(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग नऊ

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक तीन - रोगाचे लेबल लावू नका."

    ज्याप्रमाणे एखाद्या एसटी ला पाटी लावली की ती गाडी त्याच मार्गाने फिरेल. त्याच मार्गाने जाताना त्याच सर्व नियमांचे पालन करावेच लागेल. तेच सर्व खड्डे, तेच स्पीड ब्रेकर, तेच अडथळे, तेच वाहतुकीचे नियम, तेच थांबे, तीच वेळ, तशीच गती अपेक्षित ठेवली जाते. कारण आपण गाडीला बोर्ड लावलेला असतो. हा बोर्ड लावला नसता तर हीच गाडी मोकळेपणाने कुठेही सहजपणाने फिरवता आली असती.

    हं! रोगाच्या बाबतीत असेच आहे. एकदा आपण आपल्याला विशिष्ट रोगाचे लेबल चिकटवून घेतले की, स्वतंत्र विचाराने जाऊच शकणार नाही.

    जसे, मी रक्तदाबाचा रोगी आहे, असे स्वतःला लेबल चिकटवले, डाॅक्टरनी तसे सांगणे हे डाॅक्टरांचे कर्तव्यच आहे, त्यामुळे ते तसे सांगणारच. पण आपण ठरवायचे आहे की मी या कायमस्वरूपी रोगाची पाटी मला चिकटवून घ्यायची आहे की नाही.

    एकदा मी रक्तदाबाचे लेबल लावले की सहजपणे आपण गृहीत धरतो,
    आता ही औषधे कायमची.....
    कुठेही गेलो तरी औषधे लक्षात ठेवायची कायमची.......
    या औषधांबरोबर त्याचे दुष्परिणाम कायमचेच...
    त्यासाठी दरमहा तपासणी कायमची......
    वैद्यकीय खर्च कायमचा.....
    मीठ कमी अळणी जेवणे कायमचे.....
    अधिक श्रमाची कामे बंद कायमची.....
    तेल तूप नारळ शेंगदाणे बंद कायमचे.....
    कधीच टेन्शन घ्यायचे नाही, याचे टेन्शन कायमचे......
    यामधे जरा चूक झाली की जे होईल त्याला मीच जबाबदार आहे, कायमचा ......
    आणि हे वयाच्या तिसाव्या वर्षीपासून आजन्म....
    संपला जीवनातला आनंद !
    आणि येतं अकाली वृद्धत्व.
    लवकर म्हातारे झाल्यासारखं वाटू लागतं.

    पुल म्हणतात तसं
    ........जेव्हा भज्याच्या वासाने मन भरून जायच्या अगोदर जेव्हा अॅसिडीटी आठवते, तेव्हा समजावं आपण म्हातारे झालो.....

    ........तरूणीकडे लक्ष जाण्याअगोदर जेव्हा तिच्या कडेवरील मुलाकडे पहिले लक्ष जाते तेव्हा समजावं आपण म्हातारे झालो...

    .......पिकनिकला निघताना औषधांच्या डब्याची जेव्हा आठवण होते, तेव्हा खुशाल समजावं, आपण म्हातारे झालो....

    म्हणूनच म्हणतो,
    सदा तरूण रहा.
    काढून टाका गाडीचा बोर्ड आणि मस्त फिरवा गाडी, मन मोकळेपणाने.
    आणि एन्जाय करा जीवनाची पिकनिक. औषधांच्या डब्याशिवाय !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    18.04.2017

  • किचन क्लिनीक – जव

    किचन क्लिनीक – जव

    जव हे धान्य प्रामुख्याने क्षुद्रधान्या मध्ये समाविष्ट होते. तसेच ह्याचा वापर आपल्या दैनंदिन आहारात आपण जास्त करताना आढळत नाही कारण तसे हे धान्य कोकण गोवा प्रांतात फारसे प्रचलित नाही.

    तरी देखील हे अत्यंत पौष्टीक, त्यामानाने स्वस्त असे धान्य असल्याने ह्याचा वापर जर आपण आपल्या आहारा मध्ये केला तर त्याचा फायदा आपल्या आरोग्यास व शरीरास नक्कीच होऊ शकेल ह्यात शंका नाही.

    डायबेटिस असणाऱ्या व्यक्तिंना तर जव हे एक वरदान आहे त्यामुळेच प्रमेही रूग्णाने आपल्या आहारात जवाचा वापर केल्यास त्याचा चांगला फायदा रक्तगक साखर नियंत्रित करायला व प्रमेह आटोक्यात ठेवायला नक्की होऊ शकतो. चला तर मग आपण जवाचे गुणधर्म पाहुयात: जव चवीला गोड, तुरट, थंड, रूक्ष, पचायला हल्के, वातकर, कफ पित्त नाशक असून, मल वाढविणारा, तसेच चरबी कमी करणारा, मेघा, बुद्धी, शरीर बल वाढविणारा आहे.

    आता आपण जवा पासून तयार केलेल्या पदार्थांचे गुणधर्म पाहुया:

    १) मंड:

    हा पचायला हल्का, कफपित्तनाशक, वातुळ, घशाला हितकर, रक्त शुध्दीकर आहे.

    २) मंथ:

    चवीला गोड, थंड, वर्ण सुधारणारा,बलवर्धक, पुष्टीकर, स्थैर्यकर, पित्तनाशक, दाह, तहान, श्रम ह्यांचा नाश करणारा, उल्टी होत असल्यास ती कमी करायला मदत करतो.

    ३) रोटी:

    चवीला गोड, हल्की, वातकर, मल वाढविणारी, कफरोगात उपयुक्त, बलकारक, शुक्रवर्धक आहे.

    जव खायचा अतिरेक केल्यास शरीरात वात वाढून त्याची लक्षणे दिसू लागतील.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    आता पर्यंत सुरू असलेले किचन क्लीनीक ह्या सदरातील हा शेवटचा लेख असून हे सदर ह्या शेवटच्या लेखाने पुर्ण होत आहे.मी आशा करते की हे सदर आपल्या सर्वांना नक्कीच उपयुक्त ठरले असेल.लवकरच पुन्हा भेटूया एक नवीन लेखमाला घेऊन.

    तो पर्यंत तात्पुरता निरोप घेते.

    धन्यवाद.

    वैद्य स्वाती अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क: ९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – करडई

    किचन क्लिनीक – पालेभाज्या – करडई

    हे बहुवर्षायू क्षूप असते. हि भाजी चवीला गोड,तिखट,भूक वाढविणारी व उष्ण असते.हि भाजी शरिरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त दोष वाढविते.

    हि भाजी जेवणात तर वापरतात तशीच ती घरगुती औषध उपचारात देखील वापरली जाते.
    आता हिचे औषधी उपयोग पाहूया.

    १)सर्दी झाल्यास करडईच्या कोवळ्या पाल्याची भाजी द्यावी.

    २)ह्या भाजीचा पोटीस सुजेवर बांधल्यास सुज व वेदना कमी होतात.

    ३)मोठ्या व्यक्तिंना क्रुमीचा त्रास झाल्यास करडईची भाजी करडईच्याच तेलात शिजवून खावी.

    ४)लघ्वी चिकट व गढूळ होणे ह्यात करडईच्या पानांचा रस २ चमचे+धणे पूड १ चमचा हे मिश्रण रोज सकाळी ८ दिवस घ्यावे.

    ५)घशात चिकट कफ येणे व तोंडात चिकट लाळ तयार होणे ह्या तक्रारीवर करडईची कोवळी पाने चावून त्याचा रस थुंकावा.

    हि भाजी जास्त खाल्ल्यास डोळ्यांचे विकार,रक्तदोष व पित्ताचे विकार होतात.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • वदनी कवल भाग १

    वदनी कवल घेता
    नाम घ्या श्रीहरीचे
    सहज हवन होते
    नाम घेता फुकाचे
    जीवन करी जिवित्वा
    अन्न हे पूर्ण ब्रह्म
    उदर भरण होणे
    जाणिजे यज्ञकर्म

    हा श्लोक बहुतेकांचा पाठ असेल.त्यातील ओळींच्या अर्थावर जरा लक्ष देऊया.

    मुखी घास घेता करावा विचार.
    कशासाठी हे अन्न मी सेवणार
    घडो माझे हाती नित्य देशसेवा
    म्हणोनी मिळावी मला बुद्धी देवा

    असा परिवर्तित श्लोक देखील म्हटला जातो. हे श्लोक सामुहीकरीत्या म्हटले जातात.
    समुहाने किंवा एकत्रितरीत्या हे श्लोक म्हणण्याचा एक वेगळा अर्थ अपेक्षित आहे.

    आपण सारे एक आहोत,
    सहनाववतु सहनौ भुनक्तु
    यामधे देखील तोच अर्थ अभिप्रेत आहे.
    एकत्र बसून भोजन करणे, हे एकमेकांची शक्ती वाढवणारे आहे.

