(User Level: User is not logged in.)

परिचय – परिक्षण

Sort By:

  • दास्ताने आगरा

    जेष्ठ हिंदी लेखक मेवाराम यांच्या कादंबरीचा किमया किशोर देशपांडे यांनी केलेला हा अनुवाद आहे आग्र्याच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली ही ऐतिहासिक कादंबरी आहे

  • मराठी ग्रंथसंपदा 2008

    मराठी ग्रंथव्यवहारांसंबधीत सर्व घटकांची माहिती संबधीत सर्वांना व्हावी. वर्षभरात नवी पुस्तके कोणती निघाली? त्यांची अद्ययावत व सर्वंकष सूची सर्व ग्रंथखरेदीकर्त्यांना सहज उपलब्ध व्हावी. संपर्क : नचिकेत प्रकाशन, 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, पाने : १२०, किंमत : २०० रु. भ्र. 9225210130

  • बगळा’ या कादंबरीचा वीणा गवाणकर यांनी घेतलेला आस्वाद

    “बगळा” या प्रसाद कुमठेकरांच्या कादंबरीचा ज्येष्ठ साहित्यिक चरित्रकार वीणा गवाणकर यांनी घेतलेला आस्वाद

  • यशस्वी नेतृत्वासाठी प्रभावी व्यक्तिमत्त्व

    संस्थेत असो, संघटनेत असो की व्यवसायात असो सर्वत्र नेतृत्व करावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. ज्याचे नेतृत्व आहे त्यांना ते यशस्वी व्हावे, असे वाटते. परंतु यशस्वी नेतृत्वासाठी हवे असते, प्रभावी व्यक्तिमत्त्व. तेव्हा आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी कसे करावे आणि त्यातून यशस्वी नेतृत्व कसे साकारावे, हे सांगणारे छोटे परंतु बहुउपयोगी पुस्तक पुस्तक : यशस्वी नेतृत्वासाठी प्रभावी व्यक्तिमत्त्व लेखक : विजय देशपांडे, पाने : 51, किंमत : 50 रू. प्रकाशन : नचिकेत प्रकाशन, नागपूर-15 भ्र.9225210130

  • वेदांच्या वेदीवरुन

    जगभरात जातीयता, स्त्री-पुरुष असमानता, उच्च – नीच फरक दिसतो. भारतात त्याचे प्रमाण मोठे आहे. वर्णभेद, जातीभेदाची झळ विशिष्ट समाजाला बसत आली आहे.

  • दिसें वांयां गेलों

    सत्तरीच्या दशकात वयात आलेली तरुण मुलं आणि त्यांच्या जगण्याचं भान या कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे. मात्र ते सत्तरीच्या दशकापुरते मर्यादित नाही. चक्रधर, या कादंबरीचा नायक, अशा पिढीचा प्रतिनिधी आहे. तो समूहात असूनही एकाकी आहे. चक्रधरचा आणि त्याच्या पिढीचा हा प्रवास अरविंद रे यांनी मोठ्या ताकदीने चित्रित केला आहे.

  • जागतिक खगोलशास्त्रज्ञ

    जागतिक खगोलशास्त्राच्या विकासात प्राचीन काळापासून ज्यांनी मोलाची भर टाकली अशा 49 महत्त्वपूर्ण जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रांचे जीवन आणि त्यांचे कार्य यांचा परिचय या पुस्तकांत साधार करून दिला आहे. यात 13 भारतीय खगोलशास्त्रज्ञही आहे. प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी हे मराठीतील अशा प्रकारचे एकमेव पुस्तक लिहिले आहे. विलास कुळकर्णी जागतिक खगोलशास्त्रज्ञ लेखक : प्रा. प्रकाश माणिकपुरे पाने : 125 किंमत : 125 रू. नचिकेत प्रकाशन 9225210130

  • देवस्वरूपा कामधेनु: वैज्ञानिक महत्त्व

    आजच्या नवीन पिढीत गायीचे हे वैज्ञानिक महत्व पुन्हा सांगण्याची निकड निर्माण झाली आहे. देवस्वरूपा कामधेनु : वैज्ञानिक महत्त्व हे अत्यंत अभ्यासपूर्ण, संदर्भपरिपूर्ण संग्राह्य पुस्तक प्रकाशित केले आहे प्रा. विजय यंगलवार यांनी त्यांचे संकलन संपादन केले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ विद्‌वान श्री रामभाऊ पुजारी यांनी लिहिली आहे. देवस्वरूपा कामधेनू : वैज्ञानिक महत्त्व नचिकेत प्रकाशन : प्रा. विजय यंगलवार पाने : १४०, किंमत : १२५ रू.

