पुदीन्याचा वापर आपण आपल्या स्वयंपाकामध्ये तसा सर्रास करत नसलो तरी देखील काही खास व्यंजनांमध्ये हा आपण हमखास वापरतो.हुॅं तोंडास पाणी सुटले ना ?समजले आम्हास आता ब-याच जणांना भैयाकडील पाणीपुरी,शेवपुरीची आठवण आली असणार.पुदिन्याची चटणी,वेगवेळी बिर्याणी,पुलाव,तसेच गोव्याचा खास पदार्थ चिकन अथवा फिश काफरियल (पापम् शांतम् ??श्रावण आलाय)ह्या सर्वांत ह्याचा हमखास वापर करतात.
ह्याचे १-२ फुट उंचीचे सुंदर क्षुप असते.ह्याची पाने आपण स्वयंपाकात वापरतो.ह्या पानांना एक छान ताक्ष्ण सुगंध येतो.
पुदीना हा चवीला तिखट व उष्ण असतो आणी तो शरीरातील वात व कफ दोष कमी करतो.ह्याचा वापर जसा स्वयंपाकामध्ये होतो तसाच तो घरगुती उपचारात देखील केला जातो.
चला तर पाहूयात ह्याचे औषधी उपयोग:
१)वेदना असलेल्या भागावर पुदिन्याची चटणी वाटून तिचा लेप लावावा.
२)नैसर्गिक माऊथवाॅश होय,पुदिन्याचा २ चमचे रस ग्लास भर कोमट पाण्यात घालून गुळण्या करा म्हणजे मुखदुर्गंधी कमी होते.
३)भुक न लागणे,तोंडास रूची नसणे,ह्यात पुदिन्याची चटणी खायला द्यावी.
४)त्वचेवर नायटा झालं असल्यास त्या जागी पुदिन्याच्या पानांचारस लावावा.
५)पोटदूखीमध्ये १ चमचा पुदीना रस+ १ चमचा आल्याचा रस+ १/४ चमचे सैन्धव घालून हे मिश्रण घ्यावे.
ह्याचे जास्त सेवन केल्यास एॅसीडीटी होऊ शकते.
-- वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
शतावरी ह्या वनस्पती बाबत आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत असेल.आपण सर्वांना शतावरी कल्प तर माहितच असेल जो बाळंतीणीला हमखास दुधातून दिला जातो.चला तर आज आपण ह्या शतावरीची थोडी जास्त ओळख करून घेऊ.
शतावरीचे काटेरी झुपकेदार वेल असतो.ह्याच्या फांद्यावर उभ्या रेषा असतात.काण्ड त्रिकोण,स्निग्ध असते.ह्याचे काटे ०.५-१ सेंमी लांब व खालच्या बाजुस वळलेले काहीसे बाकदार असतात.शतावरीचे काण्ड हे पानां सारखे भासते.२-६ ह्या संख्येत गुच्छात उगवते.१.२५-२-५ सेंमी लांब पातळ व विळ्या प्रमाणे भासते.फुले मंजिरी स्वरूपात उगवतात जी २.५-५ सेंमी लांब एकेरी किंवा गुच्छ रूपात असतात हि सुगंधी व पांढरी किंवा गुलाबी रंगाची असतात.फळ वाटाण्याच्या आकाराचे १-२ बीज युक्त असते.मुळ हे मुल स्तंभापासून जाड लांबट गोल व दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी मुळे फुटतात.
शतावरीचे उपयुक्तांग आहे मुळ.ह्याची चव गोड,कडू असून हि थंड गुणाची व जड,स्निग्ध व मृदू असते.हि वातपित्त नाशक व कफ पोषक आहे पण ओली असताना मात्र कफकर असते.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊ:
१)वातनाशक व बल्य असल्याने शतावरी सिद्ध तेल अभ्यंगासाठी वापरतात.
२)सरक्त मल प्रवृत्तीमध्ये शतावरी सिद्ध घृत चांगले कार्य करते.
३)बाळंतीणीस चांगले व भरपूर स्तन्य उत्पत्ती साठी शतावरी सिद्ध दुध देतात.
४)अधोग रक्तपित्तामध्ये शतावरीचा काढा अथवा स्वरस वापरतात.
५)शतावरी शुक्रधातूची वाढ करते तसेच ती गर्भाशय पोषक देखील आहे.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
या अन्नपचनातून आणखी एक स्फोटक पदार्थ तयार होतो. जो दिसत नाही, पण आपले अस्तित्व सतत दाखवत असतो,
ज्याच्यामुळे दवाखान्यात येणारे नव्वद टक्के रूग्ण हैराण झालेले असतात,
जो आजपर्यंत कोणत्याही पॅथाॅलाॅजी लॅबला दिसलेला नाही, कंप्युटरला समजलेला नाही, एम आर आय ला उमजलेला नाही. स्कॅनमशीन शोधू शकली नाही.
जो आपले कर्तृत्व तर दाखवतो, पण स्वतः मात्र नामानिराळा रहातो.
ज्याच्या दबावाखाली भले भले अवयव गुपचूप बसून रहातात. आपले कामही करू शकत नाही, असा दरारा असणारा,
ग्रंथात, ज्याच्या नावावर, ऐशी रोगांची भलीमोठी लिस्ट लागलेली आहे असा,
वाॅन्टेड असे फर्मान येऊनही त्याला कोणीही पकडू न शकलेला,
जो स्वतः विकृत होऊन, कफाला पित्ताला हलवून टाकण्याची क्षमता असलेला,
स्वतःची वेगळी स्रोतस यंत्रणा नसतानाही, इतर प्रस्थापित यंत्रणेचा वापर करत, सर्व स्रोतसांमधे भरून रहाणारा,
विकृत झालेल्या पित्तामुळे बिघडलेला अग्नि हा ज्याचा पितामह म्हणजे आजोबा, आणि त्यामुळेच विकृत झालेल्या कफाचा परिणाम म्हणून जन्माला आलेले 'आमजन्य अपचन' हा ज्याचा पिता आहे, ज्याच्यामुळे अनेक अन्य रोगांना जन्म मिळालेला असतो, किंवा जो त्यांचा जन्मदाता असतो,
शोषून घेऊन सुकवून टाकणे हा दुर्गुण असलेला, अत्यंत चंचल स्वभावाची जोड मिळाली की, समोरच्यातला स्नेह आटवून टाकणारा,
पाण्यामुळे वाढणारा, पाण्यात काम करण्याऱ्या मंडळींना लवकर पकडणारा, थंड गुणाचा जवळचा मित्र असणारा,
ज्याच्या अस्तित्वामुळे पोटाला चारी बाजूला सारखीच तडस लागते, हा भौतिकशास्त्रातील नियम सिद्ध करणारा,
ज्याच्याकडे स्त्री पुरूष वृद्ध बालक असा भेद नाही, कोणताही वांशिक, जातीय, धार्मिक भेदभाव न मानणारा,
हाडे ठिसूळ करण्यात एक नंबर, चरबी एका जागी साठवून ठेवण्यात एक नंबर, मळाला सुकवून टाकून विबंध निर्माण करण्यात एक नंबर, मनात आलं तर अग्निला भडकवून टाकून, एका ठिकाणी लागलेली आग दुसऱ्या ठिकाणी नेऊन, लावालावी करण्यात एक नंबर असलेला,
श्रम केले नाही, पोट हलवले नाही, पोट दाबले गेले नाही, पोट पिळले गेले नाही, तर जिथे आहे तिथे, तस्साच पडून रहाणारा,
बहुतेक वेळा आभासी ह्रदयरोगाची लक्षणे दाखवणारा, आणि प्रचंड भीती उत्पन्न करणारा,
क्षणात इथे तर क्षणात तिथे असा लपाछपीचा खेळ खेळत स्नायुंना कमजोर करून टाकणारा,
काय खाल्लेतर बरे होईल, काय नाय खाल्लेतर बरे होईल, या द्वंद्वात कायम ठेवणारा, काहीही खाल्लेतरी आणि काही नाही खाल्लेतरी जे करायचंय ते करणारा,
एवढं असूनही स्वतंत्रपणे शास्त्रीय नावाचं बारसं न झालेला, त्यामुळे स्वतंत्र व्याधी म्हणावा की नाही, इथपर्यंत वैद्यांची चर्चासत्रे घडवणारा
वन अॅण्ड ओन्ली वन
गॅस
गॅस
आणि
गॅस
-- वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
31.03.2017
हे लोकप्रिय फळ असून सर्वांनाच आवडते त्याला आपला पोपट तरी कसा अपवाद असेल.आपल्या सर्वांना ती बाल कविता आठवत असेलच "पोपट पोपट बोलतोस गोड खाना जराशी पेरूची फोड".
