(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

  • गोविंद श्रीपाद तळवलकर

    लेखक, पत्रकार, संपादक गोविंद श्रीपाद तळवलकर हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. सडेतोड, विश्लेषक आग्रलेखांचे “आग्रलेख” हे संकलन  प्रसिद्ध आहे.

  • अभिनेते , चित्रकार श्री. चंद्रकांत मांढरे

    चंद्रकांत यांनी ‘ ज्वाला ‘ या चित्रपटात अभिनेते चंद्रमोहन यांच्याबरोबर १९३८ मध्ये अभिनय केला. त्याच वर्षी भालजी पेंढारकर यांच्या ‘ राजा गोपीचंद ‘ या चित्रपटासाठी साठी त्यांनी चंद्रकांत यांना बोलवले आणि त्यांचे सिनेसृष्टीसाठी पहिल्यांदा ‘ चंद्रकांत ‘ हे नाव ठेवले.

  • मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर

    ऐश्वर्या नारकर या माहेरच्या पल्लवी आठल्ये. त्यांचे पहिलं व्यावसायिक नाटक होतं ‘गंध निशिगंधाचा’! त्यात प्रभाकर पणशीकर, रेखाताई कामत, अविनाश नारकर, शरद पोंक्षे,अशी तगडी स्टारकास्ट होती. मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा जन्म ८ डिसेंबर १९७० रोजी नाशिक येथे झाला. त्या नाटकाच्या दरम्यानच अविनाश नारकर यांच्या बरोबर प्रेम जमले. यानंतर त्यांनी विवाह केला.

    तंबाखू विक्रीची नारकर कुटुंबाची लोअर परळ आणि डिलाइल स्ट्रीटवर दोन दुकानं होती. ३५० चौ. फुटांच्या जागेत, तेरा-चौदा जण राहत होते. अवीनाश नारकर घरातील सर्वात लहान. त्या वेळी अविनाश नारकर नाटक, चित्रपट, मालिका व डिबग करायचे. अनेक इंग्रजी मालिकांना त्यांनी हिंदी, मराठी आवाज दिलाय. ‘अल्लाद्दीन’ मालिकेतला इयागोचा आवाज अवीनाश नारकर यांचा आहे. ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर या दोघांकडे मराठी सिनेसृष्टीतील अगदी सोज्वळ कपल म्हणून पाहिलं जातं. अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये हे दोघ आहेत. तसेच मालिकांमध्येही यांनी काम केली आहे. या सुखांनो या ही त्यांची गाजलेली मराठी मालिका आहे. याशिवाय 'बेटियाँ' या हिंदी मालिकेतही त्यांनी साकारलेली भूमिका विशेष गाजली होती.

    'सून लाडकी या घरची' या सिनेमाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून 'चॅम्पिअन्स' या सिनेमाची निर्मिती केली होती. या सिनेमाचे विशेष कौतुक झाले. ऐश्वर्या नारकर हा जाहिरातींमधीलही प्रसिद्ध चेहरा आहे. ऐश्वर्या नारकर यांनी माझे मन तुझे झाले या मालिका, गंध निशिगंधाचा, तुमच्या आमच्या घरात, आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे ही नाटकं, तर बाबांची शाळा, सून लाडकी सासरची, समांतर, चॅम्पियन्स, यलो असे चित्रपट केले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • अभिनेत्री वर्षा उसगावकर

    वर्षा उसगावकर ह्या मूळच्या गोव्याच्या. त्यांचा जन्म २८ फेब्रुवारी १९६८ रोजी झाला. त्यांचा पहिला चित्रपट होता "गंमत -जंमत'. सचिनने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत निखळ विनोदी चित्रपटाचा एक नवा ट्रेंड आणला आणि वर्षा उसगावकर ही नवी अभिनेत्री मराठी चित्रपटसृष्टीला दिली. "गंमत जंमत' नंतर तिने "खट्याळ सून नाठाळ सासू' "तुझ्याविना करमेना', "हमाल दे धमाल', "मुंबई ते मॉरिशस', "लपंडाव' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. या सगळ्यामध्ये त्यांचा संजय सूरकर दिग्दर्शित "यज्ञ' हा चित्रपट आला, या काळातच त्यांच्याकडे हिंदी चित्रपटांची सुरवात झाली. जॅकी श्रॉफबरोबर त्यांनी "दूध का कर्ज' हा चित्रपट केला. ९० च्या दशकात दूरदर्शन हेच एक प्रभावी माध्यम होते. त्यात "महाभारत' या लोकप्रिय मालिकेत उत्तराच्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. बी. आर. चोप्रा यांची निर्मिती असलेल्या या मालिकेतील उत्तराच्या भूमिकेने वर्षाच्या करिअरला वेगळे वळण मिळाले. देशभर तिची ओळख निर्माण झाली. जब्बार पटेल दिग्दर्शित "एक होता विदूषक'सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित "आत्मविश्वाणस' चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेत त्यांचे अस्तित्व ठळकपणे जाणवते. त्यांचे "ब्रह्मचारी' हे नाटक गाजले आहे. नाट्यशास्त्राचे रीतसर दोन वर्षे औरंगाबादला लक्ष्मण देशपांडे यांच्याकडे शिक्षण घेतलेल्या वर्षा उजगावकर ग्लॅमर आणि अभिनय यांचा नेमका समन्वय साधणारी अशी स्टार अभिनेत्री आहेत. 'वक्त', 'चौदहवी का चांद' या सारख्या क्लासिक चित्रपटांचे संगीतकार मा.रवी यांच्या वर्षा उसगावकर या सुनबाई आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • श्रीनिवास खळे

    सुप्रसिध्द मराठी संगीतकार श्रीनिवास खळे यांचा जन्म ३० एप्रिल १९२६ रोजी बडोदा येथे झाला होता;खळे यांनी भावपूर्ण गीतांनी मराठी रसिकांना सहा दशकांहून अधिक काळ संगीतमोहिनी घातली. बडोदा आकाशवाणीत संगीतकार म्हणून काही वर्षे नोकरी केल्यानंतर श्रीनिवास खळेंनी मुंबई गाठली. पण त्यांना काम मिळेना.

  • भारताचे तिसरे राष्ट्रपती डॉ. झाकीर हुसेन

    डॉ. झाकीर हुसेन अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचे कुलगुरूही होते. १९५६ साली ते राज्यसभेवर निवडून आले. पुढे ते बिहारचे राज्यपाल झाले आणि नंतर उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेले. १९६७ मध्ये ते भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले.

  • अध्यात्मिक गुरु सत्य साईबाबा

    पुट्टपर्ती येथे ईश्वराम्मा आणि पेद्दवेंकम्मा राजू रत्नाकरम या दांपत्याच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. त्याचे नाव ठेवले सत्यनारायण राजू. त्याचा जन्म झाल्यावर घरातली वाद्ये आपोआप झंकारायला लागली, एक मंद सुवास घरभर पसरला आणि एका नागाने जन्मलेल्या बाळावर आपला फणा धरला. वरवर पाहता अतिशय थोतांड वाटत असल्या, तरी जगभरातील २०० देशात वसलेल्या कोट्यावधी साईभक्तांची या कथेवर मनापासून श्रद्धा आहे.

  • गायनॅक डॉ. मीना नेरूरकर

    डॉ. मीना नेरूरकर या जितक्या नृत्यात, लिखाणात तरबेज आहेत तितक्याच त्या अभिनयातही निपुण आहेत. ‘इंग्लिश विंग्लिश’ या हिंदी तर ‘स्लीपवॉक विथ मी’ आणि ‘मिस्टर रवी अँड मिस्टर हाईड’ या हॉलीवूडपटात अमेरिकेतील टीव्ही मालिका ‘One life to Live’ यात व इतर मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. त्यांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांनी ‘वाऱ्यावरची वरात’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘सख्खे शेजारी’ यांसारख्या नाटकातही त्यांनी कामे केली आहेत.

  • विष्णू गणेश भिडे

  • जयकुमार पाठारे

    व्यावसायिक व उद्योग वर्तुळात व्ही.आय.पी मॅन म्हणुन प्रसिध्द असलेल्या आणि व्ही.आय.पी ब्रॅंडचे सर्वेसर्वा जयकुमार पाठारे यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखं पण तितकंच प्रेरणादायी आहे. कोल्हापूरात एका मध्यमवर्गीय कुटंबात जन्मलेल्या जयकुमार यांच्या वडिलांचं निधन जयकुमार लहान असतानाच झालं.