जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कोल्हापूरला पुरोहित कुटुंबात जन्मलेल्या शंकरराव व्यास यांच्या वडीलांना संगीताची आवड होती. त्यांचा जन्म २३ जानेवारी १८९८ रोजी झाला. शंकरराव व्यास यांच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले. नंतर आपले काका श्रीकृष्ण सरस्वती यांच्या कडे शिक्षणासाठी गेले. त्याच काळात पण्डित विष्णु दिगम्बर पलुसकर हे संगीत प्रचारासाठी भारतभर फिरत होते. शंकरराव व्यास यांची संगीताची आवड बघून पलुसकर यांनी त्यांना आपल्या बरोबर घेतले. पलुसकर यांनी स्थापन केलेल्या गंधर्व विद्यालयात ९ वर्ष शिक्षण घेतले. नंतर ते अहमदाबाद येथील राष्ट्रीय विद्यालय येथे शिक्षक झाले. पलुसकर यांनी लाहोर येथे स्थापन केलेल्या गंधर्व विद्यालयात प्राचार्य म्हणून गेले. १९३८ मध्ये शंकरराव व्यास हिन्दी फिल्म संगीतच्या क्षेत्रात काम करण्यास सुरवात केली. १९३८ मध्ये आलेल्या ‘पूर्णिमा’ या चित्रपटात काही गाणी गायली. गायना बरोबर चित्रपटातील रचना त्याच्या गाजू लागल्या होत्या. व्यास यांच्या संगीतबद्ध, भक्ति प्रधान गाणी लोकांना आवडू लागली होती १९४० मध्ये ‘सरदार’, ‘नरसी भगत’ व १९४२ मध्ये ‘भरतमिलाप’ या चित्रपटातील गाणी खूप गाजली. १९४३ मध्ये ‘रामराज्य’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
रामराज्य’चे दिग्दर्शक विजय भट्ट महात्मा गांधींना ‘रामराज्य’ दाखवायला घेऊन आले होते, पण राम रामासारखा दिसत नाही आणि सीता ही सीतेसारखी वाटत नाही म्हणत एक-दोन रिळे पाहून गांधीजी निघून गेले. महात्मा गांधींनी आयुष्यात पाहिलेला हा एकमेव चित्रपट म्हणून ‘रामराज्य’ची खूप पब्लिसिटी झाली. सीतेच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या धोबिणीची भूमिका पाश्र्वगायिका अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकीने केली होती. लव यशवंत निकम तर कुश मधुसूदन होते. प्रभातच्या ‘संत ज्ञानेश्वर’मध्ये याच यशवंताने बाल ज्ञानेश्वराची भूमिका केली होती. मन्ना डे यांनी हिंदी व मराठी या दोन्ही चित्रपटांत पाश्र्वगायन केले होते. हा चित्रपट गाजला तो शंकरराव व्यास यांच्या सुमधुर संगीतामुळे! विशेषत: रंजनावर चित्रित झालेल्या व सरस्वती राणे यांनी गायिलेल्या भीमपलासी रागातील ‘बीना मधुर मधुर कछु बोल’ या गाण्यामुळे! असा भीमपलासी गेल्या सत्तर वर्षांत परत कधी ऐकायला मिळाला नाही. त्यांना विजय भट यांच्या ‘रामराज्य’ या चित्रपटात पार्श्वगायनाची संधी दिली. खरे तर हे गाणे के. सी. डे यांनी म्हणावे अशी संगीत दिग्दर्शक शंकरराव व्यास यांची इच्छा होती. पण के. सी. यांनी मन्नादांचे नाव सुचविले.
मन्नादांचा आवाज व्यास यांना आवडला. या चित्रपटाचे संगीतकार होते शंकरराव व्यास. या चित्रपटातील राग वर आधारित गाणी खूप लोकप्रिय झाली होती, ‘भारत की एक सन्नारी की हम कथा सुनाते हैं...’ ‘वीणा मधुर मधुर कछु बोल...’। शंकरराव व्यास यांनी ही दोन्ही गाणी राग काफी व भीमपलासी मध्ये रचली होती. व्यास यांची कुशलता केवळ फिल्म संगीत मध्ये नव्हती तर त्यांनी शास्त्रीय गायन, संगीत शिक्षण और ग्रन्थकार म्हणून काम केले. फिल्म के साथ कई उल्लेखनीय तथ्य जुड़े हुए हैं, जिनमें शंकरराव व्यास यांनी पार्श्वगायक मन्ना डे यांच्या कडून ‘रामराज्य’ चित्रपटातील गाणी गावून घेतली होती. शंकरराव व्यास यांचे १७ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
जयाप्रदा यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलगू सिनेमाद्वारे केली होती. त्यांचा जन्म ३ एप्रिल १९६२ रोजी झाली.वयाच्या १४ व्या वर्षी जयाप्रदा यांना आपल्या शाळेतील डान्स प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यांचे नृत्य बघून एक दिग्दर्शक प्रभावित झाले होते. त्यांनी भूमिकोसम या सिनेमात त्यांना नृत्य सादर करण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही. त्यानंतर आईवडिलांच्या म्हणण्यावरुन त्यांनी ही ऑफर स्वीकारली. या सिनेमासाठी जयाप्रदा यांना केवळ १० रुपये मानधन मिळाले होते. १९७९ सालीआलेल्या 'श्री श्री मुवा' या सिनेमाचा हिंदी रिमेक असलेल्या 'सरगम' या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे जयाप्रदा यांना एका रात्रीत स्टारडम मिळाले. त्यानंतर मात्र रिलीज झालेले काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. कामचोर या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना नशीबाने साथ दिली. हा सिनेमा यशस्वी ठरला. बॉलिवूड सिनेमांमुळे मा.जयाप्रदा यांना खरी ओळख प्राप्त झाली. बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये जयाप्रदा यांची गणना व्हायची. अमिताभ बच्चन, जितेंद्र यांच्यासोबतची त्यांची जोडी चांगली गाजली. मा.जयाप्रदा यांनी विवाहित श्रीकांत नाहटा नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. श्रीकांत नाहटा हे निर्माते आहेत. या लग्नावरुन बराच वाददेखील निर्माण झाला होता. सिनेमात उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणा-या जयाप्रदा यांचा राजकारणातील प्रवेशदेखील चर्चेत राहिला. सिनेमासोबतच राजकारणातदेखील त्यांनी नाव कमावले. तेलगू देशम पक्षाद्वारे त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
जयाप्रदा यांची गाणी
https://www.youtube.com/watch?v=ARKnsS541g8
ग.रा.कामत यांनी मराठीत राजा परांजपे, राजा ठाकूर यांच्या चित्रपटासाठी काम केले. त्यांनी लिहिलेले ‘पेडगावचे शहाणे’, ‘शापित’ हे मराठी चित्रपट खूप गाजले.कन्यादान हा त्यांचा आणखी एक गाजलेला मराठी चित्रपट. ‘सावरकर’ चित्रपटाचेही सुरवातीचे लेखन त्यांनी केले होते, द.ग.गोडसे आणि म.वि.राजाध्यक्ष यांच्या लेखांचं संकलन व संपादन केलेले ‘शमानिषाद’ हे कामत यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.
मनोहारी सिंग यांचे घराणे वादकांचेच असल्यामुळे बालपणापासून त्यांच्यावर संगीताचे संस्कार झाले. त्यांची वाद्यवादनाची सुरुवात पाश्चात्त्य बासरी (क्लॅरोनेट) आणि मेंडोलीन या वाद्यांपासून झाली. अखेर सॅक्सोफोन या वाद्याला त्यांनी आपलेसे केले व त्यावर हुकूमत मिळविली.
श्रीकेक्षी यांनी अनेक जणांशी वाङ्मयीन वाद केले. ती एकप्रकारे वाङ्मय चळवळ ठरली होती. ‘ श्रीकेक्षी : एक वाङ्मयीन लेखसंग्रह ‘ ह्या पुस्तकांमध्ये त्यांनी केलेलं अनेक वाङ्मयीन वाद वाचावयास मिळतात.
पंडितांच्या बहुतेक कविता मुक्तच्छंदात्मक आहेत. गावड्यांच्या कोकणीत लिहिलेल्या त्यांच्या काही कवितांत जोष-जोम आहे. गरीबदुबळ्यांवर होणाऱ्या अन्यायाला ते आपल्या काव्यातून वाचा फोडतात, गोमंतकाचे सृष्टिसौंदर्य मोठ्या कौशल्याने वर्णितात, तर कधीकधी हळुवारपणे आपल्या प्रेमकाव्यातून विरहाची व्यथाही व्यक्त करतात. संपन्न शब्दभांडार, सहजसुंदर व परिणामकारक शैली, प्रतिमांचा मनोहर विलास, विचारांची घार व भावनेची उत्कटता यांमुळे त्यांच्या काव्याला एक आगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.
