व्यक्ती-परिचय

माधव केशव काटदरे

Category:

 

हिरवे तळकोकण’ लिहिणारे निसर्गकवी माधव केशव काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी कविताही त्यांच्या लेखणीतून झरल्या.

व्यक्ती-परिचय

मास्टर भगवान

Category:

 

डान्स हाच भगवानदादा यांचा “प्लस पाइंट’ होता. नाचता नाचता हळूवारपणे अलगद खांदे उडवण्याची त्यांची अफलातून शैली प्रचंड लोकप्रिय ठरली. सुपरस्टार अमिताभ बच्चन, कमल हसन आदी कलाकारांनी भगवानदादा यांची हीच नृत्यशैली सही सही उचलली.

व्यक्ती-परिचय

माधव यशवंत गोखले

Category:

 

श्री माधव यशवंत गोखले हे ठाणे भारत सहकारी बॅंकेचे अध्यक्ष असून ठाणे येथील अनेक सामाजिक चळवळींशी निगडित आहेत. ते मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेचेही अध्यक्ष आहेत.

व्यक्ती-परिचय

मनोहर श्याम जोशी

Category:

 

भारतीय समाजाचं प्रतिबिंब असणाऱ्या त्या मालिकांनी दर्शकांना अनेक वर्षं बांधून ठेवलं होतं. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’,‘काकाजी कहीन’,‘हमराही’,‘जमीन आसमान’,‘गाथा’यांसारख्या मालिकाही लोकप्रिय झाल्या होत्या.

व्यक्ती-परिचय

ममता सपकाळ

Category:

 

ममता सपकाळ यांच्या जीवनाची कथा ही सर्वांच्या समोर आणायची झाली तर त्यावर एक भलं मोठं पुस्तक तयार होईल. सिंधुताई सकपाळांनी जेव्हा हजारो अनाथांच्या आयुष्यामध्ये सौख्याचे रंग भरण्यासाठी आपले आयुष्य वेचायचे ठरविले, तेव्हा त्यांच्या पोट्च्या गोळ्याचा, म्हणजेच ममताचे काय करायचे हा त्यांच्यापुढील यक्षप्रश्न होता. तेव्हा केवळ ममताच्या समजुतदारपणामुळे व असामान्य त्यागशील स्वभावामुळे त्या हजारो अनाथांच्या जीवनातील कल्पवृक्षाचे काम करू शकल्या. माई या आपल्या जन्मदात्या असल्या तरी इतर अनाथ मुलांसाठी त्यांचा सहवास जास्त महत्वाचा आहे, व आपला जेवढा त्यांच्यावर,व त्यांच्या प्रेमावर जेवढा अधिकार आहे तेवढाच किंबहुना त्याहून थोडा जास्तच अधिकार भारतातल्या शेकडो मुला मुलींचा आहे हे सत्य त्यांनी कोवळ्या वयातच स्वीकारले होते.

व्यक्ती-परिचय

मल्हार सदाशिव (बाबूराव) पारखे

Category:

 

बाबूराव पारखे यांनी ‘राम यशोगाथा’ हा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथात पारखे यांनी, ज्या भृगूत्तमांना वैदिक वाङ्‌मयात अथर्वाण म्हटले आहे, त्या भार्गवांचा प्रभाव ॲसीरिया, बॅबिलोनिया, सुमेरिया, ॲनाटोलिया, मिसर या प्रदेशांतही असल्याचे म्हटले होते.

व्यक्ती-परिचय

मयुरेश शिर्के

Category:

 

मयुरेश शिर्के हे नाव माध्यम क्षेत्राशी विशेषत: “श्राव्याशी” जोडलं गेलं असून, रेडिओ, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील व्हि.ओ. (व्हॉईस ओव्हर) तसंच डबिंग शी निगडीत आहे. मुंबई आकाशवाणी केंद्रावर मयुरेश शिर्के यांनी हंगामी निवेदक व आर.जे. (रेडिओ जॉकी) म्हणून काम केलेलं आहे.

व्यक्ती-परिचय

मल्हारराव होळकर

Category:

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, निष्ठेने वाढविण्याची जबादारी सुभेदार मल्हारराव होळकरांनी आपल्या खांद्यावर घेतली होती. मराठी साम्राज्य वाढविण्याकामी मल्हारबांनी आपले सर्वस्व पणाला लावले आणि मराठी साम्राज्याच्या सीमा, सिंधू नदी पर्यंत वाढविल्या. आयुष्यामध्ये जी काही प्रगती झाली ती जेजुरीच्या खंडेराया मुळेच अशी त्यांची धारणा असल्याने त्यांनी कधीही या दैवताचा विसर पडू दिला नाही.