(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विनोदी अभिनेते व निर्माते जसपाल भट्टी

    बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते.

  • न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी

    कसोटीत तीनशेहून अधिक विकेट आणि चार हजारहून अधिक धावा करणाऱ्या भारताचा महान अष्टपैलू कपिलदेव आणि इंग्लंडचा इयन बोथम यांच्या पंक्तीत व्हेटोरीने स्थान मिळवलेय. त्यानं ६ शतके आणि २३ अर्धशतके ठोकलीत. ३४ आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये व्हेटोरीने ३८ विकेट घेतल्यात. कर्णधार म्हणूनही डॅनियल व्हेटोरी यशस्वी ठरलाय.

  • मराठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी

    समाजातील घटनांवर तिरकस कटाक्ष टाकत विनोदाची शैली हाताळणारा उमदा दिग्दर्शक म्हणजे उमेश कुलकर्णी. त्यांचा जन्म ६ डिसेंबर १९७६ रोजी झाला. वळू’, ‘विहीर’, ‘देऊळ’ सारख्या आशयसंपन्न चित्रपटांचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी केलेले आहे. वळू’ हे नाव देऊन चित्रपटातून बैलाबरोबरच त्यांनी गावाची गोष्ट मांडली. त्यांच्या चित्रपटातील रंजकता हेच त्यांच्या यशाचे रहस्य आहे.

    ‘विहीर’, ‘देऊळ’,हायवे,आरपार या त्यांच्या चित्रपटांनी इंटरनॅशनल फिल्म फेस्ट्रीवल मधील सारी महत्वपूर्ण बक्षिसे पटकावली. ‘आरभाट कलाकृती या नावाने गिरीश - उमेश कुलकर्णी संस्था चालवतात. ‘देऊळ’हा आशयघन आणि वेगळ्या धाटणीचा चित्रपट होता. ‘देऊळ’ या चित्रपटासाठी गिरीश - उमेश कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय ‘सुवर्ण कमळ’ पुरस्कार मिळाला.

    मराठी चित्रपटसृष्टीत ज्यांच्या नावावर चित्रपट चालतो अशा कलाकारांमध्ये लेखक - दिग्दर्शक म्हणून उमेश कुलकर्णी यांचे नाव आघाडीवर असून दर्जेदार आणि वेगळ्या वाटेवरचे चित्रपट निर्माण करून ते रसिकांपर्यंत पोचविण्यात ही जोडी विशेष प्रवीण आहे. चाकोरीबाहेरचे काहीतरी करतानाच मनोरंजनाचा बाज न बिघडवता चित्रपट रंगवण्यात त्यांचा हातखंडा आहे.

    जया बच्चकन यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा अभिनय आणि त्यांच्याडतील कौशल्य सर्वप्रथम हेरलं आणि या चित्रपटाच्या निर्मितीस होकार दिला. उमेश कुलकर्णी गेली काही वर्षे लघुपटनिर्मितीसाठी चित्रपटकर्मीना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. लघुपटांवर उमेश कुलकर्णी यांचे खास प्रेम आहे. त्यांची दिग्दर्शक म्हणून ओळखही याच माध्यमातून झाली होती. त्यामुळे एक प्रकारे लघुपटनिर्मितीची चळवळच त्यांनी सुरू केली असून लघुपटनिर्मितीचे प्रशिक्षण देणारी कार्यशाळा ते घेतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • १६०० कोटींच्या कंपनीचा मालक

    कसबा पेठेतून न्यू जर्सीपर्यंतची वेगवान आगेकूच. एक भन्नाट यशोगाथा.

    अथक परिश्रमाने आकाराला आलं एक अफलातून चाकोरीबाहेरचं व्यक्तिमत्त्व. ‘दीपक सखाराम कुलकर्णी.’याव्यतिरिक्त लेखाला वेगळं शीर्षक असण्याचं काहीच कारण नाही. एवढय़ा तीन शब्दांतून यशाचं संपूर्ण डीएसके विश्व डोळय़ांसमोर उभं राहतं.

    मजला क्रमांक २६. दुर्गामाता टॉवर्स. दक्षिण मुंबई. उजव्या हाताला मुकेश अंबानींचं पेंट हाऊस, हेलिपॅड. डावीकडे ताज, गेट वे सकट अख्खी मुंबई. पुण्यातील कसबा पेठेत वाढलेल्या दीपक नावाच्या मराठी मुलाने कफ परेड भागात बत्तीस मजल्यांचा अवाढव्य टॉवर बांधलाय. कसबा पेठ म्हणजे तेला तांबोळय़ांची वस्ती, असं खुद्द लोकमान्य टिळक म्हणत. पेपरची लाइन टाकून, टेलिफोन पुसत, अपार कष्ट करून तेला तांबोळय़ांच्या वस्तीतून लहानाचा ‘मोठ्ठा’झालेला दीपक आज सोळाशे कोटींच्या कंपनीचा मालक आहे.

    पूर्ण नाव दीपक सखाराम कुलकर्णी. वय ५५ ते ६०च्या अध्येमध्ये. त्यांनी मुंबई-पुण्यापासून, हैदराबाद, चेन्नई, अमेरिकेपर्यंत सर्वत्र घरं बांधली आहेत. पुणे-मुंबई प्रवासात, दिवसभराच्या मीटिंग्ज आणि बिझी शेडय़ूलमध्येही त्यांचा तजेलदार चेहरा, नीटनेटका पोशाख, मुख्य म्हणजे गळय़ातली टाय नजरेत भरते.

    ‘‘टेलिफोन बिझनेसमध्ये टाय लावायला शिकलो.’’ सव्वीसाव्या मजल्याच्या छोटेखानी टेरेसवर फोटोशूटसाठी संपूर्ण सहकार्य करत दीपक कुलकर्णी क्षणार्धात गप्पांच्या मूडमध्ये शिरतात. ‘‘टेलिफोन पुसत असताना ओळखी होत गेल्या. ‘ब्ल्यू डायमंड’चे पी. एल. किलरेस्कर म्हणाले, ‘तू ताजला का नाही जात? मी चिठ्ठी देतो, तुझं काम होईल.’ मी गेलो. हातात किलरेस्करांची चिठ्ठी. अंगावरचा वेश गबाळा. हाफ बुश शर्ट, बिनइस्त्रीची बेलबॉटम, पायात स्लीपर्स. दरवाजातच अडवलं. गुरख्यासाठी पेहेरावाचं इम्प्रेशन अधिक महत्त्वाचं होतं. पुन्हा किलरेस्करांसमोर उभा राहिलो. त्यांनी तिथल्या तिथे शंभर रुपये काढून दिले. म्हणाले, ‘आजपासून स्वच्छ इस्त्रीची पॅण्ट. फुल शर्ट, पायांत बूट, चप्पल विसरायची आणि टाय वापरायची. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्हसारखा वेश हवा. कुणी अडवणार नाही.’१९७१-७२ ची ही गोष्ट असावी. वयाच्या बाविसाव्या वर्षापासून आजतागायत टाय लावला आहे. मधल्या काळात काढला होता. १९८० साली बिल्डर झालो, तेव्हा पांढरा सफारी चढवला. टिपिकल बिल्डरचा ड्रेस. गळय़ात गोफ एकदम झकपक. सलमान खानच आम्ही जणू. मग माझ्या लक्षात आलं, आपण लोकांपासून दूर जातोय. नाइलाज म्हणून लोक येतायत, धंदा होतोय, पण लोकांना आपलेपणा वाटत नाहीय. पुन्हा जुन्या पेहेरावावर आलो.’’

    आज कोटय़वधी रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या दीपक कुलकर्णी यांनी सुरुवात कशी व कुठून केली? त्यांचा पहिला बिझनेस कोणता? कुलकर्णी तपशीलवार सांगू लागतात.

    ‘‘वडील पोलिस खात्यात. आई शिक्षिका.

    आई बिचारी दिवसभर कष्ट करायची. आम्ही तीन भाऊ, आमची एक बहीण. आमची आई सकाळी निघायची, आमचा पूर्ण स्वयंपाक करून. शिकवण्या, शाळा, पुन्हा शिकवण्या. घरी येताना बेतलेले कपडे घेऊन यायची. आमच्याकडे हप्त्यावर घेतलेलं शिलाई मशीन होतं. बेतलेले कपडे म्हणजे लहान मुलांच्या चड्डय़ाबिड्डय़ा. त्या शिवून दिल्या की, डझनाला सहा आणे मिळत. तिचा दिवस कष्टात निघून जायचा. आम्ही म्युनिसिपल शाळेत. पंचवीस नंबरची शाळा. आमचं घर म्हणजे जेमतेम दीड खोली. शाळा सकाळ-दुपार शिफ्टमध्ये, उरलेला वेळ मित्रांसोबत.

    माझ्या मित्रांच्या वडिलांचे छोटे-मोठे व्यवसाय होते. एकाची चन्यामन्या फुटाण्याची गाडी होती. दुसरा सुगंधी सुपाऱ्यांच्या पुडय़ा भरत असे. मग मी एकासोबत चन्यामन्याची गाडी लावायचो, शनिवार पेठेतल्या अहिल्यादेवी मुलींच्या शाळेसमोर आणि दुस-याला सुपारीची परात भरायला मदत करायचो. माझ्या दोन्ही मित्रांचे वडील महिन्याला दोन-तीन रुपये देत.

    अशा प्रकारे मला दरमहा पाच ते सहा रुपये मिळू लागले. दिवाळीत आमचे वडील आम्हा चार भावंडांना मिळून पाच रुपयांचे फटाके आणत. आम्ही त्याची वाटणी करत असू. मग मी म्हणायचो, ‘दादा, माझेपण सात रुपये आहेत. पाच रुपयांचे तुम्ही फटाके आणा. सात रुपयांची आपण घरासाठी एखादी छान वस्तू आणू.’ तो आनंद वेगळा होता.’’

    सोळाशे कोटींचं साम्राज्य असणाऱ्या दीपक कुलकर्णीच्या डोळय़ांत सात अधिक पाच रुपयांचा ‘तो’ आनंद चमकून जातो.

    ‘‘मी पेपर टाकण्याची लाइन निवडली. ही माझी आयुष्यातली पहिली आणि शेवटची

    नोकरी. पाच किंवा दहा रुपये महिन्यावर (आता नक्की आठवत नाही) मी पेपरवाला पोऱ्या झालो. १९५८-५९ सालची गोष्ट सांगतोय मी. एकदा कधी तरी मी साडेपाचऐवजी सव्वासहाला पोहोचलो. मालकाने खाडक्न माझ्या मुस्काटीत मारली. ‘ही काय यायची वेळ झाली? माझं गिऱ्हाईक गेलं.’ त्या दिवशी माझी पहिली आणि शेवटची नोकरी गेली. मुस्काटीत खाल्ली. अपमान झाला. माझी स्वत:ची पेपर लाइन काढली. तो माझा पहिला व्यवसाय.

    होलसेलवर पेपर घ्यायचो, कमिशन मिळायचं. पूर्वी अकरावी (मॅट्रिक) चा रिझल्ट पेपरमध्ये छापण्याची पद्धत होती. मॅट्रिकचा रिझल्ट सायकलला बांधला. कॅम्पात जाऊन एक आरोळी ठोकली की, दहा मिनिटांत चटणीसारखे पेपर संपायचे. चार आण्याचा अंक बारा आण्याला विकला जात असे. त्या दिवशी ‘प्रीमिअम’ काय असतं, ते लक्षात येत असे. आम्ही त्या दिवसाची वाट बघत असू.

    एका वर्षी पायजम्याच्या दोन्ही खिशात मिळून ऐंशी रुपये होते. सगळी चिल्लर, मी दोन्ही हातांनी घट्ट धरली होती. त्यापुढे आजचे आठ की सोळा की बत्तीसशे कोटी रुपये फिक्के आहेत.’’

    दीपक कुलकर्णी थांबतात. आज मागे वळून पाहताना, व्यवसायात मिळालेला टर्निग पॉइंट त्यांना नेमका कोणता वाटतो? ठराविक एखादा प्रसंग किंवा घटना, ज्यामुळे त्यांचा

    भविष्यातला मार्ग सुकर झाला.

    ‘‘ एम. एस. कॉलेजला प्री-डिग्री (किंवा एफवाय)ला असताना आम्हा विद्यार्थ्यांना सुट्टीत दीड-दोन महिन्यांकरिता एखाद्या कारखान्यात प्रॅक्टिकल ट्रेनिंगला पाठवत. मला ‘किलरेस्करऑइल इंजीन’मध्ये पाठवण्यात आलं. तळमजल्यावर त्यांचं टेलिफोन एक्सचेंज होतं. मोठे लाकडी बोर्ड, जाड सुतळीच्या वायर्स, कानाला भलेमोठे ‘इअरफोन्स.’ सोनपट्टी नावाचे इन्चार्ज होते. म्हटलं, ‘मला शिकवाल का?’ पहिल्याच दिवशी त्यांनी माझ्या तोंडाजवळ (इअरफोनसकट) माईक धरला आणि मी तोंड वळवत हाताने तो ढकलून दिला. त्याला डेटॉलचा उग्र वास येत होता. दर तीन मिनिटाला ऑपरेटर बदलला जात असे आणि टेलिफोन पुसून आत डेटॉलचा बोळा ठेवण्यात येई. माझ्या मनात विचार आला की, डेटॉलऐवजी यात अत्तराचा बोळा ठेवला तर?

    माझ्या मैत्रिणीला मी हे सांगितलं. मैत्रीण म्हणजे जिच्यावर मी प्रेम केलं आणि विसाव्या वर्षी जिच्याशी लग्न केलं ती, माझी मैत्रीण- (पत्नी) ज्योती. तिने माझी कल्पना उचलून धरली. एफवायला आमचं प्रेम जमलं. तिची आर्थिक परिस्थिती बिकट.आम्ही गुपचूप लग्न केलं. मी माझ्या घरी परत आलो आणि ती नारायण बागेतल्या महिलाश्रमाच्या हॉस्टेलमध्ये राहू लागली. मी सेकंड इअर बीकॉमला. मला नोकरी नाही. पेपरची लाइन टाकणं हा काही बिझनेस होऊ शकत नव्हता. मी कोणत्या तोंडाने आई-वडिलांना सांगणार होतो? त्यातून माझ्या मोठय़ा भावाचं आणि मुख्य म्हणजे मोठय़ा बहिणीचं लग्न व्हायचं होतं.

    टेलिफोनची आयडिया मी माझ्या पत्नीला सांगितली आणि आज इतक्या वर्षानी मी उघडपणे सांगू शकतो की, तिने ती आयडिया डेव्हलप करून पूर्णत्वाला नेली. भांडवलाची आवश्यकता होती. ६५ ते ७० रुपये आणायचे कुठून? तिच्या वडिलांनी तिला कानातले इअरिंग्ज दिले होते, तिच्यापाशी ट्रान्सिस्टर होता.

    तिने दोन्ही गोष्टी विकल्या. ७२ रुपये मिळाले. ते आमचं पहिलं भांडवल. आमचा पहिला बिझनेस सुरू झाला. ‘टेलिफोन क्लिनिंग सव्‍‌र्हिस’- ‘टेलिस्मेल.’ तो कमालीचा क्लिक झाला. पुण्यात एकमेव ‘टेल्को’ वगळता बाकी सर्व इंडस्ट्रीत आम्ही जात होतो. ‘बँक ऑफ इंडिया’ सोडली, तर सगळय़ा बँकांच्या शाखांचे टेलिफोन आम्ही पुसत होतो.

    अत्तराचा वास, सात दिवस टिकत असे. आठवडय़ातून एकदा, महिन्यातून चार वेळा एक फोन पुसायचे आम्हाला तीन रुपये मिळत. फोन जास्त असतील, तर दोन ते अडीच रुपये. दिवसाला दीडशे फोन आम्ही दोघं मिळून सहज पुसत असू. आमचा टर्नओव्हर होता दिवसाला सरासरी पंच्याहत्तर ते शंभर रुपये . महिन्याला सरासरी दोन हजार रुपये. दोन हजारांत नेट प्रॉफिट होता बाराशे ते चौदाशे रुपयांचा.

    मी १९७० सालातली गोष्ट सांगतोय. बँकेचा मॅनेजरदेखील तेव्हा दरमहा हजार-अकराशे रुपये कमावत होता आणि मी बीकॉमच्या दुस-या वर्षाचा विद्यार्थी. बाराशे रुपये कमावत होतो. दिवसभर कष्ट केल्यामुळे झोपही छान लागत होती.’’

    बिल्डर व्यवसायात शिरण्यायोग्य परिस्थिती कधी निर्माण झाली?

    ‘‘गरजेपोटी मार्ग सापडत जातात. मला ऑफिस हवं होतं. स्वस्तात कुणी टेबलस्पेस देईल का, या शोधात होतो. अलका टॉकीजशेजारी एका ऑफिसमध्ये टेलिफोन पुसायला जात होतो. त्या मालकाला विचारलं- तो म्हणाला, ‘जागेला रंगबिंग लाव, इंटिरिअर कर. मग तू बस.’ इंटिरिअर डिझायनरचे पैसे परवडेनात. मग मीच रंगाचं कॉण्ट्रॅक्ट घेतलं. ६६ रुपयांत काम झालं. कॉण्ट्रॅक्टरने स्क्वेअर फूटच्या हिशेबाने घेतले असते १०० रुपये. जवळपास चाळीस टक्के फायदा. मी या धंद्यात शिरलो. ‘पेंट ऑल’ ही माझी कंपनी होती. एकदा किलरेस्करांचा बंगला रंगवताना डोक्यावरचं छप्पर गळायला लागलं. (फॉल्स सीलिंग) त्यांचे इंजिनीअर वगैरे आले. मला म्हणाले, ‘दहा दिवसांनी या, आधी सीलिंग नीट होऊ दे.’ म्हटलं, भविष्यात आपण वॉटर प्रुफिंग करून द्यायचं. अनेक ठिकाणी रंगाऱ्यासह ठरलेल्या तारखेला उपस्थित राहिलो की, फ्लॅटमालक सांगणार, ‘पुढल्या आठवडय़ात या.

    अजून फर्निचर व्हायचंय.’ रंगाऱ्यांची मजुरी घरबसल्या अंगावर पडू लागली. मनाशी ठरवलं, आपणच फर्निचर करायचं. वॉटर प्रुफिंग, प्लम्बिंग, जुनी फरशी बदलून देणं (फ्लोअरिंग), मेन गेट लोखंडी करणे या सर्व गोष्टी मी करू लागलो. १९७३ ते १९८० घरातला कोपरा न् कोपरा दुरुस्त करू लागलो, तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की, लोकांनी बिघडवलेलं घर दुरुस्त करण्यात आपली ताकद घालवतोय. त्याऐवजी स्वत:च घर बांधू लागलो तर? आणि ८० साली मी बिल्डर झालो. ‘अर्बन लॅण्ड सीलिंग’ होतं.

    ३३०, रास्ता पेठ. मी विकत घेतलेला पहिला वाडा आजही माझ्या डोळय़ांसमोर आहे.’’ बोलता बोलता दीपक कुलकर्णी थांबतात. त्यांना पुढच्या अडीच तासांत कफ परेडहून पुणे गाठण्याची घाई असते. ‘‘एका शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न आहे. तो म्हणाला, ‘साहेब, तुम्ही नाही आलात, तर मी पंक्तीला बसणार नाही.’ ही माझी कमाई आहे. फ्लॅटहोल्डर्स मला ‘आपले’ वाटतात. त्यांच्या घरी जातो, बसतो, कांदे-पोहे खातो. एरवी बिल्डर आणि फ्लॅटहोल्डर्स यांचा काडीचा संबंध उरत नाही, म्हणूनच आजच्या मंदीचा आमच्याशी काही संबंध नाही.

    आमचा अलिखित नियम आहे- ‘इन्व्हेस्टर्स- ब्रोकर्स नॉट अलाऊड.’ ब्रोकर्सना आम्ही फ्लॅट विकत नाही. बिझनेसच्या चौकटीबाहेर खूप गोष्टी करायच्या आहेत. मला लेखन करायचंय, मला (ओल्ड) महाबळेश्वरला जाऊन लेखन करायला आवडतं. चालणं हा माझा छंद आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर माझी भक्ती आहे. विज्ञानावर निष्ठा आहे.

    अगदी माझा पहिला खरेदी केलेला रास्ता पेठेतला वाडा, अपशकुनी म्हणून इतर बिल्डर्स नाकारत होते, मी घेतला तोही विज्ञानाच्या निष्ठेपोटी. दोन इच्छा प्रबळ आहेत. अमेरिकेतलं ‘मॅन हॅटन’ म्हणजे आम्हा बिल्डर लोकांची काशी, पंढरी. तिथे दीडशे मजल्यांची बिल्डिंग बांधायची आहे. ऑलरेडी न्यू जर्सीपर्यंत पोहोचलोय आणि दुसरी इच्छा म्हणजे मला पेढी काढायचीय- ‘दीपक सखाराम आणि मंडळी, सोन्या-चांदीचे व्यापारी’ अशी बाहेर पाटी हवी. मला छान तलम धोतर नेसायचंय, जुन्या काळातला डगला शर्ट घालायचाय, डोक्यावर टोपी घालून पेढीवर येणाऱ्या लोकांचं स्वागत करायचंय.’’ क्षणभर पॉझ घेतात, डोळे मिचकावून मिश्कीलपणे म्हणतात, ‘‘आणि सध्या मी पुण्याला निघालोय. शेतकऱ्याच्या मुलाच्या लग्नाला, नाही तर त्याला वाईट वाटेल.’’ सोळाशे कोटींच्या कंपनीचा मालक, चालक, सर्वेसर्वा एका शेतकऱ्याचं मन राखण्याकरिता म्हणून पुण्याच्या वाटेने भरधाव सुटला. हीच ओळख कायम राहावी याकरिता कायम झटत असतात आणि घरापेक्षा घरपण राखलं जावं म्हणून जिवापाड मेहनत करतात पुण्याचे दीपक सखाराम कुलकर्णी ऊर्फ डी. एस. कुलकर्णी ऊर्फ डीएसके.

  • मराठी अभिनेता जितेंद्र जोशी

    सुरवातीला त्यामध्ये विक्रम गोखले यांचे बरोबर जितेंद्र जोशी काम करीत असे. इतके जबरदस्त नाटक होते कि त्यामध्ये नातू आणि आजोबा यांच्या संघर्षामध्ये सध्याच्या दोन पिढ्यातील अंतर इतक्या प्रभावीपणे मांडला आहे कि हे नाटक पाहताना डोळ्यात अक्षरश अश्रू येतात.

  • गायक शब्बीरकुमार

    गायक शब्बीरकुमार

    ब्बीर कुमार यांनी सर्व मोठ्या संगीतकारांसोबत काम केले आणि अमिताभ बच्चन ते अनिल कपूर आणि सनी देओल यांच्यासाठी गाणी गायली. देशभरात नवरारात्रीत कायम गायले जाणारे ‘मर्द’ चित्रपटातील ‘माँ शेरों वाली’ हे प्रसिद्ध गाणे शब्बीर कुमार यांनी गायले होते

  • संजय भागवत

    उत्तम वाचन व साहित्याची चांगली जाण असलेले संजय मितभाषी, विनम्र स्वभाव व उत्तम निर्णयक्षमता या स्वभाववैशिष्ट्यांसाठी ओळखले जात. 

  • प्रसिद्ध संतूर वादक शिवकुमार शर्मा

    आजमितीला संतूर आणि शिवकुमार शर्मा हे जणू समानार्थी शब्द झालेले आहेत. संतूरला अभिजात संगीताच्या व्यासपीठावर सतार, सारंगी किंवा सरोदच्या तोलामोलाचे स्थान मिळालेले आहे. शिवकुमारांचे संतूर वादन सर्वार्थाने समृद्ध असते. ज्यांना संगीतातल्या तांत्रिक बाबी समजत नाहीत, अशांना संतूरमधून प्रकटणार्‍या नादमाधुर्याचा, भाव आणि नवरसांच्या उत्कट अभिव्यक्तीचा आस्वाद घेता येतो.

  • मराठी कवी व गीतकार कवी संजीव

    कवी संजीव यांचे नाव कृष्ण गंगाधर दीक्षित. आपल्या लहानपणी वडिलांचे छत्र हरवलेले संजीव त्यांच्या काकांच्या घरी वाढले. त्यांचा जन्म १२ एप्रिल १९१४ रोजी सोलापुराजवळील 'वांगी' गावात झाला.त्यांचे शालेय शिक्षण सोलापुरात झाले. पुढे कलाशिक्षणाकरता त्यांनी मुंबईच्या 'बाँबे स्कूल ऑफ आर्ट' या संस्थेत प्रवेश घेतला. तेथून १९३९ साली ते जी.डी. आर्ट पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले. मा.संजीव व्यवसायाने छायाचित्रकार व मूर्तिकार होते. त्यांनी काही काळ सोलापूर महानगरपालिकेच्या मुलींच्या शाळेत कलाशिक्षकाची नोकरी केली. तात्यासाहेब श्रोत्रिय यांच्या संपर्कात संजीवांना काव्यशास्त्राची, वृत्तछंदांची गोडी लागली. सुरुवातीच्या काळात गणेशोत्सवाच्या मेळ्यांकरता त्यांनी पुष्कळ गाणी लिहिली. १९३०-३२ च्या सुमारास 'माझा राजबन्सी राणा कोणी धुंडून पहाना' हे कवी संजीव यांनी लिहिलेले आणि लोकप्रिय गायिका मेहबूबजान हिने गायलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. १९३५ साली 'दिलरुबा' हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. १९५०-६० सालांच्या दशकांत संजीवांनी मराठी चित्रपटांची गीतेही लिहिली. मा.संजीव यांचे २८ फेब्रुवारी १९९५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • बाबुराव गोखले

    बाबुराव गोखले, राजा गोसावी, शरद तळवलकर यांनी गाजवलेलं एव्हरग्रीन अस्सल दर्जेदार विनोदी म्हणजे नाटक ‘करायला गेलो एक’ त्यांचं गाजलेलं नाटक ‘करायला गेलो एक’ म्हणजे मनोरंजनाचा खच्चून भरलेला मसालाच!