जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
निशीकांत कामत हा आजच्या तरूण पिढीचा दबलेला आवाज चित्रपटांद्वारे सगळ्यांपुढे मांडणारा एक नव्या व ताज्या दमाचा दिग्दर्शक. नव्या पिढीच्या आकांक्षाचं, स्वप्नांचं, व अपेक्षांचं प्रतिनिधीत्व करणारे असे त्याचे चित्रपट आजच्या दिग्दर्शकांच्या विशिष्ठ साच्यापेक्षा खुप वेगळे व आशयपुर्ण असतात. प्रेक्षकांच तीन तास निव्वळ मनोरंजन करण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावतील व समाजात वावरणार्या अपप्रवृत्तींविरोधात आवाज उठवायला लावतील असे चित्रपट बनवण्याकडे त्याचा कल असतो व त्याची ही वेगळी तर्हा व शैली प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे.
सापेक्षतावाद आणि पुंजवादाला एकत्र आणणार्या पुंजकीय गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रात अभय अष्टेकरांनी केलेली कामगिरी लक्षणीय ठरली आहे.
आशिष खान देबशर्मा हे अली अकबर खान यांचे चिरंजीव, अलाउद्दीन खान हे त्यांचे आजोबा. सरोदवादक आशिष खान देबशर्मा यांचा जन्म ५ डिसेंबर १९३९ यांचा जन्म खाला. त्यांची मावशी, म्हणजे अन्नपूर्णादेवी. आशिष खान देबशर्मा यानी वयाच्या ५ व्या वर्षी आपल्या आजोबांच्या मार्गदर्शना खाली शिक्षण घेण्यास सुरवात केली, व पुढे अली अकबर खान यांच्या कडे तालीम घेतली. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांनी ऑल इंडिया रेडिओ नॅशनल प्रोग्राम मध्ये आणि व तानसेन म्युझिक संमेलन मध्ये आपल्या वडिलांसोबत आणि आजोबांबरोबर वादन सादर केले होते.
२००२ मध्ये त्यांना अमेरिकेतील इलिनॉय आर्ट्स कौन्सिलची फेलोशिप आणि २००५ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००७ साली रोजी आशिष खान ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडमधील रॉयल एशियाटिक सोसायटीचे फेलोशिप मिळाली. आशिष खान देबशर्मा यांना २००६ सालासाठी त्याला "गोल्डन स्ट्रिंग्स ऑफ द सरोद" अल्बमसाठी 'बेस्ट वर्ल्ड म्युझिक' श्रेणीमध्ये ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारही मिळाला आहे.
आशिष खान यांनी जॉन बारम, जॉर्ज हॅरिसन, रिंगो स्टार, द बीटल्स, एरिक क्लॅप्टन, चार्ल्स लॉयड, जॉन हाडी, अॅलिस कोलट्रणे, एमिल रिचर्ड्स, डॅलस स्मिथ, डॉन पोप, जॉर्ज स्ट्रुनझ, अरदिशर फराह अश्या अनेक संगीतकारांसोबत काम केले आहे. आशिष खान सध्या न्यू ऑरलियन्स संगीतकारांसोबत टिम ग्रीन आणि जेसन मार्सलिस यांच्यासारखे आशिष खान सध्या कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ आर्टस, लॉस एन्जेलिस, यूएस येथे भारतीय शास्त्रीय संगीताचे सहायक प्रोफेसर आणि अमेरिकेतील सांताक्रुझ येथे कॅलिफोर्निया विद्यापीठातील संगीत विभागाचे सहायक प्राध्यापक आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=z0kt_vRo_Qo
https://www.youtube.com/watch?v=-rU1QGYm65s
गोल्डन स्ट्रिंग्स ऑफ द सरोद
https://www.youtube.com/watch?v=_bpsXIJUxPI
‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक गोपीनाथ सावकार यांनी त्यांच्या ‘कलामंदिर’ या नाटय़संस्थेतर्फे २० ऑगस्ट १९६६ रोजी रंगभूमीवर आणले. पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या रंगभूमीवर सादर केला गेला होता.
माणिक वर्मा यांनी वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे १९३९ साली दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेली चार भावगीते गायली आणि दोन ध्वनिमुद्रिकामध्ये गाऊन ह्या क्षेत्रात त्या आल्या. अर्थात चित्रपटगीतांच्या बाबतीतही त्यांचे महत्वाचे स्थान आहे. प्रभात कंपनीच्या हिंदी ‘ गोकुल ‘ या चित्रपटात सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केलेले गीत त्यांनी प्रथम गायले. परंतु त्यांनी जास्त गाणी हिंदीपेक्षा मराठी चित्रपटांसाठी गायली. माणिक वर्मा यांनी असंख्य भावगीते , भक्तिगीते , चित्रगीते गायली आणि ती सर्व गाणी आजही आपल्या संस्कृतिक जीवनाचा भाग बनून राहिली आहेत.
अवघे १५०० रुपये घेऊन १९९१ साली नाशिकमध्ये आलेले विराज लोमटे यांनी यशश्री ग्रुप या बांधकाम कंपनीची सुरुवात करून २० वर्षांत कोटीच्या कोटी उड्डाणे घेत मराठी पाऊल पडते पुढे हे दाखवून दिले आहे.
सांगली येथील मध्यमवर्गीय कुटूंबातील विराजने आई - वडिलांच्या आग्रहाखातर बी. ई. सिव्हीलचे शिक्षण घेतले. सांगलीसारख्या छोट्या शहरात कर्तृत्वाला संधी नाही म्हणून नोकरीच्या शोधात नाशिक गाठले. आर्किटेक्ट जयंत देशमुख यांच्या कंपनीत दोन वर्षे नोकरी करून १९९४ साली स्वत:चा व्यवसाय सुरू केला.
पीडब्ल्यूडीमधील बांधकाम ठेकेदार म्हणून करिअरला सुरुवात केली. त्याचबरोबर अनेक औद्योगिक इमारती, खासगी बंगलो व अनेक संस्थांच्या इमारती बांधल्या. स्वत:ची आवड म्हणून प्लॅनिंग करीत आर्किटेक्चरल फर्मही काढली. या फर्मला पहिल्याच वर्षी सांगली येथे वसंतदादा स्मारकाच्या डिझाइनसाठी पारितोषिकही मिळाले.
सांगली, नाशिक, शिर्डी, कोपरगांव, देवळाली, सटाणा, त्र्यंबकेश्वर नगरपालिका, राहुरी कृषी विद्यापीठ, यशवंतराव मुक्त विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, विविध बँका आदींच्या आर्किटेक्चरल पॅनलवर त्यांची संस्था काम करते आहे. शिर्डी येथील हॉटेल, नाशिक येथील बंगल्यांसाठी त्यांची डिझाइन्स वापरली जात आहेत. त्र्यंबकेश्वर नगरपालिकेसाठी सिटी डेव्हलपमेंट प्लॅनही त्यांच्या संस्थेने बनविला आहे.
बांधकाम व्यवसायात सचोटी, प्रामाणिकपणा, गुणवत्ता व पारदर्शकता यामुळे यशश्री, भाग्यश्री, धनश्री, विजयश्री, श्रीगणेश, अपूर्वाई, गझल, धन्वंतरी, श्रीयोगेश्वर, श्रीसूर्यमाला हे प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. उदघाटनापूर्वीच पूर्ण बुक होणारा त्र्यंबकचा श्रीवरद व पुण्याच्या डी. एस. के. समूहाबरोबर साकारण्यात येत असलेला सुवास्तू प्रकल्प हे त्यांच्या व्यवसायाच्या मानांकनाचे केंद्रबिंदू ठरले आहेत.
व्यवसायाबरोबरच सामाजिक बांधीलकी जपताना पर्यावरण रक्षणासाठी ३०० वृक्षांचे रोपण व संगोपन, मोदक स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करतात. लघुउद्योग भारती या राष्ट्रीय संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व मानद सचिवपदही त्यांनी भूषविले आहे. नुकत्याच पार पडलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ६० टक्के इतके मतदान घडविण्यासाठी नाशिक सिटीझन फोरमने राबविलेल्या मतदार जागृती अभियानात त्यांचा सिंहाचा वाटा होता.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
‘देवमाणूस’, ‘बैजू’, ‘अशी बायको हवी’, ‘वऱ्हाडी माणसे’, ‘संगीत सौभद्र’, ‘मानापमान’, ‘एकच प्याला’, ‘ब्रह्मचारी’, ‘लग्नाची बेडी’, ‘संशयकल्लोळ’, ‘सुवर्णतुला’, ‘मैलाचा दगड’ ‘भावबंध’सारख्या संगीत नाटकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. ‘देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर’ हा ‘प्रीतिसंगम’ नाटकातील त्यांनी गायलेला अभंग अजरामर ठरला.
संत तुकारामांच्या अभंगरचनांचा विज्ञानाच्या माध्यमातून वेध घेऊन संतसाहित्य, वारकरी परंपरा यांचा समकालाशी नव्याने अन्वयार्थ लावणे असो किंवा कवी अरूण कोलटकर यांच्या कवितेतील मानवी वृत्ती-प्रवृत्ती, बोलीभाषा, लोकभाषा याविषयीचे भाषिक सत्व उलगडून कवितेत शिरण्याची वाट सोपी करण्याचे कसब असो. समीक्षा आणि संशोधन ही दोन्ही अंगे डॉ. दिलीप धोंडगे तितक्याच समर्थपणे हाताळतात.
डॉ. दिलीप धोंडगे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला संत परंपरेचे अभ्यासक हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. दिलीप धोंडगे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला संत परंपरेचे अभ्यासक हा लेख वाचा.

लता मंगेशकर हा त्यांचा विक पॉइंट. हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातील सर्व गायक-गायिकांच्या गाण्यांचे पारायण तर ते त्या वेळी करतच होते, पण लता मंगेशकरांच्या गाण्यांसाठी मनाचा एक कोपरा कायम राखून ठेवलेला होता.
बऱ्याचदा लक्ष्मीकांतजींना ‘चाल’ लावण्यास विशेष आनंद वाटे, सोपी चाल हे त्यांचे वैशिष्टय़. ‘सरगम’चे परबत के उस पार, ‘खलनायक’चे चोली के पीछे क्या है, ‘हम पाँच’चे आती है पालखी सरकार की, ‘एक दूजे के लिए’चे हम बने तुम बने, ‘हम’चे जुम्मा चुम्मा दे दे ही उदाहरणे पुरेशी आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti