(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • प्रसिध्द बासरीवादक प्रा. सचिन जगताप

    कोल्हापूरातील प्रसिध्द बासरीवादक व ‘जीवनगाणे’ वाद्यवृंदाचे निर्माते प्रा.सचिन जगताप हे भारतातील पहिले कलाकार आहेत की ज्यांनी बासरी वादनामध्ये गांधर्व महाविद्यालयाची “संगीत अलंकार” ही पदवी थेट प्रवेश घेऊन संपूर्ण भारतात पहिला क्रमांक मिळण्याचा बहुमान त्यांना मिळाला. याचबरोबर शिवाजी विद्यापिठामध्ये हार्मोनियममध्ये एम.ए. संगीतमध्ये ते शिवाजी विद्यापिठात पहिले आले आहेत.

      April 19, 2022


  • उदय गंगाधर सप्रे

    उदय गंगाधर सप्रे हे व्यवसायाने तांत्रिक बाजूंवर काम करणारे अभियांत्रिक असले तरी आयुष्यभर विवीध कलांमध्ये बेधुंदपणे रमणारा, व हौशीपणाने प्रत्येक कलेमधील सुप्त सौंदर्याचा रसास्वाद घेणारा प्रतिभावंत कलाकार त्यांचा नेहमीच कानोसा घेत आलाय. बी. ई. केमिकल, व डीप्लोमा इन इंटेरिअर डिझाईन अँड डेकोरेशन ह्या पदव्या संपादन करणार्‍या सप्रे यांना लहानपणापासूनच विविध कलाकौशल्यांमध्ये झळकायची, व त्यांना पुर्णपणे आत्मसात करण्याची खुमखुमी होती. चित्रकला व उत्तम रंगसंगतींची जाण तसेच कुठलीही गोष्ट सुबक, रेखीव व उठावदार होण्यासाठी काय करावे लागते, याचे अचुक, उपजत ज्ञान त्यांच्यात मुबलक असल्यामुळे इंटेरिअर डिझाईनिंग व डेकोरेशन या वेगळ्या वाटेकडे वळण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला व तो यशस्वीही करून दाखविला.

      August 29, 2011


  • मराठी रंगभूमीवरील जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते प्रभाकर पणशीकर

    लहानपणापासूनच प्रभाकर पणशीकर यांचा ओढा नाट्यक्षेत्राकडे होता. त्यांचा जन्म १४ मार्च १९३१ रोजी मुंबईतल्या गिरगांव येथील फणसवाडीत झाला.शाळेत असताना विविध व प्रसिद्ध नाटक कंपन्यांची नाटके त्यांनी पाहिली. इककेच नाही तर ती नाटके गिरगावातील गणेशोत्सवात सादर केली. त्यामुळे तरूणपणीच त्यांना घरापासून परागंदा व्हावे लागले. .पणशीकरांनी आपले पदवी पर्यंतचे शिक्षण कला शाखेतुन मुंबईतल्या विल्सन महाविद्यालयातून पूर्ण केले.

    १३ मार्च १९५५ ह्या दिवशी “राणीचा बाग” नाटकाद्वारे मा.प्रभाकर पणशीकरांनी मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. नाट्य वर्तुळात मा.प्रभाकर पणशीकरांना “पंत” या नावाने ओळखले जात असत; वयाच्या पंचविशीत त्यांनी लेखक-दिग्दर्शक मो.ग.रांगणेकरांच्या “नाट्यनिकेतन” या संस्थेत प्रवेश केला आणि “कुलवधू”,“भूमिकन्या सीता”,“वहिनी”,“खडाष्टक” अशा नाटकांमधून कामे करण्यास सुरुवात केली.

    पुढे मो.ग.रांगणेकरांशी काहीकारणास्तव मतभेद झाल्यामुळे “नाट्यनिकेतन” मधून प्रभाकर पणशीकर बाहेर पडले आणि “अत्रे थिएटर्स” मधून “तो मी नव्हेच”या नाटकाचे प्रयोग सादर करू लागले. या नाटकात तो मी नव्हेच, असं म्हणत लखोबा लोखंडेने काही वर्षांपूर्वी बऱ्याच जणांना गंडा घातला होता. त्यातील विविध व्यक्तिरेखा साकारत मा.प्रभाकर पणशीकर यांनी जवळपास साऱ्यांनाच चकित केलं होतं. आपले स्नेही मोहन वाघ आणि वासुदेव कोल्हटकर ह्यांच्या मदतीने मा.प्रभाकर पणशीकरांनी १९६३ साली “नाट्यसंपदा” या संस्थेची स्थापना केली. विद्याधर गोखले लिखीत “अमृत झाले जहराचे” आणि वसंत कानेटकर ह्यांचे “मोहिनी” ही दोन नाटके “नाट्यसंपदे”ने रंगमंचावर आणली. पण दुर्दैवाने ही नाटके फार काळ चालली नाहीत. मात्र त्यानंतरच्या “मला काही सांगायचंय” आणि “इथे ओशाळला मृत्यू” ह्या नाटकांच्या निर्मितीने “नाट्यसंपदे”ला व्यावसायिक यश आणि अमाप ख्याती मिळाली. “इथे ओशाळला मृत्यू’मधील औरंगजेब साकारताना ते नमाज पढायला शिकले. या नाटकात औरंगजेबाच्या व्यक्तिरेखेला मिळालेली दाद ही पणशीकरांच्या अभिनयकौशल्याला होती. “अश्रूंची झाली फुले’ नाटकामध्ये पणशीकर यांनी साकारलेले प्रा. विद्यानंद आणि आधी डॉ. काशिनाथ घाणेकर व नंतरच्या टप्प्यात रमेश भाटकर यांनी साकारलेला “लाल्या’ ही अभिनयाची जुगलबंदी रसिकांना अनुभवता आली. या नाटकाच्या गुजराती भाषेतील प्रयोगातदेखील त्यांनी भूमिका साकारताना जणू आपण जन्माने गुजराती आहोत असेच सिद्ध केले. नाट्यसंपदेच्या “कट्यार काळजात घुसली” संगीत नाटकाने तर इतिहास घडवला; तर १९७० मध्ये “तो मी नव्हेच” चे हक्क “नाट्यसंपदे”ने विकत घेऊन पुढे ह्या नाटकाचे मा. पणशीकरांनी दोन हजार पेक्षाही अधिक प्रयोग केले. पंतांनी आणखीन ज्या नाटकांमध्ये अभिनय केला ती नाटकं म्हणजे “अश्रुंची झाली फुले”,“थँक यु मि. ग्लाड”,“जेव्हा गवताला भाले फुटतात”,“भटाला दिली ओसरी”; तर “संगीत मदनाची मंजिरी”,“संगीत सुवर्णतुला”,“अंधार माझा सोबती”,“किमयागार”,“पुत्रकामेष्टी” या सारख्या गद्य व संगीत नाटकांची निर्मिती केली. याशिवाय पणशीकरांनी मराठीसोबतच गुजराती व कन्नड भाषेतही आपल्या अभिनयाची प्रतिभा दाखवुन दिली.नाटकांसोबतच ४ मराठी चित्रपट, ४ मराठी मालिका यांसोबतच एक इंग्रजी मालिका आणि आकाशवाणीसाठी असंख्य नाट्यवाचने केली. पणशीकरांनी नाट्य तसंच चित्रपट क्षेत्राला दिलेल्या योगदानासाठी त्यांना अनेक पुरस्कारांने सन्मानित कराण्यात अले होते. यामध्ये महत्त्वपूर्ण पुरस्कार म्हणजे “महाराष्ट्रभूषण पुरस्कार”,“विष्णुदास भावे सुवर्ण पदक”,“राजेश्री शाहू सुवर्ण पदक”,“नाट्यगौरव सुवर्ण पुरस्कार”,“संगीत नाटक अकादमी पुरस्कार”,“नटसम्राट बालगंधर्व स्मृति पुरस्कार”,“नटश्रेष्ठ केशवराव दाते पुरस्कार”,“डॉ.काशिनाथ घाणेकर स्मृति पुरस्कार”,“नटवर्य दत्ताराम पुरस्कार”,“आचार्य अत्रे पुरस्कार”,“कलाश्री पुरस्कार”,“उत्तुंग पुरस्कार”,“महाराष्ट्र गौरव पुरस्कार”,“जागतिक मराठी परिषद पुरस्कार”,“मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति पुरस्कार”,“नटसम्राट नानासाहेब फाटक स्मृति पुरस्कार”,“सह्याद्री वाहिनीचा नवरत्न पुरस्कार”,व “महाराष्ट्र शासनाचा पहिला जीवन गौरव पुरस्कार”असे पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. महाराष्ट्र शासनाच्या जीवन गौरव पुरस्काराचे ‘प्रभाकर पणशीकर पुरस्कार’ असे नामांतर करण्यात आले. मा. प्रभाकर पणशीकर यांचे १३ जानेवारी २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    प्रभाकर पणशीकर यांची नाटके
    मोहिनी, मदनाची मंजिरी, अमृत झाले जहराचे, सुवर्णतुला, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू. कट्यार काळजात घुसली, इथे ओशाळला मृत्यू, मला काही सांगायचंय, वीज म्हणाली धरतीला, संत तुकाराम, तो मी नव्हेच, विकत घेतला न्याय, महारामी पद्मिनी, लागी करेजवा कटार (हिंदी), होनाजी बाळा, बेईमान, प्रश्नक नाजूक आहे, तो राजहंस एक, त्या कातरवेळी, तीन लाखांची गोष्ट, थॅंक यू मि. ग्लाड, तुझी वाट वेगळी, राजसन्यास, भटाला दिली ओसरी, पुत्रकामेष्टी, मी मालक या देहाचा, निष्पाप, अवनु नानल्ला (कानडी-तो मी नव्हेच), जिथे गवतास भाले फुटतात, किमयागार, घर अण्णा देशपांडेंचं.

      March 14, 2017


  • व्ही. शांताराम (शांताराम वणकुद्रे)

    व्ही. शांताराम हे नांव उच्चारताच डोळ्यासमोर येतो तो चित्रपटाचा पडदा आणि त्यावर व्ही. शांताराम या नांवाखाली गाजलेले एक एक चित्रपट. व्ही. शांताराम यांचे पूर्ण नांव शांताराम वणकुद्रे. वयाच्या १९ व्या वर्षीच ते महाराष्ट्र फिल्म कंपनीत दाखल झाले.

      January 22, 2010


  • व्यंगचित्रकार, चित्रपट समिक्षक श्रीकांत ठाकरे

    श्रीकांत ठाकरे, एक असं नाव ज्यामुळे मराठी संगीत सृष्टीला नव्या ढंगाची ताज्या दमाची आणि उ़डत्या चालीचा आविष्कार प्राप्त झाला; मा.श्रीकांत ठाकरे यांची ओळख महाराष्ट्राला संगीतकार म्हणून तर होतेच; पण ते स्वत: उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, समीक्षक, पत्रकार आणि आयुर्वेदाचे अभ्यासक देखील होते,ठाकरे कुटुंबीय म्हणजे कलेच्या प्रांगणात रममाण असणारे, सामाजिक बांधिलकीचा ध्यास घेतलेले आणि सृजनशील; अर्थात हे संस्कार प्रबोधनकार मा.ठाकरे यांनी आपल्या प्रत्येक आपत्यांवर केले.

    संगीतकार म्हणून श्रीकांत ठाकरे व्हॉयोलीन वादनात निपुण होते, सतत वेगवेगळ्या संगीताच्या चाली त्यांच्या मनात रुंजी घालत आणि यामुळे सुरेल गाण्यांची निर्मिती त्यांच्या हातून झाली.