    आजकालच्या प्रथेनुसार एकत्र जरी आलो तरी, बसून भोजन काही होत नाही. ते यथाकालोद्भव उभ्याउभ्याच होते. डाव्या हाताने कधीही वाढू नये, वाढून घेऊपण नये. पण डाव्या हाताने घेतल्याशिवाय बुफेभोजन होतच नाही. याकरीता, ( फार फार वर्षा) पूर्वी (सौ.) अन्नपूर्णा सर्वांना वाढून नंतरच आपण जेवायला बसत असे. जे काही हवे ते एकदाच घेऊन नंतरच ती जेवत असे. वाढपी लोकांची संगत हीच तिची पंगत. पण तिच्या चेहर्‍यावर इतरांना वाढण्याचे समाधान झळकत असे.

    सर्व पदार्थ वाढून पूर्ण झाल्यावर, अन्नशुद्धी वाढली जाई.
    अन्नशुद्धी म्हणजे लोणकढे तूप.
    हे तूप (आडव्या चमच्याने) वाढून झाले की, आता आणखी पदार्थ ताटात येणे शिल्लक नाही, असा जणुकाही इशाराच जेवणार्‍यांना मिळत असे.
    म्हणजे अन्नशुद्धी वाढून होईपर्यंत, समोर वाढलेल्या ताटाला हातही लावायचा नाही. असा अलिखित नियमच होता त्यावेळी.

    कोशींबीर वाढून होईपर्यंत लोणचे संपलेले, भाजी येईपर्यंत कोशींबीर संपवलेली. याला सहभोजन म्हणत नाहीत.

    आता पंगतही कालबाह्य झाली आहे.

    एका ओळीत मांडलेली केळीची हिरवीगार पाने, त्यावर रंगीबेरंगी पदार्थांनी सजलेलं आणि गच्च भरलेलं ताट, उदबत्यांचा सुवास,
    एका सुरात, एका तालात म्हटलेले श्लोक, हा सर्व माहोल पाहून आधीच अग्निनारायण अवतीर्ण झालेले असत. आणि वाट बघत बसलेले असत फक्त गजराची !

    जय जऽय रघुवीर समर्थ ऽऽऽ
    हरऽऽहर महाऽऽदेव

    आणि नंतर आक्रमणाला जी सुरवात होई, ती अग्निनारायणाने अगदी तथास्तु म्हणेपर्यंत.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.

    04.09.2016

  • आंबेहळद / आम्रगंधी हरिद्रा

    हिचे हळदीप्रमाणे दिसणारे वर्षायू क्षुप असते.ह्याची पाने ६० सेंमी -१मीटर लांब असतात व कंद गोल,स्थूल आल्याच्या कंदा प्रमाणे दिसणारा व रूंदिला बारीक व अधिक पांढरा असतो.ह्या कंदाला कैरी सारखा वास येतो.

    ह्याचे उपयुक्तांग कंद असून हि चवीला कडू,गोड व थंड गुणाची असून हल्की व रूक्ष असते.आंबेहळद कफपित्तशामक व वातकर आहे.

    चला आता आपण हिचे काही औषधी उपयोग पाहुयात:

    १)शरीराचा कुठला हि अवयव मुरगळला असता आंबेहळदीचा लेप लावल्यास सुज कमी होते.

    २)त्वचा रोगा मध्ये खाज व पुरळ आला असता आंबेहळदीचा लेप लावतात.

    ३)आंबेहळद रक्त शुद्ध करते म्हणून रक्ताच्या विकारात उपयुक्त आहे.

    ४)चेहऱ्यावर मुरमांचे डाग अथवा मुरूमे आली असता आंबेहळदीचा लेप लावतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य (सौ) स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४
    ©️ Dr Swati Anvekar

    English Name: Mango Ginger

  • आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग दोन

    विषारी रासायनिक खतांचा भडीमार झालेल्या पालेभाज्या, कृत्रिमरीत्या पिकवलेली फळे आणि नसत्या ग्लोबलायझेशनच्या नावाखाली, नसती भुरळ पडून, स्वतःच्या आरोग्याला पणाला लावत, डुकरांसाठी असलेले सोयाबीनसारखे पाश्चात्य कडधान्य आणखी किती दिवस खायचे ?

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग सत्तावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग दोन !

    यापूर्वी लिहिलेल्या उपवास मालिकेमधे खरंतर हे सर्व नियम सांगितले आहेतच, पण.....

    आपलं जसं एक मन असतं, तसं निसर्गाचं एक मन असतं. विश्व मन. आपण जसा विचार करत असतो, तसा निसर्ग पण विचार करत असतो. आपलं मन जेव्हा विश्वमनाशी जोडलं जातं, तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. विश्वाची सर्व एनर्जी, उर्जा आपण जेव्हा आपल्या मनापासून स्विकारतो, तेव्हा ही आनंदाची अनुभूती आपल्याला येत असते.

    आपण जसा विचार करतो, तसं आरोग्य आपणाला मिळत असतं. कोणत्याही रोगाची बीजे ही आपल्याच मनामधे असतात. ती विश्वमनाशी जोडली गेली की, तीच स्पंदने पुनः आपल्यापाशी येतात.

    आपल्या उपनिषदांमधे हेच सांगितले आहे. ब्रह्मांडामधे प्रचंड शक्ती आहे. ब्रह्मांडातील सर्व चांगल्या गोष्टी माझ्यासाठी दास बनून येऊ शकतात. हे विश्व मला सतत मदत करत आहे. मला माझ्या प्रत्येक कार्यात ही शक्ती सूक्ष्म रूपात मदत करत आहे. माझ्या सर्व गरजा विश्वमनाकडून पुरवल्या जात आहेत. हे विश्व खूप सामर्थ्यशाली आहे, त्यामुळे माझ्या सर्व योग्य गरजा विश्वमनाकडून सहज पूर्ण होणाऱ्या आहेत. त्याच्यासाठी या गरजा म्हणजे किस झाड की पत्ती !

    फक्त योग्य शब्दात, योग्य वेळी त्या मागितल्या पाहिजेत. त्या सर्व इच्छा पूर्ण होणारच आहेत, असा विश्वास पाहिजे, या आनंदात सतत राहिलो तर त्या मिळतातच !

    वास्तुशास्त्रामधे पण हेच सांगितलेले आहे. वास्तु कायम "तथास्तु" म्हणत असतो. घरात कायम सकारात्मक स्पंदने असतील तर कोणतीही प्रबळ अनिष्ट शक्ती कोणताही त्रास देऊ शकत नाही. निसर्गाचे हे नियम, ही स्पंदने, ही उर्जा घेण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन. असा सकारात्मक विचार करायला शिकलं पाहिजे.

    माझ्या आजोबांना डायबेटीस होता, वडीलांना पण होता, आता मलाही तो होणार आहे, असा विचार जर मनात प्रबळ होत गेला तर, कितीही पथ्य पाळले तरी डायबेटीस तुम्हाला शोधत तुमच्याकडे येणारच. हाच निसर्गाचा नियम आहे.

    मग विचारांची स्पंदने जर सकारात्मक ठेवली तर विश्वमना पर्यंत पोचणारा परिणाम सकारात्मकच असणार ! म्हणजेच काहीही झाले तरी मला डायबेटीस होणार नाही, वाढलेल्या साखरेचा मला काहीही त्रास होणार नाही, अशी स्पंदने जर निसर्गामधे प्रक्षेपित केली तर तीच स्पंदने जास्त ताकद घेऊन पुनः आपल्याचकडे परत येतात आणि रोगापासून हवे असलेले संरक्षक कवच आपणाला मिळत असते. यालाच आजच्या भाषेत प्रतिकारशक्ती म्हणतात.

    राॅन्डा बर्न यांनी लिहिलेले एक पुस्तक आहे, द सिक्रेट नावाचं. या पुस्तकात हेच रहस्य सांगितलेलं आहे. आपण जो विचार करतो, तो एवढा सकारात्मक करा की विश्वमनाशी तो जोडला जाईल.

    रोन्डा बर्न यांचे नाव एवढ्यासाठीच घेतले की आपली मानसिकताच अशी बनली आहे, की पाश्चात्य तज्ञ जे सांगतात, तेच अंतिम सत्य. जणुकाही आकाशातूनच पडले आहे, आपल्या पराभूत भारतीय मानसिकतेचा तो परिणाम आहे, इतकंच. बाकी विशेष नाही.
    सो बी पाॅझिटीव्ह, नेचर हियर्स यु !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    07.05.2017

  • आहाररहस्य १

    जसा देश जसा वेश तसे खावे… जशी प्रकृती जशी पचनशक्ती तसे पचवावे…

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अकरा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषध काम करत नाही.

    भाग दोन

    जीवनावश्यक काय आहे ?
    अ.व.नि.
    अवनि म्हणजे पृथ्वी. तिचे रक्षण तर झालेच पाहिजे. पण शब्दाची फोड केली तर अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभुत गरजा आहेत. असे आम्हाला शाळेत इयत्ता चौथी अ मधे शिकवले होते. आताच्या काळाचा विचार करता, चौथी गरज वाॅटसपची झाली.....
    ....... तुला स्वर्गात जायचे आहे की नरकात असा प्रश्न विचारल्यावर जिथे फोरजीची रेंज येते आणि मोबाईल आणि चार्जर नेता येतो तिथे कुठेही चालेल, अशी उत्तरे देणारी मोबाईल अनिवार्य झालेली आजची पिढी.....

    पाचवी गरज औषधांची निर्माण झाली.
    असे वाटू लागले आहे, की औषधांशिवाय मी जगूच शकणार नाही. एकवेळ जेवण आणि आंघोळ राहिली तरी चालेल पण औषधे विसरून चालणार नाही, असे वाटण्या इतपत कायमस्वरूपी औषधाबद्दलचे प्रेम निर्माण झाले आहे.

    "उगाच रिस्क कशाला घेताय"
    " हेल्थ महत्त्वाची की पैसा"
    अशा गोंडस टायटल असलेली टिपीकल वाक्य डाॅक्टरनीच सुनावल्यावर, औषध ही जीवनावश्यक गरज बनली. परदेशवारीची ऑफर फार्मा कंपन्या, डाॅक्टरना देतात. एखाद्या कंपनीची औषधे जर वर्षभर वापरली तर सिंगापूर मलेशिया ट्रीप जर होत असेल तर या मोहात कोण पडणार नाही ? अर्थात सर्व डाॅक्टर ही ऑफर स्विकारतात असं नाही. पण हा सरळ सरळ बिझनेस आहे. दुर्दैव आहे की यात सर्वसामान्य जनतेचे आरोग्य पणाला लावले जातेय.

    फूड अॅण्ड हेल्थ सप्लीमेंटच्या नावाने महागड्या टूथपेस्ट पासून ते अगदी औषधे विकणाऱ्या कंपन्या, आपले टाय बांधलेले सोकाॅल्ड सोकावलेले एजंट दारोदारी फिरवत आहेत. दुर्दैवाने यात काही डाॅक्टरदेखील एजंट म्हणून सामील आहेत. आरोग्य जनजागृती च्या नावाने, जनतेच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. "आजकाल म्हणे अन्नाचा दर्जा खूप घसरल्यामुळे आमची ही पावडर तुम्हाला दिवसभराची सर्व एनर्जी देईल." इथपर्यंत असत्याचा प्रचार केला जातोय. फ्रि मेडीकल हेल्थ चेक अप कॅम्पच्या जनसेवेतून काही मशीनद्वारे मोफत कॅल्शियम, हिमोग्लोबिन तपासणीचे नाटक पार पाडले जाते. हवे तसे रिपोर्ट आणले की आमच्या कंपनीचे अमुक औषध आता आपल्याला विकत घ्यायला हवे, असेही या "फ्री" चेक कॅम्पमधे सांगितले जाते.
    उल्लु बननेवाले है, इसलिए "बनानेवाले" पैदा होते है।

    औषधे ही रोग घालवण्यापुरती, तात्पुरतीच घ्यायची असतात, नंतर रोग विसरून जायचा असतो, लक्षात ठेवायचा नसतो, हे लक्षातच येत नाही आणि औषधं कायमची पाठी लागतात.

    "माझ्या चुकीच्या जीवनशैलीमुळे मला त्रास होताहेत" हे मान्य न करता, हे जीवनचक्र असेच चालणार, आणि आम्ही आयुष्यभर औषधे घेत बसणार आहोत." अशी विचारसरणी असलेल्या व्यक्तींनी, हा लेख फारसा मनाला लावून घेऊ नये. विसरून जावे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    20.04.2017

  • आजचा आरोग्य विचार – भाग सव्वीस

    सुगंधी उटणे लावून केलेली आंघोळ साबण लावून केलेल्या आंघोळीपेक्षा कितीतरी पटीने आरोग्यदायी आहे. तरीसुद्धा आपण वैचारिक गुलामीमुळे स्वतंत्र विचार करू न शकल्याने साबणाच्या फेसातून बाहेर पडण्याची मानसिकताच नाहीये.