जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पं रामाश्रेय झा यांनी लिहिलेल्या पाच खंड असलेल्या लेखांचा संग्रह अभिनव गीतांजली संगीत हे भारतीय संगीतातील एक महत्वाचे मानले जाते. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला. यात रागांचे सखोल विश्लेषण केले आहे.
जितेंद्र अभिषेकी यांनी पं रामाश्रेय झा यांच्या अनेक रचना गाऊन रसिकांसमोर आणल्या होत्या. १९६८ मध्ये, ते अलाहाबाद विद्यापीठात शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते आणि १९८० पर्यंत संगीत विभाग प्रमुख झाले होते. त्याचे सुप्रसिद्ध शिष्य गणांमध्ये कमला बोस, शुभा मुदगल, गीता बॅनर्जी अशी नावे आहेत.
२००५ मध्ये पं रामाश्रेय झा यांना संगीत नाटक अकादमी, पुरस्कार मिळाला होता मा.पं रामाश्रेय झा यांचे १ जानेवारी २००९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
श्री. अशोक रामचंद्र शिंदे हे गेली २५ वर्षे पत्रकारितेत असून त्यांनी `सांज लोकसत्ता', `नवशक्ती', `सकाळ', `अर्थनीती', `युगधर्म' अशा दैनिकांमधून पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळले असून त्याची दखल शासकीय स्तरावरून वेळोवेळी घेण्यात आली आहे. ते भारतीय पत्रकार संघ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ आदी संस्थांशी संलग्न आहेत तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृतीधारक पत्रकारदेखील आहेत. नागपूर येथून प्रकाशित होत असलेल्या ६७ वर्षे जुन्या `दै. युगधर्म' या दैनिकाचे ते मुंबईचे ब्यूरो चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर याच वृत्तपत्र समूहातील `दै. देश', `दै. उद्याची खबर आज', `दै. विदर्भ पुकार' या दैनिकांसाठीही ते मुंबईचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.
पूर्णवेळ पत्रकारिता करत त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, व्यापार-उद्योग अशा विविध क्षेत्रातील वार्तांकनं तसेच लेखन केले आहे. व्यसनमुक्ती तसेच अवैध दारूचे धंदे, व्यसनापायी होणारी सामाजिक हानी, राजकारणात सत्शीलपणा येण्यासाठी आग्रही राहिलेले त्यांचे लेखन, विविध सामाजिक बाबी आदी विषयांवर त्यांनी गेल्या २३ वर्षांमध्ये नियमितपणे व सातत्याने लिखाण केले आहे. त्याच्या उपयोग महाराष्ट्राच्या विकासात हातभार लागण्यासाठी झालेला आहे. प्रत्येक बातमीमागे त्याची वस्तुनिष्ठता तसेच त्याचा सापेक्षपणा ठळकपणे अधोरेखित होतो.
अनेक चरित्रपर व मार्गदर्शनपर पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कांची कामकोठी पीठाचे जगदगुरु शंकराचार्य यांच्या हस्ते पुरस्कारदेखील मिळाला आहे. त्याचबरोबर अन्य संस्थांनीही त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला आहे. व्यसनमुक्ती उपक्रमांबरोबरच अन्य कामिगरींमध्ये त्यांचा लौकिक राहिला आहे. महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्प, पंचतारांकित औद्योगिक वसाहती, कृषी प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांनी अभ्यास करून पत्रकारितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांची पाहणी करून त्याबाबत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून त्यांची सोडवणूकदेखील केलेली आहे. त्याची अनेक उदाहरणे आहे. आपल्या लिखाणातून राज्यातील असंख्य वाचकांवर शासनाच्या वतीने राबवण्यात येणा-या उपक्रमांचे तसेच योजनांचे विवेचन विश्लेषणात्मक रुपाने दिले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये या योजनांचे स्वरुप समजून त्याचा उपयोग कल्याणकारी कार्यासाठी करून घेण्यास हातभार लागला आहे. गेली पाच वर्षे सलगपणे ते विधिमंडळाच्या अधिवेशनांचे वार्तांकन करत असल्यामुळे शासकीय कामकाजांना त्यांनी वृत्तपत्राच्या माध्मयातून प्रसिद्धी देऊन जनमानसांपर्यंत शासनाचे विविध कार्य पोहचवले आहे.
व्यसनमुक्तीच्या उपक्रमांना आपल्या लिखाणातून प्राधान्य देत महाराष्ट्राच्या विविध विकास कामं, योजना यांच्याशी संबंधित माहिती, त्याच्यावरील विश्लेष्ण तसेच त्याच्या प्रचारासाठी सातत्याने त्यांच्याकडून होत असलेल्या लिखाणातून राज्याच्या विकासकार्यात त्यांचेदेखील भरीव योगदान काही प्रमाणात लाभत आहे.
भारतीय पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी पत्रकारांचे साहित्य संमेलन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सहकार्याने आयोजित केले. त्यालादेखील राज्यभरातील पत्रकारांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके व लेख लिहले आहेत. पुस्तकांमध्ये अधिकांश आत्मचरित्रपर लिखाण असून त्यात राजकीय नेते शरद पवार, विक्रमराव सावरकर, पी. एस. लाड, उद्योजक भाई सावंत, शिक्षणकर्मी अनंत वामन वर्तक, पुष्पकांत अनंत म्हात्रे आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर `लघुउद्योजकांच्या दुनियेत' हे त्यांचे पुस्तक तत्कालिक उद्योगमंत्री लिलाधर डाके यांच्या हस्ते प्रकाशित झाले. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याशिवाय अनेक प्रासंगिक लेखन ते वृत्तपत्रांमधून करत असतात. त्यांचे अनेक लेख महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळ, कुर्ला व श्रमिक पत्रकार संघटना असलेल्या भारतीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी २०१७ या दिवशी पत्रकारितेतील उल्लेखनीय व समर्पित कार्याबद्दल व श्रमिक पत्रकार म्हणून २५ वर्षे कार्य केल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांची परिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
मुंबईतील लघुवाद न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालत अंतर्गत त्यांना न्यायालयीन खटल्याच्या न्यायप्रक्रियेत पत्रकार व समाजसेवक म्हणून सहभागी करून घेतले जाते.
कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते अजीवन सदस्य असून त्यांनी कोमसापच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या साहित्य संमेलनात मोलाची भूमिका बजावली. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात झालेल्या या भव्य संमेलनाच्या आयोजनापासून ते संपूर्ण संमेलन पूर्ण होईपर्यंत प्रसिद्धी समिती प्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
ऋजुता फाऊंडेशनचे ते विश्वस्त असून त्यांनी महिला साहित्यिकांचे राज्यव्यापी संमेलन दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित केले. त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजया वाड होत्या तसेच गिरीजा किर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेला. भाषा संचालनालयाच्या संचालिका डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासह देश-विदेशातील अनेक सुप्रसिद्ध महिला साहित्यिका यात सहभागी झाल्या होत्या. या संमेलनाचे नेटनेटके आयोजन अशोक शिंदे यांनी केले व संमेलन यशस्वी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक ग्रंथ संपदांचा 12 भारतीय भाषांमध्ये अनुवाद तसेच ब्रेल लिपीत त्याचे रुपांतरण करण्याचा प्रकल्प त्यांनी एकट्यानी यशस्वीपणे राबविला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य मराठी, हिंदी, इंग्रजीसह गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळ्म, आसामी, पंजाबी, उडिया या भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे.
माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी लिहलेल्या `शिवसेना – काल, आज आणि उद्या' या अभ्यासपूर्ण ग्रंथाच्या निर्मितीसाठी संपादकीय स्तरावर सहकार्य केले असून तसा उल्लेख प्रकाशकांनी प्रस्ताविकेत केला आहे.
राजहंस प्रकाशनच्या वतीने गाजत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक संदीप वासलेकर लिखित `एका दिशेचा शोध' या पुस्तकाच्या संपादकीय प्रक्रिया त्यांचा सहभाग असून तसा उल्लेख लेखकाने आपल्या मनोगतात केला आहे.
अनेक स्वयंसेवी संस्थांशी ते संबंधित आहेत. रामचंद्र प्रतिष्ठान या विश्वस्त संस्थेच्या तसेच अर्थनीती मासिकाच्या वतीने त्यांनी लेख, निबंध स्पर्धा अशा साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.
श्रमजीवी वर्गात त्यांचे व्यावसायिक कार्य येत असून त्यातून त्यांनी महाराष्ट्राच्या समाजाच्या विकासात अप्रत्यक्षपणे भरीव योगदान दिले आहे.
एखाद्या माशाच्या शरीरात परोपजीवी घटक त्याला आतून खात असेल तर? तर या माशांची संख्या कमी होईलच, पण त्यावर अवलंबून असणारी अन्नसाखळीही रोडावेल. प्राणीशास्त्राचे संशोधक डॉ.एम.ए. वाहूळ यांचे संशोधन यादृष्टीने महत्त्वाचे आहे...
डॉ.एम.ए. वाहूळ यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला माशांचा डॉक्टर हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ.एम.ए. वाहूळ यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला माशांचा डॉक्टर हा लेख वाचा.
जलतरंग हे प्राचीन भारतीय वाद्य असून ते वाजविणाऱ्या व्यक्ती दुर्मीळ आहेत. ‘ही ६४ कलांमधील एक कला आहे. या वाद्याला जलवाद्य किंवा ‘जलतंत्री वीणा’ असेही म्हणतात. यात कमीतकमी १२, तर जास्तीत जास्त २६ भांडी असतात. भांड्यांची रचना मोठ्यापासून छोट्यापर्यंत, अर्धवर्तुळाकार स्वरूपात केली जाते. बांबूच्या किंवा प्लास्टिकच्या काठ्यांनी ते वाजवितात.
सरहद्द गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफारखान ज्यांना बादशाह खान म्हणूनही ओळखले जाते, हे वायव्य सरहद्द प्रांतातील सर्वात प्रभावशाली स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांचा जन्म ३ जून १८९० रोजी झाला. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते. गफारखानांनी १९२९ मध्ये 'खुदा ई खिदमतगार' नावाची संघटना उभारली होती. भारत सरकारने १९८७ मध्ये त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने गौरवले गेले. बादशाह खान उर्फ खान अब्दुल गफार खान हे या प्रदेशातील एका उमराव कुटुंबात जन्माला आलेले. सर्व पठाण-पख्तुन-अफगाण विशेष (बादशाह खान यांचे वास्तव्य असलेल्या प्रदेशातील लोकांना, अफगाण किंवा पठाण असे संबोधले जायचे. परंतु ते स्वत: असे म्हणत, की आम्ही पख्तुन आहोत, तीच आमची खरी ओळख आहे.) अंगात सहज आलेले. जवळजवळ सव्वासहा फूट उंची, पिळदार शरीर, तडफदार चेहरा, तेजस्वी डोळे. तशीच लढाऊ वृत्ती आणि धडाडी. केव्हाही मरायला वा मारायला सज्ज.अशा व्यक्तीला आणि त्या उग्र, धगधगत्या वातावरणात अहिंसेचा विचार सुचावा, हेच आश्चर्य. त्याहून महद् आश्चर्य म्हणजे, तो विचार एक लाखाहून अधिक पठाणांना पटवून देण्यात त्यांना आलेले यश. बादशाह खान यांचा जेव्हा जन्म झाला, तेव्हा या प्रदेशावर इंग्रजी साम्राज्याचा अंमल होता. इंग्रजांचे साम्राज्य बंदूक आणि डावपेच, दहशत आणि कारस्थान यावर उभे राहिलेले. पठाण टोळ्यांना अर्थातच, अशी परकीय राजवट चालणे शक्य नाही. पहिल्या महायुद्धाच्या अगोदरपासून इंग्रज राजवट अधिकाधिक क्रूर होऊ लागली होती. तिकडे पठाणी टोळ्या इंग्रजांना आव्हान देत होत्या. भारतातही स्वातंत्र्य भावना पसरू लागली होती. मोहनदास करमचंद गांधी नावाच्या मध्यमवयीन वकिलाने दक्षिण आफ्रिकेत गौरवर्णीय, वंशद्वेष्ट्या सत्तेच्या विरोधात आंदोलन पुकारलेले होते; परंतु ते आंदोलन होते, सत्याग्रहाचे. अहिंसेने चाललेले. गोपाळकृष्ण गोखलेंनी दक्षिण आफ्रिकेत जाऊन गांधीजींना भारतात पाचारण केले होते. गांधीजी भारतात आले, तेव्हा त्यांना ‘महात्मा’ हे बिरुद लावले गेलेले नव्हते. गांधीजींनी त्यांचे ‘अहिंसेचे’, ‘सत्याचे’, ‘आत्मशुद्धी’चे प्रयोग सुरू केले आणि अवघा देश फिरून त्यांनी लोक कसे जीवन जगतात, देशाची स्थिती कशी आहे, याचा प्रत्यक्ष शोध-वेध घेतला. गांधीजी जेव्हा हा शोध घेत होते, त्याच वेळेस बादशाह खान हे पख्तुनिस्तानमध्ये त्यांच्या स्वतंत्र विचारांनी अहिंसेच्या विचाराकडे वळू लागले होते. बंदुकीने, म्हणजेच हिंसेने प्रश्न सोडवला जाऊ शकत नाही, डोळ्याचा बदला शत्रूचा डोळा फोडून घेतला तर क्रमात अवघे जग आंधळे होईल. अहिंसेने संघर्ष केला तर कदाचित लगेच विजय प्राप्त होणार नाही; पण पराभव तर नक्कीच होणार नाही आणि अंतिम विजय नक्कीच होईल, असा विचार त्यांनी मांडायला सुरुवात केली होती. परंतु पख्तुन, पठाण, अफगाण लोकांना बंदुकीचा, शस्त्रांचा, संघर्षाचा त्याग करायला सांगणे म्हणजे त्यांच्या संस्कृतीचा, जीवनशैलीचा आणि ‘पुरुषार्था’चाच त्याग करायला सांगण्यासारखे होते. बादशाह खान यांनी अहिंसक सेना स्थापन केली. त्या सेनेचे नाव ‘खुदाई खिदमतगार’ म्हणजेच, ‘ईश्वराचे सेवक’. बादशाह खान यांच्या या सेनेत एक लाखाहून अधिक ‘सैनिक’ सामील झाले. बादशाह खान ‘फ्रंटियर’वर म्हणजे, तत्कालीन ब्रिटिश इंडियाच्या सीमेवर राहून पख्तुनिस्तानात हे अहिंसेचे काम करत होते. म्हणून ते पुढे ‘फ्रंटियर गांधी’ किंवा ‘सरहद्द गांधी’ म्हणून ओळखले जाऊ लागले. ते गांधीजींचे अनुयायी नव्हते, तर एकाच विचाराने प्रेरित झालेले सहकारी होते. गांधीजी तर म्हणत असत की, त्या प्रांतात अहिंसेचे व्रत स्वीकारणे व अमलात आणणे, हे भारतात सत्याग्रही होण्यापेक्षा कठीण आहे! गांधीजींच्या आणि बादशाह खान यांच्यात २१ वर्षांचे अंतर होते. गांधीजी मोठे आणि बादशाह खान त्यांना सहकारी मानण्यापेक्षा गुरुस्थानी मानत. आयुष्याचा प्रत्येक क्षण लोकसेवेसाठी खर्च व्हायला हवा, असे व्रत दोघांनी घेतले होते. दोन्ही ‘गांधींचा’ फाळणीला विरोध होता आणि हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिश्चन-पारशी हे सर्व एकाच मानवजातीचे आहेत आणि त्यांच्यात भेदाभेद, गैरसमज व शत्रुत्व असणे हे अनैसर्गिक आहे, असे त्यांचे मत होते. ‘इस्लाम’ धर्म हा शांतता, प्रेम आणि बंधुत्वाचा आहे आणि इस्लामच्या नावावर हिंसा करणे, विद्वेष करणे, हे तर महंमद पैगंबराच्या शिकवणुकीचा अवमान करणे आहे, असे त्यांचे मत होते. बादशाह खान यांच्या ‘खुदाई खिदमतगार’मध्ये एक लाखाहून अधिक अहिंसाव्रती सामील व्हावे, यावरूनच इस्लामचा शांतता व प्रेमाचा संदेश त्या प्रांतातील जहाल इस्लामपंथीयांना पटला होता, हे सिद्ध होते. गांधीजी आणि बादशाह खान दोघांना फाळणी मंजूर नव्हती; कारण धर्माच्या आधारावर देश तोडला जात होता आणि धर्मद्वेषातून हिंसेचा आगडोंब उसळू लागला होता. गांधीजींची १९४८ मध्ये ३० जानेवारीला हत्या झाली, तीसुद्धा त्याच विद्वेषाच्या वातावरणात. बादशाह खान यांचा गुरू, सहकारी, मित्र, सहाध्यायी, मार्गदर्शक गेला आणि गांधीवादी विचारांचा झेंडा बादशाह खान यांच्याकडे आला. पाकिस्तानला बादशहा खान यांचे तत्त्वज्ञान आणि ‘खुदाई खिदमतगार’चे कार्य मंजूर असणे शक्यच नव्हते. त्यांच्या दृष्टिकोनातून तो देशद्रोह-धर्मद्रोह-पाकिस्तानद्रोह होता. साहजिकच पाकिस्तानने त्यांच्यावर निर्बंध घातले आणि ब्रिटिशांनी जितका काळ त्यांना तुरुंगात डांबले नव्हते, तितका काळ पाकिस्तानने डांबले. गांधीजींच्या हत्येनंतर आपली प्रतिक्रिया देताना आइन्स्टाइन म्हणाले होते की, या भूतलावर असा एक माणूस होऊन गेला, असे पुढील पिढ्यांना कोणी सांगितले, तर त्यावर त्यांचा विश्वासही बसणार नाही. नेमके तेच विधान फ्रंटियर गांधींना अधिक प्रकर्षाने लागू आहे. सत्याग्रह आणि अहिंसा ही ‘शस्त्रे’ घेऊन बलाढ्य ब्रिटिश साम्राज्याला आव्हान देण्याचा ‘वेडेपणा’ सुचणा-या गांधीजींच्या आणि फ्रंटियर गांधींच्या चरित्राचा वेध कसा घेणार? पण, त्यांनी असे लाखो वेडे तयार केले. कॅनडियन-अमेरिकन चित्रपट दिग्दर्शिका टेरी मॅक्लुहान यांनी खान अब्दुल गफार खान उर्फ बादशाह खान उर्फ सरहद्द गांधी यांच्या जीवनावरील चित्तथरारक डॉक्युमेंटरी उर्फ चरित्रपट बनविला. मा.खान अब्दुल गफारखान यांचे निधन २० जानेवारी १९८८ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
‘मसीहा’ या त्यांच्या कादंबरीवरून त्याच नावाचे नाटकही उदय कला केंद्राने रंगभूमीवर आणले होते. आय कन्फेस, रोप ट्रिक यांसारख्या १३ एकांकिका त्यांनी लिहिल्या.
स्त्रियांच्या विशेषतः पतिता व विधवांच्या सर्वांगीण उध्दाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी.
लक्ष्मीबाई ऊर्फ अंबाबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे हे त्यांचे माता पिता तेव्हाच्या म्हैसूर संस्थानातील मंगलोर जवळ माहेरंजी येथे राहणार्या हया चित्तपावन ब्राम्हण दांपत्याच्या पोटी माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत रमाबाईच्या जन्म झाला. अनंत शास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे या मताचे ते होते. लक्ष्मीबाई व रमाबाईस त्यांनी वेदादींचे शिक्षण दिले. रमाबाई नऊ वर्षाच्या झाल्या, तरी त्यांचे लग्न करुन दिले नाही म्हणून ज्ञातिबांधवांनी त्यांना वाळीत टाकले.
बालविवाह, पुनर्विवाहास बंदी इ. घातक चालीरीती व दुष्ट रुढी यांतून समाजास मुक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी प्रथम पुणे येथे व नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इ. ठिकाणी ‘आर्य महिला समाजा‘ची स्थापना केली. स्त्रीधर्मनिती हे पुस्तक त्यांनी याच साली लिहिले. १८८३ साली सरकारी विद्याविषयक हंटर आयोगासमोर त्यांनी प्रभावी साक्ष दिली. मे १८८३ मध्ये स्त्रियांच्या उध्दाराकरिता अधिक प्रभावी कार्य करता यावे, म्हणून इंग्रजी भाषा व वैद्यक या विषयांच्या शिक्षणाकरिता त्या कन्या मनोरमेसह इंग्लंडला गेल्या. हा प्रवास खर्च त्यांनी स्त्रीधर्मनीती हया पुस्तकाताच्या विक्रीतून केला. इंग्लंडमध्ये त्या वॉटिंज गावच्या सेंट मेरी या मठात राहिल्या. येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांबाबतच्या दृष्टीकोनामुळे तसेच भूतदया व प्रेमाचे शिकवणीने त्या ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित झाल्या. परिणामतः २९ संप्टेंबर १८८३ रोजी वॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला.
आपल्या आश्रमातील स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, म्हणून रमाबाईनी शारीरीक श्रमाचे महत्व पटवून आश्रमातील स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इ. कामे शिकविली. मुक्तिसदना'त धान्य, भाजीपाला, फळफळावळ यांचे उत्पन्न मुलींच्या साहयाने काढण्यात येई. दुर्बल व आजारी लोकांकरिता सायं घरकुलाची व्यवस्था त्यांनी केली. १९१९ साली रमाबाईना त्यांच्या हया कार्याबद्दल कैसर ई हिंद हे सुवर्ण पदक मिळाले.
जन्म : २३ एप्रिल १८५८
मृत्यू : ५ एप्रिल १९२२
बाह्य दुवे :
दत्ता माने यांनी अभिनेता व मराठी दिग्दर्शक म्हणून काम केले. त्यांचा जन्म १९२२ रोजी झाला. त्यांनी आपल्या काळात १८ चित्रपट बनवले. काही नावे बाईसाहेब, मामा भाचे, कार्तिकी, कसे काय पाटील बरे आहे का?, पाटलाची सून.
दत्ता माने यांचे २९ ऑक्टोबर १९८० रोजी निधन झाले.
#DattaMane
संगणकक्षेत्रात एक विनोदाने प्रश्न विचारला जातो. “लॅरी एलिसन आणि देव यांच्यात काय फ़रक आहे?” यावर उत्तर,”देवाला आपण लॅरी एलिसन आहोत असं वाटत नाही.” यातूनच लॅरी एलिसन हा किती महत्वाकांक्षी माणूस होता याची कल्पना येईल. ओरॅकल नावाच्या त्याच्या कंपनीने मायक्रोसॉफ़्ट, आयबीएम अशा तगड्या कंपन्यांना धडकी भरेल अशी जबरदस्त मुसंडी मारली. विशेष करुन माहिती साठवायच्या म्हणजेच डेटाबेसेसच्या तंत्रज्ञानात तर अशी मुसंडी मारली की त्याच्यापुढे भल्याभल्यांनी हार मानली. सुमारे २७०० कोटी डॉलर्स इतकी प्रचंड संपत्ती असलेला हा माणूस २००० सालच्या “फ़ोर्ब्स” मासिकात बिल गेट्सच्या खालोखाल जगातील दुसर्या क्रमांकाचा सर्वात श्रीमंत माणूस म्हणून जागा मिळवून गेला.
राक्षसी महत्त्वाकांक्षा या नाटकातील वीरश्रीयुक्त विक्रांतची भूमिका, ‘संन्याशाचा संसार’मधील शंकराचार्यांची भूमिका, ‘सत्तेचे गुलाम’मधील केरोपंत वकिलाची भूमिका, ‘शहाशिवाजी’ नाटकात शहाजी, ‘कृष्णार्जुन युद्धात’ चित्ररथ गंधर्व, ‘हाच मुलाचा बाप’मध्ये वसंत, ‘श्री’ या नाटकातील कुसुमाकर, ‘सोन्याचा कळस’ नाटकातील कामगार बाबा शिगवण इ. भूमिका तर खूपच गाजल्या, पण ‘पुण्यप्रभाव’मधील वृंदावन, ‘एकच प्याला’मधील सुधाकर, ‘झुंजारराव’ नाटकातील झुंजारराव आणि ‘हॅम्लेट’ या भूमिका त्यांच्या सर्वोच्च भूमिका होत.
Copyright © 2025 | Marathisrushti