(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ‘द’त्तू ‘फ’डकर : ‘द’मदार ‘फ’र्जंद

    कपिलदेव हा भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्कृष्ट महान अष्टपैलू खेळाडू मानला जातो, आणि त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली कामगिरी ही मान्यता सिद्धही करते. परंतु कपिलच्या ३० वर्षं आधी भारतीय क्रिकेटच्या क्षितिजावर असा एक तारा चमकून गेला, ज्याने काही काळ आपल्या जबरदस्त अष्टपैलू कामगिरीने क्रिकेटजगताला आपली नोंद घ्यायला लावली. हा मराठमोळा तारा म्हणजे १२ डिसेंबर १९२५ ला जन्मलेला कोल्हापूरचा रांगडा गडी ‘दत्तात्रय गजानन ‘उर्फ’ दत्तू फडकर’.

  • उत्तम भास्कर जोशी

    श्री. उत्तम जोशी हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष आहेत. ते ठाणे येथील उद्योजक असून ठाण्यातील अनेक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध आहे.

  • अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर

    कार्व्हर चित्रकलेत आणि पियानो वाजवण्यात निष्णात होते. त्यांनी काढलेलं चित्र पॅरिसच्या संग्रहालयात ठेवण्यात आलेलं आहे. जर त्यांनी ठरवलं असतं तर जगात सर्वश्रेष्ठ चित्रकार म्हणून प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही मिळवता आला असता. पण या मार्गाने समाजाचा आणि मुख्यतः आपल्या निग्रो बांधवांचा जीवनोद्धार करता येणार नाही म्हणून ‘ध्येय’ क्षेत्र निवडलं – शेती , केमर्जी आणि मायकोलोजी.

  • प्रमोद हिंदूराव

    प्रमोद हिंदूराव यांनी लोकप्रतिनिधी या आपल्याला मिळालेल्या समाजसेवेच्या सुवर्णसंधीचा पुरेपूर फायदा उचलला आहे. ठाणे जिल्हा परिषदेने प्रथम त्यांच्या नेतृत्वाखाली, ठाणे जिल्ह्यामध्ये शिक्षण परिषद उत्तम प्रतिसादामध्ये घेतली होती. शिक्षण, महिला सक्षमीकरण, रस्ते विकास, आरोग्य संवर्धन, सांस्कृतिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेली विकासकामे अतुलनीय आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्यामधील अभिजात व निरागस कलेला प्रोत्साहन मिळावे, यासाठी त्यांनी सुरू केलेली निबंध व चित्रकला स्पर्धा अवघ्या जिल्ह्यात चर्चिली गेली.

    जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकणार्‍या मुलांना उच्च दर्जाच्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात म्हणूने त्यांनी अफाट कार्य केले आहे. शाळांमधून बाक सुविधा, तसेच मोफत गणवेष वाटप, दप्तर वाटप, शूज-रेनकोट वाटप ही त्यांची उपलब्धी मानावी लागेल. जिल्हा नियोजन समितीमार्फत ग्रामपंचायतीच्या अंतर्गत येणार्‍या गावठाणचे विस्तारीकरण करण्याबाबतची मागणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे आरोग्याच्या प्रगत सेवा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी केलेला “मोबाईल ओ.पी.डी.” हा अभिनव उपक्रम फारच यशस्वी झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना प्रगत आरोग्य सेवा उपलब्ध झाल्या आहेत.

    याशिवाय रेल्वे प्रवाशांचे प्रश्न रेल्वे प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी रेल्वे परिषदेचे आयोजन ते सतत करीत होते. त्याच अनुषंगाने माळशेज रेल्वे सुरू करण्याबाबत जागृत रेल्वे प्रवासी परिषदेमार्फत दिल्ली येथे रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी सहाय्य रेल्वे बोर्डाकडे खासदार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक घेवून या प्रलंबित प्रस्तावाबाबत चर्चा केली होती.

    त्यांनी सिडकोचे अध्यक्षपदह भूषविले आहे.

  • मराठीतले लोकप्रिय बालकथाकार राजीव तांबे

    राजीव तांबे गेली अनेक वर्षे मुलांसाठी काम करत आहेत. मराठीतले लोकप्रिय बालकथाकार राजीव तांबे यांचा जन्म ४ ऑगस्ट रोजी झाला. त्यांच्यासाठी विविध पुस्तके, हसत-खेळत शिक्षणाच्या पद्धतींचा विकास केला आहे.

    युनिसेफ आणि इतर काही सामाजिक संस्थांसोबत काम करताना त्यांनी राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील अनेक शाळांना भेट दिली आहे. त्या माध्यमातून विविध स्तरातील विद्यार्थ्यांच्या गरजा समजून घेत त्यांनी शिकवण्याची पद्धत विकसित केली आहे. यामध्ये कविता, कथा, एकपात्री प्रयोग, नाटक, विज्ञानकथा अशा विविध वाङ्मय प्रकारांची निर्मिती केली आहे. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी अशा तीनही भाषांमध्ये लेखन केले आहे. गुजराती आणि कानडीमध्ये त्यांनी लिहिलेली पुस्तके भाषांतरीत झाली आहेत. बालरंगभूमीसाठी त्यांनी लिहिलेल्या अनेक एकांकिकांना बक्षिसं मिळाली आहेत. त्यांच्या लेखनाला आजपर्यंत सुमारे १७ विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.

    अक्कम बक्कम, छत्रीची जादू आणि इतर कथा, दांडोबा राक्षस आणि गुळगुळीत मावशी, अजब कथा, अशोक आणि अमीन, आई आणि बाळ, आमची शाळा, मगरू आणि इतर कथा, गंमत गँग, गंमत जंमत, गंमतशाळा भाग १, २, गुळाची ढेप आणि सरबत, चटकन पटकन वाचन लेखन, झॅकपॅक शोध आणि इतर कथा, बंटू बसला ढगात आणि इतर कथा, ससुल्या आणि इतर कथा, विज्ञान गमती-सहज सोपे प्रयोग, माझे मराठी निबंध, भाग १,२, सु सुटका आणि रंगीत डोंगर, प्रेमळ भूत संच अशी त्यांची ५० हून जास्त पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

  • ज्येष्ठ गायक पं. राजाभाऊ कोगजे

    उल्हास कशाळकर, अजय पोहनकर, आशा खाडिलकर आणि इतर कलाकारांचे ते गुरू होत. नागपूर महानगरपालिकेने नागपूरच्या गोकुळ पेठेमध्ये रहात असलेल्या रस्त्यास त्यांचे नाव दिले आहे.

  • भालजी पेंढारकर

    भालचंद्र गोपाल पेंढारकर म्हणजेच भालजी पेंढारकर यांचे काही प्रमुख व उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “थोरातांची कमळा”, “तांबडी माती”, “साधी माणसं”, “मराठा तितुका मेळवावा”, “छत्रपती शिवाजी’, “मोहित्यांची मंजुळा”, “घरची राणी’, “स्वराज्याचा शिलेदार”, “कांचनगंगा” ,”महाराणी येसुबाई” ,”बाल शिवाजी”, “प्रीत तुझी माझी” आणि “शिलंगणाचे सोने’

  • क्रीडा दिन

    आज २९ ऑगस्ट हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म दिवस त्यामुळेच देशातील सर्व खेळाडूंचे प्रेरणास्थान असलेले या महान हॉकीपटूचा जन्म दिवस आपल्या देशात क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो.

    मेजर ध्यानचंद यांचा हॉकी खेळ म्हणजे चेंडू आणि स्टीक यांचा सुंदर मिलाप होता. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलहाबाद येथे झाला. भारतीय हॉकीतील नव्हे तर हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे. ड्रिबिलींगमधील त्यांचे कर्तृत्व एवढे भन्नाट होते की, चेंडू लोहचुंबकाप्रमाणे त्यांच्या स्टिककडे आकर्षित होतो असाच साऱ्यांचा समज व्हायचा.

    ध्यानसिंग सोमेश्वरसिंह बैस हे त्यांचे पूर्ण नाव. मेजर ध्यानचंद यांचे खरे नाव ध्यानसिंग असे होते. मात्र, ते नेहमी रात्री चंद्र प्रकाशात सराव करत असत त्यामुळे कालांतराने त्यांच्या जवळच्या मित्रांनी ध्यान सिंग यांच्या नावापुढे ‘चंद’ हा शब्द जोडला. तेव्हापासून ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले. मेजर ध्यानचंद यांचे शिक्षण फक्त ६ वी पर्यंतच. खरंतर सैन्यात भरती झाल्यानंतर ध्यानचंद यांनी हॉकी खेळायला सुरूवात केली होती. त्याआधी त्यांना हॉकीचा अनुभव नव्हता. त्यानंतर ध्यानचंद यांचा भाऊ रूप सिंग यानेही आपल्या ध्यानचंद यांच्या पावलावर पाऊल ठेवत हॉकीमध्ये आवड निर्माण केली. हॉकी फेडरेशन आर्थिक संकटांना सामोरे जात असतानाही कोणताही दबाव निर्माण न होऊ देता ध्यानचंद यांनी भारतीय संघाचे नेतृत्त्व करून देशाला पहिले ऑलिम्पिक पदक जिंकून दिले होते. त्यानंतर सलग दोन ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा कायम होता.

    ध्यानचंद यांच्या खेळाने सर्वांची मने जिंकली होती. १९२६ च्या न्युझीलंड दौ-यात एकूण २१ सामने खेळणा-या भारतीय संघातर्फे १९२ गोल झाले त्यातील १०० गोल एकट्या ध्यानचंद यांचे होते. १९२८ साली झालेल्या ऑल्मपिक हॉकीत भारत अजिंक्य ठरला. स्पर्धेच्या पाच सामन्यात भारतावर एकही गोल झाला नव्हता. उलट भारताने २९ गोल केले होते. या स्पर्धेचे हिरो होते ध्यानचंद. १९२८ च्या ऑमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात नॅदरलेंड विरुद्ध ३-० अशा जिंकलेल्या सामन्यात, ३ पैकी दोन गोल ध्यानचंद होते. १९३२ च्या लॉस एन्जलीस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेस तर २३ - १ अशा फरकाने भारताने हरवले. हा उच्चांक २००३ पर्यंत अबाधित होता. त्यातील ध्यानचंदने ८ गोल केलेले होते.

    हंगेरी विरुद्ध ४-०, अमेरिका ७-०, जपान ९-० असा प्रवास करत फ्रान्स विरुद्ध १०-० असा जिंकला तर जर्मनी विरुद्ध ८-१ असा जिंकला. त्यांनी भारताला १९२८, १९३२ व १९३६ मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांनी आपल्या आंतराष्ट्रीय काराकीर्दीत ४०० पेक्षा अधिक गोल केले. १९३६ मधील भारत-जर्मनी यांच्यातील ऑलिम्पिकच्या अंतिम लढतीत ध्यानचंद यांच्या याच नजाकतीने अगदी जर्मनीचा हुकूमशहा अॅनडाल्फ हिटलर यांनाही वेड लावले होते. त्यांच्या या असामान्य कौशल्याने भारावलेल्या हिटलर यांनी त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच इंग्लिश इंडियन आर्मीत मेजरपद व कर्नल पदापर्यंत बढती देण्याचीही ‘ऑफर’ दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती. मात्र, ध्यानचंद यांनी तो फेटाळून लावला होता.

    ध्यानचंद आपला शेवटचा आंतराष्ट्रीय सामना १९४८ साली खेळले. भारत सरकारने ध्यानचंद यांना १९५६ साली पद्मभूषण देऊन गौरवले होते. मेजर ध्यानचंद यांचे ३ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले. हॉकी विश्वात आपले वेगळे स्थान निर्माण केलेल्या या हॉकीच्या जादूगाराला क्रीडा दिनानिमित्त सलाम.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • व्यंग चित्रकार विकास सबनीस

    विकास सबनीस हे गेली अठ्ठेचाळीस वर्षे अर्कचित्रं, व्यंगचित्रं काढत होते. तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. एखादी घटना घडली, एखादी व्यक्ती भेटली की, त्यांच्या मनात यातून कसं चित्र निर्माण होईल याचा विचार करून ते टिपणं काढून ठेवत असत.

  • सदाशिव आत्माराम जोगळेकर

    संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात त्यांनी लिहिलेला ‘संयुक्त महाराष्ट्र — महागुजरात’ हा ग्रंथ त्या दोन राज्यांच्या जडण-घडणीचा अद्ययावत ज्ञानकोश समजावयास हरकत नाही. ‘अहल्या आणि इतर कथा’ हा त्यांचा लघुकथा संग्रह आहे.