अवर्गिकृत

भृणहत्या, वैद्यकीय व्यवसायाचे व्यापारीकरण वगैरे वगैरे

Category:

 

जेव्हा वैद्यकीय व्यवसायाचे व्यापारीकरण असा शब्दप्रयोग केला जातो तेव्हा हसावे की रडावे हे कळत नाही. कोणत्या व्यवसायाचे व्यापारीकरण झाले नाही. कोणत्या क्षेत्रास ह्या व्यापारीकरणाने सोडले आहे. सन्माननिय समजली जाणारी क्षेत्रे उदा. न्याय, शिक्षण, सामाजिक इ. क्षेत्रे यापासून मुक्त आहेत असे म्हणता येईल का.

लेखसंग्रह

भारतरत्न, दादासाहेब फाळके आणि वाद

Category:

 

भारतात अनेक पुरस्कार सोहळे पार पडतात, मग त्यावर अनेक दिवस चर्चा रंगतात, नामांकनं कोणाला मिळाली आहेत, विजेते कोण? वगैरे; पण जर का पुरस्कार किंवा सन्मान राष्ट्रीय पातळीवरील असे, तर त्याविषयी अनेकांना आत्मियता वाटते तर अनेकांचा हिरमोड होतो आणि मग थेट पुरस्कार निवड समितीवर आरोपांच्या फैरी झडतात.

अवर्गिकृत

लग्न आणि विघ्न गूढ

Category:

 

आज काकुंना एका नयनी आनंद व एका नयनात दुःख वाटत होतं. आपल्या मुलीच्या लग्नात पतीराजाची कमी त्यांना प्रकर्षाने जाणवत होती. पतीच्या जाण्याने न खचता मोठ्या धीरानी त्यांनी आपल्या मुलांना सांभाळले वाढवले. आज मातृ कर्तव्याबरोबरच पितृ कर्तव्यही त्या पार पाडीत होत्या.

अवर्गिकृत

मैत्रीण

Category:

 

शैक्षणिक मानसशास्त्रात “प्रबलन” ही एक सुंदर संकल्पना मांडली आहे. स्त्रीमध्ये दुसर्‍याचे स्वार्थ निरपेक्ष कौतूक करण्याची एक उपजतच शक्ती असते. तिच्यामुळे तिच्या भोवतीचे सहज प्रबलन होते. म्हणून स्त्रियांनी शिक्षक झाले पाहिजे. “बाई शाळा सोडून जातात.” या गंगाधर गाडगीळांच्या कथेचे हेच मर्म आहे. गुरुजी शाळा सोडून गेले असते तर नायकाला एवढे वाईट वाटले नसते.

व्यक्ती-परिचय

सुबोध भावे

Category:

 

एका दशकापेक्षा ही अधिक काळात सुबोध भावे यांनी नाटकं, दूरचित्रवाणी-मालिका, चित्रपट अशा सर्व दृकश्राव्य माध्यमातून सहज सुंदर आणि ओघवत्या अभिनय शैली मुळे रसिक मनावर अधिराज्य केलं.

व्यक्ती-परिचय

उर्मिला भूतकर

Category:

 

शिक्षण, वाचन याची उपजत गोडी असणार्‍या उर्मिला भूतकरांना साहित्याची विशेष आवड आहे, त्या कवयित्री म्हणून प्रसिद्ध असून, कोणत्याही प्रसंगावर, व्यक्तीवर घटनेवर केवळ ३-४ मिनिटांमध्ये काव्यरचना करतात. “उर्मी” हा त्यांचा एकपात्री प्रयोग महाराष्ट्रासोबतच महाराष्ट्राबाहेर लोकप्रिय ठरला.

व्यक्ती-परिचय

रत्नाकर तारदाळकर

Category:

 

रत्नाकरांच्या कलापैलूत आणखीन भर टाकणारी गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे लेखन कौशल्याची.

व्यक्ती-परिचय

अरुण सरस्वते

Category:

 

पुण्याच्या दापोडी परिसरात राहणार्‍या सरस्वते यांनी बजाज कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी सौरऊर्जेचा वापर करुन दिवे लावण्याचा प्रकल्प तयार केला, “सोलर इलेक्ट्रिफिकेशन प्रोजेक्ट” या नावाने. आयुष्यात ज्यांना “दिवा” हा प्रकारच माहित नाही त्यांच्यासाठी ही गरज अधिक असणार म्हणूनच सरस्वते यांनी आसाममधील दुर्गम भागात असलेल्या हनग्रुम या हाफलॉंग तालुक्याची निवड केली आहे.

व्यक्ती-परिचय

नितीन माधव पायतोडे

Category:

 

नितीन पायतोडे हे मूळचे नागपूरचे पण गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईकर. चित्रपट, नाटकं यामध्ये विशेष आवड असणार्‍या नितीन यांनी अविष्कार या हौशी नाट्य संस्थेत आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.

व्यक्ती-परिचय

दिनू रणदिवे

Category:

 

ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांना “सिंहासन” कादंबरीसाठी सुचलेली दिघू टिपणीसांची व्यक्तीरेखा ही रणदिवेंवरुनच सुचल्याचं अनेकजण अगदी ठामपणे सांगतात. दिनू रणदिवे यांच्या व्यक्तीमत्त्वानं प्रेरित होऊन अनेक ज्येष्ठ पत्रकार त्यांच्याविषयी आदरानं बोलतात व त्यांचे विचार व कार्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवताना दिसतात.