(User Level: User is not logged in.)

परिचय – परिक्षण

Sort By:

  • “जागत्या स्वप्नाचा प्रवास” आता इ-बुक स्वरुपात !

    सचिन तेंडुलकरच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे “जागत्या स्वप्नाचा प्रवास....” हे पुस्तक आता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी इ-बुक स्वरुपात केवळ रु.९९/- मध्ये उपलब्ध आहे.

    डबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्‍या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल ४८० पानी पुस्तकात सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने. सचिन संदर्भातल्या शेकडो व्हिडिओ लिंक्स हे या इ-बुकचं आणखी एक आकर्षण आहे.

    आपण आमच्या वेबसाईट समूहाचे एक सन्माननीय वाचक आहात. आपल्यासाठी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात आणलंय केवळ रुपये ९९/- मध्ये. ही खास ऑफर अत्यंत मर्यादित काळापर्यंतच आणि फक्त पहिल्या ५००० ग्राहकांसाठीच आहे.

    आपल्याला या पुस्तकाची छापील आवृत्ती हवी असल्यास ती उपलब्ध आहे फक्त रुपये ४००/- मध्ये महाराष्ट्रात कोठेही अगदी घरपोच! आणि याबरोबर इ-बुक मोफत!

    हे पुस्तक कोणत्याही क्रिकेट रसिकाला आपल्या संग्रही ठेवावेसे वाटेलच. सचिनच्या मैदानावरच्या प्रत्येक विक्रमाची नोंदही या पुस्तकात आहे. आपल्याला माहित नसलेल्या अनेक बाबी या पुस्तकातून आपल्यासमोर येतात.

    आपण जरुर या सवलतीचा लाभ घ्यावा!

    खरेदीसाठी क्लिक करा....


    <!-- सचिन तेंडुलकरच्या सोनेरी कारकिर्दीचा मागोवा घेणारे “जागत्या स्वप्नाचा प्रवास....” हे पुस्तक आता मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी इ-बुक स्वरुपात केवळ रु.९९/- मध्ये उपलब्ध आहे. डबल क्राऊन आकाराच्या तब्बल ४८० पानांचा भरगच्च खजिना असलेल्या या पुस्तकात सुमारे १२५ हून जास्त पानांची सांख्यिकी माहिती दिलेली आहे हे या पुस्तकाचे एक ठळक वैशिष्ट्य. खर्‍या अर्थाने या पुस्तकाला सचिन-कोश असेच म्हणता येईल. मूळ किंमत रु.७००/- असलेल्या या तब्बल ४८० पानी पुस्तकात सचिनच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापासूनचा प्रवास टिपलाय डॉ. आनंद बोबडे या क्रिकेटवेड्या अवलियाने. सचिन संदर्भातल्या शेकडो व्हिडिओ लिंक्स हे या इ-बुकचं आणखी एक आकर्षण आहे. आपण आमच्या वेबसाईट समूहाचे एक सन्माननीय वाचक आहात. आपल्यासाठी हे पुस्तक इ-बुक स्वरुपात आणलंय केवळ रुपये ९९/- मध्ये. ही खास ऑफर अत्यंत मर्यादित काळापर्यंतच आणि फक्त पहिल्या ५००० ग्राहकांसाठीच आहे. आपल्याला या पुस्तकाची छापील आवृत्ती हवी असल्यास ती उपलब्ध आहे फक्त रुपये ४००/- मध्ये महाराष्ट्रात कोठेही अगदी घरपोच! आणि याबरोबर इ-बुक मोफत! हे पुस्तक कोणत्याही क्रिकेट रसिकाला आपल्या संग्रही ठेवावेसे वाटेलच. सचिनच्या मैदानावरच्या प्रत्येक विक्रमाची नोंदही या पुस्तकात आहे. आपल्याला माहित नसलेल्या अनेक बाबी या पुस्तकातून आपल्यासमोर येतात. आपण जरुर या सवलतीचा लाभ घ्यावा! खरेदीसाठी क्लिक करा....


