जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
फार्स किंवा प्रहसन या प्रकाराला मराठी रंगभूमीवर रुजवलं आणि गाजवलं नाहीतर प्रतिष्ठा मिळवून दिली ती अभिनेता-नाटककार बबन प्रभू यांनी. त्यांनी ‘झोपी गेलेला जागा झाला’, ‘दिनूच्या सासूबाई राधाबाई’, घोळात घोळ’ यासारखे अनेक फार्स लिहिले. ‘झोपी गेलेला जागा झाला’ हे त्यांनी लिहिलेले नाटक खूप लोकप्रिय झाले होते.
अल्पायुषी ठरलेला हा मधुरकंठी गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला.
‘संगीत सुवर्णतुला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’, ‘जावयाचे बंड’, ‘चमकला ध्रुवाचा तारा’, ‘जयजय गौरीशंकर’ ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले जहराचे’, ‘मदनाची मंजिरी’, ‘स्वरसम्राज्ञी’ ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं.
पूर्वी एक जिंगल तयार व्हायला चार ते पाच तास लागत. माझ्या बाबतीत सांगायचं तर दोन तासांत दोन जिंगल्स तयार करून मी पुन्हा तिसऱ्या कामासाठी दुसऱ्या स्टुडिओत जायचो. एक काळ असा होता की, सकाळी रेडिओवाणीला (वरळी) ८ ते १० मध्ये दोन जिंगल्स, मग १० ते ६ वेस्टर्न आऊटडोअर (फाऊंटन), पुन्हा संध्याकाळी ६ ते १० दोन जिंगल्स (रेडिओवाणी किंवा रेडिओ जेम्स- वरळी) आणि रात्री १० ते २ बॉम्बे लॅब किंवा फिल्म सेंटरला फिल्मची जिंगल्स मी करत असे आणि पहाटे तीन वाजता घरी जात असे. आणि पुन्हा सकाळी साडेसहाला उठून आठ वाजता रेडिओवाणीला हजर!
अशोक पत्की यांच्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
http://www.marathisrushti.com/articles/ashok-patki-jingles-king/
# Patki, Ashok
“विज्ञानप्रणीत समाजरचना”, “भारतीय लोकसत्ता”, “लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान”, “राष्ट्रधर्म”, “हिंदू समाज”, “महाराष्ट्र संस्कृती”, “इहवादी शासन”, “केसरची त्रिमूर्ती” आदी वैचारिक पुस्तके लोकहितवादींच्या शतपत्रांचे संपादन, तसेच “साहित्यातील जीवनभाष्य” ही समीक्षा, दोन नाटके आणि “लपलेले खडक” हा लघुकथासंग्रह त्यांनी लिहीला.
“आहुती’, “गुन्हेगारी आणि शासन’, “गुन्हेगारांचे जग’, “पुरुषप्रधान संस्कृती’, “दुर्दैवाशी दोन हात’ अशा अनेक पुस्तकांची लेखिका सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी.
त्यांची मोठी बहीण सावनी शेंडे ह्या त्यांच्या आजी म्हणजेच किराणा घराण्याच्या प्रसिद्ध गायिका 'कुसुम शेंडे' यांच्याकडे रीतसर शिक्षण घेऊ लागल्या होत्या. त्यावेळेस शेजारी बसून बेला शेंडे बहिणीचे गाणे ऐकत असत; आई वडिलांबरोबर अनेक कार्यक्रमांना जात असत. त्यांच्या आवाजाची पट्टी वरची आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी पुरुष गायकाकडे शिकावे असे सुचवले गेले. ह्यानंतर बेला शेंडे यांनी आपल्या वडिलांकडे गायनाचे धडे घ्यायला सुरुवात केली. त्यांच्या आजीमुळे त्यांच्या घरी माणिक वर्मा, डॉ. प्रभा अत्रे, शोभा गुर्टू अश्या गायिकांचे येणे-जाणे होते, त्यामुळे बेला शेंडे यांचे गाणे समृद्ध व्हायला खूप मदत झाली. बेला शेंडे यांनी वयाच्या ११-१२ व्या वर्षी स्टेजवर गाणे म्हणायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी झी 'सा रे ग म' ची लहान मुलांची स्पर्धा जिंकली. तेव्हा त्या १४-१५ वर्षाच्या होत्या. दहावीत असतांना ही 'सा रे ग म'ची ही स्पर्धा होती. त्या स्पर्धेत भाग घेण्याबद्दल त्या जरा साशंक होत्या, पण घरच्या आणि शाळेतल्या सार्यांचा पाठिंबा होता. अभ्यास आणि गाणे हे दोन्ही सांभाळायचे होते, आणि हे त्यांनी सांभाळले आणि त्या ती स्पर्धा जिंकल्या. मोठ्यांच्या झी 'सा रे ग म' मेगा फायनलमध्ये भाग घेण्याची संधी त्यांना लवकरच मिळाली. ही स्पर्धादेखील त्या जिंकल्या. त्या वेळेस पंडित जसराज,अनिल बिस्वास, हरिप्रसाद चौरसिया अशा अनेक महान मंडळींकडून त्यांना मार्गदर्शन आणि प्रशंसा मिळाली. तेव्हापासून बेला शेंडे यांच्या गाण्याच्या प्रवासाला खर्या अर्थाने सुरुवात झाली. त्या ह्या स्पर्धेनंतर त्यांना अनेक अल्बममध्ये, हिंदी- मराठी चित्रपट, शीर्षक गीते गायला मिळाली. पार्श्वगायनाची पहिली संधी त्यांना महेश मांजरेकर यांनी दिली.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.विकीपिडीया.
यशवंत जोशी हे भारतीय अभिजात संगीताच्या दुनियेत आद्य घराणे म्हणून ओळखल्या जाणार्या ग्वाल्हेर गायकीतील एक नामवंत कलावंत आहेत. ग्वाल्हेरबरोबरच आग्रा या घराण्याचीही त्यांना तालिम मिळालेली असल्यामुळे त्यांच्या भात्यात या दोन्ही घराण्यांच्या सांगितीक चीजांचा भरणा आहे. आग्रा घराण्याची तालीम त्यांनी जगन्नथबुवा पुरोहित यांच्याकडून घेतली.
यशवंत जोशी यांचा जन्म १९२७ साली झाला. त्यांचे बालपण पुण्यात गेले. लहानपणापासून संगीत व गायनाची प्रचंड आवड असल्याने संगीतविषयाशी निगडीत गोष्टींकडे त्यांचे मन सहज वेधले जात. त्याकाळी अनेक दिग्गज गायकांच्या कर्यक्रमांना हजेरी लावल्याने गायक बनण्याच्या त्यांच्या स्वप्नाला नियमीत सराव व आपल्या सुरांना वळण लावण्याची जोड मिळाली. अशा तर्हेने त्यांच्यामधील गायक घडत गेला. त्या काळी केवळ गायक होण्याला, आजच्यासारखी सामाजिक प्रतिष्ठा वगैरे अजिबात नव्हती, तर गायक अधिक नट असणार्या कलाकारांनाच प्रसिध्दीचे वलय चाखण्याची संधी मिळत असे. पण यशवंतबुवांची साधना व गायननिष्ठा या सर्व भौतिक सुखांच्या पलीकडची असल्याने, त्यांनी आपल्या शास्त्रीय गायनाने व सुरांवरील हुकुमतीने श्रोत्यांना तृप्त करण्याचा निर्णय घेतला, व त्यांच्या गायनप्रवासाची झोकात सुरूवात झाली. यशवंतबुवा मिराशी हे त्यांचे पहिले गुरू होते.
आयुष्यभर विद्यादानात रमलेल्या यशवंतबुवांना लौकिक अर्थाने प्रसिध्दीचे वलय फार उशीराने प्राप्त झाले. यशवंतबुवांची गायनशैली हीदेखील त्यांच्या व्यक्तित्वाप्रमाणेच वेगळी, उठावदार, व बहारदार आहे. इतर नवोदित गायक ज्याप्रमाणे आपल्या गायनशैलीत इतर घराण्यांच्या शैलींचा प्रभाव मिसळून नेहमी एका नव्या व तजेलदार गायनशैलीचा वेध घेण्यास उत्सुक असतात, त्याप्रमाणे यशवंतबुवा हे प्रत्येक शैलीचे वेगळेपण व स्वतंत्र असं अस्तित्व अबाधित ठेवणाचा सचोटीने प्रयत्न करतात. गायला सुरूवात करताच स्वरांवर घट्ट पकड बसविण्याची त्यांची क्षमता असो, किंवा बंदिशीतल्या सौंदर्यपूर्ण जागांना त्यांच्या खास शैलीत सादर करण्याचे त्यांचे कसब असो, या सर्व गोष्टी त्यांच्या सर्जनशील गायकीचा प्रत्यय देत असतात.