  • शेतीमातीची सल ‘ करपलं रान सारं’

    शेतीमातीचे प्रश्न नवे नाहीत. ते आदीम काळापासून आलेले आहेत. जो दुसऱ्याला जगवितो त्याच्या स्वतःच्या जगण्याचे काय ? या प्रश्नाने अश्वस्थ झालेले आणि स्वतः घेतलेले अनुभव आविष्कृत होण्याची तडफ कवितेतून मांडणारे डॉ.प्रभाकर शेळके हे 'करपलं रान सारं' या कवितासंग्रहातून व्यक्त होतात. मिरगाचा खेळ,दु:ख सांदीत ठेऊन, निबर मनाने, बया काटेरी उनगा, बेंदाड अंगावर येणार , चिभडं पिकांचा हुडहूड होम अशी शब्दरचना ग्रामनात्याची साक्ष देतात. धान्य पिकविले जाते. ते विकले जाते. शेतकऱ्यांची पदोपदी पिळवणूक होते.हे सांगताना ते म्हणतात.
    करपलं रान सारं,झाला डागीनचा वाडा
    गाव वेशीला टांगला,ह्यो ग जन्माचा ख्वोडा
    गावचं गावपण हरवत चाललय. शहराच्या ओढीनं माणसं जास्त व्यावहारिक बनत आहेत.गाव, गावचा मळा, माणसाचा लळा ओसाड होतो की काय ?अशी अनामिक भिती कवीला सतावते आहे. 'गेला गावकुस' या कवितेत ते खंत व्यक्त करतात.
    गेला गावकुस गेला लपंडाव
    व्यसनाचे पेव आता गावांमध्ये
    अध्यात्माची वाटचाल पुर्वीइतकी निर्मळ आता राहिलेली नाही. देवाच्या वाटेवर भक्तीमार्गाचा वास असतो तरी अपघातात मरण येते. तोंडामध्ये ईश्वराच्या नामोच्चार असतो मग असे का घडावे? देवाच्या नावाने धर्मभोळेपणा जपला तर जात नाही ना? हे विचारण्याचे धाडस कवीने दाखविले आहे.
    असं दिंडीचं मरण
    उभ्या जन्माची जिभाळी
    सवसांज आहेवाची
    कशी रडते आभाळी
    'करपलं रानं सारं ' हा कवितासंग्रह वाचताना काही प्रश्न उभे केले आहेत. तर काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.ते म्हणतात काळ्या आईच्या प्राक्तनातून माझ्या भूमियांच्या वेदनेचे कढ मला नेहमीच अस्वस्थ करत आले. खरेतर अस्वस्थताच लेखनाची उर्जा असायला हवी. आजची गावखेड्याची अवस्था पाहून कवी गलबलतो. कुणब्यांची दु:खसल कुणबावा असल्याशिवाय मांडता येत नाही. अनुभवाची शिदोरी पाठीशी लागतेच.
    कुणबी कर्जात बुडाला
    सालदार घेई झोके
    मोंढ्यामंदी टपलेले
    त्यांच्या मालावर बोके
    साध्या शब्दात समर्पक आशय कवीने मांडला आहे. जालना हा मराठवाड्यातील जिल्हा. तेथील बोलीभाषेचा शब्दपरिपोष कवितासंग्रहात जाणवतो.तो स्वाभाविक आहे.करपलं रान सारं मध्ये पाच श्रृंगारिक लावण्यादेखिल आहेत. हायकू हा काव्यप्रकार कवितासंग्रहात आला आहे. बेकारीचे चटके उद्धृत केलेले आहेत. ही प्रचंड मोठी समस्या आहे. खेड्यातील तरूण युवक शहरांकडे धावत आहे. पोटाचे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या बाबतीत हा संग्रह नाविन्याचा शोध घेत आहे.एकूण बासष्ट कवितांचा समावेश यात आहे. सरदार जाधव यांनी केलेले मुखपृष्ठ बोलके आहे. कुंडलिक अतकरे यांनी देखणा कविता संग्रह बनविला आहे.फक्त एकाच विषयावरील कवितांचा समावेश होणे शक्य झाले असते तर वेगळी झालर प्राप्त झाली असती. सर्वच कविता गेय आहेत. नादनिर्मितीमुळे हृदयापर्यंत भिडतात.
    करपलं रान सारं (कवितासंग्रह​)
    डॉ. प्रभाकर शेळके
    कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद
    पृष्ठे;७१ मुल्य ; ७०₹

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार,बीड
    सं.९४२१४४२९९५

  • रामजन्मभूमी मुक्ती : एक अभूतपूर्व आंदोलन

    भारतीय जनमानसाचे आराध्य असणाऱ्या प्रभु श्री रामचंद्राच्या रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातील एक अभूतपूर्व आंदोलन आहे. स्वातंत्र्य आंदोलनापेक्षा अधिक व्यापक तीव्र असे हे आंदोलन या जन चळवळीचा साक्षेपी सखोल व साधारण मागोवा घेतला आहे प्रसिद्ध पत्रकार विचारवंत रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन लेखक : दि. भा. घुमरे पाने : १६०, किंमत : १५० रू. नचिकेत प्रकाशन : 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130