ह्याचा आता जाम,आयस्क्रीम,सरबत अस,वड्या असे बरेच रूचकर पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत.
पेरूचे सदाहरित झाड असते,पाने जाड,गोलसर,कडक,व सुगंधी असतात.कच्चा पेरू हिरवा तर पिकल्यावर पिवळा व आतील गर पांढरा व भरपुर बियांनी भरलेला असतो.
हा कच्चा असताना तुरट लागतो व पिकल्यावर गोड.कच्चा पेरू खाऊ नये.खायला व औषधासाठी पिकलेला पेरू बियाकाढून त्याचा गर वापरावा.
पिकलेला पेरू गोड,थंड,पित्त व वात दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.
आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)पोटात जळजळ,घसा कोरडा पडणे,हात,पाय,डोळे ह्याची आग ह्यात जेवणानंतर १ तासाने पिकलेला पेरू खावा.
२)चालल्यावर थकवा येणे,पोटऱ्या दुखणे,घसा कोरडा पडणे ह्यावर सकाळी रिकामी पोटी १ पेरूचा गर+२ चमचे मध+१ चिमूट सैंधव हे मिश्रण घ्यावे.
३)संडासला साफ होत नसल्यास महिनाभर रोज रात्री एका पेरूचा गर खावा.
४)मोठ्या सर्जरी नंतर थकवा कमी करायला व जखम लवकर भरून यायला रोज १ पेरू+१ चमचा मध+१/२ चमचा साजुक तूप खावे.
५)लहान मुलांना पौष्टिक म्हणून खायला १ पेरूचा गर+ मध द्यावा.
पेरू खायचा अतिरेक केल्यास सर्दी,पडसे होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
गणेशजींना जसे मोदक आवडतात, तसे भगवान भोलेनाथना दूध आणि बेल आवडते. नागोबाला लाह्या, देवीला पुरणपोळी हे वैशिष्ट्याचे नैवेद्य.
भोलेनाथ जरी भोळे असले तरी उग्रसंतापी आहेत. जरा मनाविरूद्ध झालं की तांडवच सुरू. म्हणजे लगेचच पित्त वाढण्याचा प्रकार. मन बिघडले तरी तळपायाची आग लगेच मस्तकात जाणार ! थोडक्यात आजच्या भाषेत "यांचा ना क्षणात रक्तदाब वाढतो" आता बरे आहेत, तर पुढच्या क्षणाला काय होईल याचा नेम नाही, असे शंकर प्रत्येक घरात, प्रत्येक पार्वतीच्या वाट्याला आलेले असतात. (काही घरातील शंकर पार्वती अपवाद सोडून) अशा शंकररावांसाठी बेल हे ऊत्तम औषध आहे. मन बिघडल्यामुळे होणाऱ्या पित्ताचा दाह कमी होण्यासाठी बेलाची पाने हे छान औषध आहे.
भोलेनाथांची पिंडी बेलाच्या पानांनी याच कारणासाठी झाकून ठेवतात. रेडीएशनमुळे होणारे उपद्रव कमी होण्यासाठी देखील बेल काम करेल.
कारण एक अभ्यास असा सांगतो, की जिथे शंकरांची जागृत ज्योतीर्लिंगे आहेत, तिथे खाली अणुसाठे असण्याची शक्यता आहे. ते झाकण्यासाठी पिंडाकार डोम !!! जगामधे जिथे जिथे अणुभट्ट्या आहेत, तिथे तिथे पिंडीच्या आकारासारखे छत असते. (/ डोम असतात.)
