जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
रघुनंदन बर्वे हे सर्वपरिचीत व कौशल्यवान लेखक, दिग्दर्शक, एडिटर, व फ्री लान्सींग करणारे कलाकार आहेत. त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल योगदान समाजाच्या विवीध स्तरांमधुन वाखाणलं गेलेलं आहे. झी टॉकिज सारख्या प्रतिष्ठीत चित्रपट निर्माण कंपनीमध्ये कायमस्वरुपी, लेखक व दिग्दर्शक रुजु झालेल्या रघुनंदनने त्याला मिळालेल्या प्रत्येक संधीचा उत्तम फायदा मिळवला आहे. मराठी व्यासपीठ गाजवलेल्या व सर्वसामान्य रसिकांच्या हृद्यास स्पर्शुन गेलेल्या अनेक मालिकांची, चित्रपटांची व म्युझिक अल्बम्सची लांबलचक यादी त्याच्या सफाईदार दिग्दर्शनाखाली तावुन सुलाखून निघालेली आहे.
लहानपणापासूनच जो माणूस अलम दुनियेतील दु:खे संपवणा-यांच्या गटात सामील झाला, सर्वांच्या दु:खाला आपल्या गीतांमधून ज्याने शक्ती दिली आणि न्यायाच्या लढाईत ज्याची गाणी पुढच्या रांगेत असत, तो स्वत:चे दु:ख कधीही व्यक्त करीत नसे. कैफी फार मोठे कवी होते. आपल्या भावाची गझल पूर्ण करण्यासाठी त्यांनी १२ व्या वर्षी जी गझल लिहिली ती अमर झाली. नंतर तीच गझल बेगम अख्तर यांनी गायिली. ‘इतना तो जिंदगी में किसी की खलल पडे, हंसने से हो सुकून न रोने से कल पडे’.
अपर्णा सेन ह्या एक प्रसिध्द सिनेअभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत. त्यांचा जन्म २५ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला. १९८१ मध्ये अपर्णा सेन यांनी ३६ चौरंगी लेन या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले होते. अपर्णा सेन यांना सुचित्रा सेन यांच्या एकांतवासाच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री बनवायची होती, परंतु यासाठी त्यांना परवानगी मिळू शकली.
कोंकणा सेन ह्या अपर्णा सेन यांची मुलगी. त्यांचे पती सायन्स रायटर आणि जर्नलिस्ट मुकुल शर्मा. अपर्णा सेन ह्यांनी पश्चिम बंगालच्या वस्त्रोद्योगमंत्री म्हणून काम केला आहे. जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये सेन यांनी ज्युरीवर काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
स्नेहल भाटकरांचे नाव उच्चारले की जुन्या मंडळींना चटकन कभी तनहाईयों मे युँ, हमारी याद आयेगी हे मुबारक बेगम च्या आवाजातील सदाबहार गीत आठवते. खरे तर हे गीत भाटकरजींना लतादीदींच्या आवाजात ध्वनीमुद्रित करायचे होते; पण ठरलेले असूनही लागोपाठ तीन दिवस लतादीदी तिथे फिरकल्याच नाहीत हे पाहून कोणतीही तक्रार न करता त्यांनी हे गाणे मुबारक बेगमच्या आवाजात ध्वनिमुद्रित केले आणि मग पुढचा त्या गाण्याने जो इतिहास घडवला तो सर्वश्रुतच आहे. स्नेहलता हे त्यांच्या मुलीचे नाव. त्यांचा जन्म १७ जुलै १९१९ रोजी झाला. त्यातील स्नेहल घेऊन केदार शर्मा ह्यांनी सुहागरात ह्या चित्रपटाच्या वेळी त्यांचे स्नेहल भाटकर असे नव्याने बारसे केले. नोकरीत म्हणजे आकाशवाणी मध्ये ते व्ही.जी भाटकर म्हणून वावरले तर भजनी मंडळात भाटकरबुवा म्हणून वावरले.
संगीतकार आणि गायक म्हणून कधी स्नेहल तर कधी वासुदेव भाटकर हे नाव घेऊन वावरले. स्नेहल भाटकर, भाटकर बुवा, व्ही.जी.भाटकर, वासुदेव भाटकर,बी वासुदेव! एकाच माणसाची ही अनेक.त्यांचे पूर्ण नाव वासुदेव गंगाराम भाटकर. आकाशवाणीच्या नोकरीत राहून देखिल संगीत दिग्दर्शनाचा व्यवसाय करता यावा म्हणून शोधलेला, नियमाला बगल देणारा हा मार्ग होतागोड गळ्याची देणगी त्यांना त्यांच्या आईकडूनच मिळाली होती. त्या नंतर श्रीकृष्ण संगीत विद्यालयात त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. तसेच आजुबाजुच्या त्या परिसरात नियमितपणे भजनं चालत, त्यातही ते उत्साहाने भाग घेत आणि “ह्यातूनही आपण बरेच शिकलो” असे ते प्रांजळपणे नमूद करतात. ह्या भजनांचा परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला दिसतो की ज्यामुळे त्यांचा स्वभाव अतिशय निगर्वी आणि समाधानी झाला.कलेच्या ह्या क्षेत्रात ते अजातशत्रू राहिले ते ह्याच स्वभावामुळे. म्हणूनच आयुष्यभर त्यांनी ह्या भजनांची साथ कधीच सोडली नाही. भजनी मंडळात ते भाटकरबुवा म्हणूनच प्रसिद्ध होते. १९३९ साली त्यांनी एच.एम.व्हीत पेटीवादक म्हणून नोकरी पत्करली पण पुढे आपल्या स्वत:च्या कुवतीवर ते संगीतकार म्हणून नावारुपाला आले. १९४४ च्या सुमारास बाबुराव पेंटर ह्यांच्या रुक्मिणी स्वयंवर ह्या चित्रपटाला संगीत देण्यासाठी त्यांची सुधीर फडके ह्यांच्याबरोबरीने निवड झाली आणि मग वसुदेव-सुधीर ह्या नावाने त्या चित्रपटाला त्या दोघांनी संगीत दिले.गंमत म्हणजे ह्यांतील भाटकरांनी संगीत दिलेली काही गाणी बाबुजींच्या पत्नी ललिता फडके ह्यांनी गायलेली होती.
केदार शर्मा ही व्यक्ती भाटकरबुवांच्या आयुष्यातील एक अती महत्वाची व्यक्ती होती. सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळात केदार शर्मांनी बुवांना जो हात दिला त्याचा विसर कधीही पडू न देता केदार शर्मांच्या पडत्या काळातही पैसे न घेता बुवांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिलंय.बुवांचे वैषिष्ठ्य हे की त्यांनी राज कपूरने पहिल्यांदाच नायक म्हणून काम केलेल्या नीलकमल ह्या चित्रपटातील त्याच्या तोंडच्या गाण्यासाठी आपला आवाज उसना म्हणून दिलेला आहे.ह्या चित्रपटाचे संगीतकार देखिल ते स्वत:च होते. इथे त्यांनी बी वासुदेव हे नाव धारण केलेले होते.तसेच मधुबाला,तनुजा,गीताबाली,नूतन इत्यादिंच्या चित्रपट पदार्पणातील पहिल्याच चित्रपटांना त्यांनी संगीत दिलंय.आधी नायिका म्हणून गाजलेल्या आणि नंतर निर्मात्या बनलेल्या कमळाबाई मंगरुळकर,कमला कोटणीस,शोभना समर्थ वगैरे स्त्री निर्मात्यांच्या पहिल्या चित्रपटांनाही बुवांनीच संगीत दिलंय. नीलकमल, सुहागरात, हमारी बेटी, गुनाह,हमारी याद आयेगी,प्यासे नैन,भोला शंकर, आजकी बात,दिवाली की रात,पहला कदम इत्यादि हिंदी चित्रपटांना त्यांनी दिलेलं संगीत खूपच गाजलंय. तसेच मराठीतील रुक्मिणी स्वयंवर,चिमुकला पाहुणा,नंदकिशोर,मानला तर देव,बहकलेला ब्रह्मचारी इत्यादि चित्रपटांचे संगीतही विलक्षण गाजलंय.नंदनवन,राधामाई,भूमिकन्या सीता,बुवा तेथे बाया इत्यादि नाटकांचे संगीतही चांगलेच गाजलेय. स्नेहल भाटकर यांचे २९ मे २००७ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. प्रमोद देव
मनमोहन देसाई यांनी २० चित्रपट बनवले त्यातील १३ चित्रपट हिट झाले.
गायिका, कवयित्री, नाटककार व सुप्रसिद्ध लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म ६ ऑगस्ट १९२५ रोजी पुणे येथे झाला.
योगिनी जोगळेकर यांनी बी.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर १९४८ ते १९५३ या काळात त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. तसेच 'राष्ट्रसेविका समिती'च्या माध्यामातून त्यांनी अनेक वर्ष सामाजिक कार्यही केले. याच काळात त्यांनी विविध कथा, कादंबरीतून स्त्रीविषयक लेखन केले. त्यांचे काही काव्यसंग्रह व नाटकेही प्रसिद्ध झाली.
पंडित भास्करबुवा बखले यांच्या जीवनावर "" या सम हा "" आणि राम मराठे यांच्या जीवनावर राम प्रहर"" या चरित्रांचे त्यांचे लेखन वेगळे ठरले.
वयाच्या आठव्या वर्षापासून योगिनीबाई शंकरबुवा अष्टेकर यांचेकडे संगीत शिकत होत्या. त्यानंतर योगिनी जोगळेकर यांनी राम मराठे यांचे शिष्यत्व पत्करले. आकाशवाणी व खाजगी बैठकीबरोबरच योगिनी जोगळेकर यांनी "पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले.
आकाशवाणीवरील गीतरामायणाच्या प्रथम प्रसारणात विरूप झाली शूर्पणखा, ही दाशरथीची कृति सूड घे त्याचा लंकापति हे गाणे योगिनी जोगळेकर यांनी गायले होते.
योगिनी जोगळेकर यांनी "राम प्रहर " हे राम मराठे यांच्या जीवनावर चरित्र लेखन केले होते.
योगिनी जोगळेकर यांचे निधन १ नोव्हेंबर २००५ रोजी झाले.
त्यांची गीतसंपदा
मधुर स्वरलहरी या ------- सखे बाई सांगते मी -----हरीची ऐकताच मुरली -----हे सागरा नीलांबरा
सखे बाई सांगते मी नवनवल गे
गमते मना मृदु भावना
हृदयींची शतजन्मींृची गे
स्वप्नाीत तयाशी प्रहर प्रहर बोलते
या मनोरथातुनी योजनभर विहरते
गमते मना सुख साधना
हृदयींची शतजन्मींाची गे
नित् प्रीत उमलतसे
माला मी गुंफितसे
भक्ति ज्योति तेवतसे
मन हसे, तन हसे, मधुरसे"
-- संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
आपल्या १८ वर्षाच्या करीयर मध्ये त्यांनी एकूण ८५९ धावा केल्या. यात तीन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश होता.
सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते.
माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक कीर्तीचे तत्ज्ञ व परम महासंगणकाचे जनक पद्मश्री डॉ. विजय भटकर यांचा जन्म ११ ऑक्टोबर, १९४६ ला महाराष्ट्रातील मुरंबा या गावी झाला. अभियांत्रिकिचे पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर बडोदा येथील महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापिठातून १९७२ मध्ये त्यांनी मास्टर ऑफ इंंजिनिअरिंग ही पदवी प्राप्त केली. दिल्ली येथील इंंडियन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये त्यांनी पीएच.डी . प्राप्त केली.
भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्वल त्यांना पद्मश्री हा सर्वोच्च नागरी सन्मान २००० मध्ये प्रदान करण्यात आला आहे. तत्पूर्वी १९९९ व २००० ला “महाराष्ट्र भूषण“ हा महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च सन्मानासह राष्ट्रीय स्तरावरील अनेक महत्वाचे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. भारत सरकारच्या केद्रीय मंत्रिमंडळात नियुक्त केलेल्या शासकिय सल्लागार समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. पंतप्रधानांनी नियुक्त केलेल्या माहिती तंत्रज्ञान कृती गटाचे ते सदस्य होते. भारताला माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर नेण्याचे महत्वपुर्ण कार्य या समितीवर सोपविण्यात आले होते. रॉयल सोयायटीने त्यांना २००३ मध्ये व्याख्यानासाठी आमंत्रित केले होते.
भारत दक्षिण आफ्रिका दरम्यान संगणक क्षेत्रातील संयुक्त कराराचा तपशील निश्चित करण्यात त्यांनी महत्वपुर्ण कामगिरी केली. भारत रशियाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संयुक्तरित्या हाती घेतलेल्या दीर्घमुदतीच्या कार्यक्रमाचे (आयएलटीची) सदस्य आहेत. इंडीया हेंगरियन इंडो फ्रेंच संयूक्त आयोगाचेहि ते सदस्य असून सध्या ईटीएच रिसर्च लॅब चे अध्यक्ष आहेत. डॉ. भटकर यांना देशविदेशातील अनेक मान्यवर संस्थानी फेलो हा बहुमान प्रदान केला आहे. त्यात आय.ई.ई.ई. कॉम्प्यूटर सोसायटी ऑफ इंडिया, इंडियन नॅशनल अॅकॅडमी ऑफ इंजिहनअरिंग (नवी दिल्ली), महाराष्ट्र अॅकॅडमी ऑफ सायन्स (पुणे), इन्स्टिटयूशन ऑफ इलेक्ट्राॅनिक्स अॅण्ड टेलिकम्यूनिकेशन इंजिनिअर्स (दिल्ली) या संस्थाना समावेश आहे. याशिवाय न्यूयॉर्क अॅकॅडमी ऑफ सायन्सेस (न्यूयॉर्क) आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय संस्थाचे सदस्य अथवा पदांवर कार्य करण्याचा बहूमान त्यांना प्राप्त झाला असून अनेक राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय पूरस्कार प्राप्त झाले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti