जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
जलतरण क्रीडाप्रकारात ठाण्याचे नाव मोठं करण्यात वाटा असलेला सौरभ सांगवेकर हा जलतरणपटू म्हणजे अनवाटांनी जाऊनही आपल्या आयुष्याचं ध्येय गाठणारा ध्येयवादी आहे.
ए आर रहमान हे तामीळ मुदलियार परिवारातील ते आहेत. त्यांचा जन्म ६ जानेवारी १९६७ रोजी चेन्नई येथे झाला. त्यांचे वडील आर. के. शेखर हे तामीळ आणि मल्याळम चित्रपटांचे निर्माते होते. रहमान लहानपणापासून आपल्या वडिलांच्या कामात हातभार लावत असे. रहमान नऊ वर्षांचे असतानाच त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबाची परिस्थितीच बदलली. त्यावेळी आपल्या वडिलांची वाद्ये भाड्याने देऊन त्यांनी अक्षरश: आपल्या कुटुंबाचा गाडा चालवला. त्यांचे खरे नाव ए. एस. दिलीप कुमार असे आहे. त्यांचे आई वडील हिंदू होते. रहमान नऊ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांची आई त्यांच्या वडिलांचे म्युझिकल इन्स्ट्रूमेंट्स भाड्याने देत असे. याच काळात एका पीर बाबांच्या संपर्कात रहमान यांचे कुटुंबीय आले. त्यांच्या आई पीरबाबांची सेवा करायच्या. तेही त्यांच्या आईला अगदी मुलीप्रमाणे मानायचे. पीरबाबांचे रहमान यांच्यासोबतही घट्ट नाते जुळले होते. दरम्यान रहमान यांना त्यांचे दिलीप कुमार हे नाव कधीच आवडले नव्हते. हे नाव आपल्या प्रतिमेला शोभेसे नसल्याचे त्यांना वाटायचे. ते आपल्या आई सोबत बहिणीच्या लग्नाच्या निमित्ताने तिची जन्मपत्रिका दाखवायला एका हिंदू ज्योतिषाकडे गेले होते. याचदरम्यान रहमान यांनी त्या ज्योतिषाकडे आपले नाव बदलण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी रहमानला दोन नावे सुचवली. एक अब्दुल रहमान आणि दुसरे अब्दुल रहीम. मात्र रहमान यांनी त्यांच्या आईच्या सल्ल्याने अल्लारक्खाो रहमान म्हणजेच ए. आर. रहमान हे नाव ठेवले.” वडिलांच्या निधनाच्या दहा वर्षांनी रहमान यांनी आपले नाव आणि धर्म बदलला. रहमान हे त्यांना एका हिंदू ज्योतिषाने दिलेले नाव आहे तर अल्लारखा हे त्यांच्या आईने त्यांना दिलेले नाव आहे. रहमान यांच्या पत्नीचे नाव सायरा बानो असून या दाम्पत्याला दोन मुली आणि एक मुलगा आहे. खतीजा आणि रहीमा ही त्यांच्या मुलींची तर अमीन हे मुलाचे नाव आहे.
आधी तमिळ, मग हिंदी असं करता करता रहमानने केव्हाच हॉलिवूडसुद्धा पादाक्रांत केलेय. त्याचे इराणी आणि मँडरिन साऊंडट्रॅक्ससुद्धा तितकेच लोकप्रिय आहेत. असं म्हणतात, रहमानचं कोणतंही गाणं किमान ४ वेळा तरी ऐकलंच पाहिजे, तरच मगच कुठे ते गाणं समजू लागतं. आणि मगच ते गाणं आवडूसुद्धा लागतं. ए आर रहमान पुन्हा एकदा मानाच्या ऑस्कर पुरस्कारासाठी शॉर्टलिस्ट झाला आहे. 'पेले: बर्थ ऑफ लिजंड' या चित्रपटाच्या संगीतासाठी ए आर रहमान 89 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत आहे.यापूर्वी ए आर रहमानला स्लमडॉग मिलिनेअरमधील 'जय हो' गाण्यासाठी ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर रहमान पुन्हा एकदा रहमान ऑस्करवर नाव कोरतो का, हे लवकरच स्पष्ट होईल. बेस्ट ओरिजनला स्कोअर आणि बेस्ट ओरिजनल सॉन्ग अशा दोन गटात रहमानला शॉर्टलिस्ट करण्यात आलं आहे. 'पेले: बर्थ ऑफ लिजंड' या चित्रपटाचं संगीत आणि त्यातील जिंगा हे गाणं ऑस्करच्या शर्यतीत असेल. ब्राझिलियन सिंगर अॅना बिट्रीझने हे गाणं स्वरबद्ध केलं आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
पल्लवी जोशी यांनी मेरी आवाज ही पहचान है या मालिकेत काम केले आहे. एखादा अपवाद वगळता नेहमी हिंदीत रमणारी पल्लवी जोशी मराठीतून “सा रे ग म’ करू लागल्या, तेव्हा समस्त मराठी रसिकांना तो सुखद धक्का होता.
आज २९ सप्टेंबर. बॉलीवुडचा विनोदाचा बादशहा मेहमूद यांची जयंती. मेहमूद यांचा जन्म २९ सप्टेंबर १९३२ रोजी झाला.
मुमताज अली हे मेहमूद यांचे वडील मुंबई टॉकीज स्टुडिओमध्ये काम करत असत. मेहमूद अभिनेता बनण्याच्या आधी ड्रायव्हरचेही कामही करत असत मीना कुमारी यांनी त्यांना टेबल टेनिस शिकवण्यासाठी नोकरीला ठेवले होते. तेव्हा त्यांनी मीना कुमारीची बहीण मधू हिच्याशी विवाह केला. विवाह केल्यावर अभिनय करण्यास सुरवात केली. सुरुवातीला "दो बिघा ज़मीन" व "प्यासा" " या चित्रपटात छोटी मोठी कामे केली. पहिला ब्रेक परवरिश या चित्रपटात मिळाला. ज्यात राज कपूर यांचा भाऊ म्हणून रोल केला. मग ते प्यार किए जा, प्यार ही प्यार, ससुराल, लव इन टोक्यो व जिद्दी सारखे हिट चित्रपटात दिसले. यातील काही चित्रपटात हिरो म्हणून रोल केले, परंतु प्रेक्षकांना त्यांना कॉमेडियन म्हणून खूप आवडले. नंतर मेहमूद यांनी त्याच्या स्वत:चे प्रॉडक्शन हाउस चालू केले. प्रॉडक्शन हाउसचा पहिला चित्रपट छोटे नवाब नंतर सस्पेंस-कॉमेडी फिल्म भूत बंगला व साठ च्या दशकातील हिट चित्रपट पड़ोसन. पड़ोसनला अजून ही श्रेष्ठ विनोदी चित्रपट मानले जाते.
मेहमूद यांनी यानंतर अनेक चित्रपटात कामे केली. गुमनाम, प्यार किए जा, बॉम्बे टू गोवा, सबसे बड़ा रूपैया, पत्थर के सनम, अनोखी अदा, नीला आकाश, नील कमल, कुँवारा बाप इ. सिनेमांत हीरो आणि हिरोइनची कमाई खलनायकापेक्षा जास्त असते, परंतु त्याकाळी महमूद हीरोपेक्षा काही पटीने ज्यास्त पैसे घेत होते. 'सु्ंदर' सिनेमात महमूद यांच्यासोबत विश्वजीत यांनी काम केले होते. या सिनेमात हीरो म्हणून काम करण्यासाठी विश्वजीत यांना दोन लाख रुपये तर महमूद यांना आठ लाख रुपये मानधन मिळाले होते. असेच 'हमजोली' सिनेमासाठीसुध्दा घडले होते. या सिनेमातील नायक जितेंद्र होते, परंतु महमूद यांना त्यांच्यापेक्षा जास्त पैसे मिळाले होते.
हास्य अभिनेता, विनोदवीर, विनोदाचा बादशहा अशी अनेक विशेषणे असलेला मेहमूद हे अभिनेता म्हणूनही प्रसिद्ध होते. मात्र त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना रडण्यासुध्दा भाग पाडले. 'कुंवारा बाप', 'लाखो में एक जैसा'सारख्या सिनेमे याचे मोठे उदाहरण आहेत. या दोन्ही सिनेमामध्ये महमूद यांनी मुख्य अभिनेता म्हणून काम केले. 'कुंवारा बाप' ही महमूद यांच्या ख-या आयुष्यावर आधारित सिनेमा होता. त्यांचा मुलगा मकदूम अलीला पोलियो झाला होता. महमूद यांनी त्याला ठिक करण्यासाठी लाख प्रयत्न केले मात्र होऊ शकले नाही. त्यामुळे त्यांनी आपले दु:ख सिनेमाव्दारे मांडण्याचा प्रयत्न केला होता.
आई एस जौहर व मेहमूद यांची जोडी खास मानली जाते. या दोघांनी जौहर महमूद इन गोवा व जौहर महमूद इन हाँगकाँग या चित्रपटात जान आणली. मेहमूद यांनी त्याच्या कारकिर्दीत ३०० पेक्षा हिंदी चित्रपटांमधून काम केले.
मेहमूद यांचे २३ जुलै २००४ रोजी निधन झाले. मेहमूद यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
माणसाच्या वाट्याला येणारे सुखदुःख, राग, लोभ, आनंद, निराशा, यश, अपयश या सगळ्यामध्ये गुंडाळले गेलेले माणसामाणसामधील संबंध त्यातून ताण निर्माण करणारे मानवी विकार आणि आतक्र्य नियतीचे खेळ, त्यातून येणारी अर्थशून्यता या सगळ्याचा प्रत्यय देणारी कथा म्हणजे जी. एं. ची कथा. असा आगळावेळा कथाकार महाराष्ट*ाला मिळाला हे महाराष्ट्राचं भाग्यच. जी. ए. कुलकर्णींचा जन्म तालुका चिपोडी येथील एकसंबा या गावी १० जुलै १९३२ साली झाला.
तुकडोजी महाराजांचा वारसा घरात असल्याने त्या संस्काराने मार्ग दाखविला आणि 'आपुलकी' चा जन्म झाला. कम्पयुटर क्षेत्रात करिअर असतानाही वर्धा जिल्ह्यातील अभिजीत फाळके यांनी शेतकर्यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार केला. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर त्यांना अवजारे पुरविणारी 'अॅग्रो टुल बॅंक' सारखी कल्पना राबविली. हे काम सचिन तेंडुलकरलाही थक्क करुन गेलं...
अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आपुलकी' चे उड्डाण हा लेख पुढील पानावर वाचा.
अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आपुलकी' चे उड्डाण हा लेख वाचा.
उत्तम व नैसर्गिक अभिनय क्षमता, निःपक्षपाती समिक्षा, कथा, व समाजकल्याण अशा विविध गुणांचा प्रभावी मिलाफ असणारे व आयुष्यभर अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये सारख्याच तन्मयतेने वावरणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लाडकोजीराव आयरे ! खेडयातील संस्कृती, रीतिरिवाज, रूढींशी त्यांचं जीवन निगडित असल्यामुळे, खेडयातील पार्श्वभूमी त्यांनी आपल्या नाटकांमधून अत्यंत कल्पकतेने उभी केली. समाजाच्या दृष्टीने ज्वलंत व खळबळजनक विषयावर त्यांनी १८ नाटके लिहून कित्येक सामाजिक समस्यांना व अन्यायाला वाचा फोडली.
महाराष्ट्र राज्य सरकारचा साहित्य लेखन स्पर्धेत उत्कृष्ट नाटयलेखनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, तसेच अखिल भारतीय नाटय परिषदेने श्रमजीवी वर्गाचे रंगभूमीवरील पहिले यशस्वी नाटककार म्हणून त्यांचा गौरव केला गेला होता .
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
ह्या जोडीने भारतातला हा गुजराथी लोकसंगीताचा प्रकार जगभर प्रसिद्ध केला, नुसताच प्रसिद्ध केला नाही तर डिस्को दांडिया ह्या संगीत प्रकाराचा जन्म किंवा उगम ह्या बाबला व कांचन ह्या जोडीने च केला.
खाप्रुमामा ना त्यांची आई 'खाप्रु' असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले. खाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका धरुन त्याची कितिही भागात विभागणी करणेहि त्यांना जमत असे. त्यांचे काही ध्वनीमुद्रण त्या काळात प्रकाशित झाले होते, १९१९ साली पं. विष्णु पलुस्कर यांनी आयोजीत केलेल्या संगीत संमेलनात त्यांनी आपली कला त्या काळच्या अग्रगण्य संगीतकारांसमोर सादर केली. त्यांच्या अद्वितीय लयकारीमुळे अनेक दिग्गज संगीतकारांनी त्यांची प्रशंसा केली.
१९३९ साली संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांनी त्यांना एका समारंभात सन्मानपूर्वक 'लयभास्कर' हि पदवी दिली. तसेच गोव्यातील रसिकांकडून त्याना 'तालकंठमणि' हि पदवी देण्यात आली. त्यांना तबला, पखवाजाबरोबरच सारंगीवादन व गायन पण येत असे. त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य तबला, ताल व लयशास्त्र ह्यात घालविले. लयीच्या अद्भुत दैवी देणगीमुळे ते एकाच वेळी पाच वेगवेगळ्या तालांचा ठेके धरुन त्यांना एकाच वेळी समेवर आणू शकत. उदा. डाव्या हाताने त्रिताल (१६ मात्रा), उजव्या पायाने झपताल (१० मात्रा), उजव्या हाताने धमार (१४ मात्रा), डाव्या पायाने चौताल (१२ मात्रा) व तोंडाने सवारी (१५ मात्रा) असे पाच तालाचे ठेके धरुन समेवर आणणे त्यांना सहज जमत असे. त्यांनी अनेक नविन तालांची निर्मिती केली. त्यातला त्यांच्या खास आवडीचा म्हणजे 'परब्रह्मताल' (१५.७५ पावणेसोळा मात्रा). लय त्यांच्या जीवनात इतकी भिनली होती की झोपेतसुद्धा त्यांचे हात लयीत हलत असत.
लक्ष्मण पर्वतकर यांचे ३ सप्टेंबर १९५३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
बाबा आमटेंच्या आनंदवन आश्रमात आशा शस्त्रक्रियेमुळे ३५ टक्यांवरुन १ टक्का इतका खाली गुंतागुंतीचे प्रमाण आणले आहे. यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण करुन अंध आणि प्रौढांना नवी दृष्टी दिली आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti