आजच्या भाषेत बाजारी टिकावू खाद्यान्न, बेकरी फूड, हाॅटेलचे खाद्य, डबाबंद खाद्यपदार्थ, अर्धतयार अन्न, म्हणजे अगदी स्पष्टच सांगायचं तर किंडर, जेम्स सारखी चाॅकलेटस्, लेज, कुरकुरे, दो मिनट नूडल्स, पेप्सीकोक, मॅक आणि पिझ्झा हट्टचे अन्न इ.इ. हे सर्व तयार करताना कसली तेलं, पीठं पाणी वापरतात, कसं समजणार ? हे सर्व परान्न.
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे अठरा
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
निरोगी रहाण्यासाठीचे हे पथ्यापथ्य मोजक्या दिवसासाठी नसून कायम स्वरूपी आहे, हे लक्षात घ्यावे.
आपण नेहमी निरोगी राहण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ते सोडून आमच्या धारणाच आम्ही बदलून टाकल्या आहेत. आयुष्य हे अनमोल आहे, हे विसरून आयुष्य हे चुलीवरच्या कांद्यापोह्या एवढे स्वस्त करून टाकले आहे. गॅसपेक्षा चुलीवरचे जरा खमंग लागतात, एवढेच काय ते !
निरोगी रहाण्यासाठी अमुक पथ्य पाळा, असे सांगितले की, रुग्णाच्या कपाळावर डाव्या कानापासून उजव्या कानापर्यंत आठ्याच आठ्या दिसू लागतात.
बंधनात रहायला कुणालाच आवडत नाही. आणि जर ते बंधन दुसऱ्याने घातलेले असेल तर अजिबात नकोसे वाटते.
मी मला हवे तसे वागेन, मला कोण अडवणार ? अशा बेगुमान मनाला लगाम तर हवाच. हा लगाम आप्तांनी घातला तर त्याला तप म्हणतात. आई वडीलांनी सांगितले तर शिस्त म्हणतात, आणि डाॅक्टरनी सांगितले तर पथ्य म्हणतात. आणि दुसऱ्या कुणीतरी सांगण्यापेक्षा स्वतःचे स्वतःला आवरणे आणि सावरणे आवश्यक आहे.याला संयम म्हणतात.
हे कुणा दुसऱ्यासाठी नसून स्वतःच्या भल्यासाठी आहे, एवढे तरी लक्षात ठेवावे. शरीर मन आणि आत्मा या तिघांच्या चिरंतर कल्याणासाठी हे करावेच लागेल.
पहिल्या ओळीतील हितकर असा आहार विहार हा शरीरासाठी. दुसरी तिसरी ओळ मनावरील संयमासाठी आणि चौथी ओळ आत्मरक्षणासाठी आहे. हे भान असावे. असे ग्रंथकार सांगतात.
या संयमाची सवय पहिल्यापासूनच लावून घेतली तर लागते. संयम आतून यावा लागतो. संयम येण्यासाठी मनाला मुरड कशी घालावी, आवर कसा घालावा, हे समर्ध रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकात लिहून ठेवले आहे.
मना वासना दुष्ट कामा नये रे,
मना सर्वथा पापबुद्धी नको रे ।
मना धर्मता नीती सोडू नको हो,
मना अंतरी सार विचार राहो ।।
संत असो वा आप्त. सर्वजण आतून एकच विचार करीत असतात, हेच यावरून सिद्ध होते. आयुष्य असो वा आरोग्य. ते नीट सांभाळायचे असेल तर काही पथ्य तर करावेच लागणार.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
०७.०८.२०१७
हे परमेश्वरा, मला या जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे. यासाठी मला तू अंतिम सत्य सांग. मला एवढे कळते आहे, की माझे अंतिम सत्य तूच आहेस. तरीदेखील माझी बुद्धी मला वेळोवेळी तुझ्यापासून लांब नेते. माझ्या बुद्धीला तू स्थिर बनव.
आजच्या काळातील एक जोरदार चर्चा सुरू असलेला एक विषय. आहारातील बदल चांगले की वाईट ?
कोणासाठी कसा आहार असावा, याचे काय काय नियम आहेत हे तारतम्याने ठरवायचे असतात.
वाॅटसपवर अनेक लोकाचे अनेक आहार सल्ले येत असतात. निसर्गोपचार, घरगुती आहार सल्ले, अनुभविक उपचार, आजीबाईचा बटवा, लेखाखाली स्वतःचेच नाव असलेले, दुसर्याच्या नावावरील लेख तिसर्याच नावाने खपवलेले, अनेक विरोधाभास असलेले सल्ले आपल्याला वाचायला मिळत असतात. त्यातील खरेखोटेपणा शोधायला तेवढा वेळही नसतो.म्हणून काही नियम गृहीत धरावे लागतात.
आपला पारंपारिक आहार कधीही बदलू नये.
जो आहार आपल्या पणजी पणजोबा, आजी आजोबा, आई बाबांनी घेतलेला आहे, तोच आहार आपल्यासाठी योग्य असतो. त्यांनी तो तेथील परिस्थिती, उपलब्धता, आवश्यकता, गरज, प्रकृती, विचार, इ. गोष्टी विचारात घेतलेल्या असतील.
आपले पूर्वज खूप हुशार होते, ज्ञानी होते, सूक्ष्मातील जाणणारे होते. प्रत्यक्ष कृती करणारे होते. केवळ वाचाळवीर आणि आरंभशूर नव्हते.
सांगे वडिलांची किर्ती, तो एक मूर्ख. असे समर्थांनी सांगून सुद्धा तो दोष मी स्विकारतो.
अनुभवाच्या आधारे जीवन जगायची एक आदर्श पद्धत त्यांनी निर्माण केली होती. खरं सांगायचं तर शास्त्र निर्माण करत गेले. अनुभवाच्या जोरावर, प्रायोगिकता वापरत, भविष्याचा वेध घेत जगायचं कसं हे पुढील पिढीला प्रत्यक्ष शिकवित गेले. आचरणात आणत गेले. त्याची पुढील पिढी त्यात ज्ञानाची आणखी भर टाकत गेली. अनुभव जोडत गेली. अनावश्यक गोष्टी काढत गेली, काही वेळा कालानुरूप बदलतही गेली. नवीन सिद्धांत तयार करत गेली. नवीन बदलाला समोरी गेली. मूळ तत्व न सोडता, होणारे बदल मान्य करत गेली. नवीन गोष्टींना मान्यता देत गेली.
यालाच सनातन म्हणतात. नित्य नूतन सनातन !
म्हणून तर हजारो वर्षे झाली तरी वैशिष्ट्यपूर्ण असलेली भारतीय संस्कृती अजून ही जिवंत आहे. केवळ कागदी घोडे न बनता, कृतीच्या स्तरावर बदल मान्य करत गेलेली आधीची वडील पिढी.
आता हेच पहा ना, अगदी आपल्या लक्षात येतील असे आपल्या डोळ्यासमोर झालेले आहारातील काही बदल आपल्या आधीच्या वडील पिढीने मान्य केलेच ना !
दोन पिढ्यांपूर्वी न्याहारीच्या वेळी फक्त कोंड्याची भाकरी आणि पेज जेवून रहाणार्या या पिढीने उपमा आणि पोहे स्विकारले.
त्या पुढच्या पिढीने थालीपीठ, आंबोळी, डोसा पण स्विकारला, वडा भजी ऊसळ मिसळ पण पचवली. आवडीने आणि चवीने खाण्याची चटक वाढत गेली.
आणि अगदी आताची पिढी पिझ्झा बर्गर पनीर बटरच्या बदलाला सामोरी जातेय.
परिवर्तन , बदल ही काळाची गरज असते. युक्ती वापरून त्यातील योग्य अयोग्य ठरवणे हे आपल्याच हातात असते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
22.09.2016
हि भाजी तशी आपल्या सर्वांच्या परिचयाची व ब-याच लोकांना आवडणारी.तोंडलीची चटणी,भाजी,उसळ,लोणचे असे अनेक प्रकार करून हिचा आस्वाद आपण सगळेजण घेत असतो.दिसायला छोटी असली तरी हि भयंकर रुचकर भाजी आहे.
हि तोंडली वेलीला लागते.अर्थात हे त्या वेलींचे फळ होय.हि कडू व गोड अशा दोन प्रकारामध्ये उपलब्ध असते त्यातील कडू हि औषधात वापरतात तर गोड तोंडली स्वयंपाकामध्ये वापरतात.
कच्ची तोंडली हि हिरवी असतात तर पिकलेले तोंडली हि आतून लाल असते.जसे ह्याचा वापर आपण स्वयंपाकामध्ये करतो तसाच ह्याचा उपयोग घरगुती उपचारांमध्ये देखील होतो.
पिकलेले तोंडले हे चवीला आंबट व उष्ण असते व ते वात व कफ कमी करते व पित्त वाढविते.तर कच्चे तोंडले हे चवीला गोड तुरट असते व ते थंड असून शरीरातील कफ व पित्त कमी करते व वात दोष वाढविते.
आता ह्याचे घरगुती औषधी उपयोग पाहूयात:
१)तोंड आले असता कच्चे तोंडले चावून खावे.
२)बाळंतिणीचे दूध वाढायला तिला तोंडली उकडून गरम मसाला न वापरतां भाजी करून द्यावी.
३)अम्लपित्तामध्ये तोंडलीची कोवळी भाजी उकडून धणे,बडीशेप व सुंठ घालून खावी.
४)खोकला येत असल्यास ४ तोंडली ४ कप पाण्यात उकळावी व ते पाणी १ कप करावे व त्यात १/२ चमचा भाजलेला ओवा,१/२ चमचा हळद व १/४ चमचा काळी मिरी पूड घालून ते पाणी प्यावे.
५)तोंडाला चव नसेल व जीभेवर देखील मळ साचला असेल तेव्हा कच्ची तोंडली व मीठ हे मिश्रण चावून रस व चोथा थुंकावा.
६)मधुमेह असणा-या व्यक्तिंनी तोंडलीची भाजी हळदींची फोडणी देऊन खावी.
तोंडली खाण्याचा अतिरेक केल्यास पोटात वात धरतो व संडासला खडे होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
जव हे धान्य प्रामुख्याने क्षुद्रधान्या मध्ये समाविष्ट होते. तसेच ह्याचा वापर आपल्या दैनंदिन आहारात आपण जास्त करताना आढळत नाही कारण तसे हे धान्य कोकण गोवा प्रांतात फारसे प्रचलित नाही.
तरी देखील हे अत्यंत पौष्टीक, त्यामानाने स्वस्त असे धान्य असल्याने ह्याचा वापर जर आपण आपल्या आहारा मध्ये केला तर त्याचा फायदा आपल्या आरोग्यास व शरीरास नक्कीच होऊ शकेल ह्यात शंका नाही.
डायबेटिस असणाऱ्या व्यक्तिंना तर जव हे एक वरदान आहे त्यामुळेच प्रमेही रूग्णाने आपल्या आहारात जवाचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा रक्तगक साखर नियंत्रित करायला व प्रमेह आटोक्यात ठेवायला नक्की होऊ शकतो. चला तर मग आपण जवाचे गुणधर्म पाहुयात: जव चवीला गोड, तुरट, थंड, रूक्ष, पचायला हल्के, वातकर, कफ पित्त नाशक असून, मल वाढविणारा, तसेच चरबी कमी करणारा, मेघा, बुद्धी, शरीर बल वाढविणारा आहे.
आता आपण जवा पासून तयार केलेल्या पदार्थांचे गुणधर्म पाहुया:
१) मंड:
हा पचायला हल्का, कफपित्तनाशक, वातुळ, घशाला हितकर, रक्त शुध्दीकर आहे.
२) मंथ:
चवीला गोड, थंड, वर्ण सुधारणारा,बलवर्धक, पुष्टीकर, स्थैर्यकर, पित्तनाशक, दाह, तहान, श्रम ह्यांचा नाश करणारा, उल्टी होत असल्यास ती कमी करायला मदत करतो.
३) रोटी:
चवीला गोड, हल्की, वातकर, मल वाढविणारी, कफरोगात उपयुक्त, बलकारक, शुक्रवर्धक आहे.
जव खायचा अतिरेक केल्यास शरीरात वात वाढून त्याची लक्षणे दिसू लागतील.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
आता पर्यंत सुरू असलेले किचन क्लीनीक ह्या सदरातील हा शेवटचा लेख असून हे सदर ह्या शेवटच्या लेखाने पुर्ण होत आहे.मी आशा करते की हे सदर आपल्या सर्वांना नक्कीच उपयुक्त ठरले असेल.लवकरच पुन्हा भेटूया एक नवीन लेखमाला घेऊन.
तो पर्यंत तात्पुरता निरोप घेते.
धन्यवाद.
वैद्य स्वाती अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क: ९९६०६९९७०४
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 27-नैवेद्यम् समर्पयामी-भाग एक
आपल्यासाठी देवपूजेतील एक महत्वाचा उपचार म्हणजे नैवेद्य. कारण आपणाला निश्चितपणे माहिती असते, की जो नैवेद्योपचार आपण देवासाठी म्हणून करत आहोत, तो देवासाठी नसून, आपल्या देहासाठीच आहे. तो नैवेद्य नंतर आपणालाच खायला मिळणार आहे. मग तो गणपतीचा मोदक असो किंवा म्हसोबासाठीचा बोकड. नाव देवाचे खातो आपणच.
निवृत्तीनाथ इंदोरीकर एका किर्तनात म्हणतात,
"किती स्वार्थी आहोत आपण. 'बोकड देवासाठी' असं म्हणत देवाला काय देतात तर खूर. जो शिजत नाही. तो शिजला असता तर तोही दिला नसता, विठ्ठल विठ्ठल"
देवपूजा दिवसातून किती वेळा केली जाते ? दोन वेळा. सकाळी आणि सायंकाळी. दिवसभर देवपूजा असते का ? नाही. दोनवेळा देवपूजा तसे दोन वेळा नैवेद्य. इथे आरोग्य दडलेले आहे. दिवसभर चरत राहायचे नसते. जे काही खायचे ते दोन वेळा पोटभर हा महत्त्वाचा सिद्धांत इथे सांगितलेला आहे.
भारतीय परंपरांना आरोग्याच्या दृष्टीने किती महत्त्व आहे, ते इथे लक्षात येते. कारण अन्य कोणत्याही धर्मात अशी षोडशोपचार पूजा नाही, असे नैवेद्य नाहीत. अन्य चार पाच सण सोडले तर फार मोठे सण नाहीत. त्यामागे फार मोठे लाॅजिक नाही. जे सण म्हणून साजरे केले जातात, ते फक्त प्रेषितांच्या जयंत्या अथवा मयंत्या. किंवा त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे प्रसंग लक्षात ठेवण्यासाठी, त्यांचे कार्यकर्तृत्व स्मरणात रहावे यासाठी केलेली सोय असते. पुष्पगुच्छ किंवा बुके आणून ठेवला, मेणबत्ती पेटवली की, झालं. उपचार म्हणून नाही.
आज आमच्या हिंदू धर्मामधे देखील हे नुसते कर्मकांड उरले आहे. एखाद्या महामानवाच्या नावे जयंती किंवा पुण्यतिथीच्या निमित्ताने जुलुस, जलसा, डीजे, आणि पार्टी ! मग ते महामानव गांधी असोत वा आमचे आंबेडकर किंवा आमचेच सम्राट अशोक असोत, या महामानवांनी सांगितलेली तत्वे सोयीस्कर विसरवली जातात, आणि फक्त जातीचे राजकारण पसरवले जाते.
आणखीन दुर्दैव हेच आहे की प्रत्येकाने आपले झेंडे देखील वेगळे केलेत, रंग देखील वाटून घेतलेत, महापुरूष पण वाटून घेतलेत.
मोहनदास करमचंद गांधीचा आत्मा, ड्रायडेच्या निमित्ताने कुठेतरी म्हणत असेल "हेची फळ काय मम तपाला" ! मी आयुष्यभर काय सांगितले आणि माझे अनुयायी माझ्या नावाने काय करत आहेत ? माझे गुण जाऊदेत, अहिंसा जाऊदेत, सत्य जाऊदेत, माझ्याच नावाची टोपी घालून, मद्यपान करत, मांसाचाच चकणा भरताहेत. हे केवळ गांधीचे दुःख नाही तर सर्वच महामानवांचे दुःख आहे. असो.
षोडशोपचार पूजेचे हे वैशिष्ट्य फक्त हिंदू धर्मामध्येच. धर्मसूत्रे नीट अभ्यासली तर त्यामागे असलेले शास्त्र समजून घेतले तर ती अंधश्रद्धा, बुरसटलेले कालबाह्य विचार नसून, सुसंस्कृत जीवन जगण्याची एक आदर्श पद्धत आहे, असे लक्षात येते.
राजकारणातील काही स्वार्थी माणसांनी किंवा काही जातीयवादी माणसांनी राजकारण म्हणून या चालीरीतींवर टीका करायला सुरवात केली, आणि आमच्या मनात विकल्प यायला सुरवात झाली. एकेकाळी शिक्षण व्यवस्थेमधे असणारे सर्व हिंदू धर्मग्रंथ, मेकाॅलेच्या कुटनीतीला बळी पडून आमच्या शिक्षणातूनच गायब करण्यात आले. मूळ पायाच डळमळीत केला तर इमारत केव्हाही पडू शकते, या सिद्धांतानुसार, हिंदुंचे धर्मग्रंथ देवघरात फूल वाहून, पोथीरूपात बंद झाले. ते गेल्या पन्नास साठ वर्षात कधी उघडून, वाचून, आचरणात आणले गेले नाहीत, परिणामी धर्मग्रंथात काय सांगितले गेले होते, का सांगितले होते, त्याचे भावार्थ काय होते ?त्यात नेमके काय समजून घ्यायचे असते, ही दृष्टी नाहीशी झाल्यामुळे आम्हाला आमचेच धर्मग्रंथ म्हणजे जणुकाही पुराणातली वांगीच वाटू लागली. भीतीपोटी केवळ उपचार शिल्लक राहिले आणि उपचारामागील विज्ञान विसरले गेले. आणि फक्त कर्मकांड म्हणून आमचेच बुद्धिमान पंडीत आपल्याच धर्मग्रंथाची हेटाळणी करू लागले.
नैवेद्याचे रूपांतर पार्टी पर्यंत येऊन पोचले आहे, ही शोकांतिका आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.06.2017
ex - आय.व्ही.पी. हा स्पेशल एक्स-रे मूत्रपिंडाचा त्रास असणार्या बर्याच रुग्णांस माहीत आहे. या एक्स-रेमुळे मूत्रपिंडे कार्य करतात की नाही हे समजते.
एका गंभीर सुरात सर्वानी मिळून म्हटलेले हे मंत्रपुष्प, केवळ ऐकत असताना देखील अंगावर रोमांच उभे राहातात.
या प्रश्नाचे नेमकेपणाने उत्तर देणे कठीण आहे. दूष्यम् देशम् बलम् कालम् या सूत्रानुसार किमान दहा गोष्टींचा विचार, किमान दहा वेळा तरी करावा लागेल, तेव्हा कुठे हे “परम्युटेशन काॅम्बीनेशन ” थोडेफार जुळेल. हे दहा घटक जुळतील, असा ग्रंथोक्त आहार, एका घरात सुद्धा घेणे, असे जेवण रोज बनवणे शक्य होणारे नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti