(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रमुख आहारसूत्र – भाग ११

    आयुष्यभर औषधे घ्यावी लागू नयेत, असं प्रत्येकालाच वाटतं. पण त्यासाठी जे करावं लागतं ते करायची तयारी मात्र नसते.

    आणि असा समज करून दिला जातो, की एकदा डायबेटीस झाला की कायमचा चिकटला. ही निराशा मनातून काढून टाकली पाहिजे. हा आजार जर मनोशारिरीक असेल तर औषध फक्त शरीरात जाऊन काय करणार ? जर रोगाचे एक मूळ मनात असेल तर तिथपर्यंत पोचायला नको का ?
    मन कुठे आहे ते अजून माॅडर्न (?) मेडीसीनला समजलेलंच नाही. मन ह्रदयात आहे. आणि आज शोधलं जातंय मेंदूमधे. कसं सापडणार ?
    जाऊदे !

    प्रमेह होण्याचं मुख्य कारण दूध, दही, पाणी, अति, गोड, कफ वाढवणारे पदार्थ खाणे, हे तर आहेच पण यापेक्षादेखील खाल्लेलं पचवता न येणं किंवा पचवण्यासाठी काहीही कष्ट न करणे हे प्रमुख कारण आहे. मेहनत करा. म्हणजे मेह म्हणजे प्रमेह म्हणजे मधुमेह नत म्हणजे नाहीसा होईल.

    प्रमेह वाढण्याचं मुख्य कारण बदललेली जीवनशैली आहे. बैठे काम वाढलंय, सुखाचा अतिरेक झालाय. आम्ही खातोय खूप. खाऊन खाऊनच अशक्तपणा येतोय. मग पचवणार कधी ? त्यात कफ वाढवणारे सर्व पदार्थ निसर्गनियमाने मधुर रसाचे आणि पचायला जड असणारेच असतात.

    आमची वृत्तीच अशी झालीय की, आता दूध बंद करायचं, मग अशक्तपणा येणार, त्यासाठी परत टाॅनिक घ्यायला हवं. म्हणजे प्रत्येक वेळी आपण असा विचार करू लागलोय, की अमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय माझं रक्त वाढणारच नाहीये, तमुक पदार्थ खाल्ल्याशिवाय प्रोटीन्स मिळणारच नाहीत. कॅल्शियमसाठी हे खाल्लंच पाहिजे. ह्रदयासाठी हे, किडनीसाठी ते. असा विचार करणं योग्य नाही.

    शरीराचे तुकडे करून तपासणारी वैद्यकीय यंत्रणा कार्यरत असल्यावर प्रश्न पडतो. संपूर्ण शरीराचा, मन आत्मा, इंद्रियासह विचार कोण डाॅक्टर किंवा वैद्य कधी करणार ? पायाला काटा लागल्यावर डोळ्यातून पाणी येणारं आपलं शरीर, प्रत्येक डाॅक्टरनी शरीर असं काही वाटून घेतलं आहे की, काही वर्षांनी वरच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा आणि खालच्या कवळीचा डेंटिस्ट वेगळा शोधावा लागेल. उजवा डोळा एक जण तपासेल, तर डावा डोळा दुसराच !
    जोक अपार्ट. चिकित्सा करताना संपूर्ण शरीराचा विचार करावा, असं आयुर्वेद मानतो.

    एवढे व्हिटॅमिन्स हवेतच, एवढे कॅल्शियम हवेच, हे नियम बनवले की कायदे आले. कायदा बनला की, पुरावे आले. पुरावे दाखवायची वेळ आली तर मन कसं दाखवणार ? आणि इंद्रियांचं काय करणार ? मग त्याला कोण विचारणार ? त्याला म्हणजे आत्म्याला !

    आयुर्वेद शास्त्र शरीराचे असे तुकडे पाडून विचार करतच नाही. अखंड शरीर, मन, इंद्रिय आणि आत्म्यासह चिकित्सा करण्यासाठी घ्यावे, असे शास्त्रकार म्हणतात.

    ही प्राथमिक माहिती समजल्याशिवाय प्रमेहाविषयी आयुर्वेदात सांगितलेली सूत्रे नीट लक्षात येणार नाहीत, म्हणून हे आधी आणि परत परत सांगावे लागत आहे. कारण आज आरोग्य हे चौकटीतल्या नियमांना बांधले गेले आहे. रक्तदाब एवढाच पाहिजे. रक्तातील साखर एवढीच हवी. वजन एवढेच हवे, कॅल्शियम एवढे हवेच ! कमी पडत असेल तर सरळ लेबल चिकटवले जाते, तू रोगी !
    ....... आणि आयुर्वेद म्हणतो.....
    ........ इथे प्रत्येकाचे नियम वेगळे !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    27.01.2017

  • आहाररहस्य ५

    छान पंगत बसलेली आहे. जिलब्यांचा मस्त वास दरवळतो आहे. आवडीची मंडळी वाढायला अवतीभवती बागडताहेत,
    अशा वेळी जिलबी खाण्यावरून पैज लागते.

  • विडा घ्या हो नारायणा – भाग बारा

    सहा वेळा पान खाल्ल्यानंतर तोंडात जी लाळ तयार होते, ती गिळावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेळी केवळ चावून थुंकायचे आहे. आणि नंतरची लाळ येईल तेवढी सावकाश निर्माण करून गिळायची आहे.

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग नऊ

    आपली पचन प्रक्रिया कशी चालते, ही समजून घेण्यासाठी, हे क्रियाशारीर सोपे करून, ढोबळमानाने सांगण्याचा हा प्रयत्न आहे. वास्तवाशी याचा डिट्टो संबंध असेलच, असे नाही. आपल्याला कुठे लेखी परीक्षा द्यायची नाहीये.

    लाळेचे काम फक्त तोंडापुरतेच मर्यादित असते. नंतरची पचनाची जबाबदारी लाळेची नाही. मुळात अल्कलाईन नेचरची म्हणजे अल्कली ( क्षार ) गुणधर्म असलेली ही लाळ जेव्हा पोटात जाते, तेव्हा पोटात वाढलेल्या पित्ताला कमी करते आणि लाळेचे अस्तित्व संपते.

    म्हणजे जेवढी लाळ जास्त तेवढेच तोंडातून सुरू होणाऱ्या पचनाला मदत होते. म्हणून जेवढे चर्वण जास्त तेवढे पुढे पोटातील पचन सुलभ होते.

    भारतीय परंपरेमधे जेवणानंतर मुखशुद्धी खाल्ली जाते, ती याच कारणासाठी! घाई घाईने जेवताना, चावताना जी लाळ कमी पडते, त्याची पूर्तता या मुखवासाने पूर्ण केली जाते. मुखवास ही वेगळी टीप होईल. इथे फक्त उल्लेख आलाय म्हणून सांगितले.

    जेव्हा आपल्याला ताप येतो, तेव्हा तोंडाची चव निघून जाते, भूक कमी होते. या शरीराकडून निर्माण होणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहेत. ताप आल्यावर शरीरातील अग्निची स्थिती बदलते. कोष्ठातील अग्नी, कोष्ठ सोडून बहिर्गम होतो, तेव्हा भूक लागत नाही. अशावेळी जर आपण अन्न सेवन केले तर ते पचतच नाही. म्हणजेच ताप आल्यावर भूक न लागणे, ही शरीराकडून आपोआपच केली जाणारी प्रक्रिया पुढची गुंतागुंत टाळण्यासाठी केलेली एक प्रतिबंधात्मक उपाययोजनाच आहे.

    अशावेळी भूक नसताना जेवणे हे रोगाला निमंत्रण देणे असते. आयुर्वेदानुसार भूक लागणे हा एक वेग आहे. शरीराकडून केली जाणारी प्रक्रिया आहे. तिला वेळीच ओळखून सन्मानाने, आदर राखत न जेवणे हे हितकर असते. यालाच शास्त्रीय भाषेत, ज्वरादौ लंघनम् कुर्यात ! असे म्हटलेले आहे. म्हणजे तापाच्या सुरवातीला एखादा दिवस लंघन करावे. उदरगुहेचा द्वारपाल असलेल्या तोंडात जोपर्यंत लालास्राव निर्माण होत नाहीत, तोपर्यंत आतमधे कोणालाही सोडायचे नाही. आत (पोटा) मधे अग्नीची पुनः स्थापना झाली की, त्याच्याकडून संदेश येतो, "आता जेवायला हरकत नाही", तेव्हाच जेवावे. (प्रकृतीनुसार हे लंघन कसे करावे, हे बदलते असते. इथे वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा. )

    लाळ जेवढी गिळता येईल तेवढी गिळावी. काही जणांना खूपच लाळ सुटते, त्यांनी तुरट चवीचा वापर जेवणानंतर अवश्य करावा. झोपेत लाळ गळण्याचा संबंध कृमीशी असू शकतो, किंवा खून दमलेल्यामुळेदेखील जेव्हा झोप लागते, तेव्हा तोंडातून लाळ गळते, हा रोग नाही. केवळ दंतमंजन वापरले तरी हे लक्षण कमी होते.

    शरीराकडून काही प्रतिक्रिया या रोगसूचक असतात, तर काही नैमित्तिक असतात. जेवणानंतर तासाभरात ढेकर येणे स्वाभाविक असते. पण दिवसभर ढेकरा येणे हे पचन बिघडल्याचे लक्षण आहे.

    बोटाला जरा कुठेही जखम झाली की लहानपणी लगेच बोट तोंडात जायचे, त्याला लाळ लागायची, ओठांनी जखम दाबून धरली जायची आणि जखम बरी देखील व्हायची. सर्व प्राणीमात्र आपले शरीर जीभेने म्हणजे लाळेनेच स्वच्छ करतात.

    मी असं अजिबात म्हणत नाही की, आपणही आपले शरीर असेच चाटत बसावे. पण लाळेमधल्या या शक्तीवर अजून संशोधनाला वाव आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    24.03.2017

  • विडा घ्या हो नारायणा – भाग ९

    पान खाणे या प्रकारात, पानातील हे सर्व मिश्रण चावणे आणि चघळणे या दोन क्रिया महत्त्वाच्या !

    पान तोंडातल्या तोंडात घोळवल्याने जीभेला उत्तम व्यायाम होतो. वर खाली, डावीकडे उजवीकडे,व तिरपी जीभ वळल्याने जीभेला जोडले गेलेले सर्व छोटे मोठे स्नायु अगदी स्वरयंत्रापर्यंत, ताणले जातात. आणि शब्दोत्पत्तीला मदत होते. गळ्यापासून टाळूपर्यंत जीभेला फिरावेच लागते. टाळू शकतच नाही.

  • आहारसार भाग ८

    रासायनिक खतांच्या विषारी अवगुणांपासून आपली सुटका तर नाहीच.
    ती तर प्रत्येक अन्नामधे, भाज्यांमधे, साखरेमधे, दुधामधे, औषधांमधे, हवेमधे, आणि आता विचारांमधेदेखील आली आहे.

    गरज आहे ती शुद्धीकरणाची !
    अंतर्बाह्य शुद्धीकरण !
    अगदी प्रसन्न आत्मा इंद्रीय मनापर्यंत.

    जेवढे आपापल्या परिने शुद्ध रहाता येईल तेवढे रहायचे.
    जेवढे शक्य आहे तेवढे सर्व प्रयत्न मनापासून करून अशुद्धी बाहेर काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा.
    एवढंच आपल्या हाती.

    समुद्रासारखं व्हायचं.
    समुद्र आतमधे काहीही घाण सामावून घेणारच नाही. जे काही आत नको असेल, ते ते सर्व बाहेर किनारपट्टीवर आणून टाकायचे !

    अगदी अनावश्यक विचार सुद्धा !
    मनापासून केलं तर नक्कीच यश मिळते,

    खाताना जेवढे शुद्ध सात्विक खाता येईल तेवढे खायचे.
    म्हणून तर आपण अन्नावर वेगवेगळे संस्कार करतो, ते त्यातील विष निघून जाण्यासाठीच. !

    धान्यांच्या बाबतीत, वारवणे म्हणजे वारा देणे, निवडणे, आसडणे, पाखडणे, चाळणे, घोळणे, धुणे, हे झाले प्राथमिक शुद्धी संस्कार.
    नंतर चिरणे, कापणे, फोडणे, वाफवणे, उकडणे, शिजवणे, तळणे, परतणे, गाळणे, फुलवणे, फुगवणे, आंबवणे, भाजणे, बेक करणे, हे सर्व संस्कार आपण अन्नावर दररोज अगदी सहजपणे करत असतो.
    कशासाठी ?
    अन्न सहज पचावे, याकरता सोयीचे व्हावे म्हणून केलेले जाणारे हे शुद्धी संस्कार !

    प्रत्येक पदार्थातील विष वेगळे. त्यामुळे त्याची शुद्धी वेगळी. जसे मोहोरी धुण्यासाठी माझी आई मोहोरी पाण्यात घोळून धुवायची.
    एका मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन एक वाटी एका हातात, त्या पाण्यात धरून ती हलवत रहायची. दुसर्‍या हाताने मूठमूठ मोहोरी घेत त्या वाटीत वरून हलकेच सोडायची. म्हणजे मोहोरीतले बारीक दगड पाण्यात घोळल्यामुळे, वाटीत आपोआपच तळाला बसायचे. वरची शुद्ध मोहोरी पातेल्यात यायची. दगड वाटीत जमा व्हायचे.
    आणि नंतर पातेल्यातील मोहोरी वाळवायची.

    काही पदार्थांची शुद्धी होऊच शकत नाही, म्हणजे जर्सी गाईच्या दुधाची शुद्धी कशी करणार ?
    दूध ऊकळून किंवा सुंठ, आले मिरी बाळशेप इ. औषधे घालून देखील या दुधाची शुद्धी होणारच नाही. अशावेळी या पदार्थाना आपल्या आहारातून कायमचे हद्दपार करणे, हाच सर्वोत्तम उपाय ठरतो.

    अशी शुद्धी जर प्रत्येक पदार्थाची करायची ठरवले तर अन्नशुद्धी फार कठीण नाही.

    पण वेळच नाही हो, कसं जमणार, जागाच नाही, माहितीच नाही, आईने शिकवलेच नाही, करायचं कुणी, अश्या वैचारिक द्वंद्वात सतत राहिल्यामुळे आयुष्य कमी झालं तरी चालेल, पण हे असलं कालबाह्य काही करायची आमची मानसिक आणि शारिरीक तयारी नाही, असं म्हणून कसं चालेल ?

    कुछ (100 बरस ) पाने केलिए
    कुछ खोना पडता है !
    जिंदगी पाने केलिए
    गंदगी को हटाना जरूरी होता है !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    26.08.2016

  • छातीचा एक्स-रे

    छातीचा एक्स-रे

    आधुनिक विज्ञानात प्रतिमाशास्त्राने कितीही प्रगती केली तरी क्ष किरणांचे महत्व अजिबात कमी होणार नाही. कमी खर्चात भरपूर व सूक्ष्म माहिती देण्यात क्ष किरण शास्त्र समर्थ आहे आणि याचेच उत्तम उदाहरण म्हणजे छातीचा एक्स-रे. क्षुल्लक तक्रारीतही डॉक्टर रुग्णाला छातीचा एक्स-रे काढायला लावतात व यात डॉक्टरांची काहीही चूक नाही कारण छातीचा एक्स-रे म्हणजे रुग्णाच्या आरोग्याची कुंडलीच आहे.

  • जेवणाची योग्य वेळ कोणती ? भाग 9

    ऋतुनुसार, दिनमानानुसार सर्वसाधारणपणे सकाळी 6 ते 10 हा काल कफाचा, 10 ते 2 पित्ताचा आणि 2 ते 6 हा वाताचा काळ येतो. असेच सायंकाळ पासून सकाळ पर्यंत समजावे.

    जेवण हे भूक लागेल तेव्हा घ्यावे. भूक असेल तेवढेच घ्यावे. परंतु सूर्य असेपर्यंतच घ्यावे. म्हणजे सर्व साधारणपणे दिवसा जेवावे. रात्रौ जेवू नये.

    व्यवहारात, नियम करायचाच झाल्यास, जेवणाच्या मुख्य वेळा दोन सकाळी नऊ ते अकरा आणि सायंकाळी पाच ते सात.

    पण आपण समजा दुपारी बारा वाजता पोटभर जेवलो तर पुनः चरचरीत भूक किती वाजता लागेल ? रात्री 8 वाजता. म्हणजे किती वेळ गेला ? आठ तास. दुपारचे जेवण पचायला फक्त आठ तास.

    समजा, रात्री 8 वाजता पोटभर जेवलो तर पुनः भुक कधी लागते ? पित्ताची प्रकृती असलेल्यांना सकाळी नऊ दहा वाजता. आणि इतरांना चरचरीत भूक कधी लागेल? चरचरीत भूक लागेल, दुपारी बारा वाजता. म्हणजे किती वेळ गेला ? सोळा तास. रात्रीचे जेवण पचवायला सोळा तास ?????

    दिवसाचे जेवण पचायला फक्त आठ तास आणि रात्रौचे जेवण पचायला तब्बल सोळा तास जातात. एवढा वेळ का लागतो ?

    उत्तर सोपं आहे, दिवसा सूर्य असतो म्हणून आणि रात्रौ सूर्य नसतो म्हणून.

    आपण हे पाहिलंय की सूर्य म्हणजे अग्नि.
    पचन घडवणारा तो सूर्यनारायण. हजर असला तर पचन होणारच ना ! त्यात विशेष ते काय ?
    प्रश्न येतो तो, रात्रीचं पचन घडवणार कोण ?

    पचन घडवणे म्हणजे नेमके काय हे पण आपण अन्नपचन कसे होते ? या लेखमालेतून पाहिले आहे. पचन म्हणजे रूपांतरण. एका बाह्य घटकद्रव्याचे रूपांतर शरीराला योग्य होईल अशा अवस्थेत बदलवून घेणं. त्याचे शरीरातील वेगवेगळ्या विकरकामार्फत ( एन्झाईम्स) विघटन घडवून आणणे, त्याचे चांगल्या ( उपयुक्त) आणि वाईट (टाकाऊ) भागात विभागणी करणे, चांगल्या भागातून शरीराचे पोषण करवणे, टाकाऊ भाग जवळच्या मलमार्गापर्यंत आणून ठेवणे, इ. कामे करवून घ्यायला, शरीरातील काही उर्जा संपून जाते. म्हणजे पचन घडवून आणायला, रूपांतरण घडवायला, उर्जा निर्माण करायला उर्जा संपून जाते.

    या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आता एक रूपक पाहू. हे उदाहरण ग्रंथात लिहिलेलं नाही. पण समजून घेण्यासाठी थोड्या वेळ पुरतं विचारात घेऊ.

    आपल्या शरीरात एक बॅटरी आहे. जी सोलर एनर्जी वर चालते. सूर्योदय ते सूर्यास्त असं हिचं चार्जिंग सुरू असतं. जोपर्यंत चार्जिंग सुरू असतं, तोपर्यंत सगळी हेवी ड्यूटी कामे करून घ्यावीत. चार्जिंग संपल्यावर जर बॅटरीकडून काम जास्ती करून घेतलं तर बॅटरी लवकर संपून जाईल, अगदी तस्सच होतं पचनाचं.

    सूर्यास्तानंतर या शरीरातील बॅटरी, बॅकअप वर जाते. पचनासाठी लागणारी उर्जा संपू नये असं वाटत असेल तर बॅकअपवर कमीत कमी काम करायचे. म्हणून सूर्यास्तापूर्वी जेवून घ्यावं. जोपर्यंत सूर्य आहे, तोपर्यंत पचन पूर्ण करून घ्यावं आणि पुढील महत्वाच्या कामासाठी ही बॅटरी रिझर्व्ह ठेवावी. सकाळपर्यंत नो प्रॉब्लेम. पचन पूर्ण. उठल्या उठल्या दोन नंबरचा काॅल येणार. आणि संपूर्ण दिवस चांगला जाणार.

    सायंकाळी एवढ्या लवकर जेवणार म्हणजे सकाळी लवकर जाग येणार. भूक लागूनच जाग येणार. किंवा कदाचित झोपच लागणार नाही. कारण तशी सवयच नाही ना. गेल्या चाळीस वर्षातील चुका दुरूस्त करायच्या असतील तर थोडा त्रास तर होणारच. काहीजणांची थोडी अॅसिडीटी वाढणार.
    हा पोटात पडणारा खड्डा सुखासाठीच असल्याने त्याचं दुःख मानायचं नाही, ( देहे दुःख ते सुख मानीत जावे ) असं आपलं आधीच ठरलं आहे.
    कुछ बडा पाने के लिए कुछ छोटा खोना तो पडता ही है दोस्तो !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग. 9673938021
    04.03.2017

  • किचन क्लिनीक – दुध

    दुध हे पुर्णान्न आहे पण देशी गाईचेच बरं का!

    देशी गाईमध्ये देखील गीर हि प्रजाती जी मुळ गुजरात येथील आहे तिचे दुध सगळ्यांपेक्षा गुणांनी श्रेष्ठ आहे. देशी गायीचे दुध हे तुलनेने भरपूर गुणांनीयुक्त,पचायला हलके, स्निग्धांश कमी असणारे असे असते.

    लहान मुलांना देखील काही कारणाने आईचे दुध मिळत नसेल तर पावडरचे दुध घालून त्यांचे पोट खराब करण्यापेक्षा गाईंचे दुध पाजावे.असे म्हंटलेच आहे ना माय नसेल तिथे गाय आहे.आणी कसा योगायोग आहे पहा ना आई जशी आपल्या बाळाला पोटात ९ महीने वाढवते तशी गाय देखील ९ महिन्यांनीच व्याते.

    आपल्या भारतीय संस्कृतींत गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे ते काही उगाच नव्हे.गाय हि खरोखरच पुजनीय आहे.असे म्हणतात कि गोमातेची सेवा केल्याने सर्व पापकर्मांचे क्षालन होते.तसेच गाईच्या उदरात ३३ कोट देव वसतात असे म्हणतात.

    गाईंचे दुधच नव्हे तर मुत्र,शेण हे देखील औषधी गुणधर्म युक्त आहे.गाईच्या वाशिंडावर जी सुर्य किरणे पडतात त्याचे रूपांतर सोन्यामध्ये होते आणी ह्या सोन्याचे अंश गाईच्या दुधात सापडले आहेत हे संशोधनाने सिद्ध झाले आहे. त्यामुळेच देशीगायीचे दुध हे पिवळया रंगाचे असते.

    आधुनिक विज्ञानाच्या संशोधनातून असे आढळले कि देशी गाईच्या दूधामध्ये A-2 protein आढळते जे आपल्या आरोग्याला अत्यंत फायदेशीर आहे.

    पण आपल्या देशाची विवंचनाच अशी आहे कि आपण हातचे सोडुन पळत्याच्या मागे धावत असतो.आणी ह्याच मुळे आपल्याला आपले अस्तित्व गमवायची पाळी आली आहे.होय बरोब्बर ओळखलेत तुम्ही माझा रोख कुठे आहे तो.

    २५-३० वर्षांपूर्वी आपल्या देशांतील सरकारने काय केले. दुधाचे उत्पादन वाढवावे म्हणून जर्सी हा प्राणी आपल्या देशात आणला आणी त्याची बिजं आपल्या देशांतील दुग्ध उत्पादन क्षेत्रात रोवली. आपण सगळे जर्सी गाय असे म्हणता पण मी त्याला फक्त एक प्राणीच म्हणेन कारण ज्या प्राण्याच्या शरीरात दुध उत्पादन वाढावे म्हणून डुक्कर ह्या प्राण्याचे जीन्स रोवले आहेत त्याला आपण गाय नाही ना म्हणू शकत.आणी ह्या जर्सीचे दुध हे दुध नसून दुधाच्या रूपातले सफेद विष आहे जे आपल्या देशांतल्या पिढीच्या रक्तात इतकी वर्षे भिनले आहे आणी आता ते आपले जहाल रूप दाखवू लागले आहे.थोडक्यात काय जर्सी ह्या पुतनामावशीचे विषारी दुध आपल्या देशांतील बाळकृष्ण दुध म्हणून पित आहेत किंबहुना आपल्या देशांतील यशोदा माताच त्यांना हे पाजत आहेत.तर सांगायचा मुद्दा हा कि जर्सीचे दुध हे slow poison आहे.