    -->

  • ग्राहक चेतना

    मायावी बाजारांच्या भुलभूलय्यात अडकलेल्या सर्व सामान्य माणसाला-ग्राहक राजाला सावध करणारे, त्याच्या हक्कांची अधिकारांची जाणीव करून देणारे आणि या सर्व व्यवस्थेत तो केंद्रस्थानी आहे, हे भान सर्वांना आणणारे हे तळमळीचे लिखाण लिहिले आहे ग्राहक पंचायतीचे प्रसिद्ध कार्यकर्ते श्री सुरेश बहिराट यांनी. दै. लोकमत मध्ये विक्रमी 20 वर्ष लिहिलेल्या ग्राहक चेतना या सदरातील अत्यंत निवडक, महत्वाच्या सार्वकालिक मूल्य असलेल्या लेखांचा हा संग्रह सर्वांसाठीच संग्रहनीयआहे. पृ.200 किं.200 रू. पुस्तकाचे नाव – ग्राहक चेतना : लेखक – सुरेश बहिराट : पाने : २०० किंमत – २०० रुपये श्रीपाद कोठे नचिकेत प्रकाशन, 24-योगक्षेम लेआऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-440015

  • संत ज्ञानेश्वर – शुभारंभाचे दोन शब्द

    ‘व्यवस्थापन’ या विषयावर १९७०च्या दशकानंतर, भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभर गांभीर्याने लक्ष केंद्रित केले जाऊ लागले. मोठमोठ्या औद्योगिक समूहाबरोबरच, मध्यम व लघु उद्योगांनीही सातत्याने नावीन्यपूर्ण, उपाययोजना, कल्पना यांचा समावेश असलेली व्यवस्थापनाची विशिष्ट प्रणाली आपलीशी केली आहे.

  • वेदांच्या वेदीवरुन

    जगभरात जातीयता, स्त्री-पुरुष असमानता, उच्च – नीच फरक दिसतो. भारतात त्याचे प्रमाण मोठे आहे. वर्णभेद, जातीभेदाची झळ विशिष्ट समाजाला बसत आली आहे.

  • एका निवांत समयी’ व ‘साहित्य उपेक्षितांचे’ या पुस्तकाचे प्रकाशन

    कवी श्री. निलेश बामणे लिखीत " एका निवांत समयी " व " साहित्य उपेक्षितांचे " या पुस्तकाचे प्रकाशन करताना राजमाता प्रतिष्ठान च्या अध्यक्षा सौ. आशाताई मामिडी, सरिता को.आॅप.क्रेडिट सोसायटी लि.चे अध्यक्ष श्री. सदाशिव मते, संचालक डॉ. शांताराम कारंडे, संचालक श्री विनोद निक्षे, सचिव श्री. प्रभाकर देसाई, श्री हरिशचंद्र झावरे, धगधगती मुंबई मराठी वृत्तपत्राचे उपसंपादक श्री जगदीश लाड.

    jagdishlad0022jagdishlad011

  • प्रिय, हा कण गॉड पार्टिकल आहे

    एक निस्पृह कामगार नेता म्हणून त्यांची आज जगभर प्रसिद्धी होती. कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सामोपचाराने आणि सुलभतेने हाताळले; एवढेच नव्हे तर तत्संबंधीचे विचार त्यांनी इंडस्ट्रियल रिलेशन्स, लेबर प्रॉब्लेम्स इन इंडियन इंडस्ट्री , जॉब्ज फॉर अवर मिलियन्स वगैरे पुस्तकांद्वारे मांडले.

  • वैज्ञानिकाचा सत्याचा शोध – मनोगत

    मी प्रदीर्घ साधना आणि कसोटीच्या काळात गेलो ज्यांचा संदर्भ आवश्यक आहे. याशिवाय सर्वसंग परित्याग, मुक्तीची अतीव ओढ, भक्ती, योग्य गुरू या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्या विचारात घेतल्याच पाहिजेत. या गोष्टी विचारात घेतल्या तरच पुस्तकातील विचारांना अर्थ राहील आणि वाचकांना त्याचा लाभ होईल.

