कथा

वेडा मगर आणि हुशार कोल्हा

Category:

 

समुद्राच्या काठी एक गाव होतं. तिथं एक मगर आणि एक कोल्हा राहायचे. त्यांनी दोघांनी मिळून शेती करायचं ठरवलं. सुरवातीला बटाट्याची शेती केली. मगर म्हणाले, “आपण उत्पन्नाची वाटणी कशी करायची ते आधी ठरवून टाकू.” कोल्ह्याने त्याला मान्यता दिली. मगर म्हणाले, “मी झाडांचा वरचा भाग घेईन, खालचा तू घे.” कोल्हा म्हणाला, “चालेल, तू म्हणशील ते मला मान्य आहे.” पुढे बटाट्याचं पीक तयार झालं.

कथा

साळींदर आणि कोल्ह्याची गोष्ट

Category:

 

कोल्हा हा एक धूर्त, कावेबाज, चतुर आणि लबाडी करण्यात पटाईत असलेला प्राणी आहे. कोल्ह्याच्या अनेक चातुर्यकथा प्रसिद्ध आहेत. वास्तविक सिंह हा जंगलचा राजा, पण कोल्हा त्यालाही फसवतो. विहिरीच्या पाण्यात सिंहाला त्याचेच प्रतिबिंब दाखवून “तुझा प्रतिस्पर्धी तुला आव्हान देत आहे” अशी बतावणी करून तो सिंहाला चिथावतो.

कथा

बोरोली पिकली गांडोली शेकली

Category:

 

एका बोरगाव नावाच्या खेड्यात सारजा नावाची एक आजी राहायची. ती गरीब होती पण कुणाकडे हात पसरायची नाही. परसात अळू, मेथी, काकडी लावायची. बाजारात विकून चार पैसे मिळवायची. शेंगदाणे, हरभरे भाजायची. कागदाचे कोन करून त्यात भरायची व शाळेतल्या मुलांना दहा- वीस पैशात विकायची. अंगणाला बोरीचे, वेलाचे कुंपण घालायची. हंगामात फळं आली की ती विकायची. चिमणी एकेक दाणा टिपते तशी संसार करायची. तरुणपणी नवरा गेला तरी ती हरली नाही. कष्ट करून आनंदाने जगत होती. गावातली उनाड मुलं कधी तिची बोरं चोरायची. पोरंच ती! खायची गोष्ट खाणारच, म्हणून ती कानाडोळा करायची. गावाबाहेरच्या जंगलातला कोल्हा तिच्या परसातली काकडी, बोरं खायला यायचा. आजीची नजर चुकवून तो काकडी फस्त करायचा.

कथा

उडणाऱ्या हत्तीची गोष्ट

Category:

 

कुणी एकेकाळी हत्तीला चार पंख होते. जसा सकाळी कोंबडा बांग देतो
तसेच हत्ती पण देत होते. असंही म्हणतात की हत्तीवर बसून देव विश्वफेरीला
निघत असत. परंतु जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली आणि लोकांची वस्ती वाढली
तेव्हा नवनवीन अडचणी निर्माण होऊ लागल्या. आकाशात उडता उडता
थकवा आला की हत्ती घरांच्या छतावर येऊन बसत; त्यामुळे त्यांच्या वजनामुळे घरे पडायला लागली. काही माणसं मेली.

कथा

गायक गाढव

Category:

 

एक होता धोबी. गावाचे कपडे धुवायचा. मजेत रहायचा. धोब्याकडे एक गाढव होतं. गाढव मात्र मरतुकडं आणि म्हातारं होतं. सकाळ झाली की मालक मळलेल्या कपड्यांचा गठ्ठा गाढवाच्या पाठीवर टाकायचा. नदीवर जायचा.

सकाळी धुतलेले कपडे घेऊन घरी यायचा. रात्र होण्यापूर्वी मालक गाढवाची सुट्टी करायचा. एके दिवशी संध्याकाळी गाढव फिरायला निघालं. काम संपलं होतं. पाठीवर कपड्यांचं ओझं नव्हतं, आणि मालकाची किटकिटही नव्हती. अशा गाढवाला भेटला एक कोल्हा. दोघेही एकटे होते. कामातून मोकळे होते. त्यामुळे दोघांची चटकन बनली दोस्ती. मग दोघेही मित्र भोजनाच्या शोधात एकत्र फिरू लागले.

कथा

बैल आणि खेचर

Category:

 

एक श्रीमंत जमीनदार शेतकरी होता. आपल्या बायका-मुलांसह तो शेतावरच राहात असे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. फक्त हे ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगायचे नाही, असे त्याच्यावर बंधन होते. त्याने ते ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगितले तर त्याच्या वाट्याला मृत्यू येणार होता. त्यामुळे हे रहस्य त्याने कुणालाच कळू दिले नव्हते. पण या भाषिक देणगीमुळे त्याला पशु-पक्ष्यांच्या भावभावना चटकन समजायच्या. गोठ्यातले वासरू भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याच्या आईचा धावा करते आहे; घोड्याला कंटाळा आला आहे, त्याला चक्कर मारून आणली पाहिजे हे त्याला चटकन कळायचे. मांजरांची भांडणं, कोंबड्यांचा कलकलाट, पक्ष्यांचे गुंजन यातला भावार्थ त्याला समजायचा.

कथा

गाईचे सैन्य

Category:

 

एके दिवशी ‘तांबू’ गाय रानात गेली. रानात चरता चरता दिवस कसा संपला ते कळलंच नाही. जरासं अंधारून आलं होतं. हळूहळू ती परतीच्या वाटेवर आली. परंतु बरोबरीच्या ‘पांढरी’, ‘ढवळी’, ‘राणू’ कुणीच दिसत नाही, हे लक्षात येताच तांबू गायीने आपला चालण्याचा वेग वाढवला. जवळजवळ रानातली वाट संपतच आली होती. दूरवर दिवे दिसत होती. इतक्यात वाघोबाराजे दत्त म्हणून समोरी आले! क्षणभर तांबू गायीला काही सुचेनासे झाले. भीती वाटली.

कथा

मोती पोवळ्याची मोष्ट

Category:

 

एका गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. तो आंधळा होता. त्याला दिसत नसे. एके दिवशी चालता चालता तो विहिरीत पडला. तेव्हा “देवा मला वाचव रे” असे तो ओरडू लागला.

कथा

सिंह आणि ससा

Category:

 

मध्य भारतातल्या एका प्रचंड मोठ्या जंगलात एक दांडगा सिंह राहात होता. त्याचं नाव होतं भासुरक. त्याला स्वतःच्या शक्तीची घमंड होती. नि ह्या शक्तीचे प्रदर्शन करण्यासाठी तो खुशाल दुबळ्या जनावरांना ठार मारीत असे. एकदा काय झालं, त्या जंगलातली सगळी जनावरं एकत्र जमली आणि सगळी सिंहाकडे गेली.

कथा

बीव्हर आणि साळू

Category:

 

खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे अगदी ट्लिंगट जमात अस्तित्वात येण्यापूर्वी साळू आणि बीव्हर हे चांगले मित्र होते. नेहमी एकमेकांच्या घरी जात येत होते. साळू घरी आली की ती परत जाताना तिचे खूप काटे पडत. बीव्हरला ते आवडत नव्हते. म्हणून बीव्हर ठरवतो की साळूच्या घरी जाऊन तिला कधीही आपल्या घरी येण्याचे आमंत्रण द्यायचे नाही. एके दिवशी साळूने त्याच्या घरी येण्याची इच्छा आहे, असे बीव्हारला सांगितले.