कृषी आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण महाराष्ट्राला समृद्धीच्या वाटेवर नेण्यासाठी सदैव प्रयत्नरत असणारे नेते.
पहिल्यापासून चित्रावर एस. फडणीस अशी इंग्रजी अक्षरे नोंदवणाऱ्या शि. द. फडणीस यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन जेव्हा इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ कार्टूनिस्टने बंगलोर येथे भरवले, तेव्हा ते मराठी आहेत की नाहीत, याचा तपास करण्याची गरज तेथील रसिकांना वाटली नाही. त्यांनी ती चित्रे मनापासून पाहिली आणि त्यांना दाद दिली. तसे पाहिले तर शिदंना व्यंगचित्रकार व्हायचेच नव्हते.
१९४४ साली जेव्हा ते मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये दाखल झाले, तेव्हा त्यांनी ‘कमर्शिअल आर्ट’ हा अभ्यासक्रम निवडला होता. चित्रकलेतील व्यावसायिकता जाणून त्यामध्येच करिअर करण्याची त्यांची इच्छा होती. दीनानाथ दलाल यांच्यासारख्या त्या काळातील चित्रकाराची मुद्रा मनावर असली, तरीही आपल्याला काही वेगळे करायचे आहे, असे न ठरवता फडणीस व्यंगचित्रकार झाले. १९४५ पासून व्यंगचित्रे काढताना ती नि:शब्द असतील, याची काळजी त्यांनी घेतली. केवळ रंग, रेषा आणि परिसर याच्या आधारे मानवी स्वभावातील विनोद त्यांना दिसू लागला. हौसेहौसेने तेव्हापासून सुरू झालेल्या या व्यंगचित्रकलेचा हीरक महोत्सवही होऊन गेला. तरीही त्यातील ताजेपणा, टवटवीतपणा आणि निर्विषता जराही कमी झाली नाही. फडणीसांच्या चित्रांचे वैशिष्टय़च हे की, नि:शब्द आणि निर्विष विनोदाची पखरण ते आपल्या रंग, रेषांमधून करत राहिले. सुरुवातीच्या काळात काढलेल्या चित्रांना प्रकाशनाची वाट मिळणे अवघड असे. स्वत: उत्तम चित्रकार असलेल्या किलरेस्कर मासिकाचे संपादक शं. वा किलरेस्कर यांनी फडणीसांना प्रथम जगापुढे आणले. त्याच काळात सुरू झालेल्या ‘हंस’ या मासिकाचे संपादक अनंत अंतरकर यांनी आयोजित केलेल्या एका स्पर्धेत शिदंनी पाठवलेल्या व्यंगचित्राला पारितोषिकही मिळाले. चित्राला मिळालेली ही संपादकीय पावती, त्यांच्यासाठी नेहमीच मोलाची ठरली. त्यांना मिळालेल्या ‘हंस’ पुरस्काराने सद्गदित होणे हा त्यांच्यातील कलावंत असण्याचा परिणाम आहे. ज्या काळात पुस्तके केवळ शब्दांसाठीच छापली जायची, त्या काळात फडणीसांनी पुस्तकांना चित्रांचा चेहरा दिला. ती पुस्तके देखणी केली आणि वाचकांना चित्रे वाचायचीही असतात, याची जाणीव करून दिली. एखाद्या जाहिरात संस्थेत आर्ट डायरेक्टर होण्याची शक्यता नाकारून व्यंगचित्रकार म्हणून करिअर करायचे ठरवले, तेव्हा फडणीसांना या कलेतील सर्जनशीलता आणि त्यातील आव्हानांची जाणीव झाली. गेली सहासष्ट वर्षे हा चित्रकार स्वत: काहीही न बोलता आणि चित्रातही शब्द न वापरता गुदगुल्या करतो आहे. जगातल्या कोणत्याही भाषकाला समजणाऱ्या या विनोदाने चित्रकलेतील आणि विनोदातील दालन समृद्ध केले आहे. एरवी सभासमारंभात फार कमी भाग घेणारे फडणीस आपल्या स्टुडिओत असतात, तेव्हा त्यांची सर्जनशीलता त्यांना साद घालत असते. समाजाचे निरीक्षण जेव्हा त्यांच्या कुंचल्यातून व्यक्त होते, तेव्हा पाहणाऱ्याच्या चेहऱ्यावर उमटणारी स्मितरेषा हेच पारितोषिक ठरते. अशा कितीतरी पारितोषिकांचे ते धनी आहेत!
---------------------------------------------------------------------------------------
फडणीस, शिवराम दत्तात्रय
२९ जुलै १९२५
१९२५> “हसरी गॅलरी” हे हास्यचित्रांच स्वतंत्र पुस्तक साकार करुन नर्मविनोदाची नवी रेषा-भाषा घडविणारे ज्येष्ठ चित्रकार शिवराम दत्तात्रेय फडणीस यांचा जन्म. चिमुकली गॅलरी, मिश्किल गॅलरी या संग्रहांसह मुलांसाठी दोन खास पुस्तके त्यांनी लिहिली. त्यांचे “रेषाटन” हे त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. कित्येक मासिके व पुस्तकांची मुखपृष्ठे आतील चित्रे करणार्या फडणीस यांनी काही काळ बालभारतीसाठी गणित विषयाच्या पुस्तकांना (इ.१ ते ४) चित्रांचे नवे परिणाम दिले, हे उल्लेखनीय आहे.
१९६० ते १९८०या दशकात सिल्वर स्क्रीन गाजवणारा अभिनेता म्हणजे धर्मेंद्र हे असे एक अभिनेता आहेत. बॉलिवूडमधील हिमॅन धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी झाला. धर्मेंद्र यांनी मोठ्या पडद्यावर गुंडाबरोबर चार हात करताना तितकाय्च सहजपणे अभिनेत्र्याबरोबर रोमान्स केला. म्हणून त्यांना हिमॅन आणि 'गरम धरम' अशा नावाने पण ओळखले जाते. १९६० साली अभिनयक्षेत्रात पदार्पण केलेल्या धर्मेंद्राने आत्तापर्यंत २५० हून अधिक चित्रपटांमधून भूमिका केल्या आहेत. दिल भी तेरा हम भी तेरे या चित्रपटाने त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. १९७६ ते १९८४ च्या काळात त्यांनी अनेक अॅक्शनपट केले.बिमल रॉय, जे पी दत्ता, मोहन कुमार, दुलाल गुहा, राजकुमार कोहली, राज खोसला, रमेश सिप्पी अशा अनेक दिग्दर्शकांसह त्यांनी काम केले.
अर्जुन हिंगोरानींनी दिग्दर्शित केलेले त्यांचे चित्रपट खास गाजले. त्यांनी कब क्यू कहा, कहानी किस्मत की, खेल खिलाडी का कातिलो के कातिल, कौन करे कुरबानी या चित्रपटात एकत्र काम केले. फूल और पत्थर चित्रपटात त्यांनी मीना कुमारींसह काम केले. मीना कुमारी, माला सिन्हा, सायरा बानू, शर्मिला टागोर, आशा पारेख, परवीन बाबी, हेमा मालिनी, रीना रॉय, जया प्रदा या मोठ्या अभिनेत्रींसह त्यांनी कामे केली. शोले चित्रपटादरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्यात प्रेमप्रकरण सुरु असल्याची चर्चा होती. जुगनू, ललकार, ब्लॅकमेल, यादो की बारात या चित्रपटांमुळे ते अॅक्शन हिरो म्हणून नावाजले जाऊ लागले. हेमा मालिनींसोबतची त्यांची जोडी नेहमीच हिट राहिली.
शोले चित्रपटात त्यांनी साकारलेली विरूची भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे. त्यांनी अनेक पंजाबी चित्रपटांमध्येही काम केले आहे. धर्मेंद्र यांनी आपल्या मुलांसाठी चित्रपटांची निर्मितीही केली. त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाद्वारे त्यांच्या मुलांनी बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. सनी देओलने बेताब तर बॉबीने बरसात चित्रपटाद्वारे बॉलीवूड पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी भाचा अभय देओलसाठी सोचा ना था चित्रपटाची निर्मिती केली.धर्मेंद्र यांनी उत्तरकाळात राजकारणातही उडी घेतली. २००४ सालातील भारतीय लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ते राजस्थान येथील बिकानेरातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडणूक जिंकून लोकसभा सदस्य बनले. २०१२ साली त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Copyright © 2025 | Marathisrushti