(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ज्येष्ठ सरोदवादक राजन कुलकर्णी

    त्यांनी सरोद व इलेक्ट्रॉनिक गिटारचे फ्युजन केले आहे. त्यासंबंधी वाद्य निर्माण केले आहे. झीरॉड असे नामकरण तौफीक कुरेशी यांनी या वाद्यासंबंधी केले आहे. फ्युजन म्हणजेच शास्त्रीय संगीतातला पुढला भाग किंवा आवृत्ती. युवकांना फ्युजन अधिक आवडते. त्याचा प्रसार करण्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत.

  • कोकणातील उभारता गायक कुणाल भिडे

    देवरूख येथील अक्षय पाटील याने बनवलेल्या ‘अजाण’या लघुपटाला कुणालने आपल्या मित्रांच्या सोबत संगीत दिले आहे. हा लघुपट नाशिक येथील फेस्टिव्हल मध्ये दाखवला गेला होता.

  • भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई

    भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला.

    विक्रम साराभाई यांचे वडील हे एक उद्योगपती होते. शिवाय ब-याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने त्या लोकांचे (रविंद्रनाथ टैगोर, जवाहरलाल नेहरू, सरोजनी नायडू , महात्मा गांधी) त्यांच्या घरी जाणे-येणे होते. त्यामुळे खरंतर विक्रम साराभाईंना उद्योग क्षेत्रात अथवा राजकारणात जम बसवण्यासाठी पोषक वातावरण होते. पण त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहले होते आणी ते संपूर्ण भारत देशाचे नशीब बदलणारे असे काहीतरी होते. त्यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ची माँटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच यूरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे विक्रम साराभाईंचे शिक्षण झाले. त्यांना लहानपणापासूनच गणित आणि भौतिक शास्त्र हे विषय विशेष आवडीचे होते. आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते कैंब्रिज विश्वविद्यालय येथे शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोर मधील ‘इंडियन इंस्टीट्यूट आफ साइंस’ मध्ये नोबेल पुरस्कार विजेते सर सी.वि.रमण यांच्या मार्गदर्शनाखाली 'कोस्मिक किरणा'वर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाटयम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मा.मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणी मल्लिका ही दोन अपत्ये झाली. १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर ते ब्रिटनमध्ये परत गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून पी.एच.डी. पदवी मिळवली. आणि त्याच वर्षी मायदेशी परत आले. ११ नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबादला Physical Research Laboratory ची स्थापना केली हे त्यांचे पहिले पाउल. पुढे जाऊन अवकाश संशोधनात त्यांनी जे कार्य केले त्याबद्दल काही सांगायला नकोच. केरळजवळील थुंबा हे ठिकाण लॉन्च पेड़साठी निश्चित झाले होते कारण हे ठिकाण मैग्नेटिक इक्वेटर लाइन (चुंबकीय भूमध्य रेखा) च्या अगदी जवळ होते. पण त्या ठिकाणी शंभरेक घरे आणि एक चर्च होते. आणि ते लोक तिथून बाजुला हटण्यास तयार नव्हते. त्या जागेच्या भौगोलिक आणि वैज्ञानिक महत्वामुळे त्या जागेसाठी केरळ सरकारची मदत मागितली गेली पण केरळ सरकारही ती जमीन मिळवण्यात अपयशी ठरले. मग एके दिवशी स्वत: विक्रम साराभाई त्या चर्चच्या फादर कड़े गेले आणि त्यांना सगळे पटवून दिले. आणि काय चमत्कार दुस-याच दिवशी फादर आणि तिकडचे लोक तिथून बाजूला होण्यास तयार झाले. पुढे तिथे 'थुंबा रॉकेट लौन्चिंग स्टेशन' ची स्थापना केली गेली. २१ नोव्हेंबर १९६५ ला तिथून पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण केले गेले. पुढे या केंद्राला संयुक्त राष्ट्रने अंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली. हा चमत्कार घडवणारे ते विक्रम साराभाईच. म्हणूनच की काय पुढे या केंद्राला विक्रम साराभाई स्पेस सेंटर असे नाव दिले गेले. इंग्लंडच्या प्रयोगशाळेत संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांना भारताच्या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन करून डॉ. विक्रम साराभाई यांनी भारतात आणलं होतं. ''ब्रिटनप्रमाणे वातानुकुलित लॅब्ज आणि ऑफिससारख्या सोयी आम्ही देऊ शकणार नाही, पण बसायला एक टेबल, खुर्ची आणि एक कपाट नक्कीच देऊ शकतो'', असं म्हणून डॉ. साराभाईंनी देशापुढील आव्हानही स्पष्ट केलं होतं. कारण त्यावेळी संशोधनासाठी विशेष बजेट वैगेरे नव्हते. डॉ. विक्रम साराभाई यांनी शास्त्रज्ञांना स्वप्न दाखवलं, नवी दिशा दिली. खंबीर नेतृत्व हाही त्यांचा एक व्यक्तिविशेष. डॉ. अब्दुल कलाम यांनीही आपल्या अग्निपंख या आत्मचरित्रात साराभाई यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक केले आहे. ते स्वप्न पाहायचे आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हवी ती मेहनतही घ्यायचे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य त्यांच्या सहका-यांसाठी नेहमीच एक प्रेरणा स्रोत ठरले आहे. त्यांनी त्यांच्या सहका-यांना एक वेगळी दृष्टी दिली. अंतराळ संशोधनात बजावलेल्या मोलाच्या कामगिरीसाठी इंटरनॅशनल अस्ट्रोनॉमिकल युनियनतर्फे भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार ठरलेल्या अश्या डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव चंद्रावरील मोठ्या विवरांना देण्यात आल आहे. (भारताच्या अणुऊर्जा तंत्रज्ञानातील जनक डॉ. होमी भाभा आणि नोबेल पारितोषिक विजेते सी. व्ही. रामन यांचीही नावे चंद्रावरील विवरांना दिली गेली आहेत.) डॉ. विक्रम साराभाई यांच्या अथक परिश्रमानंतरच १९६९ साली भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्त्रो) स्थापना झाली. आईआईएम अहमदाबादच्या स्थापनेतही डॉ. विक्रम साराभाई यांची मुख्य भूमिका होती. होमी भाभा यांच्या मृत्यु नंतर ते १९६६ मध्ये परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची अध्यक्षपदे त्यांच्याकडे होती. अवकाश संशोधनाबरोबरच त्यांनी टेक्स्टटाईल, फार्मासिटिकल, अणुऊर्जा, कला या क्षेत्रातही विशेष कामगिरी केली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या ATIRA (Ahmedabad Textile Industry’s Research Association) ने आधुनिक वस्त्रोद्योगाचा पाया रचला. फार्मासिटिकल उद्योगात सर्वप्रथम इलेक्ट्रोनिक डाटा प्रोसेसिंग आणि रिसर्च टेक्निकचा वापर त्यांनीच केला. Electronics Corporation of India Limited (ECIL),Uranium Corporation of India Limited (UCIL) अशा अनेक संस्थांची स्थापना त्यांनी केली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला, त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली गेली होती. आर्यभट्टच्या सफल संक्षेपणानंतर अनेक उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले गेले. ज्यासाठी श्री.साराभाई यांची नेहमीच आठवण केली जाते. कारण या सगळ्या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टि आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली भारत सरकारचा पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आला.

    विक्रम साराभाई यांचे ३१ डिसेंबर १९७१ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडुन मा.विक्रम साराभाई यांना आदरांजली.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • प्रमोद पारखी

    पारखी, प्रमोद

    जेव्हा औद्योगिकीकरणाचे वारे जोरात वाहत नव्हते, मध्यम आणि लहान आकाराच्या कंपन्यांना कंपनी सेक्रेटरी या नावाची व्यक्ती आवश्यक वाटत नव्हती, तेव्हा प्रमोद पारखी यांनी एक उत्तम कंपनी सेक्रेटरी म्हणून काम करण्यास सुरुवात केली. उद्योगांच्या विकासात आवश्यक असणाऱ्या या पदावरील व्यक्तीचे महत्त्व त्यांच्यामुळे लक्षात येऊ लागले.

    पारखी यांनी आपल्या व्यवसायात जी सचोटी आणि कार्यक्षमता दाखवली, त्यामुळेच तर त्यांना द इन्स्टिटय़ूट ऑफ कॉस्ट अ‍ॅण्ड वर्क्‍स अकौंटंट्स ऑफ इंडिया या राष्ट्रीय संस्थेचे अध्यक्षपद १९८८ मध्ये भूषवता आले. कंपनी सेक्रेटरी म्हणून देशातील अनेक नामांकित कंपन्यांचे सल्लागार म्हणून काम करण्यापूर्वी पारखी यांनी भारत फोर्जसारख्या कंपनीत काही काळ याच पदावर नोकरीही केली. त्यांचा मूळचा पिंड अभ्यासकाचा असल्याने पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र संस्थेत त्यांनी सुरुवातीला काही काळ कामही केले. परंतु त्यानंतरच्या काळात आपली ही भूमिका निभावण्यासाठी त्यांनी अध्यापनाचे क्षेत्र निवडले. व्यवस्थापनशास्त्राच्या अनेक संस्थांमध्ये त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे कार्य केले. विषय समजावून सांगण्याची त्यांची पद्धत आणि तंत्र यामुळे पारखी हे एक लोकप्रिय ‘सर’ झाले. कॉस्ट अ‍ॅण्ड मॅनेजमेंट अकौंन्टसी, फायनान्स मॅनेजमेंट अशा अनेक क्षेत्रांत त्यांनी अभ्यासवर्ग घेतले. पुणे विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीही प्रमोद पारखी यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. कॉसमॉस सहकारी बँकेच्या प्रगतीमध्ये पारखी यांचा मोठा वाटा राहिला आहे. राज्यातील एक महत्त्वाची बँक म्हणून तिला नावारूपाला आणण्यासाठी पारखी यांनी खूप कष्ट घेतले. १९७८ पासून शेवटपर्यंत ते या बँकेच्या संचालक मंडळावर होते आणि या काळात आठ वेळा त्यांनी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडली. सामान्यांच्या मनात या बँकेविषयी विश्वास निर्माण होईल, इतकी पारदर्शकता निर्माण करण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. देशातील दुसऱ्या क्रमांकाची सहकारी बँक म्हणून या बँकेला आज जे महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामागे पारखी यांचे कष्ट कारणीभूत आहेत. या बँकेचे संगणकीकरण आणि विकास यासाठी त्यांनी आपली सारी बौद्धिक क्षमता उपयोगात आणली. बँकिंग क्षेत्रातील एक तज्ज्ञ म्हणून त्यांनी अनेकांना विश्वासाने सल्ला दिला आणि मदतीचा हात पुढे केला. महाराष्ट्रातील सहकारी बँकिंगच्या क्षेत्रातील त्यांचे हे योगदान भरीव स्वरूपाचे आहे, यात शंका नाही. पुणे स्टॉक एक्स्चेंजच्या कार्यकारी समितीचे सदस्य, मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या नियामक मंडळाचे सदस्य, पुणे विद्यापीठाच्या सिनेटचे सदस्य अशा अनेक पदांवर त्यांनी काम केले. जगातील २९ देशांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या कॉन्फिडरेशन ऑफ पॅसिफिक अ‍ॅण्ड एशियन अकौंटन्टस या संस्थेच्या कार्यकारी समितीचे सदस्य होण्याचा बहुमानही पारखी यांनी मिळवला. त्यामुळे जगातील अनेक देशांत होणाऱ्या विविध परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधीही त्यांना मिळाली. पारखी यांच्या निधनाने एक अभ्यासू बँकर आणि तज्ज्ञ काळाच्या पडद्याआड गेला आहे.

  • मराठी अभिनेता दिग्दर्शक लोकेश गुप्ते

    लोकेश गुप्ते हे नाव छोट्या पडद्यावर तसेच चित्रपट नाटकांतून अभिनेता व दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांच्या परिचयाचे आहे. लोकेश गुप्ते ह्यांच्या अभिनयाची सुरूवात विनय आपटे ह्यांच्या अभिनेत्री नाटकांना झाली.

  • संत तुलसीदास

    गोस्वामी संत तुलसीदासाचे जन्मगाव उत्तर प्रदेशातील राजापुरा असावे असा अंदाज आहे. ‘रत्नावली‘ या सौंदर्यशालिनीशी त्यांचा विवाह झाला. तिच्यावरील प्रेमाने तो पागल झाला. तिचा विरह त्याला सहन झाला नाही. ते गंगानदी पोहून मृत सर्पाची दोरी करून तिच्या माहेरी तिला भेटला, ‘एवढं प्रेम ईश्वरावर केलेत तर.... ?‘ तिने त्यांना विचारले., तेव्हा त्यांना उपरती झाली. तो रामभक्तीत लीन झाला. भक्तीमार्गाचे उपासक असलेल्या तुलसीदासांना लहानपणी काशीच्या नरहरीदास स्वामींनी सांभाळलेले होते. वेद, उपनिषदे, पुराणे, अठरा शास्त्रे इत्यादी प्राचीन ग्रंथांचे ज्ञान त्यांना शिकविले होते. रत्नावलीच्या ईश्वर, राम शब्दाने केवढे परीवर्तन घडवून आणले याची तिलाही कल्पना आली नाही. हिंदु समाजात त्यांच्या काव्यग्रंथाने प्रचंड परीवर्तन घडवून आणले, ‘रामचरितमानस‘ हा श्रीरामाच्या आदर्शांचे सूक्ष्म दर्शन घडवितो. तत्कालिन बहूजन समाजाच्या लोकभाषेत हे काव्य लिहले आहे. इस्लामी लोक ‘कुराण‘ वाचतात, ख्रिश्चन लोक ‘बायबल‘ वाचतात, त्याच भक्तीभावानेने हिंदु लोक ‘रामचरितमानस‘ वाचतात. अकबराच्या उदारमतवादी दृष्टीकोन स्वीकारणारा राजा मानसिंग हा तुलसिदासाचा निस्सीम भक्त होता.

    तुलसीदासांच्या रामचरितमानसात तात्त्विक चिंतनासमवेतच हिंदी भाषेचा डौल आहे. शब्दालकार, अर्थालंकार, नवरसयुक्त मधुर शब्दांचे भांडार आहे. हिंदू धर्मातील पावित्र्य व धार्मिक निष्ठा मुस्लिम आक्रमणामुळे ढेपाळल्या होत्या. स्वच्छंदीपणा, स्वैराचार बोकाळळा होता. अज्ञानाचा सागर पसरला होता; परंतु तुलसीदासाने हे सामाजिक परिवर्तन घडवून आणले. जनसामान्यांच्या भाषेत सांस्कृतिक-मानस परिवर्तन केले. माणसाने ‘मर्यादापुरूषोत्तम राम‘ आदर्श मानला. रामभक्तीत सदाचरणाचे, श्रध्देचे धडे आहेत. हिंदी साहित्यसागरातील तुलसीचे ‘रामचरितमानस‘ हा कौस्तुभमणी आहे. जगभर भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक ज्ञानासाठी या ग्रंथाचा अभ्यास केला जात आहे.

    युगप्रवर्तक हिंदी महाकवी . त्यांची जन्मतिथी, जन्मस्थान, जात, गुरु, मातापिता या सर्वाबद्दल मतभिन्नता आढळते. हाजीपूर, तारी, राजापूर, सोरो सूकर क्षेत्र अयोध्या इ. गावांची नावे गोस्वामी तुलसीदासांचे जन्मस्थान ठरविताना पुढे आली आहेत. पंडित रामदत्त भारद्वाज यांनी या सर्व संशोधनांचा अभ्यास करुन तुलसीदासांचा जन्म सारो या स्थानाजवळच रामपूर येथे झाला. असे निश्चित केले आहे. ते सवरिया, सारस्वत, सरयू पारीण, सनाढय आणि कान्यकुब्ज या ब्राम्हण जातींपैकी निश्चित कोणत्या जातीचे होते याबद्दल मतभेद आहेत. ते ब्राम्हण नसावेच, असेही एक मत पुढे आले आहे. जगन्नाथदास, रामदासजी, नहर्यानंद, नरहरिदास, नृसिंह अशी त्यांच्या गुरुची नावे दिली जातात. बहुसंख्य विद्वान त्यांचा विवाह झाला होता, असे मानतात.

    त्यांच्या जन्मतिथीसंबंधी सहा संवत तिथी सामान्यतः पुढे आल्या आहेत. त्या अशा संवत १५५४, १५६० , १५६८, १५८३, १५८९ आणि १६०० बहुसंख्य विद्वान भाद्रपद शुध्द एकादशी मंगळवार, संवत १५८९ म्हणजे इ.स. १५३२ ही तिथी मान्य करतात. मृत्यू मात्र संवत १६८० श्रावण वद्य तृतीया, शनिवार या तिथिला म्हणजे १६३२ मध्ये झाला, याविषयी सामान्यतः एकमत आहे.

  • संवेदनशील कवी कैफी आझमी

    आझमगड जिल्ह्यातील मिजवां येथे जन्मलेले अतहर हुसेन रिझवी हेच नंतर कैफी आझमी बनले. त्यांचा जन्म १४ जानेवारी १९१९ रोजी झाला. उत्तर प्रदेशातील आझमगढ जिल्ह्यात एका जमीनदाराच्या घरी कैफी आझमी यांचा जन्म झाला.

  • ज्येष्ठ तबलावादक पंडित निखिल घोष

    ज्येष्ठ तबलावादक, लेखक पंडित निखिल घोष यांचा जन्म २८ डिसेंबर १९१८ रोजी बारीसाल या पुर्व बंगालमधील गावी झाला.

    निखिल घोष हे जेष्ठ बासरीवादक पन्नालाल घोष यांचे धाकटे भाऊ होते. त्यांनी आपले संगीताचे शिक्षण आपले वडील अक्षय कुमार घोष यांच्या कडे घेतले, जे सतार वाजवण्यासाठी प्रसिद्ध होते तसेच त्यांनी तबला वादनाचे शिक्षण व संगीताचे शिक्षण अहमद जान थिरकवा,अमीर हुसेन खान,ओंकारनाथ ठाकूर,बडे गुलाम अली खान, अमीर खान,पन्नालाल घोष, रवि शंकर अली अकबर खान,विलायत खान ,भीमसेन जोशी, निखिल बॅनर्जी, जसराज,अमजद अली खान, शिवकुमार शर्मा अशा महान संगीतकाराकडे घेतले होते.

    निखिल घोष यांनी संगीत महाभारती या संस्थेची स्थापना १९५६ साली केली, यात त्यांनी अनेक होतकरू संगीतकाराना घडवले. याच संस्थेत अनिश प्रधान,एकनाथ पिंपळे,दत्ता यंदे इत्यादी पुढे नावारुपाला आले. त्यांनी आपले पुत्र नयन घोष व ध्रुबा घोष यांना अनुक्रमे तबला आणि सारंगी शिकवले. आपली मुलगी तुलीका घोष यांना पण या संस्थेत शिकवले. निखिल घोष यांनी अनेक मैफीली एडनबर्ग, ब्राटीसिवा, हेल्न्सकी, रोम, अथेन्स अशा विविध ठिकाणी केल्या.

    त्यांनी Fundamentals of Rag and Tals with new system हे पुस्तक लिहून संगीतात क्रांती केली. त्यांना भारत सरकारने १९९० साली पद्मभुषण पुरस्कार देऊन गौरवले होते.१९९५ साली त्यांना उस्ताद हफीज अली खान पुरस्कार मिळाला. त्यांचा विवाह १९५५ साली उषा नयमपल्ली यांच्या बरोबर झाला होता.

    पंडित निखिल घोष यांचे ३ मार्च १९९५ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • सवाई माधवराव पेशवे

    सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात बारभाईच राज्यकारभार पहात होते. श्रीमंत सवाई माधवराव नाममात्र पेशवे होते. बाळाजी विश्वनाथ, बाजीराव बल्लाळ, चिमाजीअप्पा, बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब, सदाशिवराव भाऊसाहेब, विश्वासराव, माधवराव यांच्यामुळेच पेशवे या तीन अक्षरांचाच भारतात दरारा निर्माण झाला होता. दिल्लीच्या लाल किल्यावर भगवे निशाण डौलदारपणे, दिमाखात फडकायला लागले. सवाई माधवराव पेशव्यांच्या कारकिर्दीत महादजी शिंदे यांनी दिल्लीची पातशाही कबजात घेतली. दरमहा ६५००० रूपये तनखा ठरवून दिल्लीच्या बादशहाकडून वकील ई मुतालिक आणि मिरबक्षी अशा स्वतंत्र दोन सनदा सन १७८४ साली मिळवल्या. दिल्लीचे संस्थान झाले.

  • डॉ. सुलभा हेर्लेकर

    सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रातील जुन्या-नव्या पिढीला जोडणारा दुवा ज्येष्ठ कवयित्री डॉ. सुलभा हेर्लेकर यांच्या निधनाने निखळला. नवोदित कवयित्रींना ‘अभिव्यक्ती’ च्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे मोठे काम डॉ. हेर्लेकरांनी केले होते. आशा बगे, जयश्री रुईकर, सुनीती आफळे, डॉ. आशा सावदेकर आणि डॉ. सुलभा हेर्लेकर या विदर्भाच्या पंचकन्या.. वैदर्भीय साहित्य क्षेत्रात प्रत्येकीला एक स्वतंत्र अस्तित्व आहे. यात कवयित्री म्हणून डॉ. सुलभा हेर्लेकर यांचे योगदान विशेष उल्लेखनीय ठरले.

    कवितेवर मनस्वी प्रेम करणारी ही प्रगल्भ कवयित्री पु.शि. रेगे आणि इंदिरा संत यांच्या साहित्याची मोठी चाहती. इंदिरा संतांवरचा अभ्यास, कविता व समीक्षेच्या क्षेत्रातील मुशाफिरी आणि कविता वाचनाच्या प्रयोगांच्या निमित्ताने त्यांनी स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. कवी अनिलांनी हेर्लेकर यांचे वेगळेपण एकेकाळी हेरले होते. ‘पहाटपक्षी’, ‘नितळाई’ सह अनेक काव्यसंग्रहांतून पुढे त्यांनी हे स्थान टिकवले. शासकीय सन्मानासह अनेक पुरस्कारांच्या त्या मानकरी ठरल्या. दर्जेदार कवयित्री म्हणून स्वत:चा आब राखतानाच नवोदित लेखिका व कवयित्रींना तेवढीच सन्मानाची वागणूक देण्याचा कटाक्ष त्यांनी बाळगला.

    जुन्या आणि नव्या कवयित्रींचे सख्य जुळविण्याचे अवघड काम त्यांनी अगदी सहज पार पाडले. राम शेवाळकरांनी लेखिका संमेलनासाठी स्थापन केलेल्या ‘अभिव्यक्ती’तून हेर्लेकरांच्या प्रगल्भतेचा खऱ्या अर्थाने परिचय घडला. त्या व्यासपीठावरून नव्या कवयित्रींना समोर आणण्याची त्यांची धडपड शेवटपर्यंत राहिली. विदर्भ साहित्य संघाच्या ‘युगवाणी’ त्रमासिकाच्या पाच वर्षे केलेल्या संपादनातून त्यांची साहित्यिक जाण व दर्जा स्पष्टपणे जाणवला. संशोधन, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि संस्थात्मक कार्यातील त्यांचा सहज वावर प्रत्येकालाच हवाहवासा वाटे. जवळजवळ चार दशके त्यांनी कवी संमेलने गाजवली.

    शालीनता, सुसंस्कृतपणा, सभ्यता यांची सांगड घालून देतानाच घर-दार आणि जिव्हाळ्याचा वाङ्मयीन गोतावळा जपणाऱ्या डॉ. सुलभा हेर्लेकरांनी गंभीर आजारपणाची खबरबात कोणापर्यंत पोचू दिली नव्हती. त्यामुळे हेर्लेकरांचे अचानक जाणे वाङ्मयीन गोतावळ्याला चटका लावून गेले आहे.