जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
चार वर्षात केवळ एक एकर जमिनीवरील फुलशेतीतून ३०-४० लाखांचा टर्नओव्हर करणार्या आयटी स्पेशालिस्ट गोपाळ मेखले यांनी आपल्या गावात बचतगट, डेअरी, यासारखे यशस्वी प्रोजेक्टही राबवले आणि त्याची दखल हॉवर्ड युनिव्हसिर्टीने घेतली.
गोपाळ मेखले शिक्षणाने इन्फमेर्शन टेक्नॉलॉजिस्ट, पण सध्या करतोय शेती. वाचून कुणालाही आश्चर्य वाटेल. चार वर्षांपूर्वी 'डेल' या आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपनीतील लठ्ठ पगाराची नोकरी सोडूऩ त्याने़ शेतात राबायचा निर्णय घेतला, तेव्हा असंच सगळ्यांना आश्चर्य वाटलं होतं. पण थोड्याच अवधीत त्याने एक मोठी हॉर्टीकल्चर इंडस्ट्री उभी केली आणि सगळ्यांनी त्याच्या यशाचं व त्याने घेतलेल्या निर्णयाचं कौतुक करायला सुरुवात केली.
सध्याच्या पिढीचा आपला 'सीव्ही फ्लरीश' करुन सतत कंपन्या बदलण्याकडे कल असताना, काहीतरी वेगळं करायचं, घरची जबाबदारी सांभाळायची अशा विचारानं चाळीशीच्या आतील गोपाळ मार्च २००८ मध्ये लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातल्या आपल्या सुगाव गावी आला. स्वत:च्या ३० एकर शेतीत हायटेक फ्लोरिकल्चर डेव्हलप केलं आणि दरसाल चक्क २०-३० लाखांचा टर्नओव्हर घेऊ लागला, हा त्याचा प्रवास नक्कीच वेधक आहे. पण त्यामागे त्याची बुध्दी आणि कठोर मेहनतही आहे. खरंतर गोपाळ २००२ ते २००८ या कालावधीत पूण्याला नोकरी करत होता. नोकरीत चांगलं चाललं होतं. नोकरीत स्थिरस्थावर झाल्यावर आईवडिलांनी पुण्यात कायमचं आपल्याकडे यावं, असं त्याला वाटलं. पण मुलाकडे राहायची इच्छा असतानाही गोपाळच्या आईवडिलांना पुण्यात नकोसं वाटलं. सुगाव सारख्या लहान गावात आयुष्य काढलेल्यामुळे त्यांना शहराचं आकर्षण होतं, मुलगा सोबत असणार म्हणून आनंदही झाला होता. परंतु पूर्णपणे पुण्यात स्थायिक होणं त्यांना पचलं-आवडलं नाही. शिवाय गावाकडे असलेल्या ३० एकर शेतीचं काय, असा प्रश्न गोपाळच्या आईवडिलांना भेडसावत होता. शेवटी मातीची माया वरचढ ठरली आणि त्यांनी सुगावातच राहण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे म्हाताऱ्या आईबाबांकडे कोण लक्ष देणार, ते ३० एकराची शेती कशी पाहणार, असे विचार गोपाळला छळायला लागले. त्याचं कामावरुन लक्ष उडालं. अन् एके क्षणी त्याच्या डोक्यात विचार आला- आपणच सुगावला गेलं तर! पण पुण्यासारख्या शहरात आठ वर्षं नोकरी केलेल्या गोपाळसाठी गावी परतण्याचा निर्णय घेणं सोपं नव्हतं. किंबहुना भविष्य खेड्यात काढायचं या कल्पनेने त्याला जणू काही फ्रस्ट्रेशनच आलं. पण शहर की गाव, आपलं भविष्य की कर्तव्य या संघर्षात अखेर वरचढ ठरलं ते मुलगा म्हणून करायचं कर्तव्य! आणि तडक सात वर्षांची नोकरी सोडून, पुण्यातील गाशा गुंडाळून गोपाळ सुगावला परतला.
सुगावला येताच गोपाळचं पुन्हा नव्यानं स्ट्रगल करणं सुरु झालं. यावेळी स्ट्रगल जरा वेगळं होतं. एकीकडे शेती करण्याचं प्लॅनिंग सुरु असतानाच, पुण्यात नोकरीला असताना सुरू झालेली लग्नाची बोलणी एकदम बंद झाली. स्थळं येणं बंद झालं. घरी येणारा लठ्ठ पगारही बंद झाला. पण एव्हाना काय करायचं त्याचं चित्र त्याच्या डोळ्यासमोर होतं. त्याने सुगावातच बचतगट स्थापनं करणं, डेअरी प्रोजेक्ट आखणं, हॉटीर्कल्चर फार्मसाठी इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं ही कामं करायला सुरुवात केली. दरम्यान एक स्थळ येऊन त्याचं लग्नही झालं. त्याच्या आईवडिलांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पण गोपाळला अजून खरा टप्पा गाठायचा होता. त्याचं लक्ष होतं, फ्लोरिकल्चर युनिटकडे. इथे तळेगाव दाभाडे येथे हॉटीर्कल्चरचं घेतलेलं शिक्षण उपयोगी आलं.
एकूण ३० एकर पैकी १ एकरात गोपाळचे प्रयोग सुरु झाले. एक एकर शेतात जरबेराचं उत्पादन घेण्याचं ठरलं. काही लाखांची स्वत:ची गुंतवणूक व कॅनरा बॅंकेकडून घेतलेलं कर्ज या बळावर त्याने, 'इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट'करावी तशी शेतीत इन्व्हेस्टमेंट सुरु केली. शेती कोरडवाहू, त्यात अनेक अडचणी. ग्रीनहाऊस, फ्लोरिकल्चर हाऊस कसं उभारावं हा प्रश्न. पण हा प्रश्नही सोडवला गेला तो गावातीलच १२ जणांना घेऊन. गोपाळने़ १२ जणांना रोजगार दिला. मेहनत सुरु झाली. कोरडवाहूत एक पॉलीहाऊस उभारलं गेलं. ऊस, सोयाबीन, तूर यासारखी पीकंही फ्लोरिकल्चरच्या जागे व्यतिरिक्त पारंपरिकपणे घेणं गोपाळने सुरु ठेवलं. लागवडीनंतर रोज किमान ४ हजार जरबेराची फुलं येऊ लागली. त्यामुळे आता त्याच्या माकेर्टिंगची जबाबदारी आली. लातूर, औरंगाबाद, हैदराबाद, दिल्ली, पुणे आदी ठिकाणी माल जाऊ लागला पहिल्या वर्षी जेवढी इनव्हेस्टमेंट केली तेवढी काढणंही कठीण झालं. पण कधीही न संपणारा अनुभव पाठीशी आला. पहिल्या वर्षी झालेल्या चुका टाळण्यात करण्यात दुसर्या वर्षी यश आलं. पहिल्या वर्षीचा अनुभव गाठीशी आल्यानं २००९-२०१० साली १० लाख, त्याच्या पुढील वर्षी २० लाख तर, तर यंदा तब्बल ४० लाखावर उलाढाल गेली. अर्थात फुलांच्या धंद्यात चढउतार नसतात, असं नाही.कधी जरबेराच्या एका फुलाला अडीच, तर कधी ८ रुपये दरही आला. ह्यातून अॅग्रिकल्चर ही एक 'इंडस्ट्री' म्हणून गोपाळने याला 'ट्रीट' केलं. माकेर्टिंग, पॅकेजिंग, अशा टेक्निकल बाबी शिकून घेतल्या. दिल्लीपर्यंत फुलांची बाजार नेल्यानंतर, आता गोपाळ दुबई, अमेरिकेची स्वप्न पाहू लागला आहे. तब्बल बारा जणांच्या बळावर आता ही फुलशेती हायटेक होऊ लागली आहे.
आधुनिक काळात ज्या ज्या म्हणून तांत्रिक बाबी गावात यायला हव्यात, त्या-त्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात गोपाळला यश आलं आहे. गावात डेअरी फार्म, ज्वारी-गव्हाच्या पीठाचा कारखाना, बचत गट, भाजीपाला उत्पादन, अत्याधुनिक शेतीकडे युवकांना अॅग्रिकल्चर ही एक इंडस्ट्री म्हणून पाहायला भाग पाडणे, त्या दृष्टीने प्रबोधन करणं, लातूरमध्ये डेअरी फार्म मधून म्हशीचं प्युअर दूध मिळवून देणं, आदी प्रोजेक्टही हळूहळू सुरू करण्यात गोपाळला यश आलं आहे.
नुकतंच हॉवर्ड युनिर्व्हसिटीचं एक डेलिगेशन खास त्याचे हे प्रयोग पाहायला त्याच्या शेतात येऊन गेलं. बॅंकेचं पाठबळ, दुर्दम्य इच्छा शक्ती आणि 'आऊट ऑफ बॉक्स थिकिंग'ने केलेल्या हायटेक फुलशेतीच्या जोरावर, गोपाळ मराठवाड्याच्याच काय राज्यातील मुलांसाठी एक युथ आयकॉन ठरला आहे.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
दिलीप सरदेसाई यांची ओळख विदेशी भूमीवर द्विशतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज
अशी होती. त्यांचा जन्म ८ ऑगस्ट १९४० रोजी मडगाव गोवा येथे झाला. १९५६ मध्ये मुंबईमध्ये येईपर्यंत दिलीप सरदेसाई यांची क्रिकेट कारकीर्द सुरु झालेली नव्हती. त्यावेळी गोवा राज्यात मध्ये तसे क्रिकेट कमीच होते. लहानपणी ते टेबल टेनिस खेळात असत. ते शाळेच्या अनेक स्पर्धेत टेबल टेनिस खेळले. परंतु मुंबईला आल्यानंतर त्यांनी विल्सन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तिथे ठरवले की आपण क्रिकेट खेळायचे.
त्यांना खरे क्रिकेटसाठी खरे प्रोत्साहन दिले ते भारतीय संघाकडून नाव कमावलेल्या त्यांच्या चुलत भावाच्या म्हणजे सोपान सरदेसाई याला मिळालेल्या यशामुळे. दिलीप सरदेसाई खऱ्या अर्थाने सुदैवी होते कारण मुंबईचे भूतपूर्व रणजी खेळाडू एम. एस. नाईक दिलीप सरदेसाई यांच्या खेळावर खूप खूश होते. त्यांनी दिलीप सरदेसाई यांना मार्गदर्शन द्यायला सुरवात केली.
एम. एस. नाईक सरांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप सरदेसाई विविध प्रकारचे फटके मारण्याची तयारी करत होते त्याचप्रमाणे आपल्या फलंदाजीवरचे लक्ष विचलित न होण्याची देखील काळजी घेत होते. म्हणून त्यांनी जास्त गोलंदाजीवर लक्ष केंद्रित केले नाही. तर फलंदाजीवर आपले लक्ष केंद्रित केले. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी कडून खेळण्यास सुरवात केली. १९६०-६१ साली पुण्यात झालेल्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्यांनी १९४ मिनिटांमध्ये ८७ धावा केल्या. त्यांनी ह्या धावा केलेल्या पाहून मुंबई बोर्ड प्रेसीडेंटस ११ मधून त्याच संघाविरुद्व नाबाद १०६ धावा केल्या. त्यांनी १९६१ मध्ये आपल्या क्रिकेट करिअरची सुरूवात केली. ते १९६१ च्या डिसेंबर मध्ये त्यांचा पहिला कसोटी सामना जो इंग्लंडविरुद्ध ग्रीन पार्क , कानपुर येथे झाला होता त्या सामन्यात खेळले. त्या सामन्यांमध्ये ते लॉक कडून २८ धावांवर ' हिट विकेट ' करून बाद झाले. हा सामना अनिर्णित राहिला.
दिलीप सरदेसाई यांनी विदेशी मैदानावर म्हणजे १८ ते २३ फेब्रुवारी १९७१ साली किंग्स्टन मैदानावर वेस्टइंडिनजवरुद्ध पहिल्या इनिंग २१२ धावा केल्या. आणि त्यांनी एक वेगळा रेकॉर्ड केला तो म्हणजे परदेशी भूमीवर पहिले द्विशतक केले.अर्थात तो सामना अनिर्णित राहिला. ह्याच दौऱ्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्यांमध्ये त्यांनी ११२ धावांची भागीदारी केली आणि भारतीय संघाने पहिल्या वेळी वेस्ट इंडिजच्या संघाला हरवले. ह्या दौऱ्यामधील पहिला , तिसरा आणि पाचवा सामना अनिर्णित राहिले.
ह्या दौऱ्यामधील चौथ्या सामन्यांमध्ये त्यांनी १५० धावा केल्या, ते होल्डरकडून बाद झाले होते . ही कसोटी मालिका भारतीय संघाने १-० ने जिंकली. ह्या दौऱ्यामध्ये दिलीप सरदेसाई यांनी ऐकून ६४२ धावा केल्या. ह्या दौऱ्यामध्ये सुनील गावस्कर यांनी ७७४ धावा केल्या तर सर गारफिल्ड सोबर्स यांनी ५९७ धावा केल्या होत्या. दिलीप सरदेसाई यांनी मुंबई मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १२ ते १५ मार्च १९६५ मध्ये नाबाद २०० धावा केल्या. डावखुरे दिलीप सरदेसाई गोलंदाज पण होते परंतु त्यांचे लक्ष फलंदाजीकडे असल्यामुळे ते गोलंदाजीमध्ये जास्त प्रभाव पाडू शकले नाही.
दिलीप सरदेसाई ज्या जमान्यामध्ये आतंरराष्ट्रीय सामने कमी होत असत. खेळाडू जास्त फर्स्ट क्लास सामने खेळत असत. जेव्हा त्यांनी भारतीय संघाने पहिला वहिला इंग्लंडच्या ओव्हल मैदानावरचा सामना जिंकला तो क्षण दिलीप सरदेसाई यांना महत्वाचा वाटला होता. त्या ओव्हलच्या मैदानावर महत्वाच्या कसोटी सामन्यांमध्ये दिलीप सरदेसाई यांनी ५४ आणि ४० अत्यंत मोलाच्या धावा केल्या. भारताला त्या विजयासाठी या धावांची खूप मदत झाली. पहिल्या इनिंग मध्ये सरदेसाई यांच्या ५४ तर सर्वात जास्त फारुख इंजिनिअर यांनी ५९ धावा काढल्या होत्या तर दुसऱ्या इनिंग मध्ये सरदेसाई यांनी ४० धावा काढल्या होत्या. तर अजित वाडेकर यांनी ४५ धावा काढल्या होत्या.
दिल्ली इथे २० ते २५ डिसेंबर १९७२ रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात दिलीप सरदेसाई खेळले. सुनील गावस्कर यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटले आहे की , ' दिलीप सरदेसाई यांनी जलद गोलंदाजीवर कसे खेळावे हे दाखवून दिले.' दिलीप सरदेसाई यांना चेंडूवर नजर बसण्यासाठी जरा वेळ दिला की क्षेत्ररक्षकांची दमछाक होत असे, गोलंदाजांचा धीर सुटत असे. ते दमून जात. दिलीप सरदेसाई यांचे कटचे फटके, ग्लान्सचे फटके , ड्राईव्हचे फटके आणि हूकचे फटके मारत असत त्याचप्रमाणे खेळताना अनेक फटके त्यांच्या भात्यात असत.
३० सामन्यांमध्ये २००१ धावा केल्या त्यावेळी त्यांची सर्वोच्च धावसंख्या होती २१२, त्यामध्ये त्यांनी ५ शतके आणि ९ अर्धशतके केली. त्यातली दोन द्विशतके होती. तर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १७९ सामन्यांमध्ये १०, २३० धावा केल्या त्यामध्ये त्यांची २५ शतके आणि ५६ अर्धशतके होती.
विजय मर्चंट यांनी दिलीप सरदेसाई यांना'द रेनासांस मॅन ऑफ इंडिया' म्हणून गौरवले. महत्त्वाचे असे की ज्या काळात आंतरराष्ट्रीय सामने मोठ्या प्रमाणावर खेळले जात नसत. त्या काळात त्यांनी ही कामगिरी केली आहे. डावखूरा फलंदाज असलेले सरदेसाई एक उत्कृष्ट गोलंदाजही होते. १९७२मध्ये त्यांनी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. त्यांची आणखी एक खासीयत अशी की आपल्य एकूण कारकिर्दीत त्यांनी केवळ दोनच षटकार ठोकले.
१९६२ च्या वेस्ट इंडिज दौऱ्यातली सरदेसाई यांची एक आठवण सांगितली जाते. वेस्ट इंडिजकडे त्यावेळी एकापेक्षा एक वेगवान मारा करणारे गोलंदाज होते. भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज नरी कॉन्ट्रॅक्टर यांच्या डोक्यात एक उसळता चेंडू बसला होता. त्यामुळे त्यांना डाव अर्धवट सोडून पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. त्यांच्यानंतर फलंदाजीला येण्यासाठी फलंदाज तयार नव्हते. त्यावेळी सरदेसाई यांनी पुढाकार घेतला आणि ते खेळायला उतरले.
दिलीप सरदेसाई यांनी बडोद्यात राहणारी आपली गर्लफ्रेंड नंदिनी पंत यांच्याशी लग्न केले. असे म्हणतात दिलीप सरदेसाई हे नंदिनी पंत यांना दररोज एक पत्र लिहीत असत. त्या एक प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ होत्या. नंदिनी पुढे सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षाही झाल्या. नंदिनी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की त्यांना एकमेकांना सुमारे १०० पत्रं लिहीली.दिलीप सरदेसाई यांचे चिरंजीव राजदीप सरदेसाई हे देशातील नामवंत पत्रकार आहेत.
दिलीप सरदेसाई यांची पत्नी नंदिनी सरदेसाई या सेंट सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबईत समाजशास्त्र विभागाच्या मुख्य होत्या. दिलीप सरदेसाई यांच्या स्मरणार्थ दरवर्षी दिलीप सरदेसाई मेमोरियल लेक्चर मुंबईत आयोजित केलं जातं. दिलीप यांच्या पत्नी आणि समाजशास्त्रज्ञ नंदिनी आणि मुलगा ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्यातर्फे या व्याख्यानाचं आयोजन केलं जातं. दिलीप सरदेसाई यांचे २ जुलै २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले. बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत.
शांता शेळके यांची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देत असत. ‘नवयुग’मध्ये त्या काम असताना मा.अत्रे एकदा त्यांना म्हणाले होते, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्र्रचुर भाषाशैली बदलली. मा.शांता शेळकेंनी साधेपणा आयुष्यभर जपला. निसर्गाविषयी मात्र त्यांना विलक्षण ओढ होती. निसर्गाच्या सांनिध्यात त्या तहानभूक विसरून तासन्तास बसत. निसर्ग हाच त्यांचा खरा सखा सोबती होता. निसर्गाच्या अनेक छटा त्यांनी त्यांच्या अनेक गीतांतून व्यक्त केल्यात. धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे.
जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ’पाण्यावरच्या पाकळ्या’ नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात. जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी "किलबिल किलबिल पक्षी बोलती", "विहीणबाई विहीणबाई" अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या मा.शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलानाच्या त्या अध्यक्षा होत्या. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात. गीतांचे लावण्या, कोळीगीते असे विविध प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले.
शांता शेळके यांचे ६ जून २००२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
शांता शेळके यांची काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=cjmmEnmf5IQ
चुकवू नये अशा शांता शेळके यांच्या वरील नक्षत्रांचे देणे हा कार्यक्रमाची लिंक
https://www.youtube.com/watch?v=Uu2aB9LY-AE&list=PLqhKd63J-s6FKAZgFh9i9EdWtfdRgmH0n
https://www.youtube.com/watch?v=nPvJrSERxXA
https://www.youtube.com/watch?v=MYdiWHCAvUQ
https://www.youtube.com/watch?v=g7MDSoFFJxQ
https://www.youtube.com/watch?v=2xA9mMiEO6g
https://www.youtube.com/watch?v=QJCggfj3gRs
https://www.youtube.com/watch?v=XSUlZIQxPWI
https://www.youtube.com/watch?v=ORaa2x980fY
https://www.youtube.com/watch?v=6CF8BWBj5WI
https://www.youtube.com/watch?v=5paqPYi6sM4
https://www.youtube.com/watch?v=iSGWoHWcZmw
चांगल्या कामासाठी “नाही” हा शब्द न वापरणाऱ्या ह्या व्यक्तीचा हात बिनशर्त सदैव मदतीसाठी तयार असतो …..हो अगदी बरोबर ओळखलं…”डॉ. प्रकाश बाबा आमटे” या भाऊंच्या जीवनावर आधारित चित्रपटामध्ये आपले नाना पाटेकर ज्यांना “येम्पलवार” म्हणून बोलावतो ना … तीच ही व्यक्ती.‘मनोहर नारायण येम्पलवार’ ……
आज ६ नोव्हेंबर.. आज प्राध्यापक भालचंद्र वामन केळकर ऊर्फ मा.भालबा केळकर यांची पुण्यतिथी
भालबा केळकर यांचा जन्म २३ सप्टेंबर १९२० रोजी झाला.