हे त्याच्यातील साम्य.
महत्वाचे आहे ते म्हणजे पित्ताचा दाह कमी करणे.
आजचे संशोधन हेच सांगतेय की बेलपत्राचा वापर रक्तदाब कमी करण्यासाठी केला जातोय.
यासाठी बेलाची चार पाने एक कप थंड पाण्यामधे सात आठ तास भिजवून ( आयुर्वेदीय परीभाषेत हिम करून ) ते पाणी पिण्यासाठी वापरावे. असे तीन महिने केल्याने रक्तदाब नियंत्रणात रहातो. असा अनुभव आहे.
तसेच पित्तशमनाचे काम दुधाचा अभिषेक पण करतो. नागोबालादेखील दुधाचा नैवेद्य दाखवला जातो. प्रत्यक्षात नागोबा दूध पित नाही, हे काय पूर्वजांना माहीत नव्हते ? नागोबाच्या लाह्या या उत्तम शोषक गुणाच्या आहेत. न पचलेले अतिरिक्त पाणी, आमसदृश्य विष शोषून घ्यायला लाह्याएवढे दुसरे चांगले औषध नाही.
प्रतिकपूजेमधे हे सर्व गृहीत धरलेले आहे.
देवाला वाहिलेली सर्वप्रकारची पाने फुले या पण औषधीच आहेत. या पानाफुलांनी, देवाला केलेल्या दुधाचा किंवा पाण्याच्या अभिषेकाने, हे पाणी किंवा दूध न रहाता, तीर्थ बनते. यातही या पानाफुलांचा औषधी अर्क उतरलेला असतो. म्हणजे हा तीर्थ प्रसाद औषधच झाले ना ?
आणि हा तीर्थ प्रसाद दररोज घ्यायचा. मग वेगवेगळ्या औषधांची गरज भासेल ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
10.09.2016
मसाले वर्गातला हा पदार्थ त्याच्या उग्र वासाने जेवणाला एक विशिष्ट चव आणि खमंग पणा आणण्याचे काम उत्तम बजावतो.फोडणीला खरोखरच चिमूटभर हिंग घातल्या शिवाय मजा नाही,एवढा फरक ह्या हिंग महाशयांच्या अनुपस्थितीने आपल्या जेवणात पडतो.व्यवहारात देखील 'हिंग लावणे' हा वाक्प्रचार जेवणात आणी व्यवहारात दोन्ही कडे उपयोगी पडतो.
चला तर मग करून घेऊयाना ह्या हिंग रावांची एक वेगळी ओळख.हिंग हा झाडाचा निर्यास आहे अर्थात झाडाच्या खोडामधून निघणारा द्रव.ह्याचे पांढरा आणि काळा असे दोन प्रकार असतात,त्यातील पांढरा हा सुगंधी व चमकदार असतो म्हणून त्यास हिराहिंग म्हणतात तर काळा हिंग हा जरा दुर्गंधी युक्त असतो.हे दोन्ही प्रकार औषधी प्रयोगात वापरले जातात.
हिंग हा चवीला तिखट आणी उष्ण असतो.त्यामुळे तो शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करतो पण अतिवापराने पित्त मात्र वाढवू शकतो.हिंग हा पोटात देताना तूपासोबत भाजून मगच द्यावा.तसेच ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी हिंग घरगुती औषधामध्ये वापरू नये.
१)अपचनामध्ये पाव चमचा हिंग साजूक तूपात भाजून खावा व वरून गरम पाणी प्यावे.
२)भूक लागत नसल्यासवअथवा तोंडास रूची नसल्यास १/४चमचा हिंगपूड +२चमचे लिंबाचा रस हे मिश्रण जेवणाच्या पहिल्या घासा सोबत घ्यावे.
३)१/२ इंच आल्याचा तुकडा +१ चिमूट हिंग पूड हे मिश्रण जेवणापुर्वी चावून खावे ह्याने जीभेवर साचलेला मळ आणी तोंडास दुर्गंध येणे ह्या समस्या कमी होतात.
४)जखम लवकर भरून येण्यासाठी कडूनिंबाचा पाला आणी हिंग ह्यांची पेस्ट जखमेवर लावणे.(क्रूपया डायबेटिस मुळे जखम भरून येत नसेल तेव्हा वैद्यांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे ह्याची नोंद घ्यावी).
५)गांधील माशी चावलेल्या जागी हिंग उगाळून त्याचा लेप लावला तर वेदना आणी सूज कमी होते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
ब)ताकावरचे लोणी:
१)हे लोणी लहान मुलांना अत्यंत पोषक आहे.त्यांना जेवणासोबत ३ भाग लोणी व १ भाग मध असे मिश्रण द्यावे(फक्त शाकाहार करत असतानाच हा उपाय करावा मांसाहार जेवणासोबत नाही).
२)रसायनांशी संपर्क,उन्हाचा प्रभाव ह्यामुळे त्वचेचा वर्ण खराब होतो तेव्हा त्वचेवर लोण्याचा लेप लावावा व पोटात देखील लोणी घ्यावे वर्ण सुधारतो.
३)गर्भिणी स्त्रीने नियमीत आपल्या आहारात लोणी ठेवावे त्यामुळे माता व गर्भ दोघांचेही आरोग्य उत्तम रहाते.
४)मुळव्याधीची तक्रार तसेच त्यात वेदना,रक्त पडणे,संडासला घट्ट होणे,संडासच्या जागी दाह होणे अशा तक्रारी असताना त्या व्यक्तिने १ ग्लास दुधामध्ये १ मोठा चमचा लोणी घालून रात्री घ्यावे व जेवणामध्ये बिनमसाल्याची दुधीभोपळ्याची भाजी खावी आराम मिळतो.
लोण्याच्या अतिसेवनाने वजन वाढते व शरीरातील मेद वाढतो.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
केवळ आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणूनही पुरणार नाही. भारतीय आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणणे आवश्यक आहे. कारण आज आणखी एक प्रकार चिकित्सा करताना विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे पाश्चात्य विचाराने अभ्यासलेला आयुर्वेद.
म्हणजे रोगाचे निदान पाश्चात्य पद्धतीने करायचे आणि चिकित्सा भारतीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे घोड्याला गाढवाचे शेपूट लावल्यासारखे होते.
भारतीय पद्धतीने निदान केले तर भारतीय पद्धतीने चिकित्सा करता येते. भारतीय पद्धतीने पथ्यापथ्य सांगता येते आणि रुग्णाला बरे वाटते. संपूर्णतः भारतीय !
थोडं आणखीन स्पष्ट करून सांगतो. जसे प्रमेह हा आजार आयुर्वेदात वर्णन केला आहे. मधुमेह हा त्याच्या वीस प्रकारापैकी एक. हा रोग का होतो, कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत, हे सर्व ग्रंथात वर्णन केलेले आहे. पण या रोगामधे रक्तातील साखरेचा संबंध आयुर्वेदात कुठेही वर्णन केलेला नाही. आणि असा हट्ट पण असता कामा नये. प्रत्येक शास्त्राचा एखाद्या रोगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. शेवटी महत्त्वाचे काय आहे, रुग्णाला बरं वाटणं, पॅथी कोणती का असेना.
हो, आणखी एक. हे माझं वैयक्तिक म्हणणे अजिबात नाही. जे ग्रंथात लिहिलेले आहे ते जसेच्या तसे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एखाद्या रोगाचा माझा आयुर्वेद कसा विचार करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का ? विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अन्य पॅथी.
त्या पॅथींचा डायबेटीस कडे पहाण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे. तो मान्यच आहे. तो त्यांच्या संशोधनाचा एक भाग असेल. पण त्याला प्रमाण मानून आयुर्वेदानुसार त्या रोगाची चिकित्सा देणे हे मला योग्य वाटत नाही.यात कुणा पॅथीला दुखावण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना अॅलोपॅथीचा अगदी कळवळा येतोय, त्या आयुर्वेद पदवीधारकांनी खुशाल तसा विचार करावा. आम्ही किती वैचारिक गुलामगिरीत वागत आहोत, याचा हा उत्तम नमुना आहे.
आयुर्वेदातून उत्तरे कशी शोधायची ? आयुर्वेदाची जी पद्धत आहे, त्याचा पूर्णपणे भारतीय पद्धतीनेच विचार केला तर उत्तर मिळेल.
तर सांगायचेय काय, माझ्या अभ्यासानुसार, प्रमेह म्हणजे डायबेटीस नाही. आणि मधुमेहामधे रक्तातल्या साखरेचा संबंध तपासावा, असे कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात लिहिलेले नाही. ( पुढील वाक्य वैद्यांसाठी आहे - "असल्यास त्याचा पुरावा दाखवावा.")
त्याच्या तपासणीचे निकष हे पूर्णपणे आयुर्वेदाचेच आहेत. ते तसेच अभ्यासले पाहिजेत.आयुर्वेदिय पद्धतिने रोगनिदान करुन आयुर्वेदिय चिकित्सापद्धति वापरणे,
यालाच म्हणतात,
चिकित्सेमागील आयुर्वेदीय दृष्टीकोन.
भारतीय आयुर्वेदातील भारतीय दृष्टीकोन.
माझे काही चुकलंय का ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
22.02.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा
विज्ञान शाप की वरदान-भाग दोन
विज्ञानाला स्वयंपाकघरात आणून ठेवल्याने त्याने भस्मासूराचे रूप घेतले आहे आणि आता तो निर्माणकर्त्यावरच उलटला आहे. त्याला कार्यालयात, दिवाणखान्यात, शिक्षणक्षेत्रात, अंतराळ क्षेत्रात जागा जरूर द्यावी, पण हा राक्षस जेव्हा आमच्या घरात घुसला तेव्हा, त्याला तिथेच बाहेर रोखायला हवा होता. आता तो एवढा माजला आहे की, त्याला आवरणे भल्याभल्यांना कठीण होत आहे. स्वयंपाकघरात तर त्याच्याशिवाय पानही हलत नाही. आता सगळं कसं "इझी" झालंय, या "इझीपणाची" ही सवय आळसाची सख्खी मैत्रीण आणि व्यायामाची शत्रू झाली आहे. आणि जे व्हायचं तेच होतंय. अनारोग्य !
विज्ञानाची भलावण करणाऱ्यांना जरूर भलावण करूदेत, पण जेव्हा पाश्चात्य तज्ञ त्यांच्या संशोधनातून सांगतील, तेव्हाच यांना पटेल, तोपर्यंत वेळ निघून गेलेली असेल.
सावध तो सुखी.
वेळीच सावध होऊन जेवढे शक्य आहे, तेवढे व्यायामाचे रूपांतर कामात केले तर रोगापासून आणि औषधांपासून आपण लांब जाऊ शकतो.
पहाटे उठून सडासारवण केले जायचे. घरातील सर्व दहा पंधरा खोल्यामधील केरवारे वाकून केले जायचे. तुळशीला प्रदक्षिणा व्हायची.जमिनीवर खाली बसून समोर एक पाय पसरून मधे जात घेऊन, जात्याच्या आवाजात घुमणारे, ओव्यांचे सूर कमी होत गेले. एका हाताने धान्य जात्यात भरत दुसऱ्या हाताने जात्याचा खुंटा ओढताना एक तान एक लय सापडायची..... आता दोन्ही हातानी गिरणीवर दळण टाकून परत आणणे यातच म्हणे हात गळ्यात येतात. आणि वर म्हणायचं काम सोप झालं.
गेले ते दिवस उरल्या त्या आठवणी. आता त्या आठवणी आठवणं देखील गुन्हा आहे.
विज्ञानाने ही सर्व यांत्रिक साधने दिल्यामुळे, आता काम सोपं झाल्याने, सर्व गृहिणी निश्चितच विज्ञानाचे आभार मानणार. आणि डाॅक्टरसुद्धा ! ( त्यांचे रूग्ण वाढले म्हणून! )
विज्ञान वापरावं. जरूर वापरावं, पण जर तेच आरोग्याच्या मुळावर येत असेल तर ! आमच्या बदलत्या पाश्चिमात्य वृत्तीमुळे शरीराच्या कमी होत असलेल्या हालचाली, बैठी जीवनशैली, हे प्रमेह, ह्रदयरोग, पीसीओडी, थायराॅईड सारख्या रोगाचे कारण आहे. हे विसरून जायचे का ?
पूर्वी दुचाकी गाडी सुरू करण्यासाठी एक तंगडी तरी झाडायला लागायची. आता एका बोटाने दुचाकी सुरू होतेय. तेवढे सुद्धा श्रम नाहीत. काम सोपे झाले.
पुरणपोळीसाठी लागणारे पुरण, पाटा आणि वरवंट्यावर वाटावे लागे, त्यासाठी उकीडवे बसावे लागे. पोट मांड्या यांना छान व्यायाम होत होता. मध्यंतरीच्या काळात पुरण यंत्र आले. पाटा वरवंटा मागे पडला, उकीडवी बैठक लुप्त झाली आणि फतकल मारून सुद्धा पुरण वाटले जाऊ लागले. आता आणखीनच सोपे झाले, पुरणपोळ्या "रेडीमेड" मिळतात. काम सोपे झाले.
सायकल चालवून आरोग्य मिळत होते, आता गाडीवरून जिममधे जाऊन तिथे सायकलच चालवावी लागते.
घरात सहजपणे मिळणारे आरोग्य शोधण्यासाठी घराबाहेर जावे लागत आहे.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
24.05.2017
आपल्या दररोजच्या जेवणात महत्त्वाचे स्थान असणारा हा मसाले वर्गामधला घटक.खरोखरच कापत असताना जरी सर्वांना रडवत असला तरी देखील आपल्या विशिष्ट चवीने रोजच्या जेवणाला एक वेगळीच चव आणतो.हा सुद्धा जमिनी खालीच उगवणारा कंद आहे.ह्याचे दोन प्रकार आहेत पांढरा आणि लाल.पांढरा कांदा चवीला गोड असतो तर लाल कांदा चवीला तिखट असतो.
कांद्याची चव तिखट गोड असते आणि हा अनुष्णशीत असतो थोडक्यात सांगायचे तर कोमट पाणी कसे असते तसा त्यामुळे हा शरीरातील वात आणि कफ दोष कमी करतो पण पित्त वाढू देत नाही.औषधे पोटात घयायची असतील तर त्यासाठी पांढरा कांदा वापरावा पण बाहेरून लावण्यासाठी लालकांदा उत्तम.
चलातर आता तुमच्या स्वयंपाक घरातील कांदा वैद्याची भूमिका कशी बजावितो हे पाहूयात ना!
१)मुळव्याधी मध्ये ब-याच जणांना संडासला घट्ट होते त्यांनी कांद्याचा रस दह्यात मिसळून खावा.
२)जुलाब होत असल्यास अथवा आव पडत असल्यास कांद्याचा रस साजूक तूपासोबत प्यावा.
३)कांदयाच्या आडव्या गोल पातळ चकत्या कापाव्यात प्रत्येक चकतीवर खंडीसाखर घालून एकावरएक रचून ठेवावी काही वेळाने जो रस वाटीत उतरेल तो सर्दी ,खोकला ह्यात कफसुटून पडायला उत्कृष्ट काम करतो.
४)खरूज अथवा गजकर्ण ह्यात कांद्याच्या रसात हळकुंड उगाळून लावा खाज देखील कमी होते आणि व्याधी बरा होतो.
५)मार लागणे,मुरगळणे,सुज ह्यावर कांद्याचा रस आणि मोहरीचे तेल एकत्र करून कोमट करून दुखणा-या भागावर लावावे सूज आणि वेदना एकदम कमी होतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti