व्यक्ती-परिचय

योगेश दामले

Category:

 

योगेश दामले हे महाराष्ट्रामधील परिचीत व सुप्रसिध्द पत्रकार असून त्यांनी पत्रकारितेशी व महाराष्ट्राच्या दुर्गम भागांमध्ये अतिशय हालाखीच्या परिस्थितीमध्ये गुजराण करणार्‍या आपल्या बांधवांशी दाखविलेली निष्ठा खरोखरीच स्पृहणीय आहे. असं म्हणतात की पत्रकारामध्येही एक समाजसेवक दडलेला असावा, व योगेश हे या अशा काही दुर्मिळ पत्रकारांच्या माळेमधील मणी आहेत, की ज्यांच्यातील झुंजार व तेजस्वी समाजसुधारक आपले दर्शन वारंवार इतरांना घडवित असतो. पत्रकारिता हा त्यांचा श्वास आहे व इतरांना जागृत करण्यासाठी चालविलेले व्रत आहे.

व्यक्ती-परिचय

रमाबाई महादेव रानडे

Category:

 

स्त्री शिक्षण ज्याकाळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य मानली जात होती अश्या परिस्थितीत शिक्षणासाठी पुढाकार घेणारी महिला म्हणजे रमाबाई महादेव रानडे.

व्यक्ती-परिचय

रघुनाथराव पुरूषोत्तम परांजपे (रँग्लर परांजपे)

Category:

 

गणितशास्त्र या विषयातील केंब्रिज विद्यापिठातील रँग्लर ही सर्वोच्च पदवी मिळवलेले कुशाग्रबुध्दीचे अभ्यासक.

व्यक्ती-परिचय

योगाचार्य श्रीकृष्ण उर्फ अण्णा व्यवहारे

Category:

 

ठाणे येथे सुरुवात करुन गेली ४५ वर्षे योगप्रसारासाठी सर्वस्व अर्पण करणारे ज्येष्ठ योगाचार्य श्रीकृष्ण उर्फ अण्णा व्यवहारे हे ठाणे शहराचे एक भूषण होते.  २६ जानेवारी १९६५ रोजी त्यांनी घंटाळी मित्र मंडळाची स्थापना केली. मंडळाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसह अण्णांनी योगसाधनेची चळवळ ठाणे शहरात उभी केली.

व्यक्ती-परिचय

योगेश फुलफगर

Category:

 

योगेश फुलफगर यांचा जन्म जानेवारी 18, 1985 मध्ये पुणे येथे झाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात अनेक नवे प्रयोग करण्यास सुरूवात केली. त्यांच्यामधील सतत नव्या व तजेलदार विषयांवर चित्रपट बनविण्यास आसुसलेल्या, व चित्रपट क्षेत्रातुन नवीन संवेदनशील चित्रपटांची नांदी आणण्यास तयार असलेल्या या प्रतिभावान दिग्दर्शकाची दखल हिंदी चित्रपटसृष्टीने घेतली.

व्यक्ती-परिचय

योगेश्वर अभ्यंकर

Category:

 

अक्रुरा नेऊ नको माधवा, अजिंक्य भारत अजिंक्य, अभिमानाने मीरा वदते, अमृताची गोडी तुझ्या, आज मी नाथा घरी आले’ यासारखी एकाहून सरस गाणी त्यांनी लिहिली व त्याकाळच्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये ती गाजली.

व्यक्ती-परिचय

रंगनाथ पठारे

Category:

 

रंगनाथ पठारे हे कथा आणि कादंबरी या दोन्ही साहित्यप्रकारांत ते लेखन करतात. वैचारिक, समीक्षा आणि अनुवाद असे प्रकारही त्यांनी हाताळले. मात्र, ते रमले कथा-कादंबरीत.