हे मराठी लेखक, नाट्यअभिनेते व रसायनशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांनी प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन ही नाट्यसंस्था स्थापली. ते पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात रसायनशास्त्राचे अध्यापन केले. भालबा केळकरांनी बालनाट्येआणि नभोनाट्ये लिहिली. त्यांच्या बालनाट्यांमध्ये शास्त्रीय विषय रंजकतेने मांडलेले असत. १९६१ साली प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन (पीडीए) संस्थेने रंगमंचावर आणलेल्या "प्रेमा तुझा रंग कसा'"’ या नाटकाचे दिग्दर्शन भालबा केळकरांनी केले होते. त्यातील ""प्रोफेसर बल्लाळ" हे पात्रही त्यांनी रंगवले होते. पीडीएच्या "वेड्याचे घर उन्हात", "तू वेडा कुंभार" या नाटकांचे दिग्दर्शनही त्यांनीच केले. मात्र नाट्यनिर्मितीच्या प्रक्रियेदरम्यान भालबा केळकरांसारख्या मंडळींना महत्त्वाची वाटत असलेली उत्स्फूर्तता आणि श्रीराम लागूंसारख्या मंडळींना आवश्यक वाटणारी शिस्त यांवरून पुढील काळात पीडीएत मतभेद वाढत गेले. मा.भालबा केळकर यांचे ६ नोव्हेंबर १९८७ निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
नातवंडांच्या कविता हा सामाजिक जाणीव असलेला कार्यक्रम (वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसाठी कवितावाचन) आदित्य दवणे यांच्या संकल्पनेतून सुरू झाला असून मुंबई, पुणे, गोवा येथे या कार्यक्रमांचे प्रयोग सादर झाले आहेत.
आरोग्यविषयक विपुल व वैविध्यपुर्ण लेखन करून अनेक कौटुंबिक जोडप्यांच्या जीवनांमध्ये लक्षवेधी सुधारणा करणार्या निवडक काही तरूण पत्रकारांमध्ये अभिजीत मुळ्ये यांचे नाव घेता येईल. पत्रकारितेच्या आपल्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी विवीध पदांवर व विभीन्न जबाबदार्यांवर आवडीने काम केले, असले तरी आरोग्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेभोवती फिरणार्या घटकांवर माहितीपर लेखन करणे हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा प्रांत आहे. लहान असताना प्रत्येक गोष्टींवर चौफेर विचार करणार्या अभिजीत यांनी आपल्यातल्या जिज्ञासु पत्रकाराला अवांतर वाचनाद्वारे व सुक्ष्म निरीक्षण शक्तीद्वारे आकार दिलेला होता.
अहिल्याताई व रांगणेकर नोव्हेंबर १९६२ ते २९ एप्रिल १९६६ पर्यंत ‘भारत संरक्षण कायद्या’खाली अटकेत होते. या काळात कैदी स्त्रियांचे प्रश्न सोडविण्यासाठी अहिल्याताईंनी २१ दिवसांचा उपवास करून त्यांना सवलती मिळवून दिला. एकदा अमेरिकन वकिलातीसमोर निदर्शने करत असता तिथली पाटी त्यांच्या डोळ्यांना लागली. या घटनेमुळे त्यांचे डोळे कायमचे अधू झाले. तशाही स्थितीत पुढे सुमारे २०-२५ वर्षे त्या कुणाचीही सोबत अथवा हातात काठी न घेता मुंबईत फिरत असत. यानंतर अहिल्याताई व मृणाल गोरे या जोडगोळीने महागाई प्रतिकारसमितीची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. महिलांच्या कर्तबगारीचा एक नवा इतिहास घडवला.
९३९ साली हंस पिक्चर्सचा ‘देवता’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात बाबूराव पेंढारकरांनी प्रथमच नायकाची भूमिका केली आणि आपल्या समर्थ अभिनयाच्या बळावर ‘सुखाचा शोध’, ‘देवता’, ‘पैसा बोलतो आहे’, ‘पहिला पाळणा’ अशा अनेक चित्रपटांत नायकाची व्यक्तिरेखा साकारली. वाढत्या वयाला लक्षात घेत त्यांनी चरित्र भूमिकाही प्रभावीपणे अभिनित केल्या.
Copyright © 2025 | Marathisrushti