(डॉ.) मनोहर जाधव

मराठी साहित्यात सामाजिक वास्तवाचे भान असावे, या मताचा हिरीरीने पुरस्कार करणारे साहित्यिक डॉ. मनोहर जाधव हे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख. विचारमंथनातून निमिर्तीक्षम साहित्यसेवा आणि अध्यापनातून कृतिशील संवेदना जपणारे जाधव समतावादी परंपरा पुढे नेणारे असे कवी.

साहित्यिकांनी सामाजिक दृष्टिकोनातून बदलत्या समाजजीवनाचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, या त्यांच्या भूमिकेचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटते. वास्तवाची जाणीव, आसपासच्या घटनांचे भान आणि लेखन परंपरेचे अधिष्ठान त्यांच्या लेखनातून ठळक होते. या जाणीवेतूनच दलित साहित्याकडे ते पाहतात.

समाजव्यवस्थेचे बळी ठरलेल्या दलितांच्या आत्मभानाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सहसंवेदनेची आहे. दलित कविता ही मराठी कवितेचे एक वैशिष्ट्यपूर्ण वळण आहे. या कवितेच्या मुळाशी असलेला जीवनानुभव त्यांना स्पर्श करतो. दलित कवींच्या तिसर्‍या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे कवी शेषराव धांडे यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत दलित कवितेवर होणारा आक्रस्ताळेपणाचा आरोप ते खोडून काढतात. आक्रस्ताळेपणा आणि आक्रमकपणा, स्थितिशीलता आणि परिवर्तन, आक्रोश आणि विदोह यातील फरकावर ते नेमके भाष्य करतात.

'दलित स्त्रियांची आत्मकथने', 'प्रत्ययपर्व', 'साहित्य : शोध आणि बोध' यांसारखी त्यांची पुस्तके समीक्षकांनी गौरविली आहेत. समतावादी साहित्य संमेलन असो वा भटक्या-विमुक्तांवरील राष्ट्रीय चर्चासत्र, जाधव आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून आलेली सुधारणावादी भूमिका आग्रहाने मांडतात.

त्यांनी हिंदी भाषेतही मुशाफिरी केली आहे. कवी अरुण काळे यांच्या कवितासंग्रहाच्या 'सायरन के शहर' या अनुवादाला डॉ. जाधव यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. हिंदीतील सहा समकालीन मान्यवर कवींच्या कवितांच्या अनुवादाचे कामही त्यांनी केले आहे.

फैजपूर येथे अध्यापन करून १९९५ मध्ये ते पुण्यात आले. पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुखपद सांभाळताना त्यांची कृतिशीलता अधिक स्पष्ट होते. मराठी विषयात व्यवसायाभिमुख कौशल्यावर आधारित चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचे धोरण काळाबरोबर जाण्याच्या त्यांच्या आग्रहाला पुष्टी देते.

अमराठी भाषकांना मराठी शिकविण्यासाठी सहा महिन्यांचा मराठीचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. बालवाङ्मयाचा विद्यापीठ पातळीवर अभ्यास व्हावा, अशी निराळी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

डॉ. जाधव यांना बुलढाणा जिल्हा साहित्य संघातर्फे उत्कृष्ट साहित्य निमिर्तीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)




मराठी साहित्यात सामाजिक वास्तवाचे भान असावे, या मताचा हिरीरीने पुरस्कार करणारे साहित्यिक डॉ. मनोहर जाधव हे पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रमुख. विचारमंथनातून निमिर्तीक्षम साहित्यसेवा आणि अध्यापनातून कृतिशील संवेदना जपणारे जाधव समतावादी परंपरा पुढे नेणारे असे कवी.

साहित्यिकांनी सामाजिक दृष्टिकोनातून बदलत्या समाजजीवनाचा आढावा घेण्याची आवश्यकता आहे, या त्यांच्या भूमिकेचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात उमटते. वास्तवाची जाणीव, आसपासच्या घटनांचे भान आणि लेखन परंपरेचे अधिष्ठान त्यांच्या लेखनातून ठळक होते. या जाणीवेतूनच दलित साहित्याकडे ते पाहतात.

समाजव्यवस्थेचे बळी ठरलेल्या दलितांच्या आत्मभानाकडे पाहण्याची त्यांची दृष्टी सहसंवेदनेची आहे. दलित कविता ही मराठी कवितेचे एक वैशिष्ट्यपूर्ण वळण आहे. या कवितेच्या मुळाशी असलेला जीवनानुभव त्यांना स्पर्श करतो. दलित कवींच्या तिसर्‍या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे कवी शेषराव धांडे यांच्या कवितासंग्रहाच्या प्रस्तावनेत दलित कवितेवर होणारा आक्रस्ताळेपणाचा आरोप ते खोडून काढतात. आक्रस्ताळेपणा आणि आक्रमकपणा, स्थितिशीलता आणि परिवर्तन, आक्रोश आणि विदोह यातील फरकावर ते नेमके भाष्य करतात.

‘दलित स्त्रियांची आत्मकथने’, ‘प्रत्ययपर्व’, ‘साहित्य : शोध आणि बोध’ यांसारखी त्यांची पुस्तके समीक्षकांनी गौरविली आहेत. समतावादी साहित्य संमेलन असो वा भटक्या-विमुक्तांवरील राष्ट्रीय चर्चासत्र, जाधव आपल्या सामाजिक दृष्टिकोनातून आलेली सुधारणावादी भूमिका आग्रहाने मांडतात.

त्यांनी हिंदी भाषेतही मुशाफिरी केली आहे. कवी अरुण काळे यांच्या कवितासंग्रहाच्या ‘सायरन के शहर’ या अनुवादाला डॉ. जाधव यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली आहे. हिंदीतील सहा समकालीन मान्यवर कवींच्या कवितांच्या अनुवादाचे कामही त्यांनी केले आहे.

फैजपूर येथे अध्यापन करून १९९५ मध्ये ते पुण्यात आले. पुणे विद्यापीठात मराठी विभागप्रमुखपद सांभाळताना त्यांची कृतिशीलता अधिक स्पष्ट होते. मराठी विषयात व्यवसायाभिमुख कौशल्यावर आधारित चार नवे अभ्यासक्रम सुरू करण्याचे धोरण काळाबरोबर जाण्याच्या त्यांच्या आग्रहाला पुष्टी देते.

अमराठी भाषकांना मराठी शिकविण्यासाठी सहा महिन्यांचा मराठीचा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठीही त्यांनी पुढाकार घेतला आहे. बालवाङ्मयाचा विद्यापीठ पातळीवर अभ्यास व्हावा, अशी निराळी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.

डॉ. जाधव यांना बुलढाणा जिल्हा साहित्य संघातर्फे उत्कृष्ट साहित्य निमिर्तीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)


Author