मराठीसृष्टी या आघाडीच्या आणि लोकप्रिय मराठी वेबपोर्टलवर ब्रिगेडिअर हेमंत महाजन हे गेली अनेक वर्षे “राष्ट्रीय सुरक्षा” या विषयावर नियमितपणे लेखन करत आहेत. हे लेख अल्पावधीतच आमच्या हजारो वाचकांच्या पसंतीला उतरले असून अतिशय लोकप्रिय झाले आहेत.
“भारताची सुरक्षा” हा विषय नेहमीच लोकांच्या जिव्हाळ्याचा राहिला असून २६/११ च्या हल्ल्यांनंतर तर तो मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या चिंतेचा विषयही झाला आहे. `आव्हान भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे` या इ-पुस्तकात भारताच्या “अंतर्गत सुरक्षे”शी संबंधित लेखांचे संकलन करुन ते वाचकांपर्यंत आणले आहे. ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला आहे.
स्वत: युद्धभूमीवर शत्रूचा सामना केल्यामुळे त्यांच्या लिखाणात सुरक्षेविषयीची कळकळ आणि ढोंगी राजकारणाबद्दलची चिड जाणवते. त्यांचे लिखाण अत्यंत मोकळेपणाने आणि कोणतीही भीड न ठेवता केलेले असते. त्यामुळेच ते वाचकांना भावते. वातानुकुलित केबीनमध्ये बसून पत्रकारिता करणार्या किंवा दूरदर्शन चॅनेलवर भडकाऊ चर्चा करणार्या पत्रकार आणि नेत्यांपेक्षा प्रत्यक्ष सीमारेषेवर जवानांचे नेतृत्त्व केलेल्या एका सेनाधिकार्याने सत्ताधार्यांना सुनावलेले खडे बोलही वाचकाला आपलेसे वाटतात.
या पुस्तकातील लेखांची यादी पुढील पानांवर :
या पुस्तकातील लेख :
भारत भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते डॉक्टर स्नेहल तावरे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात संतांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे संतांचे योगदान आणि संत साहित्याची समीक्षा या डॉक्टर नीला पांढरे यांच्या लेखाने या पुस्तकाचा प्रारंभ होतो
साधारणत: असे मानले जाते की, उत्तर दिग्विजयाच्या मोहिमेवर निघालेल्या मराठी सेनेसमवेत अनेक कुटुंब बृहन्महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थायिक झाली. महाराष्ट्राच्या सीमारेषेच्या अवतीभोवती असलेले राज्य म्हणजे मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश. बृहन्महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या लोकसंखेच्या १८ टक्क्यांपेक्षाही जास्त लोकसंख्या आहे.
आजवर कुणी या विषयावर कधी पुस्तक लिहिण्याचा विचारच केला नसेल असा हा विषय म्हणजे ( पंढरपूरपासून ) उलट परतीची वारी ! आषाढी एकादशीला महाराष्ट्रमाऊली विठाईच्या दर्शनाला लाखो भाविक पिढ्यानपिढ्या करीत असलेली वारी, हा एक जागतिक कुतूहलाचा विषय झाला आहे. त्यामुळे यावर आजपर्यंत आणि दरवर्षी विविध लेख, विशेषांक , चित्र सफरीच्या शॉर्टफिल्म्स, कथा, पुस्तके , वृत्तवाहिन्यांचे दैनंदिन वृत्तांत आपण पाहतोच.
पण .. एकादशीनंतर ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका पुन्हा आळंदीला घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांची " परतवारी ", म्हणजे काय प्रकार असेल ? याची कुणीही फारशी दखलच घेतलेली नाही. सुधीर महाबळ नामक एका इंजिनियर तरुणाने अनेकवर्षे नित्यनेमाने वारी केल्यानंतर त्याला नेमकी याचीच उत्सुकता होती. गेली काही वर्षे ही अतिशय खडतर परतवारी करून त्याने लिहिलेल्या " परतवारी" या अत्यंत वेगळ्या आणि अस्पर्श विषयावरील मराठीतील एकमेव पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन, अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते झाले. यावेळी केलेल्या भाषणांतून डॉ. रवीन थत्ते, शरद काळे, अच्युत गोडबोले, अरुण साधू, दीपा देशमुख, अशा सर्व नामवंत लेखकांनी या पुस्तकाचे खूप कौतुक केले.
