No Picture
व्यक्ती-परिचय

बाबु घोलप

Category:

 

बाबु गणपत घोलप यांच्या शैक्षणीक कारकिर्दीवर नुसती धावती नजर जरी टाकली, तरी त्यांच्या प्रखर बुध्दीमत्तेची व सर्वांगिण क्षमतांची पोच, तसेच आभ्यासाप्रती त्यांनी दाखविलेल्या निष्ठेची खोली त्वरीत ध्यानात येते. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश या लहानश्या तालुक्यात, 1 मे, 1978 रोजी जन्मलेल्या घोलपांनी विद्येसाठी भरपुर कष्ट उपसले.

No Picture
अवर्गिकृत

लोकशाहीत सरकार निरंकुश कशी काय राहू शकते ?

Category:

 

लोकशाहीत कोणतीही सरकार निरंकुश असूच शकत नाही.लोकशाहीत जनता सर्व शक्तिमान असून सत्ताधारी जनतेचे नोकर आहेत. जो विनावेतन व आपल्या घरावर तुळसीपत्र ठेवून जनसेवा करत असेल, त्यालाच जनतेचा नेता म्हणता येऊ शकते ! अन्यथा सर्व नोकर आहेत. संसदेला विशेषाधिकार असले तरी जनतेपेक्षा जास्त नाहीत, हे कसे विसरता येईल ? सत्तेच्या नशेत काहीही वक्तव्य करणे कायदेशीर आहे काय ? सत्ताधाऱ्यांनी जेव्हा-जेव्हा निरंकुश बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा-तेव्हा जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचले, हा इतिहास सांगण्याची गरज नाही.

No Picture
व्यक्ती-परिचय

चंद्रकांत गिरी

Category:

 

चंद्रकांत गिरी हे शिक्षण क्षेत्रात झळकलेले, मराठी तरूणाचे नाव असून ते सध्या सी. एस. कॉर्डिनेटर या पदावर काम करीत आहेत. इंग्रजी संभाषण कौशल्यावर प्रभुत्व कसं मिळवायच याचं साध्या व रोचक भाषेत सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना सविस्तर व शास्त्रशुध्द ज्ञान देणारा व मुंबई विद्यापीठाने अनिवार्य केलेला हा विषय आहे व या विषयाशी निगडीत असलेल्या प्रत्येक गोष्टींमध्ये व वस्तूंमध्ये सुसुत्रता आणण्याचे काम ते त्यांच्या पदाच्या व अधिकारांच्या अख्त्यारित राहून मोठ्या प्रामाणिकपणे करीत असतात.

No Picture
व्यक्ती-परिचय

स्वप्नाली यादव

Category:

 

वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये अल्पवयीन भारतीय खेळाडुंनी दाखविलेले प्राविण्य आता जगमान्य झाले आहे. या क्रीडाप्रकारांमध्ये नव्यानेच आता एका आणखी आव्हानात्मक प्रकाराची भर पडली आहे ती म्हणजे जलतरण व जगभरातून वाखाणल्या गेलेल्या या क्रीडाप्रकाराच्या रथी महारथींमध्ये आपल्या अफाट कौशल्याच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर अढळ ध्रुवस्थान मिळविणारी चिमुरडी म्हणजे स्वप्नाली यादव.

No Picture
व्यक्ती-परिचय

संपदा भोंडसे

Category:

 

संपदा भोंडसे, या यशवंतराव मुक्त विद्यापीठ नाशिक येथील जनसंपर्क अधिकारी या हुद्यावर काम करीत असून इच्छुक विद्यार्थ्यांना सर्व प्रकारची मदत, व त्यांच्या पुढील शैक्षणीक भविष्याचा आराखडा बनविण्यासंबंधीची हवी ती माहिती व प्रत्यक्ष मदत पुरवित आहेत. विद्यार्थी व त्यांचे पालक यांना विद्यापीठाची, समस्त शिक्षकवर्गाची, विद्यापीठाकडुन घेतल्या जाणार्‍या कोर्सेसची, कार्यक्रमांची, उपक्रमांची, व अतिरीक्त स्पर्धांची सांगोपांग माहिती पुरविणे, पालक व शिक्षक यांच्यामधील नात्यामध्ये सुसुत्रता आणणे, व व्यवस्थापन व विद्यार्थीगण यांच्यामधील एकमेव दुव्याचे काम करणे अशा स्वरूपाचे, व्यापक असे कार्य त्या गेली अनेक वर्षे इमानदारीने करीत आहेत.

No Picture
व्यक्ती-परिचय

निपुण धर्माधिकारी

Category:

 

आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांमध्ये, दर्जेदार व उद्योन्मुख तरूण दिग्दर्शकांच्या लांबलचक यादीमध्ये निपुण धर्माधिकारीचा क्रमांक नेहमी अव्वल असायचा.

No Picture
व्यक्ती-परिचय

प्रतिक पारखी

Category:

 

प्रतिक पारखी हा तरूण पुण्याचा रहिवासी असून कला, तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणारा व्यावसायिक आहे. ‘ओव्हेशन क्रिएशन’ ह्या सर्वा प्रकारच्या व आशयांवरच्या दृष्यफितींना सराईतपणे कात्री लावून त्यांच व्यावसायिक एडिटींग करून देणार्‍या लोकप्रिय स्टुडिओचा, समान भागीदार आहे. ऑगस्ट 2009 पासून सुरू झालेला हा स्टुडियो आजवरच्या त्याच्या सर्वात यशस्वी व फायदेशीर जागेवर उभा आहे, व याचं सारं श्रेय जातं ते उत्तुंग प्रतिभेचं व कल्पनाशक्तीचं, अत्यावश्यक भांडवल या स्टुडियोला एकहाती पुरविणार्‍या प्रतिकला.

No Picture
व्यक्ती-परिचय

मुकेश माचकर

Category:

 

मुकेश माचकर हे महाराष्ट्र टाईम्स, केसरी, प्रहार, अशा नामांकित वृत्तपत्रांमधुन नियमीत स्तंभलेखन व प्रासंगिक लेखन करणारे तरूण पत्रकार आहेत. पत्रकारिता व लेखन या दोन्ही विभिन्न भुमिका समर्थपणे निभावताना त्यांनी त्यांची स्वतःची अशी अगदी वेगळी व मार्मिक अशी शैली निर्माण केल्यामुळे त्यांची गणती आज भारतातल्या निवडक काही जबाबदार व लोकप्रिय पत्रकारांमध्ये होते.

No Picture
व्यक्ती-परिचय

रश्मी पुराणिक

Category:

 

रश्मी पुराणिक ह्या ई टी. व्ही. या आघाडीच्या वाहिनीवरील बातमी सदरामध्ये रिपोर्टर म्हणून काम करणार्‍या अतिशय चपळ व हुषार तरूण पत्रकार आहेत. पत्रकार म्ह्टला की त्याला समाजसेवकाचे अंग हे लागतेच. तळागाळातील महिला व पुरूष यांच्या खर्‍या, व वास्तवदर्शी जीवनांचे पारदर्शी चित्रण शहरी व सुसंस्कृत लोकांसमोर आणणे वाटते तेवढे सोपे काम नसते. त्यासाठी डोंगरदर्‍या पालथ्या घालुन दुरवरच्या गावांमध्ये निवासी व फलदायी मुक्काम करावा लागतो. तेथील लोकांच्या समस्या व दुःखे प्रत्यक्ष अनुभवावी लागतात, त्यांच्याशी कौशल्यपुर्ण पध्दतींनी संवाद साधावा लागतो.