व्यक्ती-परिचय

भुपेश कुंभार

Category:

 

भुपेश कुंभार हे भारताच्या गळ्यात सजणार्‍या तंत्रज्ञानाच्या माळेतील लकलकते मणी आहेत, व तंत्रज्ञान विकासाला विशेषतः गाड्या बनविण्याच्या गुंतागुंतीच्या क्षेत्रातील क्रांतीप्रती त्यांनी दिलेले योगदान अद्वितीयच मानले पाहिजे. सल्ला-मसलत हा त्यांचा आवडीचा प्रांत असल्यामुळे ते सध्या बजाज ऑटो लिमीटेड या नावाजलेल्या कंपनी क्षेत्रातील सर्व सल्ला मसलतींचे काम व ग्राहकांना आपल्या परिवारात खेचुन घेण्याचे काम मोठ्या निष्ठेने करीत आहेत.

व्यक्ती-परिचय

भास्कर चितळे तथा काकासाहेब चितळे

Category:

 

काकासाहेब चितळे यांच्या मार्गदर्शन आणि कार्यपद्धतीमुळे व आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे चितळे उद्योग समूह वाढला. व्यवसाय फक्त डेअरीपुरता मर्यादित न ठेवता दूध, दही, लोणी, तूप, श्रीखंडासोबतच लाडू, मोदक, करंज्या व बर्फी आदी पदार्थ बाजारात आणले.

व्यक्ती-परिचय

भाऊ पाध्ये

Category:

 

पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना कादंबरीत अभिव्यक्त केल्या आहेत.

व्यक्ती-परिचय

भालचंद्र वामन केळकर उर्फ भालबा केळकर

Category:

 

पीडीए या नाट्यसंस्थेमुळे ‘भालबा’ ओळखले जात. परंतु ‘तो तो नव्हताच’, ‘असा देव असे भक्त’ आदी पुस्तके, किशोरांसाठी विज्ञानकथा व कादंबरी असे त्यांचे भरपूर लेखनही होते.

व्यक्ती-परिचय

भालचंद्र देशमुख

Category:

 

भालचंद्र उर्फ बी. जी. देशमुखांची गणती भारताच्या राजकीय पटलावरील सर्वपरिचीत व अनुभवी व्यक्तिमत्वांमधल्या, रूबाबदार व तडफदार अधिकार्‍यांमध्ये होते. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीमध्ये त्यांनी भारतातील राजकीय वळणांची वाटचाल जवळून पाहिली होती, व राजकीयदृष्ट्या ऐतिहासिक असलेल्या एका कालखंडाचे ते प्रत्यक्ष साक्षीदार देखील होते. 1951 मध्ये स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले बी. जी देशमुख हे मुंबई राज्यातील पहिले आय. ए. एस. अधिकारी होते.

व्यक्ती-परिचय

भास्कर रामचंद्र (भा रा) भागवत

Category:

 

मराठी बालसाहित्यात अत्यंत गाजलेल्या फास्टर फेणे या कथानायकाचे शिल्पकार म्हणजेच भास्कर भागवत.