जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
सुभाष देशमुख हे सोलापूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेत निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. सध्या ते महाराष्ट्राचे सहकारमंत्री आहेत.
ते १४ व्या लोकसभेचे सदस्यही होते.
लोकमंगल समुहाचे ते संस्थापक व अध्यक्ष आहेत.
## Subhash Deshmukh
मराठी चित्रपट रसिकांच्या मनावर मागील पांच दशकांपासून राज्य करणार नाव म्हणजे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सचिन पिळगावकर.
सचिन पिळगावकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला. १९६२ सालच्या हा माझा मार्ग एकला या मराठी चित्रपटातील बाल कलाकाराच्या भूमिकेद्वारे वयाच्या चौथ्या वर्षी त्याचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते बाल कलाकारासाठीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला.
त्यानंतर बालकलाकार म्हणून त्याने ज्वेलथीफ, ब्रह्मचारी, मेला आणि अन्य १५ चित्रपटांतून भूमिका केल्या. त्यानंतर राजश्री प्रॉडक्शन-निर्मित गीत गाता चल या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्यानंतर एकामागून एक बालिकावधू, कॉलेज गर्ल, अंखियोंके झरोकोंसे आणि नदिया के पार अशा चित्रपटांतल्या प्रमुख भूमिका त्याच्या वाट्यास आल्या. त्रिशूल चित्रपटाच्या यशानंतर त्याने शोले, सत्ते पे सत्ता या चित्रपटांत साहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या.
त्यानंतर ते मराठी चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळले.
मराठीसृष्टीवरील सचिन पिळगांवकर यांच्यावर लिहिलेला संपूर्ण लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
आशालता वाबगावकर या सुप्रसिद्ध मराठी चित्रपट कलाकार आहेत.
वेलणकरांनी विविधरंगी व लांब-रुंद पक्क्या रंगांच्या लुगड्यांचे उत्पादन सुरू केले. या लुगड्यांसाठी त्यांनी `पातळ’ हा शब्द रूढ केला. या उत्पादनाकरिता आवश्यक असलेली भांडवली रक्कम उभी करणे वेलणकरांच्या आवाक्यात नव्हते. त्यांनी ताणा तयार करण्यासाठी एक नवा मोठा लाकडी रूळ (बीम) शोधून काढला व त्यावर साध्या चात्यांच्या चौकटीवरून विशिष्ट प्रकारे ताणाभराई केली. यामुळे ताणाभराई (वॉर्पिंग) यंत्राची आवश्यकता उरली नाही. कांजी देण्याच्या साइझिंग यंत्राची गरज टाळण्यासाठी वेलणकरांनी दुहेरी सुताचा वापर केला. त्यामुळेच वेलणकरांना १९१२ मध्ये पुणे येथे तीन यंत्रमाग वापरून लहान कारखाना स्थापण्यात यश आले.
प्रत्येकजण राजपाल यादव यांच्या अभिनयाचे फॅन आहेत. जरी त्याची उंची खूप कमी असली, तरी त्याची प्रतिभा तितकीच मोठी आहे.
इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका व पुणे येथील सिम्बॉयसिस संस्थेसाठी त्यांनी दृककला विषयात भरीव कामगिरी केली आहे. जागतिक रंगकला व तंत्रज्ञान या क्षेत्रातील तज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
अनंत कान्हेरे ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले.कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
मुकुंद संगोराम हे गेली चार दशके पत्रकारितेत सक्रीय आहेत. सध्या मुकुंद संगोराम हे लोकसत्ता दैनिकाचे सहाय्यक संपादक आहेत. ते आधी तरुण भारत आणि पुणे वर्तमान या दैनिकांचे सहसंपादक होते. मुकुंद संगोराम हे समाजकारण, नागरी प्रश्न, संगीत, कला, संस्कृती या विषयावर सातत्याने लेखन करत असतात.त्यांची ‘आजकाल’, ‘समेपासून समेपर्यंत‘, ‘ख्यालिया’ ही पुस्तके प्रसिद्ध झाली असून सध्या ते‘स्वरावकाश’ या सदराचे लेखन ते करत आहेत.
डॉ. विजया वाड या निशिगंधा वाड यांच्या आई. त्यांचा जन्म ११ आक्टोबर १९६९ रोजी झाला. निशिगंधा वाड यांना वयाच्या अकराव्या वर्षी अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली निशिगंधा वाड या १९८५ मध्ये झालेल्या १० वीच्या परीक्षेत पहिल्या पन्ना्सात, आणि नंतर बारावीला मेरिटमध्ये तिसर्यान आल्या होत्या.
१९९० च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक. काळाच्या बंधनास न जुमानणारं लावण्य, सौंदर्य खचितच ज्या व्यक्तिंवर मेहरनजर करतं, त्यांपैकी एक म्हणजे निशीगंधाजी. १९९० च्या सुमारास व्यावसायिक चित्रपटांमध्ये त्यांचे पदार्पण झाले. गालावरल्या त्या दोन खळ्यांनी कित्येक श्वासांचे लगाम खेचले असतील याची फक्त कल्पनाच केलेली बरी. भारतीय आणि ब्रिटिश रंगभूमीवरील स्त्रीची बदलती भूमिका या पीएच.डी.च्या प्रबंधासाठी निशिगंधा वाड यांनी १०० वर्षांचा ऐतिहासिक कालखंड घेऊन तौलनिक अभ्यास केला.
२००३ मध्ये मुंबई विद्यापीठानं त्यांना पीएच.डी. बहाल केली. नंतर निशीगंधा वाड यांना कोलंबिया विद्यापीठाने डी. लिट. पदवी दिली आहे. निशीगंधा वाड. एक सालस, चिकित्सक, अभ्यासू व्यक्तिमत्व. त्यांनी काही मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांतूनही काम केले आहे. सहजसुंदर अभिनयाच्या जोरावर शंभरहूनही अधिक चित्रपट त्यांच्या नावे आले. 'शेजारी-शेजारी', 'वाजवा रे वाजवा', 'एकापेक्षा एक', 'प्रतिकार', 'सासर माहेर', 'अशी ही ज्ञानेश्वरी' यांसारखे मराठी तसेच 'सलिम लंगडे पे मत रो', 'कर्म योद्धा', 'दादागिरी', 'आप मुझे अच्छे लगने लगे' यांसारखे हिंदी चित्रपट त्यांनी केले. 'कुलवधू' (मराठी) व 'झी हॉरर शो' (हिंदी) यांसारख्या मालिकाही त्यांनी केल्या.
अभिनयासोबतच एक उत्तम लेखिका म्हणूनही त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी लिहीलेल्या पाच पुस्तकांपैकी तीन पुस्तकांना राज्य शासनाचा मानाचा पुरस्कार मिळाला. मराठी व ब्रिटीश रंगभूमी व चित्रसृष्टीतील दृष्टीकोनातून स्त्रियांची समाजातील बदलती भूमिका या विषयावर मुंबई विद्यापीठात त्यांनी केलेले संशोधन त्यांच्या विद्वत्तेचीही ग्वाही देते. रिलीजीयस हार्मनी फाऊंडेशन निर्मित धार्मिक सलोखा या विषयावरील व्याख्यानपटाच्या त्या व्याख्यात्या आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट
सुरवातीला त्यामध्ये विक्रम गोखले यांचे बरोबर जितेंद्र जोशी काम करीत असे. इतके जबरदस्त नाटक होते कि त्यामध्ये नातू आणि आजोबा यांच्या संघर्षामध्ये सध्याच्या दोन पिढ्यातील अंतर इतक्या प्रभावीपणे मांडला आहे कि हे नाटक पाहताना डोळ्यात अक्षरश अश्रू येतात.
Copyright © 2025 | Marathisrushti