मुळ्याचा वापर हा भाजी करायला तर केला जातोच, तसेच सांबार,आमटी,डाळ,कोशिंबीर,लोणचे इ पदार्थ तसेच कोलंबीची मुळा घालून केलेली आमटी हे सर्वच पदार्थ रूचकर व चविष्ट लागतात.
जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे. मन जर जेवणात नसेल तर अन्न पचत नाही.रसांचा आस्वाद नीट घेता येत नाही. आपण खात असताना लक्ष टीव्ही बघण्यात असेल तर लोणचे खातोय की मीठात बोट जातंय, हेच लक्षात येत नाही. सरळ सरळ एक चव बदलून दुसरी चव तोंडात जातेय. परिणाम बदलणारच.
आपल्या पैकी ब-याच मंडळींना कच्च्या केळ्याची भाजी व केळफूलाची भाजी नक्कीच आवडत असणार.कच्च्या केळीचे काप,भाजी,भजी,चिप्स अगदी छान लागतात तर केळफूलाची भाजी,कटलेट देखील रूचकर लागतात बरं का.
जसे ह्या दोघांचा स्वयंपाकात उपयोग होतो तसाच ह्याचा युक्तीपुर्वक वापर केल्यास आपण ह्याचा घरगुती उपचारात देखील उपयोग करू शकतो.
कच्चे केळे हे तुरट गोड थंड गुणाचे असून शरीरातील कफ पित्त कमी करते तर केळफूल हे चवीला कडू तुरट असून उष्ण असते व हे शरीरातील वात कफ हे दोष कमी करते.
आता ह्यांचे औषधी उपयोग पाहूयात:
१)जुलाब होत असल्यास कच्च्या केळीचा चीक तांदुळाच्या पेजेसह प्यावा.
२)संडासमधून आव पडत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून द्यावा.
३)अपचन,अम्लपित्त ह्यात कच्च्या केळीच्या पिठाच्या चपात्या कोरड्याच खाव्यात
४)मधुमेही रूग्णांना कच्च्या केळीची व केळफूलाची भाजी पथ्यकर आहे.
५)कच्च्या केळीच्या सालीची राख एरंडेल तेलात मिसळून पायाला पडणा-या कात्र्यांवर लावावे.
६)मासिक पाळीच्या वेळी अतिरक्तस्त्राव होत असल्यास केळीच्या बोंडाचा रस दह्यातून खायला द्यावा.
कच्ची केळी व केळीचे बोंड खायचा अतिरेक केल्यास संडासला साफ न होण्याची तक्रार होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
सहा वेळा पान खाल्ल्यानंतर तोंडात जी लाळ तयार होते, ती गिळावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेळी केवळ चावून थुंकायचे आहे. आणि नंतरची लाळ येईल तेवढी सावकाश निर्माण करून गिळायची आहे.
डोक्याचं लालभडक कुंकु गेलं पण तोच लालभडकपणा डोक्यावरून उतरून ओठावर येऊन चिकटला. लिपस्टीक लावण्याने ओठ अधिक आकर्षक दिसतात. आपण सुंदर दिसावं. पण आपल्याकडे कुणी वाईट वासनामय नजरेनं बघू नये, शृंगार एवढा सोज्वळ असावा. हा झाला भारतीय दृष्टीकोन.
अंजीर हे फळ ओले अथवा सुक्यामेव्यात जगभर प्रसिध्द आहे.तसेच बऱ्याच लोकांचे हे आवडते फळ आहे.ह्याचे काळे व लाल असे दोन प्रकार आहेत.आता तर ड्रायफ्रूट मिठाई मध्ये अंजीर हमखास वापरतात,तसेच सुक्या अंजिराचे शेक देखील केले जाते.
अंजिराचे १२-१५ फुट झाड असते व त्याला वसंत ऋतुमध्ये फळे लागतात व ग्रीष्म ऋतुमध्ये ती पिकतात.ह्याची पाने आकाराने मोठी व काळपट हिरवी असतात.
अंजीर चवीला गोड,थंड व वात पित्तनाशक आहे व थोड्या प्रमाणात कफ वाढवितो.
आता आपण त्याचे घरगुती उपयोग पाहूयात:
१)तोंडातील जीभ,दात,हिरड्या ह्यांचे आरोग्य टिकवायला अंजीर चावून खावे.
२)लघ्वीची जळजळ,उग्रवास,खरपडणे ह्यात अंजीर खावा फायदा होतो.
३)लहान मुलांचे पोट फुगून संडासला खडा होतो कारण पोटात मळ सुकतो अशा वेळेस सुका अंजीर पाण्यात कोळून ते पाणी त्याला पाजावे.
४)अशक्तपणा,वजन कमी होणे,सुका खोकला,संध्याकाळी बारीक ताप येणे,ह्यात २ अंजीर +१ चमचा ज्येष्ठमध चुर्ण हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी त्या व्यक्तीला द्यावे व नंतर २ तास काही खायला व प्यायला देऊ नये.असे ३ आठवडे करावे.
५)बऱ्याच लहान मुलांना जेवणामध्ये काही तरी गोड लागते अशा वेळी त्यांना जेवणात अंजीराचा पाक करून द्यावा ह्याने त्यांचे पोषण देखील होते.
अंजीर खायचा अतिरेक केल्यास भुकमंदावणे,जुलाब होणे अशा तक्रारी उद्भवतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
जे जे देवासाठी ते ते देवासाठी या न्यायाने देवाला जी फुले वाहिली जातात, ती दुसऱ्या दिवशी तशीच टाकून देण्यापेक्षा औषधी म्हणून वापरली गेली तर ? आणि कोणाच्याही धार्मिक भावना न दुखावता, या निर्माल्याचे पूर्ण पावित्र्य जपून वापरवी गेली तर फुलांचे औषधी गुण पण मिळतील आणि दैवी गुण सुद्धा !
हे चवीला कडू असले तरी आहे मात्र फारच पौष्टिक बरे का.ह्याच्या कडू चवीमुळे ब-याचं मंडळींना हे आवडत नाही.पण ह्यात असणा-या औषधी गुणांमुळे प्रत्येकाने ही भाजी खायलाच हवी.
ज्यांना हि भाजी आवडते ते ह्याची तळलेली कापं,भजी,चटणी,भाजी असे विविध प्रकार करून खातात.
कारल्याचा वर्षायू वेल असतो.व आपण खातो ते कारले म्हणजे ह्या वेलीला लागणारे फळ होय.कारले हे चवीला कडू तिखट असते व उष्ण असून त्रिदोषघ्न असते.
ह्याचा उपयोग जसा स्वयंपाकात केला जातो तसाच घरगुती उपचारात देखील आपण कारले वापरू शकतो.
१)संडास मधून आव पडत असल्यास कारल्याचा रस तीळ तेलात मिसळून प्यावा.
२)ज्यांना कृमी होण्याची सवय असते त्यांनी १/४ कप कारल्याचा रस+१/४ चमचा वावडींगाचे चुर्ण सकाळी उपाशी पोटी प्यावे व त्यावर तासाभराने एरंडेल तेल प्यावे.
३)छातीत कफ साचून खोकला येत असल्यास १/२ कप कारल्याचा रस +२ चमचे मध+१/४ चमचा मिरीपूड हे मिश्रण घ्यावे.
४)ज्या इसब व खरूज ह्यात स्त्राव होतो त्यात कारल्याचा रस व हळद एकत्र करून लावावी.
५)अंगात बारीक ताप,अंगदुखी,तोंडास पाणी सुटणे,भुक न लागणे ह्यात कारल्याचे बारीक तुकडे+दालचिनी+काळी मिरी+वेलची रात्रभर पाण्यात भिजत घालून दुस-या दिवशी दिवसभर हे पाणी थोडे थोडे प्यावे.
कारले खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरात वात वाढून संडास व लघ्वी साफ न होणे व अंगमोडून येणे अशा तक्रारी होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
हे परमेश्वरा, मला या जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्त व्हायचे आहे. यासाठी मला तू अंतिम सत्य सांग. मला एवढे कळते आहे, की माझे अंतिम सत्य तूच आहेस. तरीदेखील माझी बुद्धी मला वेळोवेळी तुझ्यापासून लांब नेते. माझ्या बुद्धीला तू स्थिर बनव.
आता आपण ओल्या नारळाचे घरगुती उपयोग पाहुयात:
१)कृमी मध्ये नारळाचे दुध १/२ कप सकाळी अनशापोटी प्यावे व नंतर तासाभराने एरंडेल तेल प्यावे.
२)हाता पायांना पडलेल्या भेगांवर चुन्याची निवळी+ एरंड तेल+ नारळाचे दुध हे मिश्रण घोटून मलम करावे व लावावे.
३)नारळाच्या खोबऱ्याच्या वड्या केशर,वेलची,जायफळ घालून कराव्या ह्या फुफ्फुसे बळकट करतात.
४)गोवा कोकण भागामध्ये नारळाचे दुध काढुन त्यात कोकम,मिरची,लसूण,मीठ घालून सोलकढी करतात जेवणानंतर शेवटी भातात मिसळून खाता ही पाचक असते.
५)ओले खोबरे व गुळ हे मिश्रण बल व बुद्धीवर्धक आहे.
६)किसलेले खोबरे व खोबरेल तेल एकत्र शिजवून त्याचा पोटीस हा सुज व मार लागलेल्या जागी बांधला असता वेदना कमी होतात.
७)ओल्या नारळाचा रस व शहाळ्याचे पाणी हे मिश्रण लघ्वी कमी होत असल्यास प्यावे ह्याने लघ्वी सुटायला मदत होते.
८)नारळाचे पाणी १ लिटर भर घ्यावे व काकवी सारखे होई पर्यंत आटवावे मग त्यात जायफळ,सुंठ,मिरी,वेलची,जायपत्री ह्यांची पुड घालून बाटलीत भरून ठेवावे हे मिश्रण पोटदुखी किंवा पोटात आग होत असल्यास १० मिली दिवसातून २ वेळेस सकाळ संध्याकाळी २ आठवडे घ्यावे.
(क्रमश:)
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती.)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti