जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथील निवृत्त शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञान परिषद पत्रिकेचे संपादक असलेले श्री वामनाचार्य हे वयाच्या पंचाहत्तरी नंतरही अत्यंत जोमाने अणि उत्साहाने कार्यरत आहेत. मराठी आडनावांचा मोठा संग्रह.
उदित नारायण यांचा जन्म १ डिसेंबर १९५५ रोजी झाला. त्यांचे संपूर्ण नाव उदित नारायण झा. त्यांच्या वडिलांचे नाव किशना झा आणि आईचे नाव भुवनेश्वरी झा आहे. उदित यांनी पी.बी शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी रेडिओ नेपाळमध्ये मॅथिली आणि नेपाळी लोकांचे गाणे गाऊन करिअरची सुरुवात केली. उदित यांची गायन करिअरची सुरुवात 'सिंदूर' या नेपाळी गाण्याने केली होती. १९७८ मध्ये ते मुंबईला आले. १९८० मध्ये त्यांनी पहिल्यांदा एका सिनेमात गाण्याची संधी मिळाली. मात्र त्यांना खरी ओळख 'कयामत से कयामत तर'मधून मिळाली. या सिनेमातील 'पापा कहते है बडा नाम करेगा' गाण्यासाठी त्यांना पहिल्यांदा उत्कृष्ट गायकाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. उदित नारायण यांना २००९ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरवले होते. आपल्या आवाजासाठी त्यांना तीनवेळी उत्कृष्ट गायकाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. सोबतच त्यांना फिल्मफेअर उत्कृष्ट गायकचे ५ पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना हे पुरस्कार 'कयामत से कयामत तक', 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे', 'राजा हिंदुस्तानी', 'हम दिल दे चुके सनम', 'लगान'सारख्या सुपरहिट सिनेमांसाठी मिळाले आहेत. मा.उदित नारायण यांनी आतापर्यंत ३० भाषांमध्ये जवळपास १५ हजार गाणी गायली आहेत. उदित नारायण यांचा मुलगा आदित्य तो गायक आणि अभिनेता आहे.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट.
शैलेश भागवत यांचे आकाशवाणी वरून अनेक वेळा सनई वादनाचे कार्यक्रम झाले आहे. त्यांनी भारताबरोबरच दुबई,अमेरिका, युरोप आणि श्रीलंका येथे ही अनेक कार्यकम केले आहेत. शैलेश भागवत यांनी अनेक मोठ्या कलाकारांच्या बरोबर सनईच्या जुगलबंदीचे कार्यक्रम केले आहेत.तसेच परीक्षक म्हणून शैलेश भागवत यांनी अनेक स्पर्धेसाठी काम केले आहे.
केसरीच्या संचालिका असलेल्या झेलम यांना फायनान्स, टिकिटिंग आणि ॲडमिनिस्ट्रेशन या विभागांमध्ये विशेष रुची आहे. मात्र, पर्यटनाच्या नवनवीन योजना आखण्यात त्यांचा हातखंडा आहे. नेहमीच्या ग्राहकांबरोबरच शेतकऱ्यांना पर्यटनाबरोबरच शेती आणि शेतीपूरक व्यवसायासंबंधी नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी म्हणून ॲग्रो टुरिझम, विद्यार्थ्यांसाठी ‘नासा’ टूर आणि कार्पोरेट क्षेत्रात विशेष लोकप्रिय असलेली माईस (MICE) अशा पूर्णपणे भिन्न आणि लोकप्रिय योजना आखण्याचे श्रेय ‘झेलम’ यांचेच.
समाजशास्त्र विषयातील संशोधक, मानववंश शास्त्राच्या एक तज्ज्ञ विचारवंत जगन्मान्य विदुषी, ललित निबंध लेखिका अशी कर्तृत्वान महिला म्हणजे इरावती कर्वे.
स्नेहल भाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले आणि मग पुढचा त्या गाण्याने जो इतिहास घडवला तो सर्वश्रुतच आहे. संगीतकार आणि गायक म्हणून कधी स्नेहल तर कधी वासुदेव भाटकर हे नाव घेऊन वावरले. स्नेहल भाटकर, भाटकर बुवा, व्ही.जी.भाटकर, वासुदेव भाटकर,बी वासुदेव! एकाच माणसाची ही अनेक.त्यांचे पूर्ण नाव वासुदेव गंगाराम भाटकर. त्यांचा जन्म १७ जुलै १९१९ रोजी झाला. आकाशवाणीच्या नोकरीत राहून देखिल संगीत दिग्दर्शनाचा व्यवसाय करता यावा म्हणून शोधलेला, नियमाला बगल देणारा हा मार्ग होता. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव. त्यातील स्नेहल घेऊन केदार शर्मा ह्यांनी सुहागरात ह्या चित्रपटाच्या वेळी त्यांचे स्नेहल भाटकर असे नव्याने बारसे केले. नोकरीत म्हणजे आकाशवाणी मध्ये ते व्ही.जी भाटकर म्हणून वावरले तर भजनी मंडळात भाटकरबुवा म्हणून वावरले. गोड गळ्याची देणगी त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती. त्या नंतर श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच आजुबाजुच्या त्या परिसरात नियमितपणे भजनं चालत, त्यातही ते उत्साहाने भाग घेत आणि “ह्यातूनही आपण बरेच शिकलो” असे ते प्रांजळपणे नमूद करतात. ह्या भजनांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतो की ज्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय निगर्वी आणि समाधानी झाला.कलेच्या ह्या क्षेत्रात ते अजातशत्रू राहिले ते ह्याच स्वभावामुळे. म्हणूनच आयुष्यभर त्यांनी ह्या भजनांची साथ कधीच सोडली नाही. भजनी मंडळात ते भाटकरबुवा म्हणूनच प्रसिद्ध होते. १९३९ साली त्यांनी एचएमव्हीत पेटीवादक म्हणून नोकरी पत्करली पण पुढे आपल्या स्वत:च्या कुवतीवर ते संगीतकार म्हणून नावारुपाला आले. १९४४ च्या सुमारास बाबुराव पेंटर ह्यांच्या रुक्मिणी स्वयंवर ह्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांची सुधीर फडके ह्यांच्याबरोबरीने निवड झाली आणि मग वसुदेव-सुधीर ह्या नावाने त्या चित्रपटाला त्या दोघांनी संगीत दिले.गंमत म्हणजे ह्यांतील भाटकरांनी संगीत दिलेली काही गाणी बाबुजींच्या पत्नी ललिता फडके ह्यांनी गायलेली होती.
केदार शर्मा ही व्यक्ती भाटकरबुवांच्या आयुष्यातील एक अती महत्वाची व्यक्ती होती. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात केदार शर्मांनी बुवांना जो हात दिला त्याचा विसर कधीही पडू न देता केदार शर्मांच्या पडत्या काळातही पैसे न घेता बुवांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिलंय.बुवांचे वैषिष्ठ्य हे की त्यांनी राज कपूरने पहिल्यांदाच नायक म्हणून काम केलेल्या नीलकमल ह्या चित्रपटातील त्याच्या तोंडच्या गाण्यासाठी आपला आवाज उसना म्हणून दिलेला आहे.ह्या चित्रपटाचे संगीतकार देखिल ते स्वत:च होते. इथे त्यांनी बी वासुदेव हे नाव धारण केलेले होते.तसेच मधुबाला,तनुजा,गीताबाली,नूतन इत्यादिंच्या चित्रपट पदार्पणातील पहिल्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय.आधी नायिका म्हणून गाजलेल्या आणि नंतर निर्मात्या बनलेल्या कमळाबाई मंगरुळकर,कमला कोटणीस,शोभना समर्थ वगैरे स्त्री निर्मात्यांच्या पहिल्या चित्रपटांनाही बुवांनीच संगीत दिलंय.
नीलकमल,सुहागरात,हमारी बेटी,गुनाह,हमारी याद आयेगी,प्यासे नैन,भोला शंकर,आजकी बात,दिवाली की रात,पहला कदम इत्यादि हिंदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत खूपच गाजलंय. तसेच मराठीतील रुक्मिणी स्वयंवर,चिमुकला पाहुणा,नंदकिशोर,मानला तर देव,बहकलेला ब्रह्मचारी इत्यादि चित्रपटांचे संगीतही विलक्षण गाजलंय.नंदनवन,राधामाई,भूमिकन्या सीता,बुवा तेथे बाया इत्यादि नाटकांचे संगीतही चांगलेच गाजलेय. मा. स्नेहल भाटकर यांचे २९ मे २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- प्रमोद देव
आज २१ सप्टेंबर
शब्दास्वरांचे जादुगार महान हार्मोनियम व ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२३ रोजी झाला.
गोविंदराव पटवर्धन बोटात विलक्षण जादू असलेला कलाकार! हार्मोनियमवर ज्या सफाईने त्यांची बोटं फिरत, त्यात ते स्वरालयीची जी कामगत करत ते केवळ दैवी म्हणावं लागेल.
जन्मताच सूर,ताल व लय यांची निसर्गदत्त देणगी लाभलेले गोविंदराव यांनी आपल्या मुंजीत हार्मोनियम वाजवून आपल्या सुप्त गुणाची चुणूक दाखवली होती. आपल्या वयाच्या १४ व्या वर्षी संगीत वेणुनाद या नाटकाच्या प्रयोगाला ऑर्गन ची साथ केली होती.
विशेष हार्मोनिअमच्या साडेतीन सप्तकांवर अधिराज्य गाजवणाऱ्या गोविंदराव यांनी वादनाचं कोणतंही तांत्रिक शिक्षण घेतलेलं नव्हतं, ते स्वतः उत्तम तबला वादकही होते. त्यामुळे लय, ताल यावर त्यांचे प्रभुत्व होते.
१९४० साली मुंबईला आल्यावर पं गोविंदराव साहित्य संघाच्या संगीत नाटकांना ऑर्गनची साथ करू लागले. त्या वेळी देवधर स्कूल ऑफ म्युझिक व मनहर बर्वे यांच्या विद्यालयात पं. कुमार गंधर्व व पं.राम मराठे यांची ओळख झाली, तेव्हा पासून अखेर पर्यत पं गोविंदराव यांनी त्यांना साथ केली. कोणत्या स्वरासाठी कोणतं बोट वापरायचं, असं विचारलं तर ते म्हणायचे - मी फक्त वाजवतो. बाकीचं काही मला माहीत नाही. त्यातून मला आनंद मिळतो असं ते सांगायचे.
पेटीवादन हे दोन प्रकारे केलं जातं. एक म्हणजे प्रत्येक स्वर सुटासुटा वाजवणं आणि दुसरा म्हणजे जोडून वाजवणं. गोविंदराव या दोन्ही पध्दतींनी वाजवायचे. हार्मोनियम व ऑर्गन वादनातला सफाईदारपणा हे त्यांच्या वादनाचं वैशिष्टय होतं. अतिशय जलद आणि सफाईदार पलटे ते वाजवत असत. त्यांची दुसरी खासियत म्हणजे ते पद वाजवताना त्यातले शब्द ऐकू आले पाहिजेत असा त्यांचा आग्रह असायचा. ते आपल्या शिष्यांना शिकवतानाही ते त्याच पध्दतीने शिकवायचे.
गोविंदराव पटवर्धन यांना पेटीवर्धन पण म्हणत असत. त्यांना गोविंदराव असे म्हणलेले रुचत नसे, ते नम्रतेने म्हणत गोविंदराव म्हणायच्या योग्यतेचे एकच पं गोविंदराव टेंबे मला नुसतेच गोविंदा म्हणा, खरेतर आपल्या गुहाघरवासीयांनी गोंद्या म्हणून हाक मारलेले त्यांना आवडायचे. अनेक संगीत कार्यक्रमांमधून, संगीत नाटकांतून त्यांनी साथसंगत केली. आलापी, तान वाजवण्यातली सफाई होती. आयुष्यभर रामभाऊ मराठे, कुमार, वसंतराव, छोटा गंधर्व यांसारख्या दिग्गज कलाकारांना साथ करून करून वादनातलं हे गायकी अंग गोविंदरावांनी आत्मसात केलं होते, व स्वत:त अक्षरश: मुरवलं होते.
गोविंदराव पटवर्धन यांच्या एकसष्ठी सत्कारात पु.ल नी त्यांच्या बरोबर हार्मोनियम वादन केले होते, तेव्हा पु.ल मार्मीकतेने म्हणाले होते, पोटात व पोटरीत गोळा येतो हे माहिती होते पण बोटातही गोळा येतो हे आज प्रथम समजले.
पं. गोविंदराव पटवर्धन यांचे पट्टशिष्य म्हणून डॉ.विद्याधर ओक यांना ओळखले जाते. त्याच्या इतर शिष्यांमध्ये पं. विश्वनाथ कान्हेरे, मकरंद कुडले, विघ्नेश्र्वर जोशी, अशी नावे घेता येतील. आदित्य ओक तर लहानपणापासून गोविंदराव पटवर्धन यांचे हार्मोनियम वादन ऐकत आला आहे. तो पण त्यांचाच शिष्य.
पं. गोविंदराव पटवर्धन यांचे ३० जानेवारी १९९६ रोजी निधन झाले.
गोविंदराव पटवर्धन एक हार्मोनियम बरोबरच उत्कृष्ट ऑर्गनवादक होते. त्यांच्यासंबधी काही प्रसंग
एकदा कोकणात काही वर्षापूर्वी एक नाटक होतं साथीला गोंविंदराव होते आणि वयाच्या पंच्याहत्तरीत असलेले छोटा गंधर्व गायला आले होते तेव्हा एका पदाच्या वेळी गोविंदराव आणि तबलजी गंधर्वाँधा कैक वेळ समेवर यायलाच देत नव्हते त्यावर छोटा गंधर्व गोविँदरावांना म्हणाले, "अरे गोविंदा माझं वय पंच्याहत्तर आहे आता मी दमलोय आता थांब" गंधर्वाँची ही वाक्य गोविंदरावानी ऑर्गनवर जशीच्या तशी उतरवली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला.
पूर्वी नाटकं उघड्यावर आणि बत्तीच्या उजेडात होत. असंच एका उत्सवाच्या प्रसंगी नाटकाचं आयोजन करण्यात आलं साथीला गोविंदराव होते साधारण दहाचं नाटक पण साडेनवाच्या सुमारास अचानक पाऊस सुरु झाला सहाजीकच नाटक रद्द झालं त्यावर कोणीतरी म्हणालं गोविंदराव "तुमचा ऑर्गनवादनाचा कार्यक्रम देवळात होऊ दे" ते गोविंदरावानी मान्य केलं आणि हा त्यांचा कार्यक्रम तब्बल पहाटे साडेतीन वाजेपर्यँत रंगला.
पं. गोविंदराव पटवर्धन यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त पु.ल.देशपांडे यांनी केलेले भाषण.
http://www.marathisrushti.com/mvideos/speeches-by-pu-la-deshpande-about-pt-govindrao-patwardhan/
पं. गोविंदराव पटवर्धन यां चे व्हिडीओ
www.youtube.com/watch?v=0JWkKjxNGNc
www.youtube.com/watch?v=5qXM9L3bjBA
www.youtube.com/watch?v=_c-JWigeh3I
https://www.youtube.com/watch?v=JM1jtZJRLxE
https://www.youtube.com/watch?v=eYjUcsXukMY
https://www.youtube.com/watch?v=m8KcijSZvEY
पं. गोविंदराव पटवर्धन यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
शब्दास्वरांचे जादुगार महान हार्मोनियम व ऑर्गन वादक पं.गोविंदराव पटवर्धन (31-Jan-2017)
शब्दास्वरांचे जादुगार पं. गोविंदराव पटवर्धन (8-Oct-2017)
#PtGovindraoPatwardhan #GovindraoPatwardhan
प्रकाश घांग्रेकर मराठी संगीत रंगभूमीवरील गायकनट होते. प्रकाश घांग्रेकर मुळचे पुण्याचे.संगीत नाटकाची कारकीर्द घडवण्यासाठी १९६० साली मुंबईला आले.धारदार आवाज,देखणे व्यक्तिमत्व पल्लेदार ताना घेण्याची कसब या मुळे त्यांच्या भूमीका प्रभावी होत.देवियाच्या द्वारी या नाटकातून त्यांची कारकीर्दची सुरवात झाली.
मानिनी त्यांनी संगीत सौभद्र, सुवर्णतुला, मदनाची मंजिरी, गोरा कुंभार, कट्यार काळजात घुसली या नाटकांत भूमिका केल्या. मानिनी सोडतुझा अभिमान, मजला नसे निवारा, घेई छंद मकरंद , सुरत पियाबिन या नाट्यपदांवर प्रकाश घांग्रेकर यांनी आपला ठसा उमटवला होता. गीत गाती ज्ञानेश्वर या नाटकातील भूमिका वाखाण्याजोगी होती. या नाटकातील एक तत्व नाम हे पद त्यांनी गाजवले होते. त्यांना बालगंधर्व पुस्कार व संगीत नाट्य स्पर्धेत रौप्य पदक मिळाले. प्रकाश घांग्रेकर यांचे १ एप्रिल २००३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
प्रकाश घांग्रेकर यांची गाणी.
अवघे गर्जे पंढरपूर, कटु योजना ही, केशवाचे भेटी लागलेंसे कांता वंचिता निज पतिता, तूंचि दिव्यांगना, ब्रह्म मूर्तिमंत, मानिनी सोड तुझा अभिमान, रमणि मजसि निजधाम लहरी अता सुखाच्या, सदा कलहाविना, सुखमय आशा, ही बहु चपल वारांगना, हो तनय काल
https://www.youtube.com/watch?v=uNz8x7vFNg4
‘मेरा कलम तो अमानत है मेरे लोगों की, मेरा कलम तो अदालत मेरे जमीर की है’ किंवा ‘अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले, जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले’ लिहिणारे शायर अहमद फराज. ऊर्दू शायर अहमद फराज यांचा जन्म १२ डिसेंबर १९३१ रोजी नौशेहरा (पाकिस्तान) येथे झाला. प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा यावरचे तरल संवेदनशील शेर ही त्यांच्या शायरीची खासियत. त्याची गज़ल सुसंस्कृत व प्रगल्भ बुद्धिवान कवीची गज़ल संबोधली जाते.
त्याच्या शायरीवर फैज व अहमद नदीम कासमीच्या भावुक व संवेदनशील शैलीचा प्रभाव होता. सामाजिक संदर्भ त्यांच्या गज़लेपेक्षा कवितेत प्रकर्षांने साकारतात. ग़जलेत प्रणयाचा रंगछटा तरल शब्दशैलीत उमलतात. त्याची गज़ल सुसंस्कृत व प्रगल्भ बुद्धिवान कवीची गज़ल संबोधली जाते.
अहमद फराज यांचे वडील सय्यद मोहम्मदशाह परख पेशावर विद्यापीठात प्राध्यापक होते. फराजच्या काव्यलेखनाचा आरंभ असा झाला. ते दहावीत शिकत असताना त्यांनी पहिला शेर रचला अन् तो वडिलांच्या उशाशी ठेवला.
जब कि सब के वास्ते लाये है कपडे सेल से
लाये है मेरे लिए कैदी के कंबल जेल से
१९५१ मध्ये फराज पेशावरहून कराचीला आले. एक वर्ष कराची रेडिओवर कार्यक्रम करीत होते. ती नोकरी सुटली. अन् पेशावरला परतले. अन् १९५४ साली बी. ए. करतानाच त्यांचा ‘तनहा- तनहा’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर त्यांनी फारसीमध्ये एम.ए. केलं. अन् ते पेशावर रेडिओवर निर्माते झाले. अन् वडील सेवानिवृत्त होताच पेशावर विद्यापीठात लेक्चरर झाले. पाकिस्तान नॅशनल सेंटर इस्लामबादचे डायरेक्टरही झाले. १९८२ ला त्यांना हद्दपार करण्यात आलं तेव्हा ते लंडनला राहिले. सरकार बदलल्यावर ते पाकिस्तानात परतले. त्यांनी पाच-सहा नाटकंही लिहिली. जानाँ’, ‘बे-आवाज गली-कूचों में’ ‘नाबीना शहर में आईना’, ‘असासा’.
अहमद फराजच्या शायरी संग्रहाची नावे अशी, ‘दर्द-आशोब’,‘तनहा-तनहा’, ‘शब खून’, ‘नायाफ्त’, ‘जानाँ. ज्येष्ठ उर्दू समीक्षक शमीम हनफीच्या मते फराजच्या भाषेवर व कथनशैलीवर फारसी व क्लासिकल उर्दू गजलचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. प्रेमातील मिलन, विरह, प्रतीक्षा इत्यादीचे शेर फराजच्या गज़लांचे वैशिष्टय़ होते.
रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ
आ फिर से मुझे छोडम्के जाने के लिए आ
अब के हम बिछडे तो शायद कभी ख्वाबों में मिले
जिस तरह सूखे हुए फूल किताबों में मिले
‘दर्द-आशोब’ या फराजच्या पहिल्या संग्रहातील गज़ला मेहदी हसनने गाऊन जगभर पोहचवून लोकप्रिय केल्या. मेहदी हसन मात्र गज़ला गाताना शायराचे नाव अवश्य नमूद करत असत.
अहमद फराज यांचे २५ ऑगस्ट २००८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ :-लोकसत्ता/ डॉ. राम पंडित
Copyright © 2025 | Marathisrushti