(User Level: User is not logged in.)

परिचय – परिक्षण

Sort By:

  • परिचय एका पुस्तकाचा

    साहित्यात बराचसा मान मचकुरापेक्षा माथ्ल्यामुळे मिळतो हे ध्यानात येई पर्यंत पन्नाशी आली .’ या सुरवातीच्या वाक्याने जी मनाची पकड घेतली ते ‘इत्यलम’ या शेवटच्या शब्दा पर्यंत. मुकुंदराजाच्या विवेकसिंधू पासून ते शाहिरांच्या लावण्यापर्यंतचा इतिहासाचे हे अजोड विडंबन! एक छोटेखाननी पुस्तक .फक्त शहात्तर पानांचं !विडंबन हे विनोदाच व्रात्य तरी लाडक आपत्य,याची प्रचीती देणार.

  • वैद्यकीय क्षेत्रातील निर्मळ कथन

    डॉ. रवी बापट यांचे नाव सुरेश भट आणि पंढरीनाथ सावंत यांच्या तोंडून वारंवार ऐकले होते. डॉक्टरांची हे दोघेही कायम स्तुतीच करीत. माझा आणि मुंबईचा तसा संबंध नाही आणि मुंबईतल्या डॉक्टरांचा तर त्याहून नाही. त्यामुळे बापट हे कोणी तरी बडे डॉक्टर आणि अधूनमधून साहित्यिकांवर उपचार करतात, असा एक समज माझ्या मनात होता. या पूर्वग्रहासह मी डॉ. बापट यांचे हे आत्मकथन वाचायला घेतले आणि डॉ. बापट यांच्याबद्दल माझे दोन मित्र जे बोलत त्यातले अक्षरही खोटे नव्हते, हे लक्षात आले.

  • शेतीमातीची सल ‘ करपलं रान सारं’

    शेतीमातीचे प्रश्न नवे नाहीत. ते आदीम काळापासून आलेले आहेत. जो दुसऱ्याला जगवितो त्याच्या स्वतःच्या जगण्याचे काय ? या प्रश्नाने अश्वस्थ झालेले आणि स्वतः घेतलेले अनुभव आविष्कृत होण्याची तडफ कवितेतून मांडणारे डॉ.प्रभाकर शेळके हे 'करपलं रान सारं' या कवितासंग्रहातून व्यक्त होतात. मिरगाचा खेळ,दु:ख सांदीत ठेऊन, निबर मनाने, बया काटेरी उनगा, बेंदाड अंगावर येणार , चिभडं पिकांचा हुडहूड होम अशी शब्दरचना ग्रामनात्याची साक्ष देतात. धान्य पिकविले जाते. ते विकले जाते. शेतकऱ्यांची पदोपदी पिळवणूक होते.हे सांगताना ते म्हणतात.
    करपलं रान सारं,झाला डागीनचा वाडा
    गाव वेशीला टांगला,ह्यो ग जन्माचा ख्वोडा
    गावचं गावपण हरवत चाललय. शहराच्या ओढीनं माणसं जास्त व्यावहारिक बनत आहेत.गाव, गावचा मळा, माणसाचा लळा ओसाड होतो की काय ?अशी अनामिक भिती कवीला सतावते आहे. 'गेला गावकुस' या कवितेत ते खंत व्यक्त करतात.
    गेला गावकुस गेला लपंडाव
    व्यसनाचे पेव आता गावांमध्ये
    अध्यात्माची वाटचाल पुर्वीइतकी निर्मळ आता राहिलेली नाही. देवाच्या वाटेवर भक्तीमार्गाचा वास असतो तरी अपघातात मरण येते. तोंडामध्ये ईश्वराच्या नामोच्चार असतो मग असे का घडावे? देवाच्या नावाने धर्मभोळेपणा जपला तर जात नाही ना? हे विचारण्याचे धाडस कवीने दाखविले आहे.
    असं दिंडीचं मरण
    उभ्या जन्माची जिभाळी
    सवसांज आहेवाची
    कशी रडते आभाळी
    'करपलं रानं सारं ' हा कवितासंग्रह वाचताना काही प्रश्न उभे केले आहेत. तर काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला आहे.ते म्हणतात काळ्या आईच्या प्राक्तनातून माझ्या भूमियांच्या वेदनेचे कढ मला नेहमीच अस्वस्थ करत आले. खरेतर अस्वस्थताच लेखनाची उर्जा असायला हवी. आजची गावखेड्याची अवस्था पाहून कवी गलबलतो. कुणब्यांची दु:खसल कुणबावा असल्याशिवाय मांडता येत नाही. अनुभवाची शिदोरी पाठीशी लागतेच.
    कुणबी कर्जात बुडाला
    सालदार घेई झोके
    मोंढ्यामंदी टपलेले
    त्यांच्या मालावर बोके
    साध्या शब्दात समर्पक आशय कवीने मांडला आहे. जालना हा मराठवाड्यातील जिल्हा. तेथील बोलीभाषेचा शब्दपरिपोष कवितासंग्रहात जाणवतो.तो स्वाभाविक आहे.करपलं रान सारं मध्ये पाच श्रृंगारिक लावण्यादेखिल आहेत. हायकू हा काव्यप्रकार कवितासंग्रहात आला आहे. बेकारीचे चटके उद्धृत केलेले आहेत. ही प्रचंड मोठी समस्या आहे. खेड्यातील तरूण युवक शहरांकडे धावत आहे. पोटाचे नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. या बाबतीत हा संग्रह नाविन्याचा शोध घेत आहे.एकूण बासष्ट कवितांचा समावेश यात आहे. सरदार जाधव यांनी केलेले मुखपृष्ठ बोलके आहे. कुंडलिक अतकरे यांनी देखणा कविता संग्रह बनविला आहे.फक्त एकाच विषयावरील कवितांचा समावेश होणे शक्य झाले असते तर वेगळी झालर प्राप्त झाली असती. सर्वच कविता गेय आहेत. नादनिर्मितीमुळे हृदयापर्यंत भिडतात.
    करपलं रान सारं (कवितासंग्रह​)
    डॉ. प्रभाकर शेळके
    कैलास पब्लिकेशन्स, औरंगाबाद
    पृष्ठे;७१ मुल्य ; ७०₹

    विठ्ठल जाधव
    शिरूरकासार,बीड
    सं.९४२१४४२९९५

  • हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का?

    आपला भारतदेश अडीच हजार वर्षांपासून परकीय आक्रमणाच्या अमलाखाली राहिला आहे. सिंकदरापासून शक, हुण, मोगल, फे्रंच, इंग्रज, डच पोर्तुगीज आदींनी भारतावर अव्याहतपणे आक्रमण केली. या सतत होणार्‍या आक्रमणांनी भारत देश जर्जर झाला असला तरी वाकला नाही, नैतिक बळाच्या जोरावर तो आजही ठामपणे उभा आहे. याचे मुख्य कारण आपली हिंदू संस्कृती.हिंदू परिवार म्हणून आम्ही जगतो का? अर्थात ऋषिनिर्मित हिंदू परिवार अवस्था पाने : 68, किंमत : 80 रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130 अनिल सांबरे नचिकेत प्रकाशन, नागपूर 9225210130

  • आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला

    हॉंगकॉंगमध्ये राहणाऱ्या अनिता या सिंधी सुखवस्तू कुटुंबातील. कॉर्पोरेट जगतात त्या काम करीत असताना डॅनी मुरजानी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.

  • शरसंधान – एक वाचनिय पुस्तक

    कोणतेही पुस्तक मी सह्सा संपूर्ण वाचून झाल्याखेरीज हाता वेगळे करत नाही आणि एकदा वाचलेले पुस्तक पुन्हा वाचायला शक्यतो घेत ही नाही. पण ‘शरसंधान’ हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक मी तीन वेळा वाचले. ‘

    शरसंधान’ हे ह्लके-फुलके पुस्तक असले तरी समजायला जड आणि पचायला अवघड आहे. हे पुस्तक आपल्या बुध्दीचा किस काढण्याबरोबर बुध्दीचा कस लावण्यास प्रवृत्त करते. कोणत्याही पुस्तकाबद्दलची मी माझी प्रतिक्रिया कधीच कोठे दिली नाही की कोठे लिह्ली ही नाही कारण लेखक कोणी का असेना त्याने निर्माण केलेलं साहित्य माझ्या दृष्टीने बहूमोलच असतं.

    ‘शरसंधान’ पुस्तकाच्या निर्मितीत माझा खारीचा वाटा आहे अस या पुस्तकाचे लेखक जयेश मेस्त्री मानतात. पण खरं सांगायच तर मला ते माझ्या लहान भावासारखे आहेत. सावरकरांच्या बाबतच्या त्यांच्या ज्ञानाचा मी प्रचंड आदर करतो. त्यांचे लेखन मी सातत्याने वाचत आलेलो आहे राजकारणा सोबत ते इतर विषय अगदी विनोद ही उत्तम हाताळतात. हे पुस्तक प्रकाशित होण्यापुर्वी ही माझ्या हातात आले होते पण ते वाचण्याचा मोह मी त्यावेळी टाळला. पण पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जेंव्हा जयेशने त्या पुस्तकाची प्रत मला भेट दिली तेंव्हा मी ते पुस्तक पचेपर्यंत वाचले.

    जयेश जरी नवोदित लेखक असला तरी तो नवखा नाही त्याने यापुर्वी बरेच लिखाण केलेले आहे. प्रचंड अभ्यास आणि निरीक्षणातून त्याचे हे ‘शरसंधान’ पुस्तक जन्माला आलेले आहे. हे पुस्तक म्ह्णजे एक उत्तम लेखक म्ह्णून नावारूपाला येण्याच्या दृष्टीने त्याचे पहिले पाऊलच म्ह्णावे लागेल. जयेशच्या पहिल्याच पुस्तकाला लाभलेली ज्येष्ठ पत्रकार, लेखक, वक्ते आणि समिक्षक श्री.अरविंद कुलकर्णी यांची प्रस्तावना बरेच काही सांगून जाते. त्याच सोबत जयेश मेस्त्री यांच्या लिखाणाचा दर्जाही अधोरेखीत करते. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत जयेश मेस्त्री यांची पाठ थोपटण्याबरोबरच त्यांच्या हिंदूतत्वनिष्ठतेचे कौतुक करत जयेश मेस्त्री सावरकरांच्या विचारांनी प्रभावित आहे हे सांगायला विसरलेले नाहीत. या पुस्तकाला लाभलेली प्रस्तावनाच एक वाचनिय लेख आहे असे म्हटले तर ते ही वावगे ठरणार नाही.

    जयेश मेस्त्री यांनी आपले हे पुस्तक स्वा.सावरकर आणि बाबा आमटे आणि परिवाराला समर्पित केलेले आहे यावरून त्यांना समाजसेवेचाही वारसा लाभलेला आहे हे स्पष्ट होते. या पुस्तकात जयेश मेस्त्री यांच्या आवघ्या सहा लेखांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकाच्या सुरूवातीलाच त्यांच्या या पुस्तकाला किशोर नार्वेकर आणि डॉ.शांताराम कारंडे यांनी काव्यात्मक शुभेच्छा दिलेल्या आहेत. डॉ. शाताराम कारंडे यांनी या पुस्तकाला अर्थसहाय्य करून त्याच्या निर्मितीत मोलाची भुमिका बजावलेली आहे.

    या पुस्तकातील पहिला लेख ‘आशीर्वाद देऊ की घेऊ ?’ हया लेखात लेखकाने एक प्रगत राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदाचे चरित्र आजच्या पिढीने स्विकारण्याची गरज का आहे या बद्दल आपले परखड विचार मांडलेले आहेत. ‘कृष्णा तुला शोधू कोठे’ हा लेख भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राकडे वर्तमान पिढीने कसं डोळ्सपणे पाहायला हवे या बद्दल मार्गदर्शन करताना दिसतो. त्यापुढील पत्रकारीताः लोकहित की व्यवसाय या लेखात ते पत्रकारीता हा फक्त एक व्यवसाय बनून न राहता पुर्वीसारखीच त्याला राष्ट्रभक्तीची आणि राष्ट्रप्रेमाची जोड असावी असा आशावाद लेखकाने व्यक्त करताना बर्या च दुर्लक्षीत गोष्टी प्रकाशात आणण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केलेला आहे. ‘तहानलेला सावरकर’ हा या पुस्तकातील चवथा लेख सावरकरांवर प्रेम करणार्यां ना नव्याने त्यांच्या प्रेमात पडायला प्रवृत्त करेल अशी खात्री वाटते. या पुढील लेख ‘अखंड भारत का आवश्यक आहे?’ या प्रश्नाच उत्तर जाणण्यास सारेच उत्सुक असतात. वाचकांची ही उत्सुक्ता दूर करण्याचा प्रयत्न लेखकाने या लेखाच्या माध्यमातून केला आहे. अखंड भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण हे स्वप्नवत असतानाही तसा आशावाद दाखविण्याचा लेखकाचा प्रयत्न नक्कीच स्तुती करण्यासारखा आहे. या पुस्तकातील शेवटचा लेख ‘तुंम्हाला गांधी हवेत की सावरकर?’ या प्रश्नाचे उत्तर देणे तसे अवघडच पण जयेश मेस्त्री यांनी ठामपणे सावरकरांची बाजू उचलून धरल्याचे या लेखात स्पष्ट दिसते. त्यांचे सावरकर प्रेम हे वरवरचे नाही तर त्यांनी सावरकरांचा अभ्यास मनापासून केलेला आहे आणि त्या अभ्यासातूनच या लेखाचा जन्म झालेला आहे.

    जयेश मेस्त्री यांचे हे अठ्ठेचाळीस पानाचे छोटेसे पुस्तक वाचकांनी वाचण्यासाठी हाती घेतल्यावर ते संपूर्ण वाचल्याखेरीज ते ते हातावेगळे करणार नाहीत याची मला खात्री वाटते. त्यातील काही वाचक हे पुस्तक आपल्या हृदयालाही कवटाळतील का ते? हे पस्तक वाचल्यावरच वाचकांच्या लक्षात येईल त्यामुळे प्रत्येक मराठी वाचकाने हे पस्तक नक्कीच वाचायला हवे...

    – निलेश बामणे

  • फिल्मी चक्कर – सिनेसृष्टीत मारलेला फेरफटका

    Filmy-Chakkar-Front-300मराठी व हिंदी फिल्मजगतातील ज्येष्ठ व श्रेष्ठ पुरुष/स्त्री कलाकारंच्या परिचयातून त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्य दाखविण्याचा लेखकाचा प्रयत्न सफल झाला आहे. मोठे आर्टिस्ट असले तरी ते त्यांच्या सहवासातील छोट्या लोकांशी कसे मोठेपणा झुगारुन वागत याची खूप उदाहरणे पुस्तकात मिळतील.

    फिल्मी चक्कर
    लेखक : रमेश उदारे
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य : १३०/- रुपये
    पाने : ११२

  • गावाकडची अमेरिका – अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे चित्रण

    सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्‍या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्‍या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल.

  • वनस्पतीची अद्‌भुत कार्यशैली

    या सृष्टीत वनस्पतीचे जीवन हे मानवापेक्षा कितीतरी आधीचे आहे. वनस्पतीनांही जीव असतो, हे सर्वश्रुतच आहे परंतु या वनस्पतींच्या जीवनातील विविधता, निसर्गाशी जुळवून घेण्याच्या त्यांच्या बुद्धिमान पद्धती आणि त्यांच्यातील विविध यंत्रणा आणि कार्य यांची अधिकारी माहिती दिली आहे. वनस्पतींची अद्‌भुत कार्यशैली : डॉ. किशोर नेने नचिकेत प्रकाशन : पाने : ९६ , किंमत : १००/- रू. 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130

  • खाद्याविष्कार

    प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सांगितलेल्या खास पाककृतींचा हा संग्रह आहे. पुस्तकाचं वेगळेपण हे, की त्यांनी विविध फळांचा वापर करून पदार्थ कसे तयार करायचे याचं मार्गदर्शन केलं आहे.