  • सी.ई.ओ: भूमिका आणि जबाबदारी

    नागरी बॅंका/पतसंस्था किंवा कोणत्याही संस्थेतील सी.ई.ओ.- मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे व्यवस्थापनातील वजिराचे प्यादे असते. .ई.ओ ची भूमिका यशस्वीरीत्या निभावणे म्हणजे तारेवरची कसरत असते. ही भूमिका त्याला प्रभावी रीत्या निभाविता यावी, यासाठी त्याची नेमकी बाबदारी काय? भूमिका कार्य? र्यादा काय? यांचे सांगोपांग विवेचन व मार्गदर्शन शाखा व्यवस्थापन या लोकप्रिय व दुसरी आवृत्ती निघालेल्या पुस्तकाचे लेखक व नागरी बॅंकांचा प्रदीर्घ अनुभव सणारे डॉ. माधव गोगटे यांनी या पुस्तकातून केले आहे.नचिकेत प्रकाशन पाने : १४४ किंमत : २५० रु.

  • चाकोरीबाहेरच्या स्त्रीकथा

    डॉ. अलका कुलकर्णी या मुंबईसारख्या शहरातून डॉक्टर झालेल्या आणि शहाद्यासारखे दूरचे गाव त्यांनी कार्यक्षेत्र म्हणून निवडले. या गोष्टीबरोबरच वैद्यकीय व्यवसाय करीत असतानाही त्या दमदार लेखन करतात, याचे कौतुक वाटते. `ओळख’ हा डॉ. अलका कुलकर्णी यांचा कथासंग्रह वाचला. त्यांचा काहीसा आगळावेगळा विषय अर्थवाही होऊन मनात खोलवर रुतू लागला. त्यातील बहुतेक सर्व कथा आधुनिक जगातल्या स्त्रियांच्या समस्येवर आधारित आहेत, तरीही काहीशा चाकोरीबाहेरच्या आहेत.

  • शरसंधान – एक वाचनिय पुस्तक

    कोणतेही पुस्तक मी सह्सा संपूर्ण वाचून झाल्याखेरीज हाता वेगळे करत नाही आणि एकदा वाचलेले पुस्तक पुन्हा वाचायला शक्यतो घेत ही नाही. पण ‘शरसंधान’ हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक मी तीन वेळा वाचले. ‘

    शरसंधान’ हे ह्लके-फुलके पुस्तक असले तरी समजायला जड आणि पचायला अवघड आहे. हे पुस्तक आपल्या बुध्दीचा किस काढण्याबरोबर बुध्दीचा कस लावण्यास प्रवृत्त करते. कोणत्याही पुस्तकाबद्दलची मी माझी प्रतिक्रिया कधीच कोठे दिली नाही की कोठे लिह्ली ही नाही कारण लेखक कोणी का असेना त्याने निर्माण केलेलं साहित्य माझ्या दृष्टीने बहूमोलच असतं.

    ‘शरसंधान’ पुस्तकाच्या निर्मितीत माझा खारीचा वाटा आहे अस या पुस्तकाचे लेखक जयेश मेस्त्री मानतात. पण खरं सांगायच तर मला ते माझ्या लहान भावासारखे आहेत. सावरकरांच्या बाबतच्या त्यांच्या ज्ञानाचा मी प्रचंड आदर करतो. त्यांचे लेखन मी सातत्याने वाचत आलेलो आहे राजकारणा सोबत ते इतर विषय अगदी विनोद ही उत्तम हाताळतात. हे पुस्तक प्रकाशित होण्यापुर्वी ही माझ्या हातात आले होते पण ते वाचण्याचा मोह मी त्यावेळी टाळला. पण पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जेंव्हा जयेशने त्या पुस्तकाची प्रत मला भेट दिली तेंव्हा मी ते पुस्तक पचेपर्यंत वाचले.

    जयेश जरी नवोदित लेखक असला तरी तो नवखा नाही त्याने यापुर्वी बरेच लिखाण केलेले आहे. प्रचंड अभ्यास आणि निरीक्षणातून त्याचे हे ‘शरसंधान’ पुस्तक जन्माला आलेले आहे. हे पुस्तक म्ह्णजे एक उत्तम लेखक म्ह्णून नावारूपाला येण्याच्या दृष्टीने त्याचे पहिले पाऊलच म्ह्णावे लागेल. जयेशच्या पहिल्याच पुस्तकाला लाभलेली ज्येष्ठ पत्रकार, लेखक, वक्ते आणि समिक्षक श्री.अरविंद कुलकर्णी यांची प्रस्तावना बरेच काही सांगून जाते. त्याच सोबत जयेश मेस्त्री यांच्या लिखाणाचा दर्जाही अधोरेखीत करते. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत जयेश मेस्त्री यांची पाठ थोपटण्याबरोबरच त्यांच्या हिंदूतत्वनिष्ठतेचे कौतुक करत जयेश मेस्त्री सावरकरांच्या विचारांनी प्रभावित आहे हे सांगायला विसरलेले नाहीत. या पुस्तकाला लाभलेली प्रस्तावनाच एक वाचनिय लेख आहे असे म्हटले तर ते ही वावगे ठरणार नाही.

    जयेश मेस्त्री यांनी आपले हे पुस्तक स्वा.सावरकर आणि बाबा आमटे आणि परिवाराला समर्पित केलेले आहे यावरून त्यांना समाजसेवेचाही वारसा लाभलेला आहे हे स्पष्ट होते. या पुस्तकात जयेश मेस्त्री यांच्या आवघ्या सहा लेखांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकाच्या सुरूवातीलाच त्यांच्या या पुस्तकाला किशोर नार्वेकर आणि डॉ.शांताराम कारंडे यांनी काव्यात्मक शुभेच्छा दिलेल्या आहेत. डॉ. शाताराम कारंडे यांनी या पुस्तकाला अर्थसहाय्य करून त्याच्या निर्मितीत मोलाची भुमिका बजावलेली आहे.

    या पुस्तकातील पहिला लेख ‘आशीर्वाद देऊ की घेऊ ?’ हया लेखात लेखकाने एक प्रगत राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदाचे चरित्र आजच्या पिढीने स्विकारण्याची गरज का आहे या बद्दल आपले परखड विचार मांडलेले आहेत. ‘कृष्णा तुला शोधू कोठे’ हा लेख भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राकडे वर्तमान पिढीने कसं डोळ्सपणे पाहायला हवे या बद्दल मार्गदर्शन करताना दिसतो. त्यापुढील पत्रकारीताः लोकहित की व्यवसाय या लेखात ते पत्रकारीता हा फक्त एक व्यवसाय बनून न राहता पुर्वीसारखीच त्याला राष्ट्रभक्तीची आणि राष्ट्रप्रेमाची जोड असावी असा आशावाद लेखकाने व्यक्त करताना बर्या च दुर्लक्षीत गोष्टी प्रकाशात आणण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केलेला आहे. ‘तहानलेला सावरकर’ हा या पुस्तकातील चवथा लेख सावरकरांवर प्रेम करणार्यां ना नव्याने त्यांच्या प्रेमात पडायला प्रवृत्त करेल अशी खात्री वाटते. या पुढील लेख ‘अखंड भारत का आवश्यक आहे?’ या प्रश्नाच उत्तर जाणण्यास सारेच उत्सुक असतात. वाचकांची ही उत्सुक्ता दूर करण्याचा प्रयत्न लेखकाने या लेखाच्या माध्यमातून केला आहे. अखंड भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण हे स्वप्नवत असतानाही तसा आशावाद दाखविण्याचा लेखकाचा प्रयत्न नक्कीच स्तुती करण्यासारखा आहे. या पुस्तकातील शेवटचा लेख ‘तुंम्हाला गांधी हवेत की सावरकर?’ या प्रश्नाचे उत्तर देणे तसे अवघडच पण जयेश मेस्त्री यांनी ठामपणे सावरकरांची बाजू उचलून धरल्याचे या लेखात स्पष्ट दिसते. त्यांचे सावरकर प्रेम हे वरवरचे नाही तर त्यांनी सावरकरांचा अभ्यास मनापासून केलेला आहे आणि त्या अभ्यासातूनच या लेखाचा जन्म झालेला आहे.

    जयेश मेस्त्री यांचे हे अठ्ठेचाळीस पानाचे छोटेसे पुस्तक वाचकांनी वाचण्यासाठी हाती घेतल्यावर ते संपूर्ण वाचल्याखेरीज ते ते हातावेगळे करणार नाहीत याची मला खात्री वाटते. त्यातील काही वाचक हे पुस्तक आपल्या हृदयालाही कवटाळतील का ते? हे पस्तक वाचल्यावरच वाचकांच्या लक्षात येईल त्यामुळे प्रत्येक मराठी वाचकाने हे पस्तक नक्कीच वाचायला हवे...

    – निलेश बामणे