भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांनी भरलेला आहे. कायदेभंगाची चळवळ, अहिंसक सत्याग्रह, शत्रूला हिंसक मार्गाने संपवण्याची क्रांतिकारक चळवळ असे सारे प्रकार या स्वातंत्र्यलढ्यात अंगीकारण्यात आले. हा सगळा इतिहास आज उपलब्ध आहे तो निरनिराळ्या स्वरूपातील पुराव्यांच्या रूपाने. ‘चलेजाव’ची १९४२ सालातली चळवळ. हा स्वातंत्र्यचळवळीतील आंदोलनाचा शेवटचा टप्पा होता. इतर सर्व आंदोलनापेक्षा १९४२ ची चळवळ खूपच वेगळी होती. एकतर या चळवळीला एक असा नेता नव्हता, कारण गांधीजींपासून बहुतेक सारे महत्त्वाचे नेते तुरुंगात होते. भूमिगत नेते आणि कार्यकर्ते ही चळवळ चालवत होते. अंतिम टप्प्यात आलेले स्वातंत्र्य आंदोलन या शेवटच्या लढाईत तेजाळून उठले… योगोयोगाची गोष्ट म्हणजे, ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित दोन महत्त्वाचे दिवस येतात. नऊ ऑगस्टला बेचाळीसच्या लढ्यानिमित्त साजरा होणारा क्रांतिदिन आणि पंधरा तारखेस स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्य चळवळीची आठवण जागवणाऱ्या एका पुस्तकाबद्दल जाणून घेणे म्हणूनच अगत्याचे ठरेल.
राजधानी दिल्लीत असलेल्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या कार्यालयाच्यावतीने वेगवेगळी पुस्तके नेहमीच प्रकाशित होत असतात. नेहमीच्या पुस्तिकांपेक्षा ‘बॅकग्राऊंडर’चे स्वरुप वेगळे आहे. निवडणुकीच्या धकाधकीच्या काळात बिनचूक, विश्वासार्ह आणि उपयुक्त संदर्भ आवश्यक असतात. पत्रकार व विश्लेषकांना त्यामुळे अचूक व मुद्देसुद मांडणी करता येते.
भारतीयांची प्रज्ञा आता जगात पुन्हा नव्याने गाजत आहे. भारतीय आणि गणित यांचा अतूट संबंध तर जगात सर्वांच्याच मनात ठसलेला आहे. गणिताच्या विकासात अनेक भारतीय गणितींनी/गणितज्ञांनी वेळोवेळी मोलाची भर टाकली. भारतीय गणिती दुसरी आवृत्ती पाने : १८०, किंमत : १८० रू. 24, योगक्षेम ले आऊट, स्नेहनगर, वर्धारोड, नागपूर-400015, (:0712-2285473, 9225210130
साहित्यात बराचसा मान मचकुरापेक्षा माथ्ल्यामुळे मिळतो हे ध्यानात येई पर्यंत पन्नाशी आली .’ या सुरवातीच्या वाक्याने जी मनाची पकड घेतली ते ‘इत्यलम’ या शेवटच्या शब्दा पर्यंत. मुकुंदराजाच्या विवेकसिंधू पासून ते शाहिरांच्या लावण्यापर्यंतचा इतिहासाचे हे अजोड विडंबन! एक छोटेखाननी पुस्तक .फक्त शहात्तर पानांचं !विडंबन हे विनोदाच व्रात्य तरी लाडक आपत्य,याची प्रचीती देणार.
वाचाल तर वाचाल, असे आपण नेहमी ऐकतो. या उक्तीची कृती करण्याची कशी गरज आहे, हे या पुस्तकावरून समजते. लेखक सतीश पोरे यांच्या या पुस्तकातील एकूण ९ भागांतून वाचन संस्कृतीचा वेध घेतला आहे.
गौरवशाली प्रगत संशोधन करणारे भारतीय वैज्ञानिक अनेक शतके भारत विविध आक्रमणांना तोंड देत राहिल्याने या देशात औद्योगिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली स्थिरता आणि शांतता नव्हती. सतत लढाया, अशांतता होती. यामुळे मधल्या काळात येथे संशोधनासाठी पूरक वातावरण निर्माण होऊ शकले नाही. मात्र तरीही वैदिक काळात व नंतरही भारतात विविध विषयांवर संशोधन झाले होते. त्याकाळी व त्यानतर भारताने संशोधन क्षेत्रात केलेल्या गौरवशाली प्रगतीची ओळख करून देणारे काही साहित्य जाणीवपूर्वक प्रकाशित होत असते. नचिकेत प्रकाशनाने प्रसिद्ध केलेले डॉ. मधुकर आपटे यांचे ङ्गभारतीय वैज्ञानिकङ्घ हे पुस्तक अशाच प्रकारातील आहे.
या पुस्तकाबाबत उल्लेखनीय बाब म्हणजे जुन्या काळात झालेल्या वैज्ञानिक प्रगतीची माहिती मोघम व अस्पष्ट नसून थोडक्यात पण अतिशय मुद्देसूद आहे.
उदाहरणार्थ- ङ्गप्राचीन भारतीय खगोलविद आर्यभट्टङ्ख मध्ये आर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याबाबत व पृथ्वीवरील नाक्षत्र दिनाचा (डळवशीशरश्र ऊरू) काळ काढण्याबाबत केलेल्या संशोधनाची माहिती देताना नमूद केले आहे की-
ङ्गआर्यभट्टांनी पृथ्वीचा परिध मोजण्याची पद्धत सांगून पृथ्वीचा परिध 24,835 मैल असल्याचे सांगितले. हा आकडा आधुनिक पद्धतीने पृथ्वीचा परिध काढून सर्वत्र मान्यताप्राप्त पृथ्वीच्या परिघापेक्षा (24,902 मैल) फक्त 0.2 टक्के कमी आहे.
आर्यभट्टांनी त्यांच्या गणिताने पृथ्वीवरील नाक्षत्र दिनाचा काळ 23 तास 56 मिनिटे 4.1 सेकंद ठरविला होता. त्याचा आधुनिक काळ 23 तास 56 मिनिटे 4.01 असल्याचे पाहून आर्यभट्टांच्या गणितातील अचूकता जाणवते. तसेच त्यांनी ठरविलेल्या नाक्षत्र वर्षाच्या काळात सध्याच्या मान्यताप्राप्त काळाच्या तुलनेत फक्त 3 मिनिटे 20 सेकंदाची चूक दिसते.
ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध शल्यविशारद सुश्रुत यांच्याबाबतच्या माहितीत म्हटले आहे की, त्यांच्या ङ्गसुश्रुत संहिताङ्ख या संस्कृत ग्रंथात 184 प्रकरणे असून त्यात 1120 आजारांची वर्णने आहेत. यात 120 प्रकरणात शस्त्रक्रियेची सविस्तर माहिती, इतर 64 प्रकरणात औषधांची माहिती आहे. तसेच औषधात वापरल्या जाणाऱ्या 700 वनस्पती, 64 खनिज आणि 57 प्राण्यांचीही सविस्तर माहिती आहे.
शस्त्रक्रियेचे आठ प्रकार, पट्टीबंधनाचे (इरपवरसशी) चौदा प्रकार आणि शस्त्रक्रियेच्या शंभराहून जास्त उपकरणांचे वर्णनही "सुश्रुत संहितेत आहे."
पुस्तकातील सर्वच लिखाण असेच शास्त्र व आधार यांना धरून लिहिलेले आहे. या पुस्तकात खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट, वैद्यक शास्त्राचे सुश्रुत यांच्याशिवाय चरक, नागार्जुन, अणुसंकल्पनेचे जनक कणाद, गणितज्ज्ञ भास्काराचार्य या प्राचीन काळातील संशोधकांसोबतच आधुनिक काळात विविध क्षेत्रात संशोधक म्हणून मान्यताप्राप्त भारतीय संशोधक डॉ. जगदीशचंद्र बोस, सर सी. व्ही. रमण, श्रीनिवास रामानुजम, होमी भाभा, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. विजय भटकर, डॉ. जयंत नारळीकर अशा एकूण 25 संशोधकांचे जीवन आणि कार्य याबद्दल सखोल, सविस्तर व सचित्र माहिती आहे.
पुस्तकाची भाषा गोष्ट सांगण्यासारखी सोपी आणि सहज समजणारी आहे.
नचिकेत प्रकाशनाची अंतरबाह्य दर्जेदार निर्मिती आहे. मुखपृष्ठही कल्पक व आकर्षक झाले आहे. नव्या पिढीला वाचनाची सवय लागावी असा विचार गेल्या काही वर्षात जोर धरू लागला आहे. त्यात मुलांना वाढदिवस, मौंज किंवा सत्कार प्रसंगी पुस्तके भेट देण्याची प्रथा सुरू झाली आहे. त्या भेट देण्याच्या पुस्तकांमध्ये ङ्गभारतीय वैज्ञानिकङ्घचा समावेश आवर्जून करायला हवा. उत्तम पुस्तकनिर्मितीसाठी लेखक व प्रकाशक दोघाचेही अभिनंदन.
नचिकेत प्रकाशन, नागपूर. 1 विकास कुळकर्णी
(पृ. 112 / किंमत 100 रुपये)
या सृष्टीत वनस्पतीचे जीवन हे मानवापेक्षा कितीतरी आधीचे आहे. वनस्पतीनांही जीव असतो, हे सर्वश्रुतच आहे परंतु या वनस्पतींच्या जीवनातील विविधता, निसर्गाशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या बुद्धिमान पद्धती आणि त्यांच्यातील विविध यंत्रणा आणि कार्य यांची अधिकारी माहिती दिली आहे. वनस्पतींची अद्भुत कार्यशैली : डॉ. किशोर नेने नचिकेत प्रकाशन : पाने : ९६ , किंमत : १००/- रू. 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130
'श्यामची आई' या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ठ सिनेमाचा 'कमळ' पुरस्कार 'श्र्वास' या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची 'श्र्वास' ही कथा माधवी घारपुरेंची.
श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्र्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह.
श्र्वास आणि इतर कथा
लेखिका : माधवी घारपुरे
प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
मूल्य : १६०/- रुपये
पाने : १४२
आयटी क्षेत्रातील गतीमान घडामोडींवर ताज्या दमाचे लेखक चेतन भगत यांनी ‘द थ्री मिस्टेक्स ऑफ माय लाईफ’ आणि ‘वन नाईट ऽ द कॉल सेंटर’ या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे. आयटी क्षेत्रातील युवकांच्या मानसिकतेचा मागोवा घेताना मुक्त अर्थव्यवस्थेचे प्रतिबिब त्यात आढळते. शिवाय ‘पितृऋण’ या कादंबरीतून पारंपरिक संस्कृतीतील नातेसंबंध उलगडत जातात. दुयर्या महायुद्धानंतर ज्यूंवर झालेल्या अन्यायाची कहाणी ‘शिडलर्स लिस्ट’ या कादंबरीतून समोर येते.
‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या पुस्तकात लेखक मंगेश विठ्ठल कोळी या लेखकाने संकलित केलेल्या राष्ट्रीय प्रतीकांच्या बारीक सारीक तपशिलासह वर्णन केलेल्या प्रतीकांचे वाचन करतांना एक वेगळाच आनंद मिळतो. मुळात भारतभूमीबद्दल अपार प्रेम असणारी आपण भारतीय मंडळी, देश व देशातल्या गोष्टींचे वर्णन लिहिताना वा वाचतांना आपणाला एक प्रकारचे स्फुरण चढते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांत आपल्या मातृभूमितील मातृभूमीची ‘अस्मिता’ वैशिष्टये ठरणा-या महत्वपूर्ण गोष्टींचे महत्वपूर्ण संकलन वाचतांना खरोखरीच आनंदाला मोहोर येतो. मग ते आंबा या राष्ट्रीय फळांचे वर्णन असो वा कमळ या फुलाचे किंवा वटवृक्षाचे.
राष्ट्रध्वज-तिरंगा, राष्ट्रीय भाषा-हिंदी, टागोरांचे जनगणमन वा बंकिमचंद्राचे वंदेमातरम. राष्ट्रीय खेळ-हॉकी, राष्ट्रीय प्राणी-वाघ, याच बरोबर गंगा, रुपया, अशोक स्तंभ. देवनागरी राष्ट्रीय लिपी, सत्यमेव जयते हे घोषवाक्य इत्यादी गोष्टी नित्यपरिचयाच्या व नेहमी ओठावर असल्यातरी त्याबद्दलची तपशीलवार माहिती फारच थोडयांना असते. पण वरील सर्व गोष्टींवर आपण अपार प्रेम करीत असल्यामुळे त्यांच्या बद्दलची इत्यंभूत माहिती वाचतांना खरोखरच ‘अलिबाबाची गुहा’ सापडल्याचा आनंद आपणाला होतो.
कथा - कादंब-या अफाट झाल्या, विपुल काव्य निर्मिती झाली मात्र ज्या गोष्टींची माहिती प्रत्येक भारतीयाला असलीच पाहिजे असे साहित्य किती निर्माण झाले आहे? या दृष्टीकोनातून विचार करता लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांनी ‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या विषयावर संकलन करून एक फार मोठी पोकळी भरून काढून एक मोलाची साहित्यकृती निर्माण केली आहे असं मी म्हणेन.
बरेचदा आपण पाहतो, वाचतो, ऐकून घेतो, विसरतो पण ‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ हे पुस्तक त्या पलीकडचा ठरणार आहे. कारण एकदा का आपण हे वर्णन वाचल की ते कोणत्याही प्रकारानं विसरलं जाणार नाही याची मला शंभर टक्के खात्री वाटते. विद्यार्थी, शिक्षक, वक्ते, राजधुरीण या सर्वासर्वांना हा विशेषांक अत्यंत उपयुक्त ठरेल म्हणून ‘ज्ञानाचा दीपस्तंभ’ असं वर्णन या संकलनाचं केल्यास अतिशोयक्ती ठरणार नाही. या लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांच्या हातून अशीच अधिकाधिक मौलिक साहित्य सेवा घडो असा शुभाशीर्वाद देतो.
मला खात्री आहे की, ‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ हे पुस्तक वाचक, विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांना नक्कीच आवडेल व त्यांच्या ज्ञानात भर घालणारा ठरेल. तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणा-या स्पर्धकांना सुद्धा या पुस्तकाची मोलाची मदत झाल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.
बी. बी. गुरव (09421287107)
(ज्येष्ठ साहित्यिक - समीक्षक व माजी प्राचार्य)
ओळख राष्ट्रीय प्रतीकांची
• संपादक - मंगेश विठ्ठल कोळी
• पृष्ठे - 117
• प्रकाशक - डॉ. सुनील दादा पाटील
• प्रकाशन - कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर
• संपर्क - 02322 - 225500, 09975873569
• ईमेल - sunildadapatil@gmail.com
• ईबुक - http://www.readwhere.com/read/933659/Olakh-Rashtriya-Pratikanchi-
• फ्लिप बुक - http://fliphtml5.com/fkws/gxan
Copyright © 2025 | Marathisrushti