(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रुपाली मदन

    कलेचं शिक्षण आणि सामाजिक भान या दोन्हीचं एकत्रीकरण करणार्‍या ठाण्यातल्या कलाकार म्हणजे रुपाली मदन.

  • थोरले बाजीराव पेशवे

    एकदाही पराभूत न झालेले जगाच्या इतिहासातील हे एकमेव सेनापती आहेत.

  • साहित्यिक बाबूराव रामजी बागुल

    बाबूराव बागुल हे दलित लेखकांमधले प्रमुख साहित्यिक. शोषितांच्या आणि पददलितांच्या जीवनावर त्यांनी भेदक लिखाण केलं आहे. ‘धारावीत भरलेल्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बुद्धिप्रामाण्यवादी आणि परिवर्तनवादी असणाऱ्या बागुल यांनी अण्णा भाऊ साठ्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रभावित होऊन कामगार चळवळीत कार्यकर्ता म्हणून योगदान दिलं.

  • वाणी जयराम

    वाणी जयराम या दक्षिणच्या एक प्रतिभाशाली गायिका आहेत. वाणी जयराम यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४५ रोजी झाला. त्यांनी तमिळ, तेलुगू , कन्नड, मल्याळम हिंदी आणि मराठी , गाणी गायली आहेत आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारने तीन वेळा सन्मानित केले गेले आहे. त्याचे पार्श्वगायना मध्ये खूप योगदान आहे. वयाच्या ८ व्या वर्षी त्यानी आकाशवाणी वर गायन केले. कर्नाटक और हिंदुस्तानी शैली त्या शिकल्या नाहीत तर त्यांनी विशेष अभ्यास केला. लग्नानंतर मुंबईत आल्यावर प्रथम ब्रेक मिळाला तो संगीतकार वसंत देसाई यांनी १९७१ मध्ये 'गुड्डी' चित्रपटासाठी ३ गाणी गाऊन घेतली तेव्हा.

    वाणी जयराम यांनी गायलेल्या "बोल रे पपीहरा" या गाण्याने त्यांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली. या गाण्याला त्यांना तानसेन सन्मान मिळाला. सन १९८० साली 'मीरा' या चित्रपटा साठी फ़िल्म-फ़ेयर पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य कलाकार असूनही गायिका वाणी जयराम यांचे मराठी नाटय़संगीत आणि भावगीतांमधील योगदान मोठे आहे.`संगीतकार वसंत देसाई यांना त्यांच्या आवाजातील व्याकुळता आणि पोत आवडला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिची सुरुवातीची वाटचाल इथे सुरू झाली. केवळ वसंत देसाई यांनी आपल्या आवाजावर आणि सांगितिक प्रतिभेवर घेतलेल्या परिश्रमांमुळे आपली कारकीर्द यशस्वी ठरली अशा शब्दांत वाणी जयराम याही कृतज्ञता व्यक्त करतात.

    ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे एकमेव नाटय़पद सोडले तर वाणी जयराम यांची बाकी सर्व गाणी ही भाव आणि चित्रपट गीते आहेत. ‘प्रेम पिसे भरले अंगी’ यातून ईश्वराविषयी वाटणारी उत्कटता संत नामदेवांनी आपल्या या अभंगातून साकारली आहे. ‘टाळ मृदुंग उत्तरेकडे, आम्ही गातो दक्षिणेकडे’ असे या गीतांत नामदेव म्हणून जातात. उत्तर ही भोगाची दिशा आहे तर पश्चिम ही मुक्ती देणारी दिशा आहे. आध्यात्मात रंगलेल्या या संताला साहजिकच भोगाऐवजी मुक्तीची आस लागली आहे. कोरसमध्ये या गीताची मोहिनी काही विलक्षणच आहे.

    ‘प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही ‘पाहिलं का कुणी पाहिलं का’, देवाचे घर कुणी पाहिलं का? ‘दूर जाते ही वाट रात्र अंधारी दाट, अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी’ हे उच्च पट्टीत त्यांनी बांधलेले गीत वाणी जयराम पुन्हा झकास रंगवून गेल्या आहेत. ‘यशोदा’ या चित्रपटातील ‘माळते मी माळते, केसात पावसाची फुले मी माळते’ आणि ‘जिवलग माझा नाही आला’ (परिवर्तन) ही संगीतकार दत्ता डावजेकर यांची गाणी आहेत, तर संगीतकार राम कदम यांची ‘उठा उठा हो सूर्यनारायणा’ ‘माठ पाण्यात बुडाला’ आणि ‘थांब जोडीदारा’ ‘माठ पाण्यात बुडला’ हे ‘भोळी भाबडी’ चित्रपटातील गीत.‘भोळी मात्र त्यातले ‘टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संगे’ हे रामभाऊंचे गाणे अधिक लोकप्रिय झाले होते.

    ‘जसा पाऊस उन्हात न्हाला’ आणि ‘झाले बेजार गर्दी ही दाटली’ दोन गाणीही चांगली गाजली होती. मा.वाणी जयराम यांची ही सर्व गाणी आता ती सहसा ऐकायला मिळत नाहीत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट. https://www.youtube.com/watch?v=SPAjRbHvobs https://www.youtube.com/watch?v=NbchuCfqBls

  • अभिनेत्री माला सिन्हा

    ६० आणि ७०च्या दशकांत आपल्या सौंदर्य आणि अभिनय कौशल्याच्या बळावर आपलं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारी अभिनेत्री माला सिन्हा हिचा जन्म ११ नोव्हेंबर १९३६ रोजी साली कोलकाता येथे झाला.
    मा.माला सिन्हा यांचे मूळ नाव एल्डा आहे. त्यांचे वडिल अल्बर्ट सिन्हा हे बंगाली ख्रिश्चन तर आई नेपाळी होती. शाळेतील मित्रमैत्रिणी तिला तिच्या अल्डा या नावावरुन डालडा असे चिडवत असल्याने तिचे नांव बदलण्याचा निर्णय घेतला गेला.

    बेबी नझमा या नावाने जय वैष्णेदेवी या बंगाली चित्रपटातुन तिचा बालकलाकार म्हणुन प्रवेश झाला. त्यानंतर श्रीकृष्ण लिला, जोग बियोग, धुली या सारख्या चित्रपटांतुन ती बालकलाकार म्हणुन चमकली. लहानपणापासुनच तिने नृत्य व गायन या कलाप्रकारांचे प्रशिक्षण घेण्यास प्रारंभ केलेला होता. बंगाली दिग्दर्शक अर्धेंदु बोस यांनी शाळेतील नाटकातुन त्यांचा अभिनय पाहिला आणि लागलीच तिच्या वडिलांना भेटुन तिने चित्रपटांत नायिकेचे काम करावे यासाठी त्यांची संमती मिळवली.

    रोशनआरा या बंगाली चित्रपटाव्दारे माला सिन्हा यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्या नंतर अनेक बंगाली चित्रपटांतुन तिने अभिनय केला. अशाच एका बंगाली चित्रपटाच्या चित्रिकरणासाठी मुंबईला आलेली असतांना अभिनेत्री गीता बालीशी तिची भेट घडुन आली. त्या भेटीने प्रभावित झालेल्या गीता बालीने केदार शर्मा यांचेशी तिची गाठ घालुन दिली. अशारितीने रंगीन रातें हा केदार शर्मांचा हिंदी चित्रपट तिला मिळाला. मात्र हिंदीत माला सिन्हा यांचा प्रदर्शित झालेला पहिला चित्रपट ठरला बादशाह. यात अभिनेता प्रदिप कुमार नायक होता. त्यानंतर एकादिशी नावाच्या पौराणिक चित्रपटातुन त्यांनी अभिनय केला. मात्र सुरवातीचे हे दोन्ही चित्रपट आर्थिकदृष्ट्या अयशस्वी ठरले. त्यानंतरचा माला सिन्हा यांची प्रमुख भुमिका असलेला प्रदिप कुमार बरोबरचा हॅम्लेट हा चित्रपट देखील अयशस्वीच ठरला मात्र यावेळी तिच्या अभिनयाबाबत बोलले जाऊन तिची दखल मात्र घेतली गेली.

    प्रदिप कुमार यांचेबरोबर फॅशन, डिटेक्टीव्ह, दुनिया ना माने या सारख्या नायकप्रधान चित्रपटांतुन अभिनय केल्यानंतर अभिनेते बलराज सहानी यांनी दिग्दर्शित केलेला एकमेव चित्रपट लालबत्ती, नौशेरखान ए आदिल, फिर सुबह होगी या सारख्या चित्रपटांतील त्यांच्या अभिनयाने माला सिन्हा यांची अष्टपैलु अभिनेत्री म्हणुन ओळख प्रस्थापित झाली. आव्हानात्मक, वैविध्यपुर्ण व चाकोरीबाह्य भुमिका स्वीकारण्याकडे त्यांचा’ नेहमी कल होता. अभिनेता, दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या प्यासा या चित्रपटात अभिनय करण्याची त्यांना संधी मिळाली. प्रियकाराला नाकारुन एका श्रीमंत व्यक्तीशी लग्न करणार्या तरुणीच्या या भुमिकेसाठी आधी मधुबालाचे नांव ग्रुहित धरण्यात येत होते. माला सिन्हाने या भुमिकेला योग्य तो न्याय दिला व हा चित्रपटच तिच्या कारकिर्दीत एक मैलाचा दगड ठरला.

    'फिर सुबह होगी' तसेच यश चोप्रा दिग्दर्शित पहिला चित्रपट 'धुल का फुल' या चित्रपटांतुन तिने घवघवीत यश मिळवले. प्यासा, अनपढ, दिल तेरा दिवाना, गुमराह, हिमालय की गोद में, आँखे, मर्यादा हे त्यांच्या सिनेकारकिर्दीतील यशस्वी व विशेष उल्लेखनीय चित्रपट आहेत. बहुरानी, गुमराह, गहरा दाग, अपने हुए पराये, जहाँआरा या चित्रपटांतील तिचा अभिनय चित्रपट जाणकार सर्वोत्तम मानतात. माला सिन्हाने राजकुमार, राजेंद्र कुमार, मनोज कुमार यांचे बरोबर अनेक नायिकाप्रधान चित्रपटांतुन अभिनय केलेला असला तरी अभिनेता विश्वजीत बरोबरची तिची रुपेरी पडद्यावरील जोडी सर्वाधिक लोकप्रिय ठरली. आसरा, नाईट इन लंडन, दो कलियाँ, तमन्ना, नई रोशनी, प्यार का सपना, पैसा या प्यार, जाल, फिर कब मिलोगी अशा दहा चित्रपटांतुन ही जोडी पडद्यावर झळकली. २००७मधे त्यांना स्टार स्क्रिनचा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यावेळी दोघांना एकाचवेळी मंचावर बोलावण्यात येऊन गौरवण्यात आले.

    त्या काळात मालासिन्हा यांच्या चित्रपटांतील भुमिका या नायकांपेक्षा अधिक सशक्त व महत्वाच्या असत. त्या काळात चित्रपटाच्या श्रेयनामावलीत नायकाच्या आधी माला सिन्हाचे नांव नमुद करण्यात येत असे. गुरुदत्त, राज कपुर, देव आनंद, प्रदिप कुमार, किशोर कुमार हे नायक मात्र वरिष्ठ असल्याने याला अपवाद होते. या वरिष्ठ नायकां प्रमाणे शम्मी कपुर, राजेंद्र कुमार, राज कुमार या समकालीन तर मनोज कुमार, धर्मेंद्र, राजेश खन्ना, सुनिल दत्त, संजय खान, जितेंद्र, अमिताभ बच्चन या सारख्या त्या काळातील नवोदित अभिनेत्यांसमवेत नायिका म्हणुन माला सिन्हा यांनी अभिनय केला. नवोदितांबरोबर अभिनय करण्यास तिचा नेहमीच होकार असे फक्त तिची भुमिका सशक्त आहे की नाही हाच एक निकष ती चित्रपटांची निवड करतांना लावत असे.

    मर्यादा हा त्यांच्या सिनेकारकिर्दीतील सर्वाधिक यशस्वी चित्रपट मानला जातो. एक अभिनेत्री बरोबरच माला सिन्हा उत्तम गायिका देखील होत्या. ऑल इंडिया रेडीओची त्या मान्यताप्राप्त गायिका होत्या. अनेक भाषांमधुन त्यांनी त्या काळी गायनाचे कार्यक्रमही केले. मात्र चित्रपटांत पार्श्वगायन करण्याची संधी तिला मिळाली नाही. याला अपवाद फक्त 'ललकार' या चित्रपटातील मेरे मेहबुब हे गीत.
    धुल का फुल, बहुरानी, जहाँआरा, हिमालय की गोद में या चित्रपटांतील अभिनयासाठी तिला फिल्मफेअर या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

    उत्तम कुमार, किशोर कुमार यांचे समवेत नायिका म्हणुन तिने बंगाली चित्रपटांतुन अभिनय केला. बंगाली आणि हिंदी चित्रपटांनंतर तिने नेपाळी चित्रपटातही प्रवेश केला. माइतीघर हा तिने अभिनय केलेला एकमेव नेपाळी चित्रपट. चिदंबर प्रसाद लोहानी हे यात तिचे नायक होते. इस्टेट एजंट च्या व्यवसायात असलेल्या लोहानींच्या ती प्रेमात पडली व त्यांचेच बरोबर पुढे जाऊन घरच्यांच्या संमतीने ती विवाहबध्द झाली. लग्नानंतर तिने चित्रपटांत अभिनय करु नये अशी लोहानी यांची अट होती. सुरवातीला माला सिन्हाने ती मान्य देखील केली. परंतु तिला अभिनयाच्या चांगल्या संधी मिळत असल्यामुळे तिचं अभिनयाप्रतीचं वेड तिला स्वस्थ बसु देत नव्हते. अखेर सी पी लोहानी यांनी आपली अट मागे घेतली. काठमांडु येथे ते व्यवसाय सांभाळत असतांना माला सिन्हाला चित्रपटात अभिनय करण्यासाठी त्यांचेपासुन दुर राहावे लागत असे.

    कालांतराने सशक्त नायिकाप्रधान भुमिका करणाऱ्या माला सिन्हा यांनी तशी वेळ येताच चित्रपटांतुन चरित्र भुमिका करण्यास सुरवात केली. ३६ घंटे, जिंदगी, कर्मयोगी, बेरहम, हरजाई, ये रिश्ता ना तुटे, बाबु, खेल या चित्रपटांतुन माला सिन्हा चरित्र भुमिकांतुन चमकल्या. माला सिन्हा यांच्यावर चित्रित झालेली गाणी रसिकांना प्रचंड भावली. ये हरियाली और रास्ता..., धीरे धीरे चल चाँद गगन में... आपकी नजरोने समझा, प्यार के काबिल मुझे... झुमता मौसम मस्त महिना... यांसारख्या एकाहून एका सरस गाण्यांना अभिनेत्री मा.माला सिन्हा यांनी आपल्या अदाकारीने चार चाँद लावले. १९५४ ते १९७४ अशा वीस वर्षांत जवळपास ६५ हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. प्रतिभा सिन्हा या आपल्या कन्येला तिने चित्रपटांत येण्यासाठी प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले. पण प्रतिभाला चित्रपटांत अजिबातच यश मिळवता आले नाही. राजा हिंदुस्तानी चित्रपटातील परदेसी परदेसी जाना नहीं.. केवळ या गाण्यासाठीच ती ओळखली जाते.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट / श्रीराम वाघमारे

  • प्रभाकर वाडेकर

    चारुहास पंडित यांची चित्रे आणि प्रभाकर वाडेकर यांची कथा यातून साकारणारा चिंटू दैनिक सकाळमधून दररोज भेटीला यायचा. भोपाळ दुर्घटनेच्यावेळी त्यांनी आणि चारूहास पंडित यांनी एक चित्रमालिका वृत्तपत्रामध्ये चालवली.

  • श्रीकांत ठाकरे

    श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते. संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त पत्रकारिता आणि चित्रपट संबंधी लेखन श्रीकांतजींनी केलं, यामध्ये नवीन चित्रपटांची समीक्षा असेल किंवा वैविध्यपूर्ण लेखन, त्यामध्येखास “ठाकरे टच” असायचा “परखड”, “सत्यता” आणि “वैचारिक” पैलू त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडलेले दिसत;“मार्मिक” या मासिकात ६० व ७० च्या दशकात “शुद्ध निषाद” या नावाने “सिनेमाची समीक्षा” करणारे सदर लोकप्रिय ठरले.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर

    डॉ. आंबेडकर म्हणजे तळागळातील लोकांना बौद्धिक व समाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते. शिकल्याशिवाय आपल्यावरील न्याय, अन्याय, आपले हक्क ही आपल्याला कळत नाही अशा प्रकारे त्यांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग समाजात फुंकले.

  • ख्यातनाम नाटककार, लेखक अशोक पाटोळे

    आई रिटायर होतेय', 'हीच तर प्रेमाची गंमत आहे', 'जाऊ बाई जोरात', 'श्यामची मम्मी', 'एक चावट संध्याकाळ' ही गाजलेली नाटकं, 'हसरतें', 'श्रीमान श्रीमती' या सुपरहिट मालिका आणि 'चौकट राजा', 'झपाटलेला' यासारखे सिनेमे आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारणारे अशोक पाटोळे यांचे शालेय शिक्षण गिरगावातील विल्सन हायस्कूल येथे झाले. अशोक पाटोळे यांना लहानपणापासूनच लेखनाची आवड होती. त्यांचा जन्म ५ जून, १९४८ रोजी झाला.

    कथाकार, नाटककार म्हणून १९७१ मध्ये त्यांनी ‘आयजीच्या जिवावर बायजी उदार’ ही पहिली एकांकिका लिहिली. त्यांनी लिहिलेली पहिली कथा 'नवाकाळ' या दैनिकात प्रकाशित झाली होती. पुढे 'श्री दीपलक्ष्मी', साप्ताहिक मार्मिक' आदी नियतकालिकांमधून त्यांनी लिहिलेल्या विनोदी कथा प्रकाशित झाल्या होत्या. पाटोळे ह्यांनी दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांचेही लेखन केले होते. लहानपणापासूनच लिखाणाची आवड असलेले पाटोळे यांनी पहिल्यांदा १९७१ मध्ये 'आयजीच्या जीवावर बायजी उदार' या एकांकिकेचे लेखन केले होते. यानंतर त्यांनी विनोदी व ह्रदयस्पर्शी अशा दोन्ही प्रकारच्या नाटकांचे लेखन करत नाट्यक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

    पाटोळे यांनी लिहिलेली २० नाटके व्यावसायिक रंगभूमीवर गाजली. 'झोपा आता गुपचूप' हे त्यांचे पहिले नाटक. 'मुंबई पोर्ट ट्र्स्ट'च्या 'एकटा जीव सदाशिव' या नाटकात त्यांनी विनोदी नायकाची भूमिका केली होती. चित्रकला, वक्तृत्व, गीतगायन व अभिनय यांचीही पाटोळ्यांना आवड होती. अनुपम खेर यांच्या ’कुछ भी हो सकता है’ या आत्मकथनात्मक नाटकाचे लेखन अशोक पाटोळे यांनी केले होते. अशोक पाटोळे यांची अनेक नाटके हिंदी-गुजरातीतही यशस्वी ठरली आहेत. सातव्या मुलीची सातवी सातवी मुलगी हा कथासंग्रह व पाचोळ्या हा त्यांचा कविता संग्रहदेखील प्रसिद्ध झाला होता. अधांतर, हद्दपार, अध्यात न मध्यात, हसरतें यांसारख्या यशस्वी दूरदर्शन मालिकांचे लेखनही त्यांनी केले होते. अशोक पाटोळे यांचे १२ मे २०१५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके

    कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन शांता शेळके केलेल्या वृतपत्र, संपादक तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.