(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • मराठीतील श्रेष्ठ गीतकार व भावकवी भा. रा. तांबे

    भा.रा.तांबे यांच्या कवितेचे वैशिष्ठय म्हणून आपणास त्यातील गेयता व भावमधुरता या गुणांचा उल्लेख करता येईल.

  • कोकणातील ज्येष्ठ पत्रकार दिनेश केळुसकर

    दिनेश केळुसकर यांची तळकोकणातील निर्भीड आणि अभ्यासू पत्रकार म्हणून आपली ओळख आहे. दिनेश केळुसकर यांनी इंजिनिअरींगचे शिक्षण घेऊनही आपण पत्रकारिता क्षेत्रात आपला वेगळा ठसा निर्माण केला.

  • लालन सारंग

    मा.लालन सारंग या तेंडुलकरांच्या नायिका म्हणून ओळखल्या जात. सखाराम बाईंडर, घरटे आमचे छान, बेबी, कमला अशा तेंडुलकारांच्या नाटकांनी लालन सारंग यांना बरच काही मिळवून दिलं.

  • विद्रोही कवी तुळसी परब

    ‘हिल्लोळ’, ‘धादान्त आणि सुप्रमेय्य मधल्या मधल्या मधल्या कविता’, ‘कुबडा नार्सिसस’आणि ‘हृद’ हे त्यांचे चार कविता संग्रह आहेत.

  • ज्येष्ठ दिग्‍दर्शक आणि निर्माते बी.आर.चोपडा

    धूल का फुल (१९५९), वक्त (१९६५), नया दौर (१९५७), कानून (१९५८), हमराज (१९६७), इन्साफ का तराजू (१९८०) आणि निकाह (१९८२) असे एकापेक्षा एक सरस चित्रपट मा.बी. आर.चोपडा यांनी दिले आहेत. बी. आर. चोपडा यांचा जन्म २२ एप्रिल १९१४ रोजी झाला. भारतीय चित्रपटातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने १९९८ साली बी. आर. चोपडा यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन सन्मान केला होता. त्याआधी त्यांना १९६० साली कानून चित्रपटासाठी उत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून फिल्मफेअर आणि १९९८ साली फिल्मफेअर जीवनव्रती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.

    मोठ्या पडद्यावरील यशानंतर बी. आर. यांनी आपला मोर्चा छोट्या पडद्याकडे वळवून "महाभारत' महामालिका तयार करून ती दूरचित्रवाणीच्या माध्यमातून घराघरात पोहोचविली होती. या मालिकेनेही लोकप्रियतेचे शिखर गाठले होते.

    बी. आर.चोपडा यांचे ५ नोव्हेंबर २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • सुरेश भास्कर गायतोंडे

    सुरेश भास्कर गायतोंडे

    अभियांत्रिकी क्षेत्रात नोकरी करुन गेली ५५ ते ६० वर्षे अविरत तबलावादन करुन रसिकांना मंत्रमुग्ध करणारे तबलावादकांमध्ये ज्येष्ठ म्हणून आदराने ओळखले जाणारे ठाणेकर सुरेश तथा भाई गायतोंडे हे ठाण्यातील एक कलारत्न होय.

  • ट्रॅजिडी किंग अभिनेते दिलीपकुमार

    पेशावर मधील किस्सा खवानी बाजारात एका फळविक्रेत्या पठाण कुटुंबात जन्माला आलेल्या युसूफ खान यांनी कधीही हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनय करण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. वडिलांनी व्यवसायाचे बस्तान बसविल्यानंतर इतर कुटुंबीयांसोबत मुंबईला आल्यावरही किशोरवयीन युसूफच्या तसे मनातही कधी आले नव्हते. उलट लवकरात लवकर स्वत:च्या पायावर उभे राहून बारा मुले, इतर नातेवाईक आणि पै-पाहुण्यांचे करता करता थकून गेलेल्या अम्मीचे कष्ट काही प्रमाणात कमी करता यावेत यासाठी लवकरात लवकर कमावता होणे याच एका उद्देशाने झपाटलेल्या युसूफने एकदा वडिलांशी उडालेला खटका मनाला लावून घेत तिरमिरीत घर सोडून थेट पुणे गाठले.

  • सामाजिक नेत्या, लेखीका, संपादक विद्या बाळ

    विद्या बाळ या स्त्रियांचं आत्मभान जागृत करण्याचं आणि समाजाला स्त्रियांसंदर्भात सजग आणि संवेदनशील बनवण्याचं कार्य करण्यात अग्रेसर असणाऱ्या प्रमुख सामाजिक नेत्या आहेत. त्यांचा जन्म १२ जानेवारी १९३७ रोजी झाला. ‘स्त्री’ व ‘मिळून साऱ्याजणी’ या मासिकांमधून सातत्याने लेख लिहून त्यांनी स्त्रियांमध्ये स्वत्वाची भावना चेतवली आहे.

    स्त्र‌ियांना समृद्ध जीवन जगता यावे, यासाठी पुरुषभान येण्याची आवश्यकता आहे,' असे आग्रही प्रतिपादन करतानाच ते प्रत्यक्षात येण्यासाठी विद्या बाळ यांनी आपले आयुष्य खर्ची घातले आहे. त्यांनी १९५८ साली पुण्यातील फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. (अर्थशास्त्र) ही पदवी घेतली. पुणे आकाशवाणीवर कार्यक्रम सादरकर्त्या म्हणून विद्या बाळ यांनी दोन वर्षे नोकरी केली.

    स्त्र‌ियांना त्यांच्या हक्कांची जाणीव त्यांनी करून देणाऱ्या विद्या बाळ यांनी 'स्त्र‌ी' या मासिकात सुमारे २२ वर्षे म्हणजे १९८३पर्यंत काम केले. या काळातच १९८१ मध्ये त्यांनी स्त्र‌ियांच्या समस्यांचा वेध घेणाऱ्या 'नारी समता मंचा'ची स्थापन केली. पुढे त्यांनी 'मिळून साऱ्याजणी' हे मासिक सुरू केले. स्त्र‌ियांच्या चळवळीशी अतूट बांधिलकी मानणाऱ्या या मासिकाने आज स्वतंत्र ठसा उमटवला आहे. या साऱ्याजणी 'आपण बाया आहोत, हे नाकारत नाहीत. त्या जाणिवेत अडकून पडत नाहीत, त्याचा बाऊही करत नाहीत.

    उलट त्या बाईपणाला ओलांडून व्यक्ती आणि माणूस म्हणून त्या स्वतःची ओळख करून घेऊ इच्छितात,' अशी स्पष्ट भूमिका त्या मांडतात. याच मासिकाशी सलग्न 'सखी मंडळा'ची स्थापनाही विद्या बाळ यांनी केली. स्त्री प्रश्नांसह विविध सामाजिक विषयांची चर्चा या मंडळामार्फत घडवून आणली जाते. 'बोलते व्हा,' 'पुरुष संवाद केंद्र,' 'अक्षरस्पर्श ग्रंथालय,' 'साथ साथ विवाह अभ्यास मंडळ,' 'पुरुष उवाच अभ्यासवर्ग,' 'पुरुष उवाच अभ्यासवर्ग' या संस्थाही त्यांनी सुरू केल्या. या संस्थांकडे नजर टाकली, लेख, अनुवाद, कादंबरी, संपादन अशी त्यांची चौफेर लेखणी आहे. कृतीशील कार्यकर्त्या अशीही त्यांनी ओळख आहे.

    जनजागृतीसाठी रात्री काढलेली 'प्रकाशफेरी,' एकट्या स्त्र‌ियांसाठी परिषद, विवाह परिषद, कुटुंब नियोजन परिषद, आत्मसन्मान परिषद किंवा विविध पथनाट्य, निदर्शने, परिसंवाद, 'दोस्ती जिंदाबाद,'सारखा अॅसिड हल्ल्याविरोधातील जागृतीसाठीचा कार्यक्रम, लिंगभाव समतेसाठी पुरुषभान परिषद आदी अनेक कार्यक्रम त्यांनी आपल्या संस्थांच्या माध्यमातून घेतले. अनेक कार्यकर्त्या तयार केल्या. शहरी आणि ग्रामीण स्त्र‌ियांना जोडणे हे उद्दिष्ट ठेवून त्या काम करतात.

    त्यांना फाय फाउंडेशन, आगरकर पत्रकारिता पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. तसंच सामाजिक कृतज्ञता जीवनगौरव सन्मानसुद्धा मिळाला आहे. कथा गौरीची, अपराजितांचे नि:श्वास, शोध स्वतःचा, संवाद, तुमच्या-माझ्यासाठी, कमलाकी, तेजस्विनी, वाळवंटातील वाट अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • विलास संगवे

    हे मुळचे सोलापुरचे असणार्‍या प्रा. डॉ. विलास सांगवे यांनी मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी आणि जैन समाज या विषयावर संशोधनात्मक प्रबंधक सादर करुन १९५० साली डॉक्टरेट संपादन केल्यावर सर्वप्रथम कर्नाटक महाविद्यालयात अध्यापन सुरु केलं, त्यानंतर राजाराम महाविद्यालय व पुढे शिवाजी कार्याचे संशोधन करण्यासाठी स्थापन केलेल्या शाहू संशोधन केंद्रामध्ये त्यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली.

  • शिवचरित्राचे अभ्यासक निनाद बेडेकर

    शिवचरित्राचे अभ्यासक निनाद बेडेकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी पुणे येथे झाला.

    छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे अभ्यासक अशी ख्याती होती. निनाद बेडेकर यांनी मॉडर्न शाळेतील शिक्षणानंतर शासकीय तंत्रनिकेतन येथून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांच्या मातोश्री या सरदार रास्ते घराण्यातील होत्या. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी महिलांचे संघटन केले होते. हाच वारसा निनाद बेडेकर यांच्याकडे आला. शिवचरित्राची गोडी लागल्याने बेडेकर इतिहास संशोधनाकडे वळाले. इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी मोडी, फार्सी, उर्दू या लिपींवर प्रभुत्व मिळविले. या लिपीमध्ये असलेल्या हस्तलिखिते आणि कागदपत्रांचे वाचन करून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. त्याचबरोबरीने बेडेकर यांनी पर्शियन, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजी या परकीय भाषा आत्मसात केल्या.

    शिवचरित्र आणि १८ व्या शतकात देशभर विस्तारलेले मराठी साम्राज्य या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. राज्यातील आणि देशातील किल्ल्यांवर भ्रमंती करून शिवकालीन इतिहासामध्ये ते रममाण झाले होते. शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केले. शिवाजीमहाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी या पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यांनी लेखन केले होते. शिवरायांची व्यवस्थापकीय कौशल्ये हा विषय ते एमबीएच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये समजावून सांगत असत. लालित्यपूर्ण शैलीमध्ये ऐतिहासिक लेखन करणाऱ्या बेडेकर यांची ‘शिवभूषण’, ‘थोरलं राजं सांगून गेलं’, ‘गजकथा’, ‘हसरा इतिहास’, ‘दुर्गकथा’, ‘विजयदुर्गचे रहस्य’, ‘समरांगण’ आणि ‘झंझावात’ ही निनाद बेडेकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३५ पुस्तकांसह शेकडो लेख आणि शोधनिबंध लिहिले. गेल्याच महिन्यात त्यांचे ‘अजरामर उद्गार’ हे अखेरचे पुस्तक प्रकाशित झाले होते.

    इतिहास संशोधनाच्या कार्यामध्ये रममाण होण्यासाठी त्यांनी किर्लोस्कर कमिन्समधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री रायगड स्मारक मंडळ, श्री राजगड स्मारक मंडळ, गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ या संस्थांशी संबंधित असलेले बेडेकर हे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाचे आयोजन करणाऱ्या ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ संस्थेचे अध्यक्ष होते.

    निनाद बेडेकर यांना शिवभूषण, दुर्ग साहित्य पुरस्कार, जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, पुराण पुरुष पुरस्कार, शिवपुण्यतिथी रायगड पुरस्कार या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. शनिवारवाडा येथील ध्वनिप्रकाश योजनेमध्ये दाखविल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बेडेकर यांनी संहितालेखन केले होते. गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती झाली होती. छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीमध्ये निनाद बेडेकर यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या.

    निनाद बेडेकर यांचे १० मे २०१५ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे निनाद बेडेकर यांना यांना आदरांजली.

    शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक निनाद बेडेकर (16-May-2017)

    शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक निनाद बेडेकर (10-May-2019)

    शिवचरित्राचे अभ्यासक निनाद बेडेकर (17-Aug-2021)

    #NinadBedekar