अशा ठिकाणी असलेले अन्न पाणी घन आणि गुरू गुणाचे बनते, असे स्पष्टपणे सांगताहेत.

    या ठिकाणचे अन्नपाणी, वात आणि कफ दोष वाढवणारे बनते. हे पाणी तात्काळ पित्तशमन करेलही, पण अग्निच्या विरोधी काम होईल, आणि थंड गुणांनी वातही वाढवेल. वाढलेला वात पुनः पित्ताला अन्य ठिकाणी जायला मदत करतो. एकंदरीत हे पाणी गडबड करणारेच ठरते. दाताला झिणझिण्या आणणे, हिरड्या शिणशिणणे, लालास्राव कमी करणे, संकोच घडून आल्याने चवही बदलून जाते. सर्वात महत्वाचे आम, क्लेद, चिकटपणा वाढवणारे असते.

    आता करा यादी.
    फ्रिजमधील पाण्याच्या बाटल्या,
    दूधाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या,
    पालेभाज्यांच्या जुड्या,
    दोन चार दिवसाची मळून ठेवलेली कणिक,
    पाकीटातील मांसाचे तुकडे,
    आईस्क्रीमचे गोळे,
    दह्याचे पातेले,
    शिल्लक राहिलेली कोशिंबीर, सॅलेड,
    डबाबंद रसगुल्ले, गुलाबजाम, श्रीखंड,
    ज्युस, इ.इ. हे सर्व ....????
    सूर्येंदुपवनम् अदृष्टम् न भक्षयेत.....

    फ्रीजमधीलच नव्हे तर, जे जे अन्नपदार्थ, पाणी, सूर्येंदुपवनम् अदृष्टम असतील ते ते सर्व, या वैश्विक नियमानुसार निषिध्दच ना !
    शेवटी ज्या अन्न पाण्यावर सूर्य, चंद्र, वारा यांचा स्पर्श नसेल, ते अन्न पाणी खाण्या पिण्यासाठी अयोग्यच ठरेल. मग ते निबाड जंगलातील एखाद्या तलावातील असूदेत, बोअरवेलचे असूदेत, किंवा टाकीत साठवलेले पाणी, रेन वाॅटर हारवेस्टींगच्या माध्यमातून गोळा करून घराच्या खाली तळघरातील टाकीचे असू दे. किंवा घरातील शीतघराचे ! !

    असे साठलेले पाणी वात आणि कफ दोष वाढवणारे असल्यामुळे याच गुणाने निषिध्द ठरेल.

    शास्त्रकारानी आपल्याला प्रकाशाचा मार्ग दाखवला आहे. शास्त्रकाराते वाट पुसतु असं माऊली पण म्हणतात. ज्या मार्गाने गेल्यावर, आपले भले होईल त्या मार्गाने जाणेच संयुक्तिक होईल ना !

    आजची काळाची गरज,
    हे असंच चालायचं,
    काळानुसार बदलायला नको काय ?
    आजचे विज्ञान, शोध मान्य करायचे नाही का ?

    एकदा वैश्विक नियम पाळायचे ठरवले तर बाकी
    या साऱ्या लंगड्या पळवाटा आहेत, असे वाटत नाही काय ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

  • किचन क्लिनीक – कैरी

    आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा बाई झिम्मा खेळतो हे गाणे झिम्मा फुगडी खेळताना पुरवापार पासून आवडीने गायले जाते.हो हो आज आपण नव्याने ओळख करून घेणार आहोत फळांचा राजा आंबा ह्याची.

    धगधगत्या उन्हाळ्यात मनाला आल्ल्हाद देणारे हे फळ.उन्हाळ्यामध्ये आतुरतेने ह्या फळाच्या आगमनाची वाट पाहिली जाते.असा हा फळांचा राजा.लहान मूलांपासून अगदी वृध्द मंडळीचा देखील हा आवडता आहे.

    ह्याच्या जाती तरी किती,लंगडा,केसर,
    भिष्म,हापूस,मानकुराद,मुशेराद,तोतापुरी,रायवळ इ अनेक जाती आहेत ह्याच्या आणी प्रत्येकाची चव वेगळी बरं का.

