(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किचन क्लिनीक – तिरफळ

    किचन क्लिनीक – तिरफळ

    साधारण पणे वाटाण्याच्या आकाराची हि फळे असतात आणि त्या फळांच्या आत काळी चमकदार बी असते.ह्याचे काटेरी झाड असते.
    ह्यांना एक विशिष्ट असा उग्र वास येतो.ब-याच
    जणांना कदाचित हे फळ माहित नसेल तसा ह्याचा आपल्या स्वयंपाकामध्ये फार वापर होतो असे देखील नाही पण गोवा कोकण प्रांतामधील लोक ह्याचा थोडाफार वापर आपल्या काही विशिष्ट खास व्यंजनांमध्ये आवर्जुन करतात.

    प्रामुख्याने ह्याचा उपयोग माशाच्या जेवणामध्ये केला जातो.कर्ली,बांगडे ह्या माशांची आमटी करताना अथवा शाकाहारी पदार्थ म्हणजे गोव्यात बनविले जाणारे भाज्यांचे खतखते ह्यामध्ये तिरफळे वापरली जातात.कारण माशांच्या आमटी मध्ये वापरण्याने मासे पंचायला सुलभ होतात.आणि त्या पासून अजीर्ण होत नाही.तसेच ह्याच्या विशिष्ट वासाने माशांचा विशिष्ट गंध कमी होतो(मी दुर्गंध म्हणणार नाही कारण आमचे शरीर ह्या माशांवरच पोसलेले आहे.

    तिरफळे चवीला तिखट,कडू असतात आणी ती ब-यापैकी उष्ण असतात.त्यामुळे ती शरीरातला वात व कफ दोष कमी करतात व पित्तदोष वाढवतात.

    जसे ह्याचा उपयोग भोजनात होतो तसाच ह्याचा उपयोग काही घरगुती उपचारांमध्ये देखील केला जातो बरे का!
    चला मग पाहूयात तिरफळाचे औषधी उपयोग:

    १)वातामुळे अंगात कळा येत असतील तर १/४ चमचा तिरफळ चुर्ण मधातून घ्यावे.

    २)अजीर्ण झाले असल्यास तिरफळ चुर्ण गूळामध्ये मिसळून त्याच्या गोळ्या कराव्यात व त्या तूपासोबत घ्याव्यात.

    ३)पोटात गॅस झाला असल्यास १/४ तिरफळ चूर्ण+२ चिमूट हिंग+१ चमचा लिंबाचा रस हे मिश्रण घ्यावे गॅस कमी होतो.

    ४)जुन्या आमवाता मध्ये १/४ चमचा तिरफळ + १चमचा एरंडेल हे मिश्रण रात्री झोपताना ४२ दिवस घ्यावे ह्याने पुष्कळ फरक पडतो.

    ५)पोटात दुखून उचक्या येत असल्यास १/२ चमचा तिरफळ चुर्ण+२ चमचे मध+१ चमचा साजुक तूप हे मिश्रण वारंवार चाटावे.पण एॅसीडीटी असणा-यांनी हा उपाय करू नये.

    अतिप्रमाणात ह्याचे सेवन केल्याने एॅसीडीटी,व तोंडात उष्णतेचे फोड येणे ह्या तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहारातील बदल भाग ३

    कोणताही पूर्वग्रह दूषित ठेऊन हे वाचन करू नये. काही जणांच्या श्रद्धा, भावना, इगो, जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद, परंपरावाद आड येऊ नये. आपल्याला शुद्ध आरोग्य मिळवायचं आहे. त्यासाठी कोणते निकष कसे लावायचे, हे आपले आपणच ठरवायचे आहे. संवाद साधायचे असतील तर पूर्ण विषय समजून घेतल्यावर, जरूर बोलूया.

    समर्थ म्हणतात,
    पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण ।
    उगाच ठेवी जो दूषण
    तो दुरात्मा दुराभिमान
    मत्सरे करी ।।

    आजच्या काळात शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालणे जास्त महत्वाचे आहे.

    जसे काम तसे तसा आहार.
    कष्टाची, अतिकष्टाची कामे करणाऱ्याला, म्हणजे रस्त्यावर दगड फोड करणाऱ्या
    लमाणी माणसाला जर सांगितले गेले, की
    " तू रोज तुपभात खा, तुझ्या तब्येतीला तो चांगला आहे",

    तर तो म्हणेल,
    "काय यॅड लागलंय का, म्हणं तूपभात खावा." आमची लसणीची झणझणीत लाल चटणी, कांदा भाकर आणि कोंबडं बोकड लई ब्येस.

    आणि प्रत्यक्षात देखील तेच सत्य आहे.
    केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी ठरत नाही. तर व्यावहारिक स्तरावर काही पर्याय वेगळे असू शकतात.

    म्हणजे
    काम करून आपोआप फुकटचा घाम येतोय की, जिममधे जाऊन विकतचा आणावा लागतोय.
    रोग म्हणून अंगातून घाम येतोय, की आपोआपच येतोय.
    ऊन्हात काम आहे की एसी मधे.
    ऊद्याची चिंता आहे की नाही.
    शारीरिक श्रमाचे काम आहे की बौद्धिक क्षमतेचे.
    परंपरेने आलेले, की ओढून ताणून आणलेले.
    गरज म्हणून की हौस म्हणून.
    जीभेसाठी की पोटासाठी.
    जीवासाठी की जातीसाठी.
    हट्टआग्रहाने खातोय की सहज बदल म्हणून,
    मला हवंय म्हणून की मित्र खातोय म्हणून.
    या सर्व गोष्टींचा विचार चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी करावाच लागेल. अगदी एका जातीतल्या, एका धर्मातल्या, एकाच घरातल्या दोन व्यक्तींसाठी सुद्धा !
    विचार वेगळा करावा लागेल. लागतो.

    इथे मी मुद्दाम नमुद करू इच्छितो की , जातीनुसार मांसाहार मी सांगत नाहीये, तर कर्मानुसार आहार ठरवावा.

    मराठी भाषेत एक म्हण आहे, मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते. असं व्हायला नको. आपण प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा आणि आपला विकास करावा. शेवटी मत मांडणे म्हणजे मत लादणं नव्हे,
    माऊली म्हणतातच, जो जे वांछील तो ते लाहो,

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    24.09.2016

  • किचन क्लिनीक – कवठ

    किचन क्लिनीक – कवठ

    ह्याचा वृक्ष असतो ज्याची साल पांढरी धुसर असते.पाने बारीक व मेंदीच्या पानांसारखी असतात.फुले लहान व पांढरी असतात.फळाची साल कडक व रंग भुरकट पांढरा असतो.आतील गर पिवळा काळसर असतो व ह्यात भरपूर बिया असतात.

    ह्याचे कच्चे फळ उष्ण आंबट,तुरट व वातपित्तकर व कफनाशक असते.
    ह्याचे पिकलेले फळ गोड,आंबट,तुरट,थंड व त्रिदोष शामक असते.

    आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:

    १)पिकलेल्या फळाचा मगज साखर घालून खाल्ल्यास वाढलेले पित्त कमी होते.

    २)अन्न सेवनाची इच्छा नसल्यास २ चमचे कवठाचा गर हा सुंठ मिरी व पिंपळी चुर्ण एकत्रित पणे १/२ चमचा,१ चमचा मध,१ चमचा साखर घालून खावा.

    ३)कोरडा खोकला येत असल्यास कवठाचा गर जुना गुळ घालून खावा.

    ४)पोटात भुक असणे पण तोंडास रूची नसणे ह्यात कवठाची गुळ घातलेली चटणी १-३ चमचे खावे व लगेच जेवावे.

    ५)उचकी वारंवार लागत असल्यास कवठाचा कोळ व गुळ हे चाटण चाटून खावा.

    ६)थुकीतून रक्त पडणे आवळकाठी चुर्ण १ चमचा,१ चमचा कवठाचा गर ,१चमचा मध हे मिश्रण घेतल्यास उत्तम लाभ मिळतो.

    कवठाचे फळ अतिमात्रेत खाल्ल्यास बद्धकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकोणसाठ

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 15-पुष्प तिसरे

    फुल हा नाजूक आणि नाशीवंत अवयव ! त्याचे आयुष्यही एखाद्या दिवसाचेच!!! त्यामुळे फूल टिकणेही कठीण. टिकवणेही कठीण. पण त्यापासून मिळणारा मध मात्र टिकतो.

    फुले देवाला वाहाताना देठ काढून वाहतात. जे द्यायचे ते उत्तम गुणाचे. जसे देहाला तसेच देवाला. आपणही अन्नाचा दर्जा, प्रत, पाहूनच माल खरेदी करतो. धान्य निवडतो, त्यावर संस्कार करतो, निवडणे, आसडणे, पाखडणे, घोळणे, चाळणे, धुणे, सुकवणे, वाळवणे, चिरणे, खोवणे, तळणे, भाजणे, उकडणे, वाफवणे, शिजवणे, परतणे, इ.इ. यापैकी कोणता तरी संस्कार करतो आणि नंतरच वापरतो. हा फरक आहे पशु पक्षी आणि मानवामधील. जी बुद्धी आहे, ती वापरली तरच पचन सुलभ होते.

    देवाला देताना सुद्धा जे जांगले असेल तेच द्यावे. देवाला दिलेले परत आपल्याकडेच येत असते. न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार देवाला नैवेद्य उत्तम पदार्थांचा दाखवला तर तो परत आपल्याचकडे येणार आहे. कारण तो नैवेद्य प्रसाद म्हणून आपणच सेवन करणार असतो.

    फुले सुद्धा निवडूनच अर्पण करावीत. किडकी, शिळी, मनात राग ठेवून ओरबाडलेली फुले देवाला सुद्धा चालत नाहीत.

    फुले, पाने, ओरबाडायची तर नसतातच, पण तोडायची पण नसतात, तर खुडायची असतात. खुडणे हा संस्कार फक्त फुलांसाठी. खुडताना नखांचा वापर केला जातो. तोडण्यासाठी बोटे वापरली जातात. ( आणि माणसे तोडण्यासाठी शब्द !) डोलणारे फूल एकदा फांदीवरून तोडले की फांदीपासून कायमचेच वेगळे होत असते. ते परत जोडता येत नाही. ( माणसांचे मात्र तसे नाही. "क्षमस्व" मनापासून म्हटले तर तोडलेली नाजूक माणसे देखील जोडली जातात. पण मनापासून साॅरी म्हणायला आलं पाहिजे. काही माणसांना मनापासून "साॅरी" सुद्धा म्हणता येत नाही. तोंडदेखलेपणाने "साॅरी" म्हणतात, हे मोठ्या मनाने ऐकून घेणाऱ्याच्या सहज लक्षात येते. समर्थांनी नमस्कार करण्याचे फायदे दासबोधातील एका समासामधे छान वर्णन केलेले आहेत. असो ! )

    फुल खुडताना अगदी हलकेच खुडायचे असते. नखांनी हळुवारपणे खुडायचे असते. फांदी, पान यांना अजिबात धक्का न लावता. खुडल्यामुळे फुलांच्या देठातील रस आपल्या नखात शिरत असतो. मेंदी लावल्यावर कसं नख रंगतं, म्हणजे मेंदीचा रस जर नखातून आरपार जिरतो तर फुलांचा रस देखील नखातून शरीरात जातो. (दोन्ही हातांची नखे एकमेकांवर घासली असता केसांचं आरोग्य चांगलं राहाते, असे प.पू. स्वामी रामदेवबाबा म्हणतात.) म्हणजेच नखे हा देखील शरीरात औषध देण्याचा एक मार्ग आहे. व्यवहारात हे लक्षात येत नाही.

    वेगवेगळ्या फुलामधे वेगवेगळे अर्क असणार, वेगवेगळी फुले खुडली की, ते सर्व प्रकारचे अर्क आपल्या नखातून शरीरात शोषले जाणार. शरीराच्या दृष्टीने काही उपयोगी असतील काही निरूपयोगी. ते शरीर ठरवेल. आपलं काम शरीरात अन्न पोचवणे ! त्यातून काय निर्माण करायचं, कसं निर्माण करायचं, किती टाकायचं किती वापरायचं, हे तो ठरवेल ! आपण आपलं नेहेमीचं काम, धर्म म्हणून करावं. फळाची अपेक्षा न ठेवता ! फळ तर मिळणारच असते. हाच तर त्याचा नियम आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    08.06.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग दहा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार

    जगण्यासाठी औषध काम करत नाही.

    काही गोष्टी आपण गृहीत धरतो, जसे एकदा रक्तदाब वाढला म्हणजे तो रोग मला झाला, एकदा कधीतरी रक्तात साखर मिळाली म्हणजे मला डायबेटीस झाला, एकदा रिपोर्ट मधे कोलेस्टेरॉल वाढलेले दिसले, आता जेवणातले तेल तूप नारळ शेंगदाणे बंद करायला हवेत. असंही नाही.

    काही जणांना मात्र उगाचच औषधे घेण्याची हौस असते, किंवा मी औषधांशिवाय जगूच शकणार नाही अशी भीतीदेखील असते. आणि औषधे सुरू केली जातात. ही औषधे घेतली की मी बरा राहीन, आता मला काही होणार नाही, अशी भाबडी आशा असते.

    कायमस्वरुपी औषध ही संकल्पना आयुर्वेदात नाही. जेव्हा रोग तेव्हा औषध. नाहीतर कशाला हवंय औषध ? रोग वाढू नये याकरीता औषध, रोग होऊ नये यासाठी औषध, प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी औषध, रक्तवाढीसाठी औषध, कॅल्शियम सप्लीमेंटसाठी औषध, फूड सप्लीमेंटच्या नावाखाली औषधं हे केवळ बिझनेस फंडे आहेत, हे लक्षात घ्यावे.

    ताप आला तर औषध जरूर घ्यावे. ताप येऊ नये यासाठी औषध घ्यायचे नसते. तसे चक्कर वगैरे येत असेल तर औषधांचा विचार करावा, पण चक्कर येऊ नये यासाठी चक्क औषधे ? रोग वाढला तर, हा भविष्याचा विचार अस्वस्थ करतो आणि भीतीपोटी कायमचे औषध सुरू होते.

    औषध कसे असावे, यासाठी ग्रंथात एक प्रमाण दिले आहे. अल्पमोली बहुगुणी असावे. एका औषधाने दुसरा रोग निर्माण होऊ नये, किंवा एका औषधाचे दुष्परिणाम होऊ नयेत, याकरीता दुसरे, त्यासाठी तिसरे, चौथे औषध घ्यावे लागू नये.

    एखादे औषध डोकेदुखीसाठी जरी घेतले तरी जाते पोटातच ! पोटात गेल्यावर फक्त जिथे डोके दुखते, त्या डोक्यामधेच ते जाते का ? नाही. सर्व रक्तात ते औषध मिसळून जाते. एखाद्या अवयवाला ठीक करण्यासाठी अन्य पाच सहा निरोगी अवयवांना आपण जास्ती कामाला लावत नाही का ?

    ही औषधे शरीरातून बऱ्या बोलाने बाहेर पडतंच नाहीत. येतो तो मुक्कामीच येत असतो. आतडी, किडनी, यकृत, डोळे अशा नाजुक अवयवांना नाहक हा कचरा साठवून ठेवावा लागतो.

    आपले संविधान असे म्हणते, शंभर आरोपी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला शिक्षा होता नये. इथे तर सगळं उलटंच चाललेलं आहे. एका दोषी अवयवाला निर्दोष करण्यासाठी बाकी सर्व अवयवांना जणु काही वेठीला धरले जातंय, त्यांच्यावर अन्याय करीत, एखाद्या अवयवाला सांभाळण्याची कसरत केली जातेय. बरं इथे जनरली प्रत्येक अवयव प्रत्येक डाॅक्टरने वाटून घेतलेले. प्रत्येक तज्ञ धडपडतोय, माझ्या अवयवाचाच मी विचार करणार ! बाकीचं तुमचं तुम्ही बघा !

    कुणी कुणाचे नाही राजा,
    कुणी कुणाचे नाही.
    लळा जिव्हाळा शब्दच खोटे.

    पण शरीरातील अवयव जन्मापासूनच एकमेकांशी रक्ताने बांधलेले आहेत म्हणून काय कोण जाणे, पण हे सर्व अवयव एकमेकांना स्वतःच जीव धोक्यात घालून, त्यांच्यावरील हा औषधांचा मूक अत्याचार दूर करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावीत असतात.

    हे डाॅक्टरांचे नशीब !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    19.04.2017

  • आहारातील बदल-शाकाहार भाग १३

    सगळं चाललंय ते टीचभर पोटासाठी.
    काय शाकाहार, काय मांसाहार
    काय असेल ते खाऊन घ्या गपचुप.
    शेवटी पोट भरण्याशी मतलब ना !

    सगळं खरं आहे, पण जी बुद्धी नावाची चीज दिली आहे ती कशासाठी ? त्याचा वापर कधी करणार ?

    हिंदु भारतीय संस्कृती प्रमाणे या बुद्धीचा वापर आपले आयुष्य शतायुषी होण्यासाठी करायचा आहे. त्यासाठी रोगप्रतिकार क्षमता वाढवायची आहे. त्यासाठी सण साजरे करायचे आहेत, ते सुद्धा संस्कृतीमध्ये सांगितले आहेत तसे, बुद्धी वापरून.
    सणांची रचना ही ऋतुनुसार केली आहे. मराठी महिन्यानुसार केली आहे.

    आद्य शंकराचार्यांनी सर्वसामान्य माणसांना निरोगी जगणे सोपे व्हावे, यासाठी काही कर्मकांडे घालून दिली. या प्रत्येक कर्मकांडाचा थेट संबंध आरोग्याशी आहे. प्रत्येक हिंदु सणामधे काहीनाकाही गोडधोड केले जाते. सर्व पदार्थ शाकाहारीच असतात. अगदी क्वचित ते सुद्धा कुळानुसार, प्रदेशानुसार देवतेनुसार मांसाहाराचा नेवैद्य असेल,

    प्रत्येक सण साजरे करण्यामध्ये जे आरोग्य दडलेले आहे, ते बुद्धीने शोधले को सापडते.

    आता हेच पहा ना, आजच्या नरकचतुर्दशीला दिवसाची सुरवात करायची तीच सातीवण नावाच्या औषधी झाडाच्या सालीचा रस पिऊन.
    चुकलं.
    प्रत्येक झाड हे औषधीच असते. झाडाच्या मागे औषधी असे विशेषण लावण्याची पण आवश्यकता नाही. किंबहुना जगात जे म्हणून द्रव्य स्वरूपात आहे, ते सर्व माणसासाठी, शतायुषी होण्यासाठी, औषधीसाठी वापरता येऊ शकते.

    तर आजच्या दिवशी या सातवीण वृक्षाच्या सालीला फार महत्व आहे. या वृक्षाला नमस्कार करून, दिवा लावून, प्रदक्षिणा घालून, प्रार्थना करून काही साल काढून, वाटून रस काढताना त्यामधे, सैंधव, जिरे, ओवा, मिरी, लिंबाचा रस घालून घ्यायचा प्रघात आहे. यामुळे दिवाळीचा फराळ अघळपघळ झाला तरी फार काळजी नसते. हा फराळ सहज पचून जातो. आज हा रस घ्यावाच !

    "हे, ईश्वरी अंशाने आणि औषधी गुणाने युक्त असलेल्या वृक्षदेवते, आज तुझ्या औषधी गुणाचा आम्हा मनुष्याला फायदा व्हावा, यासाठी तुझ्या सालीचा काही भाग आम्ही निःस्वार्थ भावनेने, औषधी रूपात करणार आहोत, त्यासाठी तू तुझ्या सर्व औषधी गुणांनी युक्त होऊन आमच्यावर कृपा कर. औषधासाठी का होईना, तुझ्या अंगावर आम्हा वैद्यांना शस्त्र वापरावे लागत आहे, यासाठी तू आम्हाला क्षमा कर."

    केवढा अर्थ भरला आहे या प्रार्थनेत !
    प्रार्थनेत शक्ती असते.
    जशी प्रार्थना असते, तसे फळ मिळते.
    प्रार्थना जेवढी भावपूर्ण होते, तेवढा गुण जास्त येतो.

    अखिल मानवाच्या कल्याणासाठी, कोणत्याही अपेक्षांशिवाय, आपल्या औषधी अंगाचा वापर मुक्तपणे करू देणाऱ्या या वृक्षदेवतांप्रती, या निमित्ताने शतशः नमन !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    29.10.2016

  • नैवेद्य भाग ७

    नैवेद्य दाखवताना शरीर आणि मन शुद्ध हवे, हेच खरं. भाव महत्वाचा !

    जेवणाला सुरवात करताना दारात आलेल्या याचकाला कधीही उपाशी, विन्मुख पाठवू नये. त्याला यथाशक्ती जे असेल ते द्यावे. इथे अतिथीची कधीही जातपात बघीतली जात नाही हे विशेष ! ही संस्कृती !

    आपल्याला वाढलेल्या अन्नातून सर्व पदार्थांचा मिळून एक घास होईल एवढे अन्न काढून बाजूला ठेवावे. हा घास गोमातेसाठी असतो. याला गोग्रास असे म्हणतात.
    ( आता काही जणांना गाईला माता म्हणण्यावरच आक्षेप असतो, त्यांनी काय करावे ? जसा संकल्प तसे फळ मिळते. असो.)

    घरातील कुत्रा, मांजर, पोपट, गाय बैल, इ.पाळीव प्राणी यांना प्रथम एक घास भोजन द्यावे.
    एवढेच नव्हे तर कावळ्याला सुद्धा घास बाहेर नेऊन ठेवावा.

    आणि भोजन संपल्यावर एक घास, संस्कार न होता मृत झालेल्या पितरांच्या नावे ताटाबाहेर ठेवावा. आपल्या पूर्वजांनी, आपण पोट भरत असताना इतरांचाही किती सूक्ष्मरीत्या विचार केला आहे ना !

    पान वाढायला सुरवात केली की त्रिसुपर्ण नावाचे अन्नाची, अग्नीची स्तुती करणारे एक स्तोत्र आहे, ते म्हणावे. येत नसल्यास अन्नपूर्णा स्तोत्र म्हणावे, तेही येत नसल्यास एखादा श्लोक म्हणावा. किंवा नामस्मरण करावे.

    सज्जनगडी भोजनप्रसादासाठी बसल्यावर श्रीराम जयराम जयजय राम असा मंत्र म्हणवून घेतात. राम नामाने विषहरण होते. म्हणून भोलेनाथांनीपण जो जप केला तो करावा. ( कदाचित ) प्रत्यक्ष अन्नामधील विष नष्ट होणार नाही, पण मनातील विचारांचे विष मात्र नक्कीच कमी होते, असा अनुभव आहे.

    मंत्र म्हणत असताना वातावरण सात्विक होत जाते. मनातील रज, तम दोष नाहीसे होत जातात, हे सेवन केले जाणारे अन्न मला शतायुषी निरोगी बनविणारे आहे, असा संकल्प करावा.

    कालानुरूप या अन्नामधे निर्माण झालेले दोष, देवाच्या नामस्मरणाने आणि आपण केलेल्या संकल्पाने नाहीसे होतात आणि अन्न शुद्घ होते. असा भाव मनात आणावा. म्हणजे जे दोष आपण टाळू शकत नाही त्याची तीव्रता कमी होते.

    काहीजणांना ग्रंथात जसे वर्णन केले आहे, तसे शास्त्रोक्त भोजन मिळणे, योग्य वेळी मिळणे, सहा चवींच्या सर्व गुणांनी संपन्न मिळणे, योग्य व्यक्तीने उजव्या हातानेच गरमगरम वाढणे, दुरापास्त आहे. अशांनी काय करावे, यासाठी संकल्प करावा. कालानुरूप बदल म्हणजे हे असे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    13.09.2016

  • जटामांसी

    जटामांसीचे सरळ वाढणारे ०.५-१ मी उंचीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे मुळ १०-१२० सेंमी लांब असून त्यावर जटाकार केस असतात.ह्याची पाने मुलीय व काण्डीय असतात.फुले गुलाबी वा निळ्या रंगाची गुच्छात उगवतात.फळ ०.४ सेंमी लांब असून पांढरी लव असलेले असते.मुळांवरील पाने वाळून पडतात व त्यावर शिल्लक असणारे बळकट,तांबूस तपकिरी रंगाचे केस युक्त गाठी रहातात ज्यांना जटा म्हणतात.

    जटामांसीचे गुणधर्म आता आपण जाणून घेऊयात:

    हि चवीला कडू,तुरट,गोड असून थंड गुणाची व हल्की,स्निग्ध असते.हि प्रभावाने मानसदोष कमी करते.

    आता आपण जटामांसीचे काही औषधी उपयोग जाणून घेऊयात:

    १)जटामांसी थंड असल्याने पाण्यात वाटून हिचा लेप लावल्यास दाह कमी होतो.

    २)घामाच्या दुर्गंधीमध्ये जटामांसीचा लेप शरीरावर करावा.

    ३)जटामांसी चवीला तुरट व थंड असल्याने केसांची मुळे बळकट करते तसेच सुगंधी असल्याने केश्य म्हणून तेलात वापरतात.

    ४)जटामांसी निद्राजनन असल्याने झोपेच्या तक्रारींवर उपयुक्त आहे.

    ५)जटामांसी चवीला कडू व हल्की असल्याने गर्भाशय शुद्ध करते व मासिक पाळी नियमीत करते.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • जेवणाची बैठक कोणती ?भाग २

    पुरूषांनी दोन्ही पाय दुमडून जेवायला बसायचे. तर महिलांनी ?
    त्यांनी जेवायला बसताना दोन्ही पाय दुमडून उकीडवे बसायचे नाही. तर उजवा पाय गुडघ्यातून आडवा दुमडून घेत, जमिनीला समांतर ठेवत, त्याच्यावर डावा पाय उभा दुमडून पोटाकडे घेत जेवायला बसावे.

    आजही अनेक घरातील आज्ज्या याच पद्धतीने बसतात. केवळ जेवायलाच नव्हे तर केव्हाही. बसायचं म्हटलं की, उजव्या पायाची मांडी घालून डावा पाय गुडघ्यातून दुडुन काटकोनात सरळ. आणि पुनः डाव्या हाताने डावा उभा पाय घट्ट आवळून धरायचा.

    मग ते वाती वळायला असो, किंवा दळण दळायला, तांदुळ निवडायला असो वा भाजी नीट करायला, मुलांचा अभ्यास घ्यायला असो वा नामजप करायला, धार्मिक कार्य असो वा वो चार दिन !
    आसन मांडी एकच.

    आज वागणंच एवढं सैल झालं आहे की,
    " बसणं जरा सैल केलं, तर काय एवढं बिघडलं ? " असं, फक्त मांड्या घट्ट आवळून घेणारी (काही वेळा तर पायाकडील रक्तपुरवठाच कमी करणारी ) टाईट्ट जीन्स घालून, खुर्चीवर बसून, पाय अधांतरी हलवत, शरीराला झुलवत विचारणार्‍या, काही कमी नाहीत.

    स्त्री पुरूष समानतेच्या काळात असं लिहिणं आणि विचार करणं देखील समस्त स्त्री वर्गावर अन्याय्य आहे, समस्त स्त्री वर्गाला आणि पुरोगामी महाराष्ट्राला हे अपमानास्पद आहे. तीव्र शब्दात आम्ही याचा निषेध करतो. असं म्हणणाऱ्यांनी फक्त एक दोन गोष्टींचा जरूर विचार करावा, की,
    गेल्या तीस चाळीस वर्षांत स्त्रीयांची जाडी, पुरूषांच्या तुलनेत, वाढली की कमी झाली ? आणि,
    स्त्रीविशिष्ट आजार वाढले की कमी झाले ?

    ......नक्कीच वाढलेले आहेत.
    .....जाडी वाढलेली आहे.
    ... .वागण्यातला सैलपणा ( की सैराटपणा ? ) वाढलेला आहे.

    आसन मांडी बदलणे, हे त्यातील एक कारण असावे.

    असं घट्ट बसल्याने गर्भाशय, मूत्राशय, पक्वाशय, डावी किडनी, डिसेंडींग कोलोन, स्वादुपिंड, प्लीहा, आमाशय, ह्रदय, डावे फुफ्फुस आणि पूर्ण पाठीचा कणा हे सगळं पोट, आतून एवढं आवळून घेतलं जाई, की, पोटाची काय हिम्मत होईल, .... बाहेर यायची ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    18.09.2016

  • आजचा आरोग्य विचार – भाग दोन

    हल्ली लवकर उठणे विसरायलाच झालं आहे. लवकर उठून करायचंय तरी काय, हे विचारणारी नवीन पिढी ! त्या पिढीला शिकवण्यासाठीच दीपावलीसारखा सण आमच्या संस्कृतीने आम्हाला दिला. अभ्यंग स्नान कसे करावे हे आम्हाला शिकवले.