महत्वाचे म्हणजे सुधीर महाबळ याच्या पायाला गंभीर अपघात होऊन २ मोठ्या शास्त्रक्रियांनंतर तो सुमारे १ वर्ष अंथरुणावर पडून होता. त्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने उभा राहून तो इतकी कठीण आणि शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी परतवारी करतो आहे. नोकरीनिमित्त विदेशात असताना केवळ या परतवारीसाठी तो भारतात येत होता.
हे संपूर्ण पुस्तक म्हणजे एका वेगळ्याच विषयाची , वेगळ्याच वाटेने, वारी आणि परतवारी घडविणारे सुंदर पुस्तक आहे. प्रवास जरी पंढरपूर ते आळंदी असला तरी तो वाचकांना अनेक पातळीवर घडतो. या परतवारीत चालायला लागल्यावर कधी माणसे दिसतात तर कधी व्यक्तिचित्रे दिसतात. माणसांच्या मनोव्यापारांबरोबरच अनेकदा या परतवारीत सुंदर निसर्गचित्रे दिसतात. समोरच्या घटनेचे जे कारण दिसते ते आपले बुद्धिवादी मन थेट स्वीकारत नाही आणि केवळ आपल्याला कारण कळत नाही म्हणून त्या घटना घडणे थांबत नाही. त्याचमुळे आपण ज्यांना अद्न्य समजतो ती माणसे एखाद्या गोष्टीचा निखळ आनंद घेत असतांना, आपला बुद्धिवादाचा, आपणच घातलेला अडसर, या आनंदात आपल्याला पूर्ण भिजू देत नाही. त्यांच्या मळक्या कपड्यापासून आणि बाचक्या - गबाळ्यापासून आम्हा वाचकांचे जीन्स-टीशर्ट- सॅक वेगळेच राहतात. पुस्तक वाचतांना सतत येणारा हा अनुभव विलक्षण आहे. चमत्कार घडला तरी आम्ही तो मान्य करीत नाही, योगायोग समजतो. वारकऱ्यांच्या ऐहिक दारिद्र्य आणि अध्यात्मिक श्रीमंतीचा अदृश्य गोफ सतत गुंफताना जाणवतो.
या वारीत रोजच्या ऐहिक गोष्टी करता करता ती अध्यात्मिक पातळीवर कधी पोचते हेच कळत नाही. माउली, रथ, पादुका, वाजंत्री, माणसे, वाहने, भक्तिभाव, प्राणी, औदार्य, माणसांच्या स्वभावांचे विविध रंग , गरजा अशा अनेक गोष्टींची ही परतवारी पावसाच्या विविध छटांतून , चंद्र - सूर्यप्रकाशातून अनेक गावांमधून टप्पे घेत - पडाव टाकत - वळणे घेत मुक्कामाला पोचते तेव्हा .... ! त्या वेळेपुरती पूर्ण झालेली परतवारी ही पूर्णत्वाच्या आनंदाबरोबरच " पुन्हा पुढच्या वर्षी करायलाच हवी " अशी अपूर्णतेचे बीजही पेरते.
एक विलक्षण अनुभव सर्वांनी जरूर वाचावा असा आहे.
संपर्क - श्री. सुधीर महाबळ ... मोबाईल क्र. ९१६७७२०४१३
मकरंद करंदीकर
वाचाल तर वाचाल, असे आपण नेहमी ऐकतो. या उक्तीची कृती करण्याची कशी गरज आहे, हे या पुस्तकावरून समजते. लेखक सतीश पोरे यांच्या या पुस्तकातील एकूण ९ भागांतून वाचन संस्कृतीचा वेध घेतला आहे.
येत्या शनिवारी म्हणजेच दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता, नूतन बांदेकर लिखित मनतरंग (भाग १) या ललित लेखसंग्रहाचे व अॅडिओ सीडीचे प्रकाशन नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पहिला मजला, ठाणे (प) येथे होणार असून माननीय महापौर संजयजी मोरे (ठाणे महानगरपालिका) यांच्या हस्ते प्रकाशन होईल. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संपदा जोगळेकर-कुलकर्णी (अभिनेत्री), मिलिंद बल्लाळ (संपादक दै. ठाणे वैभव) , दीपक वेलणकर (व्हॉईस गुरु) ही नामवंत व्यक्तिमत्व लाभलेली आहेत. आपण या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती !
श्रोते हो, आपण माझ्या लिखाणाला देत असलेल्या उदंड प्रतिसादामुळे मला सतत लिहीत रहाण्याची उर्जा मिळते. तीच विचारांची मालिका आणि तंत्रज्ञानाची कास धरुन निर्माण झालेलं त्याचं हे श्राव्यरुप मी खास आपल्यासाठी सादर करीत आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी माझा हा खारीचा वाटा ! आजच्या विद्यार्थी वर्गाला मराठी भाषा वाचन आणि उच्चार सुधारण्यासाठी मदतीचा हात देण्याचा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी माझा हा वेगळा प्रयत्न आहे. आपण माझी ही नवनिर्मिती स्विकारुन, नक्कीच प्रतिसाद द्याल, ही अपेक्षा !
घेऊन तेव्हा येईन मी, विचारांचे नवीन रंग !
द्याल जेव्हा साद मित्र हो, पुन्हा उमटतील मनतरंग !
मनापासून धन्यवाद !
- नूतन बांदेकर

हॉंगकॉंगमध्ये राहणाऱ्या अनिता या सिंधी सुखवस्तू कुटुंबातील. कॉर्पोरेट जगतात त्या काम करीत असताना डॅनी मुरजानी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.
लॉक ग्रीफिन.. नावातच वेगळेपण आणि पुस्तकातही. ही एक अतिशय महत्वाकांक्षी कादंबरी आहे. उत्कंठावर्धक आणि चित्तथरारक गोष्टी आवडणाऱ्या पुस्तकप्रेमींसाठी लॉक ग्रीफिन म्हणजे पर्वणीच.

मराठी साहित्यविषयक विविध मान्यवरांचे अभ्यासपूर्ण लेखांचा संग्रह.
त्यात महात्मा फुले यांची मराठी वाङमयाला देणगी, प्रा. वा. म. जोशी यांच्या तात्विक लेखनातून प्रकटणारी जीवनदृष्टी, साने गुरुजींचे निबंधखन, कला म्हणजे काय? वाङमयीन वादळ, गो.वि. करंदीकरांचे अॅिस्टॉटलच्या काव्यशास्त्रविषयक, सुखांतिका, अभिजात साहित्य आणि लोकप्रिय साहित्य, अनुभवामृताचे साक्षेपी विवेचन, र. धों. कर्वे प्रकल्पाची फलश्रुती, ज्योत्स्ना देवधर: एक सफल लेखनप्रवास, नाट्यदर्पणकार रामचंद्र - गुणचंद्र आणि त्यांची रसविषयक भूमिका, स्त्रियांच्या साहित्यातील देशीयतेचा आविष्कार, स्त्री-पुरुष संबंधाच्या चित्रनाच्या समस्या, मराठी नाटकातील स्त्रियांची रुपे, कवितेचा अन्वयार्थ, इत्याची लेखांचा अभ्यासपूर्ण आढावा या पुस्तकात एस.एन.डी.टी विद्यापीठातील मराठी भाषा विभागाचे प्रमुख डॉ. विलास खोले यांनी घेतलेला आहे.
विमर्श
लेखक : विलास खोले
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य :
मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. इंग्रजांना ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला आणून स्थानबध्द केलं. राजाचा मोठा डामडौल होता. राण्यांवर तो खूप खर्च करावयाचा. आपल्या राहणीमानाला पूरक व्हावं म्हणून त्याने पोत्यांमधून जडजवाहिर बोटीत बसायच्या आधी टाकून घेतलं होतं. रत्नागिरीला आल्यावर जवळचे जडजवाहिर विकून ते आपला थाट करीत होते. रत्नागिरीला त्यांच्यासाठी 'थिबा पॅलेस' बांधण्यात आला. घरातील अंतर्गत बाबींचा यात अंतर्भाव केलेला आहे.
राजा थिबा
लेखक : मधु मंगेश कर्णिक
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १३०/- रुपये
पाने : १२८
Copyright © 2025 | Marathisrushti