    जर्सीच्या दुधात असणारे A-1 protein हे त्यामागील खरे कारण आहे.ह्याच प्रथिनामुळे जर्सीचे दुध हे विषारी बनले आहे .आणी त्यामुळे हे दुध पिऊन कर्करोग, डायबेटिस ,हृदयविकार, मानसिक आजार,नपुंसकता इ अनेक भयानक रोग आपल्या देशात वाढले आहेत.खरं वाटत नसेल तर विचार करून बघा.

    आता पुढे अजून हानी व्हायच्या आत आपण सर्वांनी शहाणे होऊया.आणी हे जर्सीचे दुध पिणे थांबवून देशी गाईंचे दुंध पिऊया.आपण सर्वांना माझी हि कळकळीची विनंती आहे कि देशी गाईचेच दुध प्या व आपल्या मुलांना पाजा.गाईचे दुध मिळत नसेल म्हशीचे प्या पण जर्सीच्या दुधापासून लांब रहा.

    दुध ह्या विषयी पुढील माहिती देण्या आधी मला आपणा सर्वांना जागृत करणे गरजेचे वाटले म्हणून हा लेख.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • माका अर्थात भृंगराज

    ।।गणधिपाय नम: भृंगराजपत्रं समर्पयामि।।

    भृंगराज ह्यालाच मराठी मध्ये माका असे ही म्हटले जाते. अहं आपण खातो तो मका नव्हे बरं का!हा माका आहे माका. ह्याचे बहुवर्षायू अर्थात बरीच वर्षे जाणारे क्षुप असते.

    औषधी करिता उपयुक्त म्हणून ह्याचे पंचांग व बीज वापरले जाते. हा चवीला कडू, तिखट, उष्ण असतो व जड आणी रूक्ष देखील असतो. शरीरातील कफ व वात दोषांचे हा शमन करतो.

    आता ह्याच माक्याचा उपयोग आपण कुठल्या शारीरिक तक्रारींमध्ये करू शकतो ते पाहुयात :

    जखम झाली असल्यास किंवा जखमेचा व्रण राहिला असल्यास, तसेच सुजेवर माक्याचा लेप लावला जातो.

    केसांवर तर ह्याचा खास उपयोग होतो केस गळणे, कोंडा ह्यात माका सिध्द तेल डोक्यावर लावतात. तर केस काळे भोर होण्यास पाने वाटून लेप लावतात. आपण सर्वांना महाभृंगराज तेल माहीतीचे असेलच ह्यात हा माकाच तर असतो.

    केस व हाडांचा आयुर्वेदा मध्ये जवळचा संबंध आहे. केस हा अस्थिधातूचा मल मानला जातो. त्यामुळे जर माका केस बळकट करतो तर त्याचे कार्य हे आपल्या हाडांची बळकटी करायला देखील होणारच ना!

    माका हा यकृत, प्लिहा ह्या अवयवांचे कार्य सुधारतो त्यामुळे रक्ताची कमतरता, भुक न लागणे, अजीर्ण, ह्यात ह्याचा चांगला उपयोग होतो.

    त्वचा रोगात ज्या मध्ये स्त्राव येतो जसे गजकर्ण, इसब, ह्यात देखील ह्याच्या सेवनाने लाभ होतो.

    ज्यांची दृष्टी क्षीण आहे त्यांनी ह्याचे नियमीत सेवन केल्यास दृष्टी सुधारते. त्यामुळेच ह्याला नेत्र्य असे म्हटले आहे.

    माक्याचे बीज हे वाजीकर आहे अर्थात कामशक्ती वाढविते.

    असा हा माका आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतो.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर,
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९६०६९९७०४