बहुभाषिक धनंजय कुलकर्णी हे एक व्युत्पन्न लेखक होते. पेशाने ते इंग्लीशचे प्राध्यापक. अवघ्या दोन वर्षांपूर्वीच ते हैदराबाद येथील ' आचार्य नरेंद्र देव हिंदी ओरिएन्टल कॉलेज ' चे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. मात्र निवृत्तीनंतरही त्यांच्या वाचन आणि लेखनामध्ये जराही खंड पडला नाही.
प्रदीर्घकाळ हैदराबादमध्ये वास्तव्य असणार्या कुलकर्णी यांचा मूळ पिंड हा साहित्यप्रेमीचा. मराठी ही त्यांची मातृभाषा, परंतु इंग्लीश हा त्यांचा कायमच
अध्ययनाचा आणि अध्यापनाचा विषय होता. या दोन भाषांशिवाय त्यांना हिंदी, तेलुगु आणि कन्नड या भाषा चांगल्याप्रकारे अवगत होत्या. तेलुगुमधून त्यांनी काही कथा आणि एक कादंबरी असे लेखनही केलेच ; परंतु तेलुगुतील उत्तमोत्तम साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून देण्यासाठी त्या त्या साहित्यकृतींचा अतिशय समर्थ असा अनुवादही त्यांनी केला.
हैदराबादमधील मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश या संस्थेशी त्यांचे जवळचे नाते होते. त्या संस्थेतर्फे प्रकाशित होत असलेल्या ' पंचधारा ' या त्रैमासिकाच्या संपादनात ते मनापासून भाग घेत. त्यांनी केलेल्या तेलुगुतील काही साहित्यकृतींचे अनुवाद ' पंचधारा ' मध्येच प्रकाशित झाले. अनेकवेळा ते माहितीपर अशी स्फूटेही त्या त्रैमासिकात लिहीत. हैदराबादमध्ये राहणार्या कुलकर्णी यांना मराठी भाषा आणि मराठी साहित्य याबाबत कमालीचे प्रेम होते. नव्याने प्रसिद्ध होणारे मराठी साहित्य ते आवर्जुन वाचत. त्यातल्या काही लेखकांशी त्यांचा पत्रव्यवहारही होता. आवडलेल्या साहित्यकृतीला मनमोकळी दाद देण्याचा उमदेपणा त्यांच्याकडे होता. त्यांचा बालपणातला काही काळ महाराष्ट्रात गेला होता. काही कथा किंवा लेख वाचल्यानंतर त्यांच्या मनातल्या बालपणातल्या रम्य आठवणी जाग्या होत आणि मग त्या आपल्याला का आठवल्या याचे कारण सांगत त्या आठवणींचा पट आपल्या पत्रातून अलगदपणं उलगडत त्या त्या लेखाचे किंवा कथेचे कौतुक करत. मराठी दैनिकंही ते बारकाई वाचत आणि नियमितपणं ताज्या घडामोडींवर अत्यंत सखोल असं लेखन करत.
इंग्लीश आणि फिलॉसॉफी या दोन विषयांत एम.ए. आणि एम.फील. असणार्या कुलकर्णींच्या वागण्यात कमालीचा साधेपणा होता. निजामाच्या इतिहासाबद्दल त्यांना अदम्य कुतूहल होते. त्याचे चपखल संदर्भ त्यांच्या लेखनातून डोकावत. आंध्र प्रदेशमधील राजकारण, त्या राज्याचा इतिहास आणि तेथील संस्कृती या विषयांना धरून त्यांनी विपुल असे लेखन केले. अलीकडेच त्यांचे ' हैदराबादची चित्तर कथा ' हे पुस्तक मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले. ' महाराष्ट्र टाइम्स ' मध्ये त्यांनी सातत्याने लेखन केले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
बहुभाषिक धनंजय कुलकर्णी हे एक व्युत्पन्न लेखक होते. पेशाने ते इंग्लीशचे प्राध्यापक. अवघ्या दोन वर्षांपूर्वीच ते हैदराबाद येथील ‘ आचार्य नरेंद्र देव हिंदी ओरिएन्टल कॉलेज ‘ चे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले होते. मात्र निवृत्तीनंतरही त्यांच्या वाचन आणि लेखनामध्ये जराही खंड पडला नाही.
प्रदीर्घकाळ हैदराबादमध्ये वास्तव्य असणार्या कुलकर्णी यांचा मूळ पिंड हा साहित्यप्रेमीचा. मराठी ही त्यांची मातृभाषा, परंतु इंग्लीश हा त्यांचा कायमच
अध्ययनाचा आणि अध्यापनाचा विषय होता. या दोन भाषांशिवाय त्यांना हिंदी, तेलुगु आणि कन्नड या भाषा चांगल्याप्रकारे अवगत होत्या. तेलुगुमधून त्यांनी काही कथा आणि एक कादंबरी असे लेखनही केलेच ; परंतु तेलुगुतील उत्तमोत्तम साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून देण्यासाठी त्या त्या साहित्यकृतींचा अतिशय समर्थ असा अनुवादही त्यांनी केला.
हैदराबादमधील मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश या संस्थेशी त्यांचे जवळचे नाते होते. त्या संस्थेतर्फे प्रकाशित होत असलेल्या ‘ पंचधारा ‘ या त्रैमासिकाच्या संपादनात ते मनापासून भाग घेत. त्यांनी केलेल्या तेलुगुतील काही साहित्यकृतींचे अनुवाद ‘ पंचधारा ‘ मध्येच प्रकाशित झाले. अनेकवेळा ते माहितीपर अशी स्फूटेही त्या त्रैमासिकात लिहीत. हैदराबादमध्ये राहणार्या कुलकर्णी यांना मराठी भाषा आणि मराठी साहित्य याबाबत कमालीचे प्रेम होते. नव्याने प्रसिद्ध होणारे मराठी साहित्य ते आवर्जुन वाचत. त्यातल्या काही लेखकांशी त्यांचा पत्रव्यवहारही होता. आवडलेल्या साहित्यकृतीला मनमोकळी दाद देण्याचा उमदेपणा त्यांच्याकडे होता. त्यांचा बालपणातला काही काळ महाराष्ट्रात गेला होता. काही कथा किंवा लेख वाचल्यानंतर त्यांच्या मनातल्या बालपणातल्या रम्य आठवणी जाग्या होत आणि मग त्या आपल्याला का आठवल्या याचे कारण सांगत त्या आठवणींचा पट आपल्या पत्रातून अलगदपणं उलगडत त्या त्या लेखाचे किंवा कथेचे कौतुक करत. मराठी दैनिकंही ते बारकाई वाचत आणि नियमितपणं ताज्या घडामोडींवर अत्यंत सखोल असं लेखन करत.
इंग्लीश आणि फिलॉसॉफी या दोन विषयांत एम.ए. आणि एम.फील. असणार्या कुलकर्णींच्या वागण्यात कमालीचा साधेपणा होता. निजामाच्या इतिहासाबद्दल त्यांना अदम्य कुतूहल होते. त्याचे चपखल संदर्भ त्यांच्या लेखनातून डोकावत. आंध्र प्रदेशमधील राजकारण, त्या राज्याचा इतिहास आणि तेथील संस्कृती या विषयांना धरून त्यांनी विपुल असे लेखन केले. अलीकडेच त्यांचे ‘ हैदराबादची चित्तर कथा ‘ हे पुस्तक मौज प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाले. ‘ महाराष्ट्र टाइम्स ‘ मध्ये त्यांनी सातत्याने लेखन केले.