(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • प्रतिभावंत गीतकार वर्मा मलिक

    बरकत राय मलिक उर्फ वर्मा मलिक यांचा जन्म १३ एप्रिल १९२५ रोजी फरीदाबाद पाकिस्तानचा येथे झाला.

    खूप लहान वयात त्यांनी कविता लिहण्यास सुरवात केली, फाळणीनंतर ते दिल्लीत स्थाईक झाले.

    संगीत निर्देशक हंसराज बहल यांचे भाऊ वर्मा मलिक यांचे मित्र होते त्याच्या मुळे ते मुंबईला आले. पंजाबी चित्रपटापासून वर्मा मलिक यांनी सुरवात केली. बहल यांनी वर्मा को पंजाबी चित्रपट 'लच्छी' ची गाणी लिहण्यास दिले. मा.वर्मा पंजाबी चित्रपटाचे हिट गीतकार झाले. याच वेळी त्यांच्या मित्रांनी त्यांचे नाव बदलण्यास सांगीतले बरकत राय मलिक हे वर्मा मलिक नावाने ओळखू लागले.

    वर्मा मलिक यांनी चाळीस पंजाबी चित्रपटासाठी गाणी लिहिली, तीन चित्रपटासाठी संवाद लिहिले व तीन चित्रपटासाठी निर्देशन केले. हिन्दी चित्रपट 'दिल और मोहब्बत' साठी 'आंखों की तलाशी दे दे मेरे दिल की हो गयी चोरी' हे गाणे लोकप्रिय झाले. पण ते प्रसिद्ध झाले नाहीत.

    मनोज कुमार वर्मा मलिक यांना ओळखत होते. त्यांनी आपल्या चित्रपटासाठी रात अकेली, साए दो हुस्न भी हो व इश्क भी हो तो फिर, इकतारा बोले तुन तुन, ही गाणी वर्मा मलिक यांच्या कडून लिहून घेतली. मनोज कुमार यांनी इकतारा बोले तुन तुन, 'यादगार' चित्रपटासाठी वापरले, ते गाणे गाजल्यामुळे मा.वर्मा हे प्रसिद्धीच्या झोकात आले. रेखा यांचा पहिला चित्रपट 'सावन भादों' मधील वर्मा यांनी लिहिलेले 'कान में झुमका चाल में ठुमका कमर पे चोटी लटके हो गया दिल का पुर्जा पुर्जा लगे पचासी झटके' हे गाणे अजून लोकांच्या ओठावर आहे.

    या नंतर 'पहचान', 'बेईमान', 'अनहोनी', 'धर्मा', 'कसौटी', 'विक्टोरिया न. २०३', 'नागिन', 'चोरी मेरा काम', 'रोटी कपड़ा और मकान', 'संतान', 'एक से बढ़कर एक', अश्या अनेक चित्रपटासाठी मा.वर्मा यांनी गाणी लिहिली. 'पहचान' चित्रपटातील गाणे सबसे बड़ा नादान वही है व 'बेइमान' चित्रपटासाठी जय बोलो बेइमान की जय बोलो या साठी त्यांना दोन वेळा फ़िल्मफेयर पुरस्कार मिळाला. 'सावन भादो' साठी ओमी यांनी वर्मा मलिक यांना गाणी लिहिण्यास सांगीतली. 'सावन भादों' ची गाणी हिट झाली. वारीस या चित्रपटातले 'मेरे प्यार की उमर हो इतनी सनम ' किंवा 'नागिन' यातील 'तेरे इश्क का मुझपें हुआँ ये असर है ' हि गाणी तर 'बेईमान' या चित्रपटातले, 'ये राखी बंधन है ऐसा', 'जैसे चंदा और किरण का, जैसे बद्री और पवन का, जैसे धरती और गगन का...' हम बोलेगा तो बोलोगे कि बोलता है एक मेमसाब है साथ में साब भी है मेमसाब सुंदर सुंदर है साब भी खूबसूरत है नेपाळी गुरख्याच्या भूमिकेतील प्राण यांच्या वर चित्रित झालेलं हे गीत चित्रपटाचं विषेश आकर्षण आहे. नेपाळी व्यक्ती हिंदी गीत गात असल्यानं 'स' अक्षराच्या जागी 'श'च्या उच्चाराची तसेच 'बोलना' क्रियापदावर कसरत करण्याची वर्मा मलिक यांनी कल्पकता केली होती.

    आजही हिंदी भाषीकाच्या लग्नाच्या वरातीत 'आज मेरे यार की शादी है' व बिदाईला 'बाबुल की दुआएं लेती जा' ही गाणी ही गाणी वाजवली किंवा गायली जातात. ही दोन्ही गाणी वर्मा मलिक यांची.

    वर्मा मलिक यांचे १५ मार्च २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    https://youtu.be/HIuYg2XBZMY

  • कोथरुडचे शिल्पकार मा. शशिकांत सुतार

    भाऊ अशी ओळख असलेले मा.शशिकांत सुतार हे त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे शिवसेनेचे उपनेते म्हणून कायम चर्चेत राहिले आहेत. साधेपणा हे तर भाऊंचे आभूषण, पांढऱ्या पायजमा कुर्त्यात वावरणाऱ्या भाऊ हे आदरणीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत जुने सहकारी होत.

  • गजानन वाटवे

    आपल्या सुरेल स्वरांने आणि अविट गोडीच्या संगीताने मराठी भावगीतांना अनोखी उंची प्राप्त करुन अर्थघन भावगीतांचे नवे युग निर्माण करणारे गजानन वाटवे.

  • उद्योगमहर्षी शंतनुराव किर्लोस्कर

    फ्रेड शुले ह्या जर्मन उद्योजकाने काढलेले उद्गार अतिशय समर्पक आहेत. तो म्हणाला होता, ‘माझ्यासाठी शंतनुराव हे भारतातील क्रमांक दोनचे व्यक्तिमत्त्व आहे. पहिला क्रमांक महात्मा गांधींचा आहे.’

  • एन एस वैद्य

    त्यांनी पन्नासहून अधिक चित्रपटांचे संकलन केले होते व एक उत्कृष्ट संकलक म्हणून नावलौकिक मिळविला होता. ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक दादा कोंडके, कमलाकर तोरणे, अण्णासाहेब देऊळगावकर, जब्बार पडेल, महेश कोठारे आदींच्या चित्रपटांचे संकलन वैद्य यांनी केले होते.

  • अभिनेत्री रिंकू राजगुरू

    अभिनेत्री रिंकू राजगुरूचा जन्म ३ जून २००१ रोजी झाला.

    ‘सैराट’ या एकाच चित्रपटामुळे लोकप्रियतेच्या अत्युच्च शिखरावर पोचलेली अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये रिंकूने 'आर्ची'ची व्यक्तिरेखा साकारली. या चित्रपटाने तिला अभूतपूर्व अशी लोकप्रियता मिळवून दिली. आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये पाहायला मिळणाऱ्या नायिकेपेक्षा अत्यंत विपरीत अशी नायिका रिंकूनं या चित्रपटात साकारली आणि प्रेक्षकांनी तिला डोक्यावर घेतलं. रिंकू राजगुरू मूळची सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजची. तिचे खरे नाव प्रेरणा महादेव राजगुरू.

    अभिनयाची कसलीही पार्श्वभूमी नसताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी तिला निवडले आणि या संधीचं रिंकूनं सोनं केलं. ‘सैराट’चा पुढे कन्नडमध्येही रिमेक झाला. तसेच हा चित्रपट कालांतरानं हिंदी भाषेतही आला. ‘सैराट’मधील अभिनयासाठी रिंकूला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 'सैराट'च्या सुपरडुपर यशानंतर 'कागर' हा रिंकू राजगुरुचा दुसरा सिनेमा यायला बरेच दिवस लागले. ‘कागर’ या तिच्या चित्रपटाला म्हणावं तसं यश मिळालं नाही. परंतु, तिच्या अभिनयाचं कौतुक झालं. तिने ‘झुंड’ व ‘मेकअप’चित्रपटामध्ये काम केले आहे.

    रिंकू राजगुरूने गेल्या वर्षी वेबविश्वात पदार्पण केले आहे. रिंकु राजगुरूने ‘हंड्रेड’या हॉट स्टारवरील वेबसीरिज मध्ये लारा दत्ता सोबत काम काम केले आहे. या वेबसीरिज मध्ये एका सामान्य कुटुंबात वाढलेल्या नेत्राने (रिंकू राजगुरू) अन्य मुलींप्रमाणेच अनेक स्वप्न पाहिली असतात. यात स्वित्झर्लंडला जाण्याचं स्वप्न नेत्राने मनाशी अगदी कवटाळून धरलं असतं. मात्र तिच्या आयुष्यात एक असा प्रसंग घडतो ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य बदलून जातं. याच काळात तिची भेट एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी (लारा दत्ता) होते आणि या कथेला नवं वळण मिळतं. एका सर्व सामान्य कुटुंबात वाढलेली नेत्रा आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी नवीन वाट धरते. या वाटेत तिला कोणकोणत्या अ़डचणी येता, ती स्वप्न कसं पूर्ण करते, ही या वेबसीरिजची कथा आहे. रिंकू राजगुरू लवकरच ‘आठवा रंग प्रेमाचा’नव्या चित्रपटासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

  • ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण होर्णेकर

    अरुण होर्णेकरांनी आजवर ‘दिवा जळू दे सारी रात’सारख्या मेलोड्रामापासून ‘हैदोस’, ‘भोगसम्राट’सारख्या हिट् ॲ‍ण्ड हॉट नाटकांपर्यंत.. आणि ‘बेकेट’,‘वेटिंग फॉर गोदो’, ‘गिधाडे’ सारख्या ॲ‍टब्सर्ड, प्रश्नयोगिक, तसंच वास्तववादी नाटकांपासून ते ‘सख्खे शेजारी’सारख्या रेव्ह्यू प्रकारातल्या नाटकांपर्यंत सगळ्या पिंड-प्रकृतीची आणि प्रवृत्तीची नाटकं केली आहेत.

  • भारतरत्न धोंडो केशव कर्वे

    कोकणातील मुरूड या छोट्याशा खेडेगावात 18 एप्रिल 1858 ला त्यांचा जन्म झाला. ते एकविसाव्या वर्षी मॅट्रिक झाले. सत्ताविसाव्या वर्षी गणित विषय घेऊन पदवीधर झाले. तर एकतिसाव्यावर्षी प्राध्यापक झाले. अडचणीतून शिक्षण घेत असतानाही त्यांनी आकांक्षा धरली ती समाजसेवेची, समाजसुधारणेची. अण्णा सुधारक होते पण फक्त शाब्दिक सुधारणा नव्हती तर ते क्रियाशील सुधारक होते. पुण्याच्या फर्ग्यसन महाविद्यालयात ते 22 वर्षे प्राध्यापक होते. त्यावेळेस 1899 साली त्यांनी `अनाथ बालिकाश्रम’ काढला

  • माणिक राज शिंगे

    ठाण्यात चित्रकला क्षेत्रातील अनेक मातब्बर कलाकार वास्तव्य करतात. अशा कलाकारांमधीलच एक नाव म्हणजे सौ. माणिक राज शिंगे हे होय. चित्रकला आणि कला अध्यापक म्हणून काम करणार्‍या माणिक राज शिंगे यांनी फाईन आर्टमध्ये ए.टी.जी.डी. ही पदवी तसेच डीप.ए.एड. ही पदविका संपादन केली आहे.<

  • मराठी अभिनेते व नाट्यदिग्दर्शक मास्टर दत्ताराम

    मास्टर दत्ताराम म्हणजेच दत्ताराम वळवईकर. साहित्यसंघाच्या’कौन्तेय’, ’दुसरा पेशवा’, ’भाऊबंदकी’ , ’वैजयंती’ , ’राजकुमार’ यांसारख्या नाटकांत नटवर्य नानासाहेब फाटक, दुर्गा खोटे, मामा पेंडसे यांसारख्या बुजुर्ग अभिनेत्यांबरोबर तोडीस तोड भूमिका करून दत्तारामांनी ‘नटवर्य’ हे बिरुद मिळवले. पुढे ‘ललितकलादर्श’ च्या’दुरितांचे तिमिर जावो’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘पडछाया’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या.