    बरं ह्या पासून खायचे प्रकार किती करतात मुरंबा,आमरस,आम्रखंड,आंबा वडी,आंब्याचे साठ,रायते इ हे झाले पिकलेल्या आंब्याचे.तर कारी असताना लोणचे,रायते,पन्हे,चुंदा इ प्रकार फारच सुरेख लागतात.

    चला मग आता ह्याची माहिती पाहूयात ना.आंब्याचा ३०-१२० फूट पर्यंत उंच वृक्ष असतो.पाने ४-१२ इंच लांब असतात फुले छोटी असतात व मादक सुगंध येतो त्यांना.फळ हे वेगवेगळ्या आकाराचे असले तरी कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळसर लाल असते.

    आता प्रथम भागामध्ये आपण कैरीचे उपयोग पाहूयात व गुणधर्म जाणून घेऊया.कैरी जी तुरट असते ती शरीरातील वात दोष वाढविते तर आंबट कैरी हि शरीरातील पित्त दोष वाढविते.कैरी उष्ण असते.

    चला मग ह्याचे औषधी उपयोग पाहुया:

    १)जुलाब होत असल्यास तुरट चवीच्या कैरीचा रस थोडा थोडा प्यावा.

    २)आंबट कैरी पासून तयार केलेले पन्हे हे तहान,अंगाची आग शांत करते व तृप्तीचा अनुभव देते.

    3)ज्या व्यक्तिंना कामा अथवा व्यवसाया
    निमित्त वारंवार उष्णतेशी संपर्क येतो त्याच्या डोळ्याचा थकवा घालवायला कैरीचा किस डोळ्यावर ठेवावा.

    ४)उन्हाळ्यात कच्च्या कैरीवर सैंधव मीठ घालून बेताने खाल्ल्यास उन्हाळ्याचा त्रास कमी होतो.

    ५)आंबट कैरीची साल सुकवून केलेली आंबोशी तोंडाची चव वाढविते तसेच हि चिंचे एवजी आमटी भाजीत वापरली जातात.

    कैरी अतिप्रमाणात खाल्ल्यास व अजीर्ण होऊ शकते.

    (क्रमश:)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • याला जीवन ऐसे नाव भाग २१

    पाणी शुद्धीकरण भाग एक

    दूषित पाणी केवळ पिण्यासाठी नव्हे तर स्नानादिकांसाठी वापरले तरी अनेक रोग होतात, असे ग्रंथकारांनी नमूद करून ठेवले आहे.

    दूषित पाण्यात कोळी, मासे इ. प्राण्यांची विष्ठा,मूत्र,त्यांच्या शरीरातील अन्य स्राव, किंवा त्यांचे मृत शरीर यामुळे दोष उत्पन्न होतात. तसेच अतिसूक्ष्म आणि स्थूल कृमी किटक, पालापाचोळा, चिखल, पाण्यावर वाढणारे डासाप्रमाणे असणारे अन्य जीवजंतु, किंवा त्यांच्यापासून तयार होणारे विष "जीवन" दूषित करतात.

    आजच्या काळात वेगवेगळ्या रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणारे दूषित सांडपाणी, अधिकृत आणि अनधिकृत कत्तलखान्यातून बाहेर पडणारे रक्त, मल, मांस, युक्त दुषित आणि कुजलेले पाणी, गावागावातून नदीमधे टाकला जाणारा उकीरड्यावरील जैववैविध कचरा, तसेच प्रत्येक घराघरातून बाहेर पडणारे साबणयुक्त रसायनमिश्रीत सांडपाणी........ कित्ती मोठ्ठी यादी होईल...
    हे सर्व दूषित पाणी आपल्या पिण्याच्या पाण्याचे नैसर्गिक स्रोत दूषित करत आहेत.

    भीती निर्माण करण्यासाठी नव्हे तर रोगाची कारणे शोधून काढून ती कारणे आपल्या जीवनशैलीतून कमी करता आली तर, किंवा काढता येतील तेवढी काढण्यासाठी या रोगांची यादी देतोय.

    हे रोग फक्त अशुद्ध पाणी पिऊनच होतात असे नव्हे तर रोग होण्याच्या कारणामधे इतर कारणांबरोबरच दूषित पाणी हे देखील एक महत्वाचे कारण दुर्लक्ष करून चालणार नाही.

    आठ प्रकारचे उदर रोग, वारंवार तहान लागणे, पोट फुगणे, वेगवेगळे तापाचे प्रकार, खोकला, भूक नाहीशी होणे, डोळे येणे, वेगवेगळे त्वचारोग, खाज येणे, गलगंड इ. अनेक रोग ग्रंथकार वर्णन करतात. त्याचबरोबर मुळव्याध, आदि गुदरोग, स्त्रीयामधील प्रदर आदि रोग, हत्तीरोग, रक्ताल्पता, शिरोरोग देखील नदीतील अशुद्ध पाणी, शुद्धी संस्कार करण्याअगोदर प्यायल्याने निर्माण होतात.

    आजच्या भाषेत व्हायरल फिवरचे अनेक प्रकार नावं बदलून आपल्यासमोर रोज येत आहेत, अगदी चिकुनगुनीयापासून स्वाईन फ्लु, इबोला पर्यंत सर्व प्रकार पाण्याशी संबंधीत आहेत.

    दूषित पाणी ज्या भागात आहे, त्या भागात हे आजार जास्त प्रमाणात पसरले आहेत. हे पण व्यवहारात दिसते.

    या दूषित पाण्याखेरीज, अन्य ठिकाणचे जल, वापरासाठी नसेल तर याच दूषित जलावर योग्य ते शुद्धीसंस्कार करून नंतर ते वापरावे, म्हणजेच "रिसायकल" करून वापरावे, इथपर्यंत स्पष्ट आदेश देणारी आयुर्वेदाची दृष्टी, दूरदृष्टीची नाही, असे कसे म्हणू शकतो ना !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग 9673938021
    28.12.2016

  • किचन क्लिनीक – कोहळा

    किचन क्लिनीक – कोहळा

    तसा कोहळा पौष्टिक असला तरी काही श्रध्दा अंधश्रद्धा ह्या फळाशी जोडल्या गेल्या आहेत जसे ह्याचा वेल बहरला आणी भरपूर फळे लागली कि ते अपशकुन मानला जातो,बऱ्याच घरात हा आणणे शिजविणे निषिद्ध असते.तसेच दृष्टबाधा होऊ नये म्हणून ह्याचे फळ धरा बाहेर बांधतात.

    एवढे चांगले फळ पण किती शापित बिच्चारे नाही का हो!बरे ह्याचा उपयोग खायला देखील केला जातो बरं का.आग्रा फेमस पेठा कोहळ्यापासून बनवितात,आपण उन्हाळयात करतो त्या वड्या कोळ्याच्याच,खीर देखील करतात,काहीजण ह्याचा खवा देखील करतात.आणी हे सगळे पदार्थ पौष्टिक असतात बरं का.

    कोहळ्याचा वर्षायू वेल असतो.ह्याची पाने ४-६ इंच लांब व हृदयाकृती असतात,पाने पिवळी २ इंच व्यासाची असतात.फळ अंडाकृती १-११/२ फूट लांब व वर सफेद पावडरचे आवरण असणारे असते.

    हा चवीला गोड,थंड व वात पित्त दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.

    चला आता ह्याचे औषधी व घरगुती उपचारात महत्त्व पाहूया:

    १)अंगाची आग होत असल्यास फळाच्या गराचा लेप करावा.

    २)अम्लपित्तामध्ये कोहळ्याच्या रसात साखर घालून प्यावे.

    ३)बुद्धि व धारणाशक्ती वाढवायला पिकलेल्या कोहळ्याच्या १/४ कप रसात १/२ चमचा ज्येष्टमध उगाळून घालावे व हे मिश्रण रोज सकांळी अनशापोटी प्यावे.

    ४)४ चमचे कोहळ्याचा रस+ ४ चमचे आवळा रस रोजसकाळीघ्यावाह्यानेथुंकी ,नाक,लघ्वी,
    मुळव्याध ह्यातून होणारा रक्त स्त्राव कमी होतो.

    ५)डोळ्यांची आग होत असल्यास व डोळे लाल होत असल्यास कोहळ्याच्या रसांच्या घड्या डोळ्यावर ठेवाव्यात.

    ६)वजन वाढवायला ४ चमचे कोहळ्याचा रस +गव्हाचे सत्व १/२ चमचा+ खडी साखर १ चमचा रोज सकाळी अनशापोटी घ्यावे व वर १२ सुर्यनमस्कार घालावेत.

    कोहळा अति खाल्ल्यास शरीर स्थूल होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग बावन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 7

    नंतरचा उपाय अर्घ्य.सुगंधीत पाण्याने हात धुवायला अर्घ्य वापरले जाते. पाण्यात चंदन, अक्षता, दुर्वा, इ. वस्तू घालून हे पाणी देवाला हात धुण्यासाठी दिले जाते.

    काही खाण्यापिण्यापूर्वी हात पाय धुवायचे असतात, एवढे समजले तरी पुरेसे आहे. नंतरचा उपचार आचमन. ज्याविषयी आधी लिहून झालेले आहे.

    स्नान आणि अभिषेक केल्याशिवाय पूर्ण शुद्धी होतच नाही. गंगा आदि सप्त नद्यांचे पवित्र पाणी आंघोळीकरीता आहे, अशी कल्पना करून आपणही स्नान करावे. स्नानाने शरीराची शुद्धी तर होतेच पण मनाची शुद्धी देखील होते. स्नान करीत असताना लक्ष स्नानाकडेच असावे, तरच स्नानाने मानसिक शुद्धी होईल.

    पंचामृत स्नान, भस्म स्नान, इ. प्रकारावरील सविस्तर आरोग्यटीपा यापूर्वी आपण वाचलेल्याच असतील.

    स्नान करीत असताना काही सूक्ते म्हणायला सांगितलेली आहेत. मंत्राचे विशिष्ट स्वरामधे उच्चारण केले असता, त्यातून निर्माण होणारी स्पंदने, लहरी यांनी वातावरण सात्विक बनते. घंटा, शंख इ. मुळे निर्माण केल्या नादामुळे काही जंतु मरतात, असेदेखील वाचल्याचे स्मरते. मंत्र स्वतः म्हटले तर उत्तमच, पण केवळ ऐकले तरी आरोग्याची प्राप्ती होते, असाही एक संदर्भ मंत्रोच्चाराच्या फलश्रुतीचा मिळतो. गायत्री मंत्राच्या योग्य उच्चाराने, कॅन्सर सारख्या रोगाच्या पेशींची वाढ थांबते, असेही लक्षात येत आहे. मात्र मंत्राचे उच्चारण निर्दोष हवे, स्पष्ट हवे, जीभेला पहिल्यापासूनच तशी सवय हवी तरच ते उच्चार जमतात, नाहीतर अर्थाचे अनर्थ होऊ शकतात, म्हणूनच समाजातील काहीजणांनाच ते काम नेमून दिलेले होते. जर उच्चारात जरा चुक झाली तरी निर्माण होणाऱ्या लहरींची स्पंदने बदलतात, आणि अर्थ चुकतो. चिता आणि चिंता, खून आणि खूण, जहाज, चमचा, श आणि ष यातील उच्चारात फरक पडून चालत नाही.

    काही वेळा शब्द उच्चारणाऱ्याला त्या शब्दांचा अर्थ माहिती असत नाही, पण ज्याला तो अर्थ समजला पाहिजे, त्याला जर योग्य उच्चारात एखादे वाक्य ऐकवले तर, या वाक्यातून जे समजायला हवे होते ते त्याला सहज कळते.

    जसे, "आज सांच्याक तुका चाराक सावतांथुय च्यॅयक बोल्लयला आसा" हे मालवणी वाक्य, मालवणी न कळणाऱ्या माणसाला काहीच अर्थबोध घडवणार नाही. पण ज्याला अर्थ कळणार नाही त्याने, जर हे वाक्य नीट उच्चारासह पाठ केले, आणि ज्याला मालवणी भाषा समजते, त्याच्यासमोर जाऊन उच्चारले तर ? ....
    ........त्या मालवणी माणसाला कळेल की, " मला सायंकाळी चार वाजता सावंत यांच्याकडे चहा प्यायला बोलावले आहे."

    कळले का मंत्रामधील उच्चाराचे महत्त्व ?
    जे जे देवासाठी, ते ते देहासाठी.
    जरा जरी फरक झाला तरी नुकसान हे ठरलेले.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    01.06.2017

  • नमस्कार – भाग ४

    नमस्काराचा हा संस्कार आपण मुलांवर नकळत करायचा असतो. आपले अनुकरण मुले करीत असतात, समजा, दूरध्वनीवर बोलताना सुरवातच “हॅलो” या शब्दाऐवजी,” नमस्कार ” या शब्दाने करायची ठरवली तर ? सहज शक्य आहे. प्रयत्न करून पहा. मुले पण बदलतात.

  • आहाररहस्य १०

    जसे घुसळलेल्या दह्याचा सूक्ष्म भाग म्हणजे लोणी
    भक्षण केलेल्या तेजाचा एक भाग म्हणजे वाणी,
    प्राशन केलेल्या जलाचा सूक्ष्म भाग म्हणजे प्राण,
    आणि भक्षण केलेल्या आहाराचा सूक्ष्म भाग म्हणजे मन.

  • किचन क्लिनीक – पडवळ

    किचन क्लिनीक – पडवळ

    काय हा पडवळ्या सारखा दिसतो लांबच लांब असा ठोमणा शरीरयष्टिने कृश व उंच व्यक्तीला मारला जातो.हि भाजी जर रात्री कुणी काळोखात जमिनीवर पाहिली तर साप आहे असे समजून किंचाळल्याशिवाय रहाणार नाही.असे लांबच लांब असे हे पडवळ.

    ह्याची चटणी,कोरड,भाजी,भजी असे विविध प्रकार आपण करून खातो.आणि हे सगळेच पदार्थ अगदी चविष्ट लागतात बरं का.

    ह्या पडवळाचे वेल असमतोल आपण ज्याची भाजी करून खातो ते पडवळ हे त्या वेलिचे फळ असते.औषधासाठी वापरतात ते पडवळ कडू असते पण स्वयंपाकात आपण गोड पडवळ वापरतो.त्यामुळे आपण गोड पडवळाचे औषधी उपयोग पाहूयात.

    पडवळ हे चवीला गोड व थंड असते व हे शरिरातील तिन्ही दोष कमी करते.आता ह्याचे औषधी उपयोग पहायचे ना:

    १)भूक न लागल्यास पडवळ उकडून वाटावे व सुप बनवा त्यात १/५ चमचा हिंग+१ चमचा जिरेपूड +१/२ चमचा ओवा घालून ३-४ दिवस प्या.

    २)व्यवसाया निमित्त कायम ज्यांचा संपर्क उष्णतेशी येतो त्यांच्या आहारात कायम पडवळाची भाजी असायला हवी.

    ३)जाडी कमी करायची आहे पण उपाशी राहणे जमत नाही का?पडवळ २०० ग्राम+कुळीथ २० ग्राम एकत्र शिजवून सूप करून त्यात जिरे,दालचिनी,ओवा ह्यांची पूड मिसळून प्यावे.

    ४)कावीळ झालेल्या व्यक्तींच्या आहारात पडवळाची भाजी नियमीत ठेवावी.

    ५)अंगात उष्णता,हातापायांची आग होणे,चक्कर येते,संडासला साफ न होणे अशा तक्रारी मध्ये १०० ग्राम पडवळ+१० ग्राम काळ्या मनुका+२० ग्राम आवळकाठी यांचा काढा करून द्यावा.

    कोवळा पडवळ खाण्याचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहाररहस्य १४

    आपण भारतीय उजव्या हाताने जेवतो. आणि एकाच हाताने जेवायचे असते. अन्नाला दोन्ही हात लावून जेवू नये. पाश्चात्य लोक दोन्ही हातात काटे, चमचे सुर्‍या घेऊनच फडशा पाडतात. त्यांची तशीच संस्कृती आहे. पण आपण भारतीय लोक फक्त उजवा हातच अन्नाला लावतो कारण डावा हात  दोन नंबरसाठी वापरत असल्याने जेवण्यासाठी निषिद्ध समजला आहे.