जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
उत्तम व नैसर्गिक अभिनय क्षमता, निःपक्षपाती समिक्षा, कथा, व समाजकल्याण अशा विविध गुणांचा प्रभावी मिलाफ असणारे व आयुष्यभर अशा निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये सारख्याच तन्मयतेने वावरणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे लाडकोजीराव आयरे ! खेडयातील संस्कृती, रीतिरिवाज, रूढींशी त्यांचं जीवन निगडित असल्यामुळे, खेडयातील पार्श्वभूमी त्यांनी आपल्या नाटकांमधून अत्यंत कल्पकतेने उभी केली. समाजाच्या दृष्टीने ज्वलंत व खळबळजनक विषयावर त्यांनी १८ नाटके लिहून कित्येक सामाजिक समस्यांना व अन्यायाला वाचा फोडली.
महाराष्ट्र राज्य सरकारचा साहित्य लेखन स्पर्धेत उत्कृष्ट नाटयलेखनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला, तसेच अखिल भारतीय नाटय परिषदेने श्रमजीवी वर्गाचे रंगभूमीवरील पहिले यशस्वी नाटककार म्हणून त्यांचा गौरव केला गेला होता .
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
मुंबई विद्यापीठातून बी.फार्म, एल.एल.बी. पदव्या मिळवलेले श्रीकांत वाड यांनी अतिशय विरोधाभासी क्षेत्रात आपलं नाव मिळवून ठाण्याला मोठं केलं आहे. एका बाजूला बी.फार्म आणि एल.एल.बी. तर दुसरीकडे बॅडमिंटन या दोन टोकांच्या क्षेत्रात श्रीकांत वाड यांनी आपली छाप सोडली आहे.
अनेक चित्रपटातून प्रवीण तरडे यांनी छोट्या पण उल्लेखनीय भूमिकाही केल्या. ‘चिनू’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘तुकाराम’, ‘मसाला’, ‘रेगे’, ‘कोकणस्थ’, ‘मुळशी पॅटर्न’ ह्या चित्रपटातील त्याच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.
भारताचे अर्थमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी नवी दिल्ली येथे झाला. अरुण जेटली हे भारतीय जनता पक्षाचा एक महत्त्वाचा नेता म्हणून ओळखले जातात. आधी पेशाने वकील, पण त्यानंतर पूर्ण वेळ राजकारणात उरतले. अरुण जेटली यांचे वडिल महाराज किशन जेटली हे प्रख्यात वकील होते. दिल्लीतील सेंट झेव्हियर्स शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण घेतले आणि पदवीचे शिक्षण त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून घेतले. त्यानंतर १९७७ ला त्यांनी विधीची पदवी घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते.
१९७४ मध्ये ते दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले. अरुण जेटली यांच्या राजकीय कारकीर्दीला महाविद्यालयापासूनच सुरुवात झाली. अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. सुरुवातीच्या काळापासूनच वक्तृत्व आणि वादविवादावर त्यांचे प्रभुत्व होते. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष बनले आणि त्यांचा राजकारणाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.आणीबाणीच्या काळात अरुण जेटली यांना अटक करण्यात आली होती. जेटली यांना अंबाला येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तेथून हलवून तिहारच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. आणीबाणीनंतर ते पुन्हा राजकारणात जोमाने काम करू लागले. त्यांची १९७७ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
१९७७ ला कायद्याची पदवी घेतल्यापासून अरुण जेटली हे एक यशस्वी वकील म्हणून ओळखले जातात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात ते काम पाहतात. १९९० मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ म्हणून निवडले गेले होते. कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि अनुभव पाहून १९९८ ला त्यांची निवड संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला जाणाऱ्या शिष्टमंडळात झाली होती.
१३ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांची नियुक्ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात करण्यात आली. त्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि प्रसारण या मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आले. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. मे २०१४ पासून ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहे. देशात आर्थिक सुधारणा होणे हे महत्त्वाचे आहे अशी भूमिका ते मांडतात. अल्पकाळासाठी त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची देखील जबाबदारी होती. सध्या ते भारताचे अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहेत. आजवर अरुण जेटली यांनी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, त्यानंतर राज्यसभेवर खासदार, तिथं भूषविलं विरोधी पक्षनेतेपदही... पण लोकसभेची निवडणूक मात्र पहिल्यांदाच लढवली; त्यात त्यांना अपयश आलं. ग्लॅमर आणि ड्रेस सेन्सच्या बाबतीत अरुण जेटली सर्वापेक्षा वेगळे दिसतात. चष्म्याच्या फ्रेमपासून चप्पल, बुटापर्यंत सर्वामधून उमदेपणा झळकतो. त्यांच्या वार्डरोबमध्ये जगभरातील ब्रँडचे कपडे उपलब्ध असतात.
२४ मे १९८२ रोजी त्यांचा विवाह संगीता डोग्रा यांच्याशी झाला. संगीता डोग्रा जम्मू-काश्मी रचे कॉंग्रेसी नेता व उपमुख्यमंत्री राहिलेल्या गिरीधारीलाल डोग्रा यांच्या कन्या. त्यांचा जन्म मात्र अमृतसरचा. जम्मू विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए केलं आणि त्यानंतर १९८२ मध्ये जेटलींकडून लग्नाची मागणी आली. त्या वेळी अरुण जेटली नामवंत वकील होण्याबरोबरच भाजपमध्येही स्थिरावले होते. त्यांच्या लग्नाला अर्थातच दोन्ही पक्षांचे नामवंत होते... त्यात पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी ही बडी मंडळी होती. लग्नानंतर संगीता यांचं नाव बदललं गेलं, त्या झाल्या डॉली. आणि अर्थातच हळूहळू त्या भाजपच्या कार्यकर्त्याही बनल्या. घरातून बालपणापासूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या संगीता उर्फ "डॉली‘ या अरुण जेटली यांच्या निवडणुकीचे सारं व्यवस्थापन स्वत: पाहतात. त्यांना रोहन आणि सोनाली अशी दोन मुले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
श्री. उत्तम जोशी हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. ते ठाणे येथील उद्योजक असून ठाण्यातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.
हिंदी सिनेमांतील पहिली संगीतकार जोडी म्हणून ओळख असलेले हुस्नलाल-भगतराम पैकी हुस्नलाल यांचा जन्म १९१६ मध्ये जालंधर येथे झाला. हुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते. वयाच्या १७-१८ व्या वर्षीपासून त्यांनी लाहोर, अमृतसर, दिल्ली येथील बर्यानचशा मैफिली व्हायोलिनवर शास्त्रीय संगीत वाजवत गाजवल्या होत्या. त्या व्यतिरिक्त ते उत्तम शास्त्रीय गायकही होते. अमरनाथ यांनी आपल्या धाकट्या भावांना १९४३ साली मायानगरी मुंबईत धाडलं.
प्रभातचा ‘चॉंद-१९४४’ हा ह्या जोडीचा पहिला चित्रपट. आणि बघता-बघता ‘दो दिलोंको ये दुनिया मिलने’ ह्या गाण्यानं संपूर्ण अखंड भारतात धुमाकूळ घातला. १९४६ साली पुन्हा या जोडीच्या वाट्याला प्रभातचाच ‘हम एक है’ आला. हा चित्रपट हिंदी सिनेसृष्टीला तीन नवे कलाकार देणार होता. गुरुदासपूर/लाहोरचा देव आनंद, पेशावरचा रेहमान व मंगलोरचा गुरू दत्त पदुकोण. गंमत म्हणजे गुरू दत्त हा या चित्रपटाचा नृत्य-निर्देशक होता. यातील गाणी फारशी लोकप्रिय होऊ शकली नाहीत. १९४७ च्या जून मध्ये ‘मिर्झा साहिबान’ प्रदर्शित झाला. ‘मिर्झा साहिबान’ या चित्रपटाचे मूळ संगीतकार अमरनाथ होते, पण १९४५ साली त्यांचे आकस्मिक निधन झाले व अन्य काही कारणांमुळे हा चित्रपट रखडला व शेवटी बॅकग्राऊंड संगीत व बर्यापच गाण्याचं रेकॉर्डिंग याची जबाबदारी हुस्नलाल- भगतराम यांनी समर्थपणे पार पाडल्याचे एकदा नूर जहानने स्वतः सांगितले होते.
‘आजा तुझे अफसाना जुदाई का सुनाये’, ‘हाथ सीनेपे जो रख दो’ ही यातील काही आजही आवडीनी ऐकली जाणारी गाणी. या दोघांनी आपली सिने करियर ची सुरवात १९४४ मध्ये प्रदर्शित चित्रपट “चांद” पासून केली. या चित्रपटातील “दो दिलों की ये दुनिया” गाणे खूपच लोकप्रिय झाले होते.
१९४८ पासून हुस्नलाल भगतराम जोडी खर्याल अर्थानी नावारूपास आली. ‘प्यार की जीत’ हा सुरैया, रेहमान अभिनीत चित्रपट प्रचंड गाजला व गाजली ही गाणी – ‘तेरे नैनों ने चोरी किया (सुरैया) व ‘एक दिल के टुकडे हज़ार हुए’ (मोहम्मद रफी). मूळची लाहोरची सुरैया ही त्याकाळातील अव्वल दर्जाची अभिनेत्री होती आणि तिची गाणी ती स्वतःच गात असे. तिने ९ सिनेमांमधून ६० च्या आसपास गाणी या जोडीकरिता गायिली आहेत. त्यावरून या जोडीच्या लोकप्रियतेची कल्पना येऊ शकते वाचकांना. एवढी गाणी तिची कोणत्याही अन्य संगीतकारा बरोबर नाहीत. ‘वो पास रहें’ (बडी बहन-१९४९), ‘इसका क्या मतलब है’ (सनम-१९५१), ‘बेकरार है कोई’ (शमा परवाना – १९५४) ही काही अविस्मरणीय सुरैय्याची गाणी त्यांच्या संगीतातील. १९४८ साली महात्मा गांधीच्या हत्येनंतर आलेल्या बापूंकी अमर कहानी या चित्रपटाला हुस्नलाल- भगतराम यांनी संगीत दिले होते. मोहम्मद रफी यांनी गायलेले राजेद्र कृष्णा लिखित हे गाणे अतिशय लोकप्रिय झाले होते.
१९४९ पासून लता मंगेशकर त्यांच्यासोबत आल्या. लता मंगेशकर म्हणजे एक हिरा., शास्त्रीय संगीताची अभूतपूर्व बैठक त्यांच्या स्वरांना, पण पार्श्व्गायनाचे पैलू या हिर्या्ला ज्यांनी पाडले असतील त्यात हुस्नलाल भगतराम यांचा प्रामुख्याने समावेश करणे आवश्यक आहे. लता मंगेशकर यांना प्रत्येक रचना हुस्नलाल पेटी अथवा व्हायोलिनवर वाजवून दाखवत असत आणि त्या मग त्या स्वरांना हुबेहूब आपल्या गायनात उतरवत असत. १९४९-५७ या ८ वर्षांच्या काळात लता मंगेशकर या जोडीच्या २५ च्या वर चित्रपटांतून शंभर हून अधिक गाणी गायल्या. लता मंगेशकर यांच्या कोवळ्या स्वरांतील ‘दर्द’ आपणांस जाणून घ्यायचा असल्यास हुस्नलाल-भगतराम यांना ऐकणे भाग आहे. साहजिकच आहे, ते स्वतःही लताबाईंच्या स्वरांवर तेवढेच भारावलेले असावेत. त्यांच्या अनेक रचनांमध्ये त्यांनी लताबाईंकडून कमालीचे सुरुवाती आलाप गाऊन घेतले आहेत, जे अगदी हृदय हेलावून सोडतात.
उदाहरणार्थ- ‘जो दिल मे’ (बडी बहन-१९४९), ‘जिगर के टुकडे किये’ (सरताज-१९५०), ‘मोहब्बत मे हंसी’ (स्टेज-१९५१), ‘जुदाई की खबर’ (आंसू-१९५३). कस काढलाय् लताबाईंचा! अन्य माझी काही आवडीची विरह गीतं आहेत – ‘लूट गयी’ (जलतरंग-१९४९), ‘दिल ही तो है’ (आधी रात-१९५०), ‘ठहर हो जानेवाले’ (बिरहा की रात-१९५०), ‘दर्द-ए-जुदाई’ (छोटी भाभी-१९५०), ‘अगर दिल किसीपे’ (गौना-१९५०), ‘आंसू अब तुम’ (काफिला-१९५२).
असे अजिबात नाही की हुस्नलाल-भगतराम यांनी लता मंगेशकर यांना केवळ विरह गीतंच गायला दिली. ‘चूप-चूप खडे’ (बडी बहन-१९४९), ‘तेरी अंखिया’ (सावन भादो-१९४९), ‘काहे धीरे’ (राखी-१९४९), ‘ना जाना ना जाना मेरे बाबू’ (छोटी भाभी-१९५०), ‘वो आए बहारें’ (अफसाना-१९५१), ‘तेरी गली में (फर्माइश-१९५३) अशी कित्येक साध्या चालीची, परंतु अत्यंत मंजुळ गाणी देखील दिली आहेत. ‘राजा हरिश्चंनद्र-१९५२’ मधील ‘गोरी-गोरी चांदनी’ हे गाणं म्हणजे गोडव्याचा कळस आहे. हार्मोनियम व सतार पूरक आहेत लताबाईंच्या स्वरांना. कहर केला आहे या गाण्यात.
तसेच ‘आंसू-१९५३’ मधील ‘आँखोंका तारा प्राणो से प्यारा’ रसिकांनी अवश्य ऐकावे. सुरुवातीला व्हायोलिन व त्यांनंतर इंटरल्यूडमध्ये सतार यांचा अप्रतिम वापर या गाण्याची वैशिष्ट्ये हुस्नलाल-भगतराम यांनी स्वरबद्ध केलेल्या लता-रफी यांच्या युगल गीतांबद्दल काय बोलावे? ‘जरा तुमने देखा’ (जल तरंग-१९४९), ‘छोटासा फसाना है’ (बिरहा की रात-१९५०), ‘पास आके हुए’ (मीना बाजार-१९५०), ‘हमे दुनिया को दिल’ (आधी रात-१९५०), ‘दिल लेके दिल दिया’ (स्टेज-१९५१), तू चंदा मै चांदनी (राजा हरिश्चंणद्र-१९५२), ‘दिन प्यार के’ व ‘सून मेरे साजना’ (आंसू-१९५३) ही त्यांची काही अजरामर गाणी. मागे मला बोलताना खय्याम म्हणाले होते की पहाडी धूनवर आधारित ‘सून मेरे साजना’ हे त्यांच्या अत्यंत आवडीचे गीत आहे. इतकेच नव्हे, तर हे गीत त्यांनी व त्यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी गाऊन देखील दाखवलं. खय्याम व शंकर सुरुवातीच्या काळात हुस्नलाल-भगतराम यांचे सहाय्यक ही होते. मोहम्मद रफी यांच्या करीयर मध्ये हुस्नलाल-भगतराम यांचा मोठा हात आहे. हुस्नलाल-भगतराम यांनी मोहम्मद रफी यांना पहिला ब्रेक दिला होता.
गीता दत्त, झोहराबाई, मुकेश, तलत मेहमूद, आशा भोंसले, सुमन कल्याणपूर इत्यादी कलाकार देखील त्यांच्याकरिता गायले आहेत. तलतची ही दोन गाणी – ‘मुहोब्बत की हम’ (फर्माइश-१९५३) व ‘ए मेरी जिंदगी’ (अदल-ए-जहांगीर-१९५५) तर सुप्रसिद्ध आहेत. १९५२ पासून ते व्यावसायिक पिछाडीवर पडत गेले, त्यात भर पडली त्यांच्या कौटुंबिक समस्यांची. १९५५ पासून तर त्यांना प्रतिष्ठित सिनेमे मिळणे ही कठीण होत गेले. नशिबी येत होते ते दुय्यम दर्जांचे सिनेमे. तरी देखील, लताबाईंची संपूर्ण साथ १९५७ पर्यंत त्यांना राहिली. ‘आनबान-१९५६’, ‘मिस्टर चक्रम-१९५६’ आणि ‘कृष्ण सुदामा-१९५७’ ही लताबाईंची त्यांच्यासमवेत काम केलेली शेवटची ३ सिनेमे. लताबाई १९५६-५७ साली दुय्यम दर्जांच्या सिनेमात देखील गायल्या आहेत हे कोणास सांगितल्यास विश्वाकस बसणार नाही. ‘तुने कैसी आग लगायी’ व ‘ओ आसमान वाले’ (आनबान), ‘क्यूँ झुकी जाती’ (मिस्टर चक्रम) व ‘ओ क्रिष्णा बिगडी बना दे’ (कृष्ण सुदामा) ह्या गाण्यांमधून लता मंगेशकर यांची आपल्या गुरूंबद्दल असलेली निष्ठा दिसून येते.
१९५७-५८ पासून पंडित हुस्नलाल भारतभर व्हायोलिनवर शास्त्रीय संगीत वाजवू लागले, आकाशवाणीवरही त्यांचे अनेक कार्यक्रम झालेत. १९५९ च्या सुमारास मुंबई सोडून ते अखेरीस दिल्लीला परतले. चरितार्था खातर पंडित भगतराम १९६५-६६ पर्यंत दुय्यम चित्रपटांत संगीत देत राहिले व सोबत अन्य संगीतकारांचे सहाय्यक म्हणूनही त्यांना काम करावे लागले. हुस्नलाल यांचे २८ डिसेंबर १९६८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / अजय देशपांडे
हुस्नलाल-भगतराम यांची गाणी.
https://www.youtube.com/watch?v=I_Qf-B0mtak
https://www.youtube.com/watch?v=fKndjjGwtGM
हुस्नलाल-भगतराम यांची माहिती. https://www.youtube.com/watch?v=dflf6ixWJ4Q&index=2&list=PLII0LdyKA9i7EWfs2773wJYyXIXF_BVRl
रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता. त्यांच्या आईनेही मुलाला गायकीचे शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट घेतले. त्यांचा जन्म २८ नोव्हेंबर १८७४ रोजी झाला. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते मालवण येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले. घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी पुण्याला गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी मुंबई, इंदूर, उज्जैन, वाराणसी असा त्यांचा प्रवास चालू राहिला. ग्वाल्हेर येथे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला खरे वळण मिळाले. त्यांनी काही काळ जयपूर येथे मनरंग परंपरेतील मुहम्मद अली खान यांच्याकडूनही शिक्षण घेतले. जयपूर येथे त्यांची गाठ पुन्हा निसार हुसेन खाँ यांच्याशी पडली. ह्या खेपेस खाँसाहेबांनी वझेबुवांना कसून तालीम दिली. वाराणसी येथे त्यांना स्वामी विवेकानंदांच्या सहवासात १५ दिवस राहण्याची संधी मिळाली. नेपाळमध्ये दरबारगायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली. गायक नट कै. केशवराव भोसले यांच्या आग्रहावरून बुवांनी ललितकलादर्श या कंपनीच्या नाटकांना चाली दिल्या.
स्वातंत्रवीर सावरकर लिखित रणदुंदुभी आणि सन्यस्त खड्ग ह्या संगीत नाटकातली पदे वझे बुवांनी स्वरबद्ध केली होती. वधुपरीक्षा, संन्यासाचा संसार, शहा शिवाजी, श्री, रणदुंदुभी, नेकजात मराठा, सोन्याचा कळस अशा अनेक नाटकांतील त्यांनी संगीत दिलेली पदे लोकांच्या विशेष पसंतीस उतरली. त्यांनी देशभर भ्रमंती करून अनेक मैफली गाजविल्या. त्यांनी तयार केलेल्या गायकीचा 'वझेबुवांची गायकी' म्हणून खास गौरव झाला. दुर्मिळ संगीत रागांमधील दुर्मिळ चीजांचे त्यांनी संकलन केले होते, ते 'संगीत कला प्रकाश' या शीर्षकाखाली प्रकाशित झाले. गायनावर निस्सीम प्रेम केलेल्या या थोर गायकाने गाणे हे श्रोत्यांसाठी आहे असे सतत मानले. गोव्यात तसेच महाराष्ट्रात दीनानाथ मंगेशकर, केसरबाई केरकर, व्ही.ए. कागलकरबुवा, तानीबाई, केशवराव भोसले, भास्करराव जोशी, बापुराव पेंढारकर, भार्गवराम आचरेकर, हरिभाऊ घांग्रेकर, भालचंद पेंढारकर, गुरुराव देशपांडे, दिनकरपंत फाटक, गजाननबुवा जोशी, शिवरामबुवा वझे, लक्ष्मणराव वझे, मोहनबुवा कर्वे, विनायकराव पटवर्धन अशा पुढे नावारूपाला आलेल्या कलाकारांना रामकृष्णबुवांनी गायनाचे शिक्षण दिले. रामकृष्णबुवा वझे यांचे निधन ५ मे १९४५ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
रेनकोटचा शोध लावणाऱ्या चार्ल्स मॅकिन्टॉश यांचा जन्म २९ डिसेंबर १७६६ रोजी स्कॉटलंडमधल्या ग्लासगोव्हमध्ये झाला. स्कॉटलंडमधील ग्लासगोव्हमध्ये राहणारे चार्ल्स मॅकिन्टॉश हे केमिस्ट होते. चार्ल्स यांना रसायनशास्त्रात फारच रुची होती. कामावरून घरी आल्यानंतर ते रसायनशास्त्राचा अभ्यास करायचे. एका कार्यक्रमात चार्ल्स यांना कोळसा आणि नाफ्तापासून रबरचा वापर करता येईल, अशा तंत्रासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी रेनकोटचा शोध लावण्यास सुरुवात केली. वेगवेगळे प्रयोग करण्यात ते नेहमीच व्यस्त असायचे.
नाफ्ता हा रबरमध्ये सहजासहजी विरघळतो. यापासून एक पदार्थ तयार होतो जो जलरोधक असतो हे चार्ल्स यांना एका प्रयोगादरम्यान कळले. त्यांनी दोन कपड्यांच्यामध्ये हे मिश्रण लावले हा कपडा पाण्यात भिजला तरी त्यातून पाणी आत झिरपणार नाही हे चार्ल्स यांना कळले. लोकरीच्या दोन अस्तरांना वितळवलेल्या रबरने जोडले आणि अस्तर शिवून कोट बनवला. जलरोधक कापड बनवण्याचे पेटंट त्यांना १८२३ मध्ये मिळाले. पण त्याकाळात त्यांच्यावर आरोपही झाले हा शोध खरं तर त्यांचा नसून सर्जन जेम्स सिम यांच्याकडून त्याने ही कल्पना घेतली असेही आरोप झाले.
चार्ल्स यांचा हा शोध खूपच महत्त्वाचा मानला जातो. कारण पावसात स्कॉट नागरिकांचे बाहेर फिरताना हाल व्हायचे. छत्री होती पण ती असून नसल्यासारखीच. तसे जलरोधक कपडे होते पण त्यांचे वजनच खूप असायचे आणि त्याला कुबट वासही यायचा त्यामुळे अर्थात चार्ल्सने शोधलेल्या या नवीन रेनकोटला प्रसिद्धी लाभली नाही तर नवलच म्हणावे लागेल. चार्ल्स मॅकिन्टॉशचा हा पहिलावहिला रेनकोट जगभरात प्रचंड प्रसिद्ध झाला. त्यानंतर मूळ रेनकोटमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. चार्ल्स मॅकिन्टॉश यांचं २५ जुलै १८४३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
गणेश प्रभाकर प्रधान (ग प्र प्रधान) हे समाजवादी विचारवंत, राजकारणी व मराठी भाषेमधील लेखक होते.
कवयित्री संजीवनी या नावाने काव्यलेखन करणार्या संजीवनी मराठे कवयित्री तर होत्याच, शिवाय कविसंमेलनात स्वत:च्या कविता सुरेल आवाजात त्या गातही असत.
Copyright © 2025 | Marathisrushti