(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जागतिक दृष्टीदान दिवस – १० जून

    अनेक अंध व्यक्तींचे जीवन प्रकाशमय करणारे डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ साजरा होणारा दृष्टिदान दिवस आज साजरा होत आहे. डोळ्यात दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधारातून उद्याच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या व्यक्तींना नेत्रदानाच्या माध्यमातून हे जग सुंदर आहे़ याची प्रचिती देण्याची प्रेरणा देणारा हा दिवस आहे. शासकीय सेवेत नेत्रचिकित्सक म्हणून अहोरात्र झटणाऱ्या डॉ. रामचंद्र यांचे नाव महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर आहे.

  • ज्येष्ठ समालोचक सुरेश सरैया

    १९६५ सालापासून प्रथमश्रेणी आणि १९६९ सालापासून क्रिकेटचे धावते समालोचन करणाऱ्या सुरेश सरैयांनी शंभर हून अधिक कसोटी सामन्यांत समालोचन केले होते.

  • मोगूबाई कूर्डीकर

    मोगूबाई कूर्डीकर

    स्व.मोगूबाई कुर्डीकरांचा जन्म १४ जुलै १९०४ रोजी गोव्यातील कुर्डी गावात झाला. लहानपणापासूनच घरातील संस्कार व आई जयश्रीबाई यांची शास्त्रीय गाण्याची तळमळ मोगूबाईंना गानतपस्विनी होऊनच शांत झाली असेल.

  • डॉ. कृष्णमेघ कुंटे

    मदुमलाईच्या जंगलात रानकुत्रे आणि हत्तींचा मागोवा घेत त्याने केलेली शोधयात्रा वाचकांच्या लक्षात आहे. 'रानवेडा' होऊन जंगलात 'शोधयात्रा' करणारे डॉ. कृष्णमेघ कुंटे आज विख्यात आहेत ते फुलपाखरांच्या संशोधनामुळे. सध्या ते बेंगळुरच्या जीवशास्त्रसंशोधन संस्थेत मुख्य संशोधक आहेत.

    रानवेडा !

  • चेतन कांबळे

    चेतन जनार्दन कांबळे यांची आजवरची वाटचाल म्हणजे माहितीचा अधिकार, न्यायालयीन लढाई आणि रस्त्यावरचा संघर्ष अशा तिन्ही मार्गांनी झगडत राहणे. औरंगाबादच्या भावसिंगपुरा या खेड्यातील या तरुणाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या त्रिसूत्रीवर ठाम विश्वास आहे.

  • मराठीतील ज्येष्ठ संगीतकार आनंद मोडक

    आनंद मोडक यांनी रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत आपल्या संगीताने ठसा उमटविला होता. त्यांचा जन्म १३ मे १९५१ रोजी झाला. ‘महानिर्वाण’, ‘तीन पैशाचा तमाशा’, ‘बेगम बर्वे’, ‘महापूर’, ‘पडघम’, ‘वाडा चिरेबंदी’ या नाटकांच्या आशयाला त्यांच्या संगीताने वेगळ्याच उंचीवर नेले होते. ‘२२ जून १८९७’, ‘कळत नकळत’, ‘सूर्योदय’, ‘चाकोरी’, ‘चौकट राजा’, ‘एक होता विदूषक’, ‘मुक्ता’, ‘दोघी’, ‘सरकारनामा’, ‘पाश’, ‘फकिरा’, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’, ‘आरंभ’, ‘धूसर’, ‘यशवंतराव चव्हाण’, ‘खैरलांजीच्या माथ्यावर’ या चित्रपटातील संगीतही रसिकांकडून तसेच समीक्षकांकडून अतिशय वाखाणले गेले.

    ‘एक झोका, चुके काळजाचा ठोका’, ‘जाई जुईचा गंध मातीला’, ‘युगा युगांचे नाते आपुले’, ‘श्रावणाच ऊन मला झेपेना’, ‘हे जीवन सुंदर आहे’, ‘तू तलम अग्नीची पात’, ‘वळणवाटातल्या मातीत हिरवे गंध’, ‘मना तुझे मनोगत मला कधी कळेल का’, ‘नाकावरच्या रागाला औषध काय’ ही त्यांची गाणी आजही रसिकांच्या मनात दरवळत आहेत. आनंद मोडक यांचे २३ मे २०१४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • ऑलिव्हर स्टोन

    मुंबईत लागोपाठ दोन चित्रपट पुरस्कार पार पडले. 'मामि' पुरस्कारात आंतरराष्ट्रीय पातळीव ताज्या चित्रपट प्रवाहांचे दर्शन घडले. तर आशियाई चित्रपट पुरस्कारात आशिया खंडातील चित्रपट वैविध्याने स्तिमित केले. 'मामि'मध्ये हॉलीवूडमधील ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक-लेखक ऑलिव्हर स्टोन यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले तर आशियाई चित्रपट पुरस्कार अर्थात 'थर्ड आय'मध्ये श्याम बेनेगल यांचा सन्मान करण्यात आला. स्टोन आणि बेनेगल यांचा काळ साधारणतः एकच आहे. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात बेनेगलांनी समांतर चित्रपटांच्या चळवळीला भक्कम आधार दिला, त्याच काळात ऑलिव्हर स्टोन यांनी हॉलीवूडमधील मुख्य प्रवाहातच घुसखोरी करून 'मेन स्ट्रीम'मध्येच संवेदनशील चित्रपट दिले. एक प्रकारे भारतीय व अमेरिकन चित्रपटसृष्टीतील विचारसरणीमधील फरकच यातून स्पष्ट होतो. न्यूयॉर्कमध्येच १५ सप्टेंबर १९४६ रोजी जन्मलेल्या ऑलिव्हर स्टोनने 'हॉलीवूड'मध्ये राहूनही चित्रपटांकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन स्वीकारला नाही. तीन ऑस्कर पुरस्कार मिळविताना त्याने स्वतःची राजकीय मतेही त्यात ठोसपणे मांडली.
    व्हिएतनाम युद्धात स्वतः भाग घेतलेल्या स्टोनने या युद्धाच्या वेगवेगळ्या पैलूंवर तीन चित्रपट बनविले. त्यातील 'प्लॅटून' या त्याच्या पहिल्याच आत्मचरित्रात्मक चित्रपटाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली. पाठोपाठ त्याने 'बॉर्न ऑन द फोर्थ जुलै' हा चित्रपट दिला. 'हेवन ॲण्ड अर्थ' मध्येही व्हिएतनाम युद्धातील ससेहोलपटीचे चित्रण होते.

    फ्रान्स, अमेरिकन सैन्याशी लढतानाच अनेकांना व्हिएतनामी लष्कराच्या अत्याचाराचाही सामना करावा लागला होता. 'हेवन ॲण्ड अर्थ'मध्ये स्टोनने अशाच एका तरूणीची व्यथा चितारली होती. युद्धाचे चित्रण करताना त्याने अनेकदा वास्तववादी, 'डॉक्युमेण्ट्री स्टाइल' स्वीकारण्याचे धाडस केले. त्यामुळे व्हिएतनाम युद्धावरील त्याचे चित्रपट

    पाहताना, अनेकदा प्रत्यक्ष युद्धाचेच 'खरेखुरे फुटेज' पाहतो आहोत, असे वाटते. शोधपत्रकारितेची शैली आणि वृत्ती स्टोनच्या चित्रपटांमध्ये 'जेएफके'च्या वेळीही याचा प्रत्यय आला. जॉन एफ. केनेडी यांच्या दिसते. हत्येपूर्वी घडलेल्या घटनांचा, हत्येच्या योजनाबद्ध तयारीचा मागोवा स्टोनने या चित्रपटात घेतला होता. हा चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच मोठा वाद निर्माण केला गेला. परंतु ही सर्व टीका मागे सारून चित्रपटाने मोठे यश मिळविले आणि पटकथालेखनाची एक वेगळी शैली स्थापित केली; परंतु 'डॉक्युमेण्ट्री स्टाइल' चे वैशिष्ट्य मात्र यातही कायम राखले होते. यातून बाहेर पडून त्यांनी प्रयत्न केला तो 'वॉल स्ट्रीट'मध्ये. 'ग्रेट डिप्रेशन' अर्थात अमेरिकेतील आर्थिक मंदीच्या काळातील एका तरूण शेअर दलालाची कथा हा चित्रपट सांगतो. यशासाठी आसुसलेला हा तरूण त्याचा आदर्श असलेल्या गॉर्डन गेक्कोकडे जातो. त्यानंतर

    या दोघांमधील संबंध आणि शेअर बाजारातील विविध प्रवृत्ती यातून चित्रपट घडतो. ऑलिव्हर स्टोनने हा चित्रपट आपल्या वडिलांची व्यक्तिरेखा समोर ठेवून केला होता, असे म्हणतात. 'ग्रीड, फॉर लॉक ऑफ अ बेटर वर्ड इज गुड' असं म्हणणाऱ्या मायकेल डग्लस या त्याच्या व्यक्तिरेखेकडून स्फूर्ती घेऊन अनेक तरुण शेअर मार्केटकडे वळले. 'वॉल स्ट्रीट'चा दुसरा भाग 'वॉल स्ट्रीट-मनी नेव्हर स्लिप्स' अलीकडेच प्रदर्शित झाला. चार दशकांच्या कारकीर्दीत स्टोनने लेखक-दिग्दर्शक म्हणून वैविध्यपूर्ण कामगिरी केली आहे. 'कॉनन द बार्बरियन' सारखा एरवी त्याच्या प्रकृतीचा न वाटणारा चित्रपटही त्याने समर्थरीत्या लिहिला होता. या सर्व काळात वाद, वादंग सतत त्याचा किंवा तो स्वतःच त्यांचा पिच्छा पुरवित राहिले. 'दुसऱ्या महायुद्धात ज्यूंच्या झालेल्या हत्याकांडावर खूप चित्रपट आले, कारण अमेरिकेत ज्यूंची लॉबी आहे', 'असे विधान स्टोनने केले, त्यामुळे गदारोळ उठला. अखेर स्टोनने दिलगिरी व्यक्त केली. अशा अनेक वादांचा सामना करीत, वैयक्तिक आयुष्यातील वादळे झेलत स्टोनने दिग्दर्शक म्हणून केलेली कामगिरी अजोड आहे.

  • गौरी देशपांडे

    गौरी देशपांडे या लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्पुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत.

  • धनंजय कुलकर्णी

    धनंजय कुलकर्णी यांचा जन्म ६ एप्रिल १९६२ रोजी सोलापुर येथे झाला. त्यांचे शिक्षण सुरवातीला सोलापूर, महाबळेश्वर व पुणे येथे झाले. बी. एस्सी. झाल्यावर सुरवातीला काही काळ त्यांनी बॅंकेत नोकरी केली.

  • ज्येष्ठ संपादक पत्रकार आणि साहित्यिक उत्तम कांबळे

    उत्तम कांबळे यांनी १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समाज’मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत असत. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ते ‘फिरस्ती’ नावाचे सदर लिहीत असत. त्यांतल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणार्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत.