जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
उषा मंगेशकर यांचा जन्म १४ डिसेंबर १९३५ रोजी झाला.
‘छबीदार छबी मी तोऱ्यात उभी’, ‘एक लाजरा न् साजरा’, ‘काय बाई सांगू’, ‘गोड गोजिरी लाज लाजरी’, ‘खेळ कुणाला दैवाचा कळला’, ‘शालू हिरवा’, ‘मुंगळा’, ‘मै तो आरती उतारू रे’ यासारखी असंख्य गीते आपल्या मधुर आवाजाने अजरामर करणाऱ्या ज्येष्ठ गायिका मा.उषा मंगेशकर यांचा संगीत प्रवास अलौकिक असाच आहे. मराठी, हिंदीसह गुजराती व नेपाळी भाषेतही गायन केलेल्या उषाताईंनी भक्तीगीत, भावगीत, लोकसंगीतापासून ते चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व प्रकारांत आपली सुरेल मोहोर उमटवली. लतादीदी आणि आशा भोसले यांची असंख्य गाणी रसिकांच्या ओठांवर रुळली आहेत. परंतु त्यांच्या भगिनी व गायिका उषा मंगेशकर यांची मोजकीच गाणी रसिकांना माहीत आहेत.
उषाताई मंगेशकर यांना खरी प्रसिद्धी मिळाली ते जय संतोषी माँ या चित्रपटातील काही गाण्यांनंतर मे तो आरती उतारु रे या गाण्यांसाठी त्यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट स्त्री गायिका पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले. नंतर त्यांचे मुंगळा हे गाणे व पिंजरा या चित्रपटातील गाणी तर लोकांच्या मनात अजून ही घर करून आहेत.
उषाताईंना पेंटीगची सुध्दा खूप आवड आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ विकिपीडीया
सांगलीच्या वेलिंग्डन महाविद्यालयाचे गोविंद चिमाजी भाटे पहिले प्राचार्य होते.
गोविंद भाटे हे रायगड जिल्ह्यातील थोर महापुरुष होते. महात्मा फुले, आगरकर, महर्षी कर्वे या महान विभूतींच्या विचारांचे समर्थक होते. कर्मठ चालीरितींना त्याचा विरोध होता. त्यांनी एका विधवेशी विवाह केला होता.
१९४६ साली त्यांचा मृत्यू झाला.
## Govind Chimaji Bhate
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.
गेली ६० वर्षे सिनेमा, नाटक, मालिका, जाहिरातींमधून अथकपणे अभिनयाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या रेखा कामत. वय वर्षे ८० चा टप्पा गाठूनही कार्यमग्न असलेल्या रेखा कामतांसाठी अभिनय म्हणजे लाखामोलाची गोष्ट म्हणता येईल.
जयेंद्र सरस्वती हे कांचीपुरम पीठाचे ६९ वे शंकराचार्य होते. ते १९५४ मध्ये शंकराचार्य बनले होते. वेदांवर त्यांचं प्रभुत्व होतं. चंद्रशेखेरेन्द्रा सरस्वती यांनी त्यांना त्यांचा उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं होतं. २००३ मध्ये त्यांना शंकराचार्याची उपाधी घेऊन ५० वर्ष पूर्ण झाली होती.
१९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो.
एस.एच.बिहारी यांचे पूर्ण नाव शमशूल हुदा बिहारी. आपल्या या रोमँटिक गीतलेखनाने तीन दशकांहून अधिक काळ हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारे एस. एच. बिहारी यांचा जन्म बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील अरा येथे. लहानपणापासूनच त्यांना भाषेचे प्रचंड वेड. त्या वेडातून त्यांनी हिंदी, उर्दू आणि बंगाली भाषांवर प्रभुत्व मिळवले. पण भाषेइतकेच एस. एच. बिहारी यांना फुटबॉलचेही वेड होते. कोलकात्याच्या मोहन बगानकडून तरुणपणी ते फुटबॉल खेळायचे. फुटबॉल खेळत असताना पायांच्या लयबद्ध हालचालीबरोबरच बिहारी यांच्या मनात शब्दांचा मेळा भरायचा. पुढे या काव्यप्रतिभेला गीतांचा आयाम लाभला आणि एस. एच. बिहारी नामक गीतकार जन्माला आला. पोटापाण्यासाठी मुंबईला आल्यानंतर बिहारी यांनी काही काळ रबराच्या कारखान्यात असिस्टंट मॅनेजर म्हणून काम पाहिले, परंतु गीतलेखनाचे वेड काही स्वस्थ बसू देत नव्हते. त्यातच राजा मेहंदी अली खान यांच्याशी बिहारी यांची मैत्री झाली. खान साहेबांनी त्यांना निर्माते-दिग्दर्शक शशधर मुखर्जी यांच्याकडे पाठवले. मुखर्जींनी बिहारी यांच्याकडे साशंकतेने पाहिले आणि त्यांनी प्रश्न विचारला, ‘क्या बेचते हो?’ या पठ्ठ्याने तत्काळ उत्तर दिले, ‘दिल के टुकडे बेचता हूँ।’ बिहारींच्या उत्तराने मुखर्जी प्रभावित झाले. त्या वेळी मुखर्जी ‘शर्त’ चित्रपट बनवत होते. त्यांनी विनाशर्त ‘शर्त’च्या गीतलेखनाची जबाबदारी बिहारींवर टाकली. ना ये चाँद होगा, मोहब्बत में मेरी तरह, देखो वो चाँद चुपके या त्यांच्या गाण्याला हेमंतकुमार यांच्या संगीताचा साज लाभला आणि ‘शर्त’मुळे एस. एच. बिहारी हे नाव रसिकांच्या कानात रुजले. ‘शर्त’च्या आधी संगीतकार अनिल विश्वास यांनी बिहारी यांना संधी दिली होती. मात्र शर्तमधल्या मधाळ व प्रेमरसयुक्त गाण्यांनी बिहारींना नाव मिळवून दिले. त्यानंतर मात्र बिहारी यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर बिहारी यांच्या गीतांची लय आणि ओपी यांचा ठेका यांचे सूर जुळले आणि रसिकांच्या भेटीला आली रसाळ, रोमँटिक अविस्मरणीय गाणी. काश्मीर की कली, ये रात फिर ना आयेगी, सावन की घटा, मोहब्बत जिंदगी है, किस्मत, प्राण जाए पर वचन ना जाए, एक मुसाफिर एक हसीना आदी चित्रपटांतील गाणी ओपी-बिहारी कॉम्बिनेशनची काही उदाहरणे. त्या वेळी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शंकर-जयकिशन या संगीतकाराबरोबरही बिहारींचे सूर चांगले जुळले. कौन है जो सपनों मे आया, कहाँ चल दिये इधर तो आओ, उनसे मिली नजर (झुक गया आसमान) ही काही गाणी. ये चाँद सा रोशन चेहरा, जुल्फों का रंग सुनहरा, ये झील सी नीली आँखे, कोई राज है इनमें गहरा... काश्मीरच्या नैसर्गिक सौंदर्यातही उठून दिसणारी शर्मिला टागोर आणि तिच्या सौंदर्याने भारावलेला शम्मी कपूर. जोडीला ओ. पी. नय्यरचे ठेकेबाज संगीत. या गाण्याने एका पिढीला अक्षरश: वेड लावले. शर्मिला टागोरच्या त्या काळच्या सौंदर्याचे एवढे अचूक आणि लयबद्ध वर्णन करणार्यान या गाण्याचे शब्द होते गीतकार एस.एच.बिहारी यांचे. रोमान्स, इश्क, मोहब्बत या प्रेमाच्या भावनांना शब्दरूपी उपमा आणि अलंकाराने सजवून त्याचे लयबद्ध काव्य तयार करणे, ही मा.बिहारी यांची खासियत होती. इशारो इशारों मे दिल देनेवाले (काश्मीर की कली) मधून येणारा प्रेमाविष्कार ये चाँद सा रोशन चेहरा अशा स्तुतीवर येऊन बहुत शुक्रिया बडी मेहेरबानी (एक मुसाफिर एक हसीना) या वळणावर कसा स्थिरावतो, हे बिहारींच्या मधाळ शब्दांत ऐकण्याचा आनंद विरळाच. मै शायद आप के लिए अजनबी हूँ (ये रात फिर ना आयेगी)मधला अनोळखी भाव, किसी ना किसी से कभी ना कभी(काश्मीर की कली)मधला दुर्दम्य आशावाद, जरा होले होले चलो मेरे साजना (सावन की घटा)मधले आर्जव, उनसे मिली नजर के मेरे होश उड गये (झुक गया आसमान)मधली सर्वस्व हरपल्याची भावना, चाहे लाख तूफान आये (प्यार झुकता नही)मधला वज्रनिर्धार, हैरान हूँ आपकी झुल्फों को देखकर (जबाब हम देंगे)मधले कौतुक, चैन से हमको कभी आपने जीने ना दिया (प्राण जाए पर वचन ना जाए)मधला विरक्त भाव, लाखो है यहाँ दिलवाले (किस्मत)मधले नैराश्य, कजरा मोहब्बतवाला अखियों मे किसने डाला (किस्मत)मधला प्रफुल्लित भाव, यही वो जगह है (ये रात फिर ना आयेगी)मधला आठवणींचा धांडोळा, कौन है जो सपनों मे आया (झुक गया आसमान)मधला स्वप्नवाद, तुमसे मिलकर ना जाने क्यो (प्यार झुकता नही)मधला स्मृतिगंध आणि प्यार हमारा अमर रहेगा (मुद्दत)मधला आशावाद, असा विविध नवरसांनी युक्त शब्दांचा मळा एस. एच. बिहारी यांनी फुलवला होता. एस.एच.बिहारी यांचे निधन २५ फेब्रुवारी १९८७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / http://www.shbihari.com
मा.एस.एच.बिहारी यांची वेब साईट. http://www.shbihari.com
कवी ग्रेस हे मराठी कवितेच्या प्रांतावर मौलिक ठसा उमटवून गेलेले कवी…’ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ या काव्याने घरोघरी पोहचलेले माणिक गोडघाटे ऊर्फ कवी ग्रेस. त्यांचा जन्म १० मे १९३७ रोजी झाला.
इंग्रजी चौथीचा वर्ग. जाणिवेचे आकलन नुकतेच व्हायला लागले होते. आयुष्यातील आकांक्षा, महत्त्वाकांक्षेचे धुमारे फुटू लागले होते. एक दिवस वर्गात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, ‘‘तू कोण होणार रे ?’’ प्रत्येक विद्यार्थी उठून उत्तर देत होता. कोणी सांगितलं, ‘‘टिळक’’ कोणी ‘‘डॉक्टर’’ तर कोणी ‘‘कवी’’ पण त्यात एक मुलगा म्हणाला, ‘‘मी यशवंतराव होणार !’’आत्मविश्वासाची, आत्मप्रत्ययाची जाणीव इतक्या लहान वयात ज्यांना झाली होती ते यशवंतराव चव्हाण !
पुणे येथील सामाजिक कार्यकर्ते आणि आपलं घर या संस्थेचे संचालक श्री विजय गजानन फळणीकर…
Copyright © 2025 | Marathisrushti