(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • ज्येष्ठ निर्माते विनायक चासकर

    दूरदर्शन सारख्या कौटुंबिक माध्यमाच्या प्रेक्षकांना काय रुचेल, पचेल याचा विचार करून, अनेक कथासंग्रह वाचून, त्यातून निवडलेल्या कथांचं नाटयीकरण, पटकथा-संवादासह स्वत: लिहून काढत बसलेले ते असायचे ते.. दुस-या दिवशी, त्या पटकथेचं कॅमेरा स्क्रिप्ट तयार झालं की मग कथेला साजेशी पात्रयोजना, त्यासाठी संपर्क साधणे वगरे.. तिस-या दिवशी दुपारी वाचन. संध्याकाळी कॅमे-याच्या अंदाजानं हालचालींचं नियोजन.. आणि लगेच पुढल्या दिवशी कलागारांत चित्रीकरण, असा त्यांना घटनाक्रम वर्षानुवर्ष होता.

  • अतुल खंडेराव कुलकर्णी

    अतुल कुलकर्णी यांनी १९८६ साली लातूर शहरातून पत्रकारितेची सुरुवात केली.सध्या मुंबईत दैनिक लोकमतचे ब्युरो चीफ, विशेष प्रतिनिधी म्हणून लोकमतमध्ये कार्यरत. सामाजिक विषयांना स्पर्श करीत, व्यवस्थेतील चुकांवर प्रहार करीत केलेले लिखाण ही जमेची बाजू. विविध वृत्तमालिका लिहीताना सामान्य माणूस केंद्रस्थानी कसा राहील याचा सातत्याने केलेला प्रयत्न कायम दिसून येतो.

  • डॉ. सतीश धवन

    डॉ. सतीश धवन यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२० रोजी श्रीनगरमध्ये झाला. धवन हे पंजाब (लाहोर) विद्यापीठाचे पदवीधर. गणित, भौतिकशास्त्रात बी. ए., इंग्रजी साहित्यात एम. ए., अभियांत्रिकीत बी. ई., १९४७ साली मिनिसोटा विद्यापीठातून विमानविद्या अभियांत्रिकीत एम. एस केले.

  • श्रीपाद महादेव माटे

    (2 सप्टेंबर 1886 ते 25 डिसेंबर 1957)

    बहुविविध प्रकारचे ललित व वैचारीक लेखन करणारे लेखक. स्वंतत्र प्रज्ञाचे शैलिकार साहितिक, नामवंत प्राध्यापक , अस्पृश्यासाठी कार्य करणारे समाजसेवक, जन्म विदर्भातील शिरपुर हया गावी. शिक्षण सातारा व पुणे येथे. न्यु इग्लिश स्कुल सातारा आणि न्यु इंग्लिश स्कुल पुणे या शाळेतुन अध्ययन केल्यानंतर 1935 ते 1946 हया कालखंडात सर परशुरामभाऊ महाविद्ययालयात ते इंग्रजीचे व मराठीचे प्राध्यापक होते. प्राध्यापक म्हणून त्यांची कारकीर्द अत्यंत यशस्वी व फलदायी ठरली. माटे यांच्या वाड्गमय आंरभीच्या काळी त्यांनी `केसरी प्रबोध` हया ग्रंथाचे संपादक म्हणून परीश्रम पुर्वक काम केले. माटे यांनी या ग्रंथासाठी लेखनही केले. महाराष्ट्र सावत्सरिक हा माटे यांनी संपादलेला आणखी एक महत्त्वपुर्ण ग्रंथ होय. विविध संवत्सरीचा माटे यांनी आभ्यास केला. आणि महाराष्ट्रासाठी स्वंतत्र संवत्सरीचा आभ्यास केला. रोहीणी या मासिकाचे माटे हे पहिले संपादक. शास्त्रीय ज्ञानाचे आणि विज्ञान प्रसाराचे महत्त्व जाणुन त्यांनी `विज्ञानबोध` संपादिला.

  • रमाकांत आचरेकर

    भारतरत्न सचिन तेंडुलकर सहित अजित आगरकर, अमोल मुजुमदार, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, चंद्रकांत पंडित, बलविंदर सिंग संधू, समीर दिघे यांच्यासारख्या महान क्रिकेटपटूसह असंख्य नामवंत क्रिकेटपटू घडवणारे आणि पद्मश्री व द्रोणाचार्य या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलेले ऋषितुल्य प्रशिक्षक श्री रमाकांत आचरेकर हे खर्‍या अर्थाने क्रिकेटचे  महागुरू होते. 

  • अभिनेत्री व राजकारणी नवनीत कौर राणा

    अभिनेत्री व राजकारणी नवनीत कौर राणा यांचा जन्म ३ जानेवारी १९८६ रोजी झाला. नवनीत कौर या मूळच्या पंजाबी. त्यांचे वडील लष्करात अधिकारी होते. नवनीत राणा यांचे शिक्षण मुंबईत झालेले आहे. आधी मॉडेलिंग नंतर म्युझिक अल्बम आणि नंतर चित्रपट सृष्टीत त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे. नवनीत कौर राणा यांनी तेलगू , कन्नड आणि पंजाबी चित्रपटात अभिनेत्री म्हणून आपला ठसा उंटावताना अनेक ब्लॉक बस्टर हिट दिलेले आहेत. नवनीत कौर यांनी कन्नड़ चित्रपट दर्शन ने आपले करीयरची सूरवात केली. त्यांनी तेलुगु चित्रपट सीनू, वसंथी व लक्ष्मी, चेतना, जग्पथी, गुड बॉय, भूमा मध्ये अभिनय केला आहे.

    नवनीत कौर यांनी मल्याळम चित्रपट लव इन सिंगापुर व पंजाबीतील लड़ गए पेंच मध्ये अभिनय केला आहे. नवनीत कौर २०११ मध्ये आमदार रवी राणा यांच्याशी अमरावती येथे विवाहबद्ध झाल्या. त्यांचा विवाहदेखील गाजला कारण त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होऊन लग्न केले. आमदार रवी राणा यांनी तीन हजार जोडप्यांसमवेत आपले लग्न केले होते. त्यामुळे राणा दाम्पत्याचा विवाह गिनीज बुकातदेखील नोंदवला गेलेला आहे. सातत्याने प्रकाशझोतात राहण्यासाठी भव्य सोहळे आयोजित करण्याची आमदार राणा यांची परंपरा राहिली आहे.

    नवनित कौर राणा या चित्रपट तारका असल्याने त्यांच्या दहीहंडीच्या सोहळ्यात दरवर्षी बॉलीवुड स्टारची हजेरी असंते. नवनीत कौर यांचे पती आमदार रवि राणा गेल्या दहा वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार म्हणून नवनीत कौर राणा यांनी निवडणूक लढविली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • भारतीय महिला बॉक्सिंगपटू मेरी कोम

    मांगते चुंगनेजंग मेरी कोम उर्फ मेरी कोमचा मणिपूरमधील दुर्गम खेड्यात, कांगथेईमध्ये एका गरीब कुटुंबात जन्म झाला. मुलांना शिकवण्याइतकीही आई-वडिलांची परिस्थिती नव्हती. बँकॉकच्या आशियाई स्पर्धांमध्ये मणिपुरी बॉक्सर डिंको सिंग यांनी सुवर्णपदक पटकावल्याचे कळताच, मेरी कोमलाही आपण बॉक्सिंगच्या रिंगणात का उतरू नये, असे वाटू लागले.

  • रंगभूमी कलाकार मास्टर कृष्णराव

    कृष्ण गणेश फुलंब्रीकर तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी झाला.

    आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव.

    त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशी झाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले.

    १९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या. गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे.

    नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली. कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली.

    त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.

    अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत. वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्नं केला. पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली. मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो.

    मास्टर कृष्णराव यांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • डॉ. विशाखा घालते – प्राचीन वास्तू संवर्धनाचा जागर

    आधुनिक वास्तुशास्त्राचे शिक्षण देता देता मध्यप्रदेशातील दुर्लक्षीत प्राचीन वास्तु संवर्धन व त्याच्या इतिहास जागृति चा जागर नागपुरच्या प्रो.डॉ. विशाखा कवठेकर घालत असुन तिच्या जागरणाने अनेक गड, किल्ले, महाल, वाडे, मंदीर, तलाव, बावड्या आजघडीला संरक्षित झाल्या आहेत.

  • चाफेकर बंधु

    वासुदेव चाफेकर व त्यांचे बंधु हे आद्य भारतीय क्रांतिकारकांमध्ये गणले जातात.