आपले गाणे सतत ताजेतवाने ठेवणार्या या हाडाच्या कलावंताला हृदयेश आर्ट्स या संस्थेकडून देण्यात येणारा पहिला “हृदयेश संगीत सेवा पुरस्कार” प्राप्त झाला आहे.
वसंत वैद्य प्रकाशझोतात आले ते त्यांच्या खुमासदार लेखनशैलीमुळे. प्रयोगशील लेखकाप्रमाणे एक अत्यंत हळव्या मनाचे व सृजनशील कवी म्हणूनही ते रसिकांच्या आठवणींमध्ये मिसळून गेले.
सत्यदेव दुबे यांना क्रिकेटपटू व्हायचे होते. परंतु, नाटकाकडे आकृष्ट झाले. त्यांचा जन्म १९ मार्च १९३६ रोजी मध्य प्रदेशातील बिलासपूर येथे झाला. मराठी भाषिक नसूनही त्यांनी मराठी रंगभूमीवरही आपले नाव गाजविले. भारतीय रंगभूमीवर पन्नास वर्षे वावरलेल्या दुबेंनी भारतीय रंगभूमीला अनेक वैशिष्टय़पूर्ण नाटके दिली, नाटककार दिले. नवे नाटककार घडवले. पूर्णपणे ‘नाटकमय’ होऊन दुबेंनी नाटक हाच आपला श्वास मानला. लहानपणी त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. ते उत्तर आयुष्यातही स्वत:ला संघाचे खंदे समर्थक होते. केवळ रंगभूमीचा ध्यास घेतलेले सत्यदेव दुबे हे कडवा हिंदुत्ववादी होते. ते १९५२ साली मुंबईला आले. तेव्हापासून ते या ना त्या प्रकारे मुंबईतील आणि भारतीय रंगभूमीशी निगडीत होते. दुबे यांनी रंगभूमीवरील फार मोठा काळ बघितला. त्यांनी सुरुवातीची वर्षे अल्काझी यांच्या थिएटर युनिटमध्ये काढली. त्यांना या संस्थेत विजय आनंद घेऊन गेला होता.
दुबेंना रंगभूमीवरील जादू आवडली आणि बघता बघता ते नाटय़कर्मी झाले. त्यांनी काही काळ लिंटास या तेव्हाच्या प्रख्यात जाहिरात संस्थेत नोकरी केली होती. हा छोटासा काळ सोडला तर ते नेहमी रंगभूमीशी संबंधित राहिले. धर्मवीर भारती यांचे ‘अंधायुग’ हे नभोनाटय़ दुबे यांनी १९६२ साली रंगभूमीवर आणले. या नाटकाने त्यांना भरपूर नाव मिळवून दिले. दुसरे प्रकरण सुरू होते ते दुबे यांनी या नाटकाबद्दल लिहिलेल्या लेखाने. दुबे यांनी एके ठिकाणी नमूद केले आहे की हे नाटक १९६२ साली रंगभूमीवर येणे याला महत्त्व होते. देशावर चीनचे आक्रमण झालेले होते. दुबेंच्या प्रयत्नांमुळे हे नाटक जगभर गेले. विनोद दोशी या उद्योगपतींनी दुबेंना ताडदेव येथील वालचंद टेरेस या इमारतीचा तळमजला नाटके करण्यासाठी दिला. यामुळे दुबेंच्या आयुष्याची दिशा पक्की झाली. येथे दुबेंनी सुमारे चार वर्षे नाटके केली. १९८० च्या दशकात छबिलदास चळवळ जोरात होती. त्यात दुबेंचा सिंहाचा वाटा होता.
या काळातील दुबेंचे महत्त्वाचे नाटक म्हणजे ‘हयवदन’. पौल यांना दिलेल्या मुलाखतीत दुबे नमूद करतात की, त्या काळी स्त्रीच्या भावविश्वाबद्दल लिहिण्याची एक लाट आली होती. ‘हयवदन’च्या आगेमागे ‘आधेअधुरे’ आले, त्याचप्रमाणे सुरेंद्र वर्माचे ‘द्रौपदी’ आले. दुबेंच्या मते ‘हयवदन’मध्ये स्त्रीच्या वासनेबद्दल जी भूमिका घेतली, ती खूप वेगळी होती. दुबेंचे १९९० च्या दशकातील बरेचसे काम पृथ्वी थिएटरमध्ये झाले. सुमारे पन्नास वर्षे दुबे भारतीय रंगभूमीशी निगडीत होते. या दरम्यान त्यांनी सुमारे पन्नास नाटके सादर केली. या दरम्यान ते पूर्ण वेळ रंगभूमीशी निगडीत होते. त्यांनी नाटकांचे दिग्दर्शन केले, नाटकांची भाषांतरे केली, प्रसंगी नाटकात भूमिका केल्या. मुख्य म्हणजे तरुण रंगकर्मीसाठी वेळोवेळी कार्यशाळा घेतल्या. आज भारतीय रंगभूमीवर कदाचित असा एकही महत्त्वाचा नट नसेल, जो कधी ना कधी दुबेंजींच्या सहवासात आला नसेल. ते अविवाहित होते. त्यांचे असंख्य शिष्यगण हेच त्यांचे गणगोत होते. अमोल पालेकर, नसिरुद्दीन शाह, अमरीश पुरी, यांच्यासारखे प्रतिभावान कलावंत त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले. मराठीत अमरिश भंडारी, मोहन भंडारी, चेतन दातार, किशोर कदम, सचित पाटील, ऋषिकेश जोशी या अभिनेत्यांबरोबरच महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे, राजीव नाईक, शफाअत खान, चेतन दातार, संदेश कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी आदी नाटककारांना त्यांनी घडविले.
त्यांनी मराठी-हिंदी-गुजराती रंगभूमीबरोबरच बंगाली रंगभूमीसाठीही काम केले. श्याम बेनेगल यांच्या 'भूमिका','निशांत', 'अंकुर', 'कलयुग' चित्रपटाचे पटकथा व संवादलेखनही त्यांनी केले होते. १९७८ साली सत्यदेव दुबे यांना भूमिका चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, व १९८० साली जुनून चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ‘अंधा युग’, ‘आधे अधुरे’, ‘ययाती’, ‘संभोग से सन्यास तक’, ‘एवम् इंद्रजित’, ‘अंधारयात्रा’, ‘हयवदन’, ‘पगला घोडा’, ‘रस्ते’, ‘गिधाडे’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘तुघलक’, ‘नाणेफेक’ यासारख्या गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शन केले होते.
निर्मिती करण्याबरोबरच चेतन दातारकडून ‘सावल्या’ हे नाटक लिहून घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सत्यदेव दुबे यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. १९७२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार तर १९९९ साली कालिदास सन्मान, २०११ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. संगीत नाटक अकादमीनेही गौरवले. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाचा आणि योगदानाचा दशकनिहाय आढावा घेणारा ‘सत्यदेव दुबे : ए फिफ्टी इअर्स जर्नी थ्रू थिएटर’ हा ग्रंथ संदर्भग्रंथाच्या पलीकडे जाऊन दुबे माणूस आणि नाटय़कर्मी यांचे अनेक कंगोरे उलगडून दाखवण्याचे काम करतो. शांता गोखले यांनी या पुस्तकाची रचना पाच भागांत केली आहे. पहिल्या भागात १९६० च्या दशकाची चर्चा आहे. यालाच ‘भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ुटचा काळ ’असे म्हणतात.
त्यानंतर दुसरा भाग आहे १९७० च्या दशकाबद्दल. याला ‘वालचंद टेरेसचा काळ’ असे म्हणतात. तिसरा भाग ‘छबीलदास चळवळी’चा, जी १९८० च्या दशकात बहरून आली होती. चौथ्या भागात, १९९० च्या दशकात पृथ्वी थिएटरमध्ये दुबेंजी केलेल्या कामाची चर्चा आहे. नोव्हेंबर २००८ मध्ये पृथ्वी थिएटरमध्ये दुबेंच्या कामाचे प्रदर्शन व चर्चासत्रे असा कार्यक्रम आयोजित केला होता. याची चर्चा पाचव्या भागात आहे. या प्रकारे या पुस्तकात दुबेजींच्या पन्नास वर्षाच्या कामाचा आढावा आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कामाची चिकित्सा, त्यांच्याबद्दल अनुकूल-प्रतिकूल टीका असा भरगच्च मजकूर आणि निवडक छायाचित्रे आहेत. सत्यदेव दुबे यांचे २५ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti