(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • सू-अभूतपूर्व लोकलढा

    म्यानमार (वर्मा) मधील असंख्य आबालवृद्धांची ही अजूनही 'शान' आहे.त्यामुळेच तेथील युवक-युवतींच्या टी शर्टवर तिचे छायाच असते, तसेच इतर जीवनोपयोगी वस्तूंवरही तिच्या छायाचित्रांचे दर्शन होते. कारण एकच म्यानमारमधील जुलमी राजवटीविरुद्ध तिने सुरू केलेला संघर्ष. या संघर्षाला तेथील जनतेने अभूतपूर्व पाठिंबा दिला होता. या शांततापूर्ण

    चळवळीबद्दलच तिला १९११ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. त्या महिलेचे नाव आहे आगसान सु की.

    आधुनिक म्यानमारचे संस्थापक असलेले यू आंग सान यांची सू ही मुलगी. तिने तिच्या जन्मापासूनच घरात जणू राजकारणाचे धडे घेतले होते. तिचे वडील यु आंगसान यांचा म्यानमारच्या सत्तासंघर्षात बळी गेला. त्या वेळी सू अवघी दोन वर्षांची होती, त्यामुळे त्यांचा राजकारणाचा वारसा सांभाळण्याची जबाबदारी सू वर अल्पवयातच आली. सू ची आई बर्माची राजदूत म्हणून भारतात आली. त्यामुळे सू चे प्राथमिक शिक्षण दिल्लीतच झाले. तेथेच तिला महात्मा गांधी यांच्या असहकार चळवळीची माहिती झाली व त्यातूनच तिला प्रेरणा मिळून पुढे म्यानमारमध्ये गेल्यानंतर तिने प्रस्थापित लष्करी राजवटीविरुध्द जनलढा उभारला. तिच्या या लढ्याला युवक-युवतींचा प्रचंड पाठिंबा मिळाला. रोज प्रचंड मोर्चे, सत्याग्रह यामुळे तिने तेथील लष्करी राजवटीला जेरीस आणले. सूचे हे आंदोलन मोडून काढण्यासाठी लष्करी बळाचा वापर करण्यात आला.आंदोलनकर्त्यांवर केलेल्या गोळीबारात तीन हजार आंदोलनकर्ते मारले गेले, तरीदेखील सू डगमगली नाही. ती राजकारणात सक्रिय होत गेली. तिच्या आंदोलनाला यशही मिळत गेले. तिचे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारला तेथे निवडणुका घेणे भाग पडले.

    या निवडणुकीत सू च्या पक्षाला घवघवीत यश प्राप्त झाले. मात्र लष्करी राजवटीने तिच्या हातात सत्ता सुपूर्द न करता निवडणूक रद्द करुन तिला नजरकैदेत ठेवले.

    नजरकैदेत असतानाच तिला शांततेसाठी नोबेल पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र नोबेल स्वीकारण्यासाठीही तिला कैदेतून सोडण्यात आले नाही. त्यामुळे तिच्या वतीने पती एरिस मुलाने या नोबेल पुरस्काराचा स्वीकार केला.

  • कोलगेटचा निर्माता विल्यम कोलगेट

    लहानपणापासून अनेक पिढय़ांनी पांढरा आणि लाल अशा टिनमधील टुथपेस्ट पावडर ते त्याच रंगाच्या टय़ूबमधील टुथपेस्ट असा प्रवास अनुभवलेला असतो. खूप सारे पर्याय उपलब्ध नसताना टुथपेस्ट म्हणजे कोलगेट हे गणित डोक्यात पक्कं होतं.

  • महाराष्ट्राची ‘मर्लिन मन्रो’ अभिनेत्री पद्मा चव्हाण

    अभिनयासाठी आवश्यक असलेले बोलके डोळे, क्षणाक्षणाला चेहऱ्यावरती बदलणारे भाव व आकर्षक व्यक्तीमत्व हे सर्व गुण त्यांना लाभले होते. १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांनी ‘आकाशगंगा’ नामक चित्रपट तयार केला होता. त्या चित्रपटात त्यांना भूमिका मिळाली आणि त्यांचा चंदेरी दुनियेत प्रवेश झाला.

  • डॉ. धर्मवीर मुंजे

    भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, समाज सुधारक व निष्णात नेत्रविशारद धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान द्रष्टे नेते होते. लोकप्रियतेची पर्वा न करता प्रसंगी लोकप्रवाहाच्या विरूद्ध उभे राहून समाजाच्या हिताचे तेच ठामपणे सांगणारे डॉ. मुंजे यांचे व्यक्तिमत्त्व तडफदार होते. १२ डिसेंबर १८७२ मध्ये विलासपूर येथे त्यांचा जन्म झाला.

  • गुरुदेव रानडे

    सुप्रसिध्द नामधारक, श्री.गोंदवलेकर महाराजांचे भक्त प्रा. के. वि. बेलसरे यांना एम. ए.ची पदवी देणारे श्री. गुरूदेव रा. दा. रानडे हे ‘साक्षात्कार‘ या विषयाचे परमार्थाचे पायाशुध्द व्याकरण तयार करणारे स्वतः साक्षात्कारी पुरूष होते. पाश्चिमात्य राष्ट्रांत डॉ. अंडरहिल व पौर्वात्य राष्ट्रांत गुरूदेव रानडे हे योगी अरविंद, रामकृष्ण परमहंस या कोटीतले पुरूष होते. वैज्ञानिकाला अणुरेणू जेवढे महत्त्वाचे वाटतात, त्याप्रमाणे ‘साक्षात्कार‘ विद्येला ईश्वराचे अस्तित्व हे एक पारमार्थिक वास्तव प्रिय असते.

    ३ जुलै, १८५६ साली कर्नाटकातील जामखिंडी गावात त्यांचा जन्म झाला. मुलाने शिकावे, मिळवते व्हावे, सुखाने संसार करावा हे तत्कालीन नीतीपाठ त्यांनाही मिळाले. पुण्यातील परशुराम हायस्कूलमधून ते मॅट्रिकच्या परीक्षेत जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती मिळवून मुंबई युनिव्हर्सिटीत दुसरे आले. डेक्कन कॉलेजात प्राचार्य बेन व प्रा. वुडहाऊस या थिऑसॉफिस्ट प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या पहिल्या-दुसर्‍या वर्षीच्या परिक्षेत पहिल्या श्रेणीत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. गणित विषयात ते दुसर्या वर्गात बी.ए. झाले. अशातच त्यांना क्षयाची बाधा झाली. ‘जातो तो दिवस आपला‘ असे जीवन ते जगू लागले. तरीही एम. ए. परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले.

    प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे त्यांनी ‘निबाळ‘ हे आपले खेडेगाव गाठले. अकादमी ऑफ फिलॉसॉफी अंॅड रिलिजन नावाचे अध्यात्मपीठ त्यांनी स्थापन केले. अॅनी बेझंट यांच्याशी त्यांची भेट झाली होती. गुरूदेवांच्या कृपाछत्राखाली तुम्ही सुखरूप आहात, हा आशीर्वाद त्यांनी दिला होता. पण अलाहाबादला कुलगुरू जगन्नाथ झा यांनी त्यांना विद्यापीठात तत्त्वज्ञान विषयाचे प्रमुख म्हणून बोलावले. विद्यापीठात १९२७ ते १९४६ पर्यंत प्राध्यापक , डीन, कुलगुरू इ. पदे त्यांनी भूषविली, तरी ‘साक्षात्कार‘ हा त्यांचा अनुभवविषय होता. ‘मिस्टिझम‘ हा मौनवाचक शब्द. ते सदा त्याच अवस्थेत असत. त्याचे संशोधन, विवरण, आकलन आणि प्रतिपादन हा त्यांचा स्थायी स्वभाव होता. ‘विश्वाचा मध्यबिंदू हा त्यांचा लेख जगभर गाजला .भूगर्भशास्त्रज्ञ पृथ्वीला मध्यबिंदू मानतात. तसा ईश्वर हा जगाचा मध्यबिंदू आहे पण ब्रांडाला परीघ नाही, हा त्यांचा सिध्दांत होता, पण तो आध्यात्मिक अनुभूतीवर आधारलेला आहे.

    तासनतास ते भावसमाधीत स्थिरावत. दि. ६ जून, १९५७ मध्ये ते त्या समाधीत स्थिरावले. ‘परमार्थ‘ हा मंदबुध्दीच्या व अनीतीमान व्यक्तींसाठी नसतो. आत्मज्ञान, आत्मदर्शन, आत्मसाक्षात्कार या सर्व पारमार्थिक संज्ञा आहेत. त्या समजण्यासाठी सदाचरणी सत्योपासना हेच साधन आहे.

  • राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अर्थतज्ञ चंद्रशेखर टिळक

    जागतिक मंदी आणि सामाजिक भारत, जागतिक मंदी आणि आपण, जागतिक मंदी आणि आपली गुंतवणूक, अर्थसंकल्पीय विष्लेषण, अर्थसंकल्पानंतरची गुंतवणूक, भारतीय भांडवल बाजार: २०१० आणि नंतर, आर्थिक घोटाळे आणि आम्ही, गुंतवणुकीचे समाजशास्त्र, गुंतवणूकीचे मानसशास्त्र, गुंतवणुकीतील धोक्यांचे नियोजन, स्वेच्छानिवृत्तीचे आव्हान, बदलते अर्थकारण – बदलते समाजकारण, जे.आर.डी. टाटा : शतकोत्तर विचार, आजच्या संदर्भात लोकमान्य टिळक, ‘वंदे मातरम्’चा कालखंड, आजच्या संदर्भात वंदे मातरम् , आजचे अध्यात्म, चला नवा भारत घडवूया, राष्ट्रनिर्मितीचे आव्हान, राष्ट्रवादाची बदलती संकल्पना, अल्केमिस्ट टू सी गल, व्हाया यू कॉन विन अशा विविध विषयांवर चंद्रशेखर यांची व्याख्याने झाली आहेत.

  • बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज

    बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायक मोहम्मद अझिज यांचा जन्म २ जुलै १९५४ रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला. मोहम्मद अझिज यांचे पूर्ण नाव सईद मोहम्मद अझिज उन नबी. ८० आणि ९० च्या दशकातले एक नावाजलेले गायक म्हणून त्यांचा लौकिक होता. मोहम्मद अझिज यांनी बॉलिवूड, उडिया आणि हिंदी चित्रपटांसह बऱ्याच प्रादेशिक भाषांमध्ये पार्श्वगायन करून हिट गाणे दिली. मोहम्मद अझिज यांनी 'दूध का कर्ज', 'खुदा गवाह', 'हीना', 'स्वर्ग', 'गीत' यासारख्या चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले.

    'प्यार हमारा अमर रहे', 'ऐ मेरे दोस्त', 'तेरी बेवफाई का शिकवा', 'मितवा भूल ना जाना', 'फूल गुलाब का', 'दुनिया में कितना गम है', 'रब को याद करु', 'बहुत जताते हो', 'तू कल चला जायेगा', 'हम तुम्हें इतना', 'माय नेम इज लखन', 'तुने प्यार की बिन बजाई', 'तुमसे बना मेरा जीवन', यासारखी हिट गाणी गायली आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    मोहम्मद अझिज यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=MNOjKA6vO-0
    https://www.youtube.com/watch?v=zczC3QjqArA

  • क्रिकेटपटू सुभाष गुप्ते

    सुभाष गुप्ते हे लेगस्पिनचे बादशहा. ३६ कसोट्यांमधून १४९ बळी मिळविलेले सुभाष गुप्ते हे आंतरराष्ट्रीय क्षितिजावरील सर्वाधिक चमकदार फिरकीपटूंपैकी एक होते. फलंदाजाने आक्रमक रूख़ अंगिकारल्यास मात्र गुप्ते काहीसे धास्तावतात असेही निरीक्षण या संघातील खेळाडूंनी नोंदविलेले आहे.

  • माणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)

    “इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण केले होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते, तर “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा”चे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.

  • प्रवीण अनंत दवणे

    अशा हृदयातून ऐकणार्‍या रसिकांसाठी ज्यांनी गेली तीन दशकं आपल्या लेखणीतून २००० हून अधिक गीतं लिहिली आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यापासून ते साधना सरगम यांच्यापर्यंत आणि सुरेश वाडकरांपासून ते शंकर महादेवन यांच्यापर्यंतच्या सर्व दिग्गज गायकांनी ती गायली, ती गीतं लिहिणारे ठाण्यातील ज्येष्ठ कवी, गीतकार, लेखक, सुसंवादक म्हणजे प्रवीण दवणे !