    ज्येष्ठ गायक मोहम्मद रफी यांना मराठी गाण्यांची संधी श्रीकांत ठाकरे यांच्यामुळेच मिळाली. मा.श्रीकांत ठाकरे संगीतबद्ध केलेली अनेक गाणी लोकप्रिय आहेत यामध्ये “अगं पोरी सवाल दर्याला तुफान”, “नको आरती की नको पुष्पमाला”, “तुझे रुप सखे गुलजार”, “प्रभू तू दयाळू”, “शोधीसी मानवा राऊळी मंदिरी” सारखी अवीट भक्ती, भाव आणि कोळी गीतांचा समावेश, मराठी संगीत विश्वात मा.श्रीकांत ठाकरे आणि मा.मोहम्मद रफी ही संगीत-गायक जोडगोळी म्हणजे “कानसेनांसाठी” पर्वणीच आहेत; तसंच “गझल” हा गाण्यांचा प्रकार मा.श्रीकांत ठाकरे यांच्या मुळे मराठीत रुजला. उत्तरा केळकर, सुरेश वाडकर, शोभा गुर्टू, पुष्पा पागधरे सारख्या गायकांनी मा.श्रीकांत ठाकरे यांच्या संगीताची सुरेलता वाढवली; “शूरा मी वंदिले”, “सवाई हवालदार”, “महानदीच्या तीरावर” सारख्या चित्रपटांची निर्मिती देखील श्रीकांत ठाकरे यांनी केली.

    संगीत क्षेत्राच्या व्यतिरिक्त पत्रकारिता आणि चित्रपट संबंधी लेखन श्रीकांतजींनी केलं, यामध्ये नवीन चित्रपटांची समीक्षा असेल किंवा वैविध्यपूर्ण लेखन, त्यामध्येखास “ठाकरे टच” असायचा “परखड”, “सत्यता” आणि “वैचारिक” पैलू त्यांच्या लिखाणाच्या माध्यमातून मांडलेले दिसत;“मार्मिक” या मासिकात ६० व ७० च्या दशकात “शुद्ध निषाद” या नावाने “सिनेमाची समीक्षा” करणारे सदर लोकप्रिय ठरले.

    श्रीकांत ठाकरे यांच्या व्यक्तीत्वाचे पैलू आणि चरित्र पट “जसे घडले तसे” या आत्मचरित्राच्या माध्यमातून वाचक आणि रसिकांना वाचायला मिळाला. श्रीकांत ठाकरे यांचे १० डिसेंबर २००३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट / सागर मालाडकर

      June 27, 2017


  • मराठी भाषेतील लेखक, कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे

    ‘सराई’, ‘पाणकळा’, ‘पड रे पाण्या’, ‘सोनकी’ आदी कांदब-यांतून शेतक-यांची, आदिवासींची दु:ख ज्यांनी समाजाभिमुख आणली. स्वत:ला ज्यांनी ‘शेतकी कादंबरीकार’ मानले ते ज्येष्ठ कादंबरीकार श्री. र. वा. दिघे हे खोपोलीचे सुपुत्र. त्यांचा जन्म २४ एप्रिल १८९६ रोजी कल्याण येथे झाला. रघुनाथ वामन दिघे यांच्या पुष्कळशा कादंबऱ्या ग्रामीण पार्श्वभूमीचे चित्रण करणाऱ्या आहेत. त्यांच्या लिखाणातील नायक हा बहुधा वारकरी आणि शेतकरी असायचा. हा नायक शेतकरी वारकरी संप्रदायाची मूल्ये जपतो आणि निसर्गाच्या आपत्तीशी त्यानुसार झगडा देतो. संतांच्या शिकवणीतून हा मुकाबला तो कसा करतो, याची त्या कादंबऱ्यांमध्ये उत्तम वर्णने वाचायला मिळतात. विशेषत: त्यांच्या पाणकळा आणि पड रे पाण्या या दोन कादंबऱ्यांतून भीमा नदीच्या खोऱ्यातल्या शेतकऱ्यांचे जीवन समर्थपणे उभे केलेले दिसते. आजही खोपोलीला ‘दिघ्यांची खोपोली’म्हटलं की, अभिमानाने उर भरून येतो. खोपोलीतल्या, विहिरीकडे जाणा-या रस्त्याला र. वा. दिघे मार्ग नाव दिलं, तसेच खोपोली नगरपरिषदा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी त्यांचे स्मारक उभे केले आहे. मा.रघुनाथ वामन दिघे यांच्या साहित्यिक कारकिर्दीचे विश्लेषण व मूल्यमापन करणारा कादंबरीकार र.वा.दिघे नावाचा समीक्षाग्रंथ रवींद्र ठाकूर ह्यांनी लिहिला आहे.रघुनाथ वामन दिघे यांचे ४ जुलै १९८० रोजी निधन झाले.

    रघुनाथ वामन दिघे यांची साहित्यसंपदा
    कादंबरी : पाणकळा, वसंतराव व चाळीसचोर, निसर्गकन्या : रानजाई, गानकुब्धा मृगनयना, आई आहे शेतात, पड रे पाण्या, कार्तिकी, सोनकी, हिरवा सण
    कथासंग्रह : पूर्तता, पावसाचं पाखरू, पांडुरंग कांती , लक्ष्मीपूजन, आसरा
    नाटक : माझा सबुद (मराठी)
    द ड्रिम दॅट व्हॅनिश्ड् (इंग्रजी)

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 25, 2017


  • संस्कृतचे गाढे अभ्यासक वसंत गाडगीळ

    पंडित वसंत गाडगीळ हे संस्कृतचे गाढे अभ्यासक असून पुण्यात गेली अनेक वर्षे शारदा हे संस्कृत मासिक चालवतात.तसेच ते शारदा ज्ञानपीठमचे संस्थापक आहेत.

      September 8, 2021


  • बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते ‘आगा’

    आगा ह्यांच्या विनोदी भूमिकांची वेगळी पद्धत म्हणा स्टाईल होती ती म्हणजे ‘ लेट ऍक्शन ‘ . एखादे वाक्य कानावर पडल्यावर ते हो म्हणत आणि लगेच चेहरा धक्का बसल्यासारखा करत , किंवा धक्का बसल्याचा अभिनय करत. त्यालाच ‘ लेट ऍक्शन ‘ म्हणतात. त्याची सुरवात त्यानेच केली असे म्हटले जाते. पुढे अनेक विनोदी नटांनी ही पद्धत उचलली असेही म्हटले जाते.

      June 23, 2021


  • ज्येष्ठ दिग्दर्शक यशवंतराव भोसले उर्फ वाय.जी. भोसले

    त्यांच्या दिग्दर्शनाखाली अरुण सरनाईक, सूर्यकांत मांडरे, गणपत पाटील, राजशेखर, अभिनेत्री पद्मा चव्हाण, उमा, कामीनी भाटिया, संध्या रायकर, नीला गांधी, शांता तांबे, पद्मीनी बिडकर या कलावंतानी नाट्य कलेचे धडे घेतले होते.

      July 4, 2022


  • किरण यज्ञोपावित

    किरण यज्ञोपावित हा मराठीमधील ताज्या दमाचा दिग्दर्शक आहे., व तजेलदार चित्रपटांद्वारे रसिकांचे निखळ मनोरंजन करून काही लोकांच्या जीवनातील जळजळीत वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही त्याची शैली आज मराठी रसिकांच्या मनाला चांगलीच भिडलेली दिसते. चिंचवडमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या किरणला लहानपणापासूनच नाटक बघण्याची विलक्षण आवड होती. तरूणपणी प्रायोगिक रंगभुमीमध्ये चपखल बसणार्‍या अनेक चित्रपट, नाटके, लघुनाटके, व छोट्या मोठ्या जाग्रुतीपर स्किट्ससाठी संहितालेखनाचे काम त्याने केले होते.

      August 16, 2011