जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
श्री पुंडलिक’चे काही प्रयोग झाल्यानंतर ‘श्रीपाद नाटक मंडळी’ने दुसरे नाटक करण्याचे ठरवले. ‘श्री पुंडलिक’ हे आपल्या नाट्यसंस्थेचे हुकमी नाटक चलचित्रित करावे असा ध्यास दादासाहेवांनी घेतला.
१९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो.
रामचंद्र विनायक ओतुरकर हे “हिंदुस्थानचा सांपत्तिक इतिहास' तसेच अन्य महाविद्यालयीन पुस्तकांचे कर्ते होते. २४ ऑक्टोबर १८९८ रोजी रामचंद्र विनायक ओतुरकर यांचा जन्म झाला.
## Ramchandra Vinayak Oturkar
आज १५ सप्टेंबर..आज अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो.
याचे कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे.
जन्म.१५ सप्टेंबर १८६१
मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे पिता श्रीनिवासशास्त्री विद्वान संस्कृत पंडीत होते. अशा वातावरणात त्यांच्यावर उच्च संस्कार होणारच.पण घरची हलाखीची होती.त्यांनी शालेय शिक्षण तालुक्याला एकटे राहुन गरीबीशी झुंज देत अव्वल गुणांनी पूर्ण केले.व ते बंगळुरूला उच्च शिक्षणासाठी आले.तेथेही त्यांनी विशेष गुणवत्ता किताब घेऊन B.A. केले.आता त्यांना तांत्रिक शिक्षणाची लागली.
गुणवंतांना गुणग्राहकांची कमी नसते. म्हैसुरुच्या राजांनी त्यांना पुण्यात अभियांत्रिकी पदवीसाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांनी पदवी प्राप्त केली ती साधीसुधी नाहीतर सक्करपासून थेट दावणगेरी पर्यंत पसरलेल्या मुंबई राज्यात प्रथम क्रमांकात.या दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा.स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले. १९०७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली.
एखादा असता तर निवांत आयुष्य जगला असता.पण नियतिला त्यांच्या कडून अजून काही भव्य दिव्य करून घ्यायचे होते.त्यांची कीर्ती ऐकुन हैद्राबादच्या निजामांनी त्यांना सरकारचे विशैष सल्लागार म्हणुन पद दिले. येथे त्यांनौ हैद्राबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधुन शहर पूरमुक्त केलेच पण त्यामुळे त्या शहराचा कायापालट होऊ शकला. म्हैसुर नरेशांनी त्यांना मुख्य अभियंता पदाची ऑफर.दिली व त्यांनी ती स्विकारली. म्हैसुरला ते १९२६ पर्यंत राहिले.त्यांनी कृष्णराज सागर धरण, वृंदावन उद्यान व अनेक विकासकामे पार पाडली.काही काळ ते दिवाणही होते.या व्यतिरिक्त उद्योग सिंचन शेती या क्षेत्रातही मौलिक योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळुन पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टिम ही त्यांचीच देणगी देशाला.
म्हैसुरचे पद सोडल्यानंतर निवृत्तीपश्चात केवळ अभियांत्रिकी नव्हेच तर उद्योग,अर्थ, नगरसुधार इ. कार्यात मोलाचे योगदान दिले.समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सर्वोच्च बहुमान केला. मा. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे १४ एप्रिल १९६२ रोजी निधन झाले.
अभियंता दिना निमीत्त सर्व अभियंत्यांना अभिवादन व हार्दिक शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
रत्ना पाठक-शाह या मूळच्या रंगकर्मी आहेत हे सगळ्यांना माहित आहेच. त्यांचा जन्म १९ मार्च १९५७ रोजी झाला. हॉलिवूड स्टार्सप्रमाणे त्याही मेथड अभिनय करतात. त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटात काम केले आहे. मिर्च मसाला हा त्यांचा गाजलेला चित्रपट.सुप्रिया पाठक शहा यांची साराभाई ही सिरीयल खूपच प्रसिध्द झाली होती.
त्यांची ओळख सुप्रिया पाठक यांची मोठी बहीण, व मा.दिना पाठक यांची कन्या अशी पण आहे.
मा.नसीरुद्दीन शाह हे पती. पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर नसीरुद्दीन शाह यांनी रत्ना पाठक यांच्याशी दुसरा विवाह केला. पंकज कपूर यांची पत्नी सुप्रिया पाठक यांची सख्खी बहीण आहे. त्या शाहिद कपूरच्या मावशी लागतात.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नाना पाटेकर लोकप्रिय मराठी अभिनेते आहेत
वसुंधरा साबळे या शाहीर साबळे यांच्या कन्या आहेत.
मिनार पिंपळे यांनी त्यांच बी. एस. डब्ल्यू. व एम. एस. डब्ल्यू चं शिक्षण चर्चगेटमधील निर्मला निकेतन या कॉलेजमध्ये पुर्ण केलं. लहानपणापासूनच त्यांना झोपडपट्यांमधील रहिवाश्यांसाठी काहीतरी भव्य, चांगले काम करण्याची मनी प्रचंड हुरहूर होती. पदव्योत्तर शिक्षण झाल्यानंतर त्यांनी युवा या संघटनेची स्थापना केली. मुंबईमधील झोपडपट्टयांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक उपाय योजना सुचवल्या व प्रत्यक्ष अंमलात सुध्दा आणल्या. परंतु या योजना अंमलात आणण्यासाठी त्यांनी स्थानिक बेरोजगार तरूणांची मदत घेतली. त्यांच्याशी जिव्हाळ्याच नात निर्माण करून त्यांना संघटित केलं. आज त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे व इतक्या वर्षांच्या साधनेमुळे आज अनेक झोपडपट्टयांमध्ये धडाडीच्या तरूणांची पथके उभी राहिली आहेत. हे तरूण स्वतःच या वस्त्यांच्या विकासासाठी अनेक उपाय योजना राबवीत आहेत. त्यांच्या बाहुंना बळ व पाठीला कणा देण्याचे काम मात्र युवाचे स्वयंसेवक करीत आहेत. अनेक तरूणांना गुन्हेगारी मार्गांपासून परावृत्त करून समाजाच्या आदर्श पुर्नरचनेसाठी त्यांना मानसिक व शारिरीक खाद्य पुरविण्यात या संघटनेचा मोलाचा वाटा आहे
विजय घाटे यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला शिकण्यास सुरवात केली. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६४ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. १२ व्या वर्षी त्यांनी तबलामधील विशारद पदवी मिळविली होती. वयाच्या १६ व्या वर्षी ते मुंबईत आले आणि बारा वर्षांहून अधिक काळ तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या कडे गुरुकुल पध्दतीत शिक्षण घेतले. वयाच्या १६ व्या वर्षीही ते आपल्या चमकदार एकल म्हणजेच सोलो तबला वादनाने प्रसिद्ध झाले. विजय घाटे हे काही कलाकांरपैकी एक आहे जे गायन, वाद्य आणि नृत्य या तीनमध्ये निपुण आहेत.
विजय घाटे यांनी उस्ताद बिस्मिल्लाह खान, उस्ताद विलायत खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित बिरजू महाराज, पंडित जसराज, उस्ताद शाहिद परवेझ आणि अनेक मान्यवर कलाकारांच्या सोबत साथ केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय कलाकार प्रसिद्ध संगीत जेथ्रॉटेल सारख्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत आणि जॉर्ज ड्यूकेस, अल्जेर्यु, रवी कॉलतारिन यांच्या सारख्यांना साथ दिली आहे. तसेच विजय घाटे यांनी गिसॉन्टी, लॅरी कॉरीयेल, जॉर्ज ब्रुक्स इ. त्यांनी लुई बॅंक, शंकर महादेवन, हरिहरन, शिवमणी या सुप्रसिद्ध भारतीय संगीतकारांसोबत काम केले आहे. विजय घाटे यांनी कर्नाटकी फ्युजन मध्ये डॉ. सुब्रायमॅनियम, विद्याभवन विनायकम, एम.एस गोपालकृष्णन व यू. श्रीनिवास यांच्या बरोबरही काम केले आहे. विजय घाटे नेदेरलंड मधील रॉटरडॅम मधील आर्ट कॉट्स युनीव्हसीटीत व्हिजीटींग फॅकल्टी म्हणून काम करतात.
विजय घाटे यांनी पॅरिस येथे १९८४ साली भारत-फ्रांस फेस्टिव्हल, १९८५ साली भारत फेस्टिव्हल रशिया येथे, राष्ट्रपती भवन येथे आणि भारत भवन येथे भारतीय महोत्सव येथे आपल्या तबला वादनाची प्रतीभा दाखवली होती. ते सवाई गंधर्व संगीत महोत्सव, हरवलाभा संगीत महोत्सव, तानसेन समारोह, गुनीदास संमेलन, उस्ताद अखिलिया खान संगीत समारोह, कालिदास महोत्सव, खजुराहो महोत्सव, विष्णु दिगंबर संगीत उत्सव महोत्सवामध्ये आपले उत्कृष्ट तबला वादन प्रदर्शित करत असतात. विजय घाटे यांनी तालचक्र नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला असून तो तरुण आणि नवीन कलाकारांसाठी व्यासपीठ पुरवते आणि आर्थिक दुर्बल घटकांमध्ये संगीतकारांना मदत करते. या ट्रस्टने अनुभवी संगीतकारांकडून संगीत कार्यशाळा आयोजित करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वातावरणात असलेल्या संगीतकार व संगीत शिक्षकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची योजना आखली आहे. तालाचक ट्रस्ट शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांना प्रोत्साहित करतो.
विजय घाटे यांनी 'विजय' नावाचा आपला अल्बम प्रसिद्ध केला आहे. विजय घाटे यांना पं. जसराज पुरस्कार, सरस्वती बाई राणे पुरस्कार, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांचा २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
लेखक, समीक्षक डॉ. अक्षयकुमार मल्हारराव काळे यांचा जन्म २७ जुलै १९५३ रोजी झाला.
“स्वातंत्र्योत्तर मराठी काव्यातील प्रवाह” या विषयावर त्यांनी पी.एच.डी. मिळवली असुन “सूक्तसंदर्भ”, “गोविंदाग्रज समीक्षा” ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याखेरीज, त्यांचे सुमारे १०० समीक्षालेख विविध ठिकाणी प्रसिद्ध झाले आहेत.
## Dr. Akshaykumar Malharrao Kale
Copyright © 2025 | Marathisrushti