जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सुचित्रा सेन यांचे विवाहाआधीचे नाव रमा दासगुप्ता असे होते. त्यांचा जन्म ६ एप्रिल १९३१ रोजी झाला. किमान तीन दशके तरी आपल्या सौंदर्याबरोबरच, सशक्त अभिनयाने सुचित्रा सेन या बंगाली चित्रपटाच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वाच्या साक्षीदार ठरल्या. अग्निपरीक्षा, देवदास, सात पाके बंधा हे त्यांचे बंगाली चित्रपट विशेष लक्षात राहिले. हरणासारखे नेत्रसौंदर्य (मृगनयनी) लाभलेल्या सुचित्रा सेन यांनी सत्तरच्या दशकात चित्रपटसृष्टी सोडली. नेहमी सार्वजनिक जीवनात मिसळणे टाळणाऱ्या सुचित्रा सेन या बंगालच्या ‘ग्रेटा गाब्रो’ म्हणून प्रसिद्ध होत्या. कन्नन देवी यांच्यानंतर बंगालमधील एकाही अभिनेत्रीला सुचित्रा सेन यांच्याइतके चाहते मिळाले नाहीत. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की दुर्गापूजेच्या वेळी दुर्गा, लक्ष्मी व सरस्वती यांच्या प्रतिमा सुचित्रा सेन यांच्या चेहऱ्यावर बेतल्या जात असत. ‘शेष कोठाई’ या चित्रपटापासून त्यांनी १९५२ मध्ये सुरुवात केली व नंतर बिमल रॉय यांच्या १९५५ मधील ‘देवदास’ या चित्रपटात त्यांना दिलीपकुमारच्या देवदासबरोबर साकारलेल्या पारोच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. बंगाली अभिनेते उत्तम कुमार यांच्याबरोबर त्यांची चांगली जोडी पडद्यावर जुळली. त्यांचे हारनो सूर (१९५७), अग्निपरीक्षा (१९५४), सप्तपदी (१९६१), ग्रिहदाह (१९६७), इंद्राणी (१९५८), सागरिका (१९५६), बिपाशा (१९६२), कमल लता (१९६९), अलो आमार अलो (१९७२), हर मन हर (१९७२) व प्रियो बंधाबी (१९७५) हे चित्रपट संस्मरणीय ठरले. त्यांनी ५२ बंगाली तर ७ हिंदी चित्रपट केले. भारतभूषणबरोबरचा चंपाकली, देव आनंदबरोबर सरहद, बंबई का बाबू यासह ममता हा एक चित्रपटही त्यांनी केला होता. १९७४मध्ये त्यांनी ‘देवदास’नंतर गुलजार यांच्या ‘आँधी’ चित्रपटाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. संजीव कुमार यांच्यासमवेत त्यांनी जी भूमिका केली होती, त्यात त्यांची भूमिका ही इंदिरा गांधी यांच्या जीवनाशी मिळतीजुळती होती त्यामुळे तेव्हा वाद निर्माण झाला होता. १९७८ मध्ये त्यांनी सौमित्र चटर्जी यांच्याबरोबर ‘प्रणोय पाश’ हा चित्रपट केला. तो पडला. त्यानंतर सुचित्रा सेन कधीच कुणाला दिसल्या नाहीत व २००५ मध्ये त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार नाकारला होता. यशस्वी कारकिर्दीनंतर अचानक त्या एकाकी आयुष्य जगू लागल्या होत्या. आपल्या घरातच त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले होते. २००५ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. त्यांना भारत सरकार कडून पद्मश्री आणि बंगाल सरकार कडून बंगबिभूषण हे पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. मा.सुचित्रा सेन यांचे निधन १७ जानेवारी २०१४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
भारतीय चित्रपटसृष्टीतील एके काळची आघाडीची साहाय्यक अभिनेत्री नादिरा ह्या मूळच्या बगदादच्या, एका ज्यू कुटुंबातली. जन्म बगदादमध्ये. फरहान इझिकेल (नादिरा) ह्या फ्लोरेन्स या नावाने अधिक ओळखली जायच्या. त्यांचा जन्म ५ डिसेंबर १९३२ रोजी झाला. ‘मुड मुड के ना देख मुड मुड के गर्ल’ या लोकप्रिय नावाने ओळखल्या गेलेल्या नादिरा यांनी एकूण ६३ हिंदी चित्रपटांत भूमिका करून १९५० ते १९६० हे दशक गाजविलं. नादिरा या दिग्दर्शक मेहबूब खान यांची पत्नी सरदार बेगम हिची मत्रीण होत्या. त्यांच्या आग्रहामुळे नादिरा या मुंबईत वयाच्या १९ व्या वर्षी दाखल झाल्या आणि आवारासाठी मा.नर्गिस यांनी आन चित्रपटावर वर पाणी सोडल्यानंतर मेहबूब खान यांनी त्यांच्या ‘आन’ या चित्रपटात एका फरहान इझिकेल या फिल्मी क्षेत्रात अगदी नवख्या असलेल्या बगदादी ज्यू मुलीची निवड केली व तिलाच ‘नादिरा’ या नावाने स्टार बनविण्याचा निर्धार केला. त्याकाळी अभिनेत्री सोज्वळ भूमिका साकारायला प्राधान्य देत होत्या,मात्र नादिरा यांनी बोल्ड आणि नकारात्मक भूमिका साकारणे पसंत केले. ‘आन’मधील एका राजपूत राजकन्येच्या तिच्या भूमिकेनंतर त्यांच्यावर साहाय्यक खलनायिकेचा शिक्का बसला. नादिरा यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये दिलीप कुमार, देव आनंद, शम्मी कपूर, भारत भूषण, राज कपूर, प्रदीप कुमार या सर्व दिग्गज अभिनेत्यांबरोबर काम केले. 'आन' या सिनेमात नादिरा दिलीप कुमार यांच्याबरोबर झळकल्या. तर 'पॉकेटमार'मध्ये त्यांचे हीरो होते देव आनंद. राज कपूर यांच्या 'श्री 420' मध्ये नादिरा यांनी माया हे वेगळ्या धाटणीचे पात्र साकारले होते. अशोक कुमार यांच्यासह नगमा, शम्मी कपूर यांच्यासह सिपहसालर, प्रदीप कुमार यांच्यासह 'पुलिस' आणि भारत भूषणसह 'ग्यारह हजार लडकियां' या सिनेमांत नादिरा यांनी काम केले. 1954 साली नादिरा यांनी गायक-अभिनेता तलत महमूदसह 'डाक बाबू' आणि 'वारिस' या दोन सिनेमांत काम केले. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. विशेष गोष्ट म्हणजे या सिनेमांत नादिरा यांनी तलत महमूदसह गाणीसुद्धा गायली. तब्बल तीस वर्षे नादिरा यांनी सिनेसृष्टीत काम केले. नादिरा यांनी इस्माइल मर्चंट यांच्या 'काटन मॅरी' (1999) या हॉलिवूड सिनेमातसुद्धा अभिनय केला. ‘आन’, ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘दिल अपना प्रीत पराई’, ‘ज्यूली’, ‘सागर’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय झाल्या. यापकी ‘श्री ४२०’, ‘पाकिजा’, ‘ज्यूली’ या चित्रपटांतील तिच्या भूमिकांमुळे त्यांना सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्रीचे फिल्मफेअर पुरस्कार मिळाले. ‘श्री ४२०’ मधील ‘मुड मुड के ना देख मुड मुड के’ या गाण्याने आणि ‘ज्यूली’तील मार्गारेट ऊर्फ मॅगीच्या भूमिकेने नादिरा यांना लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. नादिरा यांच्या वेगळ्या, पाश्चिमात्य व्यक्तिमत्त्वामुळे इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळेपण उठून दिसे. २००० साली प्रदíशत झालेला ‘जोश’ हा नादिरा यांचा अखेरचा चित्रपट. दोन वेळा लग्न करून घटस्फोट झालेल्या नादिराचे मुंबईतील सर्व नातेवाईक इस्रायलमध्ये स्थायिक झाल्याने म्हातारपणी नादिराच्या नशिबी एकटेपणा आला. विविध विषयांच्या वाचनाची आवड असलेल्या नादिराच्या खासगी ग्रंथसंग्रहात शेक्सपियर, विवेकानंद, हिटलर, ज्युडाइझम, दुसरे विश्वयुद्ध आणि तत्त्वज्ञानविषयक विपुल पुस्तके होती. हिंदी चित्रपटसृष्टीत नादिरा ह्या स्वत:कडे रोल्सराइस असलेली पहिली अभिनेत्री. मा.नादिरा यांचे ९ फेब्रुवारी २०१३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
माणसाचे अक्षर हा त्याचा मनाचा आरसा असतो असं म्हणतात. आपल्या हस्ताक्षरावर आपलं मन कसं आहे हे खरोखरच कळतं का? असा प्रश्न कुणी विचारला तर त्याला उत्तर होय असंच येईल;
१९९९ मध्ये शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यावेळी रामराजेंनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते महसूल राज्यमंत्री झाले. २००४ मध्ये ते कॅबिनेट मंत्री व साताऱ्याचे पालकमंत्री झाले.
१९५३ मध्ये पंतप्रधानांनी फरीदाबाद शहराची नव्याने नियोजन करून उभारणी करण्याचे काम त्यांच्यावर सोपवले. नंतर चिंतामणराव देशमुख यांनी त्यांना अर्थखात्याच्या कामासाठी बोलावून घेतले. या काळात आंतरराज्य विक्रीकर कायदा, खासगी विमा कंपन्यांचे LIC मध्ये विलीनीकरण झाले. पुढे १९५७ मध्ये ते PWD चे सचिव झाले. या काळात कोयना धरण बांधायला जागतिक बँकेकडून कर्ज घेण्यासाठी अर्थखात्याचे प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेला गेले, कोयना धरणासाठी त्यांनी अडीच कोटी डॉलर्सचे कर्ज मंजूर करून घेतले.
सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते.
गीतिका वर्दे य अखिल भारतीय रेडिओच्या A श्रेणीतील कलाकारांपैकी एक आहेत. सूर श्रृंगार संसद कडून त्यांना ‘सूरमणी’ या पदवी मिळाली आहे.
१९३६ साली मामा पेंडसे यांनी ’रमेश नाटक मंडळी’त प्रवेश मिळवला. त्यांच्या ’आग्र्यायहून सुटका’ या नाटकात केलेल्या कामामुळे मामांचे नाव सर्वमुखी झाले.
प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिध्द असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत रमेश मंत्री यांनी विपूल लेखन केले आहे. त्यांची शंभरपेक्षाही जास्त पुस्तके प्रकाशित झालेली आहेत.
राणी वर्मा या माणिक वर्मा यांच्या कन्या. राणी वर्मा यांनी वयाच्या ७ व्या वर्षापासून प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांच्या ‘गीत गोपाळ’ या कार्यक्रमातून प्रथम रंगमंचावर पदार्पण केल्यानंतर त्यांनी अनेक नामवंत गायकांसोबत गाण्याचे कार्यक्रम सादर केले. ‘हे राष्ट्र देवतांचे’, ‘पप्पा सांगा कुणाचे’, ‘गा गीत तू सतारी’, ‘मीरा तुला आळवीते’, ‘तुला आळविता जीवन स्वराचे’, ‘संपले स्वप्न हे’ अशा अनेक सुरेल लोकप्रिय गाण्यातून त्या रसिकांमध्ये लोकप्रिय झाल्या. ‘सूर सिंगार पुरस्कार’, ‘गोल्ड स्पॉट संगीत पुरस्कार’ अशा स्पर्धा तसेच आंतर महाविद्यालयीन संगीत स्पर्धांमधून त्यांनी नेहमीच प्रथम क्रमांकाची बक्षिसे मिळवली. राणी वर्मा यांची लहान मुलांची गाणी असलेले ‘अडम तडम तड तड बाजा’ ही कॅसेट तर आजही मुलांमध्ये लोकप्रिय आहे. ‘सप्तक’ या त्यांच्या ऑर्केस्ट्राचे देश-परदेशात अनेक दौरे करून त्यांनी लोकांना आपल्या मधुर स्वरांनी मंत्रमुग्ध केले. केवळ गायिका म्हणूनच नव्हे तर त्यांनी पहिली ‘महिला ध्वनीमुद्रक’ म्हणूनही मान मिळावला आहे. राणी वर्मा यांनी ‘फॅमिली कट्टा’ चित्रपटाद्वारे चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात पाउल टाकले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti