(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पुष्पा भावे

    एक विचारवंत लेखिका, नाटक आणि रंगभूमी विषयी भरपूर लेखन आणि टीकात्मक समीक्षा करणार्‍या लेखिका म्हणून पुष्पा भावे ओळखल्या जातात. पुष्पा भावे यांचा जन्म २६ मार्च १९३९ सालचा. पूर्वाश्रमीच्या त्या सरकार घराण्यातील. उत्कृष्ट लेखनाबरोबर त्या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ही प्रसिद्ध आहेत.

  • जेष्ठ नेते वसंतदादा पाटील

    वसंतदादा १९७७ ते १९८५ या काळात चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. एकूण सुमारे ४ वर्षे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. ते काही काळ राजस्थानचे राज्यपालही होते. त्या आधी १९७२ मध्ये ते प्रथम मंत्री झाले होते.

  • १३ जानेवारी – संगीत शारदा नाटकाचा पहिला प्रयोग

    सामाजिक सांस्कृतिक महाराष्ट्राच्या जडण-घडणीत मैलाचा दगड बनलेले गोविंद बल्लाळ देवल यांच्या संगीत शारदा या नाटकाचा पहिला प्रयोग १३ जानेवारी १८९९ साली इंदूर येथे झाला. हे नाटक रंगमंचावर आले आणि त्याने इतिहास घडवला. बालिका-जारठ विवाहांच्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या समस्येला वाचा फुटली. या नाटकाचा परिणाम इतका भेदक व प्रभावी होता की, त्यामुळे जनजागृती होऊन अखेर सरकारला मुलांच्या विवाहाच्या किमान वयाचा कायदा करावा लागला. तो आजतागायत लागू आहे.

    या नाटकातील अनेक पदे आजही तितकीच लोकप्रिय आहेत. `म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयमान' हे पदविनोदाचा एक मैलाचा दगड मानले जातात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • ज्येष्ठ सतार वादक अब्दुल हलीम जाफर खान

    भारतीय चित्रपट सृष्टीतील गाणी आपल्या सतार वादनाने अजरामर करणारे सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजेच ज्येष्ठ सतारवादक उस्ताद अब्दुल हालीम जाफर खान. उस्ताद अब्दुल हलीम जाफर खाँ यांच्यासाठी सतार ही त्यांची सखी होती, प्रेयसी होती आणि प्रेयसही होती. प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही ते अगदी सामान्य जीवन जगले.

  • गोविंद परशुराम पंत

    मराठी रंगभूमीवरील व चित्रपटातील एक प्रसिध्द गायक-नट म्हणून गोविंद पंत यांची ख्याती होती. आपल्या आयुष्यातील बहुतांश कार्यकाळ पंत यांनी मराठी रंगभूमीचं संवर्धन करण्यात मोलाचे योगदान दिले आहे. “मृच्छकटिक”, “संगीत सौभद्र”, “लग्नाची बेडी” ही नाटके रंगभूमीवर आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.

    चित्रपट निर्माते व दिग्दर्शक व्ही.शांताराम यांच्या “अमरभूपाळी” या चित्रपटात होनाजी बाळाची भूमिका गोविंद पंतांनी साकारली होती. तसंच लता मंगेशकर यांच्याबरोबर “घनः श्याम सुंदरा” या गाण्यावर आपल्या पहाडी स्वरांचे साज चढवून ही भूपाळी अविस्मरणीय केली. भावमधुर आवाज, तल्लीनता, हे त्यांच्या गायनातील उल्लेखनीय गुण होते.

  • अरूण दाते

    अरूण दाते

    लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, सुधा मल्होत्रा, अनुराधा पौडवाल, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर द्वंद्वगीते गाणारे अरूण दाते हे मराठीतील बहुधा एकमेव गायक असावेत. यशवंत देव, मंगेश पाडगावकर आणि अरूण दाते या त्रिकुटाने मराठी भावगीताला पुन्हा एकवार झळाळी प्राप्त करून दिली. श्रीनिवास खळे, हृदयनाथ मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांनाही अरूण दाते यांच्या आवाजावर स्वत:च्या रचना चढवण्याचा मोह आवरता आला नाही.

  • नोबेल पारितोषिकाचे जनक आल्फ्रेड नोबेल

    नोबेल पुरस्कार हा जागतिक पातळीवरचा एक सर्वोच्च सन्मान आहे. हा सन्मान दरवर्षी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, जीवशास्त्र, अर्थशास्त्र, शांतता अशा विविध क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. गणित विषयासाठी मात्र हा नोबेल पुरस्कार नाही.

  • रवि शंकर

    सतारवादनातील श्रेष्ठतम वादक रवि शंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन पोषण केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत. १९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले.

    १९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचीत झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडिल शिक्षण १९४४ पर्यंत चालले. १९३९ साली अमदावाद शहरात प्रथम खुली मैफल केली.

    १९४५ सालापासूनच रविशंकराच्या साङ्गीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट धरत्री के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहासे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले. १९४९ साली रवि शंकर दिल्लीच्या ऑल इन्डिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रूजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृन्द चेम्बर ऑर्केस्ट्रा स्थापन केला. १९५० ते १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपु त्रयी - (पथेर पांचाली, अपराजित व अपुर संसार) या चित्रपटांना संगीत दिले.

    यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी चित्रपटांस संगीत दिले. १९६२ साली पन्डित रवि शंकर यांनी किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, मुंबई व १९६७ साली किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, लॉस ऍन्जलेस स्थापन केली. रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत.

    १९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार जॉर्ज हॅरि यांच्या सोबत जॅझ, अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसङ्गीत अशा विविध प्रवाहांवर काम केले. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत नेक कार्यक्रम केले. यात एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे. १९६५ साली बीटलसच्या जॉर्ज हॅरि यांनी सतार शिकण्यास सुरूवात केली.

    या काळात त्यांचे हॅरि यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. जॉर्ज हॅरि हे रवी शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. मा.रवि शंकर यांचे ११ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • जयदेव-एक अपयशी संगीतकार!!

    खरतर, जयदेवला "अपयशी" संगीतकार म्हणण तस योग्य नव्हे, कारण, त्याने असे स्वत: कधीच म्हटल्याचे मी तरी वाचलेले/ऐकलेले नाही. आयुष्याचा बराच काळ सचिन देव बर्मन यांचा सहाय्यक म्हणून भूमिका बजावली. त्यामुळे, सतत त्यांच्या सावलीतच त्यांचे जीवन व्यतीत झाले असे म्हणायला प्रत्यवाय नसावा. अर्थात, जेंव्हा, केंव्हा स्वतंत्रपणे संगीतकार म्हणून संधी मिळाली, तेंव्हा मात्र, त्यांनी स्वत:चा दर्जा दाखवून दिला.

    मला वाटत, त्यांच्या आयुष्याची सुरवातच मुळी "सहाय्यक" म्हणून झाली आणि त्यातच बरीचशी कारकीर्द झाकोळली गेली. अगदी, सुरवातीला, उस्ताद अली अकबर खान यांच्या समवेत, देव आनंदच्या "आन्धीया" या चित्रपटाला संगीत देताना, सहाय्यकाची भूमिका स्वीकारली आणि नंतर, एस.डी.बर्मन यांच्या समवेत ऐन भरातला काळ!! जयदेव यांचे खरे नाव झाले ते, "हम दोनो" या चित्रपटाने!! पण, दुर्दैवाने, या संगीताच्या लोकप्रियतेचा फायदा त्यांना अजुबत झाला नाही. एकदा, देव आनंद म्हणाला होता कि," जयदेव, सोपी चाल अवघड करायचा!!" अजब तर्कशास्त्र!! एक खरे कि, जयदेव यांच्या चाली अवघड असायच्या पण तो त्यांचा शैलीचा भाग होता, त्याला कोण काय करणार. पण, मग, मदन मोहन तरी काय फारसे वेगळे करायचा!! अर्थात, मदन मोहन देखील अपयशी संगीतकार म्हणूनच आयुष्यभर वावरला!! एखाद्या संगीतकाराची शैली जर का रूढ मार्गाने न जाता, वेगळ्या वाटेने जात असली तर, तो काय दोष मानायचा का? त्या अर्थाने मराठीतील, श्रीनिवास खळे आणि हृदयनाथ मंगेशकर, हे देखील त्याच मार्गाचे वाटसरू म्हणायला हवेत!!
    जयदेवला, "हम दोनो" व्यतिरिक्त कधीही, कुठल्याही चित्रपटाने लौकिकार्थाने यश दाखवले नाही. अगदी, "अंजली" पासून ते शेवटचा, "हीर रांझा" पर्यंतचा इतिहास, हेच उत्तर दर्शवतो. हा नशिबाचा खेळ म्हणायचा कि आपल्या तत्वांना आयुष्यभर चिकटून राहण्याची किमत मोजली, असे म्हणायचे!! संगीताचा शास्त्रशुद्ध अभ्यास आणि पाया पक्का असूनदेखील, केवळ स्वत:ची वेगळी ओळख ठेवण्याच्या नादापायी, जयदेवने आपल्या सांगीतिक आयुष्याची फार मोठी किमत मोजली. जयदेवने, इतर संगीतकारांच्या मानाने फारच तुरळक चित्रपट केले पण, त्यातील बहुतांशी चित्रपट केवळ अविस्मरणीय असेच होते, अगदी, बुद्धिनिष्ठ विचारप्रणालीच्या सहाय्याने सांगोपांग चिकित्सा केली तरीदेखील!! जयदेवची स्वत:ची अशी शैली होती.आयुष्यभर बहुश: त्यांनी भारतीय वाद्ये आणि ती देखील अत्यंत आवश्यक असतील तितकीच, त्यांनी आपल्या रचनेत वापरली. उगाच ५० ते १०० वादन्काचा ताफा पदरी बाळगण्याचा अविचारी हव्यास कधीही ठेवला नाही. एखादी बासरीची लकेर, संतूरचा नाजूक तुकडा, यातूनच त्यांच्या रचनेचे स्वरूप स्पष्ट होई. त्यांचा हाच विचार असायचा कि, जर का ४,५ व्हायोलीन वादक पुरेसे असतील तर, उगाचच ५० वादकांचा ताफा वापरण्याची काहीच गरज नाही आणि त्यामार्गे, फुटकळ लोकप्रियता मिळविण्याची गरज नाही. असला, अव्यवहारी विचारांचा संगीतकार होता.

    आधी शब्द कि आधी चाल, हा भावगीत/चित्रपट गीतातील एक कधीही न संपणारा वाद आहे. अर्थात, आपल्या सारख्या रसिकांच्या दृष्टीने बघायचे झाल्यास, आपल्यापुढे जे गाणे सादर होते, ते महत्त्वाचे मग कुणी कुठली का पद्धत स्वीकारावी!! हा प्रत्येकाच्या पिंडाचा भाग आहे. जेंव्हा आपल्यासमोर एखादे गाणे येते तेंव्हा, ते गाणे, १] कविता, २] संगीत रचना आणि ३] गायन, या तीनच घटकातून ऐकायचे, इतकाच भाग आपण स्वीकारू शकतो. अर्थात, हे तिन्हीही घटक, वाटतात तितके सहज व सोपे नाहीत. इथे, मी केवळ "अर्थपूर्ण" गाण्यांचाच विचार करीत आहे. कारण आजही, आपल्या समजत असाच विचार प्रचलित आहे कि, तीन मिनिटांचे गाणे, हे "संगीत" नव्हेच!! अर्थात, हा देखील एक खुळचट विचार आहे म्हणा. प्रत्येक, गाण्यान, वरील तिन्हीही घटक आवर्जूनपणे आवश्यकच असतात. यातील एक जरी घटक "दुबळा" राहिला तर, सगळी रचनाच "फोफशी" होते. जयदेवच्या गाण्यांत हीं जाणीव प्रखरपणे जाणवते. जयदेवचे कुठलेही गाणे घ्या, शब्द हा घटक त्यात आवर्जूनपणे ठळकरित्या जाणवतो. अर्थात, जयदेवने बहुतेकवेळा साहिरची साथ घेतली होती आणि साहीर तर मुळातला सक्षम कवी, नंतर गीतकार!! खरतर, हा देखील एक अत्यंत निष्फळ वाद आहे, कि गीतकार हा कवी असतो कि नाही? जेंव्हा आपण, साहीर, शकील यांच्यासारखे, किंवा मराठीतील, ग.दी. माडगुळकर घेतले तर, हेच आपल्या लक्ष्यात येईल कि, हे "गीतकार" मुळात प्रतिभावंत कवी आहेत कि ज्यांच्या कविता मुलत: अतिशय गेयबद्ध आहेत. शब्दच जर गेयतापूर्ण असतील तर संगीतकाराला एक वेगळाच हुरूप येतो, हे एक निखालस सत्य आहे. जयदेव यांच्या रचनेत, या विचाराचे नेहमीच भान असल्याचे दिसून येते. अर्थात, या संदर्भात, खूप काही लिहिता येईल पण खर तर हा एका वेगळ्या निबंधाचा विषय आहे.

    "हम दोनो" मधील गाणी आपण, वानगीदाखल बघूया. "अल्ला तेरो नाम" पासून ते " कभी खुद पे" सारख्या गझल सदृश गाण्यांवर जरा नजर टाकली तर, माझा मुद्दा ध्यानात येईल. इथे, मला आणखी एक गमतीचा मुद्दा सुचला. "अल्ला तेरो नाम" हे गाणे तर अप्रतिम आहेच, यात वादच नाही, पण, मोठ्या झाडाच्या संपर्कात आजूबाजूच्या झाडांची वाढ जशी खुटते तसा प्रकार दुसऱ्या गाण्याबाबत झाला आहे. "अल्ला तेरो नाम" ची लोकप्रियता प्रचंडच आहे आणि आता तर ते लताचे एक classic गाणे म्हणूनच ओळखले जाते पण, याच चित्रपटातील, "प्रभू तेरो नाम" हे भजनदेखील तितकेच सुश्राव्य आहे, हे फारसे कुणी ध्यानातच घेत नाही आणि एक प्रकारे, या गाण्यावर थोडासा अन्यायच झाला आहे!! असाच प्रकार, सी. रामचंद्रांच्या "अनारकली" बाबत झाला आहे,. "ये जिंदगी उसीकी हैं" हे गाणे अजरामर झाले पण, त्याच चित्रपटातील, "मुहोब्बत ऐसी धडकन हैं" हे गाणे पार मागे पडले. खर तर, रचनेच्या दृष्टीकोनातून पहिले तर, "मुहोब्बत ऐसी धडकन" हे गाणे नितांत रमणीय आणि गोड गाणे आहे. थोडा वेगळा विचार केला तर, असे दिसेल कि, "ये जिंदगी उसीकी हैं" या गाण्यावर, "शारदा" नाटकातील, "मूर्तिमंत भीती उभी" या गाण्याची थोडी पडछाया आहे आणि हे खुद्द सी. रामचंद्रांनी देखील कबूल केलेले आहे तरी देखील लोकप्रियता कशी चंचल असते, हे बघण्यासारखे आहे. असो,

    जयदेवने फक्त लताकडूनच अफलातून रचना गावून घेतल्या आहेत असे नव्हे तर, हरिहरन, सुरेश वाडकर, येशुदास आणि रुना लैला यांच्या गळ्यातून तितक्याच अप्रतिम रचना सासदार केलेल्या आहेत. रुना लैलाचे "बोलो बोलो कान्हा" हे गाणे कधी ऐकले आहे का? आवर्जूनपणे ऐकण्यासारखे आहे. सुरेश वाडकर तर, "सीनेमे जलन" या गाण्यातूनच लोकांच्या पुढे आला. जयदेवची खासियत अशी आहे कि, त्याची गाणी ऐकताना गोड वाटतात पण, प्रत्यक्ष्य ऐकताना त्यातील "अवघड" लयीचा अनुभव येतो. वानगीदाखल, लताचेच प्रसिद्ध, "ये दिल और उनकी" हे पहाडी रागातले गाणे ऐकावे आणि माझ्या वाक्याची प्रतीती घ्यावी. इतके लयबद्ध गाणे पण तितकेच गायला अवघड!! तसाच प्रकार, " तू चंदा मीन चांदनी" आणि "मै आज पवन बन जाऊ" या गाण्यांच्या बाबतीत येतो. "मै आज पवन" हे गाणे तर खास जयदेवच्या सगळ्या रचनाचा अर्कच आहे. त्यात वापरलेला राजस्थानी मांड राग तर, खास जयदेवची मुद्रा घेऊनच प्रकट होतो. "रात भी हैं कूच भिगी" सारखी रचना आणि त्यात वापरलेला कोरस, सगळेच इतके विलोभनीय आहे कि, अशी गाणी ऐकताना, आपणच आपल्या मनाशी आपल्या लेखणीचा पराभव स्वीकारावा!!

    गाणी, आणखी अनेक सांगता येतील कि त्या योगे जयदेवची प्रतिभा निखरून मांडता येईल. पण, खर तर, गाण्यातील वाद्यमेळ, त्याचा कवितेशी जोडलेला बंध आणि गायकीतून सादर केलेली रचना, हा केवळ ऐकण्याचाच भाग आहे आणि तो फक्त, आपण एकटेच बसून शांतपणे अनुभवण्याचा भाग आहे. खर तर, कुठलेही संगीत हे फक्त आपण आणि ती रचना, इतकाच संवादाचा संदर्भ असतो. तिथे, दुसरे कुणीही उपरेच असतात. प्रत्येक गाणे हे, फक्त तुमच्याशीच संवाद साधत असते आणि त्यातूनच तुम्ही त्या गाण्याला प्रतिसाद देत असता. निदान, माझी तरी, गाणे ऐकण्याची अशीच प्रक्रिया आहे.

    रात्र बरीच झालेली असते, आजूबाजूला, कसलाच आवाज नसतो. आपणही, विक्लान्तपणे आपल्या खोलीत बसलेलो असतो. अशाच वेळी, दूरवरून, लताचे, "किस किसको दीपक प्यार करे" हे अत्यंत अवघडल्या रचेनेचे सूर ऐकायला येतात आणि आपण, स्वत:च कधी अंतर्मुख व्हायला लागतो हेच कळत नाही.

    - अनिल गोविलकर

  • Hot & Glamorous – नेहा पेंडसे

    Hot & Glamorous – नेहा पेंडसे

    ग्लॅमर आणि फॅशनची उत्तम समज फार थोडय़ा कलाकारांना असते. नेहा पेंडसेचे नाव यामध्ये सर्वात वर घ्यावे लागेल.
    मराठी इंडस्ट्रीत ग्लॅमर कॅरी करता येईल अशा मोजक्या अभिनेत्री आहेत. कॉस्च्यूमचा योग्य सेन्स असणं आणि ते तितक्याच सहजपणे कॅरी करणं हे इंडस्ट्रीतल्या फार मोजक्या कलाकारांना जमलं आहे. या कलाकारांच्या यादीतलं नेहा पेंडसे हे वरच्या यादीतलं नाव. ग्लॅमरस नेहा पेंडसेचं नाव मराठीसोबतच हिंदी, तामीळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा विभिन्न भाषांतून दमदार अभिनय सादर करणारी खमकी अभिनेत्री म्हणून घेतलं जातं. अभिनय क्षेत्रात यशाचा आलेख कायम चढता ठेवलेल्या नेहाने सिनेमा निर्मितीतही पदार्पण करत इंडस्ट्रीला दर्जेदार कलाकृती दिली आहे.
    ‘मुंबई फॅशन शो’ या व्यावसायिक इव्हेंटसाठी मला काही मॉडेल्सचे फोटोशूट करायचे होते. याच वेळी नेहाचं फोटोशूट करायची संधी मला चालून आली. व्यावसायिक आणि एडिटोरियल अशी दोन्ही कामे एकाच दिवशी करायची असल्याने स्टुडिओमध्ये साधारणपणे 18 ते 20 जणांची टीम माझ्यासोबत होती. सकाळी लवकर नेहाचं शूट तिच्याशी बोलून आम्ही प्लॅन केलं तर त्यानंतर व्यावसायिक शूट. नेहाशी फोटोशूटसंबंधित बोलणं झाल्यावर तिने सगळ्यात आधी विचारलेला प्रश्न म्हणजे ‘‘थीम काय असेल?’’ या प्रश्नातच नेहाची अभ्यासू वृत्ती दिसून आली.

    यात ती कामाच्या बाबतीत किती पर्टिक्युलर आहे हे समजतं. 99 टक्के कलाकार एडिटोरियल फोटोशूटची थीम काय असेल वा त्यांना नेमकं काय करायचं आहे हे विचारत नाहीत. अनेकदा शूट हे ते सध्या करत असलेल्या शूटच्या लोकेशनवर अन्यथा त्यांच्या घरी करण्याचा आग्रह धरतात. त्यामुळे फोटोग्राफरला हवी असलेली थीम वा मेकओव्हर करता येतोच असं नाही. त्यातही अनेकदा शूटिंगच्या कपडय़ात आणि तिथल्याच लोकेशनला शूट केल्याने फोटोशूट हे फार कृत्रिम वा कोरडे होतात. त्यात फोटोग्राफरला हवा असलेला जीव त्याला टाकता येत नाही. त्यात अनेकदा शूटसाठी म्हणजेच व्हिडीओसाठी केलेला मेकअप हा त्रासाचा ठरतो आणि मग फोटो मिळूनही त्यातला गोडवा निघून जातो. नेहाच्या बाबतीत हे सारं काही घडणार नाही हे तिच्याशी बोलताना अगदी पहिल्याच वाक्याला मला समजल्याने मी थोडा आनंदात होतो. नेहाला थीम सांगितली. नेहाचं कॉस्च्यूम काय असेल, त्यासंबंधित मेकअप काय असेल आणि हेअरस्टाईल कशी असेल या सगळ्याची माहिती माझ्या टीमने दिली होती. नेहाला कॉस्च्यूम आणि इतर माहिती दिली होती. मात्र त्यातही तिने तपशीलवार ती समजून घेऊन त्यातले बारकावे जाणून घेतले होते.

    ‘हॉट ऍण्ड ग्लॅमरस’ या शब्दांना साजेसं ठरेल असं नेहाचं फोटोशूट करायचं ठरलं. हे शूट प्रत्यक्षात आणण्यासाठी माझी टीम अहोरात्र झटत होती. त्यानुसार कॉस्च्यूम डिझायनर, स्टायलिस्ट, मेकअप आणि हेअर डिझायनर आणि असिस्टंट अशी तगडी ब्रिगेडच या शूटच्या कामास लागली होती. पांढऱया रंगाचा शर्ट आणि एक हॉट पॅण्ट यात तिचे एक्स्प्रेशन टिपणारं एक फोटोशूट आम्ही आधी केलं. हाय की (प्रखर प्रकाशातली) या प्रकारातलं हे शूट होत. यात नेहाचा पूर्ण फोटो (फुल फिगर फ्रेम) मला कॅमेराबद्ध करायचा होता, तर त्यानंतर लगेच लाईटिंगमध्ये बदल करत लो की (मंद प्रकाशातली) फोटोग्राफी करण्याचं ठरलं. याच कॉस्च्यूमला थोडं आणखी ग्लॅमर लूक देत तिचं बॅकलेस फोटोशूट आम्ही केलं. अर्थातच या सगळ्यात नेहाची कम्फर्ट लेव्हल लक्षात घेऊन हे शूट प्रत्यक्षात आणण्यात मला आणि माझ्या टीमला यश मिळालं.

    शूट करताना आमच्यात – नेहा, मी, माझी स्टायलिस्ट दिव्या तांदळे – सतत संवाद होत होते. प्रत्येक लाईटिंगला, तिच्या बदललेल्या पोजेसला, प्रोफाईलला आणि या सगळ्याच गणित मांडत मी टिपलेल्या फोटोवर आमच्यातले संवाद व्हायचे. शूट सुरू केल्यानंतर मध्ये फार कमी वेळ आम्ही ब्रेक घेतला होता. प्रचंड इच्छाशक्ती आणि ऊर्जा असलेल्या मॉडेलसोबत काम करताना नेहमीच फोटोग्राफरला एक वेगळा आनंद होत असतो. त्यात सगळ्यात जास्त आनंद असतो तो मिळालेल्या वेळेचा अधिकाधिक उपयोग करत जास्तीत जास्त व्हेरिएशन्सवर काम करता आलं याचा.

    नेहानं अभिनयाच्या क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकलं ते बालवयातच. ठाण्याच्या रामनाथ थळवळ यांच्या उन्हाळी शिबिरात वयाच्या सातव्या वर्षी पिटुकली नेहा दाखल झाली आणि इथेच तिच्यावर अभिनयाचे संस्कार झाले. गुरू रामनाथ यांच्याकडे शिकत असतानाच एकता कपूरच्या बालाजी प्रॉडक्शनसाठी नेहा बालकलाकार म्हणून निवडण्यात आली आणि तिचा अभिनय क्षेत्रात श्रीगणेशा झाला. बालाजी प्रॉडक्शनच्या ‘कॅप्टन हाऊस’ या मालिकेतून नेहा छोटय़ा पडद्यावरून झळकली आणि त्यानंतर तिने मागे वळून बघितलेच नाही. अनेक मालिकांतून बालकलाकाराची भूमिका साकारत असलेल्या नेहाला शिक्षण आणि अभिनय या दोन्हीपैकी नेमकं एक काय निवडायचं याचा निर्णय तिने वयाच्या तेराव्या वर्षीच घ्यावा लागला आणि अभिनय क्षेत्रातच पूर्णवेळ राहण्याचा निर्णय तिने घेतला. अर्थातच हा धाडसी निर्णय घेण्यामागे तिच्या कुटुंबीयांचा वाटा अधिक होता हे ती नमूद करते.

    अनेक हिंदी मालिकांतून काम करत असलेल्या नेहाला ‘हसरते’ या मालिकेने चेहरा दिला आणि तिचं एक वेगळं अस्तित्व या क्षेत्रात निर्माण झालं. गुरू रामनाथ थळवळ यांच्यामुळेच नेहाने मराठी इंडस्ट्रीत पाऊल टाकल्याचं ती आदराने सांगते. अभिनयाचा प्रवास एका वेगळ्याच वेगाने करणाऱया नेहाचं सिनेमा निर्मितीचं स्वप्न पूर्ण झालं ते बायोस्कोप या मराठी सिनेमामुळे. या सिनेमासोबतच तिचे आणखी काही नवे प्रोजेक्टस् या वर्षी लवकरच प्रदर्शित होणार असल्याचं ती आनंदाने सांगते.

    धनेश पाटील
    dhanauimages@gmail.com